‘पुढच्या पिढीसाठी भूमी नव्हे, स्मशानभूमी ठेवून जात आहोत’ मृद व जलसंधारण दिनानिमित्त लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात विशेष व्याख्यान परळी वैजनाथ : प्रतिनिधी.. मातीची धूप, रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अतिवापर आणि जलप्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस ढासळत आहे. आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी भूमी नव्हे, तर स्मशानभूमी ठेवून जात आहोत, अशी परखड भूमिका प्रमुख व्याख्याते दीपक पवार यांनी मांडली. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त तसेच मृद व जलसंधारण दिनाचे औचित्य साधून विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख होते, तर प्राचार्या डॉ. व्ही. व्ही. देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविकात रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. विवेकानंद कवडे यांनी मृद व जलसंधारणाच्या क्षेत्रात वसंतराव नाईक यांनी केलेल्या मह...