पोस्ट्स

इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

ओंकारकडून शेतकऱ्यांच्या हातावर तुरी

इमेज
  ओंकारकडून शेतकऱ्यांच्या हातावर तुरी  तुटपुंजे बिल देत शेतकऱ्यांची फसवणूक ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सत्याग्रह आंदोलन सुरूच परळी / प्रतिनिधी...ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकलेली ऊस बिलाची रक्कम, तोडणी मजुरी, वाहतूक व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करणे याबाबत ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने वारंवार निवेदने, भेटी घेऊन मागील चार महिन्यापासून प्रत्येक वेळी आश्वासनाची पोकळ बोळवण करून वेळ मारून नेत वेळ काढूपणा सुरू असल्याने शुक्रवार दि 8 रोजी ऊस उत्पादक संघर्ष समितीने सत्याग्रह आंदोलन सुरू केले. आंदोलनाची धास्ती घेत जानेवारी महिन्यातील गाळप केलेल्या ऊस देयक पोटी 1800 देय करत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केल्याने शेतकरीच्या सहनशीलतेचा अंत झाला असल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. ऊस गळीत हंगाम सुरू होताना ओंकार शुगर्स कडून 2950 रु भाव जाहीर करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अमिष दाखवत ऊस गाळप सुरू केला. गाळप हंगामापासून ते दि 15 जानेवारी गाळप केलेल्या ऊस देयक पोटी शेतकऱ्यांना 2950 रुपयांनी ऊस देयक ओंकार साखर कारखान्याने अदा केली मात्र तदनंतर गाळप झालेल्या ऊसाची देयके 3 महिन्याचा ...

घोटाळ्याचा तपासाकडे राज्याचे लक्ष !

इमेज
  तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठकला आठ दिवसाची पोलीस कोठडी गायब फाईल्स, लॅपटॉप आणि आवाज नमुन्यासाठी मागितली पीसीआर  बीड, प्रतिनिधी... बीड जिल्ह्यातील कोट्यावधी रुपयांच्या भूसंपादन मावेजा वाटप घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना न्यायालयाने १५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. महसूल प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेल्या या बहुचर्चित घोटाळ्याच्या तपासाला आता वेग येण्याची चिन्हे आहेत. अविनाश पाठक यांना गुरुवारी बीड न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी तपासी अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे दहा दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करत गंभीर स्वरूपाची माहिती सादर केली. आरोपीकडून महत्त्वाचा लॅपटॉप जप्त करायचा असून कॉल रेकॉर्डिंग साठी आवाजाचे नमुने घेणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच लातूर, पुणे आणि मुंबई येथील आरोपीच्या तीन निवासस्थानी झडती घेण्याची गरज असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. या घोटाळ्याशी संबंधित १५४ फाईलपैकी १४८ फाईल्स मिळाल्या असून सहा महत्त्वाच्या फाईल्स अद्यापही गायब असल्याचे तपास अ...

मुख्याधिकारी यांना लिहिले सविस्तर उत्तर......

इमेज
  सरस्वती नदी वाचवा; काँक्रीटीकरण नव्हे तर पुनर्जीवन करा — अश्विन मोगरकर यांचे परळी नगरपरिषदेला निवेदन परळी वैजनाथ : प्रतिनिधी  धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्व असलेल्या सरस्वती नदीच्या काँक्रीटीकरण प्रकल्पाविरोधात सामाजिक कार्यकर्ते अश्विन मोगरकर यांनी परळी वैजनाथ नगरपरिषदेला सविस्तर निवेदन देत हा प्रकल्प तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. नगरपरिषदेकडून दि. 30 एप्रिल 2026 रोजी देण्यात आलेल्या पत्राला उत्तर देताना मोगरकर यांनी म्हटले आहे की, सरस्वती नदी ही नैसर्गिक नदी असल्याचे तसेच ती पूर्वी बाराही महिने वाहत असल्याचे नगरपरिषदेकडून प्रथमच अधिकृतरीत्या मान्य करण्यात आले आहे. भूमी अभिलेख कार्यालयाकडे नदीची नैसर्गिक हद्द कायम करण्यासाठी मोजणीची मागणीही करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. निवेदनात नगरपरिषदेवर गंभीर आरोप करण्यात आले असून, नदीत थेट सांडपाणी व गटाराचे पाणी सोडले जात असल्यामुळे जलप्रदूषण प्रतिबंधक कायद्यांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच नदीपात्रातील अतिक्रमण रोखण्यात नगरपरिषद अपयशी ठरल्याचे सांगत, सरस्वती नदीपात्रात उभारण्यात आल...

परळी तालुका गोर सेनेची राज्यसरकार कडे मागणी

इमेज
  एस.टी.आरक्षणासाठी नेमलेल्या समितीने  पाच महिन्यात केलेल्या कामाचा आढावा द्या-परळी तालुका गोर सेनेची राज्यसरकार कडे मागणी परळी , प्रतिनिधी - गेल्या वर्षी गोरबंजारा समाजाला एस.टी.प्रवर्गातून आरक्षण द्या,हैदराबाद गॅझेट लागू करा आदी मागण्यासाठी गोरबंजारा समाजाने महाराष्ट्रभर ५५ महामोर्चे काढले शिवाय गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा संदेश चव्हाण यांनी समृद्धी महामार्गावर हजारो गोर सनिक  उतरवून रास्ता रोको केला व नांदेड रेल्वे रोखण्याचा इशारा दिला होता मात्र राज्यसरकार न सकारात्मक चर्चा करण्यासाठी मुंबई येथे ४ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व बंजारा समाजातील शिष्टमंडळासोबत सविस्तर चर्चा झाली व एसटी आरक्षणासाठी उच्च न्यायालयाचे माजी  न्यायाधीश तहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास समिती नेमण्यात आली मात्र गेल्या पाच महिन्यात समितीन कोणती कामे केली, कोणत्या दिशेने अभ्यास सुरु केला आहे की अजून फक्त कागदापुरतीच समिती सिमित राहिली आहे हे कळत नसल्याने गोरबंजारा समाज आक्रमक झाला असून अभ्यास समितीने पाच महिन्य...
इमेज
पर्यावरणास हानी पोंहचवणारा सरस्वती नदीवरील सिमेंटीकरणाचा प्रस्ताव रद्द करा-सौ.वर्षा जोशी परळी (प्रतिनिधी)  परळी शहरातुन वाहत असलेल्या सरस्वती नदीचे बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या धार्मिक इतिहासात मोठे महत्व असुन या नदीच्या अस्तित्वामुळेच परळीला पाण्यावरची परळी अशी ओळख आहे.परळी नगरपालिकेने या नदीचे क्रॉंक्रिटीकरण करुन अस्तित्वच संपवण्याचा प्रयत्न सुरु केलेला आहे.यामुळे धार्मिक ठेवा तर नष्ट होणारच आहे परंतु पर्यावरणाची मोठी हाणी होणार असल्याने हा प्रकल्प रद्द करुन पर्यावरणपूरक प्रकल्प राबवावा अशी मागणी भाजपा शहर उपाध्यक्षा सौ.वर्षा जोशी यांनी केली आहे.    याबाबत नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देत सरस्वती नदीवरील प्रस्तावित प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे.परळी वैजनाथ शहरातुन वाहत असलेल्या सरस्वती नदीमुळे शहराचा पर्यावरणीय समतोल राखण्यास मोठी मदत होते.या नदीच्या पाण्यामुळे पाणीपातळीसह,तापमानात समतोल राखला जातो.या नदीच्या पाण्यामुळे अंबेवेस, गणेशपार,बरकत नगर,कृष्णा नगर,शिवनगर,इंदिरा नगर,पद्मावती गल्ली,आझाद नगर अशा अर्ध्या परळ...

उद्या दुपारी १ वा. निकाल.....

इमेज
दहावीच्या निकालाची तारीख जाहीर; उत्सुकता संपली  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी  ८ मे) जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे.राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी अधिकृत परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणारी दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आली होती.      या परीक्षेसाठी आठ लाख ६५ हजार ७४० विद्यार्थी, सात लाख ४९ हजार ७३६ विद्यार्थिनी आणि १५ तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यातील एकूण २३ हजार ६८३ शाळांमधून विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून संपूर्ण राज्यातील पाच हजार १११ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षेचा निकाल १३ मे रोजी जाहीर करण्यात आला होता. राज्यातील एकूण २३ हजार ६८३ शाळांमधून विद्यार्थ्यांनी...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....