पोस्ट्स

सप्टेंबर २४, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

परळी तालुका माहेश्वरी युवा संघटन नुतन कार्यकारिणी जाहीर

इमेज
  परळी तालुका माहेश्वरी युवा संघटन  नुतन कार्यकारिणी जाहीर सुरज कोठारी अध्यक्ष तर सुमीत नावंदर सचिव व कोषाध्यक्षपदी मोनिष भुतडा यांची नियुक्ती विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर राहून कार्य करण्याचा नुतन कार्यकारिणीचा निर्धार परळी वैजनाथ (प्रतिनिधी)दि.29 - विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमात सदैव अग्रेसर राहून सामाजिक जाणीव जागृत ठेवणारे संघटन म्हणून परिचित असलेल्या परळी तालुका माहेश्वरी युवा संघटनच्या नुतन कार्यकारिणी निवडण्यात आली आहे.यामध्ये सुरज कोठारी अध्यक्ष तर सुमीत नावंदर सचिव व कोषाध्यक्षपदी मोनिष भुतडा यांची नियुक्ती करण्यात आली.विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर राहून कार्य करण्याचा निर्धार नुतन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.              बीड जिल्हा माहेश्वरी युवा संघटन च्या माध्यमातून विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. या अंतर्गत परळी तालुका माहेश्वरी युवा संघटन चे कार्य नेहमीच उल्लेखनीय राहिलेले आहे.सामाजिक चळवळीत अग्रेसर परळी तालुका माहेश्वरी युवा संघटन ची नुतन कार्यकारिणी निवडण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.बीड जिल्हा माहेश्वरी युवा संघटनचे मा

धनंजय मुंडेंनी केला शोक व्यक्त

इमेज
  डॉ.स्वामिनाथन यांच्या निधनाने कृषी क्षेत्राची प्रचंड हानी झाली - धनंजय मुंडे कृषी शात्रज्ञ डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांच्या निधनाबद्दल धनंजय मुंडेंनी केला शोक व्यक्त मुंबई (दि. 28) - सुप्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ तथा स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशनचे सर्वेसर्वा डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या निधनामुळे कृषी क्षेत्राची प्रचंड मोठी हानी झाली असल्याची खंत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे. याबाबत ट्विट करून धनंजय मुंडे यांनी डॉ. स्वामिनाथन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.  डॉ. स्वामिनाथन यांचे आज निधन झाले, मृत्यूसमयी त्यांचे वय 98 वर्ष होते. कृषी क्षेत्रात क्रांती घडवत डॉ. स्वामिनाथन यांनी गहू, तांदूळ आदी धान्याच्या अधिकाधिक उत्पन्न देणारे वाण विकसित केले. त्यांच्या योगदानामुळे अन्नधान्याच्या बाबतीत देशाचे इतर देशांवरील अवलंबित्व कायमचे संपले.  स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशन तसेच विविध प्रशासकीय पदे भूषवत डॉ. स्वामिनाथन यांनी कृषी क्षेत्रात अमूलाग्र संशोधन केले. डॉ.स्वामिनाथन यांनी कृषी क्षेत्रात दिलेले योगदान देश सदैव स्मरणात ठेवेल, अस

पत्रकार प्रा. संतोष कुलकर्णी नांदेड यांचा विशेष ब्लॉग >>>>>प्रामाणिक मैत्री जपणारे व्यक्तिमत्व:-पत्रकार अनंत कुलकर्णी

इमेज
  प्रामाणिक  मैत्री  जपणारे व्यक्तिमत्व:-पत्रकार अनंत कुलकर्णी ......................................................   " "मोडलेल्या माणसांचे दुःख सारे झेलताना     त्या अनाथांच्या उशाला दीप लावू झोपताना  वाहतांना भार त्यांचा जाहले गणगोत त्यांचे     कोणते नाते कळेना बांधले आयुष्यभराचे..."   मैत्री प्रामाणिकपणे जपणारे आमचे पत्रकार मित्र अनंत कुलकर्णी यांचा आज वाढदिवस आहे. मराठवाड्यातील जनतेचे मुखपत्र असलेल्या लोकप्रिय दैनिक लोकप्रभाचे उपसंपादक  अनंत कुलकर्णी  यांनी आपल्या लेखनीच्या माध्यमातुन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम प्रयत्नशील असतात. त्यांच्या लेखणीमुळे अनेक सामाजिक प्रश्न मार्गी लागले आहेत. अशा समाज हितासाठी सतत काम करणाऱ्या हरहुन्नरी पञकार अनंत कुलकर्णी यांचा आज वाढदिवस आहे.त्या  निमित्ताने  दोन शब्द  ........ .....................  अनंत कुलकर्णी हे संघर्षातून तावूनसुलाखून पुढे आलेले व्यक्तिमत्त्व सुरुवातीच्या काळामध्ये पडेल ते काम त्यांनी केले व आपल्या सुस्वाभावामुळे अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसे जोडली. ते सध्या परळी  शहरात  वीस वर्षांपासून   पत्

प्रा.प्रवीण फुटके यांचा विशेष ब्लॉग >>>>>अनंत अडचणींवर मात करणारे अनंत कुलकर्णी

इमेज
  अनंत अडचणींवर मात करणारे अनंत  कुलकर्णी             मराठवाड्यातील जनतेचे मुखपञ असलेल्या लोकप्रिय दै लोकप्रभा उपसंपादक  अनंत कुलकर्णी  यांनी आपल्या लेखनीच्या माध्यमातुन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम प्रयत्नशील असतात. त्यांच्या लेखणीमुळे अनेक सामाजिक प्रश्न मार्गी लागले आहेत. अशा समाज हितासाठी सतत काम करणाऱ्या हरहुन्नरी पञकार अनंत कुलकर्णी यांचा आज वाढदिवस आहे.त्या  निमित  दोन शब्द  ,,,,,,,,,   परळी  शहरात  वीस वर्षांपासून   पञकरिता  करत आहेत . या माध्यमातून  अनेक  विषयावर  लिखान  केले  या लिखाणातून  अनेकांना  बातमीतून  न्याय  मिळत  गेला . त्या  काळी पञकरिता  करणे  खुप  अवघड  होते . सत्य  बातमी  छापली  तर लगेच   फोन यायचे  तरीही   पञकार  अनंत कुलकर्णी  यांनी  माञ  भीती  न  बाळगता  लिखाण  सूरूच  ठेवले        अनंत कुलकर्णी यांनी नांवाप्रमाणेच अनंत अडचणींवर मात करत आपल्या जीवनाचा प्रवास करत आहेत. कुलकर्णी हे मुळचे अंबाजोगाईचे रहिवासी. परंतु परळी येथे आजीकडे प्रथम पासुनच राहत असल्याने ते परळीतच स्थायिक झाले. त्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने त्यांनी  अंबाजोगाई येथे त्

परळी वैजनाथ येथील पत्रकारांनी भाजप नेते व कार्यकर्त्यांसाठी आयोजित केले चहापान

इमेज
  बावनकुळेंच्या ‘त्या’ विधानाचा गांधीगिरी मार्गाने निषेध, परळी वैजनाथ येथील पत्रकारांनी भाजप नेते व कार्यकर्त्यांसाठी आयोजित केले चहापान परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पत्रकारांना चहा पाजा, धाब्यावर न्या; या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटली. बावनकुळे यांच्या विधानाच्या निषेधार्थ परळी वैजनाथ येथील पत्रकारांच्यावतीने गांधीगिरीचा मार्ग अवलंबत भाजप नेते व कार्यकर्त्यांसाठी गुरुवार दि. 28 सप्टेंबर रोजी शहरातील पद्मावती भागातील गड्डे अप्पा यांच्या हॉटेलमध्ये सकाळी 11 वाजता चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. अलीकडे भाजप विरोधात भूमिका घेणाऱ्या पत्रकारांवर पक्षातून आरोप केले जात आहेत. चाय बिस्कुट पत्रकार, पाकीट पत्रकार अशा शब्दात पत्रकारांना अवमानित केले जात आहेत. तर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर कार्यक्रमांमध्ये पत्रकारांना चहा पाजा, ढाब्यावर, न्या, त्यांना क्वार्टर द्या, असे म्हणत मद्यपानाचा सल्लाही दिला आहे. महाराष्ट्रातील पत्रकारांना सन्माननिधी देण्यामध्ये आडकाठी आणण्याचे काम भाजपचे सरकार करत असताना त्यांचे प्रदेशाध्यक्ष मात्र पत्रका

उद्याची सुट्टी परवा: गुरुवार (दि.२८) ऐवजी शुक्रवार दि.२९ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी

इमेज
  उद्याची सुट्टी परवा: गुरुवार (दि.२८) ऐवजी शुक्रवार दि.२९ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी   परळी/प्रतिनिधी      राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्टयांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी गुरूवारी (ता.२८) दर्शविण्यात आलेली होती. ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. तथापि यावर्षी गुरूवारी (ता.२८) हिंदुं धर्मीयांचा अनंत चतुर्दशी हा सण आहे. अनंत चतुर्दशी च्या दिवशी राज्यात सर्वत्र सार्वजनिक गणेश मुर्तीची मिरवणूक काढण्यात येते व नंतर तिचे विसर्जन करण्यात येत असल्याने हिंदुं बांधवांची मोठीं गर्दी जमा होत असते. यामुळे दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतुने ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी ही गुरुवार (ता.२८) ऐवजी शुक्रवार दि.२९ सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे गुरूवार ऐवजी शुक्रवारी  सार्वजनिक सुट्टी असणार आहे. याबाबत बुधवारी (ता.२७ ) राज्य शासनाने अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. ----------------------------------------------------- ●अधिक बातम्या वाचा व पहा● ----------------------------------------

सिताराम येचूरी, अशोक ढवळे यांच्यासह वरिष्ठ नेते राहणार उपस्थितीत

इमेज
  १ ऑक्टोबर रोजी स्वातंत्र्य सेनानी कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे स्मारक लोकार्पण सोहळा सिताराम येचूरी, अशोक ढवळे यांच्यासह वरिष्ठ नेते राहणार उपस्थितीत परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष व कॉ. अप्पांच्या स्मृतीदिनानिमित्त स्वातंत्र्य सेनानी कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे स्मारक लोकार्पण सोहळा १ ऑक्टोबर रोजी होणार आहे. कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव काॅ. सिताराम येचूरी, अशोक ढवळे यांच्यासह वरिष्ठ नेते  उपस्थितीत राहणार आहेत.           केला संघर्ष ज्यांनी स्वातंत्र्याचा,लढला लढा संयुक्त महाराष्ट्र अन् नामविस्ताराचाही. शेवटच्या श्वासापर्यंत त्याग, तत्व, निष्ठा आणि समर्पित वृत्तीने ज्यांनी सर्वहारा वर्गासाठी अर्पिले सर्वस्व सत्तेच्या मळवाटेने जायचे नाकारुन ! मराठवाडा - गोवा अन् मानवमुक्तीचाही. शिक्षणाशिवाय अन् एकोप्याशिवाय समाजाची उन्नती नाही हे जाणून, ज्यांनी दुर्गम भागात महाराष्ट्र शिक्षण संस्थेचा अन् एक गाव एक पाणवठ्यातून समतेचा घातला पाया, असे रणझुंजार स्वातंत्र्य सेनानी व बीड जिल्ह्याचे माजी खासदार कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या स्मारकाचा

● वाचा ✍️ सौ. अपर्णा हृषिकेश नेरलकर, नांदेड यांचा विशेष ब्लॉग>>>> आमचे कल्पवृक्ष : स्वर्गीय अंबादास देशपांडे

इमेज
  आमचे कल्पवृक्ष : स्वर्गीय अंबादास देशपांडे ..................................................... माझे बाबा म्हणजे वडील स्व. अंबादास गंगाधरराव देशपांडे  यांना दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी देवाज्ञा झाली. कौटुंबिक सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडून तृप्त मनाने त्यांनी आम्हा सर्व परळीकर देशपांडे व नेरलकर, स्नेही परिवारांचा निरोप घेतला. देहरुपाने बाबा  आज जरी आमच्यात नसले तरी त्यांनी आम्हा चौघी बहिणीवर जे संस्कार केले,जो सकारात्मक दृष्टिकोन दिला व नैतिक मूल्यांची शिकवण दिली हे आजही मला प्राजक्तांच्या फुलांप्रमाणे सुगंधीत वाटतात. अनेक वर्षे मला माझ्या बाबांना जवळून पाहता आले. त्यांच्या प्रत्येक पावलांना अवलोकनाची संधी मला मिळाली यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. मनाचा प्रचंड गोंधळ, सुरुवात त्यांच्या कोणत्या क्षणापासून करावी ज्यामुळे लय प्राप्त होईल. आपणासमोर सुव्यवस्थितपणे त्यांचे व्यक्तिमत्व साकार होईल याच विचाराने लेखणाला सुरुवात केली. त्यांचे अनैक पैलू डोळ्यांसमोरून तरळून जात होते. त्यांचे वाचन चौफेर व समृद्ध होते. आपल्या अवतीभवती काय घडत आहे याविषयीची त्यांना नेहमी जिज्ञासा असे. साम