गृह, वन, नगरविकाससह विविध विभागांत संधी...
माजी अग्निवीरांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; विविध विभागांत १००० अधिकसंख्य पदे निर्माण होणार शासकीय, निमशासकीय सेवेत नियुक्तीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन; गृह, वन, नगरविकाससह विविध विभागांत संधी मुंबई : प्रतिनिधी भारतीय सशस्त्र दलातील चार वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या माजी अग्निवीरांना राज्य शासनाच्या विविध शासकीय व निमशासकीय विभागांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. माजी अग्निवीरांसाठी गट-क संवर्गातील सुमारे १००० अधिकसंख्य पदे निर्माण करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने २७ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केला. केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेअंतर्गत सशस्त्र दलात चार वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या अग्निवीरांपैकी नियमानुसार २५ टक्के अग्निवीरांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेतले जाते. उर्वरित माजी अग्निवीरांना त्यांच्या प्रशिक्षणाचा, कौशल्याचा आणि शारीरिक क्षमतेचा उपयोग करून राज्यातील शासकीय व निमशासकीय सेवेत संधी देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. माजी अग्निवीरांना नियुक्ती देण्...