पोस्ट्स

इमेज
राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते बीड जिल्हा दौऱ्यावर; उद्या परळी वैजनाथ येथे देणार भेट परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते हे दि.६ व ७ ऑगस्ट दोन दिवस बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते पोलीस दलाचा प्रशासकीय आढावा, विविध बैठका व जिल्ह्य़ातील काही पोलीस ठाण्यांनाही भेटी देणार आहेत. पोलीस महासंचालक स्वतः दोन दिवसांच्या दौऱ्यावर असल्याने हा अतिशय महत्त्वपूर्ण दौरा समजला जात आहे.        पोलीस महासंचालक सदानंद दाते हे दोन दिवसांच्या बीड दौऱ्यावर  आहेत. या दौऱ्यात जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था,  गुन्हेगारी आणि पोलीस दलातील प्रशासकीय आढावा ते घेणार आहेत.स्वतः पोलीस महासंचालक बीड दौऱ्यावर येत असल्याने प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. पोलीस महासंचालक हे परळी वैजनाथ येथेही भेट देणार आहेत. या अनुषंगाने परळी पोलीस ठाण्यात तयारी सुरु असुन पोलीस ठाण्याचा परिसर चकाचक करण्यात आला आहे.तसेच रंगरंगोटी व सुशोभीकरण करण्यात आले आहे.बीड जिल्ह्यातील परळी व अंभोरा या दोन पोलीस ठाण्यांना भेटी देणार अ...

मृत्यू दावा १५ दिवसाच्या आत....

इमेज
ना.पंकजा मुंडे बनल्या पशुधनाच्या पालक ; राज्यात पशुधन विमा योजना लागू शेतकऱ्यांना मिळणार ८५ टक्के प्रीमियम अनुदान ; अपघात, नैसर्गिक आपत्ती व रोगामुळे पशुधन मृत्यू झाल्यास आर्थिक संरक्षण  प्रत्येक कुटुंबातील १० पशुधन घटकांस मिळणार लाभ  मुंबई, ता. ६ --- राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना  पंकजाताई मुंडे हया पशुधनाच्या पालक बनल्या असून राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत राज्यात पशुधन विमा योजना राबविण्यास सरकारने प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे. या योजनेमुळे पशुपालक शेतकऱ्यांना अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा रोगामुळे पशुधनाचा मृत्यू झाल्यास आर्थिक संरक्षण मिळणार आहे.    यासंदर्भात अधिक माहिती देताना पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की, हवामानातील अनपेक्षित बदल, नैसर्गिक आपत्ती, विषबाधा, सर्पदंश, दूषित पाणी, अपघात तसेच लम्पी स्कीनसारख्या साथीच्या रोगांमुळे पशुधनाचे मोठे नुकसान होते. त्यामुळे पशुपालकांचे आर्थिक स्थैर्य टिकविणे, त्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळणे आणि कर्जबाजारी होण्यापासून संरक्षण मिळावे या उद्देशाने ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.  अ...

चुकीची माहिती व निराधार बातम्या असल्याचे स्पष्टीकरण....

इमेज
बीड जिल्हा कारागृहाबाबत प्रसारित वृत्त निराधार; कारागृह प्रशासनाचे स्पष्टीकरण बीड (प्रतिनिधी):    बीड जिल्हा कारागृहासंदर्भात ४ आणि ५ ऑगस्ट रोजी विविध प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांमध्ये तथ्य नसल्याचा दावा करत कारागृह प्रशासनाने अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. कारागृहातील कैद्यांना नियमबाह्य सुविधा दिल्या जात असल्याच्या बातम्या वस्तुस्थितीला धरून नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रभारी अधीक्षक, बीड जिल्हा कारागृह वर्ग-२ यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटमध्ये म्हटले आहे की, कारागृहातील कोणत्याही बंदीवानास अनधिकृत अथवा नियमबाह्य सुविधा दिल्या जात नाहीत. सर्व सुविधा कारागृह नियमावलीनुसारच उपलब्ध करून दिल्या जातात.बंदीवानांना आठवड्यातून तीन वेळा प्रत्येकी दहा मिनिटे दूरध्वनीवर बोलण्याची परवानगी आहे. मात्र, फोनद्वारे बाहेरील व्यक्तीने कॉन्फरन्स कॉल किंवा कॉल रेकॉर्डिंग केल्यास त्यावर कारागृह प्रशासनाचे नियंत्रण नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, याबाबत कारागृह मुख्यालयालाही कळविण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.तसेच, बंदीवानांना नियमाप्रमाणे ...
इमेज
परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथाच्या दर्शनासाठी श्रावणात दाखल होतात लाखो भाविक ; देवस्थान समितीकडून जय्यत तयारी सुरू परळी वैजनाथ, प्रतिनिधी:       हिंदू धर्मात श्रावण महिना हा भगवान शंकराची आराधना, उपासना आणि भक्तीचा सर्वात पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात देशभरातील शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत असते. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी वैजनाथ येथील श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे विशेष धार्मिक महत्त्व असल्याने दरवर्षी श्रावण महिन्यात महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दर्शनासाठी परळी वैजनाथ येथे दाखल होतात. त्या अनुषंगाने वैद्यनाथ देवस्थान समितीकडून जय्यत तयारी सुरू आहे.       पौराणिक मान्यतेनुसार श्री वैद्यनाथ हे रोगहारी, दुःखनाशक आणि मनोकामना पूर्ण करणारे ज्योतिर्लिंग मानले जाते. श्रावणातील प्रत्येक सोमवार , विविध सणांचे दिवस आणि महिनाभरातील अन्य धार्मिक पर्वांनिमित्त येथे भक्तांची विशेष गर्दी होत असते. भगवान शंकराला जलाभिषेक, बेलपत्र अर्पण आणि रुद्राभिषेक करण्यासाठी भाविक मोठ्या श्रद्धेने परळी वैजनाथची वाट धरतात. यंदाही ...
इमेज
विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप; शानूरभाई शेख यांच्या उपक्रमाचे कौतुक पुणे : प्रभाग क्र. १७, रामटेकडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हॉलमध्ये सामाजिक कार्यकर्ते शानू शेख यांच्या वतीने माजी मंत्री धनंजय मुंडे आणि राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शालेय साहित्य, वह्या व पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात माजी उपमहापौर निलेश मगर आणि नगरसेविका हेमलता मगर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शानूर शेख यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हाती घेतलेला हा शैक्षणिक उपक्रम प्रेरणादायी असून समाजातील इतरांनीही अशा उपक्रमांचे अनुकरण करावे, असे मत व्यक्त करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमास अॅड. नासरजन हक्कानी, वसीम शेख, हाफिज फयाज मौलाना, प्राचार्या निखत , समीर शेख, उज्वला जाधव, अल्ताफ तांबोळी, नबी पटेल, मतिन शेख, मोहसीन सय्यद, सलमान शेख, शारिक खान, शादाब खान यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित...
इमेज
आळंदीत ज्ञानेश्वरी कंठस्थ पुरस्कार वितरण सोहळा 12 ऑगस्टला; ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली गोरे यांचा होणार सन्मान आळंदी देवाची | प्रतिनिधी गुरुवर्य कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्था, घुंडरे गल्ली, आळंदी देवाची येथे मंगळवार, दि. 12 ऑगस्ट 2026 रोजी आध्यात्मिक वातावरणात ज्ञानेश्वरी कंठस्थ पुरस्कार वितरण सोहळा आणि कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. वारकरी संप्रदायातील संत, महंत, कीर्तनकार, भाविक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार असून, यंदाचा आध्यात्मिक आघाडीचा ज्ञानेश्वरी कंठस्थ पुरस्कार ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली गोरे यांना प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत ह.भ.प. बालासाहेब मोहिते पाटील यांची कीर्तन सेवा होणार आहे. त्यानंतर पुरस्कार वितरण सोहळा पार पडेल. वारकरी परंपरेचा गौरव वाढविणाऱ्या आणि ज्ञानेश्वरीच्या अध्ययन-प्रसारासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येत असल्याने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पुरस्काराचे वितरण ह.भ.प. चैतन्य महाराज कबीर, संत ज्ञानेश्वर माऊली संस्थान आळंदीचे विश्वस्त...

पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे आश्वासन

इमेज
श्रद्धानंद गुरुकुल आश्रमास सर्वतोपरी सहकार्य करणार !    पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे आश्वासन    परळी वैजनाथ, दि.५-      आदर्श नागरिक घडण्यासाठी व मानवाच्या  सर्वांगीण विकासाकरिता गुरुकुल ही शिक्षण प्रणाली ही अत्यंत पूरक असून याच्या माध्यमाने संस्कारक्षम पिढी घडते. या अनुषंगाने श्रद्धानंद गुरुकुल आश्रम संस्था मोलाचे कार्य करीत असून या परोपकारी संस्थेला भरीव निधी देऊन सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी दिले.         येथील आर्य समाजाच्या वतीने नंदागौळ मार्गावर चालवल्या जाणाऱ्या श्रद्धानंद गुरुकुल आश्रमास ना. पंकजाताई नुकतीच सदिच्छा भेट दिली. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आर्य समाजाचे प्रधान श्री जुगलकिशोर लोहिया हे होते. तर  व्यासपीठावर स्वामी सोमानंद,  स्वामी विद्यानंद, डॉ. ब्रह्ममुनिजी(काळे सर), आर्यमुनिजी, आचार्य सत्येंद्रजी उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी गुरुकुलात चालवल्या जाणाऱ्या सर्व उ...