खा. बजरंग सोनवणे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्यासाठी शासनाने तातडीने संवाद साधावा खा. बजरंग सोनवणे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र बीड : मराठा आरक्षणाच्या संवेदनशील व न्याय्य मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या बिघडणाऱ्या प्रकृतीची शासनाने तातडीने दखल घ्यावी, तसेच त्यांच्याशी सकारात्मक संवाद साधून हे उपोषण सोडवण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा, असे पत्र बीड लोकसभेचे खा.बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. याबाबत खा.बजरंग सोनवणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ३१ ऑगस्ट २०२६ रोजी पाठवलेल्या पत्रात मराठा समाजाच्या वेदना आणि सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य स्पष्टपणे मांडले आहे. पत्रात नमूद करण्यात आले आहे की, मनोज जरांगे पाटील हे २९ ऑगस्ट २०२६ पासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषणास बसले आहेत. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना वारंवार आंदोलनाचा व उपोषणाचा खडतर मार्ग स्वीकारावा लागत आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक असून सततच्या उपोषणामुळे आता त्यांच्या आरोग्यावर आणि प्रकृतीवर गंभीर विपरीत परिणाम ह...