पोस्ट्स

इमेज
  चना खरेदीस २९ मे पर्यंत मुदतवाढ, धनंजय मुंडेंची मागणी केंद्र सरकारने केली पूर्ण मुदतवाढ मागितली १५ मे पर्यंत, शिवराज सिंह चौहान यांनी मुदतवाढ दिली २९ मे पर्यंत मुंबई (प्रतिनिधी) - राज्यात चना (हरभरा) खरेदीस शासकीय खरेदी केंद्रावर १५ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, तसेच पोर्टलवर याबाबत नोंद करण्यात मुदतवाढ देण्यात यावी या माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मागणीस थेट केंद्र सरकारने मान्यता दिली असून शासकीय हमीभाव चना खरेदी केंद्रांवर आता २९ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  २९ एप्रिल पर्यंत नाफेड द्वारा संचालित शासकीय केंद्रांवर चना खरेदीस शासनाने दिलेली मुदत २४ एप्रिल रोजीच ऑनलाइन नोंदी बंद करून शासनाने थांबवली होती. याबाबत उत्पादक शेतकऱ्यांनी विनंती केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या सह केंद्र सरकारला लेखी पत्राद्वारे विनंती करुन शासकीय केंद्रांवर किमान १५ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी विनंती केली होती.  केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबत आज अधिकृत घोषणा केली असून आता चना (हरभरा) उत्पादक शेतकऱ्यांना आपला चना २९ ...

चर्चेत तोडगा नाही, आंदोलनावर ठाम

इमेज
  महादेव कोळी, मल्हार कोळी प्रमाणपत्र व जात वैधता प्रश्नासाठी  समाजबांधवांचे जिवघेण्या उन्हात तीन दिवसांपासून "अन्नत्याग आंदोलन" आंदोलक आणि जात पडताळणी अधिकाऱ्यांमधील चर्चा निष्फळ, प्रश्न मार्गी लागेपर्यंत अन्नत्यागावर आंदोलक ठाम परळी वैजनाथ (प्रतिनिधी) मराठवाड्यातील महादेव कोळी, मल्हार कोळी बांधवांच्या प्रमाणपत्र व जात वैधता प्रश्नासाठी 8 समाजबांधवांनी जिवघेण्या उन्हात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. जात पडताळणी अधिकारी आणि आंदोलकांमध्ये आज चर्चा झाली मात्र ती निष्फळ ठरली. तर प्रश्न मार्गी लागेपर्यंत अन्नत्याग आंदोलन मागे घेणार नसल्याच्या भूमिकेवर आंदोलक ठाम आहेत. विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनात वेगवेगळ्या जिल्ह्यातील समाजबाधव सहभागी होत आहेत. आंदोलन सुरू असेपर्यंत समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ताकद दाखवून द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.      मराठवाड्यातील महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाला सध्या जातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्राप्त करून घेण्यासाठी जीवाचे रान करावे लागते. एव्हढे करूनही यश मिळत नाही. महादे...
इमेज
  गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांनी चारित्र्य व सद्गुणही जोपासावेत 'वैद्यनाथ' च्या गुणवंत सत्कार समारंभात श्री दत्ताप्पा इटके        परळी वैजनाथ,दि.५--         जिद्द व परिश्रमातून मिळवलेली शैक्षणिक गुणवत्ता  ही व्यक्तिमत्त्वाच्या चौफेर विकासासाठी आधारभूत मानली जाते. पण त्याबरोबरच विद्यार्थ्यांनी आधुनिक युगात उत्तम चारित्र्य व सद्गुणांचीही जोपासना करावी, असे आवाहन जवाहर शिक्षण संस्थेचे सचिव श्री दत्ताप्पा इटके यांनी केले.            संस्थेच्या येथील  वैद्यनाथ महाविद्यालयात काल बारावी बोर्ड परीक्षेत विशेष विशेष प्राविण्य संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला . त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री इटके बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. व्ही. जगतकर हे होते. यावेळी माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, उपप्राचार्य प्रा. डी. के. आंधळे , प्रा.हरीश मुंडे, प्राध्यापक प्रतिनिधी डॉ. पी. एल. कराड, पर्यवेक्षक डॉ. नयनकुमार आचार्य, समन्वयक यु.आर. कांदे, प्रा. एम. एल. देशमुख, प्रा डॉ एम....

शाही सोहळ्याची जोरदार तयारी

इमेज
  जे. के. कन्स्ट्रक्शनचा मुस्लिम धर्मीय सामूहिक विवाह सोहळा उद्या अनेक मान्यवरांची राहणार उपस्थितीत, सोहळ्याची जय्यत तयारी नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - जाफर खान, हाजी राजा खान परळी वैजनाथ (प्रतिनिधी) बांधकाम क्षेत्रात संपूर्ण मराठवाड्यात नामवंत म्हणून ओळख असलेल्या जे. के. कन्स्ट्रक्शनने समाजहिताचा उपक्रम हाती घेतला आहे. राजकारण, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या खान बंधूंनी मुस्लिम धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. उद्या गुरुवार दि. 7 मे रोजी हा शाही विवाह सोहळा संपन्न होत असुन त्याची जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्याला नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जे. के. कन्स्ट्रक्शनचे संचालक जाफर खान, उपनगराध्यक्ष हाजी राजा खान यांनी केले आहे.         सामाजिक भान ठेवून, समाजाचे देणे लागतो या भावनेतून जे. के. कंट्रक्शन यांच्या वतीने गुरुवार दि. 7 मे रोजी मुस्लिम धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मलकापूर रोडवरील जे. के. फंक्शन हॉल येथे सकाळी 11 वाजता हा सामूहिक विवाह सोहळा थाटात आणि उत्साहात संपन्न...
इमेज
  संघर्षातून यशाकडे: भांडी-धुणी करणाऱ्या माऊलीच्या लेकीची १२ वीच्या परीक्षेत मोठी झेप! परळी वैजनाथ,प्रतिनिधी... आईने दुसऱ्यांच्या घरी भांडी-धुणी करून काबाडकष्ट केले आणि मुलीनेही त्या कष्टाचे चीज करत १२ वीच्या परीक्षेत तब्बल ७८% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. परिस्थिती बेताची असली तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मिळवलेल्या तनुजा रणदिवे या मुलीच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तनुजा ची आई पद्मिन तानाजी रणदिवे  गेल्या अनेक वर्षांपासून गणेशपार भागात धुणी-भांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. पतीच्या निधनानंतर व आर्थिक स्थिती हलाखीची असताना घराची संपूर्ण जबाबदारी आईच्या खांद्यावर होती. "माझ्या वाट्याला आलेले कष्ट माझ्या मुलीच्या वाट्याला येऊ नयेत," याच एका ध्येयाने या माऊलीने दिवसरात्र काम केले. परळी येथे हनुमान नगर येथे किरायाच्या घरात राहणाऱ्या व घरात अभ्यासासाठी वेगळी खोली नाही की महागडे क्लास लावण्याची सोय नव्हती. आई कामावर गेल्यावर घरची कामे आटपून ही मुलगी अभ्यासाला बसायची. रात्री उशिरा पर्यंत तिने चिकाटीने अभ्यास केला. कष्टाचे मोल जाणणाऱ्या तनुजाने अभ्यासात कधीही ...
इमेज
भूसंपादन प्रकरणी नागरिकाची तक्रार ; प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची खंत:न्याय देण्याची मागणी परळी वैजनाथ (प्रतिनिधी) – भूसंपादन प्रकरणात न्याय न मिळाल्याच्या निषेधार्थ एका नागरिकाने आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली. संबंधित प्रकरणाची दखल घेत पुढील कार्यवाही सुरू करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतरही न्याय मिळत नसल्याची खंत या नागरिकाने व्यक्त केली आहे.          उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, परळी वैजनाथ (भूसंपादन विभाग) कार्यालयाकडून दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी संबंधित अर्जदारास पत्र देण्यात आले आहे. या पत्रानुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ, औरंगाबाद येथील आदेश क्रमांक 1956/2024 संदर्भात अर्जदाराने न्याय मिळावा व जमिनीच्या बदल्यात योग्य मोबदला मिळावा, यासाठी पाठपुरावा केला होता. मात्र, अपेक्षित तोडगा न निघाल्याने अर्जदाराने आंदोलनाचा मार्ग अवलंबत 1 मे 2026 रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. प्रशासनाने दिलेल्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित प्रकरण भूसंपादन अधिनियम 1894 च्या कलम 28-अ अंतर...
इमेज
  पश्चिम बंगाल चा निकाल  भाजप कार्यकर्त्यांसाठी अत्यंत आनंददायी व उत्साह वाढवणारा - ना. पंकजा मुंडे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या कुशल रणनितीचा विजय मुंबई दि. ०५--- पश्चिम बंगाल मध्ये झालेला दणदणीत विजय हा अत्यंत आनंददायी व देशभरातील तमाम भाजपा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविणारा आहे अशा शब्दात राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांचे सर्वमान्य, विकसनशील नेतृत्व आणि केंद्रीय गृहमंत्रीअमितभाई यांनी चाणक्याप्रमाणे केलेले फुलप्रूफ प्लॅनिंग त्यासमवेत भारतीय जनता पार्टीतील कार्यकर्त्यांचे अविरत कष्ट या सर्वांचे हे यश आहे. या सर्व यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि मनापासून आनंद व्यक्त करत आहे असं ना. पंकजाताई यांनी म्हटलं आहे. ••••

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....