पोस्ट्स

इमेज
  परळीतील कृषी व पशुवैद्यकीय महाविद्यालयास स्व.अजित पवार यांचे नाव द्या– दीपक देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : परळी वैजनाथ येथे सुरू होऊ घातलेल्या कृषी महाविद्यालय व पशुवैद्यकीय महाविद्यालयास स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) चे नेते माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी  मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सादर निवेदनात देशमुख यांनी नमूद केले आहे की, स्वर्गीय अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्य करताना त्यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती दिली. शेती, सिंचन, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि ग्रामीण विकास या क्षेत्रात त्यांनी दूरदृष्टी ठेवून घेतलेल्या निर्णयांमुळे जिल्ह्यात विकासाची नवी दिशा निर्माण झाली. परळी वैजनाथ येथे उभारण्यात येणारी कृषी व पशुवैद्यकीय महाविद्यालये ही शेतकरी व ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. या शैक्षणिक संस्थांमुळे परिसरातील विद्यार्थ...
इमेज
  चार श्रमसंहिता रद्द करा, मागणीसाठी परळीत सिटू कामगारांचा धडकला  तहसीलवर भव्य मोर्चा  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       चार श्रमसंहिता रद्द करा यासह अन्य कामगार क्षेत्रातील विविध मागण्यांसाठी आज परळी तहसील कार्यालयावर सिटू कामगारांचा भव्य दिव्य मोर्चा धडकला. कामगार विरोधी धोरण रद्द करा, खाजगीकरण रद्द करा, चार श्रम संहिता रद्द करा अशा प्रकारची मागणी सिटू कामगार मोर्चेकर्‍यांनी शासनाकडे केली.   केंद्र सरकारने कामगार विरोधी भांडवलदार धार्जिन्या चार श्रमसंहिता लागू केलेल्या आहेत. कामगार विरोधी चार श्रमसंहिता रद्द करा या प्रमुख मागणीसाठी परळी सिटू कामगार संघटनेने परळी तहसीलवर मोर्चा काढला होता. परळीतील सिटू कार्यालयापासून हा मोर्चा टावर- मोंढा- बस स्टॅन्ड मार्गे तहसीलवर पोहोचला. चार श्रमसंहिता रद्द करा, आशा वर्कर्सना कायम करा, शालेय पोषण आहार कामगारांना कायम करा, आजी- आजोबांना दहा हजार रुपये पेन्शन द्या, कंत्राटीकरण थांबवा,  खाजगी धंद्यात आरक्षण लागू करा, घर कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती द्या, घर कामगारांना दहा हजार रुपये पेन्शन द्या, शालेय पोषण आहा...

बीड जिल्ह्यात सर्वाधिक तब्बल 25 कोटींच्या भांड्यांचे होणार वितरण

इमेज
आता राज्यातील ४ लाख  ऊसतोड कामगारांना होणार गृहोपयोगी वस्तू संचांचे वाटप ;शासन निर्णय निर्गमित बीड जिल्ह्यात सर्वाधिक तब्बल 25 कोटींच्या भांड्यांचे होणार वितरण परळीवैजनाथ, प्रतिनिधी.....       राज्यातील ऊसतोड कामगार व त्यांचे कुटूंबियांना गळीत हंगामाच्या कालावधीमध्ये अनेक अडी-अडचणींचा सामना करावा लागत असल्याने ऊसतोड कामगारांना "गृहोपयोगी वस्तू संच" वाटप करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.  गृहोपयोगी वस्तू संच वाटप करण्याबाबत गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये ४ लाख लाभार्थ्यांना गृहोपयोगी वस्तु संच वाटप करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय आज दिनांक 12 फेब्रुवारी रोजी निर्गमित करण्यात आला आहे या मध्ये सर्वाधिक लाभार्थी संख्या बीड जिल्ह्यात 25 हजार इतकी असून तब्बल 25 कोटी रुपयांच्या भांड्यांचे बीड जिल्ह्यात वितरण होणार आहे.        महाराष्ट्र राज्यामध्ये साखर उद्योग हा एक प्रमुख उद्योग असून सद्यः स्थितीमध्ये राज्यात कार्यरत सहकार व खाजगी क्षेत्रातील साखर कारखान्यांमध्ये उसतो...

स्व. अजितदादांनी बीड येथील ऊसतोड कामगार मेळाव्यात धनंजय मुंडेना दिला होता शब्द!

इमेज
  धनंजय मुंडेंच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यास मोठे यश; ऊसतोड कामगारांच्या मुला - मुलींना दर्जेदार शिक्षणाची वाट मोकळी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतून बीड जिल्ह्यात आणखी ११ वसतिगृहे उभारणीस शासनाकडून १५९.३६ कोटी रुपये निधी उपलब्ध!   मुंबई (प्रतिनिधी) - लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या अंतर्गत तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सुरू केलेल्या संत भगवान बाबा शासकीय वसतीगृह योजनेला व्यापक स्वरूप प्राप्त होत असून धनंजय मुंडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले आहे.      धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय मंत्री असताना २५ जून, २०२१ रोजी या योजनेची घोषणा करून प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू केली होती. त्यामुळे मुंडे जनक असलेल्या संत भगवान बाबा शासकीय वसतीगृह योजनेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यांमध्ये शंभर क्षमतेचे मुलींसाठी एक व मुलांसाठी एक असे एकूण 22 वसतीगृह मंजूर करून भाड्याच्या जागेत सुरू करण्यात आलेले आहेत. दरम्यान त्यापैकी आतापर्यंत तीन वसतीगृहांना स्वतःची जागा व निधी मिळालेला असून त्याचे बांध...
इमेज
  ना.पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतील महापशुधन एक्स्पोत शेतकरी व पशुपालकांनी सहभाग नोंदवावा-उमाताई समशेट्टे   परळी (प्रतिनिधी)            परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात येत असलेल्या 'महापशुधन एक्स्पो-२०२६' या अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ना.पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या देशपातळीवरील महापशुधन एक्स्पो-2026 या भव्य या प्रदर्शनाच्या माध्यमातून राज्यातील आणि देशातील पशुपालकांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी म्हणून आयोजित करण्यात आले आहे. ना.पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या परळी वैद्यनाथ येथील देशपातळीवरील महापशुधन एक्स्पो-2026 या भव्य प्रदर्शनाचा शेतकरी व पशुपालकांनी मोठ्या संखेने सहभाग घ्यावा असे आवाहन भाजपच्या शहराध्यक्षा सौ.उमाताई समशेट्टे यांनी केले आहे.            परळी शहरातील तहसिल समोरील मैदानावर  दि.13 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय पशुप्रदर्शन संपन्न होत असून परळी हे पशुप्रदर्शन ३२ एकरांच्या भव्य परिसरात होणार आहे. शेतकऱ्यांना व बेरो...

मुकुंद पुजा विधी साहित्य भांडारच्या विस्तारित द्वितीय दालनाचा शुभारंभ

इमेज
अंतर्मनाची साधनाच माणसाला देवत्व प्राप्त करुन देते- माता स्वामीनी मुकुंद पुजा विधी साहित्य भांडारच्या विस्तारित द्वितीय दालनाचा शुभारंभ परळी (प्रतिनिधी)  प्रत्येक प्राणीमात्राच्या शरीरात बाह्य आणि अंतर्मन अशा दोन क्रिया असतात.यातील अंतर्मनाची साधना ही देवत्वाकडे घेवुन जाणारी असल्याचे पुज्य  माता स्वामीनी यांनी केले.परळी शहरातील मुकुंद पुजा विधी साहित्य भांडारच्या विस्तारित द्वितीय दालनाचा दि.१० फेब्रुवारी रोजी माताजींच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी बोलत होत्या.  पुज्य स्वामीनी माताजी यांचे सोमवार दि. 9 रोजी सकाळी  ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र परळी वैद्यनाथ नगरीत आगमन झाले आहे.गोपाळ आंधळे यांचे घरणीकर रोड,भाजपा कार्यालयाशेजारी असलेले मुकुंद पुजा विधी साहित्य भांडार हे भाविकांना खात्रीशीर आणि सर्व प्रकारच्या पुजेचे साहित्य मिळणारे दालन म्हणून ओळख निर्माण झाल्यानंतर आता या मुकुंद पुजा विधी साहित्य भांडारच्या द्वितीय दालनाचा शुभारंभ वंदनीय पुज्य स्वामीनी माताजी यांच्याहस्ते नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत मंगळवार दि.१० फेब्रुवारी रोजी करण्यात आला...

बीडच्या पोलीस भरतीमध्ये कोसळून दुर्दैवी मृत्यू..

इमेज
पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या परळीतील मांडेखाेलच्या दीपकवर पोलीस भरतीतच काळाने घातला घाला ! बीडच्या पोलीस भरतीमध्ये कोसळून दुर्दैवी मृत्यू परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मेहनत घेत बीडच्या पोलीस भरतीमध्ये सहभागी झालेल्या परळी तालुक्यातील मांडेखेलच्या दीपक व्हावळे याच्यावर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने मांडेखेल गावावर शोककळा पसरली आहे .ऊसतोड मजूर कुटुंबातील या युवकाचे ऐन पोलीस भरती मैदानावरच भरती प्रक्रियेत असताना निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.       बीड येथे सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रिये दरम्यान बुधवारी दुपारी एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. दीपक भास्कर व्हावळे (रा. मांडेखेल.ता. परळी, जि. बीड) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मूळचा मांडेखेल येथील रहिवासी आहे. दीपक सकाळी परळीहून बीड येथे पोलीस भरतीसाठी दाखल झाला होता.भरतीदरम्यान कवायत, धावणे आदी शारीरिक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. डीहायड्रेशनचा त्रास होत असल्याचे तपासण...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....