पोस्ट्स

अधिसूचना निघाली नसल्याने पेच?

इमेज
  जन्म-मृत्यू नोंदणीसाठी नागरिकांची फरफट! तहसील की न्यायालय? अधिकार नेमका कोणाचा; नागरिक संभ्रमात परळी वैजनाथ | प्रतिनिधी नवीन कायद्यानुसार दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेल्या जन्म-मृत्यूच्या नोंदणीसाठी आदेश देण्याचे अधिकार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे देण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, या तरतुदीच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेली अधिसूचना अथवा राजपत्र केंद्र सरकारकडून अद्याप जारी करण्यात आले नसल्याने न्यायालयात दाखल होणाऱ्या प्रकरणांबाबत संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. परळी येथील न्यायालयाकडून अशा प्रकारची प्रकरणे दाखल करून घेण्यास स्थगिती देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, “जन्म-मृत्यू नोंदणीचे अधिकार न्यायालयाकडे वर्ग झाले आहेत,” असे सांगून तहसील कार्यालयाकडूनही नागरिकांना परत पाठविले जात असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. दोन वर्षांपेक्षा अधिक जुन्या जन्म-मृत्यू नोंदी आवश्यक असलेल्या नागरिकांना शैक्षणिक प्रवेश, शासकीय योजना, वारसा हक्क, पासपोर्ट, आधार व इतर विविध प्रशासकीय कामांसाठी जन्म अथवा मृत्यू प्रमाणपत्राची आवश्यकता असते. मा...

आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रकरण जलदगती कोर्टात चालवा*

इमेज
  नाळवंडीतील पिडित चिमुकलीला न्याय देऊ ना. पंकजा मुंडेंचे बीड एसपींना निर्देश ; आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रकरण जलदगती कोर्टात चालवा बीड दि. १२ --- नाळवंडी ता. पाटोदा येथील आठ वर्षाच्या चिमुकलीवर झालेली अत्याचाराची घटना अत्यंत घृणास्पद आणि संतापजनक असून यातील नराधमाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण जलदगती कोर्टात चालवावे असे निर्देश राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.     या प्रकरणी आज ना. पंकजाताईंनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना फोन करून आरोपीवर कठोर कारवाई करण्यास सांगितले.  नाळवंडी गावातील एका आठ वर्षाच्या चिमकुलीवर ६५ वर्षाच्या नराधमाने अत्याचार केला. या घटनेने पिडीत चिमुकलीचे  कुटुंब भयभीत झाले आहे. घटनेतील  आरोपीला पोलिसांनी अटक केली असली तरी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे आणि आरोपीवर कठोरात कठोर शासन करावे असे ना. पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे. ••••

ना. पंकजा मुंडे यांची युवा शेतकरी संघर्ष समितीला ग्वाही...

इमेज
  माजलगांव धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय ; मंत्रालयात बैठक घेऊन योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न करू ना. पंकजा मुंडे यांची युवा शेतकरी संघर्ष समितीला ग्वाही मुंबई दि. १२ ---- माजलगांव (जि.बीड) येथील धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला गेल्याने परिसरातील बावीस गावातील शेतकरी हवालदिल झाले असून याबाबत लवकरच मंत्रालयात बैठक घेऊन योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी युवा शेतकरी संघर्ष समितीला दिली.     माजलगांव धरण परिसरातील बावीस गावच्या शेतकऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून युवा शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय रद्द व्हावा यासाठी आंदोलन सुरू केले आहे. या शेतकऱ्यांनी आज माजलगांव मधील भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यां मार्फत ना. पंकजाताई मुंडे यांच्याशी संपर्क साधून हा सर्व विषय त्यांच्या कानावर घातला. ना. पंकजाताईंनी शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले आणि यासंदर्भात लवकरच मंत्रालयात बैठक बोलवून विस्तृतपणे चर्चा करून योग्य मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. ••••

_मोंढा मार्केटमधील पाण्याच्या टाकीवर हजारो लिटर पाणी वाया गेल्याचा ठपका

इमेज
गंभीर दखल व कठोर भूमिका: परळीत टाकी बराच वेळ ओव्हरफ्लो होऊन पाण्याची नासाडी; संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई! मोंढा मार्केटमधील पाण्याच्या टाकीवर हजारो लिटर पाणी वाया गेल्याचा ठपका ठेवत काढला निलंबन आदेश परळी वैजनाथ : प्रतिनिधी...     परळी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने पाणीटंचाईची संभाव्य परिस्थिती लक्षात घेता नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी व न. प. पदाधिकारी पाणीपुरवठ्याच्या बाबतीत अतिशय गंभीर असल्याचे बघायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच वान प्रकल्पातील अवैध पाणी उपशाच्यामुद्द्यावरून नगराध्यक्षांचे आक्रमक रूपही बघायला मिळाले होते.अशा परिस्थितीत पाण्याची बचत आणि काटेकोर नियोजन करण्याची गरज असताना मोंढा मार्केट येथील पाण्याच्या टाकीवरून हजारो लिटर पाणी वाया गेल्याचा प्रकार समोर आला. अनेक नागरिकांनी याबाबत नगराध्यक्षा, पाणीपुरवठा सभापती व नगरसेवकांकडे तक्रारी केल्या होत्या.याची गंभीर दखल घेत याप्रकरणी कठोर भूमिका घेण्यात आली असून संबंधित एका कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.       मोंढा मार्केट येथील पाण्याच्या टाकीवर नियुक्त अ...

धनंजय मुंडेंनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार

इमेज
परळीत उभारणार 765 के.व्ही. अति उच्चदाब उपकेंद्र व विद्युत जोडणी प्रकल्प, ऊर्जा विभागाकडून 1345 कोटींची मंजुरी धनंजय मुंडेंनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - परळी वैद्यनाथ येथे महापारेषण मार्फत ७६५ के.व्ही. अति उच्चदाब उपकेंद्र व विद्युत जोडणी प्रकल्पास राज्य सरकारच्या ऊर्जा विभागाने १३४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.  राज्य सरकारने राज्यातील एकूण वीज मागणीचा विचार करता अतिउच्च दाब प्रणाली विकसित करण्यासाठी या प्रकल्पास परळी येथे उभारण्यास माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या विनंतीनुसार मान्यता दिली असून, याबद्दल श्री मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले आहेत.  या उपकेंद्रामध्ये ७६५ के.व्ही. अतिउच्च दाब उपकेंद्र, १५०० क्षमतेचे ३ ट्रान्सफॉर्मर, यांसह आवश्यक विद्युत जोडणी इत्यादी कामे करण्यात येणार असून, यामुळे विद्युत निर्मिती व पारेषण क्षेत्रात परळीचे वजन वाढणार आहे तसेच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीस वाव मिळणार आहे. येत्या काही दिवस...

भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन

इमेज
  नीलकंठ शिवाचार्य महाराज यांच्या ३१ दिवसीय मौन अनुष्ठानाची परळीत सांगता;  बेलवाडी येथे धार्मिक कार्यक्रम; महाप्रसादाचे आयोजन परळी : येथील वैद्यनाथ मंदिराजवळील श्री संत गुरुलिंग स्वामी मंदिर (बेलवाडी) येथे कर्नाटकातील निंबर्गा येथील श्री ष. ब्र. १०८ नीलकंठ शिवाचार्य महाराज गदगेश्वर हिरेमठ यांच्या ३१ दिवसीय २५व्या श्रावणमास मौन अनुष्ठानाची सांगता शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी होणार आहे. दि. १३ ऑगस्टपासून सुरू असलेल्या या अनुष्ठानामुळे बेलवाडी परिसरात महिनाभर भक्तिमय व आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते. कलबुर्गी जिल्ह्यातील आळंद तालुक्यातील निंबर्गा येथील नीलकंठ शिवाचार्य महाराज यांच्या मौन अनुष्ठानाचा हा २५वा वर्ष आहे. शनिवारी सकाळी ८.३० वाजता पाद्यपूजा व मौन समाप्ती होईल. त्यानंतर इष्टलिंग पूजा, विविध धार्मिक विधी तसेच शिवाचार्य महाराजांचे आशीर्वचन होणार आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सांगता सोहळ्यास माजी मंत्री व आमदार बसवराज पाटील, आमदार प्रवीण स्वामी ( उमरगा) , श्री संत गुरुलिंग स्वामी (बेलवाडी) ...
इमेज
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्यकार्यकारिणी बैठक व व्याख्यान परळी / प्रतिनिधी        महाअंनिस ची राज्यकार्यकारिणी ची बैठक मानवलोक अंबाजोगाई येथे १२ व १३ सप्टेंबर रोजी संपन्न होत आहे . या बैठकीसाठी महाराष्ट्रातील जवळपास ३० जिल्ह्यातील १०० ते १५० कार्यकर्ते येणार आहेत . कार्यकारी समिती, प्रत्येक जिल्ह्यातील कार्याध्यक्ष व प्रधान सचिव, समितीच्या २४ विभागाचे कार्यवाह,सहकार्यवाह येत आहेत. मागील ३ महिन्यातील  समितीच्या कामाचा आढावा व पूढील महिन्यातील कामाचे नियोजन यावर सविस्तर चर्चा केली जाते .    तसेच या निमित्ताने शनिवारी १२ सप्टेंबर रोजी सांयकाळी ६ वाजता सांगली येथील लेखक व इतिहास संशोधक प्रा.डॉ. काशिलिंग गावडे यांचे व्याख्यान होणार आहे . हे व्याख्यान शहरातील लोकांसाठी बौद्धिक पर्वणीच असते . या व्याख्यानाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन महाअंनिस बीड जिल्हाच्या वतीने करण्यात आले आहे .      याप्रसंगी महाअंनिसचे राज्याध्यक्ष माधव बावगे, कार्याध्यक्ष संजय बनसोडे , सर्व विभागाचे प्रधान सचिव, राज्य सरचिटणीस उपस्थित राहणार आहेत .   ...