पोस्ट्स

घातपाताचा दाट संशय:

इमेज
  सोनपेठ तालुक्यातील बेपत्ता तरुणाचा परळीजवळ विहिरीत आढळला मृतदेह ! संशयास्पद मृत्यू; कंबरेला दगड बांधलेला मृतदेह विहिरीत आढळला परळी वैजनाथ, प्रतिनिधी:         सोनपेठ तालुक्यातील शेळगाव (महाविष्णू) येथून गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या २३ वर्षीय तरुणाचा मृतदेह आज सकाळी परळी तालुक्यातील इंजेगाव - सोनपेठ रस्त्यावर कॅनॉलच्या पलीकडील निर्जन ठिकाणच्या एका विहिरीत आढळून आला. मृताच्या कंबरेला मोठे दगड बांधलेले असल्याने हा प्रकार घातपाताचा असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.        महारुद्र व्यंकटराव शिंदे (वय २३) असे मृताचे नाव असून तो २३ एप्रिलपासून बेपत्ता होता. याप्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती. महारुद्रचे अपहरण झाल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांनी आधीच व्यक्त केला होता. दरम्यान, आज सकाळी इंजेगाव -सोनपेठ रस्त्यावर  कॅनॉल पलीकडे असलेल्या एका विहिरीत त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. घातपाताचा दाट संशय:        परळी...

वर्तणुकीवरून विचारले खडे सवाल.....

इमेज
  या लोकप्रतिनिधीने लाज आणली: अर्वाच्य अशोभनीय भाषा, धटिंगगिरी आणि अज्ञानी मुजोरपणा! परळीतील सामाजिक कार्यकर्त्याचे आमदार संजय गायकवाड यांना 'खुले पत्र'; वर्तणुकीवरून विचारले खडे सवाल परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... आपल्या वादग्रस्त विधानांनी सतत चर्चेत राहणारे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना परळी येथील सामाजिक कार्यकर्ते अनंत इंगळे यांनी एका जाहीर पत्राद्वारे चांगलेच धारेवर धरले आहे. "लोकप्रतिनिधीची भाषा, वर्तन आणि त्यांचा अभ्यास हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसा असावा," अशा शब्दांत खडे बोल सुनावत इंगळे यांनी गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. हे पत्र सध्या सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. अनंत इंगळे यांनी आपल्या पत्रात प्रामुख्याने आमदार गायकवाड यांच्या भाषेवर आक्षेप घेतला आहे. पत्रात म्हटले आहे की, लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना समाजात एक आदर्श निर्माण करणे अपेक्षित असते. मात्र, संजय गायकवाड यांची भाषा आणि त्यांची शिवीगाळ करण्याची पद्धत ही लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहात बसणाऱ्या व्यक्तीला शोभण...

कामगार दिनी....... मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

इमेज
  परळीत १ मे रोजी 'सीटू'चा भव्य कामगार मेळावा; कॉम्रेड किरण मोघे करणार मार्गदर्शन परळी (प्रतिनिधी):        जागतिक कामगार दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही परळी शहरात 'सीटू' (CITU) संलग्न कामगार संघटनांच्या वतीने भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. १ मे रोजी  परळी वैजनाथ येथील जाजीवाडी विठ्ठल मंदिर येथे दुपारी १ वाजता हा मेळावा संपन्न होणार असल्याची माहिती 'सीटू'चे अध्यक्ष प्रा. खाडे बी.जी. यांनी दिली आहे.       जागतिक कामगार चळवळीचा इतिहास आणि आपल्या देशातील कामगार चळवळीची सद्यस्थिती याबद्दल कामगारांमध्ये जनजागृती करणे, हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले जाते.यावर्षीच्या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य 'सीटू'च्या सचिव तथा घरकामगार संघटनेच्या राज्याध्यक्षा कॉम्रेड किरण मोघे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांना त्यांच्या हक्कांची आणि भविष्यातील लढ्याची दिशा समजण्यास मदत होईल.   ...
इमेज
परळी उपजिल्हा रुग्णालयात नेफ्रॉलॉजिस्ट आणि ICU सुविधा उपलब्ध करा; महादेव गंगणे पाटील यांची मागणी परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस घेणाऱ्या रुग्णांच्या समस्यांकडे लक्ष वेधत, येथे तातडीने तज्ज्ञ डॉक्टर (नेफ्रॉलॉजिस्ट) आणि आयसीयू (ICU) सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष महादेव सोपानराव गंगणे पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अँड. जीवनराव देशमुख यांच्यासह त्यांनी वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, परळी वैजनाथ यांना लेखी निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिसची सुविधा उपलब्ध आहे, मात्र तिथे या विषयातील तज्ज्ञ नेफ्रॉलॉजिस्ट डॉक्टर उपलब्ध नाहीत. तसेच रुग्णालयात अतिदक्षता विभागाची (ICU) सोय नसल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. डायलिसिस घेणाऱ्या रुग्णांची प्रकृती अनेकदा नाजूक असते. अशा वेळी अचानक प्रकृती बिघडल्यास तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांची आणि आयसीयू सुविधेची गरज भासते. सध्या या सुविधा रुग्णालयात उपलब्ध...

गुणवत्तेनुसार सेवा देणाऱ्या जिल्ह्यांचा अधिकाऱ्यांसह गौरव

इमेज
  नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक सेवा देण्यावर भर देण्याची गरज-मुख्य सचिव राजेश अग्रवाल मुंबई,दि.28: नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक सेवा देण्यावर भर देण्याची गरज असल्याचे राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले. द्वितीय सेवा हक्क दिनानिमित्त सह्याद्री अतिथिगृह येथे सामान्य प्रशासन विभाग आणि राज्यसेवा हक्क आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमास राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, कोकण विभागाचे आयुक्त बलदेव सिंह, पुणे विभागाचे आयुक्त सुधाकर तेलंग, छत्रपती संभाजीनगर विभागाचे आयुक्त किरण जाधव तसेच नाशिक विभागाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्य सचिव अग्रवाल म्हणाले, पासपोर्टसारख्या कार्यक्षम प्रणालींचा आदर्श घेत शासनाच्या विविध विभागांमध्ये डिजिटल समन्वय वाढविण्याचे काम सुरू आहे. निकाल जाहीर होताच संबंधित माहिती आपोआप विविध विभागांकडे पोहोचून अल्पावधीत अहवाल तयार होईल, अशी प्रणाली विकसित केली जात आहे. एआय आधारित यंत्रणेक...

विशेष लेख क्रमांक 2-

इमेज
  विशेष लेख क्रमांक 2- भारताची जनगणना 2027 : डिजिटल युगातील पहिली जनगणना भारताची 16 वी आणि स्वातंत्र्यानंतरची 8 वी जनगणना 2027 मध्ये होणार आहे. 2011 नंतर 16 वर्षांनी होणारी ही जनगणना अनेक कारणांमुळे ऐतिहासिक ठरणार आहे. कोविड-19 मुळे 2021 ची जनगणना पुढे ढकलण्यात आली होती. जनगणनेची ठळक वैशिष्ट्ये: 1. पहिली डिजिटल जनगणना ही भारताची पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना असेल. गणक कर्मचारी मोबाईल ॲपद्वारे माहिती संकलित करतील. नागरिकांसाठी _स्वतः माहिती भरण्याची सुविधा_ प्रथमच उपलब्ध करून देण्यात आली आहे.  http://census.gov.in पोर्टलवर नागरिक स्वतःच्या घराची माहिती भरू शकतात. 2. दोन टप्प्यांत जनगणना - पहिला टप्पा : घरांची यादी आणि गृह जनगणना   एप्रिल ते सप्टेंबर 2026. यात घरांची स्थिती, उपलब्ध सुविधा, मालमत्ता यांची माहिती घेतली जाईल. - दुसरा टप्पा : लोकसंख्या गणना   फेब्रुवारी 2027. यात वय, लिंग, शिक्षण, व्यवसाय, स्थलांतर, जन्मदर यांसारखी वैयक्तिक माहिती नोंदवली जाईल. 3. जात जनगणनेचा समावेश 1931 नंतर प्रथमच जनगणनेत जातीची गणना केली जाणार आहे. आतापर्यंत फक्त अनुसूचित जाती आणि जमात...
इमेज
  सोमवारी लोकशाही दिन बीड, दि. 28 (जि. मा. का.)  जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार दिनांक 4 मे 2026 रोजी सकाळी  10-00 वाजता या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे.            लोकशाही दिनात अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज 15 दिवस अगोदर दोन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे.  लोकशाही दिनासाठी अर्ज देताना संबंधित तालुक्यातील तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज दिलेला असावा व तालुकास्तरीय लोकशाही दिनात एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन देखील कोणतीही कार्यवाही झालेली नसावी अशाच अर्जदारांनी टोकन क्रमांकाच्या पावतीसह अर्ज दोन प्रतीत सादर करावा.        लोकशाही दिनामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व, अपील, सेवाविषयक, आस्थापनाविषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. तसेच तालुकास्तरीय लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची तहसिलदार यांच्या स्वाक्षरीची पोहोच पावती व त्यासाठी दिलेल्या मुदतीत व नमुन्यात ज्यांनी यापूर्वीच्या आवश्यक कागदपत्रासह अर्ज केले अस...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....