पोस्ट्स

मोहा येथील घटनेने बीडमध्ये हळहळ

इमेज
  बांधकामावरून पडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू बीड प्रतिनिधी —        मोहा ता. परळी येथील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून खाली पडल्याने एका २८ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अमोल विलास माने (वय २८, रा. गोविंद नगर, धानोरा रोड, बीड) असे मृत युवकाचे नाव आहे.या दुर्दैवी घटनेची सिरसाळा पोलीस ठाण्यात  बीएनएसएसच्या कलम १९४ अंतर्गत अनैसर्गिक मृत्युची नोंद करण्यात आली असुन पोलीस हवालदार विष्णु नामदेव शेंडगे अधिक तपास करत आहेत .     याबाबत मयताची आई निर्मला विलास माने यांनी सिरसाळा पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १२ मे २०२६ रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास कंत्राटदार मुस्ताक कादरी व कामगार अक्षय गायकवाड आणि शेख अजीन हे त्यांच्या घरी आले. त्यांनी अमोल हा मोहा येथील बांधकाम साईटवर काम करत असताना दुसऱ्या मजल्यावरील टेरेसवरून खाली पडल्याचे सांगितले. त्याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने शासकीय रुग्णालय, अंबाजोगाई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र नंतर नाते...
इमेज
  रंगकर्मी प्रदीप भोकरे यांना स्मृतिशेष विजयकुमार धायगुडे रंगकर्मी पुरस्कार प्रदान परळी प्रतिनिधी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, महानगर शाखा लातूर यांच्या वतीने दिले जाणारे विविध पुरस्कार काल दिमाखदार वातावरणात वितरीत करण्यात आले. रंगभूमी, अभिनय आणि नाट्य चळवळीतील उल्लेखनीय कार्याचा गौरव करत हा सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात स्मृतिशेष विजयकुमार धायगुडे रंगकर्मी पुरस्कार रंगकर्मी श्री. प्रदीप भोकरे यांना, स्मृतिशेष बंकटराव पुरी पुरस्कार श्री. संकर्षण कऱ्हाडे यांना तर रंगमंचीय कार्यगौरव पुरस्कार सौ. नीलम शिर्के-सामंत यांना प्रसिद्ध अभिनेते डॉ. मिलिंद शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. परळी सिने-नाट्य कलावंत संघटनेचे अध्यक्ष असलेले रंगकर्मी प्रदीप भोकरे हे सातत्याने रंगभूमीवर सक्रिय असून त्यांनी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धा, बाल नाट्य तसेच कामगार कल्याण नाट्य स्पर्धांमध्ये नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे. लेखक, अभिनेता, दिग्दर्शक आणि रंगतंत्रज्ञ या विविध क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले असून त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना स्मृतिशेष विजयकुमार धायगुडे रंगकर...

शासनाकडून हरकती व सूचना मागवल्या...

इमेज
छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये देवस्थान इनाम जमिनींसंदर्भात याआधीच कायदे अस्तित्वात! देवस्थान इनाम जमिनींबाबत नवीन कायदा लागू होणार   मुंबई: प्रतिनिधी..... राज्यातील देवस्थान इनाम जमिनींशी संबंधित गुंतागुंत सोडवण्यासाठी आणि नागरिकांना कायदेशीर अधिकार मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठे पाऊल उचलले आहे. 'महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम, २०२६' चे प्रारूप (Draft) महसूल व वन विभागाकडून तयार करण्यात आले असून, यावर नागरिकांकडून ५ जून २०२६ पर्यंत हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. नवीन कायद्याची गरज का? सध्या राज्यात केवळ छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये देवस्थान इनाम जमिनींसंदर्भात 'हैदराबाद इनामे व रोख अनुदाने नाहीसे करण्याबाबतचा अधिनियम, १९५४' आणि 'हैदराबाद अतियात चौकशी अधिनियम, १९५२' हे कायदे अस्तित्वात आहेत. मात्र, उर्वरित महाराष्ट्रात असा कोणताही स्वतंत्र कायदा नसल्याने देवस्थान आणि नागरिकांना विविध कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही गुंतागुंत सोडवून इतर जमिनींप्रमाणेच या जमिनींबाबतही नागरिकांना कायदेशीर हक्क देण्याचा शासनाचा विचार आहे. सूचना...

विशेष लेख >>>>प्रवीण टाके (उपसंचालक, (माहिती)विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर)

इमेज
  चला ! देशापुढे महाराष्ट्राच्या बचतीचा आदर्श ठेवूया !       ज्या ज्या वेळी देशावर संकट येते, त्या त्या वेळी महाराष्ट्र हा दिल्लीच्या मदतीला धावून जातो. “हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला ” ही महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासूनची आपली भूमिका आजही तितकीच जिवंत आहे. युद्ध असो, टंचाई असो, महापूर असो की महामारी-महाराष्ट्राने प्रत्येक संकटात देशाच्या पाठीशी उभे राहत मदतीचा नवा आदर्श निर्माण केला आहे. पश्चिम आशियातील वाढते तणाव आणि त्यातून निर्माण झालेल्या जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आज देश पुन्हा एका मोठ्या आव्हानासमोर उभा आहे. या संकटाचा कालावधी किती असेल हे आपल्या हातात नसले, तरी या अशा काळात संयम, शिस्त आणि बचत यामधून देशाच्या अर्थकारणाला बळ देण्याचे मोठे काम महाराष्ट्र करु शकतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात सर्वप्रथम आवाहन केले. त्यांनी देशवासियांना केलेले आवाहन हे केवळ खर्च कमी करण्याचे नाही, तर राष्ट्रहितासाठी जीवनशैली बदलण्याचे आहे. 'जितकी बचत, तितकी राष्ट्रसेवा' हा संदेश त्यांनी अत्यंत स्पष्टपणे दिला आहे. अनावश्यक ...

आनंद शिंदे यांच्या भीमगीतांचा रंगणार जल्लोष...

इमेज
  सिरसाळा येथे बुद्धरूप अनावरण व बुद्ध विहार लोकार्पण सोहळ्याचे आयोजन ना. संजय शिरसाट,ना. पंकजाताई मुंडे, माजी मंत्री  आ.धनंजय मुंडे व डॉ. हर्षवर्धन कांबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम परळी प्रतिनिधी - परळी तालुक्यातील सिरसाळा येथे रविवार दि. २४ मे २०२६ रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या बुद्धरूपाचे अनावरण तसेच सम्राट अशोक बुद्ध विहाराच्या लोकार्पणाचा भव्य दिव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवानिमित्त परिसरात उत्साहाचे आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले असून पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. सम्राट अशोक बुद्ध विहार, कुशी नगर, सिरसाळा येथे होणाऱ्या या कार्यक्रमास विविध मान्यवर, भन्तेजी, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी तसेच बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. आयोजकांनी सर्व नागरिकांना उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता पंचशील धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करून होणार असून पूज्य भन्ते डॉ. धम्मप्रिय महास्थवीर (अध्यक्ष, भीम जन्मभूमी महू, मध्यप्रदेश) यांच्या हस्ते हा विधी पार पडणा...
इमेज
 डॉ. श्रीगणेश मुंडे यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव परळी प्रतिनिधी: परळी वैजनाथ येथील मूळ रहिवासी तथा महानिर्मिती कंपनीमध्ये कार्यरत असलेले डॉ. श्रीगणेश महादेव मुंडे यांना प्रशासकीय कार्य, मानव संसाधन व्यवस्थापन, सुनियोजन आणि सामाजिक बांधिलकीच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांकडून गौरविण्यात आले आहे. आयएफईए संस्थेच्या वतीने उत्कृष्ट प्रशासकीय व मानव संसाधन व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. तसेच ग्लोबल एक्सेललेन्स समिट २०२६ तर्फे त्यांच्या विशेष कार्याबद्दल अभिनंदन पत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या सर्वांगीण कार्याची दखल घेत अमेरिकन मॅनेजमेंट युनिव्हर्सिटीने त्यांना मानद पीएच.डी. पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. डॉ. श्रीगणेश मुंडे यांनी D. Pharm, B. Pharm, MBA (HR) तसेच YCMOU अंतर्गत PhD Scholar म्हणून शिक्षण घेतले आहे. सध्या महानिर्मिती कंपनीच्या मुख्यालय मुंबई येथे मुख्य लिपिक म्हणून ते कार्यरत असून यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषद जालना येथे औषध निर्माण अधिकारी तसेच परळी वैजनाथ थर्मल विद्...

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-४ अंतर्गत निधी मंजूर; ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण

इमेज
  खा.बजरंग सोनवणे यांच्या प्रयत्नांना मोठे यश गेवराई तालुक्यातील 'एमडीआर-२० ते यमगरवाडी' रस्ता कामाला मंजुरी! प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-४ अंतर्गत निधी मंजूर; ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण  बीड: गेवराई तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांचा आणि दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर गेवराई तालुक्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तालुकयातील L021 एमडीआर-२० ते यमगरवाडी या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाला अखेर 'प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-४' (PMGSY-IV) अंतर्गत प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. बीडचे खा. बजरंग सोनवणे यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक प्रयत्नांना यामुळे मोठे यश आले असून, या रस्त्यासाठी १ कोटी ३७ लक्ष २९ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने (नवी दिल्ली) १८ मे २०२६ रोजी या कामाला अधिकृत मंजुरी दिली असून, यामुळे परिसरातील ग्रामस्थांची अनेक वर्षांची मोठी अडचण दूर होणार आहे.  गेवराई तालुक्यातील एमडीआर-२० ते यमगरवाडी...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या