पोस्ट्स

इमेज
जेजुरीत दिंडीतील ट्रकच्या धडकेत तीन वारकरी महिलांचा मृत्यू; चार गंभीर जखमी श्रद्धा, भक्ती आणि नामस्मरणाच्या वातावरणात सुरू असलेल्या पंढरपूर वारीला सोमवारी सकाळी भीषण अपघाताचे ग्रहण लागले. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड–जेजुरी मार्गावरील दिवे घाट परिसरातून मार्गस्थ होत असताना ट्रकने मागून वारकऱ्यांना धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून 16 वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. नांदेडचा ट्रक, सांगलीच्या वारकरी बेलसर टोल नाक्यापासून जेजुरीच्या दिशेने साधारण ५०० मीटर अंतरावर हॉटेल शिपदीप लॉजिंगच्या समोर हा अपघात झाला. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता. स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य हाती घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत . धडक इतकी भीषण होती की, तिन्ही महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त केली जात असून परिसरात शोककळा पसरली आहे. अपघातात ३ ते ४ वारकरी गंभीर जखमी असून इतर वारकऱ्यांना किरकोळ दु...
इमेज
वारकरी संप्रदाय:भक्ती, बंधुता आणि सामाजिक सलोखा; महम्मद खान महाराजांच्या पालखीचे परळीत स्वागत परळी | प्रतिनिधी...      आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातून परळी मार्गे पंढरपूरकडे जाणाऱ्या पायी दिंड्यांचे आगमन सुरू असून, शनिवारी संत परमहंस महम्मद खान महाराजांची पालखी दिंडी वैद्यनाथ नगरीत दाखल झाली. विविध धर्म, पंथ आणि समाजघटकांना एकत्र आणणाऱ्या वारकरी परंपरेचा सामाजिक सलोखा व मानवतेचा संदेश या दिंडीच्या माध्यमातून पुन्हा अधोरेखित झाला.       अनिल महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आलेल्या या दिंडीतील वारकऱ्यांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेऊन हरिनामाच्या गजरात भक्तीभाव व्यक्त केला. अमरावती जिल्ह्यातील गणोरी येथून १९ जून रोजी निघालेली ही दिंडी कारंजा, वाशीम, हिंगोली, औंढा नागनाथ, परभणी आणि गंगाखेड मार्गे परळीत पोहोचली आहे. २० जुलै रोजी ही दिंडी पंढरपूर येथे दाखल होणार असून परळी हा या पालखी सोहळ्याचा २१ वा मुक्काम असल्याची माहिती शिवम चंदेल यांनी दिली.      यावेळी आकाश महाराज लक्षणे यांनी सांगितले की, वारकरी संप्रदाय हा केवळ धार्मिक प्रवास...

भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

इमेज
  वैद्यनाथ नगरीत रुक्मिणी मातेच्या माहेरच्या दिंडीचे जल्लोषात आगमन! मेणा, पालखी आणि विठ्ठलनामाच्या गजराने परळी दुमदुमली; भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी परळी |प्रतिनिधी  आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील कौंडिण्यपूर येथून निघालेली रुक्मिणी मातेच्या माहेरची पायी दिंडी वैद्यनाथ नगरी परळीत दाखल होताच संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. रुक्मिणी मातेचा मेणा, पालखी आणि विठुरायाच्या अखंड जयघोषाने परळीचे वातावरण अक्षरशः विठ्ठलमय झाले. "ज्ञानोबा-तुकाराम", "पुंडलिक वरदे हरी विठ्ठल" आणि "रुक्मिणी माता की जय"च्या घोषणांनी शहरातील प्रमुख मार्ग दुमदुमून गेले. टाळ-मृदंगाच्या तालावर वारकरी भक्तिभावाने नाचत-गात पुढे सरकत होते. दिंडीचे आगमन होताच दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. रुक्मिणी मातेचे जन्मस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कौंडिण्यपूर येथून निघणाऱ्या या दिंडीला वारकरी संप्रदायात विशेष स्थान आहे. यामुळे दिंडीच्या स्वागतासाठी परळीतील विविध धार्मिक संस्था, वारकरी मंडळे आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. फुलांची उधळण, आरती आणि जयघोषात दिंडी...
इमेज
  परळी वैजनाथ शहरात १४ जुलै रोजी भव्य रिंगण सोहळ्याचे आयोजन सर्व वारकरी-भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे : नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांचे आवाहन परळी वैजनाथ : प्रतिनिधी...        आषाढी वारीनिमित्त परळी वैजनाथ शहरात मंगळवार, दि. १४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ३.३० वाजता भव्य रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पालखीतील सर्व वारकरी तसेच वारकरी महिला भजनी मंडळांच्या सहभागातून हा सोहळा उत्साहात पार पडणार आहे.सर्व वारकरी-भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे  असे आवाहन नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी केले आहे.      अखिल भारतीय वारकरी मंडळ व परळी नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक कार्यक्रमात शहर व तालुक्यातील सर्व महिला भजनी मंडळे सहभागी होणार आहेत. वारकरी संप्रदायाची परंपरा, हरिनामाचा गजर आणि भक्तिमय वातावरण यामुळे परळी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे. रिंगण सोहळा कॉटन मार्केट यार्ड (जत्रा मैदान),  वेअरहाऊस शेजारी, प...
इमेज
  बंजारा समाज एकता यात्रा रविवारी परळीत संत सेवालाल महाराज चौकात होणार स्वागत-अमर पवार परळी(प्रतिनिधी)  धर्मगुरू बाबुसिंग महाराज पोहराड गड तसेच धर्माधिकारी आंध्र प्रदेशचे संत सेवालाल महाराज चॅरिटेबल  ट्रस्ट सेवागड श्री जी महाराज यांनी आयोजित केलेली बंजारा समाज एकता संकल्प यात्रा रविवार दि.१२ जुलै रोजी परळीत येत असुन संत सेवालाल महाराज चौकात या यात्रेचे भव्य स्वागत केले जाणार असुन या यात्रेच्या स्वागतास समाजबांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन बंजारा समाजाचे सेवागड विश्वस्त परळी वैजनाथ  अमर पवार यांनी केले आहे.  बंजारा समाज एकता यात्रा बंजारा धर्मगुरू बाबुसिंग महाराज पोवाडा गड तसेच धर्माधिकारी आंध्र प्रदेशचे संत सेवालाल चॅरिटेबल ट्रस्ट सेवागड श्री जी महाराज यांनी आयोजित केली असुन ही यात्रा ही ५ जुलै सेवागढ आंध्र प्रदेश येथून निघणार आहे १८ राज्यातुन बंजारा एकतेचा संदेश देत दि.२६  जुलै रोजी दिल्ली येथे पोंहोचणार आहे.यात्रेदरम्यान भगवंतसेवक किशन राठोड यात्रेनिमित्त देशातील बंजारा समाजांना पांढर्या ध्वजाखाली एकत्र आणण्याचा संकल्प करणार आहेत.यात्रेचे नियोजन प्रवीण ...
इमेज
महायुती सरकारचा मोठा निर्णय! आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सदस्यांची थेट नियुक्ती होणार, समीकरणे बदलणार महाराष्ट्र सरकारने महानगरपालिकांच्या उदाहरणाचे अनुकरण करून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद सदस्यसंख्येच्या दहा टक्के आणि पंचायत समिती सदस्यसंख्येच्या २० टक्के सदस्य हे नामनिर्देशित सदस्य असतील. ग्रामीण भागात सक्रिय सामाजिक कार्यकर्ते आणि सक्षम व्यक्तींना विकास प्रक्रियेत सहभागी करून घेणे हे उद्दिष्ट आहे. नामनिर्देशित सदस्यांच्या नावाने हे लोकांच्या राजकीय पुनर्वसनाचे साधन बनेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. १९९३ मध्ये पंचायत राज कायदा लागू होईपर्यंत नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्याची पद्धत अस्तित्वात होती, परंतु नंतर ती बंद करण्यात आली. आता राज्य सरकार ती पुन्हा सुरू करणार आहे. या निर्णयानंतर नागपूर जिल्हा परिषदेत सहा नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती केली जाईल. २० टक्के पंचायत समिती सदस्यांची नियुक्ती केली जाईल. याबाबतचा कायदा लवकरच विधानसभेत मंजूर केला जाईल. महसूल मंत्री चंद्रशेखर ...
इमेज
गांज्याच्या शेतीवर चकलांबा पोलिसांची धाड ;  ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त  गेवराई, प्रतिनिधी: चकलांबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे यांच्या टीमने अवैध धंद्यावरील कारवाया आणखी गतिमान केल्या असून शुक्रवारी (दि.१०) गांज्याची शेतीच पोलिसांनी उघडकीस आणली आहे.या कारवाईत तब्बल ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.    चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरळेगावच्या गट ११३ मधील उसाच्या शेतात गांज्याची लागवड करण्यात आली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या टीमला पाठवून खात्री केली असता उसाच्या शेतात गांज्याची लहान मोठी अशी २५३ झाडे लावल्याचे समोर आले.यात काही झाडांचे वजन १८४.४ किलो असून त्याची किंमत ४८ लाख १० हजार व ४ किलो ३०० ग्रॅम सुका गांजा ज्याची किंमत २ लाख ६ हजार ४०० रुपये तसेच ४५० ग्रॅम निमसुका गांजा ज्याची किंमत ११ हजार २५० रुपये असून एकूण ४८ लाख २७ हजार ६५० किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे...