पोस्ट्स

गृह, वन, नगरविकाससह विविध विभागांत संधी...

इमेज
माजी अग्निवीरांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; विविध विभागांत १००० अधिकसंख्य पदे निर्माण होणार शासकीय, निमशासकीय सेवेत नियुक्तीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन; गृह, वन, नगरविकाससह विविध विभागांत संधी मुंबई : प्रतिनिधी भारतीय सशस्त्र दलातील चार वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या माजी अग्निवीरांना राज्य शासनाच्या विविध शासकीय व निमशासकीय विभागांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. माजी अग्निवीरांसाठी गट-क संवर्गातील सुमारे १००० अधिकसंख्य पदे निर्माण करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने २७ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केला. केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेअंतर्गत सशस्त्र दलात चार वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या अग्निवीरांपैकी नियमानुसार २५ टक्के अग्निवीरांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेतले जाते. उर्वरित माजी अग्निवीरांना त्यांच्या प्रशिक्षणाचा, कौशल्याचा आणि शारीरिक क्षमतेचा उपयोग करून राज्यातील शासकीय व निमशासकीय सेवेत संधी देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. माजी अग्निवीरांना नियुक्ती देण्...

सर्व स्तरातून अभिनंदन.........!!!!

इमेज
  कमी कालावधीत उत्कृष्ट  काम : नाथरा येथील रमेश मुंडे यांचा रेल्वे सेवेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मान परळी वैजनाथ : प्रतिनिधी          परळी वैजनाथ तालुक्यातील नाथरा येथील रहिवासी रमेश जगन्नाथ मुंडे यांनी सेंट्रल रेल्वेच्या सोलापूर विभागात मेकॅनिकल विभागात कार्यरत असताना अल्पावधीत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांचा १५ ऑगस्ट रोजी विशेष सन्मान करण्यात आला. रेल्वे सेवेत कर्तव्यनिष्ठा, समर्पण आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.              रमेश मुंडे हे सेंट्रल रेल्वेच्या सोलापूर डिव्हिजनमध्ये मेकॅनिकल विभागात कार्यरत आहेत. आपल्या कामातील तत्परता, जबाबदारीची जाणीव आणि समर्पित वृत्तीच्या माध्यमातून त्यांनी कमी कालावधीत वरिष्ठांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून त्यांचा गौरव करण्यात आला. नाथरा या ग्रामीण भागातून पुढे येत रेल्वेसारख्या महत्त्वाच्या सेवाक्षेत्रात कार्यरत राहून...

परळी ग्रामीण पोलिसांचा छापा....धडक कारवाई...

इमेज
  शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये ‘तिरट’चा डाव; २० जणांवर कारवाई परळी ग्रामीण पोलिसांचा  छापा; ३७ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त परळी वैजनाथ : प्रतिनिधी       शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये गुपचूप सुरू असलेल्या ‘तिरट’ जुगाराच्या अड्ड्यावर परळी ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत जुगार खेळणाऱ्या १८ जणांसह जुगार चालविणारा आणि जुगारासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या अशा एकूण २० जणांवर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी रोख रक्कम, विविध कंपन्यांचे मोबाईल, दुचाकी व चारचाकी वाहने असा एकूण ३७ लाख ३४ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. परळी-अंबाजोगाई रस्त्यालगत कन्हेरवाडी शिवारातील शेतातील एका पत्र्याच्या शेडमध्ये ‘तिरट’ जुगार सुरू असल्याची माहिती परळी ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार २७ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे ३.४० वाजता पोलिसांनी तेथे छापा टाकला. यावेळी काही जण पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळत असल्याचे, तर काही जणांकडून जुगार खेळविला जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. १८ जुगाऱ्यांसह दोघांवरही कारवाई या प्रकरणात शेख निजाम फकिर अहमद, बालाजी नाथराव ...
इमेज
  नादब्रह्म संगीत विद्यालय संचालक वीरेंद्र नरवणे यांचे निधन परळी :  येथील गांधी मार्केट परिसरातील नादब्रह्म संगीत विद्यालय परळीचे संचालक वीरेंद्र (दिपक) गणपतप्पा नरवणे यांचे अल्प आजाराने २७ ऑगस्ट रोजी गुरुवारी सकाळी निधन झाले. सायंकाळी त्यांच्या पार्थिव देहावर येथील वीरशैव लिंगायत स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यू समयी त्यांचे वय ६३ वर्ष होते. त्यांच्या पश्चात आई,पत्नी,एक मुलगा, ६ बहीणी, एक भाऊ असा परिवार आहे. आर्यन नरवणे यांचे ते वडील होते तर येथील श्री सुरेश चौधरी यांचे ते भाचे होते.

दुःखद वार्ता: भावपूर्ण श्रद्धांजली!!!

इमेज
  माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांच्या मातोश्री रंजनाबाई देशमुख यांचे निधन परळी वैजनाथ : परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक रंगनाथ देशमुख यांच्या मातोश्री श्रीमती रंजनाबाई रंगनाथराव देशमुख यांचे 87 वर्षी  आज, गुरुवार दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी  निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, सुना,नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. निधनाने देशमुख कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शहरात हळहळ व्यक्त होत आहे. श्रीमती रंजनाबाई रंगनाथराव देशमुख या प्रेमळ, मनमिळावू व धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांच्या निधनाने देशमुख परिवाराची मोठी हानी झाली आहे. त्यांच्यावर शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता परळी वैजनाथ येथील देशमुख स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. देशमुख कुटुंबीयांच्या दुःखात एम बी न्यूज परिवार सहभागी आहे.
इमेज
संतभूमी रक्षणासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ भामचंद्र डोंगरावर पुणे : प्रतिनिधी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या साक्षात्काराची तपोभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील भामचंद्र डोंगराच्या संरक्षणासाठी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मातोश्रीच्या सूचनेनुसार शिवसेनेचे आमदार रवींद्र मिर्लेकर यांच्यासह पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी (दि. २६) भामचंद्र डोंगराची प्रत्यक्ष पाहणी केली. भंडारा, भामचंद्र आणि घोराडेश्वर हे डोंगर संत तुकाराम महाराजांच्या ध्यान, चिंतन व साधनेशी जोडलेले असून, या परिसराला प्राचीन ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसाही लाभला आहे. या डोंगर परिसरात बौद्ध, शैव व जैन परंपरेशी संबंधित प्राचीन लेणी असल्याचे सांगण्यात येते. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून औद्योगिक प्रकल्प, अतिक्रमण आणि कथित बेकायदेशीर उत्खननामुळे या परिसराच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याचा आरोप संतभूमी संरक्षक संघर्ष समितीने केला आहे. या परिसराचे महत्त्व लक्षात घेऊन पुरातत्त्व विभागाने सन २०११ मध्ये भंडारा, भामचंद्र व घोराडेश्वर डोंगर परिसराचा राज्य संरक्षित स्मारकाच्...

भाजप प्रदेश प्रवक्ता राम कुलकर्णी यांचा विशेष लेख>>>≥>

इमेज
  राखीचा धागा : बहिणीच्या मायेची आणि भावाच्या कर्तव्याची आठवण रक्षाबंधन हा केवळ बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधण्याचा सण नाही; तो रक्ताच्या नात्यातील प्रेम, विश्वास, जिव्हाळा आणि परस्परांच्या रक्षणाची भावना दृढ करणारा संस्कृतीचा उत्सव आहे. हजारो वर्षांच्या भारतीय परंपरेतून आलेल्या या सणामागे केवळ एक धागा नसतो, तर त्या धाग्याला जोडलेल्या असतात असंख्य आठवणी, बालपण, माया आणि आयुष्यभराची निःस्वार्थ साथ. बहिणीच्या हाताने भावाच्या मनगटावर बांधली जाणारी राखी म्हणजे भावाच्या सुखासाठी, आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी केलेली मनापासूनची प्रार्थना असते. त्याच वेळी भावानेही आपल्या बहिणीच्या सुख-दुःखात खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे राहावे, संकटाच्या वेळी धावून जावे, ही त्या राखीची खरी भावना आहे. आपल्या संस्कृतीने स्त्रीचा सन्मान आणि तिच्या रक्षणाची जबाबदारी ही केवळ कायद्याची बाब न मानता ती कुटुंबाच्या संस्कारांचा भाग मानली आहे. संकटसमयी बहिणीसाठी भाऊ धावून जाणे, तिच्या सुख-दुःखाची विचारपूस करणे, तिच्या संसारातील अडचणीच्या वेळी आधार देणे, हे भावाच्या कर्तव्याचेच एक रूप आहे. बहिणीला महागडी भेट नक...