पोस्ट्स

जुलै २३, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
श्री सुर्वेश्वर मंदिरात शिव महापुराण कथा आणि पंचकुंडात्मक हरिहर यागाने मंगलमय अधिक मास शिव महापुराण कथेचे भाविकांना लाभ परळी वैजनाथ (प्रतिनिधी)...      बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथे अधिक मासानिमित्त सुर्वेश्वर मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या पंचकुंडात्मक हरिहर याग व शिव महापुराण कथा यामुळे मंगलमय धार्मिक पर्वणी सुरू असून या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक सहभागी होत आहेत        पुरूषोत्तम मास (अधिक मास) पर्वकाळ निमित्ताने येथील श्री सुर्वेश्वर प्रभूंच्या सानिध्यात दिनांक 26 जुलै 2023 ते 1 ऑगस्ट 2023 पर्यंत सकाळी 8 ते 12 या वेळेत पं. विजयजी पाठक यांच्या आचार्यत्वात पंचकुंडात्मक हरिहर याग व दुपारी 2 ते 6 या वेळेत पं. उत्तमजी शास्त्री यांच्या रसाळ वाणीतून शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. अधिकमासाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक पर्वणीला भाविकांची मोठी उपस्थिती लाभत असून महापुराण कथा श्रवणाचा लाभ भाविकांना मिळत आहे त्याबरोबरच हरीहर यागाचा अपुर्व  योगही मिळत आहे. ••• VIDEO NEWS GALLERY 
इमेज
राष्ट्रसंत भगवान बाबांनी कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली-उपप्राचार्य प्रा.हरिष मुंडे   परळी ,प्रतिनिधी..  येथील वैद्यनाथ कॉलेजमध्ये राष्ट्रसंत भगवान बाबा यांची 127 वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. हरीश मुंडे यांनी राष्ट्र संत भगवान बाबा यांनी समाजामध्ये असलेली अंधश्रद्धा -रूढी -परंपरा व जातीयता नष्ट करण्यासाठी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन घडून आणले असे मत याप्रसंगी त्यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर संत भगवान बाबांचे कार्य समाज उपयोगी होते त्यांचे विचार प्रेरणादायी असल्यामुळे आज त्यांच्या विचारांची आवश्यकता आहे असेही सांगितले. बाबांनी सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी त्यांनी लोक कल्याणकारी कामे केली. त्यासाठी संपूर्ण आयुष्यभर खडतर जीवन प्रवास केला. या कार्यक्रमाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्या परिषद सदस्य, डॉ. पी एल कराड, डॉ विनोद गायकवाड, श्री मनोहर कराड, प्रा. समीर रेणूकादास, प्रा.उत्तम कांदे ,डॉ तुकाराम गित्ते, डॉ रामेश्वर चाटे, डॉ.बाबासाहेब शेप, डॉ व्यंकट मुंडे,प्रा अरूण ढाकणे, प्रा रवी कराड, प्रा मनोज फड, यांची

हनुमाननगर येथे पुरूषोत्तम मासनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहात किर्तन

इमेज
हनुमाननगर येथे पुरूषोत्तम मासनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहात किर्तन  अधिकमास हा भक्ती करण्यासाठी उत्तम म्हणून पुरूषोत्तम मास- ह. भ.प.केशव महाराज उखळीकर  परळी (प्रतिनिधी)       अधिकमास हा भक्ती करण्यासाठी उत्तम म्हणून पुरूषोत्तम मास असे या महिण्याला म्हटलेजाते असेप्रतिपादन सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.केशव महाराज उखळीकर  यांनी केले. येथील हनुमाननगर येथे पुरूषोत्तम मासनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्त शनिवारी प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.केशव महाराज उखळीकर यांचे कीर्तन संपन्न झाले. दिनांक 29/07/2023 शनिवार रोजी परळी शहरातील हनुमाननगर येथील पांढरीचा मळा येथे पुरुषोत्तम मासा निमित्त दिनांक 24/07/2023 पासुन ते 30/07/2023 पर्यंत ज्ञानेश्वरी पारायण, भागवत कथा,कीर्तन महोत्सव निमित्ताने आज शनिवार रोजी हरिनाम सप्ताहाच्या आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.पा.केशव महाराज उखळीकर यांचे कीर्तन संपन्न झाले या वेळी हनुमान नगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  ••• VIDEO NEWS GALLERY 
इमेज
  ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा गेवराई : नुतन कार्यकारणीची निवड गेवराई:- दिनांक 27 /7/2023 रोजी सायंकाळी (6:00) वाजता ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा गेवराई यांची महत्त्वपूर्ण बैठक श्री अनिल गोविंदराव बोर्डे यशोदीप निवास गणेश नगर येथे आयोजित करण्यात आली होती सदरील बैठकीमध्ये माननीय ज्येष्ठ कार्यकर्ते व बीड जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे माजी सदस्य अनिल बोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वानुमते कार्यकारणीची निवड करण्यात आली व व बैठकीमध्ये सर्व कार्यकर्ते यांनी महाराष्ट्र ग्राहक पंचायत शाखा गेवराई यांचे काम जोमाने करण्याचे मान्य केले.  अ. क्र.         नांवे                पद       1) अनिल गोविंदराव बोर्डे प्रमुख मार्गदर्शक 2) श्री परमेश्वर कुंडलिकराव जाधव तालुका संघटक 3) अशोक गंगाधरराव देऊळगावकर संघटक 4) प्रा. भानुदास भीमराव फलके अध्यक्ष 5) कचरू आश्रुबा उढाण उपाध्यक्ष 6) प्रा. अंकुशराव चव्हाण चिटणीस 7) सतीश दत्तात्रेय कांबळे सहचिटणीस  8) मोहन रंगनाथराव राजहंस कोषाध्यक्ष 9) एडवोकेट निलेश जी सुधाकरराव माळवे कायदेशीर सल्लागार  10) सुनील ज्ञानोबा पोपळे प्रसिद्धीप्रमुख  11) गणेश देविदास राव र
इमेज
मणिपुर राज्यातील हिंसाचाराच्या निषेधार्थ परळीत रविवारी बैठक परळी वै ता 30 प्रतिनिधी  मणिपुर राज्यात मागील तीन महिन्यापासुन हिंसाचार सुरू आहे. मणिपुर राज्यात सत्तेत असलेले सरकार व केंद्र सरकार यांनी हिंसाचार थांबविण्यासाठी कठोर निर्णय घेणे अपेक्षित आहे. त्यातच महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर सामुहिक आत्याचार केल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर प्रसारीत झाल्याने देशातील जनतेत प्रचंड संताप निर्माण झाला आहे. या हिंसाचाराच्या निषेधार्थ परळीत पुरोगामी विचारांना मानणाऱ्या विविध पक्ष व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची रविवारी ता.30 परळीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.       परळी येथील कॉंग्रेस आय च्या संपर्क कार्यालयात रविवारी दि.३० रोजी सकाळी १०:०० बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मनिपुर राज्यात चालु असलेला हिंसाचार रोखण्यात अपयशी ठरलेल्या राज्य सरकारला बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी व तेथील पिडीतांना सुरक्षा पुरवावी या मागणीसाठी परळी येथे आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी परळी येथे कॉंग्रेस आय, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उबाठा गट) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, मनसे, वंचित आघाडी
इमेज
  कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या बैठकीनंतर संयुक्त किसान मोर्चाचे (अराजकीय) प्रस्तावित आंदोलन मागे शेतीमालाच्या हमीभावासंदर्भात कृषी मूल्य आयोग लवकरात लवकर गठित करून केंद्र सरकार कडे प्रस्ताव पाठवणार - धनंजय मुंडे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम लवकरच वितरित केली जाईल - धनंजय मुंडेंची माहिती शेतकरी, ऊसतोड कामगार, वाहतूकदार आदींच्या विविध मागण्यांसंदर्भात संबंधित विभागासोबत बैठका घेऊन निर्णय घेऊ - मुंडेंचे आश्वासन मुंबई (दि. 29) - राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत आज मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहावर पार पडलेल्या बैठकीनंतर संयुक्त किसान मोर्चा (अराजकीय) यांनी सोमवारी पुकारलेले आंदोलन मागे घेतले आहे.  या बैठकीमध्ये संयुक्त किसान मोर्चा अराजकीय बळीराजा शेतकरी संघटना तसेच ऊसतोड कामगार व वाहतूकदार संघटनेच्या वतीने मांडण्यात आलेल्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर सोमवारपासून पुकारण्यात आलेले आंदोलन मागे घेतल्याचे संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले.  या बैठकीत शेतीमालाला सी-2 50% या आधारे हमीभाव देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असू

पंकजाताईंना पुन्हा मोठी जबाबदारी: केंद्रीय स्तरावर फेरनिवड

इमेज
  भाजपाची राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर; विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया राहटकरांना पुन्हा संधी नवी दिल्ली – भाजपाने पक्षाच्या बहुप्रतिक्षित संघटनात्मक पुनर्रचनेत, आज राष्ट्रीय कार्यकारिणीच्या नवीन केंद्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली, ज्यात नऊ महिला आणि दोन मुस्लीम नेत्यांचा समावेश आहे. पक्षाचे सरचिटणीस आणि केंद्रीय कार्यालयाचे प्रभारी अरुण सिंह यांनी आज सकाळी ही यादी जाहीर केली ज्यात १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष, ८ राष्ट्रीय महासचिव, राष्ट्रीय संघटन सरचिटणीस, सह-संघटन महासचिव, १३ राष्ट्रीय सचिव, राष्ट्रीय कोषाध्यक्ष आणि सह- खजिनदार अशी रचना आहे. या पदाधिकाऱ्यांमध्ये ९ महिलांचा समावेश आहे. यावेळी राष्ट्रीय सरचिटणीसांमध्ये एकाही महिलेला स्थान मिळालेले नसून १३ राष्ट्रीय उपाध्यक्षांपैकी पाच आणि १३ राष्ट्रीय सचिवांपैकी चार महिला आहेत.           भाजपाच्या या राष्ट्रीय कार्यकारणीत महाराष्ट्रातील तिघांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्यात राष्ट्रीय महामंत्री म्हणून विनोद तावडे यांच्यावर जबाबदारी दिली आहे. तर राष्ट्रीय सचिव म्हणून महाराष्ट्रातून विजया रहाटकर, पंकजा मुंडे यांचाही कार्यकारणीत समावेश करण्

पंकजाताई मुंडे शोकाकुल

इमेज
  गोरखदादा रसाळ यांना पुत्रशोक:  शेखर रसाळ यांचे अकाली दुःखद निधन ; पंकजाताई मुंडे शोकाकुल  बीड ।दिनांक २८। भाजपचे ज्येष्ठ नेते तथा ऊसतोड कामगार संघटनेचे नेते गोरख दादा रसाळ यांच्या तरूण मुलाच्या अकाली दुःखद निधनाबद्दल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी शोक व्यक्त करत भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.    गोरख दादा रसाळ यांचे चिरंजीव शेखर यांचं आज अकाली निधन झालं, या बातमीने पंकजाताई मुंडे यांना धक्काच बसला. आपल्या शोकाकुल भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या,आमचे ऊसतोड कामगार संघटनेचे नेते गोरख दादा रसाळ यांना अत्यंत दुःखद घटनेला सामोरं जावं लागलं, शत्रुवरही अशी वेळ येऊ नये. त्यांच्या तरूण मुलाचे हृदय विकाराने निधन झाले. प्रचंड धक्कादायक बातमी आहे. कोणत्या शब्दात त्यांचं सांत्वन करावं हा प्रश्न माझ्यासारख्याला पडतोय, शेखरच्या निधनामुळे गोरखदादा यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, त्यांच्या दुःखात मी व माझा परिवार सहभागी आहे,  अशा शब्दांत आपल्या शोकाकुल भावना व्यक्त करून पंकजाताईंनी शेखरला भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.  •••• ••• VIDEO NEWS GALLERY 
इमेज
  कोकणातील आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक - मंत्री धनंजय मुंडे मुंबई, दि. 28 : कोकणातील आंबा, काजूसह फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. काजू महामंडळाच्या धर्तीवर आंबा महामंडळ स्थापन करण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली असल्याचे कृषी मंत्री श्री. धनंजय मुंडे यांनी सांगितले. कोकणातील आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी विधानभवनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, महिला व बालविकास  मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, राजन साळवी, राणा जगजितसिंह पाटील, मनीषा चौधरी, शेखर निकम यांच्यासह कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  मंत्री श्री मुंडे म्हणाले की,  सध्याची बदलती नैसर्गिक परिस्थिती पाहता पावसाची अनियमितता वाढत आहे. राज्यातील  विविध भागातील पाऊस व हवामान मोजणाऱ्या यंत्रणा कमी आहेत. त्यामुळे हवामान मापक यंत्रे कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पावसाच्या पुरेशा नोंदी न कळल्याने शेतकऱ्यांना पीकविम्याच्या लाभासाठी मुख्य अडचण ठरते

उच्च शिक्षणातून आंतरराष्ट्रीय नागरिक तयार करावेत- डॉ. आर. टी. बेद्रे

इमेज
  उच्च शिक्षणातून आंतरराष्ट्रीय नागरिक तयार करावेत- डॉ. आर. टी. बेद्रे                 परळी प्रतिनिधी .....येथील जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह साजरा करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्याख्याते म्हणून डॉ.आर.टी.बेद्रे संचालक, मानव संसाधन विकास केंद्र डॉ.हरिसिंग गौर विश्वविद्यालय सागर (मध्य प्रदेश) यांना आभासी पद्धतीने निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. डी. राठोड, उपप्राचार्य प्रा हरिष मुंडे, डॉ बी.व्ही.केंद्रे, डॉ . पी. एल. कराड, डॉ जे.व्ही.जगतकर, प्रा.डी.के.आंधळे, डॉ. व्हि. जे. चव्हाण, डॉ व्ही.बी. गायकवाड, यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात  डॉ. बेद्रे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आभासी पद्धतीने भाष्य करत असताना उच्च शिक्षणातून आंतरराष्ट्रीय नागरिक तयार झाले पाहिजे असे गौरव उद्गार या प्रसंगी काढले .डॉ बेद्रे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक  धोरणाची उद्दिष्ट यावर सखोल अशा प्रकारे विवेचन केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून विद्यार्थ्यां

द्वादश पंचम् ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथाची प्रतिमा देवून मुख्यमंत्र्यांचा सत्कार

इमेज
आपत्तीग्रस्तांसाठी निधी  : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना १० लक्ष रुपयाचा सहाय्यता निधी सुपूर्द          राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून रायगड जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त "ईरशाळवाडी" गावाच्या उभारणीसाठी १० लक्ष रुपयाचा सहाय्यता निधीचा धनाकर्ष सुपूर्द करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील "ईरशाळवाडी" येथे दरड कोसळून आपले अनेक बांधव मृत्युमूखी पडले होते.ईरशाळवाडी गावाच्या नव्याने उभारणी करण्याकरीता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांना १० लक्ष रुपयाचा निधी परळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे  यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला यावेळी विधिमंडळ येथे उपस्थित राहण्याचा योग आला. मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांना ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथांची प्रतिमा यावेळी देण्यात आली तसेच मुख्यमंत्र्यांना परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग विकास कार्यास २८८ कोटींचा वाढीव तिथक्षेत्र योजना मंजूर केल्याबद्दल सर्वांनी आभार व्यक्त करीत परळी मध्ये येण्याचे निमंत्रण दिले. राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी रायगड जिल्ह्यातील दुर्घटना घडल्यामुळ

अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

इमेज
  कृषी आणि कृषी संलग्न महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया अभियांत्रिकीसारखी राबवणार - धनंजय मुंडे मुंबई.....    राज्यातील कृषी आणि कृषी संलग्न महाविद्यालयांच्या केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेच्या नियमांमध्ये बदल करुन ही प्रक्रिया अभियांत्रिकीसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांप्रमाणे राबवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. या निर्णयामुळे कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक टप्प्यानंतर महाविद्यालयात रिक्त राहिलेल्या जागांची माहिती मिळणार असून त्याप्रमाणे पर्याय निवडता येणार आहेत. कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर होईल तसेच महाविद्यालयांनाही अंतिम तारखेपर्यंत प्रवेश देणे शक्य होईल. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, कृषीमंत्री धनंजय मुंडे,आमदार शेखर निकम, वित्त, सामान्य प्रशासन, नियोजन, उच्च व तंत्रशिक्षण तसेच कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कृषी विद्यापीठांचे कुलगुर

बीड: स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

इमेज
  घरफोडया उघडकीस आणून आरोपीस केले जेरबंद बीड, प्रतिनिधी मागील चार ते पाच महिण्याचे कालावधीत बीड शहरात मोठया प्रमाणावर मालमत्तेचे गुन्हे घडले असून ते उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक, बीड यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना गुन्हेगार निष्पन्न करुन गुन्हे उघडकीस आणणे बाबत सुचना दिल्या आहेत. त्यावरुन पो.नि. स्थागुशा, बीड यांनी त्यांचे अधिपत्याखालील अधिकारी, अंमलदार यांची पथक तयार करुन त्यांना योग्य त्या सुचना दिल्या. त्यावरून बीड शहरात गुन्हेगारांचा शोध घेत असताना दिनांक 22/07/2023 रोजी  पोलीस निरिक्षक स्थागुशा बीड यांना खात्रीलायक माहिती मिळाली की, इसम नामे राम बन्सी नवले रा. आहेर धानोरा ता बीड याने बीड शहरामध्ये बऱ्याच घरफोडया केल्या आहेत व तो सध्या पालवण चौकामध्ये उभा आहे. अशी माहिती मिळालेवरुन पो. नि. स्थागुशा यांचे मार्गदर्शनाखाली पथकाने माहिती काढून योग्य सापळा लावून एका इसमास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारता याने त्याचे नाव राम बन्सी नवले रा. आहेर धानोरा ता बीड असे सांगीतले. त्यास विश्वासात घेऊन गुन्हयाबाबत विचारपुस करता त्याने पोलीस ठाणे शिवाजीनगर हीत पालवण चौक,

आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

इमेज
  एमआयएमच्या उपोषणास यश; मुख्याधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित परळी वैजनाथ, प्रतिनिधी..        नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी एमआयएम पक्षाच्या वतीने  परळी नगर परिषदे समोर दि. 27/07/2023 गुरूवार पासून आमरण उपोषण सुरू होते. मुख्याधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.      बरकत नगर,पेठ मोहल्ला, मलीकपूरा, आयशा काॅलनी,पालखी रोड, भीमनगर, सर्वे नंबर 75 मोमीनपूरा या भागातील विविध रोड, नाली,स्वच्छता,असे अनेक प्रश्न  निर्माण झालेले आहेत.कुरेशी नगर येथील  शादीखान्याचे काम अनेक वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे. वेळोवेळी नगरपरिषदेला निवेदन करून सुध्दा शहरातील विकास कामे होत नाहीत.शासनाचे करोडो रूपये निधी येऊन कामे होत नाही याचा परळीतील नागरिकांना खुप त्रास सहन करावा लागत आहे आदी  मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. परळी न प चे मुख्याधिकारी त्रिंबक  कांबळे यांच्या लेखी आश्वासनानंतर तसेच काही कामे तात्काळ सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर  आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. शहरातील विविध विकस कामाला वाचा फोडण्यासाठी   वंचितचे शहराध्यक्ष गफ्फार शहा, महासचिव मि

एक वही एक पेन अभियान

इमेज
  एक वही एक पेन अभियान वंचीत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवेल- हभप शामसुंदर सोन्नर परळी, प्रतिनिधी...      एक वही एक पेन हे अभियान वंचित, उपेक्षित राहिलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करीत आहे. असे प्रतिपादन विचारवंत व ज्येष्ठ पत्रकार ह. भ. प. श्यामसुंदर सोन्नर महाराज यांनी केले. ते परळी येथे एक वही एक पेन अभियान अंतर्गत संत धुराबाई आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना सदर साहित्य वाटप कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.    प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त युवा पत्रकार-अभिनेता विकास वाघमारे आणि सामाजिक कार्यकर्ते विकास रोडे यांनी परळी येथील संत धुराबाई आदर्श प्राथमिक आश्रम शाळेत 'एक वही एक पेन' अभियान राबवुन शालेय साहित्याचे वाटप केले. यावेळी बोलतान ह. भ. प. शामसुंदर सोन्नर म्हणाले की,एक वही एक पेन अभियान वंचीत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवेल.तसेच भारतात शिक्षणातून विद्यार्थी गळतीचे प्रमाण प्रचंड आहे. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवणे सरकारला प

वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थान: मोरारी बापुंच्या विधानानंतर काशी जगद्गुरुंनी केले महत्त्वपूर्ण विधान

इमेज
  देव एकच पण भेदभाव करू नका; परळी वैजनाथ हेच ज्योतिर्लिंग स्थान-काशी जगद्गुरु डॉ चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी  परळी वैजनाथ,प्रतिनिधी.....    देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी परळीचेच श्री वैजनाथ ज्योतिर्लिंग एक आहे, आरोग्य सुदृढ राहण्यासाठी श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे सर्व भाविक दर्शन घेऊन आशीर्वाद घेतात ,वैद्यांचा वैद्य श्री वैद्यनाथ येथे असल्याने श्री वैद्यनाथाच्या दर्शनामुळे भाविकांना सर्व सुख प्राप्त होते परंतु कोणीही देवाच्या बाबतीत भेदभाव करू नये, हिंदू धर्मात सर्व समाजाचा देव एकच आहे रूपे अनेक आहेत,नावे अनेक आहेत,असे त्यांनी स्पष्ट केले. बिहारमध्ये श्री वैद्यनाथ धाम असुन काही जण त्यालाच ज्योतिर्लिंग स्थान म्हणतात परंतु परळी वैजनाथ हेच ज्योतिर्लिंग स्थान असल्याचे स्पष्ट करुन काशी जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी सांगितले की, आद्य शंकराचार्यांनी  12 ज्योतिर्लिंगाची जेव्हा स्तुस्ती केली त्यात "परल्याम् वैद्यनाथंच्" म्हणजे परळी वैजनाथ (महाराष्ट्र) असा उल्लेख केलेला आहे असे ही जगद्गुरू यांनी परळीतील आपल्या आशीर्वाचनात सांगितले आहे.       पुरुषोत्तम मासा

संवेदनशील व अभिनव संकल्पना :कौतुकास्पद

इमेज
  मायेच्या धाग्याने रुग्ण भारावले: रुग्णालयातील रुग्णांना धोंडे जेवण व केला पूर्ण आहेर परळीच्या सौ.कीर्ती किरण धोंड यांचा संभाजीनगर येथे उपक्रम परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....           कुटुंब आणि नातेवाईकांसोबत आपण नेहमीच सण उत्सव असे आनंदाचे प्रसंग साजरे करत असतो. सध्या अधिकमास सुरू आहे. या निमित्ताने ठिकठिकाणी धोंडे जेवणाची लगबग सुरू आहे. लेक- जावयांना व पै पाहुण्यांना धोंडे जेवण देणे सध्या सुरू आहे. परंतु या सर्व गोष्टीला फाटा देत परळीच्या सौ. कीर्ती किरण धोंड यांनी आगळावेगळा उपक्रम राबविला असून संभाजीनगर (औरंगाबाद) येथील शासकीय कर्करोग रुग्णालयातील रुग्णांसोबत धोंडे जेवण व रुग्णांना पूर्ण आहार करत त्यांनी अधिक मास साजरा केला आहे. त्यांच्या या मायेच्या धाग्याने रुग्णालयातील रुग्ण भारावून गेले.             शासकी कर्करोग रुग्णालय औरंगाबाद येथे रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या उपचार घेणाऱ्या रुग्णांना अधिक महिन्यातील आनंदापासून वंचित राहायला लागू नये यासाठी म्हणून परळीच्या सौ कीर्ती किरण धोंड यांनी येथील वैद्यकीय अधिष्ठाता यांची परवानगी घेत रुग्णालयात दाखल असलेल्या

शेतकऱ्यांसाठी फायदेशीर:अत्यंत उपयुक्त ठरणार पाठपुरावा

इमेज
पीक नुकसानीची माहिती कळविण्याची मुदत 72 तासांवरून वाढवुन 92 तासांपर्यंत करण्यासाठी केंद्र सरकार कडे पाठपुरावा करणार कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची विधानसभेत माहिती *बुलढाणा जिल्ह्यातील थकीत पिकविम्या संदर्भात अहवालाची फेरतपासणी होणार - धनंजय मुंडे* मुंबई (दि. 27) - बुलढाणा जिल्ह्यात मागील वर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर सुमारे 3 लाख शेतकरी पीक विम्यास पात्र ठरले होते, मात्र पीक नुकसानीची माहिती विमा कंपनीच्या नियमानुसार 72 तासांच्या आत न कळवल्याने किंवा अन्य कारणांनी सुमरे 11 हजार शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही, किंवा अत्यंत त्रोटक विमा रक्कम मिळाली. याबाबत संपूर्ण नुकसानीच्या अहवालाची फेरतपासणी करण्यात येईल, असे आश्वासन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत बोलताना दिले.  बुलढाणा जिल्ह्यातील थकीत तसेच चुकीचा पीकविमा मिळाल्याच्या विषयी आ.श्वेताताई महाले यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या उत्तरात धनंजय मुंडे बोलत होते.  यावेळी धनंजय मुंडे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील एकूण शेतकऱ्यांनी भरलेला विमा हफ्ता, त्यांना मिळालेली रक्कम आदी आकडेवारी सभागृहात मांडली. त्याचबरोब
इमेज
  चि. राहुल सुनिल कामले चे बी कॉम पदवी परीक्षेत यश परळी वैजनाथ, प्रतिनिधी....  राहुल सुनिल कामले ने बी कॉम पदवी परीक्षेत घवघवीत  यशसंपादन केले आहे. त्याच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे चि. राहुल याने पुणे येथील भारतीय जैन संघटना (B J S) कॉलेज येथून B COM पदवी परीक्षेत  73.56 टक्के मार्क घेऊन A + श्रेणीत नुकताच उत्तीर्ण झाला आहे.लातूर येथील कामले परिवारातील श्री. सुनिल बलभीमराव कामले यांचा तो कनिष्ठ चिरंजीव आहे.त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. •••

पंकजा मुंडेंच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडणारा पत्रकार प्रा.रविंद्र जोशी यांचा विशेष ब्लॉग >>> मनस्विनी......!

इमेज
  ▪️ मनस्विनी......!   क र्तबगार-कर्तृत्ववान स्त्रियांच्या व्यक्तीमत्वाचा परिचय अस्सल शब्दश: अर्थाने करुन घेतांना विविध साहित्यिक साधनांचा विशेषत: विशेषणांचा धांडोळा घेतला तर त्याचे परिमाण देणारा शब्द म्हणजे मनस्विनी............       राजवैभव पायाशी लोटांगण घालत असतानासुद्धा नियतीने  जीवनात अनेक खडतर प्रसंग उभे केले. या प्रसंगांच्या वेळची  सोशिकता, सहनशीलता, प्रसंगावधान आणि नियतीवर मात करण्याची जबरदस्त जिद्द व महत्त्वाकांक्षा ज्यांच्या जीवन वाटचालीतून पाहावयास मिळते. स्वाभिमानी कारकीर्द आणि घेतलेला वसा आणि वारसा याच्या  संरक्षण-संवर्धनासाठी केलेली धडपड ,संघर्ष ज्यांच्या जीवन वाटचालीतून पाहावयास मिळते. याचा परामर्श घेतला तर आजच्या घडीला महाराष्ट्रात पंकजाताई मुंडे यांचं व्यक्तिमत्त्वच ठरते....मनस्विनी.               मनस्विनी हे विशेषण चपखल लागु होणारं व्यक्तिमत्व म्हणजे पंकजाताई मुंडे. आता तुम्ही म्हणाल मनस्विनी म्हणजे काय? तर मनस्विनी म्हणजे अनेक वैविध्यपूर्ण अर्थांचे विशेषण सामावणारा एक शब्द.पंकजाताईच्या  व्यक्तीमत्वाला साजेसं,अनुरूप नव्हे तर सर्वच अर्थ तोलून बघितले तर तंतोतंत जुळणा