धावत्या दुचाकीवरून सेल्फी काढणे पडले महागात, एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर

इमेज
  धावत्या दुचाकीवरून सेल्फी काढणे पडले महागात, एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर बीड  : सध्या सेल्फिचा ट्रेण्ड आहे. धावत्या दुचाकीवरून सेल्फी रिल बनवीत असतानाच, अपघात होवून एकाचा जागीच मृत्यू झालाय. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपासवर घडली आहे. तर हा अपघात होतानाची दृश्ये त्यांनी घेतलेल्या सेल्फी व्हिडीओत कैद झाली आहेत. दोघंही तरुण जालन्याचे रहिवासी आहेत. सोलापूर- धुळे महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असून आता एक नवीनच प्रकार समोर आला आहे दुजाकी वर असलेल्या दोघांचा सेल्फी काढण्याच्या नादात अपघात झाला या अपघातात एकाला आपले प्राण गमवावे लागले तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू असून हे दोघेही जालना जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते त्या दिशेने पोलिस आता अधिक तपास करत आहेत.

MB NEWS:१७५ वर्षे जुनी सावित्रीबाईंची शाळा होणार राष्ट्रीय स्मारक

 १७५ वर्षे जुनी सावित्रीबाईंची शाळा होणार राष्ट्रीय स्मारक



पुणे: ज्या काळात आपल्या देशात महिलांना शिक्षणासाठी शाळाच नव्हत्या. बाहेर पडायची देखील सोय नव्हती, अशावेळी समाजाचा विरोध पत्करून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात १७५ वर्षांपूर्वी पहिली मुलींची शाळा सुरू केली, त्या शाळेचे आता राष्ट्रीय स्मारकात रूपांतर होणार आहे. ३ जानेवारी रोजी सावित्रीबाईंची जयंती आहे. त्यानिमित्त सावित्रीबाईंचे पुन्हा स्मरण करणे क्रमप्राप्त आहे.

३ जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. सन २०१५ मध्ये पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले. ३ जानेवारी, २०१७ रोजी सावित्रीबाई फुले यांच्या १८६ व्या जन्मदिनानिमित्त त्यांचे ‘गुगलडुडल’ प्रसिद्ध करून गुगलने त्यांना अभिवादनही केले होते.

सावित्रीबाईंच्या आठवणीने आजही रोमांच

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाड्यात सुरू केली आणि स्त्रीमुक्तीची पहाट झाली. फातिमाबी शेख या त्यांच्या सहकारी होत्या. तात्याराव भिडे यांनी ही जागा शाळेला दिली. तेव्हापासून भिडेवाड्यातील मुलींची पहिली शाळा ही ओळख कायम आहे. या वाड्याच्या जागी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक करून शाळा नव्याने उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच केली आहे. त्यामुळे या शाळेचा लवकरच कायापालट होणार आहे.

डॉ. बाबा आढाव यांनी वेधले सरकारचे लक्ष!

ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी शाळेची दुरवस्था पाहून आंदोलनाची हाक दिली आणि त्या ठिकाणी वारंवार आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीदेखील यात लक्ष घालून त्या वास्तूचे पुनर्वसन करण्याची घोषणा केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?