पोस्ट्स

प्रदिप अग्निहोत्री पुरोहित वैद्यनाथ मंदीर परळी वैजनाथ यांचा विशेष लेख......>>>>

इमेज
परळीकरांचे 'लोकनेते' धनंजय मुंडे:  कामाचा माणूस अन् थेट जनसामान्यांशी नातं सांगणारं नेतृत्व परळी वैजनाथ:महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या धडाडीच्या आणि आक्रमक कार्यशैलीमुळे ओळखले जाणारे नेते म्हणजेच राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे. मात्र, केवळ एक राजकीय नेता म्हणून नव्हे, तर परळी मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचा "आपला माणूस, कामाचा माणूस" म्हणून त्यांनी जनमानसात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला धावून जाण्याची त्यांची वृत्ती हीच त्यांची खरी ताकद ठरली आहे.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाची सर्वात मोठी वैशिष्ट्यपूर्ण बाजू म्हणजे त्यांची जनतेशी असलेली नाळ. ते कितीही मोठे नेते किंवा मंत्री असले, तरी परळीतील प्रत्येक सामान्य नागरिकाशी त्यांचे संबंध कौटुंबिक आहेत. याचे सर्वात जिवंत आणि बोलके उदाहरण म्हणजे प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत पाहायला मिळते.धनंजय मुंडे जेव्हा जेव्हा प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या परिसरात येतात, तेव्हा तिथल्या स्थानिक नागरिकांना, व्यापाऱ्यांना आणि भाविकांना राजकीय अंतर कधीच जाणवत नाही. मंदिरात आल्यावर ते तिथल्या ओळखीच्या माणसांना अगद...

प्रदीप खाडे सहसचिव, नाथ शिक्षण संस्था, परळी वैजनाथ यांचा विशेष लेख...

इमेज
शिक्षण, राजकारण आणि समाजकारणाचा समतोल साधणारे लोकनेते : शिक्षणप्रेमी आ.धनंजय मुंडे समाजाचा सर्वांगीण विकास घडवायचा असेल तर शिक्षण हीच सर्वात मोठी शक्ती आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे" हा संदेश कृतीत उतरविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या नेतृत्वामध्ये आ.धनंजय मुंडे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. राजकारणात सक्रिय भूमिका बजावत असतानाच शिक्षण, सामाजिक न्याय, कला, क्रीडा आणि ग्रामीण विकास या सर्व क्षेत्रांत त्यांनी भरीव योगदान दिले आहे. विद्यार्थी हा देशाच्या भविष्याचा शिल्पकार आहे, या विचारातून त्यांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री म्हणून काम करताना उसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी संत भगवानबाबा वसतिगृह उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर झाला. नाथ प्रतिष्ठान आणि नाथ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण क्ष...
इमेज
जेजुरीत दिंडीतील ट्रकच्या धडकेत तीन वारकरी महिलांचा मृत्यू; चार गंभीर जखमी श्रद्धा, भक्ती आणि नामस्मरणाच्या वातावरणात सुरू असलेल्या पंढरपूर वारीला सोमवारी सकाळी भीषण अपघाताचे ग्रहण लागले. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड–जेजुरी मार्गावरील दिवे घाट परिसरातून मार्गस्थ होत असताना ट्रकने मागून वारकऱ्यांना धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून 16 वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. नांदेडचा ट्रक, सांगलीच्या वारकरी बेलसर टोल नाक्यापासून जेजुरीच्या दिशेने साधारण ५०० मीटर अंतरावर हॉटेल शिपदीप लॉजिंगच्या समोर हा अपघात झाला. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता. स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य हाती घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत . धडक इतकी भीषण होती की, तिन्ही महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त केली जात असून परिसरात शोककळा पसरली आहे. अपघातात ३ ते ४ वारकरी गंभीर जखमी असून इतर वारकऱ्यांना किरकोळ दु...
इमेज
वारकरी संप्रदाय:भक्ती, बंधुता आणि सामाजिक सलोखा; महम्मद खान महाराजांच्या पालखीचे परळीत स्वागत परळी | प्रतिनिधी...      आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातून परळी मार्गे पंढरपूरकडे जाणाऱ्या पायी दिंड्यांचे आगमन सुरू असून, शनिवारी संत परमहंस महम्मद खान महाराजांची पालखी दिंडी वैद्यनाथ नगरीत दाखल झाली. विविध धर्म, पंथ आणि समाजघटकांना एकत्र आणणाऱ्या वारकरी परंपरेचा सामाजिक सलोखा व मानवतेचा संदेश या दिंडीच्या माध्यमातून पुन्हा अधोरेखित झाला.       अनिल महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आलेल्या या दिंडीतील वारकऱ्यांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेऊन हरिनामाच्या गजरात भक्तीभाव व्यक्त केला. अमरावती जिल्ह्यातील गणोरी येथून १९ जून रोजी निघालेली ही दिंडी कारंजा, वाशीम, हिंगोली, औंढा नागनाथ, परभणी आणि गंगाखेड मार्गे परळीत पोहोचली आहे. २० जुलै रोजी ही दिंडी पंढरपूर येथे दाखल होणार असून परळी हा या पालखी सोहळ्याचा २१ वा मुक्काम असल्याची माहिती शिवम चंदेल यांनी दिली.      यावेळी आकाश महाराज लक्षणे यांनी सांगितले की, वारकरी संप्रदाय हा केवळ धार्मिक प्रवास...

भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

इमेज
  वैद्यनाथ नगरीत रुक्मिणी मातेच्या माहेरच्या दिंडीचे जल्लोषात आगमन! मेणा, पालखी आणि विठ्ठलनामाच्या गजराने परळी दुमदुमली; भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी परळी |प्रतिनिधी  आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील कौंडिण्यपूर येथून निघालेली रुक्मिणी मातेच्या माहेरची पायी दिंडी वैद्यनाथ नगरी परळीत दाखल होताच संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. रुक्मिणी मातेचा मेणा, पालखी आणि विठुरायाच्या अखंड जयघोषाने परळीचे वातावरण अक्षरशः विठ्ठलमय झाले. "ज्ञानोबा-तुकाराम", "पुंडलिक वरदे हरी विठ्ठल" आणि "रुक्मिणी माता की जय"च्या घोषणांनी शहरातील प्रमुख मार्ग दुमदुमून गेले. टाळ-मृदंगाच्या तालावर वारकरी भक्तिभावाने नाचत-गात पुढे सरकत होते. दिंडीचे आगमन होताच दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. रुक्मिणी मातेचे जन्मस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कौंडिण्यपूर येथून निघणाऱ्या या दिंडीला वारकरी संप्रदायात विशेष स्थान आहे. यामुळे दिंडीच्या स्वागतासाठी परळीतील विविध धार्मिक संस्था, वारकरी मंडळे आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. फुलांची उधळण, आरती आणि जयघोषात दिंडी...
इमेज
  परळी वैजनाथ शहरात १४ जुलै रोजी भव्य रिंगण सोहळ्याचे आयोजन सर्व वारकरी-भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे : नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांचे आवाहन परळी वैजनाथ : प्रतिनिधी...        आषाढी वारीनिमित्त परळी वैजनाथ शहरात मंगळवार, दि. १४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ३.३० वाजता भव्य रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पालखीतील सर्व वारकरी तसेच वारकरी महिला भजनी मंडळांच्या सहभागातून हा सोहळा उत्साहात पार पडणार आहे.सर्व वारकरी-भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे  असे आवाहन नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी केले आहे.      अखिल भारतीय वारकरी मंडळ व परळी नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक कार्यक्रमात शहर व तालुक्यातील सर्व महिला भजनी मंडळे सहभागी होणार आहेत. वारकरी संप्रदायाची परंपरा, हरिनामाचा गजर आणि भक्तिमय वातावरण यामुळे परळी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे. रिंगण सोहळा कॉटन मार्केट यार्ड (जत्रा मैदान),  वेअरहाऊस शेजारी, प...
इमेज
  बंजारा समाज एकता यात्रा रविवारी परळीत संत सेवालाल महाराज चौकात होणार स्वागत-अमर पवार परळी(प्रतिनिधी)  धर्मगुरू बाबुसिंग महाराज पोहराड गड तसेच धर्माधिकारी आंध्र प्रदेशचे संत सेवालाल महाराज चॅरिटेबल  ट्रस्ट सेवागड श्री जी महाराज यांनी आयोजित केलेली बंजारा समाज एकता संकल्प यात्रा रविवार दि.१२ जुलै रोजी परळीत येत असुन संत सेवालाल महाराज चौकात या यात्रेचे भव्य स्वागत केले जाणार असुन या यात्रेच्या स्वागतास समाजबांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन बंजारा समाजाचे सेवागड विश्वस्त परळी वैजनाथ  अमर पवार यांनी केले आहे.  बंजारा समाज एकता यात्रा बंजारा धर्मगुरू बाबुसिंग महाराज पोवाडा गड तसेच धर्माधिकारी आंध्र प्रदेशचे संत सेवालाल चॅरिटेबल ट्रस्ट सेवागड श्री जी महाराज यांनी आयोजित केली असुन ही यात्रा ही ५ जुलै सेवागढ आंध्र प्रदेश येथून निघणार आहे १८ राज्यातुन बंजारा एकतेचा संदेश देत दि.२६  जुलै रोजी दिल्ली येथे पोंहोचणार आहे.यात्रेदरम्यान भगवंतसेवक किशन राठोड यात्रेनिमित्त देशातील बंजारा समाजांना पांढर्या ध्वजाखाली एकत्र आणण्याचा संकल्प करणार आहेत.यात्रेचे नियोजन प्रवीण ...