पोस्ट्स

इमेज
ग्लोबल विकास ट्रस्टच्या प्रशिक्षणातून रेशीम शेतकऱ्याची उत्तुंग भरारी एका बॅचमध्ये एका महिन्यात 1 लाखांपेक्षा अधिक उत्पादन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ग्लोबल विकास ट्रस्टच्या शास्त्रीय प्रशिक्षणाचा आणि सातत्यपूर्ण तांत्रिक मार्गदर्शनाचा लाभ घेत बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने रेशीम उद्योग बंद करण्याच्या निर्णयापासून थेट एका बॅचमध्ये 1 लाखांपेक्षा अधिक उत्पादन घेण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास पूर्ण केला आहे. परळी तालुक्यातील इंजेगाव येथील शेतकरी गोपाल गोविंद कराड हे मागील दोन वर्षांपासून तुती लागवड करून रेशीम उद्योग करत होते. मात्र अपेक्षित उत्पादन मिळत नसल्यामुळे त्यांच्या रेशीमच्या बॅचेस वारंवार फेल जात होत्या. त्यामुळे आर्थिक नुकसान होत होते आणि त्यांनी रेशीम उद्योग बंद करण्याचा निर्णय घेतला होता. अशा परिस्थितीत मे महिन्यात ग्लोबल विकास ट्रस्टच्या कृषिकुल शेतकरी प्रशिक्षण केंद्रात आयोजित रेशीम शेती प्रशिक्षणात त्यांनी सहभाग घेतला. प्रशिक्षणादरम्यान शास्त्रीय पद्धतीने रेशीम संगोपन, बॅच व्यवस्थापन, रोग नियंत्रण, पानांचे नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर याविषयी सविस्तर मार्गदर्शन...
इमेज
श्रद्धेला सामाजिक बांधिलकीची जोड; मच्छिंद्रनाथ देवस्थानाला २.५१ लाखांची चांदी अर्पण  कडा : प्रतिनिधी आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील श्रीक्षेत्र मायंबा मच्छिंद्रनाथ देवस्थानाच्या विकासासाठी भाविक, उद्योजक आणि दानशूर व्यक्तींकडून सहकार्याचा ओघ वाढला आहे. आष्टी तालुका मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष तथा युवा उद्योजक अशोक चौधरी यांनी देवस्थानासाठी एक किलो चांदीची वस्तूरूप देणगी दिली. सुमारे २ लाख ५१ हजार रुपये किमतीची ही देणगी बुधवार, १२ ऑगस्ट रोजी आमदार सुरेश धस यांच्या उपस्थितीत देवस्थानाकडे सुपूर्द करण्यात आली. श्रीक्षेत्र मायंबा मच्छिंद्रनाथ देवस्थान हे आष्टी तालुक्यासह राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. देवस्थानाच्या विकासासाठी विविध स्तरांतून प्रयत्न सुरू असून, आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर उभारणीसह विविध विकासकामांना गती देण्यात येत आहे. या विकासकामांना हातभार लागावा, या उद्देशाने अशोक चौधरी यांनी रोख रकमेऐवजी चांदीच्या स्वरूपात देणगी देत धार्मिक श्रद्धेसोबत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. चौधरी यांनी दिलेली १ हजार ग्रॅम म्हणजेच एक किलो चांदी देवस्थानाच्या...

मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन...

इमेज
  तालुका विधी सेवा समिती, परळी वै. यांच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी वॉकेथॉन रॅलीचे आयोजन परळी वैजनाथ, प्रतिनिधी...  स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून बालकांचे हक्क, संरक्षण, शिक्षण आणि न्याय याबाबत जनजागृती करण्यासाठी तालुका विधी सेवा समिती, परळी वै. यांच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी वॉकेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ध्वजारोहण समारंभानंतर दिवाणी न्यायालय, कनिष्ठ स्तर, परळी वै. येथून मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी आठ वाजून 30 मिनिटांनी या वॉकेथॉनला सुरुवात होणार आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड, तालुका विधी सेवा समिती, परळी वै., वकील संघ परळी वै., तालुका पोलीस प्रशासन तसेच इंटरनॅशनल जस्टिस मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. बीड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. दिनेश पी. सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये विधिज्ञ, न्यायालयीन कर्मचारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, पोलीस अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. बालकांशी संबंधित विविध...

बीडच्या माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीने चैतन्य....

इमेज
  माजलगावात भाजपाची भव्य तिरंगा रॅली; देशभक्तीच्या जयघोषाने दुमदुमले शहर माजलगाव (प्रतिनिधी) : बीडच्या माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजलगाव येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य-दिव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. हातात डौलाने फडकणारे तिरंगे, देशभक्तीपर घोषणा आणि उत्स्फूर्त नागरिकांचा सहभाग यामुळे संपूर्ण शहरात राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. रॅलीदरम्यान ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक तसेच नागरिक सहभागी झाले होते. रॅलीतील तिरंग्यांची आकर्षक सजावट आणि देशभक्तीचा उत्साह लक्षवेधी ठरला. डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. देशाची एकता, अखंडता आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देणारी ही तिरंगा रॅली माजलगावकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे भव्य स्वरूपात पार पडली. रॅलीच्या माध्यमातून ‘तिरंगा हा केवळ ध्वज नसून देशाच्या स्वाभिमानाचे आणि एकतेचे प्रतीक आहे’, हा संदेश देण्यात आला. संपूर्ण रॅलीदरम्यान नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना ओ...

मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन......

इमेज
  उद्या परळीत तिरंगा रॅली ; सहभागी होण्याचे भाजपचे आवाहन परळी वैजनाथ, दि. १२ : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने परळी शहरात उद्या गुरुवार, दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. पंकजाताई मुंडे आणि खासदार प्रीतमताई मुंडे यांच्या सूचनेनुसार ही रॅली काढण्यात येणार असून, भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅलीला सुरुवात होणार असून बस स्टँड रोड, एक मिनार चौक, स्टेशन रोड मार्गे मार्केट कमिटी येथे रॅलीचा समारोप होणार आहे. या तिरंगा रॅलीमध्ये शहरातील ज्येष्ठ मंडळी, प्रमुख पदाधिकारी, विविध संस्थांचे संचालक, नगरसेवक, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख तसेच भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. राष्ट्रभक्तीचा संदेश देणाऱ्या या रॅलीत नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन भाजप तालुकाध्यक्ष राजेश गित्ते, वसंत निर्मळ, शहराध्यक्षा सौ. उमाताई समशेट्टे यांनी केले आहे.
इमेज
  संतभूमी संरक्षणाच्या लढ्याला महाराष्ट्रव्यापी दिशा; पुण्यात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न पुणे, दि. १० ऑगस्ट २०२६ : संतभूमीच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या संतभूमी संरक्षक संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुणे येथे दि. १० ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील निष्ठावंत वारकरी, संतप्रेमी, पर्यावरणवादी, इतिहास संशोधक व अभ्यासकांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. सन २००७ पासून सुरू असलेल्या संतभूमी संरक्षणाच्या आंदोलनाचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या लढ्याला आता अधिक व्यापक आणि संघटित स्वरूप देण्याचा निर्णय उपस्थितांच्या सर्वसंमतीने घेण्यात आला. बैठकीत प्रामुख्याने पुढील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले— १) आंदोलनाची संपूर्ण महाराष्ट्रभर व्याप्ती वाढविणे. संतभूमी, भंडारा-भामचंद्र आणि त्याच्याशी संबंधित ऐतिहासिक, सांस्कृतिक व पर्यावरणीय वारशाच्या संरक्षणाचा विषय महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि गावापर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. २) ‘भंडारा-भामचंद्र बचाव मुक्ती संघ...

दिव्यांग भाविकांसाठी सुलभ दर्शनाची मागणी...

इमेज
  पवित्र श्रावण महिन्यात प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी परळी तालुक्यातील भाविकांसाठी स्वतंत्र दर्शन रांग करा – डॉ. संतोष मुंडे दिव्यांग जेष्ठ नागरिक यांना स्वतंत्र दर्शन रांग करा -डॉ. संतोष मुंडे परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- पवित्र श्रावण महिन्यात प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यांतून लाखो भाविक परळी वैजनाथ येथे येत आहेत. मंदिरात दर्शनासाठी मोठ्या रांगा लागत असल्याने स्थानिक भाविकांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे परळी वैजनाथ तालुक्यातील भाविकांसाठी स्वतंत्र दर्शन रांग सुरू करावी, अशी मागणी दिव्यांग मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केली आहे. तसेच दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र दर्शन रांग, व्हीलचेअर आणि वॉकरची व्यवस्था करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. तसेच आ. धनंजय मुंडे, ना. पंकजाताई मुंडे, तहसीलदार व वैद्यनाथ मंदिर देवल कमिटी यांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.  हिंदू धर्मात श्रावण महिना हा भगवान शंकराची आराधना, उपासना आणि भक्तीचा सर्वात पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात देशभरातील शिवमंदिरांमध्ये भावि...