पोस्ट्स

मार्च १०, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अध्यक्षपदी मोहन परदेशी यांची सर्वानुमते निवड

इमेज
  अभयकुमार ठक्कर व प्रा.अतुल दुबे यांच्या मार्गर्शनाखाली जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी मोहन परदेशी यांची सर्वानुमते निवड परळी/प्रतिनिधी जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून यात अध्यक्षपदी मोहन परदेशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीचे संस्थापक शिवसेना नेते अभयकुमार उर्फ पप्प्पूअण्णा ठक्कर व प्रमुख मार्गदर्शक युवा नेते प्रा.अतुल दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली आज शनिवार दिनांक 16 मार्च रोजी एक व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तसेच शिवजयंती उत्सव समितीचे कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. पुढील कार्यकारणी :-कार्याध्यक्ष बबन ढेंबरे, उपाध्यक्ष - किशन बुंदेले, अमित कचरे, सचिव - मनीष जोशी, सह सचिव - बजरंग औटी, कोषाध्यक्ष - योगेश घेवारे, सह कोषाध्यक्ष - सचिन लोढा, नवनाथ वरवटकर, संघटक - योगेश जाधव, सह संघटक - लक्ष्मण मुंडे, प्रकाश देवकर, प्रसिद्धी प्रमुख - माऊली मुंडे, सह प्रसिद्धी प्र

बटूच्या नाव नोंदणीसाठी संपर्क साधावा

इमेज
  अ.भा. ब्राह्मण महासंघाच्या वतीने रविवार दि.२८ एप्रिल रोजी पाठक मंगल कार्यालयात भव्यदिव्य सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्याचे आयोजन बटूच्या नाव नोंदणीसाठी संपर्क साधावा बीड दि.१७ (प्रतिनिधी):- प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ जिल्हा शाखा बीडच्या वतीने चैत्र कृ.४ रविवार दि.२८ एप्रिल २०२४ रोजी पाठक मंगल कार्यालय नगर रोड ,बीड येथे सकाळी ठिक ११.३१ वा. या शुभमुहूर्तावर भव्यदिव्य, विधिवत सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्यास संत, महंत, वेदमूर्ती, प्रतिष्ठित मान्यवर, महिला पुरुष समाजबांधवाचे मौज सोहळ्यास आशीर्वाद लाभणार आहेत. या संस्कार सोहळ्यत ज्या पालकांना आपल्या पाल्यांचा उपनयन संस्कार करावयाचा आहे अशा इच्छुक पालकांनी त्वरीत नाव नोंदणी करावी. नाव नोंदणीसाठी संपर्क ॳॅड.रविंद्र सुधाकरराव देशमुख मो.क्र. ९४२२३३२०५३, ॳॅड.समीर चंद्रशेखरराव पाटोदकर मो.क्र. ९८५०५९०६५६, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जोशी मो.क्र.९२२६८७५६७०, बाळासाहेब जोशी (खडकीकर) मो.क्र.९४२१२७७८२४, नितीशकुमार कुलकर्णी मो.क्र.९८६०७७७५७२ या मोबाईल नंबरवर त्वरित संपर्क साधावा असे आवाहन अख

कार्यक्रमांच्या आयोजनांवर राहतील निर्बंध : जिल्हाधिकारी

इमेज
निवडणूक कालावधीमध्ये जात, धर्म आणि भाषावार कार्यक्रमांच्या आयोजनांवर  राहतील निर्बंध : जिल्हाधिकारी बीड, दि. 16 मार्च (जिमाका)  भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कार्यक्रम आज जाहीर  केला आहे. आजपासून आदर्श आचार संहिता लागु झालेली आहे. बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपुर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्ह्यात कसल्याही प्रकारचे जात, भाषा , धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनावर निर्बंध घालण्यात आली असल्याची माहिती पत्रकारद्वारे जिल्हाधिकारी दीपा मुदोळ मुंडे यांनी कळविली आहे.  जिल्हादंडाधिकारी बीड फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये  प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन असे आदेश जारी करण्यात आलेले आहे, जिल्ह्यात कुठेही कसल्याही प्रकारचे जात, भाषा , धार्मिक  आयोजनावर निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत (दिनांक 06.06.2024 पर्यंत) निर्बंध राहतील.   प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी असेही आदेशीत केले असून हे आदेश आज श

कृषिमंत्री धनंजय मुंडेंचा निर्णय

इमेज
  अंबाजोगाई येथील कृषी तंत्र विद्यालयात वसतिगृह बांधकामास 14 कोटी 87 लाख, तर कृषी महाविद्यालयाच्या वसतिगृह दुरुस्तीसाठी 5 कोटी 48 लाख निधी मंजूर कृषिमंत्री धनंजय मुंडेंचा निर्णय मुंबई (दि.16) - राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून आज अंबाजोगाई येथील कृषी तंत्र विद्यालय यांच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणीच्या कामास 14 कोटी 87 लाख रुपये तसेच अंबाजोगाई येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थी वसतीगृहाच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी 5 कोटी 48 लाख रुपये असे एकूण 35 कोटी 22 लाख रुपये निधी मंजूर करून उपलब्ध करून देण्यात आला आहे.  माजी आमदार संजय भाऊ दौंड यांनीही  याबाबत मागणी व पाठपुरावा केला होता.   दोन्ही कामांसाठी एकूण 35 कोटी 22 लाख रुपये इतका निधी मंजूर करून उपलब्ध करून देण्यात आला असून या दोन्ही वसतीगृहांच्या कामांमुळे येथील विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार आहे.  धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर मोठ्या प्रमाणात भर दिला असून, कृषी विभागाच्या माध्यमातून देखील जिल्ह्यासाठी कृषी भवन त्याचबरोबर जिल्ह्यात सो

केंद्र सरकारने ॲड दत्तात्रय आंधळे यांची नोटरी वकील म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार

इमेज
  केंद्र सरकारने ॲड. दत्तात्रय आंधळे यांची नोटरी वकील म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार परळी वैजनाथ (प्रतिनिधी)          येथील न्यायालयात  वकील म्हणून कार्यरत असलेले ॲड दत्तात्रय आंधळे यांची केंद्र सरकारने नोटरी वकील म्हणून नियुक्ती केले बद्दल त्यांचा हृदय सत्कार परळी येथील मोंढा मार्केट मधील आडत व्यापारी श्री नामदेवराव वसंतराव गित्ते यांचे तर्फे करण्यात आला.            यावेळी आडत व्यापारी श्री लक्ष्मण बाबुराव मुंडे सोनहिवरेकर,आडत व्यापारी श्री रामराव अशोक गित्ते,श्री सूर्यकांतराव गुट्टे हाळम, श्री अनिल कदम ,माऊली फड नंदागौळ, हरिभाऊ कराड, सुभाषराव कराड, श्री माऊली गुट्टे, सिध्देश्वर रायभोळे आदींनी ॲड दत्तात्रय आंधळे यांचा सत्कार केला.

शृंगेरीच्या श्री शारदापिठाकडून भगवद्गीता मुखोद्गत स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सौ. अनिता नेरलकर यांचा गौरव

इमेज
  शृंगेरीच्या श्री शारदापिठाकडून भगवद्गीता मुखोद्गत स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सौ. अनिता नेरलकर यांचा गौरव .......... नांदेड दिनांक 15 मार्च प्रतिनिधी शृंगेरीच्या श्री श्री जगद्गुरु शंकराचार्य महास्थान दक्षिणाम्नाय श्री शारदापीठ यांच्याकडून नांदेड येथील सौ. अनिता अनिलराव नेरलकर ( आशा प्रभाकरराव चाटूफळे ) यांना श्रीमदभगवतगीतेतील संपूर्ण 18 अध्याय व 700 श्लोक मुखोद्ग्त करण्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल रोख एकवीस हजार रुपये व प्रशस्तीपत्र देऊन नुकतेच गौरविण्यात आले. श्री श्री विदुशेखर भारती महास्वामी यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. सौ. अनिता नेरलकर यांनी आजपर्यंत पाचशेहून अधिक भाविकांना गीतेची संथा व अर्थासहित पाठांतर करून घेतले आहे. तसेच शंभरहून अधिक भाविकांना विष्णुसहस्त्रनाम अर्थासहित संथा देऊन पाठांतर करून घेतले आहे. पुणे येथील गीता धर्म मंडळाद्वारे पाच वर्षापासून भगवद्गीतेचे पाठांतर व संथा देण्याचे त्या ऑनलाइन द्वारे अध्यापनाचे कार्य करतात. तसेच योग विद्याधाम नाशिकच्या नांदेड शाखेच्या त्या उपाध्यक्षा व प्राध्यपिका असून प्रवेश परिचय, प्रबोध योगनि

ज्ञान, विज्ञान आणि आरोग्य विषयक प्रबोधन

इमेज
◆आध्यात्मिक चळवळीला नवी दिशा देणारा:शेतकरी कीर्तन महोत्सव 21 मार्चला प्रारंभ परळी / प्रतिनिधी कीर्तन परंपरेतून आलेले ज्ञान,  आधुनिक जगातील विज्ञान आणि वैद्यकीय अभ्यासातून घ्यावयाची आरोग्याची काळजी याबाबत प्रबोधन करणारा दुसरा कीर्तन महोत्सव 21 मार्च पासून धारुर तालुक्यातील कान्नापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. याचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत संजय आवटे आणि ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार राजाभाऊ महाराज यांच्या उपस्थितीत होणार असून 21 गावांनी एकत्र येऊन तुकाराम महाराज बीज उत्सवाच्या निमित्ताने या कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे, अशी माहिती या सोहळ्याचे संकल्पक शेतकरी नेते एड. अजय बुरांडे यांनी दिली. शेतकरी वर्गाला केंद्र स्थानी ठेऊन आयोजिलेल्या या कीर्तन महोत्सवात कोणत्याही प्रकारचा झगमगाट न करता प्रबोधनाला प्राधान्य दिले जाते. या वर्षी या कीर्तन महोत्सवात शेतकरी आरोग्याला प्राधान्य दिले असून दर दिवशी एका आजारावर आरोग्य शिबीर आणि मार्गदर्शन केले जाणार आहे. त्या-त्या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर या आरोग्य शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत.  या कीर्तन महोत्सवात नेत्ररोग तज्ञ प

परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी घेतलं वैद्यनाथाचे दर्शन

इमेज
  परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी घेतलं वैद्यनाथाचे दर्शन परळी वैजनाथ, प्रतिनिधी         परभणीचे खासदार तथा शिवसेना (उबाठा ) उपनेते संजय उर्फ बंडू जाधव यांनी पंचम ज्योतिर्लिंग  वैद्यनाथाचे दर्शन घेतले.     देशातील बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या प्रभू  श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे गुरुवारी परभणीचे खासदार संजय जाधव यांनी सपत्निक दर्शन घेतले व श्री प्रभू वैद्यनाथाची पूजा, आरती करून  त्यांनी दर्शन घेतले. वैद्यनाथ मंदिराचे पुरोहित राजाभाऊ दगडगुंडे ,योगेश स्वामी यांनी अभिषेक पूजा केली.यावेळी श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने खासदार संजय जाधव , सौ. क्रांती संजय जाधव यांचे   मंदिर पुजाऱ्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी प्राध्यापक बाबासाहेब देशमुख, इंजिनीयर मुकुंद देशपांडे, लोकमतचे प्रतिनिधी संजय खाकरे ,  शिवसेनेचे कार्यकर्ते रमेश चौंडे ,अतुल दुबे, उपस्थित होते.

सत्ताधारी व्हा ! हा संदेश मान्यवर कांशीरामजी यांनी बहुजन समाजाला दिला- नितीन ढाकणे

इमेज
  सत्ताधारी व्हा ! हा संदेश मान्यवर कांशीरामजी यांनी बहुजन समाजाला दिला- नितीन ढाकणे परळी/ प्रतिनिधी      सत्ताधारी व्हा आणि आपले प्रश्न सोडवा हा मोलाचा संदेश बहुजन समाज पार्टीचे संस्थापक  बहुजन नायक काशीराम यांनी बहुजन समाजाला दिला असे प्रतिपादन अतुल्य महाराष्ट्राचे संपादक नितीन ढाकणे यांनी केले .ते कांशीराम यांच्या 90 व्या जयंतीच्या निमित्ताने पत्रकार भवन येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.     लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे आज दिनांक 15 मार्च रोजी कांशीराम यांची जयंती साजरी करण्यात आली .या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी युवा संपादक नितीन ढाकणे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बसपाचे ज्येष्ठ नेते एडवोकेट डी एल उजगरे होते . पुढे बोलताना नितीन ढाकणे म्हणाले की काशीराम यांनी पंधरा विरुद्ध  पंचाऐशी हा सिद्धांत मांडला. व बहुजन समाज सत्ताधारी होऊ शकतो हे दाखवून दिले. यावेळी बाबासाहेबांचे जाती व्यवस्थेचे निर्मूलन पुस्तक कांशीराम यांच्यासाठी मार्गदर्शक ठरल्याचे सांगितले.यावेळी डी.एल. उजगरे बोलताना यांच्या विषयी अनेक आठवणींना उजाळा दिला तसेच औरंगाबाद येथील जाहीर सभेत कांशीराम यांनी जवळ घेऊन

लोकसभेत पंकजाताईंचा सर्वाधिक मतांनी विजय हेच माझं टार्गेट- खा. डाॅ. प्रितमताई मुंडे

इमेज
  राष्ट्रीय पक्षाची उमेदवारी मिळणं माझ्यासाठी सन्मानजनक ; नवीन जबाबदारी हुरहूर वाढवणारी पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या भावना लोकसभेत पंकजाताईंचा सर्वाधिक मतांनी विजय हेच माझं टार्गेट- खा. डाॅ. प्रितमताई मुंडे मुंबई ।दिनांक १४। खासदार प्रीतम मुंडें यांच्याऐवजी मला पक्षाने खासदारकीचे तिकीट दिल्याने मनामध्ये थोडीशी संमिश्र भावना आहे. पण प्रीतम यांना मी विस्थापित करणार नाही. त्यांना फार काळ काही वाट पाहण्याची गरज पडणार नाही, अशी ग्वाही भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी दिली. खासदारकीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज  पत्रकारांशी संवाद साधतांना त्या बोलत होत्या. खा. डाॅ. प्रितमताई मुंडे हया देखील यावेळी उपस्थित होत्या. कोणताही धक्का बसलेला नाही ------ पंकजाताई मुंडे पुढे म्हणाल्या,माझ्या पक्षाने माझी उमेदवारी जाहीर केली ही गोष्ट माझ्यासाठी सन्मानजनक आहे. पण थोडीशी मनामध्ये संमिश्र भावना आहे. कारण गेल्या दहा वर्षांपासून प्रीतम मुंडे या ठिकाणी चांगले काम करत आल्या आहेत. पण आमच्या दोघींपैकी कोणाला तरी तिकीट मिळेल अशी अपेक्षा मात्र नक्की होती. त्यात माझे नाव जाहीर झाल्याने कोणताह

नांदेड-पनवेल गाडीच्या बोगींची संख्या वाढवून परळी मार्गे ईतर ठिकाणी रेल्वे सुरू करण्याची महाव्यवस्थापकाकडे मागणी-जी.एस.सौंदळे

इमेज
  नांदेड-पनवेल गाडीच्या बोगींची संख्या वाढवून परळी मार्गे ईतर ठिकाणी रेल्वे सुरू करण्याची महा व्यवस्थापकाकडे मागणी-जी.एस.सौंदळे परळी वैजनाथ।दिनांक१4।   द्वादश पंचम ज्योतीर्लिंग क्षेत्र परळी मार्गे पुणे- पनवेल जाणा-या नांदेड एक्सप्रेस रेल्वे गाडीच्या प्रवाशी व स्लीपर तसेच ए.सी.बोगींची संख्या तात्काळ वाढवून या रेल्वेने दाटीवाटीने प्रवास करणा-या प्रवाशांची गैरसोय तात्काळ दुर करून परळी मार्गे पुणे,मुंबई,नागपुर,तिरूपती,अयोध्या,वाराणसी,गोवा व ईतर ठिकाणी रेल्वे सुरू करण्याची मागणी दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे महाव्यवस्थापक श्री.अरूणकुमार जैन  परळी रेल्वे स्थानक येथे तपासणीनिमित्त गुरूवार दि.14 मार्च रोजी आले असताना रेल्वे प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष जी.एस.सौंदळे यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व प्रवाशांच्यावतीने करण्यात आली.    नांदेड-पनवेल रेल्वेगाडी च्या बोगी वाढवण्याच्या मागणीसह प्रवासी जनतेच्या व्यापक हिताच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण मागण्या निवेदनात करण्यात आल्या यामध्ये 1)मछलीपट्टणम -बीदर, सिकंद्राबाद-बीदर इंटरसिटी,यशवंतपुर-बीदर एक्सप्रेस,पाटणा-पूर्णा,रायचूर-परभणी रेल्वे परळ

महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारणाचा उत्तम आदर्श म्हणजे यशवंतराव चव्हाण होय-प्रा. डॉ. विनोद जगतकर

इमेज
महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारणाचा उत्तम आदर्श म्हणजे यशवंतराव चव्हाण होय-प्रा. डॉ. विनोद जगतकर मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संलग्नित यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आंबेजोगाई येथे याच वर्षापासून यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफत असताना  प्रमूख व्याख्याते म्हणून डॉ. जगतकर यांनी वरील विचार मांडले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाट , उपप्राचार्य शिंदे, उपप्राचार्य जाधव, व्याख्यानमालेचे संयोजक प्रा.घोडके, डॉ. मुकुंद राजपंखे इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कारकिर्दीचा आढावा घेत असताना डॉ जगतकर म्हणाले, *यशवंतराव चव्हाण यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीत त्यांचे योगदान अत्यंत अमूल्य असून त्यांनीच या राज्याच्या विकासाचा सर्वांगीण पाया रचलेला आहे. शेतीचे औद्योगीकरण, जलसिंचन, नवीन उद्योगांच

बीड लोकसभा मतदारसंघासाठी पंकजाताई मुंडे

इमेज
  बीड लोकसभा मतदारसंघासाठी पंकजाताई मुंडे परळी प्रतिनिधी......     आगामी लोकसभा निवडणूक 2024 साठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजाताई मुंडे यांच्या ना वाचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी जारी केली आहे. दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील मोठ्या नावांचा समावेश आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे, नंदुरबारमधून हिना गावित, धुळे सुभाष भामरे, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांची नावं आहेत.   आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या यादीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आजच्या  यादीमध्ये महाराष्ट्रातील एकूण 20 उमेदवारांचा समावेश आहे.  नितीन गडकरी यांना नागपूर, नगरमधून सुजय-विखे पाटील, माढामधून रणजीत निंबाळकर, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

महिला महाविद्यालयात कायदेविषयक जागृती सत्र संपन्न

इमेज
  महिला महाविद्यालयात  कायदेविषयक जागृती सत्र संपन्न  परळी वैजनाथ दि.१३ (प्रतिनिधी)   येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयातील  विशाखा कमिटीच्या वतीने एकदिवशीय कायदेविषयक जागृती सत्र संपन्न झाले .       या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून डॉक्टर पल्लवी पिंपळे या उपस्थित होत्या तर याप्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून ॲड . प्राजक्ता दंडे मॅडम लाभल्या . , संस्थेच्या संचालिका मा . सौ छायाताई देशमुख तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ . विद्या देशपांडे यांची उपस्थिती लाभली .      विद्येची देवता सरस्वती देवीच्या प्रतिमापूजनाने व दीप प्रज्वलनाने या  कार्यक्रमाचा प्रारंभ झाला . प्रमुख वक्त्या ॲड प्राजक्ता दंडे यांनी आपल्या भाषणात स्त्रियांच्या सुरक्षेविषयीच्या विविध कायद्यांची माहिती उपस्थितांना  करून दिली .तसेच पितृधनात मुलींच्या वारसा हक्कालाही कसा कायदा संरक्षित करतो याचेही ज्ञान करून दिले . आणि त्यासोबतच अन्य धर्मातील मुलींनाही पित्याच्या संपत्तीत वारसा मिळावा यासाठी होत असलेल्या समान नागरी कायद्याबद्दलही थोडे विवेचन केले . तसेच कुटुंबात होणाऱ्या

सहाय्यक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पदी अँड.संतोष केंद्रे यांची नियुक्ती

इमेज
  सहाय्यक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पदी अँड.संतोष केंद्रे यांची नियुक्ती परळी (प्रतिनिधी)         मूळचे परळीचे असलेले व  सध्या छञपती संभाजी नगर येथे असलेले प्रसिद्ध वकील ॲड.संतोष केंद्रे यांची राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालयाचे खंडपीठ असलेल्या छ्त्रपती संभाजी नगर येथे सहाय्यक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पदी नियुक्ती करण्यात आली आहे.         अँड संतोष नागनाथराव केंद्रे  हे मूळचे परळीचे असून मागील तेवीस वर्षांपासून ते छत्रपती संभाजी नगर येथे उच्य न्यायालयाच्या खंडपीठात वकील म्हणून कार्यरत आहेत. अनेक खाजगी व शासकीय संस्थेवर ते विधी सल्लागार म्हणून काम पाहतात. उच्च न्यायालयातील उत्कृष्ट कार्याची दखल घेवून राज्य शासनाने त्यांची सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता या पदावर नियुक्ती केली आहे.           सन २००९ या वर्षीही शासनाने त्यांची याच पदावर नियुक्ती केली होती.त्यांच्या या नियुक्ती बद्दल मित्र परिवार तसेच वकील मंडळी, नातेवाईक,स्नेही आदींच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

हजारोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहणार

इमेज
  20 मार्च रोजी मनोज जरांगे पाटील परळीत! भव्य महासंवाद बैठकीचे आयोजन परळी (प्रतिनिधी) मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील येत्या 20 मार्च रोजी परळीत येत असून, ते सकल मराठा समाजाची महा संवाद बैठक घेणार आहेत. या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात येत असून यासंदर्भातील सकल मराठा समाजाची नियोजन बैठक मंगळवारी परळीत संपन्न झाली. मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे सध्या राज्यभर मराठा समाजाच्या संवाद बैठका घेत आहेत. आरक्षणाबाबत दशा आणि दिशा याबद्दल ते महाराष्ट्रातील मराठा बांधवांना मार्गदर्शन करत आहेत. मराठा आरक्षणाची क्रांती भूमी असणाऱ्या परळी वैजनाथ शहरात मनोज जरांगे पाटील हे येत्या 20 मार्च रोजी येत असून, यानिमित्ताने भव्य महा संवाद बैठक संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन करण्यासाठी मंगळवारी सकल मराठा समाजाची बैठक घेण्यात आली. सोज्वल मंगल कार्यालय येथे झालेल्या बैठकीस परळी तालुक्यातील सकल मराठा समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिनांक 20 मार्च रोजी परळी वैजनाथ येथे होत असलेल्या कार्यक्रमास बीड, परभणी आणि लातूर जिल्ह्यातील मराठा बांधव हजारोंच

रमजान महिण्यानिमित्त विद्युत पुरवठा खंडीत होऊ नये :- अनिल बोर्डे

इमेज
  रमजान महिण्यानिमित्त विद्युत पुरवठा खंडीत होऊ नये :- अनिल बोर्डे                   गेवराई :- रमजान सणानिमित्त विद्युत पुरवठा खंडित होऊ नये अशी मागणी बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र उपाध्यक्ष व गेवराई ग्राहक पंचायत मार्गदर्शन केंद्र प्रमुख अनिल बोर्डे सोमकुवर सहाय्यक अभियंता महावितरण यांना निवेदन दिले आहे.            सध्या पवित्र रमजान सणाचा महिना सुरू झालेला आहे या रमजान महिन्याच्या कालावधीत विजेची अत्यंत आवश्यकता असते रमजान कालावधीमध्ये विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याबाबत दक्षता व नियोजन करावे.                                      सद्यस्थितीत गेवराई तालुक्यातील व गेवराई शहरातील उन्हाळ्याचे दिवस असताना वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. पवित्र रमजान महिन्यांमध्ये वीज पुरवठा खंडित होणार नाही याबाबत योग्य ती कारवाई करून सहकार्य करावे अशी मागणी बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल बोर्डे राजेंद्र सुतार मन्मथ वाडकर जगन्नाथ वैराळ वाणी मिलिंद हिटनाळीकर समीर सिद्दिकी आणेराव कोंढे साहेब इत्यादी हजर होते.

शेतक-यांनी आधार लिंक करावे

इमेज
  प्रधानमंत्री पीक विमा योजना सोयाबीन पीक विमा अग्रिमसाठी  शेतक-यांनी आधार लिंक करावे      बीड, दि. 12 (जि. मा. का.)   प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023 अंतर्गत जिल्हयातील एकूण 86 महसूल मंडळात सोयाबीन पिकासाठी अग्रिम मंजूर करन्यात आला आहे. त्यापैकी पहिल्या टप्यातील 241 कोटी पैकी 237 कोटी रुपयांचे वाटप लाभार्थीच्या खात्यात करण्यात आले आहे.      यातील जवळपास सोडेतीन हजार लाभार्थीचे बँक खाते आधार लिंक नसल्यामुळे 2.72 कोटी रुपये लाभार्थीच्या खात्यात वर्ग होऊ शकले नाहीत. अशा सर्व लाभार्थीच्या याद्या गाव व तालुका पातळीवर देण्यात आला आहेत. ज्या शेतक-यांचा सोयाबीन विमा अग्रिम मिळाला नसेल त्यांनी आपल्या गावच्या कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा व आपले आधार बँक खात्याशी सलग्न करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी केले आहे.        दुस-या टप्प्यातील 1 लाख 5 हजार शेतक-यांचे एकूण 72.14 कोटी रुपयाच विमा हप्ता गुरुवार पर्यंत जमा होतील असे दि. 10 मार्च 2024 रोजी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्या अध्

उष्मघातापासून बचाव, लक्षणे व उपाययोजना

इमेज
  उष्मघातापासून बचाव, लक्षणे व उपाययोजना               बीड, दि. 12 (जि. मा. का.)   सध्या वातावरणात होणारा बदल म्हणजे वाढते तापमान हे होय. वाढत्या ताममानामुळे उष्मघाताची बाधा होण्याची दाट शक्यता असते. परिणामी उष्मघातामुळे मृत्यू देखील होऊ शकतात. त्यामुळे हे टाळण्यासाठी नागरिकांनी काय काळजी घ्यावी याबाबत जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे यांनी पुढीलप्रमाणे नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.                                उष्मघात टाळण्यासाठी जनतेने घ्यावयाची काळजी         उन्हाळयामध्ये पांढ-या रंगाचे किंवा फिकट रंगाचे सैलसर कपडे घालावेत. बाहेर फिरतांना डोक्याला रुमाल बांधावा व डोळयावर गॉगल घालावा जेणे करुन डोके व डोळयाची काळजी घेता येईल. बाहेर जाताना पिण्याचे पाणी बॉटल सोबत ठेवावी व नियमित पाणी पित रहावे. उन्हाळयामध्ये दुपारनंतर बाहेर फिरणे टाळावे. बाहेर उन्हात काम करणारे शेतकरी, मजूर वर्ग यांनी आपली कामे सकाळी व संध्याकाळी करावीत. दुपारी काम करणे टाळावे. उन्हाळयामध्ये दिवसभर सतत पाणी पिणे,अथवा द्रव पदार्थाचे नियमित सेवन करावे. तीव्र स्वरुपाचा ताप येणे, थकवा येणे, डोके दुखणे, नाडीच

रखरखत्या उन्हात शेख हुरैन वसीमचा पहिला रोजा

इमेज
  रखरखत्या उन्हात शेख हुरैन वसीमचा पहिला रोजा    परळी :- इस्लाम धर्मात पवित्र रमजान महिण्याला अनन्य महत्व प्राप्त आहे. या महिन्यात सर्वच मुस्लिम बाधंवाना रोजा फर्ज सक्तिचे असतात, लहानपासून मोठ्यांपर्यंत या महिन्यात रोजा धरत आहे. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालस निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले,चिमुकली हि मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा धरतात. असाच प्रकारे परळी शहरातील मलिकपुरा येथे शेख हुरैन वसीम या चिमुकलीने वयाच्या ७ वा वर्षी आपलं पहिला रोजा पुर्ण केलं आहे पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून (दि.१२) मार्च मंगळवारी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा रखरखत्या उन्हातही दिवसभर अन्नाचा कण व पाण्याचा एक थेंब न घेता काटेकोरपणे यशस्वी पूर्ण केल्याबद्दल नातेवाईक व ईतरानी ही त्याचे कौतुक व अभिनंदन करत आहे.

ऋषी बोधोत्सवात हुलगुंडे यांचे विचार

इमेज
महर्षी दयानंदांमुळे शिवरात्र "बोधरात्र" ठरली ! ऋषी बोधोत्सवात लक्ष्मणराव हुलगुंडे यांचे विचार               परळी वैजनाथ, दि.१२-                                प्रखर आध्यात्मिक जिज्ञासा व सत्यज्ञानाच्या बळावर थोर समाजसुधारक महर्षी दयानंद सरस्वती यांनी परंपरागत शिवरात्रीला बोधरात्रीत रूपांतरित केले व समग्र विश्वाला निराकार व सर्वव्यापी अशा सत्य शिवाचे दर्शन घडविले. म्हणूनच त्यांच्यामुळे  महाशिवरात्र ही ऐतिहासिक "बोधरात्र" ठरली, असे विचार वैदिक शास्त्रांचे अभ्यासक श्री लक्ष्मणराव हुलगुंडे (आर्य) गुरुजी यांनी व्यक्त केले.                येथील आर्य समाज मंदिरात नुकताच ऋषी बोधोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून श्री हुलगुंडे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. मधुसूदन काळे हे होते.  यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री जुगलकिशोर लोहिया, कोषाध्यक्ष देविदासराव कावरे व्यासपीठावर उपस्थित होते.            आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात श्री हुलगुंडे आर्य यांनी महर्षी दयानंदांच्या वयाच्या चौदाव्या वर्षी महाशिवरात्री दिनी शिवमंदिरात घडलेला प्रसंग कथन केला

महाजनको आयोजित खुल्या चित्रकला स्पर्धेत भेल संस्कार केंद्रातील मुलांचे घवघवीत यश

इमेज
  महाजनको आयोजित खुल्या चित्रकला स्पर्धेत भेल संस्कार केंद्रातील मुलांचे घवघवीत यश प्रतिनिधी (परळी वैजनाथ ) :                येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचालित भेल संस्कार केंद्र एक अग्रक्रमाचे शिक्षण देणारी आणि एक जबाबदार नागरिक बनवणारी संस्था आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांना प्रतिभावान बनविण्यास नेहमीच भर देत असते. संस्थेच्या ब्रीद वाक्याप्रमाणे *"केल्याने होत आहे रे आधि केलेची पाहिजे"* या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये या गुणांची रुजवणूक करून त्यांना भारतीयत्वाचे शिक्षण देणारी परळी शहरातील नावलौकिक प्राप्त केंद्र बनली आहे.    दि. ४ मार्च २०२४ पासून सुरु झालेल्या *"राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह"* अभियाना तर्फे महाजनको आयोजित घेण्यात आलेल्या *भव्य खुल्या चित्रकला स्पर्धेमध्ये* भेल संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. नुकतेच अभियानाचा शेवट म्हणजे विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात भेल संस्कार केंद्रातील खालील विद्यार्थ्यांना आपापले कलाविष्कार सादर केल्यामुळे त्यांना गौरविण्यात

वैद्यनाथ कॉलेज कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. पी एल कराड यांची बिनविरोध निवड

इमेज
  वैद्यनाथ कॉलेज कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डॉ.पी. एल. कराड यांची बिनविरोध निवड  परळी प्रतिनिधी---जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेज कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डॉ.पी एल कराड यांची मा. नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व मा.वाल्मीक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली  बिनविरोध निवड प्रक्रिया करण्यात आली.यासाठी आज दि.12/03/2024 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी श्री एन एन पंडित सहकार अधिकारी ,सहाय्यक निबंधक ,सहकारी संस्था यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यनाथ कॉलेज कर्मचारी पतसंस्थेच्या कार्यालयात निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी प्रा डॉ. पी एल कराड यांची संचालकांच्या माध्यमातून सर्वानुमते अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष  श्रीराम मुंडे, सचिव उमेश वाघुळकर, संचालक प्रा.उत्तम कांदे,डॉ व्हीं बी गायकवाड, प्रा. गणेश चव्हाण, श्रीमती सुनिता धर्माधिकारी, रमेश जाधव, नरेश साखरे, कर्मचारी श्री सूर्यकांत कदम यांची उपस्थिती होती.या निवडीबद्दल जवहार एज्युकेशन सोसायटीच्या सर्व पदाधिकारी व संचालक मंडळांनी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. आर डी राठोड या

महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावीत- कृषि मंत्री धनंजय मुंडे

इमेज
  महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावीत- कृषि मंत्री धनंजय मुंडे मुंबई दि 11 मार्च 2024- कृषी विद्यापीठांनी शिक्षण आणि संशोधनात भरीव कामगिरी करावी. यासाठी आवश्यक निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येईल. सर्व विद्यापीठे आंतरराष्ट्रीय दर्जाची होण्यासाठी विद्यापीठांच्या कुलगुरूंनी प्रयत्न करावेत, असे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.  महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची 114 वी बैठक आज कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणाली द्वारे पार पडली. त्यावेळी ते  बोलत होते. परदेशातील विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी सर्व महाविद्यालयातील इमारती, वसतिगृह आणि प्रयोगशाळा समवेत इतर पायाभूत सोयी सुविधा देखील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असाव्यात अशीही सूचना यावेळी कृषिमंत्री मुंडे यांनी केली. या बैठकीमध्ये राज्यपाल नियुक्त सदस्य डॉ. विवेक दामले तसेच कृषिमंत्री नियुक्त विनायक काशीद व दत्तात्रय उगले , अशासकीय सदस्य,  चारही कृषी विद्यापीठांचे कुलगुरू डॉ. प्रशांत कुमार पाटील, डॉ. इंद्र मनी , डॉ. शरद गडाख आणि डॉ.संजय भावे यांच्या समवेत कृषी परिषदेतील संचा