पोस्ट्स

इमेज
जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांबाबत ना. पंकजाताई मुंडे 'ॲक्शन मोडवर' ; मंत्रालयात ऑनलाईन बैठकीत घेतला आढावा शाळांचा दर्जा, स्वच्छतागृह व अन्य सुविधांच्या सद्यस्थितीचा अहवाल आठवडाभरात सादर करण्याचे निर्देश शाळा दुरुस्तीचा निधी अखर्चित राहणार नाही याची दक्षता घ्या ; आदर्श शाळा, आधुनिक ग्रंथालये आणि रेशीम ब्रँडिंगसाठी कालबद्ध आराखडा तयार करा मुंबई, दि. १ : जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सोय, कंपाऊंड वॉल आदींची सद्यःस्थितीबाबत पाहणी करून येत्या पाच तारखेपर्यंत अहवाल देण्याचे निर्देश पशुसंवर्धन, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी दिल्या. तसेच जालना जिल्ह्यातील शैक्षणिक सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी आदर्श शाळा, अंगणवाडी, आधुनिक ग्रंथालये आणि क्रीडांगणांच्या विकासाचा सर्वसमावेशक आराखडा तयार करावा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.  जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील वर्गखोल्यांची दुरुस्ती तसेच नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामाबाबत तसेच जालनाई सिल्...
इमेज
अर्ध्या तिकिटाची सवलत : एसटीच्या स्मार्ट कार्डचा पहिल्याच दिवशी बोजवारा! ‘सर्व्हर डाऊन’चा घोळ; कार्ड रिचार्ज अभावी पात्र प्रवाशांना पुर्ण तिकीटाचा भुर्दंड परळी वैजनाथ: प्रतिनिधी...      एसटी प्रवासात ५० टक्के सवलतीचा लाभ मिळावा, यासाठी सुरू करण्यात आलेल्या एनसीएमसी स्मार्ट कार्ड योजनेचा पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणींमुळे बोजवारा उडाल्याचे बघायला मिळाले. कार्डमध्ये पुरेशी रक्कम नसल्यास रिचार्ज करण्याची सुविधा बसमध्येच उपलब्ध होईल, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात मात्र प्रवाशांना आगाराच्या दारातच रिचार्जसाठी धाव घ्यावी लागत असल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे, बसचालक-वाहकांकडून कार्ड रिचार्ज करण्याचा प्रयत्न केल्यास ‘सर्व्हर डाऊन आहे’ असे सांगितले जात असल्याच्या दिवसभर असंख्य तक्रारी आल्या आहेत. परिणामी कार्डमध्ये शिल्लक रक्कम नसलेल्या महिलांना अर्ध्या तिकिटाचा लाभ न मिळता नाईलाजाने पूर्ण तिकीट काढावे लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे.      एसटी बसने नियमित प्रवास करणाऱ्या आणि प्रवासात सवलत घेणाऱ्या नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड काढण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य म...

खगोलीय निरीक्षणाचा अनोखा योग....

इमेज
पश्चिम आकाशात दिसला तेजस्वी ‘गोलाकार ठिपका’; खगोलीय दृश्याने वेधले नागरिकांचे लक्ष परळी वैजनाथ : प्रतिनिधी...   आज मंगळवारी, १ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास पश्चिम आकाशात अत्यंत तेजस्वी, मोठा गोलाकार प्रकाशबिंदू दिसून आल्याने नागरिकांचे लक्ष आकाशाकडे वेधले गेले. अनेकांनी या चमकदार वस्तूचे फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केले.        मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम दिशेला दिसणारा हा तेजस्वी प्रकाशबिंदू शुक्र ग्रह असण्याची शक्यता आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला शुक्र सूर्यास्तानंतर पश्चिम आकाशात अत्यंत तेजस्वी दिसत आहे. १ सप्टेंबर रोजी शुक्र आणि कन्या राशीतील तेजस्वी तारा स्पिका हे पश्चिम आकाशात एकमेकांच्या जवळ दिसण्याची खगोलीय घटना आहे.           भारताच्या आकाश निरीक्षणाच्या माहितीनुसार, १ सप्टेंबर रोजी शुक्राची दृश्यता चांगली असून तो रात्री सुमारे ९.०९ वाजेपर्यंत दिसू शकतो. त्यामुळे रात्री ८ वाजता पश्चिम दिशेला दिसलेला हा प्रखर प्रकाशबिंदू शुक्राशी जुळतो. विशेष म्हणजे, सप्टेंबर महिन्यात शुक्राची चमक आणखी वाढणार असून १८...

खा. बजरंग सोनवणे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

इमेज
मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्यासाठी शासनाने तातडीने संवाद साधावा खा. बजरंग सोनवणे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र बीड : मराठा आरक्षणाच्या संवेदनशील व न्याय्य मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या बिघडणाऱ्या प्रकृतीची शासनाने तातडीने दखल घ्यावी, तसेच त्यांच्याशी सकारात्मक संवाद साधून हे उपोषण सोडवण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा, असे पत्र बीड लोकसभेचे खा.बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे.  याबाबत खा.बजरंग सोनवणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ३१ ऑगस्ट २०२६ रोजी पाठवलेल्या पत्रात मराठा समाजाच्या वेदना आणि सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य स्पष्टपणे मांडले आहे. पत्रात नमूद करण्यात आले आहे की, मनोज जरांगे पाटील हे २९ ऑगस्ट २०२६ पासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषणास बसले आहेत. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना वारंवार आंदोलनाचा व उपोषणाचा खडतर मार्ग स्वीकारावा लागत आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक असून सततच्या उपोषणामुळे आता त्यांच्या आरोग्यावर आणि प्रकृतीवर गंभीर विपरीत परिणाम ह...
इमेज
परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघात ४०,२६१ मतदारांची घट; उद्यापासून नव्या मतदार नोंदणीला संधी परळी वैजनाथ : प्रतिनिधी परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत मोठी घट झाल्याचे समोर आले असून, आजच्या तारखेपर्यंत तब्बल ४० हजार २६१ मतदारांची संख्या कमी झाली आहे. मतदार यादीच्या पुनरिक्षण प्रक्रियेनंतर ही घट झाल्याने आगामी काळात नव्याने मतदार नोंदणीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. उद्यापासून नवीन मतदार नोंदणी तसेच पहिल्या यादीत नाव राहून गेलेल्या पात्र मतदारांना आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करून घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मतदारसंघातील नावनोंदणीपासून वंचित असलेल्या नागरिकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मतदार यादीतील पुनरिक्षण प्रक्रियेमध्ये एका मतदाराचे नाव एकाच ठिकाणी असणे या नियमाला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे एकापेक्षा अधिक ठिकाणी असलेली नावे कमी झाल्यानंतर मतदारसंख्येत घट झाली आहे. मात्र, दुसरीकडे अनेक पात्र नागरिक अद्याप मतदार म्हणून नोंदणीकृत नसल्याने आगामी काळात नवीन मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...
इमेज
  जेजुरी संस्थानचे विश्वस्त तसेच जेजुरीचे नगराध्यक्ष यांच्यासह परळीत मान्यवरांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन परळी वैजनाथ : प्रतिनिधी — श्रावण महिन्याच्या पावन पर्वात धार्मिक स्थळांना भेटी देत असताना मार्तंड देवस्थान, जेजुरीचे विश्वस्त तथा जेजुरीचे नगराध्यक्ष जयदीप भैय्या बारभाई, नगरसेवक योगेश भैय्या जगताप, जेजुरीचे सामाजिक कार्यकर्ते वैभव कोरपड, सुरेश राऊत व प्रशांत कापसे या मान्यवरांनी परळी वैजनाथ येथे पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी परळीकरांच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांनीही त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी नगरसेवक राजेंद्र सोनी यांची उपस्थिती होती.जेजुरी आणि परळी या दोन प्रमुख धार्मिक स्थळांमधील भक्तिभावाचे नाते अधिक दृढ करणारा हा प्रसंग ठरला. दर्शनावेळी मान्यवरांनी प्रभू वैद्यनाथाची पूजा-अर्चा करून सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. 

पुणे येथील ज्योतिष महासंमेलनामध्ये पुरस्कार प्रदान

इमेज
 डॉ.एकनाथ घ.मुंडे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान ज्योतिष शास्त्रातील अद्वितीय कार्याबद्दल पुणे येथील ज्योतिष महासंमेलनामध्ये पुरस्कार प्रदान _____________________________ परळी (प्रतिनिधी):दिनांक ३१ ऑगस्ट महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुणे शहरामध्ये  दिनांक २१ ते २३ ऑगस्ट दरम्यान संपन्न झालेल्या ज्योतिष महासंमेलनामध्ये   डॉ.एकनाथ घनश्यामराव मुंडे यांना ज्योतिष शास्त्रातील त्यांच्या अद्वितीय योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. जन्मगाव नाथरा असणारे डॉ.एकनाथ घ. मुंडे हे परळी वैजनाथ येथील रहिवासी असून गेली ५० वर्ष श्रीनाथ हॉस्पिटल परळी वैजनाथ येथे रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा या मूलमंत्राला एकनिष्ठ राहून समाजातील गरीब गरजू आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या  रुग्णांची सेवा करीत आहेत आणि रुग्णसेवेसोबत समाजसेवेचा वसाही त्यांनी घेतला आहे. वैद्यकशास्त्रासोबतच ज्योतिष शास्त्राचा अभ्यास आणि आवड  असणारे डॉ. एकनाथ मुंडे यांनी वैद्यकशास्त्राला ज्योतिषशास्त्राची साथ जोडली आणि हजारो रुग्णांवर ज्योतिषवैद्यक शास्त्राच्या पद्धतीने उपचार करून त्यांना त्या...