पोस्ट्स

मे ७, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
हलगीच्या तालातून थेट देशसेवेपर्यंत! हलाखीच्या परिस्थितीत वाढलेल्या तरुणाची अग्निवीर जवानपदी निवड; परळीच्या साठेनगरमध्ये जल्लोष परळी वैजनाथ ,प्रतिनिधी :       परळीच्या साठे नगर मधील ज्या घरात दोन वेळच्या जेवणाची चिंता होती, ज्या वडिलांनी हलगी वाजवून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला, त्या कष्टकरी कुटुंबातील संतोष चौरे या तरुणाने आज भारतीय सैन्यात अग्निवीर जवान म्हणून निवड मिळवत संघर्षावर यशाची मोहोर उमटवली आहे. या अभिमानास्पद यशामुळे परळी शहरातील साठेनगर परिसरात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून प्रथमच साठे नगर परिसरातून देशसेवेत निवड झाली असल्याने नागरिकांनी जल्लोषात त्याचे स्वागत केले. आर्थिक संकट, अभाव आणि प्रतिकूल परिस्थिती यांचा सामना करत वाढलेल्या या तरुणाने लहानपणापासूनच देशसेवेचे स्वप्न पाहिले होते. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे अनेक अडचणी त्याच्या वाट्याला आल्या, मात्र त्याने परिस्थितीसमोर कधीही हार मानली नाही. कठोर परिश्रम, नियमित सराव आणि जिद्दीच्या बळावर त्याने भारतीय सैन्याच्या अग्निवीर भरती प्रक्रियेत यश संपादन केले. मुलाच्या निवडीची बातमी समजताच कष्टाने...

MB NEWS:श्री.शनैश्वर जन्मोत्सव सोहळ्या निमित्त भव्य शोभायात्रा संपन्न

इमेज
  श्री.शनैश्वर जन्मोत्सव सोहळ्या निमित्त भव्य शोभायात्रा संपन्न रविवारी डॉ. फत्तेपुरकर यांचे पक्षघात जनजागृती व मोफत आरोग्य शिबीरासह रक्तदान शिबीर परळी वैजनाथ दि.१३ (प्रतिनिधी)          भजनाच्या तालावर पावली खेळत चालणाऱ्या, एकाच रंगाच्या आकर्षक साड्या घालून सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या तसेच मंगल कलश मस्तकी धारण केलेल्या, हाती भगवा निशाण फडकावत मुखी गुरुराज माऊलीचा गजर करणाऱ्या महिला भगिनी आणि पांढऱ्या शुभ्र पोशाखात दोन-दोनच्या रांगेत शिस्तीने चालणाऱ्या पुरुषांनीही श्री शनैश्वर जन्मोत्सवाच्या आणि अखंड शिवनाम सप्ताह निमित्ताने निघालेल्या शोभायात्रेची शोभा वाढवली.      येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी श्री.शनैश्वर मंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर जन्मोत्सव साजरा केला जातो. यंदा प्रथमच शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. या शोभा यात्रेची सुरुवात मोंढा मैदानातील हनुमान मंदिरापासून झाली.  नियोजनानुसार महिला भगिनींनी भगव्या पताका, मंगल कलश, एकाच रंगाच्या साड्या, परमरहस्य ग्रंथाचे...

MB NEWS:निवडणूक विश्लेषण:कर्नाटकात भाजपचा दारुण पराभव: जाणून घ्या ही आहेत प्रमुख पाच कारणे

इमेज
  कर्नाटकात भाजपचा दारुण पराभव: जाणून घ्या ही आहेत प्रमुख पाच कारणे     हिमाचल प्रदेशपाठोपाठ कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ( Karnataka Election Result 2023) भाजपला मोठा धक्का बसला आहे. मागील वर्षभरात काँग्रेसने भाजपच्या हातून सत्ता काढून घेतलेले कर्नाटक दुसरे राज्य ठरले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांना बळ देणारा हा निकाल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. सर्व ताकद पणाला लावूनही भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या पराभवाची मुख्य पाच कारणे जाणून घेवूया..... भाजप अंतर्गत कलह कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Election Result 2023) आधीपासून भाजपमध्ये अंतर्गत कलहाला सुरूवात झाली होती. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गटबाजी निर्माण झाली. माजी मुख्यमंत्री बी. एस येडियुरप्पा, विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बीएल संतोष आणि भाजप प्रदेश नलिन कुमार कटील या चार गटामध्ये विसंवाद वाढला होता. त्याचबरोबर पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सीरवी यांच्या नेतृत्वाखाली पाचवा गट निर्माण झा...

MB NEWS:सिरसाळा येथे श्री पांडुरंग रुक्मिणी व प.पु.सद्गुरु ब्रह्मिभुत वामनानंद महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा

इमेज
  सिरसाळा येथे श्री पांडुरंग रुक्मिणी व प.पु.सद्गुरु ब्रह्मिभुत वामनानंद महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... .        प. पू. श्री गुरुवर्य माधवानंद महाराज मठाधिपती, चिन्मय मुर्ती संस्थान, उमरखेड यांच्या कृपाआशिर्वादाने प.पू. ब्रह्मिभूत वामनानंद महाराज यांच्या जन्मस्थळी सिरसाळा ता. परळी वै. येथे शनिवार दि. १३/५/२०२३ ते मंगळवार दि. १६/५/२०२३ या कालावधीत श्री पांडुरंग रुक्मिणी व प.पु.सद्गुरु ब्रह्मिभुत वामनानंद महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.         वैशाख कृ. ९ शके १९४५ शनिवार दि. १३/५/२०२३ रोजीसुरुवात पुण्यावाचन नांदीश्राद्धादी कर्म, वैशाख कृ. १० शके १९४५ रविवार दि. १४/५/२०२३देवस्थापणा, अग्नीस्थापना व सर्व देवता उपचार करणे,वैशाख कृ. ११ शके १९४५सोमवार दि. १५/५/२०२३दशविधी स्नान व प्राणप्रतिष्ठा करणे, वैशाख कृ. १२ शके १९४५ मंगळवार दि. १६/५/२०२३ सकाळी ७ ते ९ - अभिषेक, महापुजा, सकाळी ९.३० ते ११.३० वे.शा.सं.ह.भ.प. भागवताचार्य श्री अनिल महाराज जोशी माजलगाव यांचे किर्तन ...

MB NEWS: 'कर्नाटक में नफरत की बाजार बंद हुई है,मोहब्बत की दुकान खुली है', -राहुल गांधी

इमेज
 'कर्नाटक में नफरत की बाजार बंद हुई है, मोहब्बत की दुकान खुली है', - राहुल गांधी निवडणुकीत काँग्रेसने निर्णायक बहुमताकडे वाटचाल सुरु ठेवली आहे. काँग्रेसला १३६ जागा मिळण्याची शक्यता आहे. या दणदणीत विजयावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. 'कर्नाटक में नफरत की बाजार बंद हुई है, मोहब्बत की दुकान खुली है', अशा शब्दांत राहुल गांधी यांनी पक्षाच्या विजयावर आपल्या भावना व्यक्त  केल्या आहेत. दरम्यान, कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांना माध्यमांशी बोलताना अश्रू अनावर झाले. यावेळी ते म्हणाले,”पक्षाने माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवला या विजयाचे सर्व श्रेय मी राज्यातील काँग्रेस कार्यकत्यार्त्यांना देतो. त्यांनी अपार कष्ट केले त्यामुळे राज्यात खोटेपणाचा पर्दाफाश झाला.” Advertise  

MB NEWS:सभापती निवडीनंतर राष्ट्रवादीत खळबळ: दत्ता पाटील यांचा तडकाफडकी राजीनामा

इमेज
  सभापती निवडीनंतर अंबाजोगाई राष्ट्रवादीत खळबळ: दत्ता पाटील  यांचा तडकाफडकी राजीनामा अंबाजोगाई - अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडीनंतर लागलीच दत्ता पाटील यांच्याकडून संचालक पदाचा राजीनामा दिल्याची खळबळ जनक घटना समोर आली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अंबाजोगाई बाजार समिती निवडणूक माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लढवण्यात आली होती. यात महाविकास आघाडीचे १५ उमेदवार निवडून आलेले आहेत तर भाजपचे फक्त ०३ उमेदवार निवडून आले. Click:  ■ अंबाजोगाई बाजार समितीच्या सभापती पदी ऍड राजेश्वर चव्हाण तर उपसभापती लक्ष्मण करनर यांची निवड आज शनिवार (दि.१३) रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उप सभापतीची निवड जाहीर करण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची सभापती पदी निवड होताच, सभापती पदाचे दावेदार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते दत्ता पाटील यांनी नाराज होत संचालक पदाचा राजीनामा सचिवाकडे दिला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  दत्...

MB NEWS:भाजपची मुस्कटदाबी आता देश सहन करणार नाही

इमेज
  राहुल गांधींच्या नेतृत्वापुढे कर्नाटकात मोदी-शहांचा करिष्मा पडला फिका - ॲड.माधव जाधव भाजपची मुस्कटदाबी आता देश सहन करणार नाही         परळी/प्रतिनिधी दि.१३- भाजप कडून होत असलेली सर्वसामान्य जनतेची मुस्कटदाबी आता देशात सहन केली जाणार नाही.राहुल गांधींच्या नेतृत्वापुढे मोदी-शहांचा करिश्माही फिका पडला असून भारत जोडो यात्रेमुळे कर्नाटकात काँग्रेसचा मोठा विजय झाला आहे असे प्रतिपादन किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड.माधव जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकातून केले आहे.२०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणूकितही देशात काँग्रेसची सत्ता येईल असेही ते म्हणाले आहेत.          दिवसेंदिवस वाढत जात असलेली महागाई आता सर्वसामान्य नागरिकाला आता नको आहे. देशात लोकशाही असलेलेली अवस्था पाहुन आता मतदारच उत्तर देत आहेत.कर्नाटकापासून बदलाला सुरुवात झाली आहे.जाती - धर्मामध्ये तेढ निर्माण करून भाजपाने अनेक ठिकाणी सत्ता मिळवली. काही ठिकाणी सरकारी यंत्रणांचा वापर सत्तेसाठी करण्यात आला.मात्र आता मतदारांनीच भाजपला नाकारले असून राहुल गांधींचे नेतृत्वच देशाला पुढे घेऊन जाईल.कर्ना...

MB NEWS:ऑपरेशन लोटस् ची भिती : काँग्रेस सतर्क : कोणतीही रिस्क नको

इमेज
  ऑपरेशन लोटस्  ची भिती : काँग्रेस सतर्क : कोणतीही रिस्क नको  बंगळूर, : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसने बहुमताची आघाडी आहे. सुरुवातीच्या कलानुसार काँग्रेसने ११3 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपने ७६ जागांवर आणि जेडीएसने ३० जागांवर आघाडी घेतली आहे. दरम्यान, काँग्रेसने सरकार स्थापनेच्या दिशेने हालचाली सुरु केल्या आहेत. काँग्रेसने त्यांच्या आमदारांना बंगळूरमध्ये आज येण्यास सांगितले आहे. आमदारांना बंगळूरला नेण्यासाठी राज्यातील दुर्गम भागातही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी निरीक्षकांचीही नियुक्ती करण्यात आल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. (Karnataka Election Results 2023) कर्नाटकात काँग्रेसला 'ऑपरेशन कमळ'ची धास्ती असून त्यांनी त्यांचा आमदारांना बंगळूरला आणण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था केली असल्याचे समजते. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतिंद्र सिद्धरामय्या यांनी काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळवून स्वबळावर पक्ष सत्तेवर येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. कर्नाटकच्या हितासाठी आपले वडील मुख्यमंत्री व्हायला हवेत, अशी इच्छा त्य...

MB NEWS:एकही दिवस मतदार संघात प्रचार नाही केला:विनय कुलकर्णींनी मारली बाजी

इमेज
  एकही दिवस मतदार संघात प्रचार नाही केला: विनय कुलकर्णींनी मारली बाजी धारवाड  : धारवाड मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विनय कुलकर्णी विजयी झाले आहेत. भाजपचे विद्यमान आमदार अमृत देसाई यांचा त्यांनी पराभव केला. विशेष म्हणजे कुलकर्णी यांना धारवाड जिल्हा बंदी करण्यात आल्याने त्यांनी या मतदारसंघात एकही दिवस प्रचार केला नव्हता.            विनय कुलकर्णी यांच्याविरुद्ध खुनासह अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. खून प्रकरणी काही महिने ते हिंडलगा कारागृहात होते. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांना धारवाड जिल्हा बंदी करण्यात आली होती. त्यामुळे निवडणूक उमेदवारी अर्ज भरून देखील जिल्हा बंदीमुळे विनय कुलकर्णी यांना एक दिवसही प्रचार केला नाही. त्यांची पत्नी, परिवाराने व कार्यकर्त्यांनी प्रचार कार्य राबविले. त्यामुळे विनय कुलकर्णी हे निवडून येणार याकडे राज्याचे लक्ष होते. पण एक दिवसही प्रचार न करता विनय कुलकर्णी हे विजयी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कर्नाटकात काँग्रेसने निर्णायक आघाडी घेतली आहे. यामुळे भाजपला धक्का देत काँग्रेसने स्वबळावर सरकार...

MB NEWS:अंबाजोगाई बाजार समितीच्या सभापती पदी ऍड राजेश्वर चव्हाण तर उपसभापती लक्ष्मण करनर यांची निवड

इमेज
  अंबाजोगाई बाजार समितीच्या सभापती पदी ऍड राजेश्वर चव्हाण तर उपसभापती लक्ष्मण करनर यांची निवड अंबाजोगाई -: अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष ऍड.राजेश्वर चव्हाण यांची तर उपसभापतीपदी लक्ष्मण करनर यांची बिनविरोध निवड  करण्यात आली. बीड जिल्ह्यातील सगळ्यांचे लक्ष लागलेल्या अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनल ने घवघवीत यश संपादन करत 18 पैकी 15 जागेवर विजय मिळवला. त्यानंतर उत्पन्न बाजार समिती सभापती कोण विराजमान होणार तसेच आ. धनंजय मुंडे कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.        दरम्यान ऍड. राजेश्वर चव्हाण यांची सभापती पदी व लक्ष्मण करनर यांची उपसभापती निवड जाहीर होताच सर्वस्तरातून निवडीचे स्वागत होत आहे. Advertise  

MB NEWS:उज्ज्वल यशाची परंपरा :भेल सेकंडरी स्कूल मध्ये सातव्या वर्षी ही CBSE चा १००% निकाल

इमेज
  उज्ज्वल यशाची परंपरा :भेल सेकंडरी स्कूल मध्ये सातव्या वर्षी ही CBSE चा १००% निकाल परळी वै ( प्रतिनिधी):  भेल सेकंडरी स्कूल ही परळी वै.  तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील नावाजलेली पहिली CBSE शाळा आहे. विध्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शाळा सतत कार्यशील असते. विध्यार्थ्यांची प्रगती हीच देशाची प्रगती असते. विध्यार्थी हा देशाचा कणा असतो. तो कणा बळकट करण्यासाठी विद्यार्थ्यांचा बैधिक विकास महत्वाचा असतो. हा विकास अधिक प्रभावी व व्यापक स्वरूपात करण्याचे कार्य CBSE करत असते.          भेल स्कूलने मागील सहा वर्षाप्रमाणे या ही वर्षी 100% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.CBSE च्या परीक्षेत एकूण 83 विध्यार्थी प्रविष्ट झाले होते. ते सर्व विद्यार्थी घवघवीत यश मिळवून पास झाले. या वर्षी चि. क्षितीज संजय गित्ते याने 94.8% मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, 93.2% मिळवून कु. दिपाली शाम शिंदे हिने द्वितीय क्रमांक मिळवला तर 91.8% मिळवत कु. श्रावणी मनीष देशमुख ही तृतीय क्रमांक पटकावला. एकूण निकाल खालील प्रमाणे आहे. 90% पेक्षा जास्त 06 विध्यार्थी 80% पेक्षा जास्त 18 विध्...

MB NEWS:सिलिंडर स्फोटात घर जळून खाक झालेल्या अकबर शेख अहमद यांना ॲड. माधव जाधव यांच्याकडून आर्थिक मदत

इमेज
  सिलिंडर स्फोटात घर जळून खाक झालेल्या अकबर शेख अहमद यांना ॲड. माधव जाधव यांच्याकडून आर्थिक मदत परळीदि.१२- बरकत नगर येथील अकबर शेख अहमद यांच्या घरातील गॅस सिलेंडरचा स्फ़ोट होऊन संपूर्ण घर जळून खाक झाले होते.या स्फोटामध्ये एका १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.यामध्ये सहा जण गंभीर जखमीही झाले.तसेच अकबर शेख अहमद यांचे घर जळून खाक झाले.त्यांना भेटून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ॲड.माधव आप्पा जाधव यांनी आर्थिक मदत देत आधार दिला.तसेच या स्फोटामध्ये जखमी झालेले शेख जुबेर महबूब व शेख आवाज मैनुद्दीन ह्या जखमींना सुद्धा जाधव यांच्याकडून धीर देण्यात आला.  हा स्फोट इतका मोठा होता यामुळे बरकत नगर भाग हादरले होते.अंदाजे ३०० फुटापर्यंत या स्फोटा दरम्यान सिलेंडरच्या पत्र्याचे तुकडे गेले होते.या स्फोटाची माहिती मिळताच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधव आप्पा जाधव यांनी प्रत्यक्ष भेटून आर्थिक मदत केली व जखमींना आधार दिला या प्रसंगी सेवकराम जाधव,संभाजी ब्रिगेड चे देवराव लुगडे महाराज, काँग्रेसचे नेते नरेश हालगे, ज्येष्ठ नेते जमील अध्यक्ष,एमआयएमचे युवा नेते मोहसीन भाई शेख यांच्यासह बरकत नगर भागात...

MB NEWS:बंजारा समाजाचे दैवत रूपसिंह महाराजांच्या भव्य मूर्तीचे थाटात अनावरण ; पंकजाताई मुंडेंच्या भाषणानं बंजारा बांधवांत नवचैतन्य

इमेज
  पंकजाताई मुंडे यांचे मध्यप्रदेशात मुख्यमंत्र्यांसमवेत विविध कार्यक्रम बंजारा समाजाचे दैवत  रूपसिंह महाराजांच्या भव्य मूर्तीचे थाटात अनावरण ; पंकजाताई मुंडेंच्या भाषणानं बंजारा बांधवांत नवचैतन्य शिवराजसिंह चौहान यांच्या पाठिशी एकजुटीनं उभं राहण्याचं केलं आवाहन भोपाळ ।दिनांक ११। भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा राज्याच्या सह प्रभारी   पंकजाताई मुंडे आज मध्यप्रदेशच्या दौर्‍यावर होत्या. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या खास निमंत्रणावरून त्या बंजारा समाजाच्या मेळाव्यासोबतच विविध शासकीय विकास योजना व लोकार्पण कार्यक्रमांना उपस्थित होत्या. बंजारा समाज मेळाव्यात त्यांनी केलेल्या भाषणानं उपस्थित समाज बांधवांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं. सर्व सामान्य जनतेच्या भल्याचा विचार करणाऱ्या मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या पाठिशी एकजुटीनं उभं राहण्याचं आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केलं.    मंदसौर जिल्हयातील जवानपुरा, सीतामऊ व मेलखेडा या  तीनही ठिकाणी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान व पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत विविध विकास योजनांचे उदघाटन व लोकार्पण पार पडले. जलसंध...

MB NEWS:परळीतील पोलीस निरीक्षकावर कारवाई

इमेज
  पोलीस दलात खळबळ: आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू: परळीतील पोलीस निरीक्षकावर कारवाई  परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....      पोलीस कोठडीत एका आरोपीचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आता थेट परळीतील एका पोलीस निरीक्षकावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी जबाबदार धरत पोलीस निरीक्षकाला सीआयडीच्या एका पथकाने आज परळीत येत ताब्यात घेतले आहे.        याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सन 2014 मध्ये  परळी पोलीसांनी अटक करुन पोलीस कोठडीत ठेवलेल्या आरोपींपैकी एका आरोपीने गळफास घेतल्याने कोठडीतच त्याचा मृत्यू झाला होता.याप्रकरणी जबाबदार धरत तत्कालीन एक अधिकारी व अन्य पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती.या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी मयतांच्या नातेवाईकांनी केलेली होती.न्यायालयात हे प्रकरण सुरु असतांना सखोल चौकशी करण्यात आली.याप्रकरणी पोलीस निरीक्षक उमाकांत कस्तुरे यांना जबाबदार धरत  मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणात आज एक पथक परळीत दाखल झाले.या पथकाने पोलीस निरीक्षक उमाकांत कस्तुरे यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केल...

MB NEWS:ज्योतिर्लिंगाचे ठिकाण असलेल्या परळीला महावितरणने तात्काळ पूर्ण वेळ अधिकारी द्यावा

इमेज
  ज्योतिर्लिंगाचे ठिकाण असलेल्या परळीला महावितरणने तात्काळ पूर्ण वेळ अधिकारी द्यावा ॲड.माधव जाधव यांची मागणी वीज ग्राहकांची हेळसांड थांबवून वीजपुरवठा सुरळीत करावा - ॲड.माधव जाधव यांची मागणी परळी / प्रतिनिधी दि.११ - ज्योतिर्लिंगाचे ठिकाण असलेल्या परळीला महावितरणने तात्काळ पूर्ण वेळ अधिकारी द्यावा.वीज ग्राहकांची होणारी हेळसांड थांबवून सतत खंडित होत वीजपुरावठा सुरळीत करावा अशी मागणी किसान कांग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड.माधव जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.गेले सहा महिन्यांपासून वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढलेले असतांनाच याकडे महावितरण दुर्लक्ष करत असल्याचेही जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हणले आहे.ग्रामीण भागातल्या शेतकरी बांधवानाही नियमित वीजपुरवाठा करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. महावितरणच्या परळी येथील कार्यालयात साधारण अडीच ते तीन वर्षांपासून पुर्ण वेळ अधिकारी भेटलेला नाही.यामुळे आपत्कालिन सुविधेत मोडणारी महावितरण ची असलेलीही व्यवस्था ढासळत चालली आहे.ज्योतिर्लिंग स्थान असतानाही महावितरण प्रशासनाकडून केले जाणारे दुर्लक्ष खपवून घेतले जाणार नाही.पूर्ण वेळ अधिकारी ...

MB NEWS:रविवारी पक्षघात जनजागृती व मोफत आरोग्य तपासणी शिबीर...

इमेज
  शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन.. शनिवारी भव्य शोभायात्रा रविवारी पक्षघात जनजागृती व मोफत आरोग्य तपासणी शिबीर... परळी वैजनाथ दि.११ (प्रतिनिधी)         येथील शनिमंदिर देवस्थान ट्रस्ट च्यावतीने शनैश्वर जन्मोत्सवा निमित्ताने विविध धार्मिक, सामाजिक, आरोग्य विषयक कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी (ता.१३) ते रविवार (ता.२०) करण्यात आले आहे.          येथे दरवर्षी शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर व सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या प्रेरणेने अखंड शिवनाम सप्ताह, श्री.ग्रंथराज परमरस्य पारायण सोहळा आयोजित केला जातो. यावर्षी अखंड शिवनाम सप्ताहाची सुरुवात शनिवारी (ता.१३) ते रविवार (ता.२०) पर्यंत करण्यात आले आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक, सामाजिक, आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहेत. शुक्रवारी (ता.१९) संध्याकाळी ७ वाजून ०७ मिनिटांनी शनैश्वर जन्मोत्सव साजरा होईल, यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी हा महाप्रसाद शनिमंदिर मध्ये होणार आहे.  त्याचबरो...

MB NEWS:तेलगंणा राष्ट्र समिती पक्षात ॲड राम चाटे यांचा प्रवेश

इमेज
  तेलगंणा राष्ट्र समिती पक्षात ॲड राम चाटे यांचा प्रवेश  हैदराबाद (प्रतिनिधी)परळी वैजनाथ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ॲड राम चाटे यांनी आपल्या समर्थकांना सोबत घेऊन तेलंगणा राष्ट्र समिती पक्षात प्रवेश आज रोजी हैदराबाद येथे केला.        परळी तालुक्यातील मांडवा गावचे असलेले व राजकीय व सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेले वजनदार नेते ॲड.राम रघुनाथ चाटे यांनी तेलंगणा राज्याचे  मुख्यमंत्री श्री के.चंद्रशेखरराव यांचे उपस्थितीत मुख्यमंत्री निवासस्थानी आपल्या समर्थकांसह दिनांक १०मे२०२३ रोजी टि.आर.एस मध्ये प्रवेश घेतला.त्यांचे समवेत श्रीकृष्ण बळीराम चाटे,केशव तुकाराम फड,माणिक शानिक कराड यांनी चाटे यांचे समवेत प्रवेश केला व पक्ष वाढीचा संकल्प केला.

MB NEWS:माजी केंद्रीय मुख्याध्यापक प्रभाकर साधुजी बुक्तर यांचे निधन

इमेज
  माजी केंद्रीय मुख्याध्यापक प्रभाकर साधुजी बुक्तर यांचे निधन परळी, प्रतिनिधी... माजी केंद्रिय मुख्याद्यापक प्रभाकर साधुजी बुक्तर यांचे वृद्धपकाळाने आज बुधवार दि.10 मे रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास वयाच्या 82 व्यावर्षी दुःखद निधन झाले.त्याच्या पार्थिव देहावर गुरुवारी सकाळी 8 वाजता कन्हेरवाडी येथील स्मशानभुमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मिलिंद नगर व हल्ली मुक्काम प्रिया नगर येथील रहिवासी असलेलेकेंद्रीय प्राथमिक शाळेत त्यांनी केंद्रीय मुख्याध्यापक म्हणून त्यांनी शैक्षणिक क्षेत्राला सेवा दिली असुन फुले शाहु आंबेडकर चळवळीचे ते अभ्यासक तर होतेच पण चळवळीला मोठे योगदान ही दिले आहे,परळी रेल्वे स्टेशन परिसरात पुर्वी असलेला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात मोठे योगदान राहिलेले माजी केंद्रीय मुख्याद्यापक प्रभाकर साधुजी बुक्तर यांचे निधन झाले आहे.त्यांच्या जाण्याने सर्वञ शोकभावना व्यक्त होत आहे.            दिवंगत प्रभाकर साधुजी बुक्तर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुल,दोन मुली सुना नातवंडें  असा मोठा परिवार आहे....

MB NEWS:नानाभाऊ शिंदे यांचे निधन ;पत्रकार वसुदेव शिंदे यांना पितृशोक

इमेज
  नानाभाऊ शिंदे यांचे निधन ; पत्रकार वसुदेव शिंदे यांना पितृशोक  अंबा सह.साखर कारखान्यातील कर्मचारी तथा पत्रकार वसुदेव शिंदे यांचे वडील नानाभाऊ त्रिबंकराव शिंदे  (वय ११४ वर्षे) यांचे बुधवार १० जुन रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.         नानाभाऊ त्रिबंकराव शिंदे हे स्वभावाने अतिशय मनमिळावू होते दुसऱ्या सुख-दुःखात सहभागी होणे हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्ये म्हणावे लागेल. तसेच धार्मिक वृत्ती असल्याने पंढरपुरची वारी कधीही चुकू दिली नाही परिसरातील धार्मिक-सामाजिक, सांस्कृतिक सोहळ्यात ते नेहमीच अग्रेसर असत. आपल्या संस्कारातून मुलांना योग्य मार्गदर्शन देवून उत्तम पद्धतीने त्यांची जडण-घडण व्हावी या उद्देशाने त्यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांचा अंत्यविधी त्यांच्या गावी होळ येथे दुपारी स्मशानभूमीत करण्यात आला. त्यांच्या पश्चात तीन मुले दोन मुली सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. या अंत्यसंस्कार विधी समयी  सर्वस्तरांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पत्रकार वसुदेव शिंदे यांचे ते वडील ...

MB NEWS:30 लाखाचा गाळा गेला 26 हजाराला

इमेज
  30 लाखाची बोली बोलणं आले अंगलट अनामत रक्कमेच्या 5 हजाराला लागला  चुना 30 लाखाचा गाळा गेला 26 हजाराला अंबाजोगाई - अंबाजोगाई तालुक्यातील डोंगरपिंपळा येथे ग्रामपंचायत कार्यालयाने कार्यालया लगत चार गाळे बांधलेले असून या गाळ्याचा लिलाव एप्रिल महिन्यामध्ये झाला होता. त्या लिलावामध्ये भावबंदकीच्या चढाओढीत एकाच गाळ्याला तब्बल 30 लाखाची बोली बोलण्यात आली होती. या बोलीची रक्कम आठ दिवसात भरायची होती. परंतु ती रक्कम वेळेत न भरल्यामुळे तोच लिलाव परत केला. आणि ज्या गाळ्यासाठी 30 लाखाची बोली बोलण्यात आली होती. तोच गाळा आता फक्त 26 हजाराला सुटला आहे. मात्र आता जी अनामत रक्कमेपोटी पाच हजार भरले होते. त्याला मात्र आता नगदीच चुना लागला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील डोंगरपिंपळा 4500 लोकसंख्या असलेलं गाव. गावची मतदार संख्या 2300 च्या आसपास. गावच्या ग्रामपंचायतीने गावच्या विकासासाठी व ग्रामपंचायत ला उत्पन्न मिळावे म्हणून ग्रामपंचायत कर्यालया लगत 4 व्यापारी गाळे 10 बाय 10 आकाराचे बांधण्यात आले आहेत. हे गाळे ग्रामपंचायत ने 11 महिन्यांच्या करारावर भाड्याने दिलेले आहेत. या गाळ्यात चहाची टपरी, झेरॉक्स,...

MB NEWS:पत्रकार आणि पत्रकारितेच्या विविध मागण्यांसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे गुरूवारी धरणे आंदोलन

इमेज
  पत्रकार आणि पत्रकारितेच्या विविध मागण्यांसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे गुरूवारी धरणे आंदोलन  बीड (प्रतिनीधी)...    पत्रकारिता आणि पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी गुरूवारी जिल्हाभरात व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत. तरी सर्व पत्रकारांनी या आंदोलनात सहभाग नोंदवावा, असे अवाहन व्हॉईस ऑफ मीडियाकडून करण्यात येत आहे. माध्यमांकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पहिले जाते. मात्र मध्यमकर्मींच्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात नाहीत. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आज राज्यव्यापी आंदोलनाच्या माध्यमातून काही मागण्या सरकारकडे करीत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने 1) पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन त्याला भरीव निधी द्यावा. 2) पत्रकारितेत 5 वर्ष पुर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी. 3) वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागू असलेला जीएसटी रद्द करावा. 4) पत्रकारांच्या घरांसाठी म्हणून विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा. 5) कोरोनात...

MB NEWS:UGC NET 2023 परीक्षेसाठी आजपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात

इमेज
  UGC NET 2023 परीक्षेसाठी आजपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात मुंबई, 10 मे:  UGC NET 2023 सत्ताही अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) आजपासून म्हणजेच 10 मे, बुधवारपासून UGC NET 2023 साठी अर्ज प्रक्रिया सुरू करेल. या परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार UGC NET च्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. त्याची अधिकृत घोषणा UGC ने अधिकृत घोषणा केली आहे. या परीक्षेसाठी महत्त्वाच्या तारखा काय आहेत आणि अर्ज कसा करणार याबाबत प्रोसेस जाणून घेऊया. यूजीसीचे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी ट्विट केले की, “ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 10 मे 2023 पासून सुरू होईल आणि 31 मे 2023 रोजी (संध्याकाळी 5 वाजता) संपेल. परीक्षेची तारीख 13 जून 2023 ते 22 जून 2023 असेल. याशिवाय, उमेदवार https://ugcnet.nta.nic.in/ या लिंकवर क्लिक करून UGC NET 2023 साठी थेट अर्ज करू शकतात. UGC NET 2023 साठी महत्त्वाच्या तारखा UGC NET 2023 साठी अर्ज सुरू होण्याची तारीख - 10 मे UGC NET 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 मे UGC NET 2023 परीक्षा - 1...

MB NEWS:उष्णतेचा कहर : मोठ्याप्रमाणावर साप निघण्याचे प्रमाण वाढले : सर्पमित्रांकडून चांगली कामगिरी

इमेज
  उष्णतेचा कहर : मोठ्या  प्रमाणावर साप निघण्याचे प्रमाण वाढले : सर्पमित्रांकडून चांगली कामगिरी परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....      गेल्या काही दिवसांपासून आवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरुच आहे.त्यामुळे वातावरण प्रचंड गरमीचे बनले आहे.जीवाची लाही लाही करुन टाकणारी गरमी व उष्णतेचा कहर यामुळे मोठ्याप्रमाणावर साप निघण्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येतआहे. अशा परिस्थितीत परळीतील सर्पमित्रांकडून चांगली कामगिरी होत आहे.        असाच एक प्रकार परळी शहरातील नवगण महाविद्यालय परिसरातील सरदार नगर मध्ये डाॅ.शेख यांच्या घरात लांबलचक साप निघाला.एवढा मोठा साप पाहून शेख कुटुंबिय गोंधळून गेले.शेजारीच राहणारे सामाजिक कार्यकर्ते मजास इनामदार यांनी तात्काळ त्यांचे मित्र असलेल्या सर्पमित्र लक्ष्मन गंभीरे रा.हमालवाडी यांना संपर्क केला.त्यानंतर सर्पमित्र लक्ष्मन गंभीरे यांनी या सापाला पकडून मेरुगिरी परिसरातील वनक्षेत्रात सुरक्षित सोडून दिले.नागरिकांनी साप निघाल्यावर न मारता सर्पमित्रांशी संपर्क साधावा व वन्यजीवांचे संरक्षण करावे असे आवाहन करण्यात येत आह...

MB NEWS:पंकजा मुंडेंचा एक फोन अन्.....

इमेज
  हरिद्वार यात्रेला निघालेल्या बीड जिल्ह्यातील भाविकांना मध्यप्रदेश बाॅर्डवर आडवून लटकत ठेवले ; पंकजा मुंडेंचा एक फोन अन्..... पंकजाताई मुंडेंचा एक फोन अन् नेकनूरच्या भाविकांचा पुढील प्रवास झाला सुकर ! बीड जिल्हयातील भाविकांना मध्यप्रदेशातही दिसला नेतृत्वाचा करिश्मा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाचा करिश्मा बीड जिल्हयातील भाविकांना काल अनुभवास आला, त्यांच्या एका फोनमुळे नेकनूर येथील भाविकांचा हरिद्वारचा प्रवास सुकर होऊ शकला.    त्याचं असं झालं, नेकनूर येथील ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे हे एक हजार भाविकांसमवेत हरिद्वार ला जाण्यासाठी प्रवास करत होते, त्यांच्यासोबत अन्न धान्याची ट्रक, स्वयंपाकी व कांही सेवेकरी देखील होते. महाराष्ट्रातून मध्यप्रदेशच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर सैंधवा बॉर्डर वर त्यांची धान्याची ट्रक व सोबतच्या माणसांना पोलिसांनी अडवले व काही तरी कारण देऊन दुपारपासून ताटकळत ठेवले. ट्रकची पासिंग व सर्व आवश्यक कागदपत्रं त्यांनी पोलीसांना दाखवली पण ते त्यांना सोडण्यास काही तयार नव्हते. शेवटी मेंगडे महाराजांनी सायंकाळी पंकजाताई मुंडे यांच्या...

MB NEWS:मोटरसायकल व कारचा भिषण अपघात:विवाह सोहळ्यासाठी निघालेल्या दोघांवर काळाचा घाला

इमेज
  मोटरसायकल व कारचा भिषण अपघात: विवाह सोहळ्यासाठी निघालेल्या दोघांवर काळाचा घाला परळी वैजनाथ, प्रतिनिधी           परळी पासून जवळच असलेल्या धर्मापुरी रस्त्यावरील नंदनज गावाजवळील रस्त्यावर आज दुपारच्या सुमारास  कार व मोटरसायकलचा अपघात घडला. या अपघातात नंदनज येथील दोघेजण ठार झाले आहेत.          याबाबत प्राप्त माहितीनुसार, कार क्रमांक एम एच बारा सी आर 21 60 या क्रमांकाच्या कारने मोटरसायकलला  धडक दिली. या भीषण अपघातात नंदनज येथील ज्ञानोबा नाथराव गुट्टे वय 45 व केशव गुट्टे यांचा मृत्यू झाला आहे. परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहेत. एका विवाह सोहळ्यासाठी जात असतानाच या दोघांवर काळाने घाला घातला आहे .या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

MB NEWS:मुंबईत पोहोचताच पंतप्रधान, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्र्यांना पाठवले पत्र

इमेज
  हज यात्रेकरूंच्या प्रश्नांसाठी पंकजाताई मुंडे सरसावल्या ! मुंबईत पोहोचताच पंतप्रधान, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्र्यांना पाठवले पत्र विमान प्रवासाच्या तिकिट दरातील तफावत दूर करण्यासाठी यात्रेकरूंच्या शिष्टमंडळाने बीड येथे घेतली होती भेट बीड ।दिनांक ०८। हज यात्रेसाठी जाणाऱ्या मराठवाडयातील यात्रेकरूंच्या विमान प्रवासातील तिकिट दरात झालेली तफावत तात्काळ दूर करावी अन्यथा मुस्लिम बांधव हया पवित्र यात्रेला जाऊ शकणार नाहीत यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री स्मृती इराणी यांना आज पत्र पाठवून यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली.    जिल्हयातील तसेच मराठवाड्यातून  मुस्लिम बांधव हज २०२३ साठी जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथून विमानाने हजसाठी रवाना होणाऱ्या बांधवांना यंदा तांत्रिक कारणामुळे ८८ हजार रूपये जादा भाडे द्यावे लागत आहे. या संदर्भात काल संध्याकाळी मुस्लिम बांधवांच्या एका शिष्टमंडळाने पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन हा प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती. मी स्वत: जातीने लक्ष ...

MB NEWS:मतभेद विसरून गावाला समृद्ध करा-पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने

इमेज
पर्यावरण संतुलन, स्वच्छता, लोकसहभाग व गावाच्या गरजा या सुत्रातून  गाव समृद्ध होईल – भास्करराव पेरे पाटील मतभेद विसरून गावाला समृद्ध करा-पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने परळी वैजनाथ, प्रतिनिधी..... पर्यावरण संतुलन, स्वच्छता, लोकसहभाग व गावाच्या गरजा या सुत्रातून  गाव समृद्ध होईल.एकजुटीने काम केल्यास गावाचा सर्वांगीण विकास शक्य आहेअसे प्रतिपादन महाराष्ट्र राज्यातील आदर्श गाव पाटोदा येथील माजी सरपंच व्याख्याते भास्करराव पेरे पाटील यांनी टोकवाडी येथे केले.             परळी तालुक्यातील विकासात्मक कामात अग्रेसर ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या  टोकवाडी ग्रामपंचायतच्या वतीने  रविवार दि.०७.०५.२०२३ रोजी सायं. ०५.३० वा. टोकवाडी येथे रविवारी आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे मार्गदर्शन व विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमास जगतविख्यात नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून पं.स.परळी-वै गटविकास अधिकारी संजय केंद्रे,ग्रा.पं. रुई ता. गेवराई (रेशीम उद्योग गा...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या