पोस्ट्स

आपले सरकार' पोर्टलशी संबंधित महाऑनलाईन प्रणालीमध्ये काही गंभीर तांत्रिक दोष.....

इमेज
तांत्रिक बिघाडामुळे महाऑनलाईन आयडीद्वारे मिळणाऱ्या सर्व सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद मुंबई: राज्यभरातील नागरिकांना विविध शासकीय दाखले आणि सेवा पुरवणाऱ्या 'आपले सरकार सेवा केंद्रां'मधील (CSC) कामकाज सध्या तांत्रिक अडचणींमुळे ठप्प झाले आहे. महाऑनलाईन आयडीद्वारे (MahaOnline ID) मिळणाऱ्या सर्व सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'आपले सरकार' पोर्टलशी संबंधित महाऑनलाईन प्रणालीमध्ये काही गंभीर तांत्रिक दोष निर्माण झाले आहेत. यामुळे उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, रहिवासी दाखला यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी येणारे अर्ज स्वीकारणे आणि त्यावर प्रक्रिया करणे कठीण झाले आहे. सध्या अनेक शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया आणि सरकारी योजनांचे अर्ज भरण्याचे काम सुरू असल्याने, या तांत्रिक बिघाडाचा मोठा फटका विद्यार्थ्यांना आणि ग्रामीण भागातील नागरिकांना बसत आहे. या संदर्भात प्रशासनाकडून एक महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. तांत्रिक अडचण सोडवण्यासाठी तांत्रिक पथक (Technical Team) युद्धपातळीवर काम करत असून लवकरच ...
इमेज
 1 मे 2026 महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 67 वा वर्धापन दिन उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण बीड, दि. 29 (जि. मा. का.) 1 मे 2026 महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 67 वा वर्धापन दिन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा येथील पोलीस कवायत मैदान येथे होणार आहे.               मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा शुक्रवार दिनांक 01 मे 2026 रोजी सकाळी 8.00 वाजता होणार आहे.  या सोहळ्याच्या आयोजनाबाबत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आज एक बैठकीत आढावा घेतला.  जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासनचे शैलेश सूर्यवंशी आदींची या बैठकीस प्रमुख उपस्थिती होती.             कार्यक्रम स्थळावरील व्यवस्था त्याचप्रमाणे इतर आयोजन याबाबत यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. मुख्य ध्वजारोहण सकाळी 8.00 वाजता असल्...
इमेज
नगर परिषदेची अग्निशमन यंत्रणा ‘रामभरोसे’ : महादेव गंगणे पाटील परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरातील रेसिन या कापड दुकानाला दि. २८ एप्रिल रोजी दुपारी आग लागली. थर्मलची अग्निशमन गाडी लवकर आली पण नगरपरिषदेची गाडी वेळेवर पोहचू शकली नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शहर आणि परिसराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असताना, दुसरीकडे शहराच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या नगर परिषदेची अग्निशमन यंत्रणा मात्र पूर्णपणे कुचकामी ठरत असल्याचे चित्र आहे. शहरात एखादी मोठी आग लागल्यास ती विझवण्यासाठी लागणारी यंत्रणा नगर परिषदेकडे उपलब्ध असली, तरी ती केवळ नावापुरतीच उरली आहे. अनेकदा अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेवर सुरू होत नाहीत किंवा पाणी असूनही तांत्रिक बिघाडामुळे फवारे चालत नाहीत. वाहने जुनी झाली असून त्यांची वेळेवर देखभाल-दुरुस्ती केली जात नाही. प्रशिक्षित अग्निशमन जवानांऐवजी कंत्राटी कामगारांवर ही यंत्रणा सुरू  आहे.प्रशासनाने तात्काळ नवीन आधुनिक अग्निशमन वाहने खरेदी करावीत, कायमस्वरूपी प्रशिक्षित जवान...

रेझिंन’ मॉल जळून खाक; ५०० मीटरवरूनही गाडी ४० मिनिटे उशिरा

इमेज
  परळी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचा बोजवारा! नगरसेवक नितीन बागवाले आक्रमक; चौकशी व कारवाईची मागणी, आंदोलनाचा इशारा परळी वैजनाथ (प्रतिनिधी): परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात बुधवारी (दि. २९) दुपारी लागलेल्या भीषण आगीत ‘रेझिंन’ या कपड्यांच्या मॉलचा अक्षरशः राखरांगोळी झाला. धक्कादायक बाब म्हणजे, घटनास्थळापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर असलेल्या नगर परिषदेच्या अग्निशमन केंद्राची गाडी तब्बल ४० ते ५० मिनिटे उशिराने पोहोचली. या गंभीर हलगर्जीपणामुळे व्यापाऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकातील गजबजलेल्या ‘रेजिन लेडीज वेअर’ या दालनात अचानक आग लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तातडीने अग्निशमन विभागाला कळवले, मात्र प्रतिसादात झालेल्या विलंबामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून अखेर थर्मल पॉवर स्टेशनच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यांच्या तत्परतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, पण तोपर्यंत मॉलमधील मोठ्या प्रमाणात माल जळून खाक झाला होता. या निष्क्रियतेवर संतप्त प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस ...
इमेज
  मुकुंद पुजा साहित्य भांडार येथे नव्याने सुरू झालेल्या भारतीय डाक सेवा केंद्र टपाल बुकींगला नागरीकांचा उत्तम प्रतिसाद   परळी वैद्यनाथ दि.(प्रतिनिधी) भारतीय डाक विभागाने नव्याने सुरू केलेल्या भारतीय डाक  सेवा केंद्र. परळी येथील प्रसिद्ध असलेले मुकुंद पूजा विधी साहित्य भांडार येथे नुकतेच सुरू करण्यात आले आहे. या ग्राहक डाक सेवा केंद्राच्या पहिल्या दिवशी परळी येथील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी 108 टपाल बुकिंग करण्यात आली.        भारतीय डाक विभागाने पहिल्यांदाच अशा ग्राहक सेवा केंद्राला मान्यता दिली असून, मराठवाड्यातील परळी वैजनाथ येथील मुकुंद पूजा साहित्य भांडार येथे संचालक मुकुंद गोपाळ आंधळे यांना या केंद्राची मान्यता देण्यात आली आहे.सोमवार दि.२७ एप्रिल रोजी मोहिनी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर या टपाल बुकिंग सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यास परळी येथील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. या ग्राहक सेवा केंद्रावर स्पीड पोस्ट बुकिंग, पार्सल बुकिंग करून केली  जाते.मुकुंद पुजा  विधी साहित्य भांडार,न्युअरुणोद्य मार्केट,घरणीकर रोड,पर...

सर्व नवनिर्वाचित सरपंच जगमित्र कार्यालयात दाखल

इमेज
  परळी तालुक्यातील तीनही ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत आ. धनंजय मुंडेंचे एकहाती वर्चस्व! सिरसाळा पुन्हा ताब्यात, तर जळगव्हाण आणि मरळवाडी सहज राखली परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले असून परळी तालुक्यातील तीनही ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या उमेदवारांनी एकहाती विजय मिळवत तीनही ग्रामपंचायती वरती धनंजय मुंडे यांचे एकेरी वर्चस्व सिद्ध केले आहे. या पोटनिवडणुकीत परळी तालुक्यातील सिरसाळा या मोठ्या व मानाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शेख नसीब यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला असून विजयानंतर त्यांनी सहकाऱ्यांच्या समवेत आ. धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयात जाऊन स्व. पंडित अण्णा मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जल्लोष केला. यावेळी सिरसाळा ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच शेख नसीब शेख रहीम, माजी सरपंच फिरोज पठाण, ग्रामपंचायत सदस्य शेख नय्युम, शेख रफिक, अक्रम पठाण, सलमान पठाण, माजी सरपंच इम्रान पठाण, उपसरपंच सुलतान पठाण, मोहम्मद इनामदार, गुड्डू पठाण, मुस्लिम संघाचे जिल्हाध्यक्ष शिराज देशमुख,...

बीड जिल्हातील केज येथील केंद्राचा समावेश

इमेज
  महा डायलिसीस योजनेअंतर्गत नवीन बारा डायलिसीस केंद्रांचे १ मे रोजी होणार लोकार्पण किडनी विकारग्रस्तांना दिलासा मुंबई, दि २९ : ग्रामीण भागातील किडनी विकारग्रस्त रुग्णांना शासकीय दवाखान्यात मोफत डायलिसीस सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या "महाडायलिसीस" योजनेचा राज्यात महाराष्ट्र दिनी विस्तार करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते १ मे रोजी नवीन बारा डायलिसीस केंद्राचे लोकार्पण करण्यात येणार आहे. राज्यातील किडनी विकारग्रस्त नागरिकांना मोफत डायलिसीस सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने  ‘महाडायलिसीस’ योजना सध्या विविध शासकीय रुग्णालयांत प्रभावीपणे राबवली जात आहे. या सुविधेमुळे राज्यातील हजारो किडनी विकारग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा तसेच जिल्हा रुग्णालयांपर्यंत ही सेवा पोहोचवून ग्रामीण भागातील रुग्णांना घराजवळच निःशुल्क उपचार मिळावेत, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण रुग्णालयांत किमान ५ बेड्स, तर उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयांत ८ ते १० डायलिसीस बेड्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या ...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....