पोस्ट्स

ऑक्टोबर ११, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MB NEWS:अट्टल मोटारसायकल चोर जेरबंद; जिल्हा व जिल्ह्याबाहेर चोरी केलेल्या ९मोटारसायकली हस्तगत

इमेज
  अट्टल मोटारसायकल चोर जेरबंद; जिल्हा व जिल्ह्याबाहेर चोरी केलेल्या ९मोटारसायकली हस्तगत परळी वैजनाथ, प्रतिनिधी...    मोटारसायकल चोरी करून त्या विक्री करणार्या एका अट्टल मोटारसायकल चोराला जेरबंद करण्यात परळी पोलीसांच्या डीबी शाखेच्या पोलिस पथकाला यश मिळाले आहे.या चोराकडून जिल्हा व जिल्ह्याबाहेर चोरी केलेल्या ९ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.     याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, परळी शहरात तहसील समोरील मैदानावरुन शेख शाहेद वाजेद यांची मोटारसायकल चोरीला गेली होती.याबाबतचा गुन्हा शहर पोलिस ठाण्यात दाखल आहे.या गुन्ह्यात तपास सुरू असताना गुप्त माहिती मिळाल्यानंतर संशयित म्हणून मरळवाडी ता.परळी येथील राहणार आरोपी राजाभाऊ रतन ताटे यास चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने मोटारसायकल चोरी केल्याचे मान्य केले.अधिक तपास केला असता त्याने बीड जिल्ह्यात व अन्य नाशिक, जळगाव, पुणे येथे ही चोर्या केल्याचे त्याने कबुल केले.तसेच चोरी करून आणलेल्या मोटारसायकली विक्री ला ग्राहक मिळाले नाही त्यामुळे मरळवाडी  शिवारात झाडा झुडुपांमध्ये लपवून ठेवल्याचे उघड झाले.पोलीसांनी वेगवेगळ्या कंपनीच्या ९ गाड्या

MB NEWS:धनंजय मुंडे अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची करणार बांधावर जाऊन पाहणी*

इमेज
 *धनंजय मुंडे अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची करणार बांधावर जाऊन पाहणी* *रविवारी गेवराई, माजलगाव आणि वडवणी तालुक्याचा करणार दौरा* बीड (दि. १७) ---- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे हे रविवारी (दि. १७) बीड जिल्ह्यात दौरा करून अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करणार आहेत.  रविवारी ना. मुंडे हे सकाळी 10 वाजेपासून गेवराई तालुक्यातील हिरापुर, इटकुर, मादळमोही, मिरकाळा, नंदपूर आदी गावांमध्ये प्रत्यक्ष बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. यावेळी ना. मुंडे यांच्यासह माजी आ. अमरसिंह पंडित, महसूल, कृषी आदी विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. गेवराई नंतर दुपारी 1 वाजल्यापासून माजलगाव व वडवणी तालुक्यातही ना. धनंजय मुंडे हे आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्यासह माजलगाव तालुक्यातील तालखेड, फुलेपिंपळगाव, नित्रुड, वडवणी तालुक्यातील मोरवड, पुसरा आदी गावांमध्ये प्रत्यक्ष शेतावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करतील.  बीड जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले असून, राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना दिलासा मिळव

MB NEWS:कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठाणचा उपक्रम

इमेज
  भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी   कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठाणचा उपक्रम परळी I प्रतिनिधी       भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थी व युवकांनी विविध विषयांवरील लेखांचे वाचन केले.       कृष्णनगर(अंबलवाडी) येथे कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठाण संचलित वृत्तपत्र वाचनालयाच्या वतीने वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले त्यांनतर गावातील विद्यार्थी , विद्यार्थिनी व युवकांनी विविध विषयांवरील लेखांचे वाचन केले.        संस्थेचे अध्यक्ष राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास माजी उपसरपंच परमेश्वर काळे, मारूती भास्कर, अक्षय काळे, मंगेश भास्कर,  ऋषिकेश काळे, वर्शिकेत भाकरे, संतोष काळे, संदीप भास्कर, गणेश पोते, अंबादास भास्कर, बळीराम तरकसे, गणेश काळे, संदेश काळकोपरे

MB NEWS:पीकाच्या नुकसानीचे भरपाई द्या अन्यथा तीव्र करू-साईराजे देशमुख

इमेज
  पीकाच्या नुकसानीचे भरपाई द्या अन्यथा तीव्र करू-साईराजे देशमुख   परळी(प्रतिनिधी):-ऑक्टोबरध्ये झालेला अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पंचनाम्याच्या फेऱ्यात न अडकविता शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी ५०,०००रूपय मदत करावी अन्यथा अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष मा.नानासाहेब जावळे पाटील , याचा नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा अ.भा.छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष साईराजे देशमुख यांनी दिला.       तालुकाध्यक्ष साईराजे देशमुख यांनी दिलेल्या पत्राद्वारे म्हटले होते की चालू खरीप हंगामाध्ये चांगला पाऊस झाल्यानंतर कापूस,तुर,सोयाबीन, बाजरी,आदी पीके चांगली आली होती. परंतु ऑक्टोबर चा परतीच्या पावसामुळे होत्याचे नव्हते झाले हाता तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावून घेतला गेला.कापसाच्या वाती झाल्या.सोयाबीन कोम फुटले, काढून ठेवलेल्या बाजरीचे भिजल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.अशा परिस्थिती मध्ये सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे.मंत्र्यांनी मंत्रालयात बसून चौकशी करण्यापेक्षा शेतकऱ्यांचा बादावर जाऊन त्यांचे हाल विचारावेत आणि तात्काळ शेतकऱ्यांना हेक्टरी ५०,०००हजा

MB NEWS:माणूसकीची भिंत-आज होणार शुभारंभ

इमेज
   राधा-मोहन साथी प्रतिष्ठाण व दै.मराठवाडा साथीच्या वतीने उभारली माणूसकीची भिंत   * आज होणार शुभारंभ; नको असेल ते द्या, हवे ते घेऊन जा ..*  परळी (प्रतिनिधी-) राधा-मोहन साथी प्रतिष्ठाण व दै.मराठवाडा साथीच्या वतीने आज स्व. मोहनलालजी बियाणी अन्नछत्र परिसरात माणूसकीची भिंत या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचा शुभारंभ होत असल्याची माहिती मुख्य मार्गदर्शक तथा दै.मराठवाडा साथीचे संपादक चंदुलाल बियाणी यांनी दिली. आपल्याला नको असेल ते येथे द्या, ज्याला हवे असेल तो गरजवंत येथून घेऊन जाईल अशी या माणूसकीच्या भिंतीमागील भूमिका आहे. अन्नछत्रच्या वतीने 20 रुपयांत जेवण देण्यासोबतच शहरतील 5 सार्वजनिक स्थळी मोफत अन्नदान मागील वर्षभरापासून करण्यात येत आहे. आपल्याला आवडीच्या वस्तू आपण खरेदी करतो, अनेकदा अशा वस्तू कालबाह्य झाल्यानंतर त्या इतरत्र फेकून देतो. परंतु आपल्या जिवनावश्यक वस्तूंच्या यादीतील वापरलेले कपडे, चष्मे, बॅटरी, जूनी सायकल, घड्याळ, पुस्तक, वह्या, पेन, पेन्सील व अन्य अशा अनेक वस्तू आपण टाकून देत असतो. आपल्यासाठी वापरात नसलेल्या या वस्तू गरिबांसाठी केवळ जिवनावश्यकच नाही तर त्या उपयुक्तही असतात. या पार

MB NEWS:अखिल तेली समाज संघटन महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी प्राचार्या डॉ रेखाताई परळीकर यांची निवड

इमेज
  अखिल तेली समाज संघटन महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी प्राचार्या डॉ रेखाताई परळीकर यांची निवड परळी वैजनाथ दि.१६ (प्रतिनिधी)                अखिल तेली समाज संघटन महाराष्ट्र राज्य या संघटनेची बीड जिल्हा महिला आघाडी नुतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून जिल्हाध्यक्षपदी प्राचार्या डॉ. रेखाताई परळीकर यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष दिलीप चव्हाण व जिल्हाध्यक्ष महादेव लोमटे यांनी नुकतीच केली आहे. याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.                 अखिल तेली समाज संघटन महाराष्ट्र राज्य या संघटनेचे प्रदेश अध्यक्ष दिलीप चव्हाण व जिल्हाध्यक्ष महादेव लोमटे यांनी नुकतीच एका आँनलाईन बैठकीच्या माध्यमातून महिला आघाडीची नुतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी येथील महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखाताई परळीकर यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. रेखाताई परळीकर या सतत सामाजिक शैक्षणिक कार्यात अग्रेसर असतात. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात २००३ पासून प्राचार्या म्हणून कार्यरत आहेत. १७ वर्षे प्राचार्या म्हणून यशस्वी कारकिर्द आहे. शैक्षणिक क्षेत्रातील

MB NEWS:पीकाच्या नुकसानीची भरपाई द्या अन्यथा तीव्र आंदोलन करू-जिल्हाध्यक्ष निळंकठ चाटे

इमेज
  पीकाच्या नुकसानीची भरपाई द्या अन्यथा तीव्र आंदोलन करू-जिल्हाध्यक्ष निळंकठ चाटे बीड (प्रतिनिधी) :- ऑक्टोंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पंचनाम्याच्या फेऱ्यात न अडकविता शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी अन्यथा माजी मंत्री पंकजाताई मुंडे आणि खा.प्रीतमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी दिला आहे.        जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, चालु खरीप हंगामामध्ये चांगला पाऊस झाल्यानंतर कापूस, तुर, सोयाबीन, बाजरी आदी पीके चांगली आली होती. परंतु ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने होत्याचे नव्हते झाले. हाता तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावून घेतला गेला. कापसाच्या वाती झाल्या. सोयाबीन कोम फुटले, काढून ठेवलेल्या बाजरीचे भिजल्यामुळे नुकसान झाले. अशा परिस्थितीमध्ये सरकारने आता शेतकऱ्यांना तात्काळ मदत करणे गरजेचे आहे. मंत्र्यांनी मंत्रालयात बसून चौकशी करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांचे हाल पहावेत अशी मागणी करतानाच तात्

MB NEWS:नवरात्रोत्सवाच्या प्रारंभानिमित्त धनंजय मुंडे यांनी दिल्या बीड जिल्हावासीयांना शुभेच्छा

इमेज
 *नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करा; गरबा, दांडिया यासह नवरात्रातील कार्यक्रमांबाबत शासकीय सूचनांचे पालन करा - धनंजय मुंडे* नवरात्रोत्सवाच्या प्रारंभानिमित्त धनंजय मुंडे यांनी दिल्या बीड जिल्हावासीयांना शुभेच्छा बीड (दि. १६) ---- : बीड जिल्ह्यासह राज्य व देशभरात उद्यापासून नवरात्रोत्सव आरंभ होत असून, कोरोनाच्या वाढत्या आकडेवाऱ्या लक्ष्यात घेत या नवरात्रोत्सवात घटस्थापना, देवी आदिशक्तीची स्थापना, गरबा, दांडिया यासह अन्य उपक्रम व सार्वजनिक कार्यक्रम टाळावेत. विविध मंडळांनी शासकीय सुचनांचे पालन करून अधिकृत परवानगी घेऊनच देवी स्थापना करावी व साध्या पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा करावा असे आवाहन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी केले आहे. नवरात्रोत्सव प्रारंभ होण्याच्या पूर्वसंध्येला जिल्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी जिल्हावासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत, तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे. बीड जिल्हा प्रशासन व राज्य शासनाने नवरात्रोत्सव साजरा करण्याबाबत विशेष नियमावली घोषित केली आहे, त्या नियमावलीचे काटेकोर पालन करत, देवी स्थापना तसेच जिल्ह

MB NEWS:डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी - ओमप्रकाश बुरांडे

इमेज
 डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी - ओमप्रकाश बुरांडे   परळी येथे कामगार कल्याण केंद्रात डाॅ. कलामांना अभिवादन  परळी (प्रतिनिधी) : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे कार्य प्रत्येक तरुणांना प्रेरणा देणारे आहे. रामेश्वरम मधील एका छोट्या गावापासून ते राष्ट्रपतिपदापर्यंत झालेला डॉ. कलाम यांचा विलक्षण प्रवास युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार ओमप्रकाश बुरांडे यांनी केले.  येथील कामगार कल्याण केंद्रात भारतरत्न माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त गुरूवारी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार ओमप्रकाश बुरांडे बोलत होते. पत्रकार जगदीश शिंदे, केंद्र संचालक आरेफ शेख यांची उपस्थिती होती. युवकांनी पुस्तक हेच आपले वैभव आहे, हे डाॅ. कलाम यांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन ओमप्रकाश बुरांडे यांनी केले. उज्वला बडवे, सोनम गव्हाणे, मसरत खान, तुलसी कमलू, काजल भोसले यांच्यासह विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.   

MB NEWS: बीड जिल्हा कोरोना अपडेटस्: आज दि.१६ आॅक्ट़ोबर प्राप्त अहवाल....

इमेज
 *बीड जिल्हा कोरोना अपडेटस्: आज दि.१६ आॅक्ट़ोबर प्राप्त अहवाल....* जिल्ह्यात १२१ रिपोर्ट पाॅझिटिव्ह. ६४७ अहवाल प्राप्त झाले. *परळीत केवळ २ रिपोर्ट पाॅझिटिव्ह जिल्ह्यात ५२६ रिपोर्ट निगेटिव्ह. ------------------ *बीड ४०, अंबाजोगाई १०, आष्टी १४, धारूर १२, गेवराई ८, केज ४, माजलगाव १०, परळी २ , पाटोदा ८, शिरूर १०तर वडवणी ३ रुग्ण*

MB NEWS:पंढरपूर दुर्घटना:मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश(Reporter-Rameshwar Nanaware)

इमेज
  पंढरपूर दुर्घटनेस जबाबदार असलेल्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश  पंढरपुर, प्रतिनिधी.... पंढरपूरच्या कुंभारघाटावरील भिंत कोसळून झालेल्या सहा जणांच्या मृत्यूची चौकशी करुन दुर्घटनेतील दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे आदेश उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी दिले. राज्यातील पूर परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांनी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. राज्याच्या कोकण, पश्चिम व मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, विदर्भासह अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेती व घरांचे नुकसान झाले आहे. येथील नुकसानीची त्यांनी माहिती घेतली. हवामानखात्याने दिलेल्या इशाऱ्याची नोंद घेऊन नागरिकांनी खबरदारी घ्यावी, पोलिस व प्रशासनाने सतर्क रहावे, अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी संबंधित जिल्हा व पोलिस प्रमुखांना दिल्या. अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून सतर्क राहण्याचे व बचाव, मदतकार्य तत्परतेने करण्याचे त्यांनी निर्देश दिले. पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसाने अनेक वसाहतीत पाणी शिरल्याचा व झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत, त्याचीही

MB NEWS:वोडाफोन-आयडियाचे नेटवर्क ढेपाळले ; अर्धा महाराष्ट्र झाला नाॅट रिचेबल

इमेज
  वोडाफोन-आयडियाचे नेटवर्क ढेपाळले ; अर्धा महाराष्ट्र झाला नाॅट रिचेबल मुंुुंुंुुुंुुंुंुुंुुंुुुंुुंु मुंबई: देशातील आघाडीची मोबाईल सेवा पुरवठादार असलेल्या वोडाफोन-आयडियाचे मोबाईल नेटवर्क पूर्णपणे ढेपाळले आहे. पुण्यात झालेल्या तांत्रिक बिघाडाने राज्याच्या निम्म्याहून जास्त सर्कलमध्ये ग्राहकांना Vi च्या कनेक्टिव्हिटी फेल्युअरचा त्रास सहन करावा लागत आहे. कंपनीच्या या ढिसाळ कारभारावर ग्राहकांनी सोशल मीडियावर जोरदार टीका केली आहे. राज्यातील काही भागातत बुधवार रात्रीपासून Vi चे नेटवर्क गुल झाले आहे. विशेष म्हणजे पुणे आणि आसपास भागात Vi च्या ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुंबईत देखील काही ठिकाणी Vi चे नेटवर्क डाउन झाले आहे. याबाबत Vi च्या ग्राहकांनी सोशल मीडियावर कंपनीबाबत पोलखोल केली. नेटवर्क नसल्याने ग्राहकांना कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राशी देखील संपर्क करणे अवघड बनले आहे. काहींनी ट्विटरवर Vi च्या नेटवर्कबाबत तीव्र नाराज व्यक्त केली आहे. यामुळे ट्विटरवर वोडाफोन टॉप ट्रेंडिंगमध्ये आला आहे. पुणे शहरात बुधवारी रात्री धुमाकूळ घातलेल्या पावसाने गेल्या दहा वर्षातील सर्व विक्रम

MB NEWS:परळीत बाजार समिती परिसरात स्वयंचलीत निर्जंतुकीकरण केंद्राचा शुभारंभ

इमेज
  परळीत बाजार समिती परिसरात स्वयंचलीत निर्जंतुकीकरण केंद्राचा शुभारंभ • मोंढ्यातील व्यापारी,शेतकरी, नागरिकांना उपयुक्त  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-          सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी परळीत राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने प्रयत्नशील आहे.त्याअनुषंगाने विविध उपक्रम राबविले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे लीगल सेलचे अध्यक्ष अँड. मनजीत सुगरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कृषी उत्पन्न बाजार समिती प्रांगणात स्वयंचलीत निर्जंतुकीकरण केंद्राचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.           देशासह संपूर्ण जगात सद्यस्थितीत कोरोना विषाणुसंसर्ग आजाराच्या जागतिक महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. त्यामुळे देशात व राज्यात आपत्कालीन परिस्थती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात येणाऱ्या शेतकरी नागरिकांना व्यापारी यांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपयुक्त असे स्वयंचलीत निर्जंतुकीकरण यंत्राचे लोकार्पण

MB NEWS:प्रभाग क्रमांक ५ मधील लाभार्थ्यांना घरकुलचे पहिल्या टप्प्यातील धनादेश प्रदान

इमेज
  प्रभाग क्रमांक ५ मधील लाभार्थ्यांना घरकुलचे पहिल्या टप्प्यातील धनादेश प्रदान  परळी वैजनाथ,प्रतिनिधी... परळी शहरातील विविध भागातील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १३५७ प्रस्ताव मंजूर झाले  आहेत. त्यांपैकी ४०६ लाभार्थींना  धनादेश  वाटप करण्यात येत आहेत. ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळी शहरातील पंतप्रधान आवास योजनेतील ४०६ लाभार्थींना पहिल्या टप्प्यातील प्रत्येकी ४० हजार रुपये रक्कमेचे धनादेश वितरित करण्याचा नुकताच शुभारंभ करण्यात आला.       सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व न.प.गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या सहकार्याने नगर परिषदेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रभाग ५ मधील लाभार्थ्यांना घरकुलचे पहिल्या टप्प्यातील धनादेश प्रदान करण्यात आले.घरकुल योजनांमूळे नविन वास्तू निर्मिती होतील.या कार्यक्रमास माझ्यासह, लक्ष्मण वाघमारे, बळीराम नागरगोजे, हनुमान आगरकर, दिनेश आमले, अर्जुन साखरे, सचिन लगड, सचिन आरसुडे, रावसाहेब आंधळे, उत्तम आरसुळे, राजाभाऊ गित्ते, गोविंद कुकर,बालाजी काळे, शैलेश कदम, मुंजाजी तळेकर, यांच्यासह अनेक मान

MB NEWS: धनादेश वाटप (MB NEWS-Reporter Parli vaijanath)

इमेज
  प्रभाग 4 व प्रभाग 15 मधील लाभार्थ्यांना घरकुलचे पहिल्या टप्प्यातील धनादेश प्रदान परळी वैजनाथ,प्रतिनिधी..    राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रभाग 4 व प्रभाग 15 मधील लाभार्थ्यांना घरकुलचे पहिल्या टप्प्यातील धनादेश प्रदान करण्यात आले.     परळी शहरातील विविध भागातील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १३५७ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. त्यांपैकी ४०६ लाभार्थींना धनादेश वाटप करण्यात येत आहेत. ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळी शहरातील पंतप्रधान आवास योजनेतील ४०६ लाभार्थींना पहिल्या टप्प्यातील प्रत्येकी ४० हजार रुपये रक्कमेचे धनादेश वितरित कयण्याचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. घरकुल योजनांमूळे परळीच्या जुन्या गावभागात नविन वास्तू निर्मिती होतील.या अनुषंगाने प्रभाग 4 व प्रभाग 15 मधील लाभार्थ्यांना घरकुलचे पहिल्या टप्प्यातील धनादेश वाटप कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी,माजी नगराध्यक्ष जाबेरखान पठाण, नगरसेवक अनिल आष्टेकर, गोविंद

MB NEWS:अखंडीत वीज पुरवठा सुरू ठेवा -शिवकुमार केदारी (Reporter-Parli vaijanath)

इमेज
  विद्यार्थ्यांचा ऑनलाईन  परीक्षा काळ असल्यामुळे अखंडीत वीज पुरवठा सुरू ठेवा -शिवकुमार केदारी  परळी वैजनाथ,प्रतिनिधी            परळी शहरात वारंवार व दीर्घकालीन वीज पुरवठा खंडित होत आहे. सध्या उच्च शिक्षणा पर्यंत च्या सर्वच वर्गातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा सुरू आहेत व याच परीक्षा काळात दिवसभर सतत वीज पुरवठा खंडित होत आहे  त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे अचानक वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा व पालकांचा गोंधळ उडतो आहे.  विद्यार्थी व्यवस्थित परीक्षा ही देऊ शकत नाहीत. वीज पुरवठा बराच काळ खंडीत राहिल्यामुळे इंटरनेट/Wifi कनेक्शन वर ही परिणाम होत आहे ते ही जास्त कालावधीच्या विद्युत पुरवठया अभावी व्यवस्थित चालत नाही त्यामुळे विद्यार्थी जास्त अडचणीत येत आहेत. आधीच कोरोना परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे  व त्यात त्यांनी ऑनलाईन घेतलेल्या शिक्षणाचीही ते नीट परीक्षा  देऊ शकत नाहीत. यामुळे त्यांचे पूर्णत: नुकसान होत आहे . त्यामुळे अखंडित वीजपुरवठा ठेवा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार केदारी यांनी निवेदनाद्वारे केली आह

MB NEWS:चंद्रभागेच्या तिरावर नव्याने बांधण्यात आलेला घाट खचला ;नागरीक दबले(Reporter- Rameshwar Nanware))

इमेज
  चंद्रभागेच्या तिरावर नव्याने बांधण्यात आलेला घाट खचला;चार ते पाच नागरीक दबले: मदतकार्य सुरू पंढरपुर, प्रतिनिधी.... पंढरपुरातील चंद्रभागा नदीकडेला असलेला नव्याने बांधण्यात आलेला घाट खचला असून त्यामध्ये चार ते पाच नागरिक दबले गेले आहेत.दरम्यान, दबलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी भर काढण्यात येत आहे.या घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर घटनास्थळी पोहोचले आहेत.पंढरपूर शहरातील विविध झोपडपट्ट्यांमधील घरांमध्ये शिरले पावसाचे पाणी पंढरपूर तालुक्यांमध्ये काल रात्रीपासून संततधार पाऊस पडत असल्याने पंढरपूर शहरातील विविध झोपडपट्ट्यांमधील घरांमध्ये पाणी घुसले आहे. महसूल प्रशासनाने दिनांक 13 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र मध्ये पावसाच्या अतिवृष्टीचा इशारा दिला असून काल रात्रीपासून सुरू झालेला पाऊस आज दुपारी साडे तीन पर्यंत कसलाच न थांबल्यामुळे पंढरपूर शहरातील अनिल नगर आणि विविध भागातील इतर झोपडपट्ट्यांमध्ये ही गोरगरिबांच्या घरामध्ये पाणी घुसले असल्याने त्यांचे कौटुंबिक जीवन विस्कळीत झाले आहे.

MB NEWS:भाजप युवानेते राजेश गिते यांच्या संपर्क कार्यालयात विजयकुमार खोसे यांचा सत्कार

इमेज
  भाजप  युवानेते राजेश गिते यांच्या संपर्क कार्यालयात विजयकुमार खोसे यांचा सत्कार परळी वैजनाथ, प्रतिनिधी... भाजप सोशलमीडिया महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री.विजयकुमार खोसे यांच्या वाढदिवसानिमित्त जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती, जि.प बीड चे सदस्य राजेश गित्ते यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी नंदनज चे सरपंच अनिल गुट्टे, मिरवट चे सरपंच धुराजी साबळे चेअरमन भरत इंगळे,भाजप नेते मुंजाभाऊ इंगळे, उपस्थित होते

MB NEWS: हैदराबादेत आभाळ फाटलं. (MB NEWS Rporter-Govind Deshmukh)

इमेज
 🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑                                       -----------------------------------     *आंध्र, तेलंगणात पावसाचं तांडव; हैदराबादेत आभाळ फाटलं, १४ जणांचा मृत्यू,पूरसदृश्य स्थिती*                            -----------------------------------  हैदराबाद/गोविंद देशमुख.......... बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं अनेक राज्यात पाऊस कोसळत असून, आंध्र प्रदेश व तेलंगानात तर अक्षरशः तांडव घातलं आहे. गेल्या २४ तासात दोन्ही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून, पावसामुळे हैदराबादमधील अनेक भागांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. मदतकार्य करण्यासाठी शहरातील रस्त्यावर बोटीतून प्रवास करावा लागत आहेत. हैदराबादमध्ये झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे. बंगालच्या उपसागरात व काकीनाडा किनारपट्टी लगतच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं हवामान विभागानं महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणासह काही राज्यात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला होता. वातावरणात झालेल्या बदलांमुळे गेल्या २४ तासांपासून पाऊस सक्रिय झाला असून, आंध्र प्रदेश व तेलंगणात थै

MB NEWS:पाऊसाची शक्यता* खबरदारीसाठी काळजी घेण्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन

इमेज
*बीड जिल्हयात विजेच्या कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह अतिमुसळधार पाऊसाची शक्यता* खबरदारीसाठी काळजी घेण्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन बीड, दि. १४ ::- जिल्हयात 13 ते 17 आॅक्टोबर 2020 या काळात विजेच्या कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह मूसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांच्या सुचनेनुसार हा बीड सह मराठवाडयातील जिल्ह्यात हा इशारा देण्यात आला आहे.  *खबरदारीची उपाययोजना म्हणुन खालील प्रमाणे काळजी घ्यावी.यासाठी पुढील गोष्टी करा:* 1. विजेच्या गडगडाटासह पावसाची पुर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळया जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालुन बसा. 2. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओटयावर थांबू नका. 3. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालु असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. 4. तारांचे कुंपन विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तुपासून दुर रहा. 5. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.     

MB NEWS:खरीप पिकांचे काढणी पश्‍चात नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांनी विमा कंपनीस कळवावे-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

इमेज
  खरीप पिकांचे काढणी पश्‍चात नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांनी विमा कंपनीस कळवावे-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड......       खरीप पिकांचे काढणी पश्‍चात नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांनी विमा कंपनीस कळवावे असे आवाहनजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.                पंतप्रधान विमा योजनेअंतर्गत खरीप पिकांचे काढणी पश्‍चात नुकसान झाले असल्यास विमा कंपनीस कळवणे आवश्यक आहे. माहे ऑक्टोबर महिन्यात बीड जिल्ह्यामध्ये सर्वत्र पाऊस होत आहे. सध्या खरीप पीक काढणी हंगाम अंतिम टप्प्यात आहे व काही शेतकऱ्यांनी पिके काढून गोळा न करता शेतात वाळवण्यासाठी ठेवलेले आहेत. मागील दोन-तीन दिवसात झालेल्या पावसामुळे सदरील पिकांचे नुकसान झाले असल्यास या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरविला आहे. त्यांनी अधिसूचित पिकांसाठी च्या अधिसूचित क्षेत्रातील शेतात कापणीपासून 14 दिवसाच्या आत गारपीट ,चक्रीवादळ , अतिवृष्टी , ढगफुटी व अवकाळी यामुळे झालेल्या नुकसानीचे वैयक्तिक स्तरावरून पंचनामे करून नुकसान ग्राह्य धरता येतात. यासाठी शेतकऱ्यांनी सदरची घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत याबाबतची सूचना विमा कंपनी व कृषी विभागास दे

MB NEWS:बीड जिल्हा कोरोना अपडेटस्: आज दि.14 आॅक्ट़ोबरप्राप्त अहवाल....*

इमेज
  बीड जिल्हा कोरोना अपडेटस्: आज दि.14  आॅक्ट़ोबरप्राप्त अहवाल....* जिल्ह्यात 115  रिपोर्ट पाॅझिटिव्ह. 669 अहवाल प्राप्त झाले. *परळीत 4 रिपोर्ट पाॅझिटिव्ह जिल्ह्यात 544 रिपोर्ट निगेटिव्ह. ------------------

MB NEWS:महाराष्ट्रावर अस्मानी संकट; सतर्क राहण्याचे आवाहन -----------------------------------

इमेज
महाराष्ट्रावर अस्मानी संकट; सतर्क राहण्याचे आवाहन  -----------------------------------      मुंबई.........  पुढील चार दिवस महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने (आयएमडी) वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पुढील तीन दिवसांत महाराष्ट्रावरून सरकत 16 ऑक्टोबरच्या सकाळी अरबी समुद्रात प्रवेश करण्याचा अंदाज आहे. आयएमडीच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राने मंगळवारी सकाळी आंध्र प्रदेशची किनारपट्टी ओलांडली. हे क्षेत्र पश्चिम दिशेला सरकत असून, 14 आणि 15 तारखेला महाराष्ट्रावरून त्याचा प्रवास होईल. 16 तारखेच्या सकाळी कमी दाबाच्या क्षेत्राचे अवशेष उत्तर कोकण आणि गुजरात किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यानंतर कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
इमेज
  परळीकरांना दिलासा नक्की पण हुरळून जाण्याची गरज नाही तर आणखी सतर्क राहण्याची गरज ⬛ बिनधास्त नाही तर बंदिस्त राहण्याला मोठेपणा समजावा ......! ----------------     -     ----------- -   प्रा.रविंद्र जोशी   परळी वैजनाथ  ......................  परळीचे आजचे प्राप्त आहवाल निगेटिव्ह आल्याचे दिसून येते. खरंतर ही आनंदाची गोष्ट आहे मात्र एक दिवसाच्या अहवालानंतर आपण कोरोनासंसर्ग मुक्त झालो असं मानायची खरंच गरज नाही उलट यावर प्रत्येकाने गंभीर होण्याची गरज आहे. दिलासा नक्की पण हुरळून जाण्याची गरज नाही तर आणखी सतर्क राहण्याची गरज आहे. बिनधास्त नाही तर बंदिस्त राहण्याला मोठेपणा समजला गेला पाहिजे.   -  --- -   संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आले. यामध्ये जग हळू हळू विळख्यात जात राहिले. महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर लाॅकडाउनचा पर्याय निवडण्यात आला. लाॅकडाउन पहिल्यांदाच आपण अनुभवत होतो. सर्वांसाठी हळूहळू आता ती जीवनशैली आपल्या अंगवळणी पडली आहे. बीड जिल्ह्यामध्ये कोरोना लागण होण्याचे प्रमाण सुरुवातीला खुप कमी होतं. परळी तालुक्यात तर कोरोना प्रभावी लाटेमध्ये असताना परळी तालुका हा पुर्णतः सुरक्षित होता. कोरो

MB NEWS:खूषखबर : आजच्या अहवालात परळीत पाॅझिटिव्ह रिपोर्ट निल...

इमेज
  खूषखबर : आजच्या अहवालात परळीत पाॅझिटिव्ह रिपोर्ट निल... *काल परळीत एकही करोना +ve पेशंट सापडला नाही* परळी वैजनाथ, प्रतिनिधी....    दररोजच्या प्रमाणे आजचे ही covid-19 चे प्रशासकीय अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये परळी तालुक्याचा अहवाल संपूर्ण स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. आनंदाची गोष्ट अशी आहे  की आजच्या अहवालांमध्ये पॉझिटिव्ह च्या आकडेवारीत परळी तालुका निल दिसून येत आहे. मात्र हीच आकडेवारी नियमित सुरू राहणे आवश्यक आहे. दरम्यान आज आलेले अहवाल हे  परवा दिनांक अकरा रोजी घेण्यात आलेल्या स्वॅबचे आहेत. दिनांक अकरा रोजी परळीत एकूण तीस स्वॅब घेण्यात आले होते. ते सर्वच्या सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. काल दिनांक 12 रोजी परळीतून एकूण 35 स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचे अहवाल उद्या मिळणार आहेत. यामध्येही सुदैवाने सर्व अहवाल निगेटिव यावेत म्हणजे परळी तालुका शुन्य कोरोना  लक्ष्य पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करु शकतो असे म्हणता येईल.

MB NEWS:एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्या मुळे ओबीसी व अठरापगड समाजातील मुलांवर अन्याय ―प्रा.टी. पी.मुंडे*

इमेज
  एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्या मुळे ओबीसी व अठरापगड समाजातील मुलांवर अन्याय ―प्रा.टी. पी.मुंडे राज्य सरकारच्या निर्णयाचा प्रा.टी. पी. मुंडे यांच्याकडून जाहीर निषेध. परळी वैजनाथ,प्रतिनिधी... 11 ऑक्टोबर 2020 रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा सकल मराठा संघटनांनी आंदोलन केल्यामुळे राज्य सरकारने पुढे ढकलली त्यामुळे दिवस-रात्र अभ्यास करणाऱ्या ओबीसी व अठरापगड समाजातील  जातीच्या विद्यार्थ्यांवर या निर्णयामुळे अन्याय झाला असून या निर्णयाचा महाराष्ट्राचे ओबीसी नेते प्रा.टी.पी. मुंडे सर यांनी जाहीर निषेध केला आहे. कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजातील संघटनांनी आंदोलनाचा इशारा सरकारला दिला तेव्हा सरकारने या आंदोलनाला प्रतिसाद देत एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला परंतु त्यामुळे ओबीसी समाजातील व अठरापगड जातीच्या विद्यार्थ्यांनी दिवस-रात्र अभ्यासासाठी केलेली मेहनत वाया गेली याचा परिणाम एमपीएससी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झाला आहे . विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पोटाला चिमटा घेऊन त्यांना पुणे औरंगाबाद यासारख्या शहरांमध्ये शिकवणीसाठी अभ्यास करण्यासाठी खर्च

MB NEWS:अंबाजोगाई शहर पोलिसांनी पकडली बियरची चोरटी वाहतूक करणारी कार

इमेज
  अंबाजोगाई  शहर पोलिसांनी पकडली बियरची चोरटी वाहतूक करणारी कार  अंबाजोगाई, प्रतिनिधी   अंबाजोगाई शहर पोलिसांनी बियरची विक्री करण्याच्या उद्देशाने चोरटी वाहतूक करणारी कार बिअर च्या बॉक्स सह पकडली आहे. याप्रकरणी कार व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.   याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अंबाजोगाई शहरात मोंढा मार्केट कमानी समोर एक गजगा रंगाची ब्रेझा कार तिच्यामधून बियर विक्री करण्याच्या उद्देशाने बियर चे बॉक्स वाहतूक केले जात होते .ही कार व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. कारसह मुद्दे मालाची अंदाजे किंमत 1 लाख 10 हजार दोनशे रुपये इतकी आहे. याप्रकरणी पोलीस नाईक गोविंद येलमटे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे .अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेवरून पोलीस निरीक्षक सिद्धार्थ गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. अधिक तपास पोहा सोळंके हे करीत आहेत.

MB NEWS: "उमेद'' अभियान ही लाखो महिलांची उमेद ; हे अभियान सशक्त करणे गरजेचे पण ' उमेद माउलीला' पावसात आंदोलनाची वेळ - पंकजाताई मुंडे

इमेज
  "उमेद'' अभियान ही लाखो महिलांची उमेद ; हे अभियान सशक्त करणे गरजेचे पण ' उमेद माउलीला' पावसात आंदोलनाची वेळ - पंकजाताई मुंडे परळी वैजनाथ,प्रतिनिधी......."   "उमेद'' ही लाखो महिलांची उमेद ; हे अभियान सशक्त करणे गरजेचे पण ' उमेद माउलीला' पावसात आंदोलनाची वेळ आली आहे हे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया पंकजाताई मुंडे यांनी दिली आहे.   उमेद अभिमानातील महिलांचे आंदोलन सुरू आहे.पावसात हे आंदोलन झाले यावर ट्विट करून माजी ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.त्यांनी म्हटले आहे की, "उमेद'' अभियान ही लाखो महिलांची उमेद आहे.. ग्रामीण भागात महिला स्वयंपूर्ण होऊन त्यांना आर्थिक ताकत देण्याचं काम यातून झालं आहे.. महिला पोषण, शिक्षण, स्वच्छता, बँक व्यवहार आणि सामुदायिक जवाबदारी शिकली आणि सशक्त बनली ते "उमेद" मुळे. समाज उत्थान व महिला सक्षमीकरण साधणारे हे अभियान, या सरकारने सशक्त करायला पाहिजे.. बचतगट चळवळ ही सुदृढ करावी.. पण दुर्दैव की त्या "उमेद"

MB NEWS:दादाहरी वडगाव चे धरणे परळीतील मराठा तरुणांनी भेट देऊन घेतला आंदोलनात सहभाग

इमेज
आज ६ वा दिवस:मराठा आरक्षणासाठी दादाहरी वडगाव चे धरणे  परळीतील मराठा तरुणांनी भेट देऊन घेतला आंदोलनात सहभाग परळी l प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव येथे बेमुदत साखळी पद्धतीने आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे. गावातील महिला, लहान मुले, तरुण आणि जेष्ठांचाही यात उत्स्फूर्त सहभाग आहे. आज आंदोलनाचा ६ वा दिवस असून जोपर्यंत मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत अखंडपणे हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय सर्वमुखी घेण्यात आला आहे.       जोपर्यंत मराठा समाजाच्या या जिव्हाळ्याच्या मागण्या पूर्ण केल्या जाणार नाहीत तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा ठाम निर्णय दादाहरी वडगाव ग्रामस्थांनी घेतला आहे. या ठिकाणी आज परळीतील मराठा तरुणांनी भेट देऊन आंदोलनात सहभाग घेतला.यावेळी ओम काळे, निकेश पाटील ,पवन बोडके ,अरुण सपाट,साईराज देशमुख, कैलास नाईकवाडे ,भागवत साबळे,गोविंद जाधव,महादू साबळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती

MB NEWS:आज ६ वा दिवस:मराठा आरक्षणासाठी दादाहरी वडगाव चे धरणे रा.काॅ.नेते तुळशीराम पवार यांनी भेट देऊन घेतला सहभाग

इमेज
  आज ६ वा दिवस:मराठा आरक्षणासाठी दादाहरी वडगाव चे धरणे  रा.काॅ.नेते तुळशीराम पवार यांनी भेट देऊन घेतला सहभाग परळी l प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव येथे बेमुदत साखळी पद्धतीने आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे. गावातील महिला, लहान मुले, तरुण आणि जेष्ठांचाही यात उत्स्फूर्त सहभाग आहे. आज आंदोलनाचा ६ वा दिवस असून जोपर्यंत मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत अखंडपणे हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय सर्वमुखी घेण्यात आला आहे. आरक्षणासह विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत समोर साखळी पद्धतीने ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे.  सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला दिलेली स्थगिती कशी उठवणार? पूर्वी मिळालेल्या आरक्षणातून ज्या ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रवेश अर्ज केलेले आहेत त्यांना तात्काळ प्रवेश देण्यात यावा, नोकर भरतीमध्ये शासनाने आरक्षणाप्रमाणे तात्काळ नियुक्ती आदेश द्यावेत, न्यायालयातील अंतरिम स्थगिती उठेपर्यंत नोकरी व शिक्षणातील आरक्षणाला अबाधित ठेवावे, स्थगिती उठेपर्यंत कोणतीही भरती शासनाने जाहीर करू नये, शासकीय पोर्टलच्या लिंकमध्ये वारंवार प्रगती अहवाल

MB NEWS-साठ हजार किंमतीची अवैध दारू संभाजीनगर पोलिसांनी पकडली

इमेज
  साठ हजार किंमतीची अवैध दारू संभाजीनगर पोलिसांनी पकडली _वाहतूक करणारा अॅटो व आरोपी ताब्यात_   परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         बाराशे लिटर दारू अवैधरीत्या अॅटोमध्ये वाहतूक करताना परळी शहरात संभाजी नगर पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपी व वाहनाला ताब्यात घेतले आहे.          आज दिनांक 12 रोजी सकाळी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपुलाखाली मोंढा परिसरात एका अॅटोची पोलिसांनी तपासणी केली असता यामध्ये दारू वाहतूक होत असल्याचे आढळून आले. यासंबंधाने धडक कारवाई करत पोलीसांनी दीड लाखाचा ऐवज जप्त केला. संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे. काॅ. भताने, पोलीस नाईक दत्ता गित्ते ,अर्जुन राठोड, पो.हे. मोहन दुर्गे यांनी ऑटो सह दारू जप्त केली.जप्त करण्यात आलेल्या दारूची अंदाजे किंमत 60 हजार रुपये असून अॅटोसह एकूण दीड लाखाची पोलीस कारवाई करण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपी व ऑटो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. अधिक तपास संभाजीनगर पोलिस करीत आहेत.

MB NEWS:जिल्ह्यात कोरोनाचा मृत्यूदर ३.११ टक्के तर रुग्ण बरे होण्याचा दर ८२.६९ ;आज १५२ रुग्णांना मिळणार डिस्चार्ज.

इमेज
  बीड जिल्हा कोरोना अपडेटस्.....,..   जिल्ह्यात कोरोनाचा मृत्यूदर ३.११ टक्के तर रुग्ण बरे होण्याचा दर ८२.६९ ;आज १५२ रुग्णांना मिळणार डिस्चार्ज परळी वैजनाथ, प्रतिनिधी....    बीड जिल्हा प्रशासनाकडून कोविड १९ विषयक दैनंदिन अहवाल देण्यात येतो.या अहवालानुसार जिल्ह्यात आज दि.१२ रोजी सायंकाळपर्यंत एकूण १५२ रुग्णांना कोविड केआर सेंटरमधुन सुट्टी देण्यात येणार आहे.    जिल्ह्यात कोरोनाचा मृत्यूदर ३.११ टक्के तर रुग्ण बरे होण्याचा दर ८२.६९  आहे. दाखल रुग्ण संख्या११५५१ असुन उपचार घेऊन बरे झालेले रुग्ण ९५५२ आहेत.तर १६४० रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. एकूण ३६९ जणांचा मृत्यू झालेला आहे.परळी तालुक्यातील १६ रुग्णांना आज सुट्टी देण्यात येणार आहे.

MB NEWS:शासनाच्या सर्व लाभार्थी योजनेसाठी जेष्ठ वयोमर्यादा65वरून 55करावी -प्रेमनाथ कदम

इमेज
  शासनाच्या सर्व लाभार्थी योजनेसाठी जेष्ठ वयोमर्यादा65वरून 55करावी -प्रेमनाथ कदम .              सामाजिक न्यायमंत्री ना.मुंडेना निवेदन द्वारे  मागणी परळी (प्रतिनिधी) राज्यातील जेष्ठ नागरिकांना शासनातर्फे विविध योजनेव्दारे लाभ दिला जातो व त्यासाठीजेष्ठ नागरिकांचे वय 65 वर्ष ठरवले गेले आहे मात्र हि वयोमर्यादा जाचक असुन याचा फटका राज्यातील असंख्य 55 वर्ष वय असणाऱ्यां जेष्ठ नागरिकांनां बसत असुन शासनाने सर्व योजनेचा लाभाची वयोमर्यादा 55वर्ष करावी अशी मागणी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या कडे दिनांक 11/10/2020 रोजी एका निवेदनाव्दारे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार प्रेमनाथ कदम यांनी केली आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील अनेक गरजवंत घटकासाठी विशेष सहाय्य योजना सुरू केल्या असुन त्यात जेष्ठ नागरिकांसाठी असलेल्या श्रावणबाळ योजना,संजय गांधी निराधार योजना व महाराष्ट्र राज्य परिवहनच्या बसने प्रवासात सवलत योजनेचा लाभ घेणाऱ्यालाव65 वर्ष ठेवली आहे.आजच्या धकाधकीच्या काळात खाण,पान,व राहणीमानाचा परिणाम जिवनावर होत असल्याने नागरिकांचे आयुष्यमान कमी होत आहेम्हणुन 65वर्षा नंतर शासनाच्य

MB NEWS:पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉन्च केली 'स्वामित्व योजना

इमेज
  आता जागेवरील मालकी हक्काबाबतचे वाद संपुष्टात येतील ! ⭕पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉन्च केली 'स्वामित्व योजना', महाराष्ट्राला महिनाभरात मिळणार लाभ  -----------------------------------      *नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 'स्वामित्व योजना' (Swamitva Yojana) लॉन्च केली. या योजनेंतर्गंत जमिनीच्या मालकांना प्रॉपर्टी कार्ड वितरित करण्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात 6 राज्यातील 673 गावांमध्ये प्रॉपर्टी कार्ड वाटप करण्यात येईल. 1 लाख 32 हजार प्रॉपर्टीधारकांना याचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्राला महिनाभरात प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. मोदी सरकारनं ग्रामीण भागाचं रुपडं पालटण्यासाठी स्वामित्व योजनेच्या माध्यमातून ऐतिहासिक पाऊल उचललं आहे. योजनेनुसार 1 लाख 32 हजार प्रॉपर्टीधारकांना मालमत्ता कार्ड मिळणार आहे. सुरुवातीला जमीन मालकांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे (SMS) एक लिंक पाठवण्यात येणार आहे. त्यावरून प्रॉपर्टी कार्ड डाऊनलोड करता येईल. त्यानंतर संबंधित राज्य सरकारद्वारा प्रॉपर्टी कार्टचं वितरण करण्यात येणार आहे.सुरूवातीच

MB NEWS:मराठा आरक्षणाचा मुळ विषय बाजुला करुन सरकार पळवाट काढतय का?- शिवाजी शिंदे

इमेज
  मराठा आरक्षणाचा मुळ विषय बाजुला करुन सरकार पळवाट काढतय का?- शिवाजी शिंदे *दा.वडगावचे साखळी धरणे चौथ्या  सुरुच* परळी वै.... मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजेत या मुळ मागणीसाठी संपुर्ण समाज रस्त्यावर उतरलेला संपुर्ण देशाने पाहिला.याची नोंद जागतिक स्तरावरही झाली परंतु सरकार मराठ्याच्या मुळ आरक्षणाच्या मागणीला बगल देत असल्याचे दिसुन येत आहे.सुप्रिम काॕर्टाने मराठा आरक्षणावर जी स्थगिती दिली ती कशी उठवता येईल हे न पाहता इतर गोष्टी पुढे करुन वेळकाढु पणा करत असल्याचा आरोप दा.वडगाचे शिवाजीराव शिंदे यांनी केला. परळी तालुक्यातील मौजे दा.वडगाव येथे गेल्या चार दिवसा पासुन गावकरी साखळी धरणे आंदोलन करत आहेत.दा.वडगावच्या अकरा विद्यार्थ्यांनी एसईबीसी च्या कोट्यातुन परिक्षा दिल्या ते पाञ ही झाले आॕर्डर ही मिळणार होत्या परंतु आरक्षणाच्या स्थगितीमुळे हे पाञ विद्यार्थ्यांचे काय करायचे असा सवाल गावकरी उपस्थित करित आहेत.आमचा मुळ प्रश्न मराठा आरक्षणाचा असताना वेळ काढु पणा करत राज्य सरकारने ख-या अर्थाने mpsc च्या परिक्षा रद्द करुन पुन्हा एकदा प्रश्न निर्माण केला आहे.हे पाञ ठरलेले अकरा विद्यार्थी सामान्य कुट