पोस्ट्स

सर्व आरोग्यविषयक उपक्रम गावागावात प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन...

इमेज
'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' अभियानाला गती; परळीत तालुकास्तरीय कृती दल समितीची उत्साहात  बैठक  परळी वैजनाथ | प्रतिनिधी ' माझं गाव, आरोग्य संपन्न गाव ' अभियानांतर्गत जुलै २०२६ महिन्यासाठी नियोजित आरोग्यविषयक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने तालुकास्तरीय कृती दल समितीची बैठक गुरुवार, दि. २३ जुलै रोजी पंचायत समिती, परळी वैजनाथ येथे उत्साहात संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी राजवर्धन भोसले होते, तर सहअध्यक्ष म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुण गुट्टे उपस्थित होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे यांनी सचिव म्हणून कामकाज पाहिले. बैठकीस तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, तालुका विस्तार अधिकारी (पंचायत) तसेच पत्रकार प्रतिनिधी आदी उपस्थित होते.बैठकीत सर्वप्रथम जून २०२६ महिन्यात राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. आरोग्य संपन्न गाव समित्यांच्या बैठका, शाळा व अंगणवाडीतील स्वच्छता मोहीम, योग शिक्षण...
इमेज
एक वर्षाची सक्तीची सामाजिक दायित्व सेवा रद्द; एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील शासकीय, महानगरपालिका, शासन अनुदानित तसेच विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांतून एमबीबीएस पदवी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागू असलेली एक वर्षाची सक्तीची सामाजिक दायित्व सेवा (Social Responsibility Service) रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केला असून, यामुळे हजारो नवोदित डॉक्टरांना पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेणे आणि करिअरची वाटचाल सुरू करणे अधिक सुलभ होणार आहे. शासन निर्णयानुसार, सामाजिक दायित्व सेवा पूर्ण केल्याशिवाय पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी पात्रता मिळत होती. मात्र, वैद्यकीय महाविद्यालयांची वाढती संख्या, दरवर्षी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण आणि सामाजिक दायित्व सेवेसाठी उपलब्ध पदांची मर्यादा यामुळे अनेक विद्यार्थ्यांना ही सेवा वेळेत पूर्ण करता येत नव्हती. परिणामी, पदव्युत्तर शिक्षणात प्रवेश घेण्यास अडचणी निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ ब...
इमेज
  गुजरातमधील पुरात अडकलेल्या ३५  पर्यटकामध्ये परळीतील दोघांचा समावेश; सुखरूप सुटका   आ. धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाच्या तत्परतेने कुटुंबियांचा झाला संपर्क परळी वैजनाथ | प्रतिनिधी       गुजरातमधील वलसाड जिल्ह्यात नदीला आलेल्या अचानक पुरामुळे महाराष्ट्रातील सुमारे ३५ पर्यटक अडकल्याची घटना घडली. मात्र, गुजरात प्रशासनाने तातडीने हेलिकॉप्टरद्वारे बचाव मोहीम राबवत सर्व पर्यटकांची सुखरूप सुटका केली. या पर्यटकांमध्ये परळी वैजनाथ येथील रुपेश झंवर व त्यांची पत्नी जान्हवी झंवर या दाम्पत्याचाही समावेश होता. या पूर परिस्थितीमध्ये अडकलेल्या या दाम्पत्यांचा संपर्क तुटला होता.त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने नातेवाईक चिंताग्रस्त होते.मात्र याबाबत आ.धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाने तातडीने संबंधित गुजरात प्रशासनाशी संपर्क केला.संबधित छावणी व त्याठिकाणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत झंवर दाम्पत्यांचा संपर्क करून दिला.      खासगी ट्रॅव्हल बसने  प्रवास करत असतांना वलसाड जिल्ह्यातील औरंगा नदीला आलेल्या पुरामुळे बसचा मार्ग बंद झाला आणि पर्यटक अडकून पडले....
इमेज
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीअंतर्गत बाल रुग्णांच्या कर्करोग निदानासाठी प्रथमच आर्थिक सहाय्य त्रिपक्षीय करारातून राज्यातील २०० बालरुग्णांना मिळणार लाभ  मुंबई, दि. २२ : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी अंतर्गत बालरुग्णांच्या कर्करोग निदानासाठी प्रथमच स्वतंत्र आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. महागड्या निदान चाचण्यांमुळे उपचार प्रक्रियेत होणारा विलंब टाळून कर्करोगाचे वेळेत निदान व्हावे, यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात त्रिपक्षीय करार करण्यात आला आहे. या विशेष उपक्रमांतर्गत राज्यातील २०० आर्थिकदृष्ट्या दुर्बल कर्करोगग्रस्त बालरुग्णांना निदानासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय चाचण्यांसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.        या लाभाअंतर्गत ० ते १८ वयोगटातील पात्र बालरुग्णांना कर्करोगाचे निदान निश्चित करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्राथमिक तसेच पुढील खर्चिक वैद्यकीय चाचण्यांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. या सहाय्यामुळे आर्थिक अडचणींमुळे निदान प्रक्रियेत ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयानंतर शासन आदेश निर्गमित

इमेज
ना.पंकजा मुंडे यांनी मानले आभार ; परळीतील नवीन पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालयाला शासनाची १३ हेक्टर जमीन विनामूल्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयानंतर शासन आदेश निर्गमित मुंबई दि. २२ -- परळी येथे नव्याने होत असलेल्या पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय उभारण्यासाठी १३ हेक्टर शासकीय जमीन विनामूल्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून तसा शासन आदेश महसूल व वन विभागाने निर्गमित केला आहे. दरम्यान या निर्णयाबद्दल राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांचे आभार मानले आहेत.      परळीच्या सर्व्हे क्रमांक ४७८ मधील १३ हेक्टर शासकीय जमीन कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या नियंत्रणाखालील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांना 'भोगवटादार वर्ग-२' या अटीवर विनामूल्य व महसूलमुक्त स्वरूपात हस्तांतरित करण्यात येणार आहे. महसूल विभागाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील कलम ४० तसेच संबंधित नियमांनुसार ही जमीन प्रदान करण्यास मान्यता दिली आहे. छत्रपती...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आगार प्रमुखांना निवेदन

इमेज
परळी वैजनाथ बसस्थानकातील चिखल, खड्ड्यांमुळे प्रवासी बेहाल; तातडीने उपाययोजना करा, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आगार प्रमुखांना निवेदन परळी वैजनाथ | प्रतिनिधी...      परळी वैजनाथ येथील राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानक परिसरात सुरू असलेल्या नवीन बसस्थानकाच्या कामामुळे तसेच पावसामुळे सर्वत्र चिखल, पाण्याचे डबके आणि मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे दररोज हजारो प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून बसस्थानकाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या गंभीर समस्येची दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हा नियन्त्रण प्रमुख दुसानी मॅडम  परळी आगार प्रमुख सोनवणे यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. यावेळी  बीड जिल्हा नियंत्रण प्रमुख दुसानी मॅडम व आगार प्रमुख सोनवणे  साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा करत बसस्थानक परिसरातील चिखल व खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी केली. पावसामुळे प्रवाशांचे पाय चिखलात रुतत असून अनेकांना घसरून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग...

सकाळी सकाळीच वार्ता वार्यासारखी पसरली....

इमेज
  खळबळजनक : परळीच्या शक्तीकुंज वसाहतीत सापडला तुटलेला मानवी पाय ; नेमका प्रकार काय? परळी वैजनाथ | प्रतिनिधी     परळी वैजनाथ शहरातील शक्तीकुंज वसाहतीत आज सकाळी मानवी तुटलेला पाय आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. सकाळच्या वेळी ही माहिती शहरभर वाऱ्यासारखी पसरताच "हा पाय कोणाचा?", "नेमके काय घडले?" अशा चर्चांना आणि तर्क-वितर्कांना उधाण आले. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.     घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मानवी अवयव वसाहतीत कसा आला, याचा युद्धपातळीवर शोध सुरू करण्यात आला. तपासादरम्यान शक्तीकुंज वसाहतीलगत असलेल्या रेल्वे मार्गावर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.रेल्वे पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता, मृतदेहाचा एक पाय गायब असल्याचे निदर्शनास आले. यानंतर वसाहतीत सापडलेला तुटलेला पाय आणि रेल्वे रुळावरील मृतदेह यांचा संबंध असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. प्राथमिक अंदाजानुसार, रेल्वे रुळाजवळील मृतदेहाचा तुटलेला पाय भटक्या कुत्र्यांनी ओढत शक्तीकुंज वसाहतीत आणला असावा, असा अंदाज पोलिसांकडून ...