पोस्ट्स

सप्टेंबर २३, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राष्ट्रवादी विजयी संकल्प सभेची जय्यत तयारी

इमेज
राष्ट्रवादी विजयी संकल्प सभेची जय्यत तयारी ना. मुंडे, पंडित, क्षिरसागर यांनी केली स्टेज आणि परिसराची पाहणी  गेवराई, दि.२९ (प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा खा.शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार, दि.१ ऑक्टोबर रोजी बीड येथे होणार्‍या राष्ट्रवादी विजयी संकल्प सभेची जय्यत तयारी झाली असून ना.धनंजय मुंडे यांनी सभास्थळी जावून उभारलेला स्टेजची पाहणी करून उपस्थितांना विविध सूचना केल्या. यावेळी त्यांच्यासमवेत माजी आ.अमरसिंह पंडित, जि.प.सदस्य संदीप क्षिरसागर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने बीड येथे पक्षाचे सर्वेसर्वा खा.शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार, दि.१ ऑक्टोबर रोजी बीड येथील बागलाने ईस्टेट नाट्यगृहासमोर भव्यदिव्य राष्ट्रवादी विजयी संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेचे स्टेज ६०×४० असुन एक लाख लोक बसतील अशी व्यवस्था केली आहे. पुर्ण बीड शहरासह जिल्ह्यात बँनरच्या माध्यमातून उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.  या सभेची संपूर्ण जय्यत तयारी झाली असून आज ना.धनं

.... सरकारचा हा निर्णय म्हणजे आणखी एक गाजरच !

इमेज
.... सरकारचा हा निर्णय म्हणजे आणखी एक गाजरच ! ⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫ -------------------- *शासकीय कर्मचाऱ्यांच्या मृत्यूपश्चात कुटुंबाला १० लाख रुपये* -------------------- --------------------  *जुनी पेन्शन हक्क संघटनेला निर्णय अमान्य, पेन्शन दिंडीचा वाद परवानगीवरून चिघळला* -------------------- -------------------- मुंबई - शासकीय कर्मचाऱ्यांच्या मृत्यूपश्चात कुटुंबियांना १० लाख रुपये सानुग्रह देण्याचा शासन निर्णय राज्य शासनाने आज जाहीर केला आहे. मात्र, हा निर्णय म्हणजे राज्य सरकारचे आणखी एक गाजर असल्याची टीका करत जुनी पेन्शन हक्क संघटनेने निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. तसेच नवी पेन्शन योजना रद्द करत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी २ आॅक्टोबरला ठाण्यावरून मुंबईवर पेन्शन दिंडी आणण्याचा निर्धारही संघटनेने  व्यक्त केला आहे. संघटनेचे अध्यक्ष वितेश खांडेकर म्हणाले की, नव्या पेन्शनला संघटनेचा विरोध कायम आहे. पेन्शन दिंडीमुळे शासकीय कर्मचाऱ्यांमधील वाढता रोष लक्षात घेऊन सरकारने १० लाख रुपयांच्या मदतीची मलमपट्टी सुरू केली आहे. मात्र, त्याने आंदोलनावर कोणताही परिणाम होणार नाही. केंद्र श

.........तर तुम्हा -आम्हाला मतदानाचा अधिकार पण ठेवणार नाहीत - धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

इमेज
.........तर तुम्हा -आम्हाला मतदानाचा अधिकार पण ठेवणार नाहीत - धनंजय मुंडेंचा हल्लाबोल  बीड दि. 29............... बाहुबली या गाजलेल्या हिंदी चित्रपटा ज्या प्रमाणे अत्याचारी भल्लाळदेव याची सत्ता होती, जनतेच्या मनावर राज्य मात्र बाहुबलीचे होते. त्याचप्रमाणे श्री.छगन भुजबळ साहेब हे राजकारणातील बाहुबली असून, राज्य आणि केंद्रातील अत्याचारी भल्लाळदेवची सत्ता आता आपल्याला उलथवून टाकायची आहे. असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. बीड येथे अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री श्री. छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आयोजित समता परिषदेच्या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून श्री.मुंडे बोलत होते. महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहु महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समतेचा विचार दिला, आदरणीय खा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेबांनी हेच कार्य पुढे नेण्याचे कार्य केले. आता भुजबळ साहेबांच्या समर्थ नेतृत्वाखाली समता परिषदेच्या माध्यमातून हे कार्य जोमाने सुरू आहे. या सामाजिक क्षमतेच्या परिवर्तनाच्या लढाईत माझ्यासारखे