पोस्ट्स

इमेज
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत शेतकरी गट व वराह पालनाचा समावेश- पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांची माहिती मुंबई, दि. १३ - राज्यात पशुधनावर आधारित उद्योजकता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेत आता मुरघास संयंत्र वाटप योजनेत शेतकरी समूह गटाचा तसेच वराह पालन व्यवसायाचाही समावेश करण्यात आला असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. पशुसंवर्धन विभागाने यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय प्रसिद्ध केला. या निर्णयामुळे मुरघास संयंत्रांच्या माध्यमातून वैरण विकासाला चालना मिळणार असून पशुपालकांसाठी स्थिर व परवडणारा चारा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. विशेषतः समूह पातळीवर काम केल्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन ग्रामीण भागात उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. या निर्णयानुसार आता वैयक्तिक लाभार्थ्यांबरोबरच शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, आत्मा अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी समूह गट, महिला आर्थिक विकास महामंडळाकडे नोंदणीकृत असलेली समुदाय आधारित  संसाधन केंद्रे आणि उमेद नोंदणीकृत प्रभाग संघ यांनाह...

भविष्यातील १५ हजार रुपयांच्या साहित्यासाठी ही नोंदणी आवश्यक

इमेज
  भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या दिव्यांग सहाय्यक पोर्टल मोफत नोंदणी शिबिराचा लाभ घ्यावा -डॉ. संतोष मुंडे                               भविष्यातील १५ हजार रुपयांच्या साहित्यासाठी ही नोंदणी आवश्यक परळी: (प्रतिनिधी)...     भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त दिव्यांग सहाय्यक पोर्टल मोफत ८ दिवसीय नोंदणी शिबिराचे आयोजन श्रीनाथ हॉस्पिटल परळी वैजनाथ येथे करण्यात आलेले आहे. दिनांक १४ एप्रिल ते २१ एप्रिल असे आठ दिवस सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वाजे पर्यंत या दिव्यांग सहाय्यक पोर्टल मोफत नोंदणी शिबिरामध्ये दिव्यांगांची नोंदणी करण्यात येणार आहे अशी माहिती या शिबिराचे मुख्य आयोजन महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉ संतोष मुंडे यांनी दिली. महाराष्ट्र राज्याचे माजी कृषिमंत्री आ.धनंजय मुंडे तसेच ना.पंकजाताई मुंडे व दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे मंत्री ना.अतुल सावे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांगांच्या कल्याणासाठी प्रत्येक...

भावपूर्ण श्रद्धांजली!!!!!

इमेज
परळीचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व आशा भोसले  ज्येष्ठ साहित्यिक मधु जामकर यांनी जागवल्या आशा भोसलेच्या आठवणी परळी वैजनाथ- प्रतिनिधी... परळीत आयोजित केलेल्या  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आकर्षण सूर सम्राज्ञी आशा भोसले यांची संगीत रजनी ठरले होते.आशाताईंचा स्पष्ट आणि सडेतोड बोलण्याचा बाणा या संमेलनातही उपस्थितांना पाहता आला. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे १९९८ साली म्हणजे तब्बल २८ वर्षांपूर्वी ७१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले होते.या संमेलनातील विविध परिसंवाद, चर्चासत्रे, काव्य संमेलने, या सर्व कार्यक्रमांमध्ये एक सांगीतिक कार्यक्रम हा सूरसम्राज्ञी आशाताई भोसले यांचे सादरीकरण आकर्षण ठरले.  या संमेलनाची संकल्पना "साहित्य-सूर" अशी असल्याचे आशाताईंसमोर मांडल्यानंतर तेव्हा त्यांनी परळीस येण्यास तत्काळ होकार दिला आणि त्यांचा सांगीतिक कार्यक्रम न भूतो.असा ठरल्याच्या आठवणी या संमेलनाचे कार्यवाहपद भूषवलेले ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक प्रा. मधु जामकर यांनी आशाताईंच्या निधनानंतर जागवल्या. मराठी विषयाचे प्राध्यापक राहिलेले मधु जामकर यांनी सांगितले की, १९...

पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण व्हावे,अशी मागणी

इमेज
परळी ते खडका (नैकोटा मार्ग) रस्त्याची झाली चाळण; नागरिक व भाविकांचे  हाल  परळी वैजनाथ: प्रतिनिधी..... परळी ते खडका (मार्गे नैकोटवाडी (दत्तवाडी) या 25 किलोमीटर रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. जागोजागी मोठे मोठाले खड्डे पडले आहेत. परळीला ज्योतिर्लिंग असलेल्या वैजनाथ महादेवाच्या दर्शनासाठी दर सोमवारी परभणी जिल्ह्यातून या रस्त्याने जाणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड आहे. दत्तवाडी नैकोटवाडी या ठिकाणी दररोज तसेच दर गुरुवारी हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रभरातून भाविक भक्तजन मुक्तेश्वर नारायण दत्तानंद संस्थान,दत्तवाडी नैकोटवाडी या परिसरात दर्शनासाठी येतात. गुरुवारी तर या परिसराला यात्रेचे स्वरूप असते.  परळी वैजनाथ ते खडका रोडा मार्गे असलेले रस्ता 'थर्मल रोड' म्हणून ओळखला जातो. हा अत्यंत खिळखिळा झाला आहे. या रस्त्याने परळी ते खडका,परळी ते नैकोटा या व इतर एसटी महामंडळाच्या बसेस देखील चालतात. या रस्त्याचा परळी ते लोणी हा 15 किलोमीटर पर्यंत भाग परळी मतदारसंघात बीड जिल्ह्यात येतो तर लोणी ते खडका 10 किलोमीटरचा भाग हा पाथरी मतदारसंघात सोनपेठ तालुक्यात परभणी जिल्ह्यात येतो. परळी ते...
इमेज
  वैद्यनाथ कॉलेजमध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती साजरी   सत्य,न्याय व बंधुता हे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या क्रांतीचे प्राण -डॉ माधव रोडे  परळी प्रतिनिधी...... जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये  प्राचार्य डॉ. जे व्ही जगतकर यांच्या संकल्पनेतून महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी भौतिकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.माधव रोडे यांनी सत्य न्याय व बंधुता हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या क्रांतीचे प्राण आहेत हे सांगून महात्मा जोतीराव गोविंदराव फुले हे महाराष्ट्रातील एक थोर भारतीय समाजसुधारक, विचारवंत, लेखक आणि शिक्षणक्रांतीचे जनक होते. स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निवारण, जातिभेद निर्मूलन आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला  त्यांनी 'सत्यशोधक समाजाची' स्थापना केली हे सांगून कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’  असे रोखठोकपणे असे विचार यास प्रसंगी व्यक्त केले.       महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे व्ही जगतकर यांनी महात्मा फुलेंनी स्...

ग्राहक पंचायतीचे अनिल बोर्डे यांची पत्राद्वारे पंतप्रधान यांच्याकडे मागणी

इमेज
  बीड जिल्ह्याला दत्तक  घेऊन विकास करावा व जिल्ह्यातील ठेवीदाराची रक्कम तात्काळ परत करावी ग्राहक पंचायतीचे अनिल बोर्डे यांची पत्राद्वारे  पंतप्रधान यांच्याकडे मागणी गेवराई ( प्रतिनिधी) सन 1974 मध्ये मराठवाडा विकास आंदोलनात सक्रिय सहभागी असलेले कार्यकर्ते व विविध संस्थेचे पदाधिकारी तथा ग्राहक पंचायत चे बीड जिल्ह्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते व बीड जिल्हा ग्राहक पंचायतचे उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांनी "मराठवाड्याचा विकास झाला पाहिजे" व बीडला रेल्वे आली पाहिजे" हे मुख्य ब्रीद वाक्य होते. परंतु अद्याप पर्यंत परळी व बीड ला नियमितपणे रेल्वे सुरू झालेली  नाही. तसेच बीडचा विकास देखील मोठ्या प्रमाणात झालेला नाही. इतर जिल्ह्याच्या मानाने आपण विकासापासून वंचित आहोत. तरी जिल्ह्याचा विकास व्हावा यासाठी मा. नरेंद्रजी मोदी पंतप्रधान भारत सरकार यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. तसेच मल्टीस्टेट व मल्टिपल निधी इतर गुंतवणूकदाराची रक्कम प्राप्त होण्यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा अशी मागणी पत्राद्वारे विनंती केलेली आहे.  बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाच...
इमेज
  महात्मा फुलेंच्या संकल्पने नुसार आजच्या पिढीला दर्जेदार, चिकित्सक आणि जागतिक पातळीचे शिक्षण मिळावे - व्याख्याते अभिषेक सोळुंके या देशात म.फुलेंनी खऱ्या अर्थाने समता स्थापित केली - उपमुख्य अभियंता हिम्मत अवचार परळी | प्रतिनिधी....    महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त औष्णिक विद्युत केंद्र, परळी येथे आयोजित कार्यक्रमात "महात्मा फुलेंच्या शाळेप्रमाणेच आजच्या पिढीला दर्जेदार शिक्षण मिळणे काळाची गरज आहे," असे प्रतिपादन बीड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा व्याख्याते अभिषेक सोळुंके यांनी केले. दिनांक ११ एप्रिल रोजी आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औष्णिक विद्युत केंद्राचे उपमुख्य अभियंता हिम्मत अवचार हे होते. मंचावर सहायक कल्याण अधिकारी शरद राठोड, सौ. अनिता सुनील इंगळे, सौ. मनीषा हिम्मतराव अवचार, कोमलताई मस्के मॅडम आणि डॉ. ओंकार हिंदूळे,नगरसेविका अर्चना रोडे, जयश्री वडमारे, उपकार्यकारी अभियंता श्रीकांत इंगळे आणि डी. एस. डोंगरे  यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्य अभियंता हिम्मत अवचार साहेब म्हणाले की, महात्मा जोति...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....