पोस्ट्स

१०८ वाचकांकडून दररोज हनुमान चालीसा पारायण.

इमेज
धर्मापुरीत ‘अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा’ ज्ञानयज्ञास उद्यापासून प्रारंभ १०८ वाचकांकडून दररोज हनुमान चालीसा पारायण. परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : तालुक्यातील धर्मापुरी येथील जागृत देवस्थान श्री रोकडेश्वर मंदिरात श्रीराम नवमी व हनुमान जयंतीनिमित्त भव्य ‘अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ व हनुमान चालीसा पारायण’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, २६ मार्च रोजी दुपारी २ वाजता या भक्तिमय सोहळ्याचा शुभारंभ होणार असून परिसरात आधीच धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे ख्यातनाम ह.भ.प. भागवताचार्य कांतादेव महाराज (दादाहरी वडगावकर) यांच्या रसाळ वाणीतून सादर होणारी ‘श्रीमद् भागवत कथा’ होय. दररोज दुपारी १ ते ४ या वेळेत कथा होणार असून अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालत भाविकांना सखोल कथाश्रवणाचचा मिळणार आहे. सप्ताहानिमित्त कीर्तन महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले असून, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची उपस्थिती लाभणार आहे. दररोज रात्री ८ ते १० या वेळेत ह.भ.प. लिंबाजी महाराज आळंदीकर, ह.भ.प. श्रीकांतजी महाराज आळंदीकर, ह.भ.प. सुशांत मह...

नगरसेविकेचा स्तुत्य उपक्रम.....

इमेज
विद्यार्थ्यांसाठी केलेली गुंतवणूक भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची -  नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई  धर्माधिकारी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने नगरसेविका कविता इंगळे यांच्याकडून वाचनालयास पुस्तके भेट  परळी वैजनाथ (प्रतिनिधी)    विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी केलेली गुंतवणूक भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी केले.त्या डॉ.भालचंद्र वाचनालयासाठी नगरसेविका कविता अनंत इंगळे यांच्यावतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभ्यासिकेसाठी स्पर्धा पुस्तके भेट देण्यात आली.त्या स्विकारतांना त्या बोलत होत्या.     नगरसेविका सौ .कविता अनंत इंगळे यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 जयंती निमित्ताने परळीचे वैभव असलेल्या डॉ.भालचंद्र वाचनालयातील स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या अभ्यासिकेसाठी स्पर्धा परीक्षा पुस्तके भेट दिली. ही पुस्तके नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, शिक्षण सभा...

लेकीकडे निघालेल्या आजींना भलतीकडे नेऊन लुटले...

इमेज
'त्या' ऑटोवाल्याला पकडले ;परळी पोलिसांची तत्परता: महिला लूटप्रकरणातील पती-पत्नीला २४ तासांत अटक परळी वैजनाथ:  प्रतिनिधी..        अंबलवाडी घाट परिसरात एका महिलेला लुटणाऱ्या रिक्षाचालक पती-पत्नीला परळी शहर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी ही कौतुकास्पद कामगिरी केली. घटनेचा तपशील: २२ मार्च २०२६ रोजी पीडित महिलेला ऑटोमध्ये लुटल्याची घटना घडली होती. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवण्यात आली. अशी झाली कारवाई: तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढत, २४ मार्च रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींची ओळख: अटक करण्यात आलेल्यांमध्ये मनोज उर्फ सायस केद्रे (वय २८) आणि त्याची पत्नी वैष्णवी मुडे (वय २०, रा. फावडेवाडी, ता. रेणापूर) यांचा समावेश आहे. गुन्ह्यात वापरलेला ऑटोदेखील पोलिसांनी जप्त केला आ...

संसदेत कांदा उत्पादकांसाठी एल्गार

इमेज
  संसदेत कांदा उत्पादकांसाठी एल्गार खासदार बजरंग सोनवणे यांचे आंदोलन; हमीभाव, निर्यातमुक्ती व सीबीआय चौकशीची मागणी नवी दिल्ली : देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संसद भवन परिसरात आज जोरदार आंदोलन करण्यात आले. खासदार बजरंग सोनवणे यांनी हे आंदोलन करत केंद्र सरकारचे लक्ष वेधले. कांद्याच्या दरातील सततची घसरण आणि निर्यातीवरील निर्बंधांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रासह देशभरातील बाजारपेठेत कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही परत मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या मांडल्या. कांद्याला कायदेशीर हमीभाव लागू करावा, निर्यातीवरील सर्व निर्बंध हटवून कांदा निर्यात पूर्णपणे मुक्त करावी आणि साठेबाजी तसेच धोरणात्मक अनियमिततेबाबत Central Bureau of Investigation (केंद्रीय अन्वेषण विभाग) मार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. “शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळत नाही...

परळीकरांच्या वतीने शोभायात्रा काढत मंगलमय स्वागत...

इमेज
  म्हैसूर मठाचे पीठाधीश्वर जगद्गुरु परमपूज्य श्री श्री शंकर भारती महास्वामीजी यांनी घेतलं ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन मंगल वाद्यासह जयघोषात महास्वामीजींचे परळीकर भाविकांनी केलं आत्मीय स्वागत वैद्यनाथ मंदिराचा अनादी काळापासूनचा वारसा अतिशय चांगला जतन केल्याचे व्यक्त केले समाधान परळी वैजनाथ, प्रतिनिधी...            म्हैसूर येथील येडतोर श्री योगानंदेश्वर सरस्वती मठाचे पीठाधीश्वर जगद्गुरु परमपूज्य श्री श्री शंकर भारती महास्वामीजी यांनी आज (दि.२३) बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाची मनोभावे पूजा करून दर्शन घेतले. परळीकर भाविक भक्तांच्या वतीने महास्वामीजींचे जोरदार मंगलमय स्वागत करण्यात आले. मंगल वाद्यांसह जयघोषात संत जगमित्रनागा मंदिर ते वैद्यनाथ मंदिर अशी स्वागत शोभायात्रा काढण्यात आली.            आद्य शंकराचार्यांच्या शृंगेरी शारदा पिठाच्या अद्वैत परंपरेतील महान विभूती आणि अद्वैत वेदांताच्या प्रचार- प्रसारासाठी कार्यरत असणारे, संपूर्ण देशभर प्रवास करून धर्मजागृती संस्कार आणि अध्यात्मिक मार्ग...

आमदार, खासदार, मंत्र्यासह मुख्यमंत्र्यांना साकडे

इमेज
  परळी - सेलु - बोंदरगाव त्वरीत सिमेंट रोड करा-- सौ.शिवकन्या फड परळी वैजनाथ - प्रतिनिधी.. परळी - सेलु - बोंदरगाव त्वरीत सिमेंट रोड करावा अशी मागणी सेलु येथील सरपंच सौ.शिवकन्या फड व सर्व नागरीकांनी केली आहे.  परळी-सेलु-बोंदरगाव जातांना खुप खड्डे आहेत. अक्षरशः सर्व नागरीकांना आपला जीव  मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. बऱ्याच वर्षापासुन खड्यातुन वाट काढून जावे लागते. अनेक गाड्या पावसाळ्यात तर चिखलामध्ये फसतात. त्यामुळे नागरीकांना खुपच त्रास सहन करावा लागत आहे.  मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पामध्ये जाहिर केल्यानुसार 1 हजाराच्या वर लोकसंख्या असलेले गाव सिमेंट रोडने जोडणार असे नमूद केले आहे. तेव्हा परळी-सेलु-बोंदरगाव रोड त्वरीत सिमेंट रोड करावा यासाठी जिल्हयाचे पालकमंत्री सुनेत्रा पवार, खासदार बजरंग सोनवणे, या विभागाचे आमदार धनंजय  मुंडे, पर्यावरण पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंंडे, जिल्हाधिकारी इत्यादींना याबाबत पत्र देवून मुख्यमंत्र्यांना साकडे घालून ईमेलद्वारे व स्पीड पोस्टाद्वारे, प्रत्यक्षात प्रश्न सोडवण्याची विनंती केली आहे. तेव्हा आमच्या या निवेदनाची सर्वजण दखल घेवून...
इमेज
  पाणी नियोजनानेच दुष्काळावर मात शक्य : प्रसाद देशमुख परळी वैजनाथ दि.२३ (प्रतिनिधी).. कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात ‘जागतिक पाणी दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. सोमवारी (ता.२३) राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने विशेष प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.       या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष प्रसाद देशमुख होते, तर प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. विवेकानंद कवडे उपस्थित होते. प्रा. विवेकानंद कवडे यांनी आपल्या मार्गदर्शनात पाण्याच्या मर्यादित उपलब्धतेकडे लक्ष वेधले. पृथ्वीवर विपुल प्रमाणात पाणी असले तरी त्यापैकी केवळ ०.३ टक्के पाणीच मानवासाठी वापरण्यायोग्य असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पिण्यायोग्य पाण्याचे जतन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तसेच पाणी पिण्यापूर्वी त्याचे शुद्धीकरण कसे करावे, याबाबत मार्गदर्शन करत शुद्ध पाण्याच्या वापरातून आरोग्य कसे चांगले राखता येते, यावरही त्यांनी सविस्तर माहिती दिली.यावेळी त्यांनी पाण्याचे प्रदूषण टाळण्याचे आणि पाण...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!