पोस्ट्स

सप्टेंबर ११, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MB NEWS- *■मराठवाडा मुक्ती संग्रामाचा पाठय पुस्तकात समावेश व्हावा-डॉ.विवेक मॉंटोरो*

इमेज
 ■मराठवाडा मुक्ती संग्रामाचा पाठय पुस्तकात समावेश व्हावा-डॉ.विवेक मॉंटोरो परळी / प्रतिनिधी देशाच्या स्वतंत्र संग्रामाप्रमाणे मराठवाडा मुक्ती संग्राम इतिहास आहे.निजामशाहीच्या जुलमी राजवटीतून मराठवाडा मुक्त करण्यासाठी मराठवाड्यात अनेकांनी आपल्या जीवाची आहुती देत शहीद झाले.मराठवाडा मुक्ती संग्राम इतिहास भावी पिढीला कळवा,त्यातून प्रेरणा मिळावी याकरिता मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास पाठय पुस्तकात असावा असे मत संशोधन,गणितज्ञ डॉ.विवेक मॉंटोरो यांनी व्यक्त केले. परळी तालुक्यातील महाराष्ट्र प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मोहा येथे 74 व्या मराठवाडा मुक्तीदिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.या प्रसंगी पुणे येथील नवनिर्मिती फौंडेशनच्या संचालिका गीता महाशब्दे, स्वाती मोरे,संस्थेचे सचिव एड.अजय बुरांडे,जेष्ठ संचालक सुदामदादा देशमुख, सुदाम शिंदे,सखाराम शिंदे आदी उपस्थित होते.या प्रसंगी डॉ.विवेक मॉंटोरो यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न झाले. अमेरिका येथील जागतिक ख्यातीचे स्टोनी ब्रूक या विद्यापीठातून गणितीय भौतिकशास्त्र या विषयात पीएचडी करू

MB NEWS-भेल सेकंडरी स्कूल येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि " निधी समर्पणाचा कार्यक्रम

इमेज
  भेल सेकंडरी स्कूल येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि " निधी समर्पणाचा कार्यक्रम  परळी.वै:    येथील बीड जिल्ह्य़ातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई संचलित एकमेवाद्वितीय भेल संकुलात " मराठवाडा मुक्ति संग्राम दिन" मा.श्री.राम पोरवालजी यांच्या हस्ते ध्वजारोहण करूण साजरा करण्यात आला. मराठवाडा मुक्ति संग्राम हे हिंदुस्थानी स्वातंत्र्यलढ्यातील एक उज्ज्वल व लोक विलक्षण पर्व आहे.मराठवाड्याच्या स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या ज्ञात- अज्ञात हुतात्म्यांना व त्यांच्या अतुलनीय शौर्याची स्मृती सदैव जागृत ठेवण्यासाठीच हा दिन साजरा केला जातो.या दिनाचे औचित्य साधून इ.स 2021-22 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीतील ( स्टेट व सी.बी.एस.ई पॅटर्न) मधील विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसोबत यथोचित सत्कार मान्यवरांकडून करण्यात आला. तसेच दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्व. अजित विकासराव डुबे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मा.श्री.विकासराव डुबे यांनी भेल संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी  विविध विषयांवरील प

MB NEWS-पंतप्रधान मोंदींच्या वाढदिवसानिमित्त पंकजाताई मुंडे यांचा स्त्युत्य संकल्प*

इमेज
 * टीबी रूग्णांच्या सेवेसाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान सरसावले!* *दोन रूग्ण दत्तक घेऊन उपचाराची संपूर्ण काळजी घेणार*  *पंतप्रधान मोंदींच्या वाढदिवसानिमित्त पंकजाताई मुंडे यांचा स्त्युत्य संकल्प* परळी ।दिनांक १७।  समाजातील वंचित, पिडित व गरजू लोकांना नेहमीच मदतीचा हात देणाऱ्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने आता टीबी रूग्णांच्या सेवेसाठी पुढाकार घेतला आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी टीबीचे दोन रूग्ण दत्तक घेऊन त्याच्या उपचाराची संपूर्ण काळजी घेणार असल्याचा स्त्युत्य संकल्प   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर केला आहे.    यासंदर्भात पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करत देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की,सेवा पंधरवाडाच्या निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या जन्म दिवस १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहेत. हे कार्यक्रम अत्यंत साधेपणाने व्हावेत अशी अपेक्षा आहे. आज आदरणीय मोदीजीनां वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा देत असताना त्यांनी जो मार्ग आम्हाला दिला आहे

MB NEWS- मुख्यमंत्री काही मिनिटात ध्वजारोहण उरकून हैदराबादला गेलेच कसे? -अजित पवारांचा निशाना

इमेज
  मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन: सरकारकडून झालेली बेफिकिरी दुर्दैवी -अजित पवार मुख्यमंत्री काही मिनिटात ध्वजारोहण उरकून हैदराबादला गेलेच कसे? -अजित पवारांचा निशाना बीड दि. 17 - महाराष्ट्रात मराठवाडा मुक्ति संग्राम दिनाचे कार्यक्रम घ्यायचे सोडून मुख्यमंत्री काही मिनिटात ध्वजारोहण उरकून हैदराबादला गेलेच कसे? असे केल्याने इथल्या नव्या पिढीला मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचं महत्त्व कळणार कसं, असा सवाल विधान सभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केला. ते आज बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील कार्यक्रमात बोलत होते.    माजलगाव येथील सुंदरराव सोळंके महाविद्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. तसेच आपण अर्थमंत्री असताना मराठवाड्याला किती निधी दिला, हेही अजित पवारांनी आवर्जून सांगितलं. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले, मराठवाडा मुक्तिसंग्राम आणि अमृत महोत्सवाबद्दल अनुत्साह दाखवण्यात आलाय. मी अर्थमंत्री असताना मराठवाड्यासाठी 75 कोटी निधीची पूर्तता केली

MB NEWS-सलग नऊ वेळा खासदार, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन

इमेज
  सलग नऊ वेळा खासदार, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन नंदुरबार :  माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. नाशिकमध्ये खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माणिकराव गावित नंदुरबारमधून  सलग नऊ वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. शनिवार, १७ सप्टेंबर सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी त्यांनी जगाचा निरोप घेतला. ते कार्यकर्त्यांमध्ये 'दादासाहेब' म्हणून लोकप्रिय होते. माणिकराव गावित यांचे सुपुत्र भरत गावित यांनी ट्विटरवरुन वडिलांच्या निधनाची दुःखद बातमी दिली आहे. माणिकरावांनी १९६५ मध्ये ग्रामपंचायतीपासून राजकारणाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर केंद्रीय गृह राज्यमंत्री, सामाजिक न्याय राज्यमंत्री अशी पदं न मागताच मिळाली. संसदेतील सर्वात ज्येष्ठ खासदार म्हणून त्यांनी लोकसभेचे हंगामी अध्यक्षपदही भूषवले होते. १९८१ मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभा लढवली व विजयीही झाले. त्यानंतर त्यांनी सलग नऊ वर्ष विजयी टिळा मिरवला. नंदुरबार लोकसभा मतदारसंघ आणि काँग्रेस हे एक समीकरण तयार झालं होतं

MB NEWS-शेतकऱ्यांच्या जनआक्रोश धरणे आंदोलनात शासनावर अजय मुंडेंचा हल्लाबोल

इमेज
  शेतकऱ्यांच्या जनआक्रोश धरणे आंदोलनात शासनावर अजय मुंडेंचा हल्लाबोल _......तर येणाऱ्या काळात आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांसह जेलभरो करू!_ बीड, प्रतिनिधी ता. 16...... बीड जिल्ह्यातील हजारो शेतकरी आज सर्वपक्षीय जनआक्रोश धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.  बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अग्रीम पीकविमा, अनुदान, जनावरांच्या लम्पी आजारावर मुबलक लशींची उपलब्धी व्हावी आदी मागण्यांसाठी बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन करण्यात आले. बीड जिल्ह्यातील हजारो शेतकरी बांधव या जनआक्रोश आंदोलनात सहभागी झाले होते. या सर्वपक्षीय शेतकऱ्यांच्या जनआक्रोश आंदोलनात युवक नेते श्री. अजय मुंडे यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचा पाढा वाचत प्रशासनावर जोरदार हल्ला चढवला, मागील वर्षी आ. धनंजय मुंडे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना ज्याप्रमाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रीम विमा मदत देण्यात आली, त्याप्रमाणे याही वर्षी विमा लागू असलेल्या सर्व पिकांना अग्रीम मदत द्यायला हवी होती

MB NEWS-विमा कवच मंडळनिहाय नव्हे तर गावनिहाय द्या- कॉ. एड. अजय बुरांडे

इमेज
  घरच्या भाकरी घेऊन भरपावसात आंदोलन:रूमणे दाखवीत शेतकऱ्यांचा विमा कंपनी व सरकारला इशारा ■विमा कवच मंडळनिहाय नव्हे तर गावनिहाय द्या- कॉ. एड. अजय बुरांडे बीड / प्रतिनिधी       सोयाबीन पिकाच्या पायी शेतकऱ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली तरी विमा कंपन्या त्यांचा हेका सोडायला तयार नाहीत. केंद्रात आणि राज्याच्या सभागृहात निवडून पाठवलेल्या प्रतिनिधींचं काम आहे की त्यांनी शेतकऱ्यांना पुरक असे निर्णय सभागृहात मंजूर करून घ्यायला हवेत. परंतु गोगलगाय आमचं सोयाबीन खाते तरी विमा कंपनी म्हणते गोगलगायीने केलेलं नुकसान किटकामध्ये मोडत नाही, सलग 27 दिवस पावसाचा खंड पडतो तरी विमा कंपनी एक ते दिड मिलिमीटर पाऊस दाखवून विमा नाकारत आहेत. आता कंपन्यांची ही मग्रुरी कदापिही खपवून घेतली जाणार नाही. सभागृहात बसलेल्या लोकप्रतिनिधींनी आता मंडळनिहाय ही संकल्पना बदलून गावनिहाय संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न करावेत. आज किसान सभा दाखवत असलेलं रूमणं कंपन्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या जिवावर राजकारण करू पाहणाऱ्यांसाठी इशारा असेल, असा खणखणीत इशारा अखिल भारतीय किसान सभेचे कॉ. अजय बुरांडे यांनी दिला आहे. कॉ. बुरांडे

MB NEWS-शनिवार व रविवार परळी येथील जगमित्र कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस सक्रिय सदस्य नोंदणी साठी विशेष अभियान

इमेज
  शनिवार व रविवार परळी येथील जगमित्र कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस सक्रिय सदस्य नोंदणी साठी विशेष अभियान राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय सदस्य बनण्यासाठी सर्वांनी या अभियानात सहभागी व्हावे - बाजीराव धर्माधिकारी परळी (दि. 16) - माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली व ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस सक्रिय सदस्य नोंदणीसाठी आ. मुंडे यांच्या जगमित्र या संपर्क कार्यालयात शनिवार व रविवार असे दोन दिवसीय सक्रिय सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे.  या अभियानात राष्ट्रवादी काँग्रेस चे सदस्य होऊ इच्छिणाऱ्या सर्वांनी सहभागी होऊन जास्तीत सक्रिय सदस्य नोंदणी करावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.  मागील तीन महिन्यांमध्ये आ. धनंजय मुंडे यांनी स्वतः हे अभियान सक्रियपणे राबवत परळी शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांशी घरोघर संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवत मोठ्या प्रमाणावर सक्रिय सदस्यांची देखील नोंदणी केली होती.  या नोंदणी केलेल्या सदस्यांचे फॉर्म एकत्र

MB NEWS- ■अभ्यासामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष नको-बी.यु.रोडे

इमेज
 ■अभ्यासामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष नको-बी.यु.रोडे  परळी / प्रतिनिधी.......शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अभ्यासाच्या ताणतणावामुळे  विद्यार्थ्यांचे आरोग्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष्य होत असून भावी आयुष्यासाठी हे धोकादायक असल्याचे मत परळी पंचायत समितीच्या बाल विकास अधिकारी बी.यु रोडे मॅडम यांनी व्यक्त केले.            परळी तालुक्यातील महाराष्ट्र माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे किशोरवयीन विद्यार्थीनीकरिता आरोग्य,स्वछता,आहार व व्यक्तिमत्त्व विकास या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शिका म्हणून बोलत होते.यावेळी पंचायत समितीच्या सौ.देशमुख मॅडम,सौ.पंडित मॅडम,सौ.कराड मॅडम तर अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.मनीषा जाधव मॅडम आदी उपस्थित होत्या.            पुढे बोलताना सौ.रोडे म्हणाले की ,किशोरवयीन विद्यार्थिनींमध्ये सततचा अभ्यासामुळे ताण-तणाव निर्माण होतो. मुलगी असल्या कारणाने घरातील किरकोळ कामे ही त्यांना करावी लागतात.परंतु आजच्या मुली ह्या सावित्रीच्या लेकी असून स्त्री बाबतीत

MB NEWS-दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळणे हे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे फळ - तुपसागर ; पदोन्नती व विशेष कामगिरीबद्दल सन्मान

इमेज
  दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळणे हे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे फळ - तुपसागर पदोन्नती व विशेष कामगिरीबद्दल सन्मान  परळी (प्रतिनिधी)    परळी औष्णिक विद्युत  केंद्रातील विशेष कामगिरी करणाऱ्या तसेच पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांचा फुले -शाहू -आंबेडकरी अभ्यास समूहाच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ के. एस. तूपसागर म्हणाले की, परळी वीज निर्मिती केंद्राला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळणे हे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे फळ आहे. मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्या मार्गदर्शनामुळे ही शक्य झाल्याचे ते म्हणाले.          परळी शक्तीकुंज वसाहतीतील एबीसी कॉलनी मध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शीतल गायकवाड हे होते. भारतरत्न युगपुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन करण्यात आले तर याप्रसंगी फुले- शाहू- आंबेडकरी समूहाच्या वतीने अधीक्षक अभियंता ए.एस.लोणे आणि अधीक्षक अभियंता एस. एन. बुक्‍तरे यांचा पदोन्नती मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला तसेच  परळी औष्णिक विद्युत केंद्राला विशेष कामगिरीबद्दल यावर्षी

MB NEWS- *आशा व गटप्रवर्तक युनियनने तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना घातला घेराव; खात्यात मानधन जमा होईपर्यंत आंदोलन*

इमेज
 आशा व गटप्रवर्तक युनियनने तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना घातला घेराव; खात्यात मानधन जमा होईपर्यंत आंदोलन परळी वैजनाथ, प्रतिनिधी       आशा व गटप्रवर्तकांच्या मानधन विषयक विविध मागण्यांसाठी आज बीड जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने शहरात लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. वाजत गाजत मोर्चाने जाऊन तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. आंदोलनात आशा व गटप्रवर्तक आक्रमक झाल्या होत्या. अखेर खात्यात मानधनाची रक्कम जमा होईपर्यंत हे आंदोलन आंदोलनकर्त्यांनी सुरूच ठेवले होते. या आंदोलनाला यश आले असून तीन महिन्याचे मानधन खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे.          आशा व गटप्रर्वतकांना जुलै २०२१ मध्ये आशाना १५०० व गटप्रर्वतकांना १७०० ची वाढ झाली होती. ही वाढ एप्रील २०२२ पासून ५ महिण्याची देण्यात यावी.,आशा व गटप्रर्वतकांना सप्टेंबर २०२१ पासून आशाना २००० व गटप्रर्वतकांना ३००० ची वाढ झाली होती सदरील वाढ एप्रील २०२२ पासून देण्यात यावी., केंद्र सरकारचा कोवीड भत्ता ऑक्टोंबर २०२१ ते मार्च २०२२ पर्यंतचा ६ महिण्याचा १००० प्रमाणे देण्यात यावा तसेच गटप्रर्वतकाचे सन २०२१ २०२२ २०२२ - २०२३ चे साड्याचा मोबदला द

MB NEWS-इच्छा माझी पुरी करा म्हणणारा पोलीस कर्मचारी निलंबित

इमेज
  इच्छा माझी पुरी करा म्हणणारा पोलीस कर्मचारी निलंबित   बीड : माझी इच्छा पूर्ण कर, अन्यथा मी फाशी घेईन, अशी धमकी देत महिला अंमलदारास अश्लील मेसेज पाठवून ब्लॅकमेल करणाऱ्या अंमलदारास पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी १३ सप्टेंबरला निलंबनाचा दणका दिला. माजलगाव येथे १० सप्टेंबरला ही घटना घडली होती. हरिश्चंद्र खताळ, असे निलंबित अंमलदाराचे नाव आहे.         हरिश्चंद्र खताळ व पीडित महिला अंमलदार ग्रामीण ठाण्यात कार्यरत आहेत. २०२१ पासून ते २७ ऑगस्ट २०२२ पर्यंत हरिश्चंद्र खताळ याने व्हॉटसअॅप मेसेज करून या महिलेस त्रास दिला. ८ सप्टेंबरला रात्री घरी येऊन माझी इच्छा पूर्ण कर, अन्यथा मी फाशी घेईन, असे म्हणत धमकावून विनयभंग केला होता. त्यानंतर त्याची पोलीस पत्नी शिवकन्या निंगुळे हिने पैसे घेऊन मिटवून टाक नाही तर तुझ्यावर ३०६ नुसार गुन्हा दाखल करून तुझी बदनामी करुन तुला कुठे तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही, अशी धमकी दिली होती.पीडित महिला अंमलदाराच्या फिर्यादीवरून पो.कॉ. पो.कॉ. हरिश्चंद्र खताळ व पो.ना. शिवकन्या निंगुळे या दाम्पत्यावर शहर ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली होत

MB NEWS-भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट; विविध विषयावर झाली चर्चा

इमेज
  भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट; विविध विषयावर झाली चर्चा  मुंबई.... भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आज सह्याद्री अतिथी ग्रहावर जाऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी विविध विषयावर सकारात्मक चर्चा झाल्याचे पंकजा मुंडे यांनी ट्विट करून म्हटले आहे .           राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी भेट घेऊन विविध विकासात्मक कामाबाबत चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या व्यस्त दिनक्रमातही पुरेसा वेळ देत पंकजा मुंडे यांचे मुद्दे व विषयांवर सकारात्मक चर्चा केली. त्याचप्रमाणे काही प्रश्न तात्काळ मार्गी लावले. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या भेटीत अनेक सकारात्मक विषयावर चर्चा झाल्याचे ट्विट या भेटीनंतर पंकजा मुंडे यांनी केले आहे.      • पंकजा मुंडे यांचे असे आहे ट्विट:- "अत्यंत व्यस्त routine मध्ये असताना देखील मुख्यमंत्री  @mieknathshinde यांची @CMOMaharashtra  निवांत भेट झाली...राजकीय,सामाजिक आणि विकासाच्या मुद्यावर त्यांनी सकारात्मकता दाखवली ..लागलीच कार्

MB NEWS-जि.प.शाळेतील ७० मुलींची हिमोग्लोबीन तपासणी पोषण आहार माह अंतर्गत स्तुत्य उपक्रम!

इमेज
  जि.प.शाळेतील ७० मुलींची हिमोग्लोबीन तपासणी पोषण आहार माह अंतर्गत स्तुत्य उपक्रम! सिरसाळा (प्रतिनिधी)  पोषण आहार माह अंतर्गत पं.गुरु पार्डीकर महाविद्यालय, गृह विज्ञान विभाग व जि प कें. प्रा शाळा सिरसाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आज जि प के प्रा शाळेतील इ. सहावी ते आठवीच्या  मुलींची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.     शालेय पोषण आहार माह अंतर्गत पं.गुरु पार्डीकर महाविद्यालय गृह विज्ञान विभागाच्या वतीने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे, याचाच एक भाग म्हणून जि.प.के.प्रा शाळेतील विद्यार्थ्यांना संतुलित व सकास आहारा संदर्भात प्रा .डॉ. उषा माने प्रा.डॉ. अरुणा वाळके व जि प. शाळेतील सांस्कृतिक विभाग प्रमुख लक्ष्मण वैराळ यांनी मार्गदर्शन केले .व त्यानंतर दुपारच्या सत्रात प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ.राधाकिशन राऊत, संदिप लांडगे, गौतम पोटभरे, नंदकुमार सोळंके यांच्या टीमने इ. सहावी ते आठवीच्या वर्गातील 70 विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन चाचणी करण्यात आली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एम एम घोडके, शा.व्य.स.अध्यक्ष नासर दादा शेख केंद्रप्रमुख गंगाधर कांबळे आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यश

MB NEWS-पोहनेर जिल्हा परिषद शाळेला केंद्र शासनाचा जिल्हास्तरीय 'स्वच्छ विद्यालय' पुरस्कार*

इमेज
  पोहनेर जिल्हा परिषद शाळेला केंद्र शासनाचा जिल्हास्तरीय 'स्वच्छ विद्यालय' पुरस्कार* *पंकजाताई मुंडेंच्या प्रयत्नाने शाळेला मिळाली होती नवी इमारत ; ग्रामस्थांनी मानले आभार* *जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले पुरस्काराचे वितरण* परळी ।दिनांक १५। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे ग्रामविकास मंत्री असतांना तालुक्यातील पोहनेर येथील जिल्हा परिषद शाळेला नवीन सुसज्ज व भव्य इमारत मिळाली होती, आता याच शाळेचा गौरव केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने    'स्वच्छ विद्यालय' पुरस्कार देऊन केला आहे. या पुरस्काराने पोहनेरची मान जिल्हयात उंचावली असून ग्रामस्थांनी याचे सर्व श्रेय पंकजाताईंना देत त्यांचे आभार मानले आहेत.    पंकजाताई मुंडे यांनी मागील सत्तेच्या काळात ग्रामविकास मंत्री असतांना पोहनेर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला मोठ्या प्रमाणात निधी दिल्याने शाळेला भव्य आणि सुसज्ज इमारत मिळाली होती, परिसरातील विद्यार्थ्यांची त्यामुळे चांगली सोय होऊ शकली, परिणामी विद्यार्थ्यांची पटसंख्या देखील वाढली. पंकजाताईंच्या सूचनेनुसार खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी हे गाव सांसद आदर्श ग्र

MB NEWS- *कै. ल .दे .महिला महाविद्यालयात झाला श्री.अमित जोशी यांचा 'अ-अभिनयाचा' हा भन्नाट कार्यक्रम

इमेज
 *कै. ल .दे .महिला महाविद्यालयात झाला श्री.अमित जोशी यांचा 'अ-अभिनयाचा' हा भन्नाट कार्यक्रम  परळी , दि. 15/9/20022 (प्रतिनिधी)   येथील कै. ल .दे . महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी  व त्यांच्या अभिनय कौशल्य विकासासाठी श्री अमित प्रतिमा नागराज जोशी यांच्या ' अ - अभिनयाचा ' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत त्यांनी विद्यार्थिनींना अभिनयाचे तंत्र व सादरीकरण व प्रभावी अभिनय याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष अभिनयाच्या माध्यमातून सलग दीड तास हसवत हसवत केलेले मार्गदर्शन अतिशय उच्च पातळीवरचे होते. अभिनयाच्या माध्यमातून प्रभावी रसाविष्कार कसा करता येतो. हे त्यांनी प्रत्यक्ष सादरीकरणातून दाखविले. यावेळी कार्यक्रमाविषयी प्रतिक्रिया देताना प्रा.प्रसाद देशमुख यांनी 'अ - अभिनया ' सारखे कार्यक्रम विद्यार्थिनीमध्ये अभिनय कौशल्य रुजविण्यासाठी आवश्यक आहेत. असे मत मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष संजय देशमुख हे होते . तर प्रमुख अतिथी म्हणून कोषाध्यक्ष प्रा.प्रसाद देशमुख , संचालिका डॉ. विद्याता

MB NEWS-_दहा मिनिटाचाच हाती वेळ पण पोलिसांच्या सतर्कतेेने एक बळी वाचला_

इमेज
 आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ शेअर करून "तो" झोपला रेल्वे पटरीवर!  _दहा मिनिटाचाच हाती वेळ पण पोलिसांच्या सतर्कतेेने एक बळी वाचला_  परळी वैजनाथ, .....         घरगुती कारणावरून तणावग्रस्त बनलेल्या एका इसमाने आपण रेल्वेखाली आत्महत्या करणार आहोत असा रेल्वे पटरीवरचा एक व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना व जवळच्या ग्रुपवर शेअर केला आणि तो पटरीवर आडवा झाला. दहा मिनिटातच या मार्गावरून रेल्वे जाणार होती. काळ आला होता परंतु वेळ बलवत्तर होती संभाजीनगर पोलिसांना याबाबत एक फोन आला आणि ड्युटीवर असलेल्या दुर्गे नावाच्या पोलिस कर्मचाऱ्याने अतिशय सतर्कता दाखवत त्याला शोधून काढले.पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक बळी वाचला आहे.काल दि.14 रोजी दुपारी 3.50 वा. च्या सुमारास ही घटना घडली आहे.           जोडहिंगणी तालुका धारूर जिल्हा बीड येथील कैलास विष्णुदास सोळंके नावाचा इसम काल दि.14 रोजी दुपारी 3.50 वा. च्या सुमारास परळीमध्ये आला व परळी रेल्वे स्टेशन पासून काही अंतरावर रेल्वे पटरीवर जाऊन त्याने स्वतःचा व्हिडिओ काढला. आपल्या नातेवाईकांना व जवळच्या व्हाट्सअप ग्रुप वर व्हिडिओ शेअर केला. आपण आपले जीवन संपवत अ

MB NEWS-बीड जिल्ह्यात या 47 महसूल मंडळातील शेतकर्‍यांना मिळणार अग्रीम

इमेज
  बीड जिल्ह्यात या 47 महसूल मंडळातील शेतकर्‍यांना मिळणार अग्रीम  बीड, दि. 14, (जि. मा. का.) : जिल्ह्यात पूर्वी जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार 16 जुने महसूल मंडळ व त्यासहित अंतर्भूत 10 नवीन महसूल मंडळ असे एकत्रित 26 महसूल मंडळ अंतर्भूत करण्यात आली होती. नव्याने देण्यात आलेले अधिसूचनेनुसार 15 जुने महसूल मंडळ व त्या अंतर्गत 6 नवीन महसूल मंडळ अंतर्भूत असलेल्या एकूण 21 महसूल मंडळाचा समावेश करण्यात आलेला असून  अशा पद्धतीने जिल्ह्यातील एकूण 47 महसूल मंडळातील शेतकर्‍यांना नुकसानीच्या 25 टक्के अग्रीम मिळणार आहे. पीकविमा कंपनीने अग्रीम देण्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय संयुक्त समिती, प्रधानमंत्री पीक विमा योजनाचे अध्यक्ष राधाबिनोद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पीकविमा कंपनीसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासंबंधी आज वाढीव 21 महसूल मंडळात 25 टक्के अग्रीम मदत देण्यासंबंधी अधिसूचना जाहीर झाली आहे. या अधिसूचनेनुसार बजाज अलाएंज जनरल इन्शुरन्स कंपनी लि. पुणे यांनी अधिसूचना जाहीर झाल्यापासून एक महिन्याच्या आत तरतूदनुसार पात्र ठरलेल्या सोयाबीन या अधिसूचित पिकाकरि

MB NEWS-परळीतून वैष्णोदेवीची दिव्य ज्योत आणण्यासाठी भाविकांचे प्रस्थान

इमेज
परळीतून वैष्णोदेवीची दिव्य ज्योत आणण्यासाठी भाविकांचे प्रस्थान नाथ प्रतिष्ठान, राधा-मोहन साथी प्रतिष्ठानचा नवरात्र उपक्रम परळी/ प्रतिनिधी- नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने नाथ प्रतिष्ठान व राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने माजी मंत्री आ. धनंजय मंुडे, न.प. गटनेते वाल्मीकअण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली  राधा-मोहन साथी प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्या विशेष प्रयत्नातून  माँ वैष्णो देवी दर्शन देखावा सादर करण्यात येत असून या पार्श्वभूमीवर जम्मू-कश्मिर मधील माँ वैष्णोदेवी मंदीरात प्रज्वलीत झालेली दिव्य ज्योत परळी येथे आणली जाणार असून संपुर्ण उत्सवाच्या कालावधीत ही ज्योत अखंडपणे तेवत राहणार आहे. विशेष वाहनाद्वारे संयोजन समितीचे चार सदस्य आज सायंकाळी जम्मू-कश्मिरसाठी रवाना झाले असून परळी येथील श्री वैद्यनाथ मंदीराची शाल देवीजींच्या चरणी अर्पण केली जाणार असून तेथून वैष्णोदेवीची चुनरी आणली जाणार आहे.  नाथ प्रतिष्ठान, राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आ. धनंजय मुंडे, ज्येष्ठ नेते वाल्मिकअण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली राधा-मोहन साथी प्रतिष्ठानचे अध्यक्

MB NEWS-परळी तालुक्यातील पाच शाळांना स्वच्छ शाळा पुरस्कार

इमेज
  परळी तालुक्यातील पाच शाळांना स्वच्छ शाळा पुरस्कार परळी( प्रतिनिधी.)  स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय या केंद्र पुरस्कृत राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये परळी तालुक्याचा डंका वाजला असून तालुक्यातील पाच शाळांनी स्वच्छ विद्यालय स्पर्धेत क्रमांक पटकाविला आहे.     राज्य भरातील  खाजगी तसेच इंग्रजी माध्यमाच्या आणि जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचे तपासणी करण्यात आली. स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय या स्पर्धे अंतर्गत बीड जिल्ह्यातील एकूण 38 शाळांना विशेष पुरस्कार देऊन जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यामध्ये विशेष भाग म्हणजे एकूण जिल्ह्यातील 38 शाळा पैकी परळी तालुक्यातील पाच शाळांनी आपला ठसा उमटवला आहे.    या पुरस्कार प्राप्त शाळांमध्ये परळी शहरातील ऐतिहासिक अशी  वैद्यनाथ विद्यालय, तसेच पोहनेर येथील जिल्हा परिषद मा ध्यमिक शाळा, रमाई इंग्लिश स्कूल परळी, संत भगवान बाबा विद्यालय वाघाळा, आणि अपेक्षा इंग्लिश स्कूल शिरसाळा या शाळा पुरस्कार प्राप्त ठरलेल्या आहेत.  या शाळांनी पटकावलेल्या विशेष पुरस्कारामुळे बीड जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रामध्ये परळीचे नाव अग्रेसर ठरले आहे.       परळी पंचायत

MB NEWS-पाच लाख रुपयांसाठी सख्ख्या भावाला विषारी औषध पाजले

इमेज
  पाच लाख रुपयांसाठी सख्ख्या भावाला विषारी औषध पाजले अंबाजोगाई - घराचे पाच लाख रुपये दे म्हणत भावाने पत्नी आणि मुलाच्या मदतीने त्याच्या सख्ख्या भावाला विषारी औषध पाजल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील दस्तगीरवाडी येथे मंगळवारी (दि.१३) दुपारी घडली. भरत मधुकर घाडगे (वय ४०, रा. दस्तगीरवाडी) असे त्या विषबाधा झालेल्या भावाचे नाव आहे. भरत यांच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी दुपारी ते शेतातील गोठयासमोर झोपले होते. दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास त्यांचा भाऊ रामचंद्र मधुकर घाडगे, भावजई सावित्रीबाई रामचंद्र घाडगे व शिवशंकर रामचंद्र घाडगे हे तिघे त्यांच्याजवळ आले. तू घराचे पाच लाख रुपये दे, तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणत त्या तिघांनी संगनमताने भरत यांना बळजबरीने कुठलेतरी विषारी औषध पाजले. भरत यांच्यावर सध्या अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सदर फिर्यादीवरून तिन्ही आरोपींवर कलम ३०७ अन्वये अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.  पुढील तपास एपीआय सावंत करत आहेत.

MB NEWS-देवाच्या दारी चोरी: मंदिराची दानपेटी फोडली

इमेज
  देवाच्या दारी चोरी: मंदिराची दानपेटी फोडली घाटनांदूर, प्रतिनिधी...   घाटनांदूर येथील श्री लक्ष्मीश्वर महादेव मंदिरात बसवलेली नवी दानपेटी फोडून चोरट्यांनी अंदाजे चार हजार रुपये लंपास केल्याची घटना ७ सप्टेंबर रोजी उघडकीस आली.  या प्रकरणी मंगळवारी (दि.१३) अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.  श्री लक्ष्मीश्वर महादेव मंदीर (महादेव पट्टी) देवस्थानचे अध्यक्ष सुरेश आप्पा चनबस आप्पा शेटे यांनी  चोरीची फिर्याद पोलिसात दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, ६ ते ७ सप्टेंबर दरम्यानच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या उत्तर बाजूच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर मंदिरात नवीन बसवलेली दानपेटी उचकटून त्यांनी पेटी मधील अंदाजे चार हजार रुपये लंपास केले. दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिराचे पुजारी बाळासाहेब गणपत पुजारी यांना चोरी झाल्याची लक्षात आले. फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पो.ह.  मुंडे पुढील तपास करत आहेत.

MB NEWS-जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते शाळेचा गौरव

इमेज
  इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून तालुक्यातून रमाई प्रायमरी स्कूलला जिल्हास्तरीय स्वच्छ शाळा पुरस्कार जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते शाळेचा गौरव     परळी वैजनाथ दि.१४ (प्रतिनिधी)            शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाची शाळेस जिल्हा स्तरावरील तालुक्यातील स्वच्छ शाळा पुरस्कार रमाई प्रायमरी शाळेस नुकताच घोषित करण्यात आला होता. या पुरस्काराचे बुधवारी (दि.१४) बीड येथे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.     जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित जिल्ह्यातील ३८ शाळांना स्वच्छ विद्यालय पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन बीड येथे नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, उपशिक्षणाधिकारी अजय बहिर, विस्तार अधिकारी तुकाराम पवार, विस्तार अधिकारी ऋषिकेश शेळके, रंगनाथ राऊत आदि उपस्थित होते.  यावेळी रमाई प्रायमरी शाळेचे संचालक मंगेश देशमुख यांच्या सह मुख्याध्यापक, शिक्षक यांना पुरस

MB NEWS-शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्यसरकार कर्णबधिर झाले आहे - अजय मुंडे

इमेज
  शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्यसरकार कर्णबधिर झाले आहे - अजय मुंडे _आ. धनंजय मुंडे पालकमंत्री असताना बीड जिल्ह्यात प्रथमच सोयाबीन या पिकास 25% अग्रीम विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली होती - अजय मुंडेंनी करून दिली आठवण !_ बीड...प्रतिनिधी ता.14) बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अग्रीम पीकविमा, अनुदान, जनावरांच्या लम्पी आजारावर मुबलक लशींची उपलब्धी आदी विषयांवर आज बीड येथील शासकीय विश्राम गृहात आयोजित सर्वपक्षीय बैठकीत युवक नेते श्री. अजय मुंडे यांनी सहभाग घेत मांडले. या बैठकीस भारतीय जनता पक्ष सोडून अन्य जवळपास सर्वच पक्षांचे व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.  बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री आ. धनंजयजी मुंडे साहेब असताना, बीड जिल्ह्यात प्रथमच सोयाबीन या पिकास 25% अग्रीम विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली होती, अशी आठवणही या सर्वपक्षीय बैठकीत श्री. मुंडेंनी करून दिली. आज त्याच धर्तीवर जिल्ह्यातील सर्व महसुली मंडळांमध्ये सोयाबीनसह विमा संरक्षित असलेल्या सर्वच पिकांना अग्रीम विमा मिळावा, ही प्रमुख मागणी आहे, असेही श्री. मुंडे म्हणाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कर्णबधिर झालेल

MB NEWS-अन्यायकारक निर्णयाविरोधात उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा एल्गार

इमेज
 *शेतकऱ्यांच्या प्रश्नी आक्रोश आंदोलन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - कॉ.मुरलीधर नागरगोजे , कॉ.पांडुरंग राठोड* ●अन्यायकारक निर्णयाविरोधात उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा एल्गार परळी / प्रतिनिधी जून ,जुलै महिन्यात झालेली अतिवृष्टी व ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या खंडामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना शासनाने जिल्ह्यातील 63 मंडळापैकी पाहिले 16 मंडळात नंतर 31 मंडळात नुकसान भरपाई व पीक विमा कंपनीकडून 25 टक्के अग्रीम देण्यात येत असल्याने उर्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये शासनाच्या निर्णयाविरोधात प्रचंड संताप निर्माण झाला असून या व इतर प्रश्नी बीड जिल्हा किसान सभेच्यावतीने उद्या शुक्रवार दि 16 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश आंदोलन करण्यात येणार असून या मोर्चात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन किसान सभेचे जिल्हा सचिव कॉ.मुरलीधर नागरगोजे, कॉ. कासीराम सिरसाट, कॉ.पांडुरंग राठोड,कॉ.दत्ता डाके,कॉ.जगदीश फरताडे यांनी केले आहे. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरील अन्याय सत्र या ही वर्षी थांबण्याचे चिन्ह दिसून येत नसून कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी नापि

MB NEWS-शंखी गोगलगायीमुळे झालेले शेतपिकांचे नुकसान: लातूर उस्मानाबाद बीड जिल्ह्यांना सुमारे ९८ कोटी

इमेज
शंखी गोगलगायीमुळे झालेले शेतपिकांचे नुकसान: लातूर उस्मानाबाद बीड जिल्ह्यांना सुमारे ९८ कोटी लातूर उस्मानाबाद बीड या तीन जिल्ह्यांमध्ये शंखी गोगलगायीमुळे शेत पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भामध्ये मदतीचे निर्देश दिले होते. यानुसार या तीन जिल्ह्यांना ९८ कोटी ५८ लाख रुपये निधी देण्यात आला आहे.  याबाबतचा शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला आहे

MB NEWS-मांडवा येथील संजय चाटे भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त संजय चाटे यांनी केलेल्या देशसेवेचा अभिमान- डॉ.संतोष मुंडे

इमेज
  मांडवा येथील संजय चाटे भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त संजय चाटे यांनी केलेल्या देशसेवेचा अभिमान-  डॉ.संतोष मुंडे परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  :-   तालुक्यातील मांडवा गावचे भूमिपुत्र संजय विक्रम चाटे हे नुकतेच भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्तीनंतर त्यांचा सत्कार करताना डॉ.संतोष मुंडे म्हणाले की संजय चाटे यांनी जी देश सेवा केली. त्या सेवेचा आम्हा परळीकरांना अभिमान आहे. त्यांच्या कार्याचा तरुणांनी आदर्श घ्यावा असेही आवाहन केले.          मांडवा येथील रहिवासी असलेले संजय विक्रम चाटे हे मे 2001 मध्ये केंद्रीय रिझर्व पोलीस बलामध्ये दाखल झाले होते. भारतीय सैन्यात दाखल होताच सुरुवातीच्या काळामध्ये पुणे सेंटर मध्ये त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर अकरा वर्ष जम्मू आणि काश्मीर, तसेच तीन वर्ष बिहार, चार वर्षे छत्तीसगड आणि साडेतीन वर्ष दिल्ली असे ठिकाणी त्यांनी काम केले. संजय चाटे यांचे प्राथमिक शिक्षण मांडवा या गावी झाले. त्यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण शहरातील मिलिंद महाविद्यालयात तर इयत्ता अकरावी वैजनाथ महाविद्यालयात केल्यानंतर पुढील बीएपर्यंत शिक्षण नवगण महाविद्यालया

MB NEWS- प्रतिकूल परिस्थितीत विद्यार्थी घडवून कांदे सरांनी तालुक्याचे नाव यशोशिखरावर नेले - डॉ.भालचंद्र चेवले

इमेज
  आदर्श शिक्षक सौदागर कांदे यांचा विद्यावर्धिनी विद्यालयात गौरव प्रतिकूल परिस्थितीत विद्यार्थी घडवून कांदे सरांनी तालुक्याचे नाव यशोशिखरावर नेले - डॉ.भालचंद्र चेवले परळी (प्रतिनिधी) परळी शहराला, तालुक्याला आणि येथील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा काय असते हे आदर्श शिक्षक सौदागर कांदे यांच्यामुळे कळले. ज्या वेळेस तांत्रिक साधने कमी होती, मोबाईल फोन नसायचे अशा काळात विद्यार्थ्यांमध्ये आहे त्या साधनाचा वापर करून स्पर्धा परीक्षेचे बीज कांदे सरांनी हजारो विद्यार्थ्यांत रुजवले. शिष्यवृत्तीच्या अनेक परीक्षामधून शहरातील विद्यार्थी राज्यात प्रथम आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. माझ्या डॉक्टरी भाषेत सांगायचे झाले तर कांदे सर या समाजाचे डॉक्टर आहेत. जे की विद्यार्थी घडवतात. शारीरिक, बौद्धीक आणि मानसिक तयारी कशी करून घ्यायची याची कलाच त्यांच्याकडे आहे असे गौरवोदगार डॉ.भालचंद्र चेवले यांनी काढले. याबरोबरच विद्यावर्धिनी विद्यालयातील उत्कृष्ठ कार्याबद्दल अनेक मान्यवरांनी गौरवोदगार काढले. कांदे सरांनी शाळेच्या जडण घडणीत मोलाचा वाटा उचलला असल्याचेही अधोरेखित करण्यात आले. विद्यावर्धिनी विद्यालयात आदर्श

MB NEWS-_कुलथे यांनी बीड जिल्ह्याचे नाव दिल्लीत झळकावले - संदीप टाक_

इमेज
  आदर्श शिक्षक शशिकांत कुलथे यांचा  हृद्य सत्कार कुलथे यांनी बीड जिल्ह्याचे नाव दिल्लीत झळकावले - संदीप टाक राष्ट्रपतींच्या हस्ते झालेल्या सन्मानाचे संग्रहित छायाचित्र  परळी वैजनाथ(प्रतिनिधी)दि.12 - बीड जिल्ह्यातील जि.प. प्राथमिक शिक्षक शशिकांत कुलथे यांचा नुकताच देशाच्या राष्ट्रपती महामयीन द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते दिल्ली येथे राष्ट्रीय पुरस्कार देऊन आदर्श शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला.बीड जिल्ह्यातील जि.प.शाळेच्या शिक्षकाचा हा झालेला गौरव जिल्ह्याची राष्ट्रीय पातळीवर प्रतिमा उंचावनारी बाब आहे. या गौरवाबद्दल परळी येथील पंडित आत्माराम टाक सराफ या पेढीतर्फे कुलथे सरांचा त्यांच्या बीड येथील निवासस्थानी हृद्य सत्कार करण्यात आला.यावेळी पेढीचे संदीप टाक यांसह परळीतील सोनार बांधव रामाकांतराव डहाळे(रि.मेजर),सुरेश टेहरे,संतोष मैड,अशोक डहाळे यांची उपस्थिती होती.शाल,श्रीफळ,फेटा बांधून कुलथे सरांचा छोटेखानी गौरव करण्यात आला. राष्ट्रपती यांच्या हस्ते झालेला गौरव म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षकांचा गौरव आहे. राष्ट्रपती भवनात श्री कुलथे यांनी बीड चे नाव झळकावले.ही बाब केवळ आपल्या सर्वांसाठीच

MB NEWS-ग्रामसेवकाचे हात बरबटले; लाच घेताना रंगेहाथ पकडले

इमेज
  ग्रामसेवकाचे हात बरबटले; लाच घेताना रंगेहाथ पकडले अंबाजोगाई - सार्वजनिक शौचालयाच्या कामाचे बिल काढून दिल्याचा मोबदला म्हणून ८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना धावडी (ता. अंबाजोगाई) येथील ग्रामसेवक अशोक विठ्ठलराव पुजारी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले. अंबाजोगाई पंचायत समिती कार्यालयात मंगळवारी (दि.१३) दुपारी ही कारवाई करण्यात आली.  स्वच्छ भारत मिशन अंतर्गत धावडी येथील सार्वजनिक शौचालयाचे काम करण्यात आले होते. या कामाचे बिल काढून दिल्याचा मोबदला म्हणून ग्रामसेवक अशोक पुजारी (रा. ह.मु. हनुमान मळा, अंबाजोगाई, मूळ रा. तेर जि. उस्मानाबाद) याने कंत्राटदाराकडे १० हजार दुपायांची मागणी केली होती. याबाबत कंत्राटदाराने बीड एसीबीकडे तक्रार केली होती. पडताळणी दरम्यान तडजोडीअंती पुजारी याने ८ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले होते. त्यानंतर बीड एसीबीच्या पथकाने मंगळवारी दुपारी अंबाजोगाई पंचायत समिती कार्यालयात सापळा लावला होता. पुजारी याने कंत्राटदाराकडून लाचेपोटी ८ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने झडप मारून त्यास रंगेहाथ पकडले. याप्रकरणी ग्रामस

MB NEWS-●अन्यायकारक निर्णयाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

इमेज
  शेतकऱ्यांच्या प्रश्नी जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी आक्रोश आंदोलन ●अन्यायकारक निर्णयाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार परळी / प्रतिनिधी जून ,जुलै महिन्यात झालेली अतिवृष्टी व ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या खंडामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना शासनाने जिल्ह्यातील 63 मंडळापैकी 16 मंडळात नुकसान भरपाई व पीक विमा कंपनीकडून 25 टक्के अग्रीम देण्यात येत असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये शासनाच्या निर्णयाविरोधात प्रचंड संताप निर्माण झाला असून या प्रश्नी बीड जिल्हा किसान सभेच्यावतीने शुक्रवार दि 16 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश आंदोलन करण्यात येणार असून या मोर्चात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन किसान सभेचे जिल्हाध्यक्ष एड.अजय बुरांडे यांनी केले आहे. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरील अन्याय सत्र या ही वर्षी थांबण्याचे चिन्ह दिसून येत नसून कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी नापिकी ही जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या पाचीला पुजली आहे.या परिस्थितीत देखील जून,जुलै महिन्यात जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व लगेच ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड यामुळे शासनाकडून अंतरिम नुकस