पोस्ट्स

रेल्वे लेबलसह पोस्ट दाखवत आहे
इमेज
हलगीच्या तालातून थेट देशसेवेपर्यंत! हलाखीच्या परिस्थितीत वाढलेल्या तरुणाची अग्निवीर जवानपदी निवड; परळीच्या साठेनगरमध्ये जल्लोष परळी वैजनाथ ,प्रतिनिधी :       परळीच्या साठे नगर मधील ज्या घरात दोन वेळच्या जेवणाची चिंता होती, ज्या वडिलांनी हलगी वाजवून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला, त्या कष्टकरी कुटुंबातील संतोष चौरे या तरुणाने आज भारतीय सैन्यात अग्निवीर जवान म्हणून निवड मिळवत संघर्षावर यशाची मोहोर उमटवली आहे. या अभिमानास्पद यशामुळे परळी शहरातील साठेनगर परिसरात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून प्रथमच साठे नगर परिसरातून देशसेवेत निवड झाली असल्याने नागरिकांनी जल्लोषात त्याचे स्वागत केले. आर्थिक संकट, अभाव आणि प्रतिकूल परिस्थिती यांचा सामना करत वाढलेल्या या तरुणाने लहानपणापासूनच देशसेवेचे स्वप्न पाहिले होते. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे अनेक अडचणी त्याच्या वाट्याला आल्या, मात्र त्याने परिस्थितीसमोर कधीही हार मानली नाही. कठोर परिश्रम, नियमित सराव आणि जिद्दीच्या बळावर त्याने भारतीय सैन्याच्या अग्निवीर भरती प्रक्रियेत यश संपादन केले. मुलाच्या निवडीची बातमी समजताच कष्टाने...

MB NEWS-सलग दुसरा दिवस: आजपण नांदेड-पनवेल रेल्वे लेट धावणार

इमेज
  सलग दुसरा दिवस: आजपण नांदेड-पनवेल रेल्वे लेट धावणार आज शुक्रवार दिनांक 21 ऑक्टोबर ला नांदेड येथून सुटणारी पनवेल एक्स्प्रेस उशिरा सुटणार असुन नांदेड-पनवेल रेल्वे आज 100 मिनिटे लेट होणार आहे. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गुरुवार दिनांक 20 ऑक्टोबर ला नांदेड येथून सुटणारी गाडी क्रमांक 17614 नांदेड ते पनवेल एक्स्प्रेस तिची नियमित वेळ सायंकाळी 18.20 वाजता सुटण्या ऐवजी गुरुवारी 4 तास 10 मिनिटे उशिरा म्हणजेच रात्री 22.30 वाजता सुटली सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार दि 21 रोजी देखील ही एक्सप्रेस 100 मिनिटे उशिरा नांदेड येथून सुटणार असून या गाडीची नियमित वेळ सायंकाळी 6:20 असून ती आज सायंकाळी 8 वाजता सुटणार आहे. प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

MB NEWS-थकीत निधी नगर - बीड - परळी रेल्वे प्रकल्पासाठी ठरू शकतो अडसर

इमेज
  अडीच वर्षाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने पाचशे ब्यानव कोटींचा निधी थकवला थकीत निधी नगर - बीड - परळी रेल्वे प्रकल्पासाठी ठरू शकतो अडसर खा.प्रितमताई मुंडे यांनी घेतलेल्या बैठकीत रेल्वे विभागाचा खुलासा बीड । दि. ०१ । केंद्र आणि राज्य सरकारच्या समान भागीदारीने होत असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पाच्या संथ गतीला नुकतेच सत्तेतून पायउतार झालेले महाविकास आघाडी सरकार जवाबदार असल्याचे वास्तव समोर आले आहे.राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सत्तेच्या कार्यकाळात रेल्वे प्रकल्पाचा पाचशे ब्यानव कोटी रुपयांचा निधी थकवला आहे.तत्कालीन सरकारच्या उदासीनतेमुळे या प्रकल्पाच्या कामात मोठी खीळ बसली आहे, हा थकीत निधी प्रकल्पाच्या प्रगतीमध्ये अडसर ठरू शकतो. क्लिक करा:  *हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे; धृतराष्ट्र नाही : हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नव्हे - उद्धव ठाकरे बीडच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रेल्वे , जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकास कामे आणि प्रस्तावित कामांचा त्यांनी आढावा घेतला. रेल्वे प्रकल्पासाठी सुरू असलेल...

MB NEWS-ट्राफिक ब्लाॅक: दि 13 ते 30 एप्रिल दरम्यान औरंगाबाद- हैदराबाद गाडीच्या वेळापत्रकात काहीसा बदल

इमेज
  ट्राफिक ब्लाॅक: दि 13 ते 30 एप्रिल दरम्यान औरंगाबाद- हैदराबाद  गाडीच्या वेळा पत्रकात काहीसा बदल परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या औरंगाबाद-हैद्राबाद या रेल्वेच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आला असून दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.      दक्षिण मध्य रेल्वे विभागाने प्रसिद्ध केलेल्या  दि 12 एप्रिल च्या पत्रकान्वये ट्रॅफिक ब्लॉकमुळे औरंगाबाद-हैदराबाद एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक  दि 13 ते 30 एप्रिल या कालावधीत चिकलठाणा औरंगाबाद विभाग - नांदेड विभागा दरम्यान प्रत्येक एक दिवस आड म्हणजे सोमवार, बुधवार, शनिवार गाडी क्रमांक 17650 औरंगाबाद- हैदराबाद एक्स्प्रेसची वेळ 2 तास 40 मिनिट उशीरा होणार आहे. सोमवार, बुधवार व शनिवार या दिवशी ही रेल्वे गाडी औरंगाबाद या रेल्वे स्थानकावरून 18.55 वा सुटणार आहे.या रेल्वे गाडीची नियोजित प्रस्थान होण्याची वेळ 16.15 वा आहे. दक्षिण मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी राकेश यांनी याबाबत माहिती दिली आहे.

MB NEWS-परळी रेल्वेस्थानक परिसरात आढळला पानगावच्या इसमाचा मृतदेह

इमेज
  परळी रेल्वेस्थानक परिसरात आढळला पानगावच्या इसमाचा मृतदेह परळी वैजनाथ, प्रतिनिधी...            येथील रेल्वे स्थानक परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह  आज( दि. २५) शुक्रवारी आढळला आहे. या मृतदेहाची ओळख पटली असुन मयत पानगाव येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे.        रेल्वे स्थानक परिसरात बाहेरच्या बाजूस एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. पांडुरंग लोहार, राहणार पानगाव, जि. लातूर (वय अंदाजे 55 वर्षे) अशी मयत व्यक्तीची ओळख  पटली आहे. या इसमाच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे. याबाबत पोलीस  माहिती घेत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयाकडे सुपूर्द केला आहे. मृतदेहाची ओळख पटल्याने संबंधितांच्या नातेवाईकांना पोलीस प्रशासनाने संपर्क करून कळवले आहे. याबाबतचा अधिक तपास संभाजीनगर पोलीस करत आहेत. ••• •••••••••••• •••••••••••• ••••• 🔸 हे देखील वाचा/पहा 🔸 •••••••••• •••••••••••• •••••••••••• •••••• •••• Click  - 🔸 *तुकाराम बीज ✍️ भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र(बाळु) महाराज उखळीकर यांनी ...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या