पोस्ट्स

इमेज
२०२७-२८ पासून सीईटीद्वारे होणार एएनएम-जीएनएम प्रवेश गुणवत्तापूर्ण व पारदर्शक प्रणालीला चालना मुंबई, दि. १४ : राज्यातील एएनएम आणि जीएनएम परिचारिका पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता, गुणवत्ता आणि एकसमानता आणण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या नियंत्रणाखालील तसेच महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैद्यक शिक्षण मंडळाशी संलग्न महाविद्यालयांतील एएनएम व जीएनएम अभ्यासक्रमांचा प्रवेश राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) मार्फत करण्यात येणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय ३० जून २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत एएनएम व जीएनएम अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत विविधता असल्याने एकसमान निकषांचा अभाव, पारदर्शकतेचा प्रश्न आणि विद्यार्थ्यांवरील अनावश्यक ताण अशा समस्या निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांप्रमाणेच सीईटी प्रणाली लागू करून गुणवत्तापूर्ण आणि न्याय्य प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या प्रणालीअंतर्गत राज्य सामाईक प्...

शासनाने काढले अधिकृत परिपत्रक...

इमेज
  दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीदिनी अभिवादन कार्यक्रम मुंबई दि. १५: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीचा समावेश २०२६ मधील राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये करण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाने १५ जुलै, २०२६ रोजी या संदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. २२ जुलै रोजी जयंती निमित्त राज्यभर कार्यक्रम परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांची जयंती २२ जुलै, २०२६ (बुधवार) रोजी राज्यभरात साजरी केली जाणार आहे. या दिवशी मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले जाईल. हा आदेश राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसह सर्व शाळा व महाविद्यालयांनाही लागू करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या भागातील सर्व यंत्रणांमध्ये या कार्यक्रमाचे योग्य नियोजन आणि अंमलबजावणी करण्याचे निर्देश साप्रविच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
इमेज
अकरावी प्रवेशासाठी १६ जुलैपासून पुढील फेरी; सुधारित वेळापत्रक जाहीर मुंबई, दि. १४ : अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत नियमित तीन फेऱ्या आणि विशेष दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी 16 जुलै पासून पुढील प्रवेश फेरीचे वेळापत्रक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. या फेरीत नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी, अर्जातील दुरुस्ती आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या पसंतीक्रमाची नोंद करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जाहीर वेळापत्रकानुसार 16 जुलै दुपारी 3 वाजेपासून 18 जुलै सायंकाळी 6 वाजेपर्यंत नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, अर्जातील दुरुस्ती आणि भाग-2 भरण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. विद्यार्थ्यांना किमान एक आणि कमाल दहा कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविता येणार आहेत. या फेरीसाठी प्रवेश वाटप प्रक्रिया 19 जुलै रोजी पार पडणार असून 20 जुलै रोजी सकाळी 10 वाजता प्रवेश यादी आणि कट-ऑफ जाहीर करण्यात येणार आहेत. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना 20 जुलै ते 22 जुलै या कालावधीत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन कागदपत्र पडताळणी करून प्रवेश निश्चित करावा लागणार आह...

पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे केले कौतुक...

इमेज
पुस्तक प्रदर्शन आणि बालसभेचे इंदपवाडी शाळेत यशस्वी आयोजन शिक्षकांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिलेल्या बाल वाचनालयातील पुस्तकांचे प्रदर्शन आणि बालसभेच्या विषयावर विद्यार्थ्यांनी मांडलेली मते यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदपवाडी येथे उपस्थित पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदपवाडी येथे दर महिन्याला बालसभा घेतली जाते आणि वेगवेगळ्या विषयावर विद्यार्थ्यांना स्वतःचे विचार मांडण्याची संधी दिली जाते. या महिन्याच्या बाल सभेच्या अध्यक्षस्थानी इयत्ता पाचवीचा विद्यार्थी युवराज गजानन मुंडे उपस्थित होता. कार्यक्रमास अतिथी म्हणून गावच्या सरपंच सौ शालूताई फुलचंदराव मुंडे, पोलीस पाटील सौ मनीषा अनंत मुंडे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष श्री केशवराव मुंडे, सदस्य श्री वैजनाथराव मुंडे, आलका दिंदोरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनानंतर वाचनालयासाठी आलेल्या नव्या पुस्तकांच्या प्रदर्शनाचे फित कापून उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या स्वागतानंतर विद्यार्थ्यांनी 'निसर्ग माझा सखा...

रेल्वे, कृषी, घनकचरा व्यवस्थापनासह विविध विभागांच्या मॅरेथॉन बैठका

इमेज
ना. पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला विकास कामांचा आढावा वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिराला पुरातन स्वरूप मिळणार ; तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी दिल्या सूचना रेल्वे, कृषी, घनकचरा व्यवस्थापनासह विविध विभागांच्या मॅरेथॉन बैठका बीड. दि. १५ जुलै----- राज्याच्या पर्यावरण आणि पशूसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाची विभागनिहाय आढावा बैठक घेतली. रेल्वे, रस्ते, तीर्थक्षेत्र विकास, कृषी पशूसंवर्धन, पर्यावरण, क्रीडा, नगर परिषद प्रशासन यासह सर्वच विभागांचा त्यांनी आढावा घेतल्यामुळे जिल्हा प्रशासन गतिमान झाले आहे.  बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहात संपन्न झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहेमान, अप्पर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक आणि सर्वच विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील नगर पालिका हद्दीतील कचरा व्यवस्थापनाचा आढावा घेतल्यानंतर ना. पंकजाताई मुंडे यांनी कचरा व्यवस्थापनासाठी मिळणाऱ्या निधीचे लेखापरीक्षण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नगर-बीड-परळ...

या भव्य मोफत आरोग्य शिबिरामध्ये तीन महत्वाच्या शिबिरांचा समावेश आहे.....

इमेज
आ. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त  १८०० रु किमतीच्या मोफत रक्त तपासणी व नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा-डॉ.संतोष मुंडे यासोबतच दिव्यांग, विधवा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठी विशेष मार्गदर्शन व तक्रार निवारण अभियानाचा होणार प्रारंभ परळी (प्रतिनिधी):दिनांक १३ जुलै       आ.धनंजय मुंडे  यांच्या वाढिवसानिमित्त सर्वसामान्य नागरिकांसाठी १८०० रु किंमतीच्या भव्य मोफत रक्त तपासणी आणि कॉम्पुटराईजड नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन दिनांक १५ जुलै सकाळी १०.०० ते १.०० वाजेपर्यंत श्रीनाथ हॉस्पिटल परळी वैजनाथ येथे करण्यात आले आहे.  त्याच बरोबर दिव्यांग, विधवा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठी विशेष मार्गदर्शन व तक्रार निवारणअभियानाची  मंगल सुरुवात करण्यात येणार आहे अशी माहिती दिव्यांग कल्याण अभियान मंत्रालयाचे उपाध्यक्ष व या शिबिराचे मुख्य आयोजक डॉ.संतोष मुंडे यांनी दिली.आ.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली  दिव्यांगाचे कैवारी म्हणून ओळख असणारे तसेच विविध सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर र...

प्रदिप अग्निहोत्री पुरोहित वैद्यनाथ मंदीर परळी वैजनाथ यांचा विशेष लेख......>>>>

इमेज
परळीकरांचे 'लोकनेते' धनंजय मुंडे:  कामाचा माणूस अन् थेट जनसामान्यांशी नातं सांगणारं नेतृत्व परळी वैजनाथ:महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या धडाडीच्या आणि आक्रमक कार्यशैलीमुळे ओळखले जाणारे नेते म्हणजेच राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे. मात्र, केवळ एक राजकीय नेता म्हणून नव्हे, तर परळी मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचा "आपला माणूस, कामाचा माणूस" म्हणून त्यांनी जनमानसात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला धावून जाण्याची त्यांची वृत्ती हीच त्यांची खरी ताकद ठरली आहे.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाची सर्वात मोठी वैशिष्ट्यपूर्ण बाजू म्हणजे त्यांची जनतेशी असलेली नाळ. ते कितीही मोठे नेते किंवा मंत्री असले, तरी परळीतील प्रत्येक सामान्य नागरिकाशी त्यांचे संबंध कौटुंबिक आहेत. याचे सर्वात जिवंत आणि बोलके उदाहरण म्हणजे प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत पाहायला मिळते.धनंजय मुंडे जेव्हा जेव्हा प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या परिसरात येतात, तेव्हा तिथल्या स्थानिक नागरिकांना, व्यापाऱ्यांना आणि भाविकांना राजकीय अंतर कधीच जाणवत नाही. मंदिरात आल्यावर ते तिथल्या ओळखीच्या माणसांना अगद...