पोस्ट्स

विधानपरिषदेसाठी उमेदवारी कोणाला?

इमेज
  स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेसाठी परळीतूनही उमेदवारी? माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख इच्छुक; कार्यकर्त्यांकडून उमेदवारीची जोरदार मागणी परळी | प्रतिनिधी    धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक नाना देशमुख यांच्या नावाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सक्रिय सदस्य असलेल्या दीपक देशमुख यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जही विकत घेतल्याची माहिती समोर आली असून पक्षाकडे उमेदवारीची मागणी देखील करण्यात आली आहे.    धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठा जनसंपर्क, विविध पदाधिकाऱ्यांशी असलेले निकटचे संबंध आणि कार्यकर्त्यांमधील मजबूत पकड यामुळे दीपक देशमुख यांचे नाव चर्चेत आले आहे. परळी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष कारकीर्दीत त्यांनी विविध विकासकामांवर भर दिला होता. त्यामुळे बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधींमध्ये त्यांचा चांगला संपर्क  असल्याचे मानले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून राजक...

दोन आरोपींवर गुन्हा दाखल

इमेज
  कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २ लाख ६५ हजारांच्या आठ गायींची पोलिसांकडून सुटका माजलगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई; दोन आरोपींवर गुन्हा दाखल माजलगाव, दि. २४ (प्रतिनिधी) : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या आठ गोवंशीय गायींची माजलगाव ग्रामीण पोलिसांनी सुटका करत दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे गोवंश तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव येथील मनूर वस्ती भागात काही गायी कत्तलीच्या उद्देशाने आणून अमानुष पद्धतीने बांधून ठेवण्यात आल्याची माहिती माजलगाव ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक मुदीराज व सहाय्यक पोलिस निरीक्षक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने छापा टाकला. या कारवाईदरम्यान आरोपी अन्वर कुरेशी व सादेक जावेद यांनी आठ गोवंशीय गायी अंदाजे २ लाख ६५ हजार रुपये किंमतीच्या गायी कत्तलीच्या उद्देशाने आणून ठेवल्याचे उघड झाले. तसेच जनावरांना चारा-पाणी न देता उपाशी अवस्थेत बांधून ठेवण्यात आल्याचेही निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ आठही गायी ताब्यात घेत त्यांची सुटका केली. याप्रकरणी ...
इमेज
  रात्री दरवाजा उघडा ठेवून झोपलेल्या महिलेचा विनयभंग केज:- लाईट नसल्याने घराचा दरवाजा उघडा ठेवून एक महिला व तिच्या दोन मुली झोपलेल्या असताना मध्यरात्री त्या विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची घटना शहरात घडली आहे. दि. २२ मे रोजी रात्री लाईट नसल्यामुळे केज शहरातील एका उपनगरात राहत असलेली एक विविहित महिला ही तिच्या दोन मुलीना सोबत घेऊन घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपल्या होत्या. त्यावेळी रात्री सुमारे ११:४५ वा. च्या सुमारास दीपक वैजनाथ लांडगे याने घरात घुसून त्या विवाहित महिलेचा वाईट हेतुने हात धरला. याचा जाब विचारण्यासाठी ती महिला दीपक लांडगे याच्या घरी गेली असता तिला दीपक लांडगे यांच्या घरातील दोन महिलांनी धक्काबुक्की केली. पीडित महिलेच्या तक्रारी वरून दि. २४ मे  रोजी दीपक लांडगे यांच्यासह त्याच्या कुटुंबातील दोन महिला विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु र नं ३१७/२०२६ भा न्या सं ७४, ११५(२), ३३३, ३५१(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल त्रिंबक सोपणे हे तपास करीत आहेत.
इमेज
 पी.एस.आय लक्ष्मण उंबरे यांची ए.पी.आय पदावर पदोन्नती परळी प्रतिनिधी : कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि जबाबदारीने सेवा बजावणारे पी.एस.आय लक्ष्मण उंबरे यांची नुकतीच ए.पी.आय (असिस्टंट पोलिस इन्स्पेक्टर) पदावर पदोन्नती झाल्याबद्दल रविवार दिनांक २४ मे रोजी परळी येथील चेमरी रेस्ट हाऊस येथे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी उंबरे यांच्या कार्याचा गौरव करत पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी फुले-आंबेडकरी अभ्यासक भगवान साकसमुद्रे, लक्ष्मण वैराळ, विनोद उंबरे, हेड कॉन्स्टेबल कोरडे, मेजर, पोलिस नाईक गवते, पोलीस कॉन्स्टेबल भोसले, पो. कॉ. भोसले, पो. कॉ. कोकाटे, पो. कॉ. गमे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन तसेच शाल-श्रीफळ प्रदान करून त्यांचा सत्कार केला. लक्ष्मण उंबरे हे सध्या राज्याचे माजी मंत्री मा. धनंजय मुंडे यांच्या व्ही.आय.पी. सुरक्षा पथकात पी.एस.आय म्हणून कार्यरत असून त्यांनी आपल्या कर्तव्यदक्ष आणि तत्पर सेवेमुळे विशेष ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या पदोन्नतीमुळे सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे व...

आंतरजिल्हा टोळीवर पोलिसांची धडक कारवाई

इमेज
आष्टीत ‘धूम स्टाईल’ सोनसाखळी चोरांचा पर्दाफाश; दोन सख्खे मेहुणे जेरबंद महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून दुचाकीवरून पसार होणाऱ्या आंतरजिल्हा टोळीवर आष्टी पोलिसांची धडक कारवाई कडा | प्रतिनिधी.... आष्टी शहरासह ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी व दागिने धूम स्टाईलने हिसकावून दुचाकीवरून पसार होणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा आष्टी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन सख्ख्या मेहुण्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या चौकशीत दोन मोठ्या गुन्ह्यांची कबुली मिळाल्याने आणखी चोरीच्या घटनांची उकल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आष्टी परिसरात महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या सलग घटनांमुळे नागरिकांमध्ये, विशेषतः महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.पोलिसांना खुले आव्हान देणाऱ्या या चोरट्यांचा माग काढण्यासाठी तीन विशेष पथके तयार करण्यात आली होती.शनिवारी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून विकास गड्या भोसले (वय २२,रा.चिखली,ता.आष्टी, जि. बीड) आणि अरुण बप्पा काळे (वय २२, रा. बोलेगाव,ता. ग...

खा.बजरंग सोनवणे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रशासनाला पत्र

इमेज
बीड जिल्ह्यात अवकाळीचा शेतकऱ्यांना फटका ; तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्या! खा.बजरंग सोनवणे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रशासनाला पत्र बीड : बीड जिल्ह्यात १५ मे २०२६ पासून झालेल्या मुसळधार अवकाळी पाऊस आणि जोरदार चक्रीवादळाने संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेती पिके, फळबागा, कृषी संरचना आणि मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी व ग्रामीण जनता मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. या पार्श्वभूमीवर बीड लोकसभेचे खा. बजरंग सोनवणे यांनी संवेदनशील भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्राताई पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना पत्र दिले आहे. पत्रात म्हटले आहे, नुकसानग्रस्त भागाचे संयुक्त पथकांमार्फत युद्धपातळीवर पंचनामे करून त्वरित आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. १५ मे पासून सुरू असलेल्या या अस्मानी संकटामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाताशी आलेली उभी पिके, फळबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. याशिवाय, चक्रीवादळाच्या ...

चॉकलेटसाठी रस्त्यावर उतरून तमाशा...भारतीय उत्पादकांचा अपमान..

इमेज
मेलोडीला गोडी देशभक्तीची, राहुल गांधीनं लावली वाट स्वदेशीची चॉकलेटसाठी रस्त्यावर उतरून तमाशा...भारतीय उत्पादकांचा अपमान    2014 साली देशाची सुत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हाती घेतली अन् स्वदेशीचा गाजावाजा सुरू झाला. आत्मनिर्भर भारत कल्पनेचा जन्म त्यातुनच पुढे आला. करोनासारख्या भयंकर आजाराची लस देखील आत्मनिर्भर झाली. प्रत्येक भारतीयाला स्वदेशीचा स्वाभिमान असतोच पण केवळ राजकिय स्वार्थापोटी सत्ता बाहेर पडलेल्या काँग्रेस संस्कृतीला मात्र स्वदेशी कल्पना तर सोडा  भारतीय उत्पादकांचा तिळाएवढा अभिमान वाटत नाही हे दुर्दैव. मेलोडी चॉकलेटची गोडी देशात चाळीस वर्षापासुनची चाखत आलो. तोच स्वाभिमान उराशी बाळगुन इटालीत दौर्‍यावर गेलेल्या मोदीजींनी त्या देशाच्या पंतप्रधान मेलोनीला मेलोडी भेट दिली. खरं तर भारतीय संस्कृती, रूढी, परंपरेचा तो भाग देखील आहे. एका भेटीनं तेवढ्या भेटवस्तूनं खरं तर चॉकलेटची गोडी आंतरराष्ट्रीय बाजारात जावुन पोहोचली. तिथेच भारतीय नागरिकांची कॉलर टाईट झाली. मात्र केवळ राजकिय स्वार्थापोटी सत्ताबाहेर खिचपत पडलेल्या काँग्रेसवाल्यांचं पित्त खवळलं. अगदी राहुल गांधीपासू...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या