पोस्ट्स

इमेज
प्रामाणिकपणाची ‘गौरव’ गाथा! : ‘सापडले ते आपले नाही’ प्रेरक दृढ भावना एटीएम मध्ये सापडली रक्कम; गौरव इंगळेंनी स्वतः पोलीसात जावून केली स्वाधीन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :         आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी प्रवृत्तीच्या काळात माणुसकी, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकीची जपणूक करणाऱ्या घटना निश्चितच प्रेरणादायी ठरतात. परळी शहरातील गौरव  इंगळे यांनी याचा प्रत्यय देत एटीएममध्ये सापडलेली ₹३ हजारांची रक्कम स्वतःकडे न ठेवता पोलिसांच्या स्वाधीन केली.प्रश्न रक्कम किती होती हा नाही तर सजग व प्रामाणिकपणा याचे हे उदाहरण ठरले आहे.         आयडीबीआय बॅकेच्या बाजुला असलेल्या एटीएममध्ये गौरव इंगळे यांना तीन हजार रुपयांची रक्कम सापडली. ही रक्कम आपली नसल्याचे लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ती संभाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन ती जमा केली. आजच्या काळात सापडलेली वस्तू किंवा रक्कम स्वतःकडे ठेवण्याचा मोह अनेकांना होऊ शकतो. मात्र, ‘सापडले ते आपले नाही’ ही जाणीव मनात ठेवून गौरव इंगळे यांनी दाखविलेला प्रामाणिकपणा समाजासाठी...

ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ दर्शनासोबत अन्नसेवेचा पवित्र संगम...

इमेज
लोकोपयोगी उपक्रम : ‘श्री सदाशिव सेवा अन्नछत्र’मध्ये दररोज हजारो भाविकांना मोफत भोजनप्रसादाचा लाभ परळी वैजनाथ/संतोष जुजगर  पंचम ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपर्‍यातून दररोज हजारो भाविक परळी वैजनाथ येथे दाखल होत आहेत. प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांना प्रेमाने आणि सन्मानाने भोजनप्रसाद मिळावा, या उदात्त भावनेतून श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टने सुरू केलेले ‘श्री सदाशिव सेवा अन्नछत्र’ हे भाविकांसाठी मोठा आधार ठरत असून, दररोज हजारो यात्रेकरू या मोफत भोजनप्रसादाचा लाभ घेत आहेत. गेल्यावर्षी सुरू करण्यात आलेल्या या अन्नछत्र उपक्रमाला भाविकांचा दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत आहे. सध्या पवित्र श्रावण महिना सुरू असून दररोज श्रीं च्या दर्शनासाठी दूरवरून येणार्‍या यात्रेकरूंना कोणतीही गैरसोय होऊ नये, तसेच त्यांना सात्त्विक, स्वच्छ आणि पौष्टिक भोजन उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ही सेवा अखंडपणे सुरू असल्याचे श्री वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव श्री राजेश देशमुख यांनी सांगितले. अन्नछत्रामध्ये दररोज सकाळी 11 ते दुपारी 1 आणि सायंकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत भोजनप्रस...
इमेज
परळी वैजनाथ शहरातील जलकुंभांच्या दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू नगराध्यक्षा, पाणीपुरवठा सभापती व मुख्याधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी परळी वैजनाथ : प्रतिनिधी...      शहरातील नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुरळीत पाणीपुरवठा मिळावा, यासाठी परळी नगरपरिषद मार्फत शहरातील जलकुंभांच्या देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. सुरू करण्यात आलेल्या या कामांची आज नगराध्यक्षा सौ.पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, पाणीपुरवठा सभापती सौ. जयश्री रविंद्र गित्ते, मुख्याधिकारी श्री. पी. एन. निगळ यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.     नगरपरिषदेच्या वतीने शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत ठेवण्याबरोबरच नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पाणी उपलब्ध करून देण्याला नगरपरिषदेने प्राधान्य दिले आहे. त्यामुळे जलकुंभांच्या दुरुस्ती व सुधारणेची कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.जल कुंभांची परिपूर्ण दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. यामध्ये जलकुंभामधील गाळ काढणे,आतून प्लास्टर, कलर ,नविन वॉल, फॅब्रिकेशनच्या शिडी भेगा भरणे व काँक्रीट दुरुस्ती,गं...

२७२ किलो क्षमतेची लिफ्ट....

इमेज
गैरसोय दूर ; सुविधा परिपूर्ण : परळी वैजनाथ नगरपरिषद मुख्यालयात अत्याधुनिक नवी लिफ्ट कार्यान्वित ! नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते श्रीफळ फोडून शुभारंभ परळी वैजनाथ : प्रतिनिधी....       परळी वैजनाथ नगरपरिषद मुख्यालयाच्या इमारतीमध्ये अधिकारी, कर्मचारी तसेच विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी अत्याधुनिक लिफ्टची सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. या नव्या लिफ्टमुळे मुख्यालयातील विविध मजल्यांवर ये-जा करणे अधिक सुलभ होणार असून, नागरिकांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.     नगरपरिषद मुख्यालयात बसविण्यात आलेल्या नव्या अत्याधुनिक लिफ्टचा औपचारिक शुभारंभ नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला. यावेळी नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.परळी नगरपरिषद मुख्यालयात विविध आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने लिफ्टची सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. लिफ्टमुळे वेळेची बचत होण्याबरोबरच मुख्यालयातील कार्यालयीन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना अधिक सुलभ व सोयीस्कर सुवि...
इमेज
पालकांनी मुलांच्या शिक्षणावर जागता पहारा ठेवावा..! दिशाहीन होण्यापासून मुलांना वाचवणे ही पालकांचीही जबाबदारी - राम कुलकर्णी अंबाजोगाई (प्रतिनिधी)     पालकांनी मुलांना महाविद्यालयात शिक्षणासाठी पाठविले म्हणजे आपली जबाबदारी संपली, असे न समजता त्यांच्या शिक्षणाबरोबरच संगत, सवयी, वर्तन आणि व्यक्तिमत्त्व विकासाकडेही जागरूकतेने लक्ष द्यावे. अकरावी - बारावी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून, या काळात मुलांना दिशाहीन होण्यापासून वाचविण्याची जबाबदारी पालकांचीही आहे, असे प्रतिपादन भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी यांनी केले. खोलेश्वर कनिष्ठ महाविद्यालय, अंबाजोगाई येथे शनिवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२६ रोजी स्व.गोपीनाथराव मुंडे सभागृहात आयोजित पालक मेळावा - २०२६ मध्ये मार्गदर्शक तथा उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.दीपक फुलारी होते. यावेळी मंचावर उपप्राचार्य प्रा.गौतम गायकवाड, डॉ.बिभीषण फड, उपप्राचार्य आनंद पाठक, पर्यवेक्...

बीड जिल्ह्यासाठी अभिमानास्पद.... सर्व स्तरातून अभिनंदन!!!!

इमेज
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर ;देशभरातील 48 शिक्षकांची निवड बीड मधील एक शिक्षक ;महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश नवी दिल्ली, दि. 22 : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देत शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या देशभरातील 48 शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 साठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश आहे. शिक्षक दिनानिमित्त 5 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत हा पुरस्कार दिला जातो. नावीन्यपूर्ण अध्यापन, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्त्व विकास, शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केलेले प्रयत्न तसेच सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील चार मानकरी डॉ. कविता नरसिंगराव गित्ते – (बीड) :      केज येथील साने गुरुजी निवासी विद्यालयात मुख्याध्यापक ...

आरोपी पकडला...ग्रामीण पोलीसांची तत्पर कामगिरी

इमेज
  "तुझ्या मुलीला माझ्या स्वाधीन कर" म्हणत गोळीबार; तीन ते चार गोळ्या झाडल्या, ८५ वर्षीय वृद्ध जखमी, एकावर गुन्हा परळी वैजनाथ : प्रतिनिधी...      तालुक्यातील खोडवा सावरगाव तांडा येथे घरासमोर झालेल्या गोळीबाराच्या घटनेत ८५ वर्षीय वृद्ध जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात एका ३१ वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.       पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश फुलसिंग जाधव (वय ५०, व्यवसाय शेती, रा. खोडवा सावरगाव तांडा, ता. परळी) यांच्या तक्रारीवरून परसराम विद्याधर जाधव (वय ३१, रा. खोडवा सावरगाव तांडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २१ ऑगस्ट रोजी रात्री साडेसातच्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या घरासमोर घडली.फिर्यादी, त्यांची पत्नी आणि वडील घरासमोर बसले असताना आरोपीने रागाच्या भरात अनाधिकृत गावठी कट्ट्यातून  तीन ते चार गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या गोळीबारात फिर्यादीचे ८५ वर्षीय वडील फ...