पोस्ट्स

ऑगस्ट ६, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ज्युनियर आय.ए.एस. कॉम्पिटीशन

इमेज
  शेख सालिक रिजवान हुसेन बनला ज्युनियर आय.ए.एस. अंबाजोगाई, योगेश्वरी नूतन विद्यालय,मधील विद्यार्थी शेख सालिक रिजवान हुसेन हा इयत्ता दुसरी मध्ये ज्युनियर आय.ए.एस. बनला.        राज्यस्तरावर आयोजित केलेल्या ज्युनियर आय.ए.एस. स्पर्धेत गुणवत्ता यादीत आल्याबद्दल त्याचा सत्कार आज योगेश्वरी शिक्षण संस्थेमार्फत, योगेश्वरी नूतन विद्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्यात सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. गुणवत्ता यादीत आल्यामुळे योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एस.टी. खुरसाळे साहेबांच्या हस्ते सालिक ला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.दिलदार फाऊंडेशन बीड चे संस्थापक अध्यक्ष शेख दिलदार शेख इस्माईल यांचा नातू असलेला शेख सालिक रिजवान हुसेन याने इयत्ता पहिली मध्येही एम.टी.एस. परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक मिळवुन सुवर्ण पदक पटकावले होते.      या गुणगौरव सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एस. टी.खुरसाळे , सचिव जी.बी.व्यास , सहसचिव गोस्वामी मॅडम, योगेश्वरी नूतन शाळा प्रशांत नगर चे मुख्याध्यापक के.बी.नांदगावकर सर, मेडिकल शाखेचे विभ

शोध घेण्यास स्थानिक भोई बांधवांच्या टिमला यश

इमेज
36 तासानंतर पाण्यात बुडालेल्या 'त्या' भाविकाचा मृतदेह सापडला शोध घेण्यास स्थानिक भोई बांधवांच्या टिमला यश माजलगाव - तालुक्यातील पुरुषोत्तम पुरी येथे शुक्रवार रोजी सकाळी ९ च्या दरम्यान एका भाविकाचा गोदावरी नदीच्या पाण्यात अंघोळ करण्यासाठी गेला होता यात तो बुडाला असल्याची माहिती त्याच्यासोबत असलेल्या नातेवाईकांनी दिली होती. या भाविकाचा स्थानिक भोई व बीड, माजलगाव , जालना एनडईआरएफ ची टीम शोध घेत होती. त्या भाविकाचा शोध शनिवार रोजी स्थानिक भोई लोंकाच्या  टिमला सायंकाळी ८ च्या दरम्यान शोध लागला.  तालुक्यातील पुरुषोत्तम पुरी येथे अधिक मास असल्याने या ठिकाणी जत्रेचे स्वरूप आले होते. या ठिकाणी भारतभरातून भाविक दररोज लाखाच्यावर येत होते यात शुक्रवार रोजी मारोती खवल वय ४५ वर्षे रा.पाटोदा या.परतुर जिल्हा जालणा येथील  भाविक पुरुषोत्तम पुरी येथे दर्शनासाठी आले होते ते दर्शनापूर्वी गोदावरी नदीत अंघोळ करण्यासाठी गेले असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले होते त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक भोई व बीड,माजलगाव ,जालना येथील एनडईआरएफ टीमल शोध घेत होती त्या भाविकाचा ३६ तासानंतर शनि

मेरी मिट्टी -मेरा देश अभियान.....

इमेज
  वैद्यनाथ कॉलेज येथे एनएसएस वतीने माझी माती, माझा देश -पंचप्रण प्रतिज्ञा  परळी - वै: दिनांक १२   येथील वैद्यनाथ कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत पंचप्रण प्रतिज्ञा आयोजित करण्यात आली होती मेरी माझी माती माझा देश या उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ . रमेश राठोड होतो . पंचप्रण शपथ देते वेळी प्राचार्य डॉ . राठोड म्हणाले पंचप्रण  हे सर्वांसाठी  असून विकसित भारत, गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करण्यासाठी भारताची एकात्मता व परकीय शक्ती  व भेद- विषमता निर्माण शक्ती  पासून संरक्षण करण्याची शपथ सर्वांनी घेऊन त्याचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. आपल्या राष्ट्राचा विकासाचा ध्यास असणे हे प्रत्येक भारतीय विदर्थ्याचे व नागरिकांचे काम आहे.   प्रसंगी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनचे प्रा . माधव रोडे, क्रिडा विभागाचे प्रा . डॉ . पी . एल . कराड , प्रा . डॉ . भिमानंद गजभारे, प्रा . डी . के . आंधळे, प्रा .डॉ . बी.व्ही. केंद्रे, प्रा . उत्तम कांदे, प्रा . गणेश चव्हाण,  प्रा . हरिश मुंडे , प्रा . सोमनाथ किरवले, प्रा . प्रमोद गी

आदर्शवत कार्य:अनुकरणीय उपक्रम

इमेज
  शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरी केली पुण्यतिथी कै एकनाथ हरिभाऊ कुरवाडे गुरुजींनी आपल्या हयातीत आदर्शवत कार्य केले आणि मृत्यूनंतरही त्यांच्या इच्छेनुसार शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले, हा कुरवाडे परिवाराचा स्तुत्य उपक्रम असल्याचे सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी श्री राजगुरू यांनी सांगितले. *कै एकनाथ हरिभाऊ कुरवाडे गुरुजी यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंगळी, जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा पिंगळी, जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा पिंगळी आणि जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पिंगळी या ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.*   या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंगळी गावचे सरपंच श्री अंगदराव अंबादास गरुड, प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी राजगुरू, केंद्रप्रमुख जल्हारे सर, केंद्रीय कन्या शाळा पिंगळी चे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री सुभाष शिंदे सर ,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजाननराव गरुड आणि सौ मुक्ताताई गरुड, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत धबाले, शिक्षण प्रेमी नागरिक श्री रामजी गरु

शरद पवार विचार मंचाची मागणी

इमेज
  त्र्यंबकेश्वर प्रमाणे परळी वैजनाथ येथेही व्हीआयपी दर्शन बंद करा : श्रीनिवास देशमुख परळी वैजनाथ (प्रतिनिधी) त्र्यंबकेश्वर प्रमाणे परळी वैजनाथ येथेही व्हीआयपीमुळे दुरून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून व्हीआयपी दर्शन बंद वैद्यनाथ देवल कमिटीने बंद करावे अशी मागणी शरद पवार विचार मंचाचे अध्यक्ष श्रीनिवास देशमुख यांनी केली आहे. शासकीय सुट्या आणि त्यानंतर श्रावण पर्वकाळासाठी होणारी गर्दी पाहता दि. १२ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे. मात्र, केंद्रीय आणि राज्यस्तरावरील राजशिष्टाचार म्हणून येणाऱ्या व्हीआयपींना दर्शन दिले जाणार आहे. सर्वसामान्य भाविक हजारो रुपये खर्च करून, वेळ देऊन येथे येतो, चार ते पाच तास रांगेत उभा राहतो. मात्र, पाच सेंकदात गर्भगृहाच्या समोरून बाजूला केला जातो. त्यात २०० रुपये देऊन दोन तास रांगेत उभे राहणारेही असतात. त्र्यंबकेश्वर येथे दररोज १५ हजार भाविकांचे दर्शन होत असते. अवघे चार सेकंद एका भाविकाला मिळतात. त्यात व्हीआयपी आल्यास आणखी पंचाईत होते यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टने व्हीआयपी दर्शन बंद केले आहे. त्य

परळीत येत परभणी पोलिसांनी धडक कारवाई

इमेज
परभणी जिल्ह्यात गुटखा पुरवठा करणाऱ्या परळीतील गुटखा व्यापाऱ्यावर सोनपेठ पोलिसांची कारवाई परळी वैजनाथ, प्रतिनिधी...           परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा पुरवठा करणारा परळीतील व्यापारी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सोनपेठ पोलिसांनी परळीत येऊन परळीच्या या गुटखा माफियावर कारवाई केली आहे. गुटख्याच्या अवैध धंद्याचे मोठे केंद्र परळीतून सुरू असल्याचे या माध्यमातून पुढे आले आहे.       याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार दि.१०|८|२०२३रोजी सायं. ६.४९ वा. सोनपेठ पोलिसांनी नैकोटा येथील एका किराणा दुकानावर कारवाई करत या ठिकाणाहून आरोपीसह अवैधरित्या विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या गुटखा पकडला याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून माहिती घेतली असता या गुटख्याचा पुरवठादार परळी येथील लाहोटी नावाचा व्यापारी असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सोनपेठ पोलिसांनी परळी येथे येत या व्यापाऱ्यावर कारवाई केली आहे.या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्याचे  एएसआय विनोद किशनराव कुलकर्णी यांनी फिर्याद दाखल केली असुन दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नैकोटा येथील किराणा  दुकानात महाराष्ट्र शा

हर घर तिरंगा अभियान..........!

इमेज
  हर घर तिरंगा : काय करावे? काय करु नये....अशी घ्या काळजी ⭕घरी फडकावलेला ध्वज सायंकाळी उतरवू नका; ⭕ राष्ट्रध्वज फडकवण्यापूर्वी 'हे' नियम माहिती करुन घ्या..... भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात गेल्या वर्षीप्रमाणेच येणारा १५ ऑगस्ट हा 'स्वातंत्र्य दिन' आपण सर्वांनी राष्ट्रीय सण म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करावा, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशात हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात येणार आहे. प्रत्येक घरावर तिरंगा लावण्यात येणार असला तरी ध्वजसंहितेचे पालन होणेही आवश्यक आहे. जिल्ह्यात 'घरोघरी तिरंगा' लावताना काय काळजी घ्यावी , तिरंग्याचा मान राखला जावा, यासाठी काय करावे याबाबत नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. त्याची उत्तर देण्याचा हा प्रयत्न. ⭕ १३ते १५ ऑगस्ट या काळात  नागरिकांनी आपल्या घरावर झेंडा लावावा. ⭕ ध्वज लावताना केशरी रंगाची बाजू काठीच्या वरच्या टोकाकडे असावी. ⭕ ध्वज उलटा फडकवला जाणार नाही याची काळजी घ्यावी. ⭕तिरंगी ध्वजाचा आकार आयताकार असावा. ⭕झेंड्याची लांबी - रुंदीचे प्रमाण ३ X २ असावे. ⭕ कातलेल्या, विणलेल्या, मशिनद्वारे तयार केलेल्या

नमामी वैद्यनाथम........!

इमेज
  श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे मुख्य आमंत्रित ट्रस्टी  दिनेश चंद्रजी यांनी घेतलं प्रभु वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, प्रतिनिधी....               राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक व विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय संरक्षक व मार्गदर्शक तथा श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे मुख्य आमंत्रित ट्रस्टी  श्री दिनेश चंद्रजी यांनी आज ( दि. ११ ऑगस्ट २०२३)    परळी वैद्यनाथ येथे प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेतले.          श्री दिनेश चंद्रजी यांनी प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेऊन सकल हिंदू समाजाच्या उन्नतीसाठी व ज्वलंत हिंदुत्वाच्या संरक्षणासाठी मनोभावे प्रार्थना केली. श्री दिनेश चंद्रजी यांचा प्रभु वैद्यनाथाची प्रतिमा देऊन यथोचित स्वागत व सत्कार श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट च्या वतीने  राजेश देशमुख यांनी केला.श्री दिनेश चंद्रजी यांच्या समवेत श्री हरी मोहनजी (सहाय्यक),  श्री. किशोर कुलकर्णी (लातूर विभाग संघटन मंत्री),  श्री. नागनाथ बोंगरगे (पूर्ण वेळ प्रचारक, पुणे विभाग),  शैलेश पांडे (जिल्हा सहमंत्री) तसेच परळी वैद्यनाथ प्रखंडातील पदाधिकारी वर्ग व परिसरातील प्रतिष्ठीत नागरिक मो

निवड : शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

इमेज
  राष्ट्रवादी काँग्रेसच्या परळी शहराध्यक्षपदी ॲड. जीवनराव देशमुख परळी वैजनाथ, प्रतिनिधी..        खा. शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परळी शहराध्यक्षपदी ॲड. जीवनराव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या नियोजन बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये परळी शहराध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध विधीज्ञ ॲड.  जीवनराव  देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. दिनांक 17 ऑगस्ट रोजी बीड येथे शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या तयारीसाठी परळी येथे नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस युवा प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हा अध्यक्ष आ. संदीप क्षीरसागर, ज्येष्ठ नेते सुदामतीताई  गुट्टे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.      दरम्यान, खा. शरदचंद्र पवार यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा आणि पक्षाला बळकटी देण्याचा येणाऱ्या काळात आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल

रक्तदान शिबिरात तब्बल १०५ दात्यांचे रक्तदान !

इमेज
  माजी नगराध्यक्ष बाजीराव  भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल १०५ दात्यांचे रक्तदान ! 🕳️ रक्तदात्यांचा हिरिरीने सहभाग; अनेेकांनी स्वयंस्फूर्त केलं रक्तदान परळी वैजनाथ/ प्रतिनिधी......     कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे परळी शहरातील कर्तृत्ववान उमदे युवा नेतृत्व व परळीच्या सर्वांगीण विकासाचा मुख्यदुवा म्हणून यशस्वी कारकीर्द निर्माण केलेले माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त आज (दि.११) रोजी आयोजित रक्तदान शिबिराला  दरवर्षी प्रमाणेच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या  शिबिरात तब्बल १०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.        राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या प्रेरणेने बाजीराव भैय्या धर्माधिकारी मित्रमंडळाच्या वतीने माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया  धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त दिनांक 11 ऑगस्ट रोजी स्व. श्री. मणिक बाजीराव धर्माधिकारी सभागृह,आंबेवेस, परळी वैजनाथ येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. सकाळी या शिबिराचा शुभारंभ राष्ट्रवादी क

आ. रोहीत पवार यांची प्रमुख उपस्थिती

इमेज
  14 ऑगस्टला अंबाजोगाई येथे युवा स्वातंत्र्य ज्योत रॅली आ. रोहीत पवार यांची प्रमुख उपस्थिती        मागील 15 पर्षापासून नवमहाराष्ट्र युवा अभियानातर्फे दरवार्षी युवकांमध्ये राष्ट्रभावना जागृत होण्यासाठी युवा स्वातंत्र्य ज्योत रॅलीचे आयोजन करण्यात येते. या वर्षीही ही रॅली अंबाजोगाईत सोमवार दि. 14 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 05:30 वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक - तानाजी मालुसरे चौक - पाटील चौक - योगेश्वरी देवी मंदीर - शिवाजी चौक ते वेणुताई चव्हाण कन्या प्रशाला काढण्यात येणार आहे. अंबाजोगाईकरांनी युवा स्वातंत्र्य ज्योत रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यशवंतराव चव्हाण सेंटर चे सचिव डॉ.नरेंद्र काळे यांनी केले आहे.  युवा स्वातंत्र्य ज्योत रॅली आयोजनाचे हे यंदाचे सोळावे वर्ष आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंध्येला दरवर्षी राज्यात 25 शहरात ही रॅली काढण्यात येते. यंदा या रॅलीत युवा आमदार श्री. रोहीत (दादा) पवार सहभागी होणार आहेत. रॅली नंतर संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक पठन करून राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप होईल. अंबाजोगाई व परीसरातील तरुणांनी मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी
इमेज
  स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतमातेच्या प्रतिमेचे पुजन आणि गाणकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजात देशभक्तीगीत कार्यक्रमाचे आयोजन - संजय सेवलकर परळी, (प्रतिनिधी) :- मागील अनेक वर्षांची परंपरा कायम राखत परळीत यंदाही  विक्रम चहाकडून स्वातंत्र्य दिनानिमित्त राणी लक्ष्मीबाई चौकात दि १५ आॅगस्ट रोजी सकाळी सात वाजता भारतमातेच्या प्रतिमेचे पुजन करून, परळीतील स्त्री आणि पुरुष आवाजाची आशीर्वाद प्राप्त झालेला  श्रावण आदोडे साक्षात गाणकोकिळा लता मंगेशकर यांच्या वेशभुषा मध्ये गोड आवाजात देशभक्तीपर गीत सादर साजरा करणार आहेत.            दरवर्षी स्वातंत्र्य दिना राणी लक्ष्मीबाई चौकात जिलेबी वाटून साजरा केला जातो तरी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी सर्व परळीकरांनी यावे असे आवाहन विक्रम चहाचे वितरक संजय सेवलकर यांनी केले आहे.

पक्षाचे विचार घेऊन सर्वसामान्यांसाठी काम करू - पांडुरंग मोरे

इमेज
संभाजी ब्रिगेड परळी वै.प्रभारी तालुध्यक्षपदी पांडुरंग मोरे यांची निवड पक्षाचे विचार घेऊन सर्वसामान्यांसाठी काम करू - पांडुरंग मोरे परळी वैजनाथ (प्रतिनिधी) संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री मनोजदादा आखरे,महासचिव शिवश्री सौरभदादा खेडेकर,प्रदेश संघटक तथा बीड जिल्हा संपर्कप्रमुख डॉ. सुदर्शन तारक सर, प्रदेश संघटक शिवश्री शशिकांत कन्हेरे सर, विभागीय अध्यक्ष ऍड.राहुलभैय्या वायकर, यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष शिवश्री प्रवीण ठोंबरे सर यांच्या मार्गदर्शनानुसार बीड जिल्हा कार्याध्यक्ष सेवकराम जाधव यांच्या हस्ते व संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष विश्वम्भर मोरे यांच्या उपस्थिती मध्ये दि.११ ऑगष्ट २०२३ रोजी परळी वै. संभाजी ब्रिगेड, प्रभारी तालुकाध्यक्ष पदी पांडुरंग किशनराव मोरे यांची निवड करून पुढील वाटचालीस सदिच्छा दिल्या.  संभाजी ब्रिगेडच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही व तसेच पक्षाचे विचार घेऊन सर्वसामान्यांसाठी सदोदित काम करू असा विश्वास या निवडीच्या वेळी नवनियुक्त प्रभारी तालुकाध्यक्ष पांडुरंग मोरे यांनी दिला.  याप्रसंगी बीड जिल्हा कार्याध्यक्ष सेवकराम जा

शोधकार्य सुरू

इमेज
  पुरूषोत्तमपरीत  भाविक गोदावरीच्या पाण्यात बुडाला माजलगाव - तालुक्यातील पुरुषोत्तम पुरी येथे सध्या अधिक मास असल्याने पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी भारतभरातून भावीक भक्त येतात. पुरुषोत्तम पुरी येथे गोदावरी नदी वाहते या नदीमध्ये आंघोळ करून भाविक भक्त दर्शन घेतात आंघोळ करत असताना जालना जिल्ह्यातील एक एक भक्त गोदावरी नदीच्या पाण्यात बुडाला असल्याची माहिती स्थानिक लोंकानी  दिली आहे. यावेळी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व माजलगाव तहसीलदार वर्षा मनाळे दाखल झाले आहेत बुडालेल्या व्यक्तीचा शोध कार्य चालू आहे. याविषयी माहिती अशी आहे की मारुती खवले वय ४५ वर्षं राहणार पाटोदा तालुका परतुर जिल्हा जालना हे शुक्रवार रोजी आपल्या नातेवाईका सोबत पुरुषोत्तम पुरी येथे दर्शनासाठी आले होते ते गोदावरी नदीमध्ये अंघोळ करण्यासाठी गेले होते या त्यांचा पाय घसरून पाण्यात बुडाले असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी सांगितली आहे ही घटना शुक्रवार रोजी सकाळी नऊच्या दरम्यान घडली आहे बुडालेल्या व्यक्तीचा स्थानिक लोक शोध घेत असून यावेळी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी व तहसीलदार वर्षा मनाळे घटनास्थळ

अभिष्टचिंतन लेख: ✍️ प्रा.शामसुंदर दासुद

इमेज
■ 'भैय्या'- परळी शहराचे 'विकासदूत': उमदे व संवेदनशील मनाचे चतुरस्र युवा नेतृत्व: प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे धनी  आपल्या वर्तनातून, आपल्या कृतीतून ज्या व्यक्ती इतरांना प्रभावित करत असतात त्या व्यक्ती मानवी समाजात अगदी ठळकपणे उठून दिसतं असतात. सार्वजनिक जीवनात अनेक लोक काम करत असतात परंतु आपल्या कार्य कौशल्याने इतरांना प्रभावित करणारे अगदी मोजकेच असतात. अशाच प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेले आमचे मित्र माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) परळी शहराचे शहराध्यक्ष आदरणीय बाजीराव  प्रकाशराव धर्माधिकारी.आज त्यांचा वाढदिवस त्या निमित्ताने केलेला हा शब्द प्रपंच. समाजात काम करत असताना सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रात बाजीराव भैयांनी ठळकपणे उठून दिसेल असे काम केले आहे.स्व. माणिक बाजीराव धर्माधिकारी चारिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेक लोकहिताची कामे त्यांनी केलेली आहेत. परळी शहरासाठी सुसज्ज रुग्णवाहिका, मागच्या दहा-अकरा वर्षापासून शासकीय रक्तपेढीसाठी रक्तदान शिबिर, ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी युवक अशा विविध स्तरातील गरजू लोकांसाठी या ट्रस्
इमेज
  कृषी विद्यापीठांनी ड्रोनद्वारे फवारणीचे पथदर्शी प्रकल्प राबवावेत- कृषी मंत्री धनंजय मुंडे मुंबई, दि. 10 : राज्यातील कृषी विद्यापीठांनी शेतीशी संबंधित कामांसाठी ड्रोन वापरण्याची व्यवहार्यता तपासण्यासाठी चालू खरीप हंगामात पथदर्शी प्रकल्प हाती घ्यावेत, असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिले. महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये रिमोट पायलट (ड्रोन) प्रशिक्षण संस्था (आर.पी.टी.ओ.) अंतर्गत सुरु असलेले ड्रोन प्रशिक्षण केंद्र इतर विद्यापीठात चालू करण्यासंदर्भात व प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, उपसचिव संतोष कराड,तसेच कृषी  विद्यापीठाचे संबंधित विभागाचे संशोधन अधिकारी, प्राध्यापक व पदाधिकारी उपस्थित होते. मंत्री श्री. मुंडे म्हणाले, शेतीमधील दैनंदिन कामासाठी मजुरांची उपलब्धता कमी झाली आहे. मजूर उपलब्ध झालेच तर मजुरीचे दर शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेर चालले आहेत. त्यामुळे ड्रोनद्वारे शेतीमधील खते फवारणी, कीटकनाशक फवारणी अशी दैनंदिन कामे होणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे . ही कामे ड्रोनद्वारे आणि प

खा.शरद पवार यांची बीड येथे सभा

इमेज
परळीतील नियोजन बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहा-अॕड.जीवनराव देशमुख परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या बीड येथील होणाऱ्या सभेच्या तयारीसाठी परळीत बैठकीचे आयोजन कारण्यात आले आहे. तरी परळी मतदारसंघतील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी  कार्यकर्त्यांनी बैठकीलस मोठ्या संख्येने उपस्थितीत राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते  अॕड.जीवनराव देशमुख यांनी केले आहे.          राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष  खा.शरदचंद्रजी पवार  यांची बीड येथे गुरुवार दि.17 ऑगस्ट 2023 रोजी  सभा होणार असून या भव्य सभेच्या पूर्वतयारी करिता शुक्रवार दि. 11 ऑगस्ट 2023  रोजी सायंकाळी 05.00 वाजता अक्षदा मंगल कार्यालय, परळी वैजनाथ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष आ.संदीप क्षिरसागर,  युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या सौ.सुदामतीताई रत्नाकर  गुट्टे, जेष्ठ नेते एस.ए.समद यांच्या उपस्थितीत
इमेज
खळबळजनक: परळी-अंबाजोगाई रस्त्यावरील हॉटेलवर अज्ञात इसमांनी केला गोळीबार परळी वैजनाथ,प्रतिनिधी.....       परळी-अंबाजोगाई रस्त्यावरील एका हॉटेलवर वाद घालत व मॅनेजरला मारहाण करून अज्ञात इसमांनी गोळीबार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.याप्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.       पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार,  परळी ते अंबाजोगाई रोडवर कन्हेरवाडी शिवारात हॉटेल यशराज येथे दि. 09/08/2023 रोजी रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चार आरोपी यांनी फिर्यादी हाॅटेल चालक विलास भिमराव आघाव व हॉटेलवरिल मॅनेजर नरेश निसाद यास सिगारेटचे पाकीट मागीतले. मॅनेजर नरेश निसाद याने सिगारेट पाकिटाचे 150 रु मागीतले असता यातील आरोपींनी संगणमत करुन  मँनेजर नरेश निसाद याच्या कॉलरला धरुन चापटा चबुक्याने मारहाण केली. शिवीगाळ करुन ग्लास, बतई फेकुन मारून आरोपींनी मॅनेजर नरेश निसाद याला जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांचेकडिल पिस्तुलने फायरींग करुन तिन गोळ्या झाडल्या. याप्रकरणी हाॅटेल चालक विलास भिमराव आघाव यांच्या फिर्यादीवरुन आरोपींविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं.-

धनंजय मुंडेंची 15 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम

इमेज
' त्या' बारा लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजना व नमो किसान सन्मान योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी धनंजय मुंडेंची विशेष मोहीम शेतकऱ्यांच्या भूमिअभिलेख नोंदी, ई-केवायसी, आधार लिंकिंग करण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत राबवली जातेय विशेष मोहीम मुंबई (दि. 10) - प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या चौदाव्या हफ्त्यापासून राज्यातील 12 लाख पात्र शेतकरी भूमी अभिलेख अद्ययावत नसणे, ई - केवायसी नसणे तसेच बँक खात्याशी आधार संलग्न नसणे या कारणांनी वंचित राहिले होते. मात्र यापुढे या दोन्ही योजनांपासून राज्यातील पात्र शेतकरी वंचित राहू नयेत याचा विचार करून या तीनही प्रकारच्या नोंदण्या व अटींची पूर्तता एकत्रित व गतिमान पद्धतीने पूर्ण करण्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी 15 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम हाती घेतली आहे.  या मोहिमेंतर्गत प्रत्येक तालुका स्तरावर तहसीलदार, तालुक्याचे भूमिअभिलेख अधिकारी व तालुका कृषी अधिकारी या तिघांची संनियंत्रण समिती गठित करण्यात आली असून त्यांच्या देखरेखीखाली गाव पातळीवर ग्रामसेवक, तलाठी व कृषी सेवक यांनी वरील तीन अटींमुळे लाभापासून वंचित राहिलेले शेतकरी शोधून त्

बीड जिल्ह्यातील कामगारांसाठी भालचंद्र जगदाळे यांचे विशेष प्रयत्न

इमेज
  कामगार कल्याण मंडळाच्या मराठवाडा विभागाचे सहाय्यक कल्याण आयुक्त म्हणून  भालचंद्र जगदाळे यांनी स्विकारला  पदभार  बीड जिल्ह्यातील कामगारांसाठी भालचंद्र जगदाळे यांचे विशेष प्रयत्न   परळी  : (प्रतिनिधी) महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या मराठवाडा विभागाचे सहाय्यक कल्याण आयुक्त या  पदाचा पदभार भालचंद्र जगदाळे यांनी स्विकारला.  श्री. जगदाळे हे कामगार कल्याण मंडळाच्या  गट कार्यालय लातूर येथे कामगार कल्याण अधिकारी म्हणून कार्ययत होते.  त्यांनी बीड, लातुर व धाराशिव जिल्ह्यातील कामगारांना जास्तीत जास्त लाभ मिळून दिला.  त्यांची नुकतीच लातूर येथून औरंगाबाद येथे सहाय्यक कल्याण आयुक्त म्हणून बदली झाल्याने त्यांचे औरंगाबाद येथील अधिकारी कर्मचाऱ्यांनी शानदार स्वागत केले आहे.  औरंगाबाद येथील ललित कला भवन येथे मंगळवार  भालचंद्र जगदाळे यांनी  मराठवाडा विभागीय सहाय्यक कल्याण आयुक्त पदाचा कार्यभार स्विकारला . यावेळी विभागीय कार्यालय व गट कार्यालय औरंगाबाद येथील कर्मचारी यांनी त्यांचे छोटेखानी  स्वागत समारंभात स्वागत केले. अधिकारी  व कर्मचाऱ्यांनी त्यांना पुषगुच्छ देवून हृदय स्वागत व सत्कार  केला. विभागीय

सर्वांचे प्रेम सदैव माझ्या साठी उर्जादायी; अनाठायी खर्च टाळण्याचे आवाहन

इमेज
  पाऊस नाही: शेतकरी अडचणीत; समारंभपूर्वक वाढदिवस साजरा न करण्याचा बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांचा निर्णय 🕳️ सर्वांचे प्रेम सदैव माझ्या साठी उर्जादायी; अनाठायी खर्च टाळण्याचे आवाहन परळी वैजनाथ, प्रतिनिधी ---- :            बीड जिल्ह्यात अद्यापही चांगला पाऊस नाही शेती आणि शेतकऱ्यांवर संकटाचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर येत्या ११ ऑगस्ट रोजी असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांचा वाढदिवस उत्सवी स्वरूपात साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. सर्वांचे प्रेम सदैव माझ्यासाठी उर्जादायी असुन वाढदिवसा वरील उत्सवी स्वरुपातील अनाठायी खर्च टाळण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.       पावसाअभावी सर्वत्र परिस्थिती गंभीर असुन शेती आणि शेतकऱ्यांवर संकटाचे सावट आहे.  या परिस्थितीत समारंभ पुर्वक वाढदिवस करणे मनस्वी टाळावे वाटते. सर्वांच्या शुभेच्छा - आशीर्वाद मला लढण्याचे बळ देतात. परंतु या परिस्थितीत वाढदिवस उत्सवी साजरा न करता साधेपणाने असावा असे मनोमन वाटते.त्यामुळे आयोजित रक्तदान शिबीरात सहभाग नोंदवून रक्तदान श्रेष्ठ दान करावे. उत्सवी स्वरुपातील अनाठायी खर्च टाळण्य

आरोपींना अटक करण्याची फिर्यादीची मागणी

इमेज
  दुसऱ्याची जमीन हडपण्यासाठी खोटा करारनामा केला ; परळीत दोन जणावर गुन्हा दाखल ! परळी वैजनाथ दहा रुपयांच्या बाॅंडच्याआधारे मालक नसतानाही दुसऱ्याच्या जमीनीचा विक्रीचा खोटा करारनामा तयार करून बनावट दस्तऐवज बनवून एकाची शेतजमीन हडपण्याचा कट करून  फसवणूक  केल्याच्या आरोपावरून परळी ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये दोन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. थोडक्यात वृत्त असे की, याबाबत परळी येथील फिर्यादी प्रदिप पुरूषोत्तम नव्हाडे  यांनी दिलेल्या फिर्यादीत  7 ऑक्टोबर 2022 मध्ये त्यांना अंबाजोगाई येथील न्यायालयाचे समन्स मिळाले तेव्हा त्यांना धक्का बसला कारण त्यांच्या मालकी व कब्जातील मौजे परळी शिवारातील जमीन सर्वे नंबर 245/2 मधील 1 हेक्टर 07 आर जमीनी विक्रीचा खोटा करारनामा सुभाष राजाराम नव्हाडे यांनी व इतरांनी आरोपी महमंद कलिमोददीन महमंद सलीमोददीन व महंमद हलिमोददीन महमंद सलीमोददीन यांना करुन दिल्याबद्दल माहिती मिळाली.  त्याबाबत अंबाजोगाई येथील न्यायालयात खोटा दावा दाखल केला.याबाबत फिर्यादीने आरोपींना जाब विचारला असता तुला काय करायचे आहे आम्ही चोराकडुन ताजमहाल सुध्दा विकत घेऊ असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली

परळी रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने स्वागत

इमेज
  २६८ किमी विकाराबाद- परळी लोहमार्गाच्या दुहेरीकरणास मंजुरी परळी वैजनाथ:  रेल्वे प्रशासनाने नुकत्याच काढलेल्या पत्रकानुसार विकाराबाद-परळी या २६७.७७ कि.मी. मार्गाच्या दुहेरीकरण मागणीला फायनल लोकेशन सर्वेक्षणसाठी दिल्ली बोर्डाने मान्यता दिली आहे. विकाराबाद ते परळी लोहमार्गावर जहिराबाद, बिदर, भालकी, उदगीर, लातूर रोड, पानगाव आदी महत्त्वाची रेल्वेस्थानके आहेत. हैदराबाद ते मनमाड, हैदराबाद ते नांदेड यासह अनेक ठिकाणे जोडणारा हा सुलभ मार्ग आहे. ही योजना मंजूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे मंजुरीबद्दल परिसरातून आभार व्यक्त होत आहेत.           विकाराबाद ते परळी मार्गावर धावणाऱ्या गाड्या... हैदराबाद- औरंगाबाद, हैदराबाद- पूर्णा, काकीनाडा- शिर्डी, विजयवाडा- शिर्डी, सिकंदराबाद- शिर्डी, तिरुपती- शिर्डी, रेनिगुंटा- औरंगाबाद, नांदेड- बंगळुरू याशिवाय मालगाडी या लोहमार्गावरून धावते. विकाराबाद ते परळी लोहमार्गावर जहिराबाद, बिदर, भालकी, उदगीर, लातूर रोड, पानगाव आदी महत्त्वाची रेल्वेस्थानके आहेत. हैदराबाद ते मनमाड, हैदराबाद ते

लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन

इमेज
  अथक परिश्रमाला पर्याय नाही, परिश्रम व आत्मविश्वासा शिवाय स्पर्धा परीक्षेत यश मिळत नाही -तहसीलदार संदीप पाटील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन परळी वैजनाथ दि.०८ (प्रतिनिधी)              ध्येय साध्य करण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक आहे. अथक परिश्रमाला पर्याय नाही, परिश्रम व आत्मविश्वासाशिवाय स्पर्धा परीक्षेत यश मिळत नाही.स्पर्धा परीक्षेत सर्वांना समान संधी असते. मोबाईलचा वापर कमीत कमी करा असे प्रतिपादन तहसीलदार संदीप पाटील यांनी लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.        शहरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा उद्घाटन समारोह मंगळवारी (ता.०८) सकाळी १० च्या सुमारास संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्येची देवता माता सरस्वती प्रतिमा पूजना झाली. कार्यक्रमासाठी तहसीलदार संदीप पाटील हे उद्घाटक लाभले.तर संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख हे कार्यक्रमाचे अध्यक्ष, कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विद्या

परमरस्य पारायण सुवर्णमहोत्सवी सोहळा

इमेज
  श्री.क्षेत्र कपिलधार येथे ३५ दिवशीय अखंड शिवनाम सप्ताह उत्साहात बीड दि०९ (प्रतिनिधी)                 श्री.क्षेत्र कपिलधार येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ३५ दिवशीय अखंड शिवनाम सप्ताह,  ज्ञानयज्ञ महोत्सव व परमरस्य पारायण सुवर्णमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन ३ जुलै गुरुपौर्णिमा ते सोमवार (ता.०७) आँगस्ट पर्यंत करण्यात आले होते या सोहळ्यास भाविक भक्तांचा मोठा प्रतिसाद मिळाला.               स्वर्गीय डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या प्रेरणेने व श्री.सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डा यांच्या मार्गदर्शनाने लिंगायत समाजाचे आराध्य दैवत असलेल्या श्री.क्षेत्र कपिलधार येथे गाढे पिंपळगाव येथील दिवंगत सोनाप्पा फुटके, अन्नपूर्णाबाई फुटके या दाम्पत्यांनी या चातुर्मास ३५ दिवशीय सप्ताहाची सुरुवात केली होती. त्यांना कपीलधार देवस्थान पंच कमिटीच्या वतीने सहकार्य करण्यात आले. गेल्या ४९ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या सप्ताहाचे अखंडपणे हे ५० वे वर्षे होते. ३ जुलै गुरुपौर्णिमेला श्री.विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते कलशपुजन करुन चातुर्मास सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. या सप्ताहात पहाटे श
इमेज
  पुरोगामी चळवळीचा आधारवड हरपला - प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार,महात्मा फुले यांच्या समग्र साहित्याचे अभ्यासक आणि संशोधक, परखड व्याख्याते म्हणून  सुपरिचित असलेले प्रा. हरी नरके सरांनी आज जगाचा निरोप घेतला. ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांच्या निधनाचे  पुरोगामी चळवळीचा आधारवड हरपला आहे. हे वृत्त मनाला चटका लावणारे आहे. तत्कालीन पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते प्रमुख होते. महात्मा फुले साहित्य समितीवर त्यांनी काम केले. त्या माध्यमातून महात्मा फुले यांचे साहित्य प्रकाशित करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले होते. महात्मा फुले-शोधाच्या नव्या वाटा अशा अनेक पुस्तकांचे त्यांनी लेखन केले. त्यांच्या निधनामुळे संशोधन, सामाजिक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व हरपले आहे. परिवर्तन चळवळीशी प्रा नरके यांचा नजिकचा संबंध राहिला.महात्मा फुले यांच्या साहित्याचा अभ्यासक हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यांनी ५६ पुस्तकांचं लेखन आणि संपादन केलं आहे.प्रा.हरी नरके य
इमेज
  चळवळीतील कृतीशील विचारवंताला आपण मुकलोत-अनंत इंगळे  परळी(प्रतिनिधी)फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील कृतीशील व अभ्यासु विचारवंताला देश मुकला आहे असे भावनिक उदगार सामाजिक कार्यकर्ते अनंत इंगळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.      डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे खंड, महात्मा जोतीराव फुलेंचं समग्र वाड्मय यावर ऐतिहासिक असं काम प्रा. हरी नरके सरांनी केलं आहे.ओबीसी जणगणना, ओबीसी जनजागरण यावर आपल्या लेखणीतून व कृतीतून अनेक प्रेरणादायी व चळवळीला प्रेरणा देणारं साहित्य त्यांनी लिहिलं  आहे.     समाजाला आताच्या काळात गरज असणारे एक एक  माणसं जात आहेत.विश्वास बसणार नाही अशा मृत्यूंना, धक्कादायक म्हणतांना या माणसांनी केलेले रचनात्मक काम इतके उभारले की, त्यांच्या जाण्यामुळे आता एक पोकळी निर्माण झाली आहे ही जाणीव आपल्याला दुःखदायक  आहे. हरी नरके सर अविरतपणे महात्मा फुलेंना समाजात उपस्थित करत राहिले आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे उद्धारक कसे असतात हे मांडत राहिले. त्यांचे विचार व साहित्य सर्वांनाच प्रेरणादायी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
इमेज
 प्रा. हरी नरके यांच्या निधनाने महाराष्ट्राने व्यासंगी विचारवंत गमावला पंकजाताई मुंडे यांनी शोकभावना व्यक्त करत वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली मुंबई । दिनांक ०९। ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांच्या निधनाने महाराष्ट्राने व्यासंगी विचारवंत आणि साहित्यिक गमावला आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.     प्रा. नरके यांच्या निधनाचे  वृत्त अत्यंत दुःखद आहे. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यापनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. त्यांच्या निधनाने एक अभ्यासू व्यक्तिमत्व आपण गमावले आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचे ते निष्ठावंत पाईक होते. आपल्या लेखणीने बहुजन समाजाचे प्रबोधन करण्याचं कार्य त्यांनी केलं. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक व्यासंगी विचारवंत, साहित्यिक गमावला आहे. नरके कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली  अशा शब्दांत पंकजाताईंनी आपल्या शोकाकुल भावना व्यक्त केल्या. ••••

• मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

इमेज
 ■ माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त ११ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन  • मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन परळी वैजनाथ/ प्रतिनिधी......      कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे परळी शहरातील कर्तृत्ववान उमदे युवा नेतृत्व व परळीच्या सर्वांगीण विकासाचा मुख्यदुवा म्हणून यशस्वी कारकीर्द निर्माण केलेले माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त  (दि.११) रोजी  रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.        राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या प्रेरणेने बाजीराव भैय्या धर्माधिकारी मित्रमंडळाच्या वतीने माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त दिनांक ११ ऑगस्ट रोजी स्व. श्री. मणिक बाजीराव धर्माधिकारी सभागृह,आंबेवेस, परळी वैजनाथ येथे दि.११ ऑगस्ट २०२३ रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० वा.पासुन शिबिराचा शुभारंभ होणार आहे. दिवसभर रक्तदात्यांना रक्तदान करता येणा

शालेय गणवेश वाटप

इमेज
  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट येथे शालेय गणवेशाचे वितरण परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... शासनाच्या योजनेअंतर्गत येणाऱ्या शालेय गणवेशाचे वाटप जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट या ठिकाणी गावचे सरपंच श्री बंडू गुट्टे यांच्या तसेच शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री सखाराम गुट्टे व मान्यवरांच्या हस्ते मंगळवारी वितरीत करण्यात आले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. मुख्याध्यापक श्री डी बी राठोड यांनी शाळेच्या उपक्रमांची माहिती उपस्थित मान्यवरांना दिली. लवकरच दुसरा गणवेश विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे असेही ते पुढे म्हणाले.  गावचा विकास करून कायापालट करणाऱ्या सरपंच श्री बंडू गुट्टे यांनी शाळेसाठी लवकरच विज्ञान प्रयोगशाळा साहित्य देणार असल्याचे सांगून विविध योजनेतून शाळेच्या भौतिक विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.  कार्यक्रमास शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष श्री हनुमान देवकते, गावचे उपसरपंच श्री लक्ष्मण गुट्टे, ग्रामपंचायत सदस्य श्री अरुण खांडेकर, चेअरमन श्री लक्ष्मण गुट्टे, श्री शालिवाहन परमेश्वर गुट्टे, बि

शेतमालाच्या सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक मूल्यसाखळ्यांच्या विकास

इमेज
शेतमालाच्या सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक मूल्यसाखळ्यांच्या विकासासाठी मदत करण्यासाठी स्मार्टने नियोजनबद्ध कार्यक्रम तयार करावे- कृषिमंत्री धनंजय मुंडे मुंबई दि.8 : लहान आणि सीमांत शेतकरी तसेच कृषी नवउद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक मूल्यसाखळ्यांच्या विकासासाठी मदत करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) ने नियोजनबद्ध कार्यक्रम  तयार करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिले बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प ( स्मार्ट)ची आढावा बैठक कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात संपन्न झाली .त्या वेळी ते बोलत होते.यावेळी कृषि विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार ,कृषिआयुक्त सुनिल चव्हाण, स्मार्ट चे प्रकल्प संचालक कौस्तुभ दिवेगावकर ,कृषि संचालक आत्माचे दशरथ तांभाळे, अतिरिक्त प्रकल्प संचालक ,स्मार्टचे ज्ञानेश्वर बोटे,कृषि विभागाचे उपसचिव संतोष कराड तसेच संबंधित इतर अधिकारी उपस्थित होते.     .श्री मुंडे म्हणाले पुणे महानगरपालिके कार्यक्षेत्रामध्ये स्मार्ट प्रकल्पासाठी उपलब्ध अस