पोस्ट्स

प्रभावी अंमलबजावणीसाठी पर्यावरण व पशुसंवर्धन सचिवांना दिले निर्देश

इमेज
ना. पंकजा मुंडे यांनी मंत्रालयात घेतल्या विभागाच्या मॅरेथॉन बैठका ; संपूर्ण दिवस कामकाजात नद्या व उद्योगांचे प्रदूषण, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजनेचा घेतला आढावा प्रभावी अंमलबजावणीसाठी पर्यावरण व पशुसंवर्धन सचिवांना दिले निर्देश मुंबई दि. ०१ --- राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज त्यांच्या मंत्रालयातील दालनात भेटीगाठी बरोबरच विभागाच्या मॅरेथॉन बैठका घेतल्या. पर्यावरणाच्या बैठकीत नद्या व उद्योगांचे प्रदूषण, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तर पशुसंवर्धन बैठकीत नव्यानेच सुरू झालेल्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजनेचा आढावा घेतयोजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पर्यावरण व पशुसंवर्धन सचिवांना निर्देश दिले.    ना. पंकजाताई मुंडे यांचा आजचा संपूर्ण दिवस शासकीय कामकाजात गेला. दुपारी कॅबिनेट बैठक झाल्यानंतर त्यांनी पर्यावरण व पशुसंवर्धन विभागाच्या सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत वेगवेगळ्या विषयांवर एका मागोमाग एक अशा मॅरेथॉन बैठका घेतल्या.    वारंवार प्रदुषण करणाऱ्या उद्योगांची बँक गॅरंटी व दंडाची रक्कम व...

सोशल मीडियातून नोटिसचा धुमाकूळ....जाणून घ्या सविस्तर काय आहे नोटीस

इमेज
अखेर "ती" वेळ आलीच… ‘वॉर लॉकडाउन’ ची नोटीस   जारी ! परळी वैजनाथ (इएफडीएन).....         देशभरात सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक नोटीस मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ‘वॉर लॉकडाउन’ अशा ठळक शीर्षकाखाली फिरणाऱ्या या पीडीएफ इमेजमुळे नागरिकांमध्ये बघता क्षणीच काही काळ संभ्रम आणि भीती निर्माण होते आणि उत्सुकतेने ही इमेज उघडल्यावर कळते आपल्याला तर एप्रिल फूल बनवण्यात आले आहे.             जागतिक पातळीवर इस्त्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध  परिस्थितीमुळे तणाव आहे. या पार्श्वभूमीवर अनेक देशांमध्ये लॉकडाउन लागू झाला असून भारतातही लवकरच लॉकडाउन होणार अशा चर्चा मोठ्या प्रमाणावर आहेत. याच  आशेचा धागा पकडत परफेक्ट एप्रिल फूल म्हणून ही नोटीस पसरवण्यात आली. त्यामुळे काही क्षण अनेक नागरिकांनी या संदेशावर विश्वास ठेवत चिंता व्यक्त करतच सविस्तर जाणून घेण्यासाठी ही इमेज फाईल ओपन करुन पाहिली अन् मग कळले की हे तर एप्रिल फूल आहे. विशेष म्हणजे, आज दिनांक १ एप्रिल – म्हणजेच एप्रिल फूल डे असल्यामुळे ही संप...

सुसाईड नोटमध्ये अन्यायाचा पाढा....

इमेज
प्रेम प्रकरणातून चोर ठरविले; बदनामीमुळे तरुणाने जीवन संपविले प्रेम प्रकरणाच्या रागातून एका २३ वर्षीय तरुणाला झाडाला बांधून बेदम मारहाण करणे आणि त्यानंतर त्याला मचोरफ म्हणून बदनाम करणे, या मानसिक छळाला कंटाळून तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. ज्ञानेश्वर कोकाटे (२३, रा. मांजरसुंबा) असे मृत तरुणाचे नाव असून, याप्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वरचे शेजारच्या गावातील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. याची कुणकुण लागताच तरुणीच्या नातेवाइकांनी ज्ञानेश् बरला गाठले. त्याला संबंधित गावात बोलावून त्याची दुचाकी आणि मोबाईल काढून घेतला. त्यानंतर चार जणांनी त्याला झाडाला बांधून बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर त्याला मचोरफ ठरवून सर्वत्र त्याची बदनामी केली. या शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे खचलेल्या ज्ञानेश्वरने धुळे-सोलापूर महामार्गावरील एका टायर पंक्चरच्या दुकानात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. पोलिस प्रशासन काय म्हणते ? मृताच्या सुसाईड नोट आणि नातेवाइकांच्या तक्रारीवरून नेकनूर पोलिस ठाण्यात चार आरोपीविरुद्ध आत्महत्येस प्रवृ...

अभिमानास्पद :मुंबई येथील 'आर्य समाज' चा प्रतिष्ठित पुरस्कार

इमेज
  डॉ.नयनकुमार आचार्य यांना राष्ट्रीय वैदिक विद्वत् पुरस्कार    परळी वैजनाथ दि.३०-       वेद व संस्कृत साहित्याचे अभ्यासक  प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य यांना मुंबई येथील 'आर्य समाज' या सामाजिक कार्यातील अग्रणी संस्थेच्या वतीने नुकताच प्रतिष्ठेचा मानला जाणारा "राष्ट्रीय वैदिक विद्वत् पुरस्कार" प्रदान करण्यात आला.              मुंबई आर्य समाजाचे अध्यक्ष श्री हरीश आर्य यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यास मुंबई प्रदेश भाजपच्या प्रवक्त्या सुमिता सुमन सिंह, प्रसिद्ध उद्योगपती विपिनभाई पटेल, अरुण अब्रोल, विजय गौतम, देशबंधू शर्मा इत्यादी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डॉ. श्री नयनकुमार आचार्य यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, गौरव राशी, शाल, श्रीफळ व मौक्तिकमाला प्रदान करून या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.      विशेष म्हणजे थोर समाजसुधारक महर्षी दयानंद सरस्वती यांनी १८७५ साली सर्वात प्रथम याच आर्य समाजाची स्थापना केली होती. गेल्याच वर्षी या संस्थेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव मोठ्या स्वरूपात ...

५ एप्रिलपर्यंत स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढण्याचे नागरिकांना आवाहन

इमेज
  चला, आपणच आपले शहर सुटसुटीत आणि शिस्तबद्ध  करुया.. हे सर्वांसाठीच आवश्यक आहे! प्रशासनाचे धाडसी पाऊल:परळी वैजनाथ नगरपरिषद राबवणार अतिक्रमण हटाव विशेष मोहीम ५ एप्रिलपर्यंत स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढण्याचे नागरिकांना आवाहन परळी वैजनाथ : प्रतिनिधी...       गेल्या अनेक वर्षांपासून  परळी शहरातील  जवळपास सर्वच रस्त्यांवर अतिक्रमणं मोठ्या प्रमाणावर झालेली आहेत. अतिशय सुटसुटीत व  वाहतूकीला  विना अडथळा  असे  समर्पक रुंद रस्ते  असतांनाही वाहतूक कोंडी, अस्ताव्यस्त रचना आणि बेशिस्त पार्किंग यामुळे सर्वांनाच प्रचंड त्रासातून जावे लागत आहे. त्यामुळे  आपणच आपले शहर सुटसुटीत आणि शिस्तबद्ध  करुया ,हे सर्वांसाठीच आवश्यक आहे हा तमाम परळीकर नागरिकांचा मनापासून निर्धार आहे.आता यासाठी नगर परिषद प्रशासनानेही धाडसी पाऊल टाकत परळी वैजनाथ नगरपरिषद अतिक्रमण हटाव विशेष मोहीम राबवणार असल्याची  सूचना काढली आहे.          परळी शहरातील वाढत्या अतिक्रमणांमुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी, अस्वच्छता आणि नागरिकांना भेडसा...
इमेज
  महिला व बालकांच्या पोषणात लक्षणीय सुधारणेचे उदिष्ट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. 31 : राज्यातील कुपोषणाच्या समस्येवर मात करुन महिला व बालकांच्या आरोग्य आणि पोषणात लक्षणीय सुधारणा घडवून आणण्याच्या दिशेने महाराष्ट्राने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. महिला व बाल विकास विभाग आणि चिल्ड्रन्स इन्व्हेस्टमेंट फंड फाउंडेशन (CIFF) यांच्यात महिला व बालकांच्या पोषणा संदर्भात पाच वर्षांसाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला असून, या भागीदारीमुळे माता व बाल पोषण निर्देशांकात मोठी उंची गाठली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांच्या उपस्थितीत हा करार झाला. यावेळी चिल्ड्रन्स इन्व्हेस्टमेंट फंड फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक मंजुला सिंग, डायरेक्टर स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्ह्ज अँड पार्टनरशिप्स अखिल पाळीअथ आणि अन्य वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते. या कराराअंतर्गत कुपोषणावर प्रभावी नियंत्रणासाठी विशेष भर देण्यात येणार आहे. योग्य पोषण आणि आरोग्य सवयी रुजवण्यासाठी मोहीम प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMV) सारख्या थे...

ट्रीपल ड्रग पॉलिसी (आयडीए) ...

इमेज
हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. ३१ :महाराष्ट्रासह देशभरात हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलेरियासिस) निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) अर्थात आयव्हरमेक्टिन, डीईसी (डायइथिलकार्बामाझीन) आणि अल्बेंडाझोल या औषधांच्या संयुक्त उपचाराला गती देण्यात येत आहे. केंद्र शासनाने २०२७ पर्यंत भारतातून हत्तीरोगाचे संपूर्ण उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या मोहिमेत राज्य शासनाने सक्रिय सहभाग घेतला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, विशेषतः दुर्लक्षित असलेल्या हत्तीरोगासारख्या आजारांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी  केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरुवात केली. देशात २०१७ मध्ये सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्यात विशेषतः विदर्भातील जिल्ह्यांना या  औषधोपचारासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्याची केंद्र सरकारकडे विनंती केली होती. यामुळे महाराष्ट्रातील, विशेषतः विदर्भातील आदिवासी व ग्रामीण भागातील लोकांचे दुःख मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होत आहे. तसेच, दे...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!