पोस्ट्स

इमेज
ग्लोबल विकास ट्रस्टच्या सहाय्यातून 30 गुंठ्यांत सव्वातीन लाखांचे उत्पन्न! लिंबू शेतीतून डिगंबर गडदे यांचा यशस्वी प्रयोग परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी तालुक्यातील वाघाळा येथील शेतकरी डिगंबर जिजाराम गडदे यांनी अल्पभूधारक असूनही आधुनिक पद्धतींचा अवलंब करत लिंबू शेतीत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. केवळ 1 एकर शेती असलेल्या गडदे यांनी 2019 साली 30 गुंठे जमिनीत 100 लिंबूची रोपे लावून शेतीत नवा प्रयोग सुरू केला. या लिंबू बागेला लागवडीपासून अवघ्या 27 महिन्यांत फळधारणा सुरू झाली. ग्लोबल विकास ट्रस्टचे सुयोग्य मार्गदर्शन आणि गडदे यांनी केलेल्या नियोजनामुळे चालू वर्षात त्यांनी सुमारे 9 क्विंटल लिंबू उत्पादन घेतले आहे. सध्या बाजारात लिंबाला 125 रुपये प्रति किलोपर्यंत भाव मिळत असला तरी, कधी कधी हा दर 10 रुपयांपर्यंत घसरतो. अशा चढ-उतारांमध्येही गडदे यांना सरासरी 40 रुपये प्रति किलो दर मिळाला. लिंबू लागवडीतूनआतापर्यंत त्यांनी सुमारे 3.25 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. विशेष म्हणजे, या शेतीसाठी त्यांचा एकूण खर्च केवळ 10 हजार रुपयांच्या आसपास राहिला आहे. ग्लोबल विकास ट्रस्टच्या माध्यमातून त्यांना लिंब...

सर्व स्तरातून अभिनंदन....

इमेज
'मृद विज्ञान' आणि 'मशिन लर्निंग'चा संगम; परळी तालुक्यातील मांडव्याच्या सुपुत्राला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून पीएचडी प्रदान परळी वैजनाथ, प्रतिनिधी:       आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती क्षेत्रातील समस्यांवर उपाय शोधणे काळाची गरज बनली आहे. याच विचारातून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने गिरीश दशरथ चाटे यांना त्यांनी सादर केलेल्या संशोधन प्रबंधाबद्दल 'डॉक्टरेट' (पीएचडी) पदवी प्रदान केली आहे.        गिरीश चाटे यांनी "A Novel Framework for Soil image Classification Using Machine Learning" या विषयावर आपले संशोधन पूर्ण केले. त्यांनी त्यांच्या संशोधनात मृद विज्ञान (Soil Science) आणि मशिन लर्निंग (Machine Learning) या दोन भिन्न क्षेत्रांची सांगड घालत मातीच्या वर्गीकरणासाठी एक नवीन 'फ्रेमवर्क' विकसित केले आहे. या तंत्रज्ञानामुळे मातीचे अचूक आणि जलद वर्गीकरण करणे शक्य होणार असून, याचा मोठा फायदा कृषी क्षेत्राला होऊ शकतो. विद्यापीठातील कॉम्प्युटर सायन्स विभागाचे  डॉ. संदीप एस. भामरे यांचे त्यांना संशोधन मार्गदर्शक म्हणून मो...

परळी येथे सत्कार.....

इमेज
  मनातली इच्छा जिद्द आणि चिकाटीने मिळवता येते -उपशिक्षणाधिकारी सुशील फुलारी परली वैजनाथ - मनातली इच्छा जिद्द आणि चिकाटीने मिळवता येते असे प्रतिपादन नुकतेच लातुर येथे नवनियुक्त उपशिक्षणाधिकारी सुशील फुलारी यांनी परळी येथे आयोजित सत्कार सोहळ्यात केले.  सतत प्रयत्न जिद्द चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर हे यश साध्य केले आहे. या कार्यक्रमासाठी परळी फुलारी मित्र मंडळाच्या वतीने नियोजन माधवबाग येथे करण्यात आले होते कार्यक्रमासाठी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून राष्ट्रपती पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक माजी सैनिक अरविंद गणपतराव फुलारी, प्रमुख  पाहुणे परळी तालुका ओबीसीचे अध्यक्ष विलासजी ताटे, मराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. यल्लावाड, अखिल भारतीय फुलारी समाज चे अध्यक्ष सुधीर फुलारी व सत्कारमूत उपशिक्षणाधिकारी सुशील फुलारी यांचे उपस्थिती होती. कार्यक्रमात परळीतील फुलारी परिवारातील सर्वांनी उपस्थिती लावली तसेच परिवाराचे स्नेही मित्र मंडळातील मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभासदांची व इतर शिक्षक मित्रमंडळींनी या सत्कारासाठी आवर्जून उपस्थिती लावली होती. मनोगतामध्ये अनंत मुंडे सर प्...

सर्व स्तरातून अभिनंदन...

इमेज
  शेख मुदस्सीर यांची 'सकल मुस्लिम युवक संघाच्या' प्रदेश संघटक पदी निवड परळी /प्रतिनिधी :-           परळी येथील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय तसेच पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय असलेले शेख मुदस्सीर नसीर यांची सकल मुस्लिम युवक महाराष्ट्र संघटनेच्या प्रदेश संघटक पदी निवड करण्यात आली आहे. ही निवड दिनांक २३ एप्रिल रोजी करण्यात  आहे. शेख मुदस्सीर हे मागील अनेक वर्षांपासून समाजकारण आणि पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहेत. सामाजिक प्रश्नांची चांगली जाण, लोकांशी संवाद साधण्याची क्षमता आणि युवकांना एकत्र  कौशल्य यामुळे त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध सामाजिक मुद्द्यांवर त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला असून, गरजूंना मदत करणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि समाजात जागरूकता निर्माण करणे यामध्ये त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण कामाची तसेच सकल मुस्लिम युवक महाराष्ट्र संघटनेसोबत सुरुवातीपासून असलेल्या सहभागाची दखल घेत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अझरुद्दीन सय्यद यांनी त्यांची प्रदेश संघटक म्हणून निवड केली आहे.  " ही जबाबदारी माझ्यास...

घवघवीत यश .....सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन

इमेज
  वैद्यनाथ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग व फिजिओथेरपी कॉलेजचा विद्यापीठ परीक्षेत दैदिप्यमान निकाल परळी वैजनाथ (प्रतिनिधी):         येथील वैद्यनाथ सर्वांगीण विकास प्रतिष्ठान संचलित 'वैद्यनाथ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग व फिजिओथेरपी कॉलेज'ने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक द्वारे घेण्यात आलेल्या हिवाळी २०२५ च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. कॉलेजचा निकाल अत्यंत उत्कृष्ट लागला असून विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली आहे.     विद्यापीठाने जाहीर केलेल्या निकालानुसार, कॉलेजमधील विविध सत्रांचा निकाल देदीप्यमान लागला आहे. बीएससी नर्सिंग  ३ रे सेमिस्टर: ८०%,  बीएससी नर्सिंग४ थे सेमिस्टर: ९२.४५%, बीएससी नर्सिंग ५ वे सेमिस्टर: १००% (पूर्ण निकाल),बीएससी नर्सिंग ६ वे सेमिस्टर: ९७.०५%,  बीएससी नर्सिंग ७ वे सेमिस्टर: १००% (पूर्ण निकाल) विशेष म्हणजे ५ व्या आणि ७ व्या सेमिस्टरचा निकाल १०० टक्के लागला असून, विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.        या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक  डॉ. सूर्यकांत मुंडे...

न.प. ची अतिक्रमण हटाव मोहिम : कायमस्वरूपी पथकाची स्थापना

इमेज
न.प. ची अतिक्रमण हटाव मोहिम : कायमस्वरूपी पथकाची स्थापना अतिक्रमणे काढण्यात कोणताही भेदभाव होणार नाही ; सर्व नागरिकांना सारखाच न्याय - मुख्याधिकारी परळी वैजनाथ (प्रतिनिधी):        परळी वैजनाथ शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि नागरी सुविधांमधील अडथळे दूर करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर ‘अतिक्रमण हटाव मोहीम’ राबवण्याची सुरुवात करण्यात आलेली आहे.,अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी कायमस्वरूपी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. अतिक्रमणे काढण्यात भेदभाव होणार नाही. सर्व नागरिकांना सारखाच न्याय  दिला जाणार आहे. ही कारवाई पूर्णपणे कायदेशीर व पारदर्शक पद्धतीने केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी पी. एन. निगळ यांनी अधिकृत निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.         शहरातील मुख्य रस्ते, सार्वजनिक जागा आणि प्रामुख्याने नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीची कोंडी व स्वच्छतेचे प्रश्न निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर, नगर परिषदेने भेदभाव न करता सरसकट कारवाईचे धोरण स्वीकारले आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेत सातत्य राखण्यासाठी प्रशासनाने एक ‘क...

घाटनांदूर रेल्वेथांब्यासाठी प्रस्ताव द्या..

इमेज
  १५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा रेल्वे व महामार्ग आढावा बैठकीत खा.बजरंग सोनवणे यांच्या अधिकाऱ्यांना निर्देश बीड: मागील दोन वर्षात रेल्वे कामाला गती दिलेली आहे. आता रेल्वेचे काम युध्द पातळीवर करून १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत पुणे ते परळी रेल्वे धावलीच पाहिजे, शिवाय बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासहित ग्रामीण मार्गावरील ब्लॅकस्पॉट कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश खा.बजरंग सोनवणे यांनी रेल्वे व राष्ट्रीय महामार्ग आढावा बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागाच्या हॉलमध्ये रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग आढावा बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत विविध प्रलंबित कामे, भूसंपादन, निकृष्ट दर्जा, अपघातप्रवण ठिकाणे व नागरिकांच्या अडचणी यांसह सर्वच मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, रेल्वे व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी उपस्थित होते. खा.बजरंग सोनवणे यांनी बैठकीत अंबाजोगाई, केज, नेकनूर, मांजरसुंबा, पाटोदा व माजलगाव शहरांभोवती बायपास व उड्डाणपूल उभारण्याचा मुद्दा उपस्...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....