पोस्ट्स

जून ३०, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पोलीस असल्याची बतावणी करून पती- पत्नीला तीन लाखाला लूटले

इमेज
दोन दिवसाखालीच खून झालाय... चौकशी करायचीय थांबा म्हणत परळीजवळ वाटमारी ! पोलीस असल्याची बतावणी करून पती- पत्नीला तीन लाखाला लूटले परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....       परळी जवळच्या चांदापूर या गावाकडे जाणाऱ्या डोंगरजवळा ता. गंगाखेड जि.परभणी येथील एका पती-पत्नीला आम्ही पोलिस आहोत असे म्हणून रस्त्यात थांबवले आणि आजूबाजूला कोणी नाही हे बघून त्यांना तीन लाख रुपयाला लूटल्याची घटना घडली आहे.विशेष म्हणजे या तोतया पोलिसांनी या पती- पत्नीला भिती घालत दोन दिवसा खालीच इकडे खून झाला आहे. तुमची चौकशी करायची आहे असा संदर्भ देत या पती पत्नीला चांगलाच दम दिल्याचेही पुढे आले आहे.           या खळबळजनक व नागरिकांमध्ये पोलिसांच्या नावाखाली दहशत निर्माण करणाऱ्या घटनेची पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, सुरेश केरबा मुंडे वय 70 वर्षे रा.डोंगरजवळा ता. गंगाखेड जि.परभणी हे लुना गाडीवर परळी जवळील चांदापूर येथील त्यांचे व्याही माधवराव आर्जुन गित्ते रा. चांदापुर यांना हात ऊसणे देण्यासाठी म्हणून एका बॅगमधून  तीन लाख रुपये घेऊन निघाले. त्यांच्यासोबत लूनावर त्यांची पत्नीही सोबत होती.चांदापूर रस्त्यावरील एका मंगल

पीएम किसान संदर्भातील लक्षवेधीला मुंडेंचे उत्तर

इमेज
कृषी विभागाच्या प्रयत्नातून एक वर्षात पीएम किसान योजनेत राज्यात 20 लाख 50 हजार लाभार्थींची वाढ - धनंजय मुंडे पीएम किसान संदर्भातील लक्षवेधीला मुंडेंचे उत्तर - 65 हजार शेतकऱ्यांचा प्रलंबित प्रस्ताव केंद्राकडे सादर, मान्यतेसाठी पाठपुरावा करणार - धनंजय मुंडेंचे उत्तर आ.अभिमन्यू पवारांसह विविध सदस्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून  केली होती मागणी डेटा एन्ट्री साठी स्वतंत्र लॅपटॉप देणार - मुंडेंची घोषणा मुंबई (दि. 02) - केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या पीएम किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये तर यावर्षीपासून राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेतून 6 हजार रुपये असे एकूण 12 हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. या योजनेत चौदाव्या हप्त्यापर्यंत 70 लाख लाभार्थी राज्यातून लाभ घेत होते. कृषी विभागाने विविध मोहिमा राबवत गेल्या एक वर्षामध्ये या योजनेमध्ये 20 लाख 50 हजार लाभार्थ्यांची वाढ करण्यात आली असल्याची माहिती आज एका लक्षवेधीच्या उत्तरादरम्यान कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.  पी एम किसान योजनेत राज्यातील 65 हजार शेतकरी काही का

हत्या झाली, रोहित पवार मात्र राजकीय पोळी भाजत असल्याचा आरोप

इमेज
बापू आंधळे हत्या प्रकरणी वक्तव्य:आ.रोहित पवारांच्या निषेधार्थ रा.काॅ.कडून उद्या परळी बंदची हाक परळी वैद्यनाथ (दि. 02) - 29 जून रोजी परळी वैद्यनाथ शहरात धनंजय मुंडे समर्थक मरळवडीचे सरपंच असलेले बापूराव आंधळे यांची डोक्यात गोळ्या झाडून  हत्या करण्यात आली. तसेच आणखी एक तरुण गोळीबारात जखमी आहे. या प्रकरणात पोलिसांनी खूनाचा गुन्हा नोंद केला असून ते तपास करत आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे  आमदार रोहित पवार यांना स्वतःची व आपल्या पक्षाची कातडी वाचवायची इतकी घाई झाली आहे की, ते मयत बापू आंधळे व त्याच्या कुटुंबविषयी सहनुभीती दाखवायचे सोडाच, उलट या निर्घृण हत्येतील आरोपीची पाठराखण करत आहेत.धनंजय मुंडे यांची व परळीची बदनामी करत सुटले आहेत. त्यांचे हे वर्तन अत्यंत असंवेदनशील व निषेधार्ह असून बुधवार दि. 03 जुलै रोजी परळी शहर बंदची हाक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.          एका तरुणाची निर्घृण हत्या झाली, आणखी एक जण मृत्यूशी झुंज देत आहे. त्याबद्दल कोणतीही संवेदनशीलता न दाखवता केवळ राजकारण मध्ये आणून आरोपीचे समर्थन करायचे इतकेच नाही तर उलटपक्षी परळीची आणि आमच

पंतप्रधान मोदींसह राज्यातील नेत्यांचे मानले आभार

इमेज
  मला आज जे काही मिळतंय ते पाच जिवांच्या चरणी अर्पण करते :पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या भावना   पंतप्रधान मोदींसह राज्यातील नेत्यांचे मानले आभार मुंबई।दिनांक ०२। “मला जीवनात जे काही मिळणार आहे, ते मी त्या पाच जीवांच्या चरणी अर्पण करते. ते आज असते तर त्यांनी घोषणाबाजी केली असती, परंतु ते आता नाहीत तर मला त्यांचं शल्य राहील. त्यांना हे मी समर्पित करते” अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी विधानपरिषदेची उमेदवारी दाखल करतेवेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.    पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, “सर्वप्रथम या दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करू इच्छिते. मी आधी सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं आणि आता या लोकांना भेटायला आले. ज्यांनी कधीही मला क्षणभरदेखील स्वतःला, स्वतःच्या हृदयपासून दूर ठेवलं नाही. माझ्या सर्व वाईट काळात ते माझ्याबरोबर राहिले. त्यांचं दर्शन घेतलं आणि आता आईचं दर्शन घ्यायला चालले आहे. मग मी अर्ज दाखल करेन.” मी माझे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर ब

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री, आमदारांनी दिल्या शुभेच्छा

इमेज
  विधानपरिषद निवडणूक; पंकजाताई मुंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री, आमदारांनी दिल्या शुभेच्छा पंकजाताईंना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातील कार्यकर्त्यांची वरळी ऑफिसला तोबा गर्दी 'पंकजाताई आगे बढो', 'मुंडे साहेब अमर रहे' च्या घोषणांनी विधानभवन परिसर दणाणला मुंबई।दिनांक ०२।  भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज विधानपरिषद निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री तसेच आमदारांनी त्यांना यावेळी शुभेच्छा दिल्या. पंकजाताईंची उमेदवारी दाखल करतेवेळी  विधानभवन परिसरात तसेच वरळीच्या कार्यालयात राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.     विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी येत्या १२ जुलै रोजी निवडणूक होत असून आज उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. भाजपने पंकजाताईंसह आपल्या पाच उमेदवारांची घोषणा काल केली होती. आज सकाळी ११ वा. पंकजाताईंनी विधानभवनात जावून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी सकाळी त्यांनी श्

गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी केला आनंदोत्सव

इमेज
  पंकजा मुंडे विधानपरिषदेवर ; परळीसह जिल्ह्यात फटाक्यांची आतिषबाजी गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी केला आनंदोत्सव परळी वैजनाथ।दिनांक०१।  भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाल्याचे समजताच परळीसह संपूर्ण जिल्ह्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह यावेळी पहावयास मिळाला. Click :- ● *अखेर भाजपने पंकजाताईंना विधानपरिषद दिली !*     विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आज आपल्या पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली, यादीत पहिल्या क्रमांकावर पंकजाताई  मुंडे यांचे नाव जाहीर होताच राज्यभरातील कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. परळी शहरात राणी लक्ष्मीबाई टाॅवर, छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच पंकजाताईंच्या यशःश्री निवासस्थानी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली तसेच गुलाल उधळून एकच जल्लोष केला. जिल्ह्यात बीड, आष्टी, पाटोदा, शिरूर, केज, अंबाजोगाई आदींसह विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी वाजतगाजत पेढे वाटून आनंद व्यक्त केला.  ••••

विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक विनायक राजमाने सेवानिवृत्त

इमेज
  विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक विनायक राजमाने सेवानिवृत्त परळी / प्रतिनिधी परळी तालुक्यातील मोहा येथील महाराष्ट्र माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विनायक राजमाने हे विहित वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.सोमवार दि 1 रोजी त्याच्या सेवापूर्ती गौरव सोहळा महाराष्ट्र विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला. महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा संचलित परळी तालुक्यातील ग्रामीण भागात असलेली सर्वात मोठी शाळा असलेल्या महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक विनायक राजमाने 28 वर्ष सेवा बजावून सेवानिवृत्त झाले.सेवापूर्ती निमित्ताने सोमवार दि 1 रोजी त्याचा गौरव सोहळा शाळेच्या प्रांगणात संपन्न झाला.या प्रसंगी संस्थेचे सचिव एड.अजय बुरांडे,जेष्ठ संचालक सुदामदादा देशमुख, सुदाम शिंदे,केंद्र प्रमुख विश्वंभर चेनलवाड, माजी मुख्याध्यापक भगवान बडे, उपमुख्याध्यापक मुरलीधर बोराडे, मुख्याध्यापक सुरेश बुरांडे आदी सह राजमाने परिवारांचे स्नेही,नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अखेर पंकजाताईंना विधानपरिषद दिली !

इमेज
  अखेर पंकजाताईंना विधानपरिषद दिली !        मराठवाड्यात बसलेल्या राजकीय पराभवावर मार्ग काढण्याच्या हालचाली आता भाजपकडून सुरू झाल्याचं दिसून येत आहे. कारण, आगामी विधानपरिषद निवडणुकांसाठी भाजपकडून 5 उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. विधानपरिषदेच्या जागेसाठी पंकजा मुंडेंनाही संधी देण्यात आली आहे. सर्वच राजकीय पक्ष ऑक्टोबर महिन्यात घोषित होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. तत्पूर्वी विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली असून पुढील महिन्यात विधानपरिषदेच्या 11 जागांसाठीही निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता भाजपकडून विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी 11 नावांची चर्चा सुरू होती. त्यामध्ये, लोकसभा निवडणूकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनाही संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.बीडमधील पराभूत उमेदवार पंकजा मुंडे यांचा भाजपच्या यादीत  समावेश आहे.         भाजपकडून विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी 11 नावांवर चर्चा सुरू होती ओबीसी, मराठा आणि धनगर समाजाला खुश करण्याचा भाजपकडून प्रयत्न होत आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वीच विधानपरिषदेत संधीत देऊन जातीय समीकरणं जुळवण्या

पालकमंत्री धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांनी शोकभावना व्यक्त करत वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली

इमेज
  नामदेवराव दादा क्षीरसागर यांच्या निधनाने जिल्ह्यातील एक प्रखर सामाजिक चळवळ आज शांत झाली - धनंजय मुंडे नामदेवराव क्षीरसागर यांच्या निधनाने जिल्हयाने ज्येष्ठ आणि अभ्यासू पत्रकार गमावला - पंकजा मुंडे पालकमंत्री धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांनी शोकभावना व्यक्त करत वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली बीड।दिनांक ०१। दैनिक चंपावतीपत्रचे संपादक नामदेवराव क्षीरसागर यांच्या निधनाने जिल्ह्याने एक ज्येष्ठ आणि अभ्यासू पत्रकार गमावला आहे, अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी शोकभावना व्यक्त करत क्षीरसागर यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.    ज्येष्ठ संपादक नामदेवराव क्षीरसागर यांच्या दुःखद निधनाने पत्रकारितेचे मोठे नुकसान झाले आहे. क्षीरसागर यांनी दैनिकाच्या माध्यमातून सर्व सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम तर केलेच याशिवाय बीडला रेल्वे आणण्यातही त्यांचे योगदान महत्वाचे होते. संस्कार प्रबोधिनीच्या माध्यमातून शैक्षणिक चळवळ देखील त्यांनी उभी केली.बीड जिल्हा व मराठवाड्यातील जनसामान्यांच्या प्रश्नांना त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडून न्याय मिळवून दिला. केवळ पत्रकारिताच नव

Photos.....विहंगम दृष्य :संतश्रेष्ठ गजानन महाराज पालखी...

इमेज
 ● विहंगम दृष्य : शेगाव येथील संतश्रेष्ठ गजानन महाराज यांचा आषाढी पालखी सोहळा काल परळीत दाखल झाला.आज शक्तीकुंज वसाहत येथून परळी वैजनाथ येथे मार्गक्रमण करतांना परळीतील डाॅ.शामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपुलावर असतांना टिपलेले हे विहंगम दृष्य.  ( छायाचित्रे: सुनील फुलारी, प्रेस फोटोग्राफर परळी वैजनाथ .) संतश्रेष्ठ गजानन  महाराजांच्या पालखीचे वैद्यनाथनगरीत जोरदार स्वागत पण नगरप्रदक्षिणेची परंपरा यावर्षीही खंडीत ! दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी; हरिनामाच्या गजराने परळी दुमदुमली परळी वैजनाथ /एमबी न्यूज वृत्तसेवा        भाविकांचे श्रध्दास्थान असलेले संत श्रेष्ठ गजनान महाराज यांच्या पालखीचे प्रभु वैद्यनाथाच्या नगरीत आज (दि.1) आगमन झाले आहे. आज सकाळी हा पालखी सोहळा  औष्णीक विद्युत केंद्राच्या शक्तीकुंज वसाहतीतून परळी शहराच्या दिशेने रवाना झाला. श्रींच्या पालखीचे परळीच्या भाविकांनी उत्स्फुर्तपणे स्वागत केले.      आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर प्रभु वैद्यनाथाच्या नगरीतून छोट्या-मोठ्या पालख्यांचे आगमन परळी शहरात होत आहे. या पालख्यांचेही स्वागत परळीचे भाविक मनोभावे करत असल्याचे दिसत आहे.संत ग

जुन्या पिढीतील सामाजिक, राजकीय ज्येष्ठ नेते प्रकाशसिंह ठाकूर यांचे निधन

इमेज
  जुन्या पिढीतील सामाजिक, राजकीय ज्येष्ठ नेते प्रकाशसिंह ठाकूर यांचे निधन परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....     परळीतील जुन्या पिढीतील सामाजिक, राजकीय व सर्व क्षेत्रात जनसंपर्क असलेले सर्व परिचित असे व्यक्तिमत्व प्रकाशसिंह (भैय्या) ठाकूर यांचे वयोमानाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 77 वर्षे वयाचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.       प्रकाशसिंह हनुसिंह (शेंगर) ठाकूर हे परळी शहरातील सर्व परिचित असे व्यक्तिमत्त्व होते. ठाकूर स्टाईल राहणीमान व पेहरावाने त्यांचे व्यक्तिमत्व भारदस्त व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते. प्रत्येकाशी अतिशय आत्मीयतेने व अधिकाराने बोलणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्रकाशसिंह ठाकुर होते. परळी नगर परिषदेत नगरसेवक म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. परळी शहरातील जुन्या पिढीतील सामाजिक, राजकीय क्षेत्रात सक्रिय असणारे प्रकाशसिंह ठाकूर हे जनसंघातही कार्यरत होते. त्यांच्या निधनाने ठाकूर कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात एम बी न्यूज परिवार सहभागी आहे.

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

इमेज
  परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात  परळी वैजनाथ, एमबी न्युज वृत्तसेवा-           परळी तालुक्यातील मरळवाडीच्या सरपंच खून प्रकरणात  पोलीस वेगाने तपास करीत असुन जलद तपासासाठी व फरार आरोपींच्या शोधासाठी तीन पथके तैनात करण्यात आली आहेत.या अनुषंगानेच आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना केज आणि धारूर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.तसेच या प्रकरणात वापरण्यात आलेली तीन वाहनेही पोलीसांनी ताब्यात घेतली आहेत.            परळी तालुक्यातील मरळवाडी गावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर शनिवारी येथील बँक कॉलनीत रात्री ८.३० वाजता गोळीबार करण्यात आला. यात बापू आंधळे यांचा जागीच मृत्यु झाला. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत उर्फ बबन गित्ते यांच्यासह पाच जणांविरुद्ध खूनाचा व खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा परळी शहर पोलिस ठाण्यात रविवारी सकाळी दाखल करण्यात आला होता. या आरोपीना फरार करण्यासाठी मदत केलेल्या चौघांना केज आणि धारूर पोलिसांनी अटक केली

जेष्ठ संपादक नामदेव क्षीरसागर यांचे निधन!

इमेज
  जेष्ठ संपादक नामदेव क्षीरसागर  यांचे निधन! बीड -दैनिक चंपावतीपत्र   चे संपादक नामदेवराव क्षीरसागर उपाख्य दादा यांचे निधन झाले. राहत्या घरी सकाळी वृतपत्र वाचन सुरु असताना दादांना हृदयविकाराचा त्रास झाला अन त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. ते 83 वर्षाचे होते. गेल्या अर्ध्या शतकापासून बीड जिल्ह्याच्या वृत्तपत्र क्षेत्रावर वेगळी छाप निर्माण करणारे नामदेवराव क्षीरसागर यांचे सामाजिक, राजकीय योगदान मोठे होते. संस्कार प्रबोधिनी च्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यात शैक्षणिक चळवळ मजबूत केली. नगर बीड परळी रेल्वे मार्गासाठी त्यांनी जनआंदोलन उभारले होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

नांदेडच्या एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात दोन नवीन अभ्यासक्रमाला एआयसीटीई ची मान्यता

इमेज
  नांदेडच्या एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात दोन नवीन अभ्यासक्रमाला एआयसीटीई ची मान्यता   .............. नांदेड दिनांक 30 जून प्रतिनिधी  नांदेड येथील महात्मा गांधी मिशन संचलित एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात नवी दिल्ली येथील अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने अभियांत्रिकी विद्याशाखेतील अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा समजल्या जाणाऱ्या  आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग व ऑटोमेशन रोबोटिक या दोन विद्याशाखांना शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून प्रत्येकी 60 प्रवेश क्षमतेला मान्यता दिली आहे. अशी माहिती अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. गीता लाठकर यांनी दिली आहे.         1984 मध्ये महात्मा गांधी मिशनचे अध्यक्ष, माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांनी नांदेड जिल्ह्यातील युवकांसाठी अभियांत्रिकी शिक्षणाची गरज लक्षात घेऊन अभियांत्रिकी महाविद्यालयाला प्रारंभ केला होता. अभियांत्रिकी पदवी विद्याशाखेचे पाच अभ्यासक्रम, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे चार अभ्यासक्रम तसेच संशोधन केंद्र (रिसर्च सेंटर) आजमितीस या अभियांत्रिकी महाविद्यालयात उपलब्ध आहेत. या शैक्षणिक वर्षापासून या अभियांत्रिकी महाविद्या