पोस्ट्स

शिवभक्तांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आ.धनंजय मुंडे यांचे आभार!!!!!

इमेज
  श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर परिसर विकासासाठी ३०१.५४ कोटींची तरतुद धनंजय मुंडेंनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मुंबई (प्रतिनिधी) - पंचम ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर व परिसराच्या विकासासाठी आखण्यात आलेल्या श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास सुधारित ३०१.५४ कोटी रुपयांची मान्यता आज संपन्न झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत राज्य सरकारने दिली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत अधिकृतपणे हे जाहीर केले आहे. माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे.  विशेष म्हणजे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार हयात असताना धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडा हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नियोजन विभागाकडे वर्ग करून नियोजन विभागामार्फत राबवण्याची मागणी केली होती, त्या मागणीसही शिखर समितीने मंजुरी दिली असून, आता श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखडा नियोजन विभागाकडून राबवण्यात येणार आहे.  या बैठकीत धनंजय मुंडे यांनी सध्या सुरू असलेल्या व आगामी काळात हाती घेण्यात येणाऱ्या विविध...

अध्यक्ष सुरेश मुळे यांची घोषणा...

इमेज
  अखिल भारतीय बहुभाषीय ब्राह्मण महासंघाच्या प्रदेश प्रवक्तेपदी  पत्रकार सिद्धेश्वर कुलकर्णी यांची निवड चाकूर, जि. लातूर सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या अखिल भारतीय बहुभाषीय ब्राह्मण महासंघाच्या प्रदेश प्रवक्ता पदी चाकूर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार सिद्धेश्वर वामनराव कुलकर्णी यांची एकमताने निवड करण्यात आली.  महासंघाचे अध्यक्ष सुरेश मुळे यांनी केंद्रीय पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून काल ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. पत्रकारितेच्या माध्यमातून गेली दोन दशके सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम श्री कुलकर्णी यांनी केले आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन महासंघाने त्यांच्यावर प्रदेश प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली आहे. नवनिर्वाचित प्रदेश प्रवक्ता सिद्धेश्वर कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, "अध्यक्ष सुरेश मुळे व सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्यास पात्र राहून महासंघाची ध्येयधोरणे, सामाजिक उपक्रम व विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहीन. समाजहितासाठी लेखणी व वाणी दोन्हीचा उपयोग करीन." श्री कुलकर्णी यांच्या निवडीचे...

एसटी ची भाडे वाढ होणार.......

इमेज
  एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक डिझेल दरवाढीमुळे एसटी महामंडळावर वार्षिक १२४ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार मुंबई, दि. 18 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाढत्या इंधन खर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असला, तरी तत्काळ भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, डिझेलच्या दरात झालेल्या वाढीमुळे महामंडळावर वार्षिक सुमारे 124 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. एसटी महामंडळाला दररोज सरासरी 10.87 लाख लिटर डिझेलची आवश्यकता भासते. सध्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमार्फत डिझेलचा पुरवठा केला जात असून, मागील आठवड्...

श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर परिसर विकासासाठी ३०१.५४ कोटींची तरतुद..

इमेज
  तीर्थक्षेत्र विकासकामे दर्जेदार सुविधांसह कालमर्यादेत पूर्ण करावीत --मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर परिसर विकासासाठी ३०१.५४ कोटींची तरतुद  महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटींच्या कामांना  मान्यता*     मुंबई,दि.१८: राज्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांच्या जतन व संवर्धनास शासनाचे प्राधान्य असून तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी.  तसेच भाविक-पर्यटकांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधासह आरोग्यसुविधाची उपलब्धता करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी दिले. यावेळी शिखर समितीच्या बैठकीत सहा तीर्थक्षेत्र विकासासाठी एकूण ९९३.७२ कोटी रुपयांच्या  विकास आराखड्यांना आणि निधीला मंजुरी देण्यात आली.          सह्याद्री अतिथीगृह येथे विविध तिर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार,वनमंत्री गणेश नाईक, ग्...

उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक...

इमेज
विधान परिषद स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर धाराशिव, दि. १८ मे : भारत निवडणूक आयोगाने, ( उस्मानाबाद-लातूर-बीड )स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद द्वैवार्षिक निवडणूक-२०२६ कार्यक्रमाची घोषणा केली आहे. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी धाराशिव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली. निवडणुकीची अधिसूचना २५ मे २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १ जून २०२६ आहे.  अर्जांची छाननी २ जून रोजी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ४ जून २०२६ निश्चित करण्यात आली आहे. मतदान १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत होणार आहे. मतमोजणी २२ जून २०२६ रोजी होईल.  निवडणूक प्रक्रिया २५ जून २०२६ रोजी पूर्ण करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिली.

प्रासंगिक लेख.....प्रा. डॉ.सिद्धार्थ तायडे यांचा विशेष लेख....

इमेज
  गुरुवर्य प्रा.सुरेश पुरी : माणुसकीचा अथांग स्नेहसागर आपल्याला सभोवताली  काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की, त्यांचे अस्तित्व हे केवळ त्यांच्या कार्यापुरते मर्यादित राहत नाही; तर ते विचारांची, संस्कारांची, प्रेरणेची आणि माणुसकीची एक अखंड परंपरा बनून पुढील अनेक पिढ्यांच्या जीवनाला दिशा देत राहते. अशी व्यक्तिमत्त्वे काळाच्या ओघात केवळ व्यक्ती राहत नाहीत, तर ती एक संस्कारपीठ बनतात. पत्रकारिता, जनसंवाद, शिक्षण, सामाजिक बांधिलकी, विद्यार्थ्यांवरील निरपेक्ष प्रेम आणि माणुसकीच्या मूल्यांचा अथांग स्नेहसागर म्हणजे आदरणीय प्रा. सुरेश पुरी सर अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके बाबा! डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद आणि वृत्तपत्रविद्या विभागाचे माजी विभागप्रमुख तसेच प्राध्यापक म्हणून दीर्घकाळ अध्यापन करताना त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना घडविले. त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ पत्रकारिता शिकवली नाही, तर जीवन समजून घेण्याची दृष्टी दिली. त्यांच्या वर्गात शिकवला जाणारा प्रत्येक विषय हा फक्त अभ्यासक्रमाचा भाग नसे; तो वास्तव जीवनाशी जोडलेला असे. त्यांच्या शिकवणीतून विद्यार्थ्यांना ...

संत जगमित्रनागांचे अभंग आता सर्वत्र होणार उपलब्ध......

इमेज
अत्यंत दुर्मिळ “संत जगमित्रनागा अभंग गाथा” प्रकाशनाच्या उंबरठ्यावर प्रकाशनपूर्व नोंदणीस भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद परळी वैजनाथ : प्रतिनिधी...        संत साहित्यप्रेमी, वारकरी, कीर्तनकार आणि अध्यात्मिक अभ्यासकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारी “अत्यंत दुर्मिळ संत जगमित्रनागा अभंग गाथा” ही ग्रंथसंपदा आता प्रकाशनाच्या उंबरठ्यावर आली असून प्रकाशनपूर्व नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे. अवघ्या ४० रुपयांत उपलब्ध होणाऱ्या या गाथेसाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.        या गाथेमध्ये संत जगमित्रनागा यांच्या दुर्मिळ अभंगांसह त्यांचा भावार्थही समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायातील अभ्यासक, कीर्तनकार तसेच संत साहित्याची आवड असणाऱ्या भाविकांसाठी ही गाथा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. संत साहित्य क्षेत्रातील एकमेवाद्वितीय आणि दुर्मिळ मानली जाणारी ही अभंग गाथा अभ्यासकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. संत साहित्याचे अभ्यासक व साहित्यिक म्हणून परिचित असलेले ॲड. दत्तात्रेय आंधळे यांनी या ग्रंथाचे लेखन केले आहे. याप...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या