पोस्ट्स

जुलै १०, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MB NEWS-महाराजांची शिकवण सतत आम्हाला सन्मार्ग दाखवत राहील -धनंजय मुंडे

इमेज
  पाटांगणकर महाराज यांच्या पार्थिवाचे धनंजय मुंडे यांनी घेेतलं अंत्यदर्शन  महाराजांची शिकवण सतत आम्हाला सन्मार्ग दाखवत राहील -धनंजय मुंडे बीड येथील संत जनीजनार्धन संस्थानचे मठाधिपती ह.भ.प.धुंडीराजशास्त्री पाटांगणकर महाराज यांच्या पार्थिवाचे आज माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी अंत्यदर्शन घेऊन त्यांना आदरांजली अर्पण केली तसेच कुटुंबीयांचे सांत्वन केले. महाराजांनी अध्यात्माच्या मार्गाने शिकवलेली मानवतेची शिकवण सतत आम्हाला सन्मार्ग दाखवत राहील अशी भावना यावेळी धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली,  यावेळी त्यांच्यासमवेत माजी आमदार सय्यद सलीम,  नारायण शिंदे,  कल्याण आखाडे, दादासाहेब मुंडे, प्रशांत चौरे आदी होते.

MB NEWS-राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांनी पंकजाताई मुंडेंना सोबत घेत केला छत्तीसगड, मध्यप्रदेशचा दौरा

इमेज
  राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू  यांनी पंकजाताई मुंडेंना सोबत घेत केला छत्तीसगड, मध्यप्रदेशचा दौरा दौऱ्यानंतर  मूर्मू यांनी ट्विट करत केली पंकजाताईंची प्रशंसा ! मुंबई  ।दिनांक१६। राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या  उमेदवार श्रीमती द्रोपदी मुर्मू सध्या विविध राज्याचा दौरा करत आहेत. मुर्मू यांनी नुकताच भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांना सोबत घेत छत्तीसगड, मध्यप्रदेशचा दौरा केला. दौरा संपल्यानंतर मुर्मू यांनी ट्विट करत त्यांचं खास कौतुक केलं.     भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू गुरूवारी (ता. १४) मुंबईत आल्या होत्या. विमानतळावर भाजपच्या वतीनं त्यांचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनीही त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर मूर्मू यांनी पुढील राज्याचा दौरा करण्यासाठी पंकजाताईंना आपल्या समवेत घेतले. दि. १४ व १५ रोजी छत्तीसगड आणि मध्यप्रदेशचा त्यांचा दौरा पार पडला. मध्यप्रदेशच्या सह प्रभारी या नात्याने पंकजाताईंनी भोपाळमध्ये त्यांच्यासोबत होत्या. याठिकाणी मुर्मू यांचं जोरदार स्वागत झालं. या स्वाग

MB NEWS-धुंडिराज शास्त्री पाटांगणकर महाराजांच्या निधनाने बीड जिल्हयाच्या अध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी* *पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या शोकभावना*

इमेज
  धुंडिराज शास्त्री पाटांगणकर महाराजांच्या निधनाने बीड जिल्हयाच्या अध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या शोकभावना बीड  ।दिनांक १६। अध्यात्मिक क्षेत्रातील थोर व्यक्तिमत्व धुंडिराज शास्त्री महाराज पाटांगणकर यांच्या निधनाने जिल्हयाच्या अध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी शोकभावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.    धुंडिराज शास्त्री महाराजांच्या  निधनाची बातमी सायंकाळी कानावर आली आणि धक्काच बसला. महाराजांचे अध्यात्मिक क्षेत्रातील योगदान मोठे होते. पन्नास वर्षाहून अधिक काळ ते या क्षेत्रात कार्यरत होते.  लोकनेते गोपीनाथराव मुंडे व परिवाराशी त्यांचा विशेष स्नेह होता. अनेक वेळा त्यांचेशी संवाद साधण्याचा योग आला, विविध विषयांवर ते मनमोकळे बोलायचे. आयुर्वेदाचे ते गाढे अभ्यासक होते. त्यांच्या निधनाने अध्यात्मिक तसेच आयुर्वेद क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे, त्यांना माझी भावपूर्ण श्रध्दांजली अशा शब्दांत पंकजाताईंनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. ••••

MB NEWS-धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश;नितीन गडकरींनी परळीसाठी 100 कोटी केले मंजूर

इमेज
  धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश;नितीन गडकरींनी परळीसाठी 100 कोटी केले मंजूर   श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपुलासह दुसऱ्या उड्डाणपुलाच्या चौपदरीकरणासाठी नितीन गडकरींनी केले 100 कोटी मंजूर!* *दोन्ही उड्डाणपूल 4 पदरी होणार; लवकरच होणार निविदा प्रसिद्ध* *अंबाजोगाई लातूर रोडवरील बीड जिल्हा हद्दीतील रस्ताही होणार चौपदरी, केंद्राने मागवले प्रस्ताव* परळी वै. (दि. 16) - माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दि. 16 जून रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन केलेल्या मागणीला मोठे यश आले असून, परळी शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूलाच्या व थर्मल परिसरातील दुसऱ्या उड्डाणपुलाच्या चौपदरीकरण कामासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक विभागाने 100 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.  निधी मंजूर करण्यात आलेल्या कामांमध्ये रा.मा.548 ब वरील श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूल चौपदरीकरण व रा.मा.361 एफ वरील परळी शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते औष्णिक विद्युत प्रकल्पाचे प्रवेशद्वार या रस्त्याचे त्यावरील रेल्वे उड्डाण पुलासह चौपदरीकरण कर

MB NEWS-बीड जिल्ह्याचे अध्यात्मिक वैभव हरवले; धुंडीराज शास्त्री पाटांगणकर महाराजांचे देहावसन

इमेज
बीड जिल्ह्याचे अध्यात्मिक वैभव हरवले; धुंडीराज शास्त्री पाटांगणकर महाराजांचे देहावसन बीड जिल्ह्याच्या आध्यात्मिक क्षेत्राला धक्का देणारी बातमी शनिवारी समोर आली.वेदशास्त्रसंपन्न हभप धुंडिराज महाराज पाटांगणकर यांचे वृद्धपकाळाने सायंकाळी निधन झाले.त्यांच्या निधनाने वृत्त समजताच शेकडो भाविक भक्तांनी रुग्णालयात एकच गर्दी केली होती. मूळचे शिक्षक असणारे धुंडिराज महाराज हे वेदशास्त्रसंपन्न होते.आयुर्वेद या विषयात त्यांचा गाढा अभ्यास होता.दुर्धर आजारावर त्यांचे निदान अतिशय परफेक्ट होते.संत जनीजनार्दन संस्थान थोरले पाटांगण चे प्रमुख होते. गेल्या पन्नास वर्षापेक्षा अधिक काळापासून ते अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत होते.विद्यावाचस्पती म्हणून त्यांचा नावलौकिक होता.श्रीमद भागवत मुखोदगद असलेले धुंडिराज महाराज हे बीड जिल्ह्याच्या अध्यात्मिक क्षेत्रातील मैलाचा दगड होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते,शनिवारी सायंकाळी त्यांचे उपचार सुरू असताना निधनझाले.त्यांच्या पश्चात दोन भाऊ,पत्नी,मुलगा,सुना नातवंडे असा परिवार आहे. बीड जिल्ह्याच्या आध्यात्मिक क्षेत्राला धक्का देणारी बातमी शनिवारी समोर आली.वेदश

MB NEWS-रविवारपासून धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात 'राष्ट्रवादी आपल्या दारी' अभियानास पुन्हा सुरुवात*

इमेज
  रविवारपासून धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात 'राष्ट्रवादी आपल्या दारी' अभियानास पुन्हा सुरुवात *विकासाची प्रभागफेरी घेऊन धनंजय मुंडे रविवारी प्रभाग क्र. 3 (बरकतनगर) भागात घेरोघरी भेटी देऊन साधणार नागरिकांशी संवाद* परळी (दि. 16) - राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरू केलेले 'राष्ट्रवादी आपल्या दारी... विकासाची प्रभागफेरी' हे अभियान रविवार पासून (दि. 17) पुन्हा सुरू करण्यात येत असून, धनंजय मुंडे हे आपल्या सहकारी - पदाधिकाऱ्यांच्या सोबतीने रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून परळी शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील बरकत नगर भागातील घरोघरी जाऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधणार आहेत.  धनंजय मुंडे यांनी परळी शहरातील नागरिकांशी संवाद साधण्याचा उपक्रम सुरू केल्यानंतर त्याला परळीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. मात्र मध्यंतरी आचार संहिता घोषित झाल्याने या उपक्रमास खंड पडला होता. मात्र धनंजय मुंडे यांनी वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यात हा उपक्रम पुन्हा सुरू करणार असल्याचे शुक्रवारी घोषित केले. दरम्यान रविवारी सकाळ

MB NEWS-श्रीमती सखुबाई उर्फ शकुंतलाबाई जनार्दनराव देशमुख यांचे दुःखद निधन

इमेज
  श्रीमती सखुबाई उर्फ शकुंतलाबाई जनार्दनराव देशमुख यांचे दुःखद निधन परळी वै.... प्रभाकर व रामभाऊ देशमुख यांच्या मातोश्री श्रीमती सखुबाई उर्फ शकुंतलाबाई जनार्दनराव देशमुख यांचे अल्पशा आजाराने आज शुक्रवार दि.15 जुलै रोजी राञी 9 वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले. श्रीमती सखुबाई उर्फ शकुंतलाबाई जनार्दनराव देशमुख या अतिषय धार्मिक व सुस्वभावी होत्या,काही दिवसापासुन त्या आजार होत्या त्यांच्यावर उपचार पण सुरु होते परंतु त्यांच्या  वयाच्या 84 व्यावर्षी त्यांची प्राणजोत माळवली.त्यांच्या जाण्याने सर्वस्तरातुन शोकभावना व्यक्त होत आहेत. माजी नगरसेवक  बाळासाहेब देशमुख यांच्या त्या काकी होत,श्रीमती सखुबाई उर्फ शकुंतलाबाई जनार्दनराव देशमुख यांच्यावर शनिवार दि.16 जुलै रोजी सकाळी अकरा वाजता सार्वजनिक स्मशानभुमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. श्रीमती सखुबाई उर्फ शकुंतलाबाई जनार्दनराव देशमुख यांच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी सुना व नातवंडे असा परिवार असा मोठा परिवार आहे.देशमुख परिवारावर कोसळलेल्या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे

MB NEWS-परळी तालुक्यातील नंदनज- कासारवाडीचा 'बोरणा' तलाव १०० टक्के भरला(Video & News)

इमेज
  परळी तालुक्यातील नंदनज- कासारवाडीचा 'बोरणा' तलाव १०० टक्के  भरला परळी वैजनाथ | एमबी न्युज वृत्तसेवा..         परळी तालुक्यातील नंदनज- कासारवाडी येथील 'बोरणा' मध्यम प्रकल्प  १०० टक्के  भरला आहे. तालुक्यातील जलसाठे भरत असल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. परळी चा मुख्य जलस्त्रोत असलेल्या नागापूर येथील वाण प्रकल्पात यापुर्वीच १०० पाण्याचा साठा झालेला आहे व सध्यस्थितीत पाण्याचा मोठा ओघ सुरू आहे.                   परळी तालुक्यात चांगला  पाऊस  झाला आहे. त्यामुळे सर्वत्र पाणी साठवण होण्यासाठी मोठी मदत होत आहे. परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत नागापूर येथील  'वाण प्रकल्प' पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. तालुक्यातील बोधेगाव, करेवाडी, चांदापुर, कन्हेरवाडी, गुट्टेवाडी, मोहा, मालेवाडी, गोपाळपुर, खोडवा सावरगाव, दैठणाघाट, करेवाडी आदींमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण होण्यास सुरुवात झाली आहे.  बोरणा तलावाच्या सांडव्यावरुन पाणी प्रवाहित ....    दरम्यान परळी पासून जवळच असलेल्या नंदनज-कासारवाडी येथील बोरणा तलावात 100 टक्के  पाणीसाठा झाला  आहे.मध्यम प्रकल्प असलेल्या बोरणा प्र

MB NEWS-सत्ता असो वा नसो सामान्य माणसाचे प्रेम व आशीर्वाद हीच खरी शक्ती -धनंजय मुंडे

इमेज
  सत्ता असो वा नसो सामान्य माणसाचे प्रेम व आशीर्वाद हीच खरी शक्ती -धनंजय मुंडे  धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो समर्थकांनी केले वृक्षारोपण धनंजय मुंडे यांच्या जन्मदिन अभिष्टचिंतन सोहळ्यास हजारो कार्यकर्त्यांची गर्दी;आईंनी केलं औक्षण तर प्रभू वैद्यनाथांचे घेतले दर्शन परळी (दि. 15) - माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या आवाहनाला त्यांच्या समर्थकांनी जोरदार प्रतिसाद देत राज्यात हजारो ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून त्याचे फोटो पाठवले आहेत.   2019 च्या निवडणुकीत मला जनतेने अभूतपूर्व प्रेम देऊन निवडून दिले, त्यांच्याच आशीर्वादाने मी मंत्री झालो. अडीच वर्षाच्या कार्यकाळानंतर राज्यात सत्तांतर झाले असले तरी माझ्यासाठी सत्ता असणे किंवा नसणे हे कधीच महत्वाचे नाही. माझ्या पाठीशी असलेले सामान्य माणसाचे प्रेम व आशीर्वाद हीच माझी खरी शक्ती असून मी सदैव जनसेवेत राहण्यासाठी कटीबद्ध आहे, असे मत माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.  आज परळी येथे धनंजय मुंडे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बो

MB NEWS-नीट परीक्षेसाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या जीपला अपघात : दोन विद्यार्थी व दोन पालक जखमी

इमेज
  नीट परीक्षेसाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या जीपला अपघात : दोन विद्यार्थी व दोन पालक जखमी केज (दि.१५) :- परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील विद्यार्थी हे त्यांच्या पालका सोबत अहमदनगर येथे नीटच्या परीक्षेसाठी जात असताना अंबाजोगाई-केज रस्त्यावर होळ नजीक त्यांच्या गाडीला अपघात होऊन पलटी झाली. त्यात दोन विद्यार्थी व दोन पालक असे चौघे जखमी झाले आहेत.       दि. १५ जुलै शुक्रवार रोजी पाथरी जि. परभणी येथील सुरेश सिरसाट वय (५० वर्ष), विनोद सिरसाट वय (४२ वर्ष), सौरभ सिरसाट वय ( १९ वर्ष ) आणि सुजित सिरसाट वय (१८वर्ष) व अन्य एकजण असे पाचजण अहमदनगर येथे नीट परीक्षेसाठी बोलेरो गाडीतून जात होते. त्यांची गाडी केजच्या दिशेने होळ पासून पुढे आली असता होळ ते चंदनसावरगाव दरम्यान त्यांची बोलेरो गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पलटी झाली. या अपघातमध्ये सौरभ सिरसाट वय (१९ वर्ष) आणि सुजित सिरसाट वय (१८वर्ष) हे दोन विद्यार्थी व सुरेश सिरसाट वय (५० वर्ष) आणि विनोद सिरसाट वय (४२ वर्ष) हे दोन पालक जखमी झाले आहेत.जखमींना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामिण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे आपत्

MB NEWS:- धनंजय मुंडे वाढदिवस अभिष्टचिंतन:एका क्लिकवर विविध लेख, बातम्या,अभिष्टचिंतन जाहिराती

इमेज
धनंजय मुंडे वाढदिवस अभिष्टचिंतन:एका क्लिकवर विविध लेख, बातम्या, अभिष्टचिंतन जाहिराती.....       राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे माजी पालकमंत्री आ. धनंजय मुंडे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अग्रभागी असलेले नेतृत्व. दातृत्व, कर्तृत्व व वक्तृत्वाचा अनोखा संगम असलेले व्यक्तिमत्त्व आहे. १५ जुलै आ.धनंजय मुंडे यांचा वाढदिवस.यानिमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! - -      -संपादक _______________________________ _______________________________ वाल्मीक (अण्णा) कराड यांचा लेख >>>>>> धनंजय मुंडे: माझे दैवत...! https://bit.ly/3IS5qbD _______________________________ ■ आ.धनंजयजी मुंडे वाढदिवस अभिष्टचिंतन जाहिरात >>>>>>  वाल्मिक अण्णा कराड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. https://youtu.be/ujNipqG725A _______________________________ ● मा.आ.श्री. धनंजयजी मुंडे साहेब वाढदिवस अभिष्टचिंतन जाहिरात.     >>>>>>>>> अजय मुंडे(गटनेते जि.प.बीड)* अभय मुंडे (युवानेते रा. काँ.परळी वै.) h

MB NEWS-आता परळी मार्गे नविन नांदेड -तिरुपती विशेष रेल्वे सेवा

इमेज
  आता परळी मार्गे नविन नांदेड -तिरुपती विशेष रेल्वे सेवा परळी वैजनाथ.... दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड ते कर्नाटक राज्यातील हुबळी दरम्यान विशेष गाड्या सुरु करण्याचे ठरवले आहे. या विशेष गाडीच्या सहा फेऱ्या मंजूर करण्यात आल्या असून, नांदेड तिरुपती दरम्यान चार विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा ही निर्णय घेण्यात आला आहे. नांदेड- तिरुपती विशेष सेवा           गाडी क्रमांक 07633 ही गाडी 16 आणि 23 जुलै रोजी शनिवारी दुपारी 12.00 वाजता सुटेल. आणि पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, झहीराबाद, विकाराबाद, तांदूर, सेरम, चित्तापूर, सुलेहाल्ली, यादगीर, कृष्णा, रायचूर, मंत्रालयम रोड, अदोनी, गुंटकळ, गुती, तादिपात्री, येर्रागुंतला, कडप्पा, रेनिगुंता मार्गे तिरुपती येथे दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी 8.30 वाजता पोहोचेल. तिरुपती-नांदेड विशेष सेवा गाडी क्रमांक 07634 ही गाडी 17 आणि 24 जुलै रोजी रविवारी रात्री 9.00 वाजता सुटेल. आणि आलेल्या मार्गानेच नांदेड येथे दुसऱ्या दिवशी सोमवारी सायंकाळी 5.20 वाजता सुटेल. या गाडीत प्रथम श्रेणी वातानुकुलीत, द्वितीय श्रेणी वातानुकुलीत, तृतीय श्रेणी वा

MB NEWS-नांदेड- पंढरपूर-हुबळी परळीमार्गे नवीन रेल्वे

इमेज
  नांदेड- पंढरपूर-हुबळी परळीमार्गे नवीन रेल्वे परळी वैजनाथ.....       दिनांक 16 जुलै, शनिवार पासून परळीमार्गे नांदेड-हुबळी दरम्यान नवीन साप्ताहिक विशेष रेल्वे धावणार आहे. नांदेड-पंढरपूर-हुबळी रेल्वे नांदेड येथून दर शनिवारी दुपारी 2.10 वाजता निघून पूर्णा 2.40, परभणी 3.15, गंगाखेड 3.50, परळी वैजनाथ सायंकाळी 4.40, पुढे लातूर रोड, लातूर, धाराशिव, बार्सी, कुर्डवाडी, पंढरपूर, सांगोला, मिरज, घटप्रभा, बेळगाव, लोंढा जंक्शन, धारवाड स्थानकावरून  हुबळी येथे दुसर्या दिवशी सकाळी 9 ला पोहोचणार आहे. परतीत हुबळी येथून दर रविवारी सकाळी 11.15 ला निघून त्याच मार्गाने परळी वैजनाथ दूसरा दिवशी सकाळी 3.45, गंगाखेड 5.05, परभणी 5.45 पूर्णा 6.35 आणि अखेर नांदेड येथे सकाळी 8 ला पोहोचणार आहे. Click &watch: *आता परळी मार्गे नविन नांदेड -तिरुपती विशेष रेल्वे सेवा* घोषित नांदेड-हुबळी रेल्वेमुळे धाराशिव येथून 17 किमी अंतरावरील तुळजापूर, पंढरपूर, मिरज येथून 40 किमी अंतरावरील कोल्हापूर महालक्ष्मी, हुबळी येथून  गोकर्णा, मुरुडेश्वर येथील मंदिरांच्या दर्शनासाठी  जाणार्या भक्तांसाठी, तसेच लोंढा जंक्शन येथून 4 तासाच्या

MB NEWS-वारीला गेलेल्या बळीराम राऊत यांचे अपघाती निधन

इमेज
  वारीला गेलेल्या बळीराम राऊत यांचे अपघाती निधन सातोना/पांडुरंग शिंदे....     परतुर तालुक्यातील अंगलगाव येथील बळीराम काशिनाथ राऊत यांचे अपघाती निधन झाले आहे. पंढरपूर येथे वारीहून परतत असताना पंढरपूर येथील पोलीस स्टेशन समोर अचानक येणाऱ्या भरधाव कार ने धडक दिली. यामध्ये त्यांच्या डोक्याला मार लागला होता. पंढरपूर येथील खाजगी  रुग्णालयात दोन दिवस उपचार सुरू होते. दरम्यान दि. 13 जुलै रोजी रात्री दहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांचा अंत्यविधी अंगलगाव येथे दिनांक 14 जुलै रोजी करण्यात आला. त्यांच्या  निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.बळीराम राऊत हे मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने सर्व परिचित होते.         त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी असा परिवार आहे. राऊत कुटुंबाच्या दु:खात माजी आमदार बबनराव लोणीकर  सहभागी झाले. त्यांनी शोक व्यक्त केला. तसेच पदाधिकारी पत्रकार पांडुरंग शिंदे, भाजप कार्यकर्ते रंगनाथ.रेंगे पाटील,  सरपंच आप्पासाहेब खंदारे, शांतारामजी शिंदे ,रामप्रसाद शिंदे, निवृत्ती शिंदे  यांनी शोक व्यक्त केला आहे. 

MB NEWS-सुधीर सांगळे, बीड यांचा लेख>>>>कठीण काळातले सक्षम पालकत्व हा जिल्हा कायम ध्यानात ठेवेल

इमेज
  कठीण काळातले सक्षम पालकत्व हा जिल्हा कायम ध्यानात ठेवेल घरातल्या लहान लेकराला शेजाऱ्याच्या लेकरसोबत खेळायला जायची सुद्धा परवानगी नाही, ना आपण जाऊ देणार, ना समोरचा घरात येऊ देणार...! कोविडच्या अशा निर्दयी संकट काळात एकीकडे घरात बसून करमत नव्हतं, गरिबाला परवडत नव्हतं पण शेवटी जीवपुढं काही मोठंही नव्हतं; म्हणून घरात बसून राहण्याशिवाय पर्यायही नव्हता! अशी विचित्र अवस्था जगात कधी कुणी पाहिली नसावी... ती तुम्ही-आम्ही पाहिली आणि जगली सुद्धा. कोविडची चाहूल लागली आणि भारत देश अचानक लॉक डाऊन करण्यात आला. कोणालाही याचा पूर्वानुभव नव्हता, कसलंही नियोजन माहीत नव्हतं! बस जशी परिस्थिती येईल तसतसा निर्णय घेत जायचं, असंच एकंदरीत शासकीय निर्णयांमध्ये होणारे बदल बघून दिसून येत होतं. महाराष्ट्रात-बीड जिल्ह्यात देखील फार काही वेगळी परिस्थिती नव्हती. वेगळा होता तो इथला पालकमंत्री, अगदी नवखा आणि काहींच्या मते अनुभव नसलेला - धनंजय मुंडे! राज्यात सत्तांतर होऊन अवघे दोनच महिने झाले होते आणि नव्या सरकारने पहिला-वहिला अर्थसंकल्प मांडला होता. राज्याच्या वाढप्याचे जिल्ह्याच्या पालकांशी अत्यंत जवळचे सख्य असल्यान

MB NEWS-*पंकजाताई मुंडेंनी मानले राज्य सरकारचे आभार*

इमेज
 * थेट जनतेतून नगराध्यक्ष, सरपंच निवडीचा निर्णय स्वागतार्ह*  *पंकजाताई मुंडेंनी मानले राज्य सरकारचे आभार* मुंबई ।दिनांक १४। राज्यातील नगरपरिषदांचे नगराध्यक्ष आणि ग्रामपंचायतीचे सरपंच आता थेट जनतेतून निवडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी स्वागत केले आहे. हा निर्णय स्वागतार्ह असल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे.     थेट जनतेतून नगराध्यक्ष व सरपंच निवडीचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने रद्द केला होता. आता नव्याने सत्तारूढ झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने हा निर्णय पुन्हा घेतला आहे. सरकारच्या या जनहिताच्या निर्णयाचे पंकजाताई मुंडे यांनी स्वागत केले आहे. "डायरेक्ट लोकांतून सरपंच व नगराध्यक्षाची निवडणूक होणार.. हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे आणि पूर्वी मी ग्रामविकास मंत्री असताना लोकप्रिय असा हा निर्णय होता" असं ट्विट करत पंकजाताईंनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. ••••

MB NEWS-धनंजय मुंडे हे वाढदिवसानिमित्तपरळीत भेटीसाठी उपलब्ध राहणार

इमेज
  धनंजय मुंडे हे वाढदिवसा निमित्त शुक्रवारी सकाळी 10 ते 1 दरम्यान परळीत भेटीसाठी उपलब्ध राहणार *समर्थक - सहकाऱ्यांनी हार, बुके इत्यादी न आणण्याचे आवाहन* परळी (दि.14) - राज्याचे माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने व वृक्षारोपण व संगोपन करण्याची चळवळ सुरू करून साजरा करण्यात येत असून, धनंजय मुंडे हे त्यांच्या समर्थक-सहकाऱ्यांना भेटून शुभेच्छा स्वीकारण्यासाठी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत परळी शहरातील हालगे गार्डन येथे उपलब्ध राहणार आहेत.  समर्थक-सहकाऱ्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्याचा निर्धार करावा व त्या झाडासोबत एक सेल्फी काढावा, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले होते, त्या आवाहनास सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.  दरम्यान धनंजय मुंडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत असून, सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी धनंजय मुंडे हे सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत हालगे गार्डन, परळी येथे उपलब्ध असणार आहेत, अशी माहिती परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आली आहे.

MB NEWS- वाल्मीक (अण्णा) कराड यांचा लेख:धनंजय मुंडे: माझे दैवत...!

इमेज
  धनंजय मुंडे: माझे दैवत...!                                 - वाल्मीक कराड अत्यंत सामान्य कुटुंबातून, पांगरी सारख्या छोट्याशा गावातून आलेल्या या साध्या वाल्मिकला साहेब तुमच्यामुळे आज खरी ओळख मिळाली. तुमचा एक कार्यकर्ता म्हणून मी सदैव प्रामाणिक, एकनिष्ठ व कोणत्याही परिस्थितीत तुमच्या सोबत आहे, तुम्हीच माझे सर्वस्व आणि तुम्हीच माझे दैवत! एकेकाळी दोन वेळचे पोट भरायची भ्रांत असलेला हा वाल्मिक कराड आज धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वात एकनिष्ठेने साहेबांसाठी लोकसेवेचे काम अविरत करतो आहे. पांगरी सारख्या छोट्याशा गावातून परळीत आलो, तेव्हा स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांनी व स्व. पंडित अण्णा मुंडे यांनी मला आसरा व आधार दिला, मला उभं केलं. पुढच्या पिढीत धनंजय मुंडे साहेबांनी मला त्यांच्या नेतृत्वात परळी करांची सेवा करण्याची संधी दिली. साहेबानी माझ्यावर जो विश्वास दाखवला, तो विश्वास आजही जपण्याचा मी प्रयत्न करतो आहे. लोकसेवेचे व्रत घेतलेले आमचे साहेब परळी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास घेऊन दिवसरात्र काम करतात. त्यांचे काम, त्यांच्या स्वभावातील माणुसकी व लोकांप्रति आपुलकी पाहून माझ्

MB NEWS-पंकजाताई मुंडे यांचं सूचक ट्विट

इमेज
 पंकजाताई मुंडे यांचं सूचक ट्विट ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत ; ओबीसींचे अभिनंदन अन् सरकारचे आभार मुंबई  ।दिनांक १४। नगरपरिषदांच्या निवडणूका स्थगित करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी सूचक ट्विट केलं आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत असं त्यांनी म्हटलं आहे. Click &Read : *न.प.निवडणुक कार्यक्रमाला निवडणूक आयोगाकडून स्थगिती*    राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणुक आयोगाने जाहीर केला होता. या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी भाजपनं लावून धरली होती शिवाय राज्य सरकारनेही तशी भूमिका मांडली होती.    निवडणुक आयोगाने आज एक आदेश काढून या निवडणुका स्थगित केल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयावर पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करत ओबीसींच्या आरक्षणाशिवाय हया निवडणुका होणार नाहीत असं म्हटलं आहे, त्याचबरोबर निवडणुक स्थगित झाल्याबद्दल त्यांनी ओबीसींचे अभिनंदन करत राज्य सरकारचे आभार मानले आहेत. ••••

MB NEWS- बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी लिहलेला अभिष्टचिंतन लेख>>>>> धनंजय मुंडे :परळी शहराचे भाग्यविधाते

इमेज
  धनंजय मुंडे :परळी शहराचे भाग्यविधाते         -  बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी   घराचे व मनाचे दरवाजे सर्वांसाठी सदैव खुले... सबंध परळी शहर म्हणजे माझे कुटुंब... परळी शहराची स्मार्ट सिटी घडवण्याचे ध्येय आणि या ध्येयपूर्ती प्रती कमालीचा उत्साह आणि निर्णयक्षमता.... धनंजयजी मुंडे साहेबांच्या परळीप्रती असलेल्या प्रेमात या बाबी समाविष्ट असल्याने भाग्यविधाता हा शब्दप्रयोग सर्वार्थाने सार्थ ठरतो.  मागील अनेक वर्षांपासून त्यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व सवंगडी काम करतो. अत्यंत कमी वयात व अल्पसंख्याक समाजातील असून सुद्धा साहेबानी मला नगराध्यक्ष होण्याची दिलेली संधी ही त्यांच्या सर्व जाती-धर्मांप्रती असलेल्या आदरभावाचे प्रतीक आहे. सर्वांना समान वागणूक, समान संधी आणि समान प्रेम आजवर साहेब देत आलेत व पुढेही ही सोशल इंजिनिअरिंगची परंपरा ते अबाधित ठेवतील यात तिळमात्र शंका नाही. साहेबांच्या नेतृत्वात मागील 10 वर्ष नगर परिषदेत एकहाती सत्ता आहे, या दहा वर्षांपैकी सुरुवातीला माझ्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात स्व. गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर सारख्या वास्तू परळी शहरात साहेबांच्या दुरदृष्टीतून साकार

MB NEWS-पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी वैद्यनाथ ज्योतीर्लिंगाचा विकास वैद्यनाथधाम प्रमाणे करावा-चेतन सौंदळे

इमेज
  पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी वैद्यनाथ ज्योतीर्लिंगाचा विकास वैद्यनाथधाम प्रमाणे करावा-चेतन सौंदळे परळी वैजनाथ/प्रतिनिधी        पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी 12 जुलै 22 रोजी झारखंड राज्यातील देवघर येथील बाबा वैद्यनाथधाम चे दर्शन घेऊन विधीवत पुजा केली तसेच केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेसह सोळा हजार कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन केले त्याचप्रमाणे द्वादश वैद्यनाथ ज्योतीर्लिंग क्षेत्र परळीसह भारत देशातील सर्व ज्योतीर्लिंगाचा विकास पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी करावा अशी मागणी राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते चेतन सौंदळे यांनी केली आहे.     भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालय अंतर्गत प्रसाद योजनेद्वारे तीर्थयात्रा कायाकल्प आणि अध्यात्मिक संवर्धन अभियानाच्या माध्यमातून तसेच राज्याच्या विकासासोबत राष्ट्राचा विकास साधण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी झारखंड राज्यातील बाबा वैद्यनाथधाम,देवघर येथे नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी अत्याधुनिक एम्स रूग्णालयसह, विमानतळ,चौपदरी राष्ट्रीय महामार्ग, तीर्थक्षेत्र व ईतर ठिकाणी रेल्वेसेवा सुरू करणे

MB NEWS- न.प.निवडणुक कार्यक्रमाला निवडणूक आयोगाकडून स्थगिती

इमेज
 न.प.निवडणुक कार्यक्रमाला निवडणूक आयोगाकडून स्थगिती   ,  मुंबई / एमबी न्युज वृत्तसेवा : नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. परंतु ओबीसी आरक्षणाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याने निवडणूक प्रक्रियेला राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. याशिवाय लागू झालेली आचारसंहिता हटविण्यात आली आहे. Click &Read: नगराध्यक्ष, सरपंचांची निवड थेट जनतेतून होणार; सरकारचे ९ महत्त्वपूर्ण निर्णय      राज्य शासनाने गुरुवारी नगराध्यक्षपदाची निवड थेट जनतेतून होणार असा निर्णय घेतला असतानाच राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. राज्यातील १७ जिल्ह्यातील ९२ नगरपरिषदा व ४ नगरपरिषदांचा निवडणूक कार्यक्रम ८ जुलै रोजी जाहीर करण्यात आला होता. परंतु ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यावर दि. १९ रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे ८ जुलै रोजीचा आदेश रद्द करण्यात आला असल्याचे पत्र राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव संजय सावंत यांनी काढले. Click &watch: अतिपावसाने धानं ओंबाळली;उगवती पीकं हातची जाण्याचा धोका

MB NEWS-अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला ;ओळख पटविण्याबाबत पोलिसांचे आवाहन

इमेज
  अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला ;ओळख पटविण्याबाबत पोलिसांचे आवाहन परळी वैजनाथ, प्रतिनिधी...          परळी शहरातील उड्डाण पुलाच्या बाजूला अभय बेकरी जवळ एका 35 वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला असून या मृतदेहाची ओळख पटविण्याबाबत संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. Click &Read: नगराध्यक्ष, सरपंचांची निवड थेट जनतेतून होणार; सरकारचे ९ महत्त्वपूर्ण निर्णय        याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दिनांक 11 जुलै रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूल परिसरात अभय बेकरी जवळ अंदाजे 35 वर्षिय वयाच्या एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. उंची अंदाजे पाच फूट तीन इंच ,सावळा रंग ,पांढरे केस, चेहऱ्यावर थोडीशी वाढलेली दाढी अशा वर्णनाचा पुरुष मृतदेह आढळून आला आहे. या अनोळखी मयताची ओळख पटविण्यासाठी परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्याची संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

MB NEWS-अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे,जमीनीचे आणि घरांचे तात्काळ पंचनामे करा -राजेश गित्ते

इमेज
  अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे,जमीनीचे आणि घरांचे तात्काळ पंचनामे करा -राजेश गित्ते          परळी........       परळी वैजनाथ तालुक्यात गेल्या चार पाच दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि पुढील काही दिवस आणखीन मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.          मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने शेतकरी यांनी पेरणी केलेली पिके(कापूस, सोयाबीन,बाजरी) बाळ अवस्थेत आहेत आणि मोठ्या पाऊसा मुळे पिके पिवळी पडून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्या मुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नदी -नाल्या लगत च्या जमीनी खरडुन गेल्या आहेत त्याच बरोबर घरांची मोठी पडझड झालेली आहे.तरी प्रशासनाने तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामे करून बाधितांना नुकसान भरपाई मिळवून दयावी असे निवेदन तहसीलदार, परळी वैजनाथ यांना भाजपा नेते राजेश गिते यांनी दिले आहे.                     Click &Read: नगराध्यक्ष, सरपंचांची निवड थेट जनतेतून होणार; सरकारचे ९ महत्त्वपूर्ण निर्णय         या निवेदना वर मिरवट सरपंच धुराजी साबळे,मिरवट उपसरपंच रामेश्वर महाराज इं

MB NEWS-नगराध्यक्ष, सरपंचांची निवड थेट जनतेतून होणार; सरकारचे ९ महत्त्वपूर्ण निर्णय

इमेज
  नगराध्यक्ष, सरपंचांची निवड थेट जनतेतून होणार; सरकारचे ९ महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत पेट्रोल-डिझेलच्या दर कपातीसोबत महाविकास आघाडी सरकारने रद्द केलेला निर्णयही बदलण्यात आला आहे. २०१८ मध्ये राज्यातील नगराध्यक्ष आणि ग्रामपंचायतीतून सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय झाला होता. परंतु राज्यात २०१९ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय बदलला होता. आज पुन्हा शिंदे-भाजपा सरकारनं हा निर्णय पूर्ववत करण्याची घोषणा केली आहे.  मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले निर्णय पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय ( वित्त विभाग)  राज्यात "स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान" राबविण्यात येणार. (नगर विकास विभाग) केंद्र पुरस्कृत अमृत अभियान २.०  राज्यात राबविणार(नगर विकास विभाग) नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेणार(नगर विकास विभाग) राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीम

MB NEWS- मोहन साखरे यांचा लेख>>>> माजी मंत्री आ.धनंजय मुंडे म्हणजे अविरत जनसेवेचा ध्यास-'आपला माणुस' असा सामान्यांना विश्वास!

इमेज
 माजी मंत्री आ.धनंजय मुंडे म्हणजे अविरत जनसेवेचा ध्यास-'आपला माणुस' असा सामान्यांना विश्वास!        महाराष्ट्राच्या विधीमंडळात अग्रभागी नेत्यांमध्ये घेतलं जाणारं नाव म्हणजे परळी मतदारसंघाचे भाग्यविधाते  आमदार राज्याचे  माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे. अविरत कार्य, जनसेवेचा ध्यास घेऊन चोविस तास जनहितार्थ वाहिलेले जीवन आणि  'आपला माणुस' असा सामान्यांना विश्वास असणारे हे खंबीर नेतृत्व आहे.आ.धनंजय मुंडे  यांचा आज वाढदिवस आहे.त्यानिमित्ताने या प्रेरणादायी व आमचे शक्तीपीठ असलेल्या व्यक्तीमत्वाला लक्ष लक्ष शुभेच्छा !!!         महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील संघर्षयात्री म्हणून स्वकर्तृत्वाने नेतृत्व सिद्ध केलेला सर्व सामान्यांशी पक्की नाळ जोडलेला 'जननायक' म्हणजे आ.धनंजय मुंडे हे आहेत. आ.धनंजय मुंडे यांचे जीवन म्हणजे महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेला समर्पित केलेले मुर्तीमंत उदाहरण होय. जिल्हा परिषदेचा सदस्य ते विरोधी पक्षनेता ते राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री हा प्रवास थक्क करणारा आहे. पण या पदांची उंची गाठण्यासाठी चालतांना रस्त्यात अ