पोस्ट्स

इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

खा.बजरंग सोनवणेंनी मांडली भूमिका, मुलाचे नाव जाणीवपूर्वक ओढल्याचा आरोप

इमेज
  घुले हत्या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करा; आम्ही तपासाला सहकार्य करू खा.बजरंग सोनवणेंनी मांडली भूमिका, मुलाचे नाव जाणीवपूर्वक ओढल्याचा आरोप केज : टाकळी (ता.केज) येथील तरुण विलास घुले यांच्या हत्येची घटना अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. या संवेदनशील गुन्ह्यातून पीडित कुटुंबाला न्याय मिळणे आवश्यक असतानाच, राजकीय हेतूने प्रेरित होऊन माझा मुलगा सौरवचे नाव यात जाणीवपूर्वक ओढले जात आहे. या प्रकरणाची वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी गृहविभाग आणि पोलीस प्रशासनाने उच्चस्तरीय चौकशी करावी, आमचे सीडीआर काढावेत, आम्ही तपासाला सहकार्य करू, अशी भुमिका खा.बजरंग सोनवणे यांनी मांडली. माध्यमांशी संवाद साधताना खा.सोनवणे म्हणाले, टाकळी येथील घटनेशी आमचा दूरवरचाही संबंध नाही. माझी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की, या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी व्हावी. या चौकशीअंती किंवा या गुन्हेगारी कटात माझा मुलगा अथवा मी स्वत: कुठेही दोषी आढळलो, तर आमच्यावर कायद्यानुसार जी कठोर कारवाई करायची आहे ती प्रशासनाने नि:संकोचपणे करावी. आम्ही तपासाला पूर्ण सहकार्य करण्यास कटिबद्ध आहोत. दरम...

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने घुले कुटुंबास पाच लाखाची मदत जाहीर

इमेज
  ना. पंकजा मुंडे यांनी मयत विलास घुलेंच्या परिवाराचे स्वीकारले पालकत्व ; दुःखात आणि न्यायाच्या लढाईतही पाठिशी बीड दि. २३ -- टाकळी- कदमवाडी (ता. केज) परिसरात झालेल्या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या विलास घुले यांच्या परिवाराचे पालकत्व स्वीकारत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजा मुंडे यांनी त्यांना मदतीचा हात दिला आहे. मयत घुले यांच्या पत्नीस गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने पाच लाख रूपयांची मदत आज त्यांनी जाहीर केली आहे.    विलास घुले याच्या हत्येच्या प्रकरणात झालेल्या दुर्दैवी घटनेचा तीव्र निषेध करत ना. पंकजा मुंडे यांनी पोलिस प्रशासनाला दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, पण कोवळ्या वयात काहीही संबंध नसताना त्याचा हकनाक मृत्यू झाल्यामुळे त्याचे कुटुंब उघड्यावर पडले असून त्यांचेवर अकाली संकट आले आहे. विलास यांचे बंधू रमेश यांच्याशी ना. पंकजाताईंनी संपर्क साधून आपण विलासच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले. तुमच्या दुःखात आणि न्यायाच्या लढाईत मी  परिवाराच्या पाठिशी  ठामपणे उभी असल्याचे सांगितले. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातू...

युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.
इमेज
तुकाराम मुंडे यांची अखेर उचलबांगडी मुंबईः गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून काम करताना राज्यभरात भेसळी विरोधात कठोर मोहिम राबवून अनेकांना धडकी भरविणारे तुकाराम मुंडे यांची राज्य सरकारने महत्वाच्या पदावरुन उचलबांगडी केली आहे. मुंढे यांना महत्वाच्या पदावरुन हटविण्यात आले असून त्यांच्या जागी डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. सुरुवातीस आयुक्तपद हे कमी दर्जाचे असून सरकारने आपला अवमान केल्याचे सांगत या पदावर रुजू होण्यास मुंढे ना खूश होते. मात्र राज्य सरकारने त्यांची अन्य पदावर नियुक्तीची विनंती फेटाळल्यानंतर मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारताच धडक कारवाई सुरु केली आहे. मुंढे यांनी गेल्या पंधरा- वीस दिवसात भेसळीविरोधात धडक मोहिम राबविली असून अन्न, औषधे, दूध, खवा भेसळ करणाऱ्यांवर कठोर कावाईचा बडगा उगारत अनेकांना जेलमध्ये पाठविले आहे. एवढेच नव्हे तर काही मोठ्या कंपन्या, उद्योग, हाॅटेलवरही मुंढे यांनी कारवाई करीत आपल...

विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांचे परळी रेल्वे विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले सकारात्मक आश्वासन

इमेज
  परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी आणि नवीन गाड्यांसाठी परळी रेल्वे विकास समितीचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांना निवेदन विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांचे परळी रेल्वे विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले सकारात्मक आश्वासन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-              परळी रेल्वे विकास समिती, मराठवाडा विकास जनता परिषद आणि इतर विविध संघटनांच्या वतीने ८ जून रोजी करण्यात आलेल्या एक दिवसीय धरणे आंदोलनाची दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या आंदोलनाचा सकारात्मक परिणाम म्हणून दि. १८ जून रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर. गोपाळ कृष्णन यांनी, तर आज दि. २३ जून रोजी विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सौरभ प्रकाश यांनी परळी रेल्वे स्थानकाला भेट देऊन प्रवासी व विविध मागण्यांचा आढावा घेतला. दरम्यान रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी आणि नवीन गाड्यांसाठी रेल्वे विकास समितीचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांना दिले निवेदन दिले. विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांचे रेल्वे विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांना सकारात्मक आश्वासन दिले आहे.            प...
इमेज
हलगीच्या तालातून थेट देशसेवेपर्यंत! हलाखीच्या परिस्थितीत वाढलेल्या तरुणाची अग्निवीर जवानपदी निवड; परळीच्या साठेनगरमध्ये जल्लोष परळी वैजनाथ ,प्रतिनिधी :       परळीच्या साठे नगर मधील ज्या घरात दोन वेळच्या जेवणाची चिंता होती, ज्या वडिलांनी हलगी वाजवून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला, त्या कष्टकरी कुटुंबातील संतोष चौरे या तरुणाने आज भारतीय सैन्यात अग्निवीर जवान म्हणून निवड मिळवत संघर्षावर यशाची मोहोर उमटवली आहे. या अभिमानास्पद यशामुळे परळी शहरातील साठेनगर परिसरात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून प्रथमच साठे नगर परिसरातून देशसेवेत निवड झाली असल्याने नागरिकांनी जल्लोषात त्याचे स्वागत केले. आर्थिक संकट, अभाव आणि प्रतिकूल परिस्थिती यांचा सामना करत वाढलेल्या या तरुणाने लहानपणापासूनच देशसेवेचे स्वप्न पाहिले होते. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे अनेक अडचणी त्याच्या वाट्याला आल्या, मात्र त्याने परिस्थितीसमोर कधीही हार मानली नाही. कठोर परिश्रम, नियमित सराव आणि जिद्दीच्या बळावर त्याने भारतीय सैन्याच्या अग्निवीर भरती प्रक्रियेत यश संपादन केले. मुलाच्या निवडीची बातमी समजताच कष्टाने...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या