पोस्ट्स

धनंजय मुंडेंनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार

इमेज
परळीत उभारणार 765 के.व्ही. अति उच्चदाब उपकेंद्र व विद्युत जोडणी प्रकल्प, ऊर्जा विभागाकडून 1345 कोटींची मंजुरी धनंजय मुंडेंनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - परळी वैद्यनाथ येथे महापारेषण मार्फत ७६५ के.व्ही. अति उच्चदाब उपकेंद्र व विद्युत जोडणी प्रकल्पास राज्य सरकारच्या ऊर्जा विभागाने १३४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.  राज्य सरकारने राज्यातील एकूण वीज मागणीचा विचार करता अतिउच्च दाब प्रणाली विकसित करण्यासाठी या प्रकल्पास परळी येथे उभारण्यास माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या विनंतीनुसार मान्यता दिली असून, याबद्दल श्री मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले आहेत.  या उपकेंद्रामध्ये ७६५ के.व्ही. अतिउच्च दाब उपकेंद्र, १५०० क्षमतेचे ३ ट्रान्सफॉर्मर, यांसह आवश्यक विद्युत जोडणी इत्यादी कामे करण्यात येणार असून, यामुळे विद्युत निर्मिती व पारेषण क्षेत्रात परळीचे वजन वाढणार आहे तसेच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीस वाव मिळणार आहे. येत्या काही दिवस...

भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन

इमेज
  नीलकंठ शिवाचार्य महाराज यांच्या ३१ दिवसीय मौन अनुष्ठानाची परळीत सांगता;  बेलवाडी येथे धार्मिक कार्यक्रम; महाप्रसादाचे आयोजन परळी : येथील वैद्यनाथ मंदिराजवळील श्री संत गुरुलिंग स्वामी मंदिर (बेलवाडी) येथे कर्नाटकातील निंबर्गा येथील श्री ष. ब्र. १०८ नीलकंठ शिवाचार्य महाराज गदगेश्वर हिरेमठ यांच्या ३१ दिवसीय २५व्या श्रावणमास मौन अनुष्ठानाची सांगता शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी होणार आहे. दि. १३ ऑगस्टपासून सुरू असलेल्या या अनुष्ठानामुळे बेलवाडी परिसरात महिनाभर भक्तिमय व आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते. कलबुर्गी जिल्ह्यातील आळंद तालुक्यातील निंबर्गा येथील नीलकंठ शिवाचार्य महाराज यांच्या मौन अनुष्ठानाचा हा २५वा वर्ष आहे. शनिवारी सकाळी ८.३० वाजता पाद्यपूजा व मौन समाप्ती होईल. त्यानंतर इष्टलिंग पूजा, विविध धार्मिक विधी तसेच शिवाचार्य महाराजांचे आशीर्वचन होणार आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सांगता सोहळ्यास माजी मंत्री व आमदार बसवराज पाटील, आमदार प्रवीण स्वामी ( उमरगा) , श्री संत गुरुलिंग स्वामी (बेलवाडी) ...
इमेज
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्यकार्यकारिणी बैठक व व्याख्यान परळी / प्रतिनिधी        महाअंनिस ची राज्यकार्यकारिणी ची बैठक मानवलोक अंबाजोगाई येथे १२ व १३ सप्टेंबर रोजी संपन्न होत आहे . या बैठकीसाठी महाराष्ट्रातील जवळपास ३० जिल्ह्यातील १०० ते १५० कार्यकर्ते येणार आहेत . कार्यकारी समिती, प्रत्येक जिल्ह्यातील कार्याध्यक्ष व प्रधान सचिव, समितीच्या २४ विभागाचे कार्यवाह,सहकार्यवाह येत आहेत. मागील ३ महिन्यातील  समितीच्या कामाचा आढावा व पूढील महिन्यातील कामाचे नियोजन यावर सविस्तर चर्चा केली जाते .    तसेच या निमित्ताने शनिवारी १२ सप्टेंबर रोजी सांयकाळी ६ वाजता सांगली येथील लेखक व इतिहास संशोधक प्रा.डॉ. काशिलिंग गावडे यांचे व्याख्यान होणार आहे . हे व्याख्यान शहरातील लोकांसाठी बौद्धिक पर्वणीच असते . या व्याख्यानाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन महाअंनिस बीड जिल्हाच्या वतीने करण्यात आले आहे .      याप्रसंगी महाअंनिसचे राज्याध्यक्ष माधव बावगे, कार्याध्यक्ष संजय बनसोडे , सर्व विभागाचे प्रधान सचिव, राज्य सरचिटणीस उपस्थित राहणार आहेत .   ...

मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी नवा पर्याय...

इमेज
  कमी पाण्यात ‘करटुले’चा प्रयोग; दीड एकरातून लाखोंच्या उत्पन्नाचा राजमार्ग  धर्मापुरीतील प्रगतिशील शेतकरी कुंडलीक बाबुराव फड यांची नावीन्यपूर्ण शेती; मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी नवा पर्याय धर्मापुरी प्रतिनिधी : कमी पाणी, वाढता शेतीचा खर्च आणि बदलते हवामान यामुळे पारंपरिक शेतीसमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. मात्र, या परिस्थितीला संधी मानत धर्मापुरी येथील प्रगतिशील शेतकरी कुंडलीक बाबुराव फड यांनी कमी पाण्यात करटुले पिकाची यशस्वी लागवड करून शेतीतील नावीन्याचा आदर्श निर्माण केला आहे. अवघ्या दीड एकर क्षेत्रात केलेल्या या प्रयोगातून चांगले उत्पन्न मिळवण्याची संधी निर्माण झाली असून, परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष या प्रयोगाकडे वेधले गेले आहे. फड यांनी गट क्रमांक २००३ मधील सुमारे दीड एकर क्षेत्रावर गावरान बियाण्यांपासून करटुलेची लागवड केली आहे. साधारण चार महिन्यांच्या या पिकाला लागवडीनंतर सुमारे दोन महिन्यांनी फळधारणा सुरू होते. त्यानंतर दर १० ते १५ दिवसांनी तोडणी करता येते. एका हंगामात साधारण दहा तोडण्या होत असल्याने नियमित उत्पन्नाची शक्यता निर्माण होते. ठिबकवर करटुले; पाण्याची बचत क...

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन

इमेज
  परळी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; विविध प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन परळी वैजनाथ : परळी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, सन २०२५ च्या खरीप पिकांच्या विम्याची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची प्रलंबित रक्कम लाभार्थ्यांना तत्काळ वितरित करावी, यासह तालुक्यातील विविध प्रलंबित विकासकामे पूर्ण करावीत, अशा विविध मागण्यांचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उपजिल्हाधिकारी लाटकर साहेब यांना देण्यात आले. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या आदेशावरुण मराठवाडा संपर्क नेते अंबादास दानवे उप नेत्या प्रा .सुषमाताई अंधारे बिड जिला संपर्क प्रमुख परशुराम जाधव उप संपर्क प्रमुख बाळासाहेब आंबुरे बिड जिला प्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे उप जिला प्रमुख नारायण सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना परळी तालुका प्रमुख  भोजराज पालीवाल यांच्या नेतृत्वाखाली उप जिल्हाधिकारी लाटकर साहेबांना निवेदन देण्यात आले....

जनुकीय बदलाची शक्यता...

इमेज
आठ दिवसांच्या शेळीच्या पिलाला पान्हा; दिंद्रुडमध्ये अजब घटना जनुकीय बदलाची शक्यता, घाबरण्याचे कारण नसल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे अवघ्या आठ दिवसांच्या शेळीच्या पिलाच्या स्तनातून दूधसदृश द्रव येत असल्याची अजब घटना समोर आली आहे. गेल्या सुमारे सात दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याने कटारे कुटुंबीयांसह ग्रामस्थांमध्येही कुतूहल निर्माण झाले आहे. जनुकीय बदलामुळे अशी घटना घडण्याची शक्यता असून, यामुळे घाबरण्याचे कारण नसल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दिंद्रुड येथील सुदाम कटारे यांचा शेळीपालनाचा व्यवसाय असून, त्यांच्याकडे सुमारे आठ शेळ्या आहेत. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्या एका शेळीने तीन पिलांना जन्म दिला. त्यापैकी एका पिलामध्ये जन्मानंतर काही दिवसांनी असामान्य शारीरिक बदल दिसून आला. या पिलाच्या स्तनातून दूधसदृश द्रव बाहेर येत असल्याचे कटारे यांच्या निदर्शनास आले. सुरुवातीला कुटुंबीयांना हा प्रकार पाहून आश्चर्य वाटले. मात्र, वारंवार द्रव येत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास ...

परळीत श्रावण महोत्सव झाला पण परळीकरांना कळलच नाही.,..

इमेज
‘श्रावण महोत्सव’ की सरकारी सोपस्कार?; कार्यक्रम झाला, रसिक मात्र गायब! दर्जेदार कलावंत, उत्तम कार्यक्रम; पण प्रसिद्धीअभावी शासनाचा सांस्कृतिक उपक्रम जनतेपासूनच दूर परळी वैजनाथ : प्रतिनिधी..   महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात आलेला ‘श्रावण महोत्सव’ अपेक्षित रसिकांविना पार पडल्याने शासकीय कार्यक्रमांच्या नियोजनासह प्रसिद्धी यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भक्तिसंगीताचा सुरेल आविष्कार आणि गुणी कलावंतांचा सहभाग असतानाही कार्यक्रमाची माहिती व्यापक स्तरावर पोहोचविण्यात अपयश आल्याने दर्जेदार कार्यक्रमाचा अपेक्षित परिणाम साधता आला नसल्याची चर्चा शहरात आहे.  ‘श्रावण महोत्सवा’अंतर्गत ‘स्वरविहार’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. राजेश सरकटे यांच्यासह विविध कलावंतांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. मात्र, कार्यक्रमाची व्यापक पूर्वप्रसिद्धी झाल्याचे जाणवले नाही. शहरातील अनेक नागरिक, रसिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनाच कार्यक्रमाची माहिती नसल्याची स्थिती होती. कार्यक्रम...