पोस्ट्स

१९ बटुंचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा

इमेज
  परळीत ब्राह्मण सभेच्या वतीने आज ४६ वा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा विशेष गौरव: नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी व समाजातील नवनिर्वाचित प्रतिनिधींचा होणार सत्कार परळी वैजनाथ (प्रतिनिधी):         येथील ब्राह्मण बहुद्देशीय सभेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ४६ व्या सामुदायिक उपनयन संस्कार (मुंज) सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. आज बुधवार, दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८:५२ च्या शुभ मुहूर्तावर प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसरातील दर्शन मंडप येथे हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात परळीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी व समाजातील लोकप्रतिनिधींचा, नवनिर्वाचित प्रतिनिधींचा सत्कार सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात येणार आहे.        गेल्या ४५ वर्षांची प्रदीर्घ आणि उज्ज्वल परंपरा लाभलेल्या या सोहळ्याला संपूर्ण महाराष्ट्रात विशेष मान्यता आहे. अत्यंत शिस्तबद्ध नियोजन आणि मांगल्याच्या वातावरणात होणारा हा उपक्रम परळी नगरीचे भूषण मानला जातो. यावर्षीच्या सोहळ्यासाठी नोंदणी पूर्ण झाली असून एकूण २१ मुंज...

अनेक वेळा निवेदने देऊनही प्रश्न मार्गी न लागल्याने अखेर या तरुणांनी उपोषणाचा मार्ग अंगीकारला

इमेज
  प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थीचे दोन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू  अनेक वेळा निवेदने देऊनही प्रश्न मार्गी न लागल्याने अखेर या तरुणांनी  उपोषणाचा मार्ग अंगीकारला  परळी वैजनाथ, प्रतिनिधी- परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रामध्ये 'प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी' म्हणून शासन सेवेत सामावून घेण्याच्या न्याय मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोमवार, २० एप्रिलपासून वीज केंद्राच्या मुख्य इमारतीसमोर या युवकांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. ​परळी औष्णिक विद्युत केंद्रासाठी जमिनी दिलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या वारसांनी कुशल प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या प्रशिक्षणार्थींना रिक्त पदांवर शासन सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. अनेक वेळा निवेदने देऊनही प्रश्न मार्गी न लागल्याने अखेर या तरुणांनी  उपोषणाचा मार्ग अंगीकारला आहे.  ​या उपोषणामध्ये केशव दत्ता सरवदे, राधाकिशन देवराव सरवदे, करण भास्कर मुंडे, धनंजय बिभीषण फड, बालाजी राम बिडगर, समाधान माणिक मुंडे, मंगेश तुकाराम मुंडे, ओंकार गणेश फड, सुरेश बाळासाहेब फड ...

नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

इमेज
  परळीतील सांची बौद्ध विहारात भीमगीतांचा सांस्कृतिक महासोहळा  युवा नेते सचिन कागदे यांच्या पुढाकारातून जयंतीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रम  नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त परळी शहर  ‘जय भीम’च्या जयघोषाने दुमदुमणार आहे. सामाजिक कार्यकर्ते सचिन कागदे यांच्या पुढाकारातून शिवाजीनगर येथील सांची बौद्ध विहार, थर्मल रोड येथे भव्य दिव्य भीमगीतांचा सांस्कृतिक महासोहळा आयोजित करण्यात आला असून, गुरुवार दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात रंगणार आहे. या सोहळ्यात ‘काळजावर कोरले नाव’ फेम अजय देहाडे यांच्यासह चेतनकुमार चोपडे, सचिन भुईगळ, विजयजी पवार, विकास साळवे यांसारखे नामवंत गायक आपल्या दमदार आवाजातून भीमगीत व बुद्धगीत सादर करणार आहेत. त्यांच्या सुरेल सादरीकरणातून बाबासाहेबांच्या विचारांचा, संघर्षाचा आणि सामाजिक क्रांतीचा संदेश रसिकांच्या मनात खोलवर रुजणार आहे. समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची ज्योत अधिक तेजस्वी व्हावी, तसेच युवा पिढीने...

सर्वांना सारखा न्याय देऊन अतिक्रमण हटाव मोहीम राबवावी

इमेज
व्यापारी व नागरिकांना विश्वासात घेऊन सर्वांना सारखा न्याय देऊन अतिक्रमण हटाव मोहीम राबवावी परळीत अतिक्रमण हटाव मोहिमेत पक्षपातीपणा नको; माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांची मागणी परळी वैजनाथ (प्रतिनिधी):   परळी नगर परिषदेच्या वतीने शहरात सध्या राबवण्यात येत असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत  पक्षपातीपणा करू नये. रस्त्यावरील वाढत्या अतिक्रमणांमुळे भाविक आणि नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हे अतिक्रमण कोणत्याही भेदाभेदाशिवाय सरसकट काढण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केलीआहे. व्यापारी व नागरिकांना विश्वासात घेऊन, सर्वांना सारखा न्याय देऊन ही मोहीम राबवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी केली आहे.      राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते माजी नगराध्यक्ष  दीपक देशमुख यांनी आज मोंढा परिसरात जाऊन स्थानिक व्यापाऱ्यांची भेट घेतली आणि नगर परिषदेच्या मोहिमेची पाहणी केली. यावेळी व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे आपल्या अडचणी मांडल्या. या भेटीनंतर  बोलताना देशमुख म्हणाले की, परळी हे ज्...

एसीबीची धडक कारवाई

इमेज
  लाच घेताना महावितरणची महिला सहाय्यक अभियंता रंगेहात जेरबंद; एसीबीची आष्टीत धडक कारवाई ----------------------------- कडा | प्रतिनिधी :      बीड जिल्ह्यात लाचखोरीचे वाढते प्रमाण पुन्हा एकदा उघड झाले असून आष्टी येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) धडक कारवाई करत महावितरणच्या महिला सहाय्यक अभियंत्याला रंगेहात पकडले आहे. या घटनेमुळे महावितरण विभागात एकच खळबळ उडाली आहे. आष्टी येथील महावितरण कार्यालयात कार्यरत असलेल्या सहाय्यक अभियंता कोमल अर्जुन शिंदे यांनी तक्रारदाराकडून सौर ऊर्जा प्रकल्पाचे ऑडिट पूर्ण करून निधी मंजुरी (फंड रिलीज) करण्यासाठी १८ हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती.या मागणीबाबत तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेत तक्रार नोंदवली.तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. त्यानुसार दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने कोमल शिंदे यांना रंगेहात ताब्यात घेतले.या कारवाईत पोलीस उपाधीक्षक सोपान चितमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी खरसाडे, बीडकर व पुरी यांनी सहभाग घेतला. पुढील गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून तपास ...
इमेज
  लाचखोर ग्रामसेवक सोपान मुसळे रंगेहात जेरबंद गेवराई, प्रतिनिधी..... बीड जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना, संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून कोणताही धडा घेतला जात नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. तलवाडा येथील ग्रामसेवक सोपान मुसळे यास पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तक्रारदाराकडून पीटीआर  देण्यासाठी मुसळे यांनी सुरुवातीला दहा हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर ही रक्कम पाच हजारांवर निश्चित झाली. याप्रकरणी तक्रारदाराने जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, २० एप्रिल २०२६ रोजी गेवराई येथील कार्यालयात सापळा रचण्यात आला. यावेळी सोपान मुसळे हे तक्रारदाराकडून ५,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.ही कारवाई जालना एसीबीचे उपअधीक्षक बाळासाहेब जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे....
इमेज
  ठोस आश्वासनाने रस्ते नुतनीकरण प्रश्न मिटला कार्यकारी अभियंता यांच्या आश्वासनाने आंदोलन तूर्तास स्थगित परळी / प्रतिनिधी अंबाजोगाई - मोहा - सिरसाळा व परळी - नागापूर - बोधेगाव - मोहा - सर्फराजपूर या दोन रस्त्यांचे तात्काळ अद्यवतीकरण करा या मागणीसाठी भारताच्या लोकशाहीवादी युवक संघटनेने रखरखत्या उन्हात म्हतारगाव फाटा कान्नापूर या ठिकाणी मागील पाच दिवसापासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनास पाठींबा म्हणून या खराब मार्गाने बाधित गावकऱ्यांनी टायर जाळून बांधकाम विभागाचा निषेध केला. आंदोलनाची तीव्रता पाहता विभागाचे कार्यकारी अभियंता स्वामी, उपअभियंता मुंडे यांनी सोमवार दि 20 रोजी आंदोलनकर्त्यांनी भेट घेतली. सुमारे दीड तास आश्वासक चर्चेअंती हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले. परळी तालुक्यातील मोहा गावाला अंबाजोगाई आणि परळी या दोन्ही तालुक्याला जोडणा-या राज्य महामार्गाची अतिवृष्टीमुळे चाळणी होऊन या मार्गावरील पूल देखील खचले गेले आहेत. आरोग्य, शिक्षण, व्यापार आदी विविध कारणाने या मार्गावरुन हजारो नागरिकांची वर्दळ असताना जीव मुठीत घेऊन या मार्गावर प्रवास करावा लागत आहे. कार्य आदे...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....