पोस्ट्स

ऑक्टोबर १८, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MB NEWS:वैद्यनाथाची दसरा पालखी परिक्रमा पाच मानकऱ्यांसह निघणार

इमेज
  वैद्यनाथाची दसरा पालखी परिक्रमा पाच मानकऱ्यांसह निघणार; जिल्हाधिकाऱ्यांची अटीसह परवानगी परळी : प्रतिनिधी...  जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दसऱ्याच्या दिवशी प्रभू वैद्यनाथाची पालखी मिरवणूक परिक्रमेस काही अटीसह परवानगी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी अटीचे पालनकरून दसरा परिक्रमा पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याने हा पारंपारिक सोहळा खंडित होणार नाही     जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिलेल्या परवानगीनुसार श्री प्रभू वैद्यनाथाची पालखी मिरवणूक परिक्रमा वाहनातून पाच मानकऱ्यांच्या सहभागाने करावी. यावेळी वाहन कुठेही न थांबवता कमीत कमी वेळेत परिक्रमा पूर्ण करावी. पाचपेक्षा जास्त भाविकांनी व मानकरी यांनी गर्दी करू नये. संसर्गजन्य स्थिती असल्याने या अटीचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रेखावार यांनी शुक्रवारी श्री वैजनाथ मंदिराचे सचिव राजेश देशमुख यांना दिल्या आहेत. यासोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सीमोल्लंघन स्थळी गर्दी करू नये असे आवाहनही करण्यात आले आहे. 

MB NEWS:नागनाथ अप्पा हलगे कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचे प्राचार्य व शिक्षक कोरोना योद्धा म्हणून सन्मानित

इमेज
  नागनाथ अप्पा हलगे कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचे प्राचार्य व शिक्षक कोरोना योद्धा म्हणून सन्मानित  विश्वमानवाधिकार परिषद महाराष्ट्र राज्याचा उपक्रम  परळी ( प्रतिनिधि) :- मागिल सात महिन्या पासुन पुर्ण देश लॉकडॉन आहे या लॉकडॉन मध्ये विद्यार्थींचे खुप नुकसान झाला होता ,परीक्षा सुद्धा होणे अवघड झाले होते. .  विद्यापीठाच्या आदेशानुसार कॉलेजने कोरोनाच्या काळात व्यवस्थितपणे परीक्षा घेतली या सर्व कामांची दखल घेऊन  विश्वमानवाधिकार परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीने नागनाथ अप्पा हलगे कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचे प्राचार्य आणि शिक्षकांना कोरोना युद्धा प्रमाणपत्र देऊन संमानित करण्यात आले.   ज्या शिक्षकांना सम्मानित करण्यात आले त्या मध्ये  प्राचार्य भास्करराव सर , गोविंद मुंडे सर, केंद्रे सर,सय्यद सादत राज, विजय दहीवाळ सर, तकवीम कुरेशी मॅडम, चाटे मॅडम, उत्तम मुंडे सर, शिंदे सर, मराठे सर, सय्यद अदिल सर यांचा समावेश आहे. यावेळी महाराष्ट्र राज्याचे विश्व मानव अधिकार परिषद चे युवा सेना चे अध्यक्ष सय्यद  सोहेल लाईक ,शेख कासिम ,आयाज शेख व पत्रकार मुदस्सीर शेख व विश्वमानवाधिकार परिषदचे कार्यकर्ते उपस्थित होते

MB NEWS:बाजीराव भैय्या धर्माधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत औरंगाबादमधील "मार्व्हल 34" या नविन गृहप्रकल्पाचे उद्घाटन

इमेज
  बाजीराव भैय्या धर्माधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत औरंगाबादमधील "मार्व्हल 34" या नविन गृहप्रकल्पाचे उद्घाटन औरंगाबाद, प्रतिनिधी.... औरंगाबादमधील  स्थापत्य अभियंता राहुल स्वामी व सहकारी यांच्या "मार्व्हल 34" या नविन गृहप्रकल्पाच्या उद्घाटन सोहळा परळीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत आज दि.२३ रोजी पार पडला.     दर्जेदार आणि माफक दरात नागरिकांना "मार्व्हल 34" या गृहप्रकल्पात रो हाऊस खरेदी करता येणार आहेत.या उद्घाटन सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते युवकनेते निलेश राऊत,शिवसेनेचे शहर प्रमुख विश्वनाथजी स्वामी,उद्योजक केशुभाई पटेल,उद्योजक प्रसाददादा जोशी, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

MB NEWS: परीक्षा हुकली, पेपर बुडाला,लाॅगिन झाले नाही....आता चिंता करु नका.

इमेज
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षेकरिता अजून एक संधी. परीक्षा हुकली, पेपर बुडाला,लाॅगिन झाले नाही....आता चिंता करु नका. कोरोनाच्या प्रादूर्भावात विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जावू नये म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर परीक्षेकरिता अजून एक संधी दिली आहे.

MB NEWS:ठाकरे सरकारचा मोठा निर्णय:अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींचे पॅकेज

इमेज
  ठाकरे सरकारचा मोठा निर्णय:अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींचे पॅकेज   मुंबई: अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ही घोषणा केली. दिवाळीपर्यंत ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. शेतकऱ्यांना १० हजार प्रतिहेक्टर मदत २ हेक्टरपर्यंत दिली जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. तसे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. ही मदत दिवाळीपर्यंत देण्याचा प्रयत्न असेल. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू राहता कामा नये, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा --------- • शेती, फळपिकांसाठी हेक्टरी वाढीव मदत  •एकूण केंद्राकडून येणं 38 हजार कोटी रुपये आहे पण मिळालेले नाहीत.  •अद्यापपर्यंत पूर, अतिवृष्टीसंदर्भात केंद्राचे पथक पाहणीसाठी आलेले नाही. आम्ही दोन तीनदा विनंती केली आहे  •या आपत्तीत 10 हजार कोटी रुपये मदत देण्याचे निश्चित केले आहे. यात रस्त्यांची दुरुस्ती, शेतजमिनीची दुरुस्ती व इतर नुकसान भरपाईचा समावेश

MB NEWS:*'माझा व्यवसाय माझा हक्क' नोंदणी शिबिराचे अंतिम दोन दिवस शिल्लक !*

इमेज
  *'माझा व्यवसाय माझा हक्क' नोंदणी शिबिराचे अंतिम दोन दिवस शिल्लक !* *_२५ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करुन अधिकाधिक लाभ घ्यावा- लक्ष्मण पौळ, बाजीराव भैय्या धर्माधिकारी_*   परळी वैजनाथ, प्रतिनिधी..             मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत बिझनेस आॅन व्हील संबंधित उपक्रम नोंदणी शिबिराचा शुभारंभ राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी 'माझा व्यवसाय माझा हक्क' शिबिर उपयुक्त ठरणार आहे. नोंदणी साठी अंतिम तारीख २५ आॅक्टोबर आहे. शेवटचे दोन दिवस शिल्लक असुन यामध्ये अधिकाधिक बेरोजगारांनी नोंदणी करावी व लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्षमण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.           ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे नोंदणी शिबिर सुरू आहे. बेरोजगारांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने 'माझा व्यवसाय माझा

MB NEWS:बीड जिल्हा कोरोना अपडेटस्: आज दि. २३आॅक्ट़ोबर प्राप्त अहवाल....

इमेज
 *बीड जिल्हा कोरोना अपडेटस्: आज दि. २३आॅक्ट़ोबर प्राप्त अहवाल....* जिल्ह्यात ८२ रिपोर्ट पाॅझिटिव्ह. २०९५ अहवाल प्राप्त झाले. *परळीत केवळ ५ रिपोर्ट पाॅझिटिव्ह जिल्ह्यात २०१३ रिपोर्ट निगेटिव्ह. ------------------ *बीड २४, अंबाजोगाई ११, आष्टी ६, धारूर १, गेवराई ८, केज ३, माजलगाव ६, परळी ५ , पाटोदा ७, शिरूर ८ तर वडवणी ३*

MB NEWS:गॅस सिलिंडरच्या किमती झाल्या कमी : अनुदान बंद

इमेज
 🛑 गॅस सिलिंडरच्या किमती झाल्या कमी : अनुदान बंद       --------------------------       मुंबई: गॅस सिलिंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. सध्या सिलिंडरची किंमत ५९७ रुपये आहे. या किमतीच्यावर दर गेले तरच ग्राहकांना अनुदान दिले जाते; मात्र किंमत कमी झाल्यामुळे चार महिन्यांपासून अनुदान बंद केले आहे. त्यामुळे हे अनुदान बंद का झाले यावरून ग्राहक संभ्रमात आहेत.देशात गॅस ग्राहकांना कमीत कमी किमतीत गॅस मिळाला पाहिजे. गॅसचा मूलभूत (बेसिक) दरही कमी झाला पाहिजे, यासाठी आंदोलने होत आहे. गॅसच्या मूलभूत दरापेक्षा जास्त किंमत झाल्यास सरकार तेवढ्याच किमतीचे अनुदान देते. एप्रिलपासून गॅसच्या मूलभूत (बेसिक) दरात वाढ झालेली नाही. सध्या प्रति सिलिंडर ५९७ रुपये मूळ किंमत आहे. या किमतीच्या वर म्हणजेच प्रति सिलिंडर ७०० रुपये दर झाल्यास सरकारकडून ५९७ रुपयांच्या वरती होणारी रक्कम म्हणजे १०३ रुपये ग्राहकांच्या बॅंक खात्यावर अनुदान म्हणून जमा केले जाते.

MB NEWS:निधन वार्ता-सिद्धेश्वरराव देशपांडे

इमेज
  वरीष्ठ पत्रकार बिपीन देशपांडे यांना पितृशोक सिद्धेश्वरराव देशपांडे यांचे निधन परळी वैजनाथ,प्रतिनिधी : परळी नगर परिषदेतील निवृत्त कर्मचारी सिद्धेश्वरराव देवीदासराव देशपांडे ( वय 78) यांचे शुक्रवारी पहाटे ३ च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. महेश बँकेतील कॅशिअर जतीन देशपांडे,  लोकसत्ताचे पत्रकार बिपीन देशपांडे यांचे ते वडील होत.

MB NEWS:मराठवाड्यातून चार विशेष रेल्वे सेवा सुरू होणार नांदेड-पनवेल आणि परभणी परळी, बिदरमार्गे औरंगाबाद-हैद्राबाद विशेष रेल्वेचा समावेश

इमेज
  मराठवाड्यातून चार विशेष रेल्वे सेवा सुरू होणार नांदेड-पनवेल आणि परभणी परळी, बिदरमार्गे औरंगाबाद-हैद्राबाद विशेष रेल्वेचा समावेश मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांच्या गैरसोयीला दुर करण्यासाठी गुरुवारी (ता.२२) रेल्वे विभागाने चार विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे. यामध्ये २४ ऑक्टोबरपासून धर्माबाद-मनमाड (मराठवाडा एक्सप्रेस) दैनंदिन विशेष रेल्वे धावणार, काचिगुडा-अकोला-नरखेडा, नांदेड-पनवेल आणि परभणी परळी, बिदरमार्गे औरंगाबाद-हैद्राबाद विशेष रेल्वेचा यात समावेश आहे.

MB NEWS:दररोज एका वाढत्या सुवर्ण अलंकाराने श्री योगेश्वरी देवीची होतेय अलंकार पूजा

इमेज
  दररोज एका वाढत्या सुवर्ण अलंकाराने श्री योगेश्वरी देवीची होतेय अलंकार पूजा   अंबाजोगाई -  नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने श्री योगेश्वरी देवीची विधीवत तीन वेळा महाआरती होते. दररोज एका वाढत्या सुवर्ण अलंकाराने अलंकार पूजा सुरू आहे. भाविकांना दर्शन नसले तरी मंदिरात सर्व विधीवत उपक्रम नित्य स्वरूपात सुरू आहेत.                  महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव सुरू आहे. या नवरात्र महोत्सवात दररोज पहाटे पाच वाजता महाअभिषेक व महापूजा त्यानंतर काकडा आरती. दुपारी १२ वाजता माध्यान्ह महापूजा व दररोज रात्री शेजआरती नित्याने  सुरू आहे. दुपारी १२ वाजता माध्यान्ह महापुजेनंतर नैवद्य महाआरती होते. यानंतर श्री योगेश्वरी देवीला दररोज एक नवा दागिना घालून अलंकार पूजा केली जाते. घटस्थापनेच्या प्रारंभीच महापूजेनंतर श्री योगेश्वरी देवीला ठेवणीतले दागिने व सुवर्ण अलंकार विधीवत चढवले जातात. घटस्थापनेच्या दिवशी सुवर्ण कुंकू, चंद्रकोर, बिंदिया, सुवर्ण मुख, कर्णफुले, सरपाळ्या, डोळे, सोन्याची फुले, हे दागिने घातले जातात.तर महापूजेनंत

MB NEWS:सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक श्रीराम सपकाळ यांचे निधन

इमेज
  सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक श्रीराम सपकाळ यांचे निधन अंबाजोगाई : सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक श्रीराम सपकाळ यांचे आज गुरूवारी (दि.२२) सकाळी ८ वाजता औरंगाबाद येथील खाजगी रूग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७० वर्षे होते. श्रीराम सपकाळ हे १९८२-८५ या कालावधीत अंबाजोगाईत पोलीस ठाणे प्रमुख होते. त्या काळात त्यांचे अंबाजोगाईशी कायमचे ऋणानुबंध जोडले गेले. अंबाजोगाईत त्यांचा मोठा मित्र परिवार आहे. त्यानंतर त्यांनी वसमत, नागपूर, जळगाव, अहमदनगर कर्तव्य बजावले. २००९ साली ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर ते औरंगाबाद येथे स्थायिक झाले होते. काही दिवसापूर्वी त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे औरंगाबाद येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे आज गुरूवारी सकाळी ८ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. सोलापूरचे जिल्हा कृषी अधिकारी उमेश बिराजदार, पालघरचे जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि औरंगाबाद येथील कंत्राटदार प्रवीण चव्हाण यांचे ते सासरे होत. कै. श्रीराम सपकाळ यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी टाकळी (ता

MB NEWS:जय भवानी फूटवेअर व जय भवानी कलेक्शन चा शुक्रवारी सिरसाळा येथे शुभारंभ

इमेज
  जय भवानी फूटवेअर व जय भवानी कलेक्शन चा शुक्रवारी सिरसाळा येथे शुभारंभ  परळी वैजनाथ, प्रतिनिधी.. ग्राहकांच्या सेवेत सिरसाळा येथे नव्याने जय भवानी फुटवेअर व भवानी कलेक्शन या नवीन दुकानाचा शुभारंभ 23 रोजी होणार आहे.       ग्राहकांच्या सेवेमध्ये सतत व्यवसायामध्ये कार्यरत असणारे गर्जे व ठोंबरे यांच्या माध्यमातून सिरसाळा येथे नवीन दालन सुरू होत आहे. वैद्यनाथ कॉम्प्लेक्स, सिरसाळा येथे या व्यवसायांना सुरुवात होत आहे. यानिमित्त आयोजित तीर्थप्रसाद व पानसुपारी उपस्थित राहावे असे आवाहन संदिपान किसनराव गरजे, रवींद्र लक्ष्मणराव ठोंबरे, लखन संदिपान गरजे, गोविंद एकनाथ सातपुते, जगन्नाथ किशनराव गरजे, साळबा किशनराव गरजे यांनी केले आहे.

MB NEWS:भगवान भक्तीगडावरचा दसरा मेळावा यंदा ऑनलाईन

इमेज
  भगवान भक्तीगडावरचा दसरा मेळावा यंदा ऑनलाईन -पंकजा मुंडे यांनी दिली माहिती बीड,  ः स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी सुरु केलेली भक्ती आणि शक्तीची परंपरा अखंडीत राहणार आहे. परंतु यावर्षी कोरोनाचे संकट पाहता दसर्‍यादिवशी ऑनलाईन संवाद साधणार असल्याची घोषणा भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केली. दसर्‍यादिवशी सावरगाव येथील भगवान भक्तीगडावर दर्शन घेवून पंकजा मुंडे या मार्गदर्शन करणार आहेत. सावरगाव (ता.पाटोदा) येथील भगवान भक्तीगडावर होणार्‍या मेळाव्याकडे राज्याचे लक्ष लागलेले असते. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पश्‍चात पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मेळावा होतो. या मेळाव्याने गर्दीचे उच्चांक प्रस्थापित केलेले आहेत. परंतु कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर या वर्षीचा मेळावा कसा होणार, किती लोक येणार, प्रशासन परवानगी देणार का, असे प्रश्‍न उपस्थित होत असतांना भाजप नेते पंकजा मुंडे यांनी याबाबत घोषणा केली आहे. गोपीनाथराव मुंडे यांनी प्रत्येक दसर्‍याला भक्ती आणि शक्तीची परंपरा सुरु केली होती. ती परंपरा मी पुढे चालवत आहे. यातील माझी शक्ती म्हणजे तुम्ही सर्वजण आहात. ही शक्ती क्षीण होणार नाही, याची

MB NEWS:शरद पवार विचार मंचच्या परळी शहराध्यक्षपदी श्रीकांत माने यांची निवड

इमेज
  शरद पवार विचार मंचच्या परळी शहराध्यक्षपदी श्रीकांत माने यांची निवड परळी वैजनाथ, प्रतिनिधी... सबंध महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘मा.श्री.शरद पवार विचार मंच’ या संघटनेच्या परळी शहराध्यक्षपदी येथील युवक कार्यकर्ते श्रीकांत बाळासाहेब माने यांची निवड झाली आहे.  या निवडीचे पत्र मंगळवारी (दि.20) राष्ट्रवादी काँगे्रसचे ज्येष्ठ नेते व परळी नगर पालिकेतील गटनेते वाल्मिकअण्णा कराड यांच्या हस्ते श्रीकांत माने यांना देण्यात आले. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या येथील ‘जगमित्र’ या संपर्क कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँगे्रसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष श्रीनिवास देशमुख, युवक नेते शंकर कापसे, नितीन कुलकर्णी, श्री बिडगर, रामेश्वर महाराज कोकाटे, नरेश वाळके, ॠषीकेश राठोड, यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या निवडीबद्दल पालकमंत्री धनंजय मुंडे, संघटनेचे  प्रदेशाध्यक्ष मा.अमित अंकुशराव ढमाळ, राष्ट्रवादी काँगे्रस डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, राष्ट्रवादी काँगे्रसचे ज्येष्ठ नेते चंदुल

MB NEWS: माझा व्यवसाय माझा हक्क' नोंदणी शिबिराची अंतिम तारीख २५ ऑक्टोबर;लाभ घ्यावा-अनंत इंगळे*

इमेज
 ' माझा व्यवसाय माझा हक्क' नोंदणी शिबिराची अंतिम तारीख  २५ ऑक्टोबर;लाभ घ्यावा-अनंत इंगळे     परळी वैजनाथ, प्रतिनिधी..            मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत बिझनेस आॅन व्हील संबंधित उपक्रम नोंदणी शिबिराचा शुभारंभ  राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते  करण्यात आलेला आहे. रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी  'माझा व्यवसाय माझा हक्क' शिबिर उपयुक्त ठरणार आहे.  नोंदणी साठी अंतिम तारीख २५ आॅक्टोबर आहे.यामध्ये अधिकाधिक बेरोजगारांनी नोंदणी करावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस अनंत इंगळे यांनी केले आहे. ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळीत   लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे नोंदणी शिबिर सुरू आहे. बेरोजगारांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने 'माझा व्यवसाय माझा हक्क' शिबिर घेण्यात येत आहे.कोरोनाच्या बिकट परिस्थितीमध्ये बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे या दृष्टिकोनातून आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने ही योजना राबव

MB NEWS:यशोगाथा:एस.एस.कराड बनले पीएसआय*

इमेज
 _परळी तालुक्यातील आणखी एका भुमीपुत्राची पोलीस दलात भरारी_ *यशोगाथा:एस.एस.कराड बनले पीएसआय* परळी वैजनाथ, प्रतिनिधी..      येथील एस.एस.कराड यांची पीएसआय म्हणून निवड झाली आहे.खात्याअंतर्गत परिक्षेत ते सन २०१३ मध्ये उत्तीर्ण झाले होते.त्यांची आता पदस्थापना  पोलीस उपनिरीक्षक म्हणून झाली आहे.परळी पोलीस दलात यापूर्वी त्यांनी सेवा बजावलेली आहे.विशेष म्हणजे ते परळी तालुक्याचेच भुमीपुत्र आहेत.     परळी तालुक्याचे भुमीपुत्र असलेले सुभाष संभाजीराव कराड हे तपोवन येथील मुळ रहिवासी आहेत.१९८६ पासुन ते पोलीस दलात कार्यरत आहेत.सेवेतील विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडलेल्या आहेत.कर्तव्यदक्ष, शांत, मितभाषी, सुस्वभावी व सरळ सरळ कार्यपद्धती ही त्यांची ओळख आहे.पोलीस दलात काम करत असताना कर्तव्यपुर्ती करून त्यांनी खात्याअंतर्गत परिक्षा दिली.यामध्ये सन २०१३ मध्ये ते महाराष्ट्रात गुणवत्तेने उत्तिर्ण झालेले आहेत. महाराष्ट्र स्तरावर १०६१ पैकी त्यांचा ५७ वा क्रमांक आहे. पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांची पदस्थापना होणार आहे.त्यांच्या या यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.     या नविन जबाबदारी ने पोलीस

MB NEWS:*पिक नुकसानीचे पंचनामे 48 तासात पूर्ण करण्याचे निर्देश--- मंत्री अमित देशमुख*

इमेज
  *पिक नुकसानीचे पंचनामे 48 तासात पूर्ण करण्याचे निर्देश--- मंत्री अमित देशमुख* *खांडवी येथे शेतात जाऊन केली पाह बीड, (जिमाका) दि. २०::--राज्यात अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून अजूनही पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. या नुकसानीचे पंचनामे 48 तासात पूर्ण करून प्रस्ताव सादर राज्य शासनास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी केले. गेवराई तालुक्यातील खांडवी येथे भेट देऊन मंत्री श्री अमित देशमुख यांनी मुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, माजी आमदार अमरसिंह पंडित, राजकिशोर मोदी, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, तहसीलदार सचिन खाडे आदी उपस्थित होते.  वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री देशमुख म्हणाले, परतीच्या पावसामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे बराच ठिकाणी 130 ते दोनशे टक्क्यापर्यंत जास्त पाऊस झाल्याने शेत पिकांबरोबरच खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे देखील राज्यात नुकसान झालेले आहे यासाठी केंद्र सरकार कडून मदत व्हावी म्हणून प्रस्ताव

MB NEWS:जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं', पंतप्रधानांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे*

इमेज
' जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं', पंतप्रधानांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे                             -----------------------------------      नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ६ वाजता देशातील नागरिकांना संबोधित केलं. कोरोनाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सातव्यांदा जनतेला संबोधित केलं आहे. कोरोना व्हायरस अजून गेला नाही. त्यामुळे बाजारपेठांमध्ये गर्दी करणं योग्य नाही, असं सांगत पंतप्रधानांनी आज भाषणाला सुरूवात केली.                                *◼️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे*                                            -----------------------------------          ⭕लॉकडाऊन गेलं असेल तरी कोरोना व्हायरस गेलेला नाही. बाजारपेठेत गर्दी वाढू लागली आहे.  आपल्याला परिस्थिती सुधारायची आहे, बिघडवायची नाही.               -----------------------------------        ⭕आज देशात रिकव्हरी रेट चांगला आहे. भारतात प्रती 10 लाख लोकसंख्येत जवळपास साडे पाच हजार लोकांना कोरोना झाला आहे. अमेरिकेत हा आकडा २५ हजार आहे. १० लाख लोकसंख्येत जवळपास मृत्यूदर हा ८३

MB NEWS:दुर्गाष्टमी पर्यंत तोडगा न निघाल्यास ऊसतोड कामगार दुर्गेचा अवतार घेतल्याशिवाय राहणार नाहीत- पंकजा मुंडे यांचा सुचक इशारा

इमेज
  दुर्गाष्टमी पर्यंत तोडगा न निघाल्यास ऊसतोड कामगार दुर्गेचा अवतार घेतल्याशिवाय राहणार नाहीत- पंकजा मुंडे यांचा सुचक इशारा --------------------------- नांदेड,प्रतिनिधी...     अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पहाणी व शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी बांधावर पहाणी दौरा करत असलेल्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांना ऊसतोड मजुर संपाबाबत माध्यमांनी प्रश्न विचारला असता दुर्गाष्टमीपर्यंतची डेटलाईनच त्यांनी दिली आहे. ऊसतोड कामगारांच्या संपाबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या, हा प्रश्न सप्टेंबर मध्येच मिटला असता परंतू यात फाटे फोडण्याचे काम झाले. हा संप मी सुरू केला आहे. कामगारांच्या दरवाढी बाबत मी वारंवार साखर कारखाना संघाकडे आग्रह धरला आहे. संबंधित नेत्यांनाही बोलले आहे. लवादा सोबत चर्चा करून हा प्रश्न मिटण्याची लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांपासूनची परंपरा आहे त्यामुळे दुर्गाष्टमी पर्यंत यावर तोडगा नाही निघाला तर ऊसतोड कामगार दुर्गेचा अवतार घेतल्याशिवाय राहणार नाहीत असे त्या म्हणाल्या.यावेळी आ. राजेश पवार, आ. तुषार राठोड, देविदास राठोड व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

MB NEWS:शेतकऱ्यांना भेदभाव न करता सरसकट नुकसान भरपाई द्या - पंकजाताई मुंडे

इमेज
  शेतकऱ्यांना भेदभाव न करता सरसकट नुकसान भरपाई द्या - पंकजाताई मुंडे नांदेड जिल्हयात थेट बांधावर जाऊन केली अतिवृष्टीची पाहणी ; शेतकऱ्यांशी साधला संवाद नांदेड दि. २० ------मराठवाडयात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटात सापडला असून त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहण्याची आज खरी गरज आहे, त्यासाठी सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विनाविलंब भेदभाव न करता सरसकट नुकसान भरपाई द्यावी. 'दसरा गेला, आता त्यांची 'दिवाळी तरी गोड करा' अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी राज्य सरकारकडे आग्रही मागणी केली. अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी  पंकजाताई मुंडे हया मराठवाडयाचा दौरा करत असून आज त्यांनी नांदेड जिल्हयातील धनगरवाडी ता. नांदेड, कारेगाव, पारडी ता. लोहा येथे  बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. रस्त्यावर पाहणी न करता त्यांनी थेट शेतापर्यंत जाऊन संकटात सापडलेल्या बळीराजाशी संवाद साधत त्यांना धीर दिला.   शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, शेतकरी सध्या आसमानी व सुलतानी अशा दोन्ही संकटात सापडला आहे. अशा परिस

MB NEWS:(VIDEO)विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे परळीत भाजप कार्यकर्त्यांनी केले स्वागत

इमेज
  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे परळीत भाजप कार्यकर्त्यांनी केले स्वागत परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पहाणी करण्यासाठी सध्या दौऱ्यात असलेले माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अंबाजोगाईहून परळीमार्गे परभणी कडे रवाना होतांना इटके काॅर्नर येथे परळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले. तत्पुर्वी या धावत्या दौऱ्यात ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोपीनाथ गडावर नतमस्तक होऊन आशिर्वाद घेतला.           अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले असून याची पाहणी करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधन्यासाठी विधान सभेचे विरोधीपक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या मराठवाड्यातील दौऱ्यात आहेत.आज सायंकाळी अंबाजोगाई येथून परभणी कडे मार्गस्थ होताना ते आवर्जून लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे समाधीस्थळ गोपीनाथ गडावर गेले.याठिकाणी गोपीनाथ गडावर नतमस्तक होऊन त्यांनी आशिर्वाद घेतला. इटके काॅर्नर येथे परळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्

MB NEWS:अन् फडणवीसांचा ताफा अपसुक वळला......!

इमेज
  अन् फडणवीसांचा ताफा अपसुक वळला......! विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गोपीनाथ गडावर नतमस्तक! परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पहाणी करण्यासाठी सध्या दौऱ्यात असलेले माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अंबाजोगाईहून परभणी कडे रवाना होतांना दौर्यात नसलेल्या मार्गाकडे त्यांचा ताफा अपसुक वळला. या धावत्या दौऱ्यात ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोपीनाथ गडावर नतमस्तक होऊन आशिर्वाद घेतला.           अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले असून याची पाहणी करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधन्यासाठी विधान सभेचे विरोधीपक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या मराठवाड्यातील दौऱ्यात आहेत.आज सायंकाळी अंबाजोगाई येथून परभणी कडे मार्गस्थ होताना ते आवर्जून लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे समाधीस्थळ गोपीनाथ गडावर गेले.याठिकाणी गोपीनाथ गडावर नतमस्तक होऊन त्यांनी आशिर्वाद घेतला.

MB NEWS:परळी शहरातील अवैध धंदे बंद करा:-साईराजे देशमुख

इमेज
  परळी शहरातील अवैध धंदे बंद करा:-साईराजे देशमुख           परळी प्रतिनिधी, परळी शहरात जोमात सुरू असलेले अवैध धंदे बंद करा अन्यथा अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने परळी शहर पोलीस स्टेशन निवेदनात दिला आहे.   एस.पी साहेबांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे याला जर लवकर आवरण नाही घातला तर छावा संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा छावा संघटनेचे परळी तालुका अध्यक्ष साई राजे देशमुख बीड जिल्हा कार्याध्यक्ष बाजीराव काळे,ओमकार देशमुख नवल वर्मा ,आबर सारडा,अमर सुरवसे सुनील गरड, गोपाळ उदरे ,अभिषेक संगेवार, आकाश जाधव ,इत्यादींनी देण्यात आला

MB NEWS:पंकजा मुंडेंचे नांदेड विमानतळावर जोरदार स्वागत

इमेज
  पंकजा मुंडेंचे नांदेड विमानतळावर जोरदार स्वागत  नांदेड, प्रतिनिधी....       अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शेतक-यांना धीर देण्यासाठी तसेच त्यांना मदत मिळवून देण्याकरिता भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे दि. 20 ऑक्टोबर रोजी पासून मराठवाड्यात विविध जिल्हयाचा दौरा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांचे नांदेड विमानतळावर जोरदार स्वागत झाले.पंकजाताईंच्या स्वागताला विमानतळाबाहेर प्रचंड गर्दी झाली होती. त्यांचे आगमन होताच "कोण आली रे कोण आली -महाराष्ट्राची वाघीण आली!" घोषणांनी परिसर दणाणून गेल्याचे दिसून आले.   अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शेतक-यांना धीर देण्यासाठी तसेच त्यांना मदत मिळवून देण्याकरिता भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे दि. 20 ऑक्टोबर रोजी पासून मराठवाड्यातील विविध जिल्हयाचा दौरा करणार आहेत. गुरूवारी त्या बीड जिल्हयातील गावांना भेटी देणार आहेत.           गुरूवारी बीड जिल्हयात पाहणी       दि. 20 आणि 21 ऑक्टोबर यादिवशी मराठवाड्यातील अतिवृष्टी पाहणी दौरा करून पंकजाताई मुंडे 22 तारखेला सकाळी औरंगाबाद येथून शहागड, गेवराई, बीड,

MB NEWS:पंतप्रधान मोदी आज 6 वाजता देशाला संबोधित करणार, काय बोलणार याकडे लक्ष*

इमेज
  पंतप्रधान मोदी आज 6 वाजता देशाला संबोधित करणार, काय बोलणार याकडे लक्ष  -----------------------------------  मुंबई...  20 ऑक्टोबर : देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज देशाला संबोधित करणार आहे. संध्याकाळी 6 वाजता ते बोलणार आहे. त्यामुळे यावेळी पंतप्रधान काय घोषणा करणार याकडे सगळ्याचे लक्ष्य लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ट करून माहिती दिली आहे. आज संध्याकाळी 6 वाजता ते देशाला संबोधित करणार आहे, असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.त्यामुळे पंतप्रधान मोदी हे आज कोणती घोषणा करणार आहे, महाराष्ट्राला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्याला मदत करणार आहे, याबद्दल काही घोषणा करतील का, हे पाहण्याचे ठरणार आहे.दरम्यान, केंद्र सरकार दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा अंदाज आहे.  हे उपभोक्‍ता मूल्‍य सूचकांक म्हणजेच CPI-IW च्या बेस इअर म्हणजे या वर्षात बदल केल्यामुळे शक्य होऊ शकेल.या नव्या बदलामुळे 48 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा होईल. रिपोर्ट्सनुसार येत्या 21 ऑक्टोबर रोजी सरकार CPI-IW च्या आधार वर्षात बदल करू शकते आणि सविस्त

MB NEWS:कॅपिटेशन फिसच्या नावाखाली प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 50 हजार रुपयांची फिस उकळल्याप्रकरणी प्राचार्य व संचालकांवर गुन्हा दाखल

इमेज
कॅपिटेशन फिसच्या नावाखाली प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 50 हजार रुपयांची फिस उकळल्याप्रकरणी प्राचार्य व संचालकांवर गुन्हा दाखल परळी दि.  : परळीच्या वैद्यनाथ कॉलेमध्ये एक कॅपिटेशन फिसच्या नावाखाली प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 50 हजार रुपयांची फिस उकळल्याप्रकरणी संस्थेचे संचालकांवर महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम 1987 आणि कलम 3 आणि 7 चे उल्लंघन केल्याप्रकरणी परळी शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. जवाहर एज्युकेशन सोसायटी परळीचे संचालक भास्कर पाटलोबा चाटे यांनी शहर ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सन 2018 पासून जवाहर एज्युकेशन सोसायटी संचलित वैद्यनाथ कनिष्ट महाविद्यालय परळी येथे इयत्ता 11 वी आणि 12 विज्ञान विषयाच्या वर्गासाठी विद्यार्थी आणि पालकांकडून प्रतिवर्षी 50 हजार रुपये कॅपिटेशन फिस घेण्यात आली. वैद्यनाथ महाविद्यालय परिसरातील मुलींच्या वस्तीगृहांच्या इमारतीत शिकवणी वर्ग विद्यमान संस्थाचालक तथा अध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, सचिव दत्तात्रय गणपतअप्पा इटके, कोषाध्यक्ष सुरेश बाबुलाल अग्रवाल व प्राचार्य रामचंद्र किशनराव इप्पर यांच्यातर्फे चालवले जात आहेत. सदरील शिकवणी वर्ग हे ऑगस्ट 2018

MB NEWS:भाजयुमो प्रदेश सचिव पदी परळीचे अॅड.अरुण पाठक यांची नियुक्ती*

इमेज
 * भाजयुमो प्रदेश सचिव पदी परळीचे अॅड.अरुण पाठक यांची नियुक्ती* परळी वैजनाथ, प्रतिनिधी....     भाजपच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांचे कट्टर समर्थक परळीचे अॅड.अरुण पाठक यांची भाजयुमो प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.      अॅड.अरुण पाठक हे भाजप विद्यार्थी आघाडी पासून संघटनात्मक कामात आहेत.विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडलेल्या आहेत.युवकांचे संघटन व भाजयुमो च्या माध्यमातून सातत्याने ते संघटनास्तरावर क्रियाशील आहेत.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश पातळीवर महत्त्वपुर्ण जबाबदारी देण्यात आली आहे.नुकतीच त्यांची प्रदेश सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.याबाबतचे नियुक्ती पत्र त्यांना पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीमध्ये 'सचिव' म्हणून निवड करुन सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रदेश स्तरावर काम करण्याची संधी दिल्याबद्दल नेत्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजाताई मुंडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश उपाध्यक्ष खासदार डॉ. प्रितमताई मुंडे, भारतीय जनता

MB NEWS:वैद्य भिसेगावकर यांना मातृशोक;लक्ष्मीबाई कुलकर्णी यांचे निधन

इमेज
  वैद्य भिसेगावकर यांना मातृशोक; लक्ष्मीबाई कुलकर्णी यांचे निधन परळी वैजनाथ, प्रतिनिधी...     सुप्रसिद्ध वैद्य लक्ष्मीकांतराव भिसेगावकर यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई शंकरराव कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने दि.१५ आॅक्टोबर रोजी सायंकाळी निधन झाले.मृत्युसमयी त्या सुमारे १११ वर्षे वयाच्या होत्या.    लक्ष्मीबाई शंकरराव कुलकर्णी या अतिशय मनमिळाऊ, कुटुंब वत्सल व कर्तव्यदक्ष गृहीणी म्हणून सुपरिचित होत्या.आप्तेष्ट व कुटुंबातील एक जेष्ठ आधारवड व्यक्तीमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. वय वर्षे १११ असताना वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्यावर भिसेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात वैद्य लक्ष्मीकांतराव, अनंतराव, हनुमंत,विनायक अशी चार मुले, तीन मुली,सुना, नातवंडे,पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने भिसेगावकर (कुलकर्णी) कुटुंबावर कोसळलेल्या या दुखात दै........................ परिवार सहभागी आहे.

MB NEWS:परळीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई:१० लाखांची लाच स्विकारताना वैद्यनाथ बॅंकेचे चेअरमन चतुर्भुज

इमेज
  परळीत अॅन्टिकरप्शन विभागाची मोठी कारवाई! परळीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई:१० लाखांची लाच स्विकारताना वैद्यनाथ बॅंकेचे चेअरमन चतुर्भुज परळी वैजनाथ, प्रतिनिधी     बॅंकेतून कर्ज मंजूर केल्याचा मोबदला म्हणून दहा लाख रुपयांची लाच स्विकारताना परळीतील वैद्यनाथ अर्बन को आॅप बॅंकेच्याचेअरमनला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.परळीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे.  कळंब येथील एका किराणा व्यापार्याला कर्ज मंजूर केल्याचे प्रकरण असुन  तक्रारदार यांचे सन 2018 मध्ये सी सी अकाउंट चे अडीच कोटी रुपये कर्ज मंजूर केल्याचा मोबदला म्हणून तक्रारदार यांचेकडे रु. 15,000,00/-  मागणी करून, रु.10,000,00/- ही प्रत्यक्ष स्वीकारून उर्वरित रू.5,000,00/-  नंतर घेण्याचे सांगितले.ही लाचलाचलुचपत प्रतिबंधक विभाग युनिट- औरंगाबादने  स्विकारताना चेअरमन अशोक जैन यांना ताब्यात घेण्यात आले आहे.सापळा अधिकारी-श्री. गणेश धोक्रट, पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि.औरंगाबाद. श्री पोना. विजय बाम्हंदे, सुनील पाटील,  मिलिंद इप्पर,  पोशि. विलास चव्हाण,  चागंदेव बागुल, ला. प्र. वि. औरंगाबाद मार्गदर्शक-मा.

MB NEWS:देशमुख टाकळी येथील शेतकऱ्यांनी सुरू केले आमरण उपोषण(Video News)

इमेज
  देशमुख टाकळी येथील शेतकऱ्यांनी सुरू केले आमरण उपोषण परळी (प्रतिनिधी)   तालुक्यातील देशमुख टाकळी येथील नंबर बांधावरील रस्ता मोकळा करण्याच्या नादात नंबर बांधावरील नालीच बुजविल्याने आजुबाजुच्या शेतात पाणी साचल्याने शेतकर्यांच्या उभ्या पिकासह सोयाबिनच्या गंजी व ज्वारीचा कडबा भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. याबाबत शेतकर्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे.      देशमुख टाकळी येथील गट नंबर 19,32,31,20,22, 23,24,25,14,08,09 व 07 या बारा गटनंबरच्या शेतातील पाणी वाहुन जाण्यासाठी नंबर बांधारुन मोठी नाली होती.यामुळे आजुबाजुच्या शेतातील पावसाचे पाणी या नालीद्वारे वाहुन जात होते. पावसाचे पाणी वाहुन नेणारी नाली बुजविली.नाली बुजविल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. रस्ता मोकळा करण्याच्या नादात संपुर्ण नालीच बुजुन टाकल्यामुळे आजुबाजुच्या शेतामध्ये तीन फुटापर्यंत पाणी साचले आहे.नुकसान भरपाई द्यावी व नाली बुजवणे, वृक्षतोडकरणे यासंदर्भात दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी शेतकरी उपोषण करीत आहेत.उपोसणकर्ते शेतकरी जगन्नाथ किशनराव शिंदे,व बन्सी ज्ञानोबा शिंदे यांनी न्याय मिळवून

MB NEWS:लॉकडाऊनमुळे खर्डे बंधूंनी व्यवसाय बदलला;पुजा साहित्याऐवजी रेडिमेड कपड्यांची विक्री

इमेज
  लॉकडाऊनमुळे खर्डे बंधूंनी व्यवसाय बदलला;पुजा साहित्याऐवजी रेडिमेड कपड्यांची विक्री *परळी (प्रतिनिधी)* लॉकडाऊन संपले असले तरी अद्याप बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले वैद्यनाथ मंदिर दर्शनासाठी उघडले नसल्याने मंदिर परिसरातील पुजा साहित्य विक्री करणारे दुकाने बंदच आहेत. या पार्श्वभूमीवर पुजा साहित्य विक्री ऐवजी खर्डे बंधूंनी मोंढा परिसरात व्यवसायात बदल करून रेडिमेड गारमेंटसची विक्री व्यवसाय सुरू केला आहे. परळी शहरातील वैद्यनाथ मंदिर परिसरात माणिकनगर भागातील रहिवाशी ज्ञानेश्वर खर्डे व रामभाऊ खर्डे यांचे पुजा साहित्य विक्रीचे दुकान मागील अनेक वर्षापासून कार्यरत आहे. लॉकडाऊनमुळे मागील काही महिन्यांपासून मंदिर बंद असून त्यामुळे पुजा साहित्य विक्री सुद्धा बंदच आहे. लॉकडाऊन उघडले असले तरी वैद्यनाथ मंदिर बंद असल्याने पुजा साहित्याची विक्री होत नाही. या पार्श्वभूमीवर खर्डे बंधूंनी मोंढा मार्केटमध्ये तयार कपड्यांच्या विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. परळी शहरात अनेकांना यामुळे रोजगार गमावण्यासोबतच व्यवसायाचे संकट झेलावे लागले. खर्डे बंधूंनी झालेला बदल लक्षात घेवून व्यवसायात व जागेतही बदल केला आहे.

MB NEWS:निधनवार्ता-माकपचे काॅ. बाबासाहेब सरवदे यांचे दुखःद निधन*

इमेज
 * माकपचे काॅ. बाबासाहेब सरवदे यांचे  निधन* अंबाजोगाई. प्रतिनिधी     माकपचे जेष्ठ नेते काॅ. बाबासाहेब सरवदे यांचे रविवारी सायंकाळी साडेसात वाजता अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात निधन झाले. मागील वर्षभरापासून कर्करोगाशी झुंज देत होते.      विद्यार्थी दशेपासुन एसएफआय या संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर अनेक आंदोलनाचे नेतृत्व केले. शेतकरी, शेतमजूरांच्या प्रश्नावर सतत सक्रीय राहुन त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्याचे काम काॅ. बाबासाहेब सरवदे यांनी केले आहे. जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी काॅ. गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या विचाराचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. शेतमजूर संघटनेवर त्यांनी अनेक वर्षे काम केले. शेतमजूर युनियनचे राज्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा येथे झाले होते. मागील पंधरा वर्षांपासून पासुन त्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम पहात होते.   काॅ. बाबासाहेब सरवदे हे मागील एक वर्षा पासुन कर्करोगाशी झुंज देत होते. रविवार दि. 18 रोजी सायंकाळी साडेसात वाजता अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात निधन झाले. मृत्युस

MB NEWS:परळी शहर गुटखा माफियांचा अड्डा बनलाय का?(Reporter-महादेव शिंदे)

इमेज
  परळी शहर गुटखा माफियांचा अड्डा बनलाय का? * परळी वैजनाथ (महादेव शिंदे)... शासनाने २०१२ मध्ये गुटखा बंदी लागू केली तेव्हापासून आजतागायत राज्यात गुटखा बंदी आहे. परंतु परळी शहरात कुठल्याही पान टपरी वर जा तुम्हाला गुटखा सहज मिळेल .शहरात अगदी लहान वयाची मुले सुद्धा गुटखा विक्री करताना सर्रास दिसून येत आहेत यावरून आता प्रश्न पडत आहे की खरंच गुटखा बंदी आहे का ?भारतामध्ये दरवर्षी लाखो लोक कर्करोगाने मृत्यू पावतात यामध्ये तोंडाचा कर्करोगाने  मृत्यू पावण्याचे प्रमाण जास्त आहे .तोंडाचा कर्करोग हा प्रमुख्याने तंबाखूजन्य पदार्थ ,गुटखा यामुळे होतो .परळीतील तरुण पिढी आज या गुटख्याच्या व्यसनाच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहे. शहरात या गुटखा विक्रिला आळा कधी बसणार? हा प्रश्न सुज्ञ लोक विचारत आहेत.  *परळी शहर गुटखा विक्रीचे केंद्र बनत  चालले आहे* परळी शहरांमध्ये बाहेर राज्यातून बोगस गुटखा,खर्रा, सुगंधी तांबाखू  छुप्या मार्गाने येते.शहरात गुटख्याचे बडे होलसेल चार-पाच व्यापारी असल्याचे बोलले जात आहे. हे व्यापारी परळी शहरातून  संपूर्ण जिल्ह्यात गुटखा पोहोचवत असल्याचे निदर्शनात  येत आहे गेल्या काही दिवसात

MB NEWS:बीड जिल्हा कोरोना अपडेटस्: आज दि.१८ आॅक्ट़ोबर प्राप्त अहवाल....*

इमेज
  *बीड जिल्हा कोरोना अपडेटस्: आज दि.१८ आॅक्ट़ोबर प्राप्त अहवाल....* जिल्ह्यात ७९ रिपोर्ट पाॅझिटिव्ह. ६८४ अहवाल प्राप्त झाले. *परळीत केवळ ६ रिपोर्ट पाॅझिटिव्ह जिल्ह्यात ६०५ रिपोर्ट निगेटिव्ह. ------------------ *बीड २५, अंबाजोगाई ८, आष्टी ८, धारूर २, गेवराई ४, केज ४, माजलगाव ९, परळी ६ , पाटोदा ७, शिरूर ६ तर वडवणी निरंक*

MB NEWS:वैद्यनाथ साखर कारखान्याच्या गळीताची तयारी: पूर्ण क्षमतेने कारखाना चालविण्यासाठी सज्जता

इमेज
  वैद्यनाथ साखर कारखान्याच्या गळीताची तयारी: पूर्ण क्षमतेने कारखाना चालविण्यासाठी सज्जता ऊसतोडणी वाहतूक कराराचा  शुभारंभ; पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना पुर्ण क्षमतेने चालवणार  परळी वैजनाथ दि. १७...         तालुक्यातील मौजे पांगरी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना गळीत हंगाम २०२१ च्या ऊसतोडणी आणि वाहतूक कराराचा शुभारंभ आज शनिवारी कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव अघाव यांच्या हस्ते आणि माजी आमदार तथा कारखान्याचे संचालक आर. टी. देशमुख यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. वैद्यनाथ कारखाना सुरू होणार असल्याने परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.         वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना माजी मंत्री तथा कारखान्याच्या चेअरमन पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी पुर्ण क्षमतेने गाळप करणार आहे. कारखान्याची आंतर्गत कामे युद्धपातळीवर सुरू झाली आहेत. लवकरात लवकर कारखाना गाळपासाठी सज्ज करण्यासाठी कर्मचारी सरसावले आहेत. दरम्यान आज शनिवारी दुपारी ३ वाजता ऊसतोडणी आणि वाहतूक कराराचा शुभारंभ कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव अघाव यांच्या हस्ते करण्यात आला