पोस्ट्स

इमेज
परळीतील तौहीद पठाण हत्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करा खा.बजरंग सोनवणे यांची मागणी, पीडित कुटुंबाची भेट घेऊन व्यक्त केल्या तीव्र भावना परळी: तौहिद पठाण हत्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी केली आहे. येथील युवक तोहीद पठाण याची काही दिवसांपूर्वी झालेली निर्घृण हत्या अत्यंत दुर्दैवी, संतापजनक आणि मन हेलावून टाकणारी आहे. या भीषण घटनेमुळे संपूर्ण परळी परिसरासह जिल्ह्यात मोठी हळहळ व्यक्त होत असून, पठाण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर, बीडचे खा.बजरंग सोनवणे यांनी आज पीडित कुटुंबाच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि संपूर्ण कुटुंबियांचे सांत्वन केले. या कठीण प्रसंगी आम्ही पठाण कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, अशी ग्वाही देत खासदार सोनवणे यांनी या प्रकरणातील दोषींवर अत्यंत कठोर आणि तातडीने कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. खा.बजरंग सोनवणे यांनी पठाण यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांच्या भावना जाणून घेतल्या व त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. कमावता आणि तरुण मुलगा गमावल्यामुळे पठाण कुटुंबियांना झालेल्य...

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई....

इमेज
  परळी वैजनाथ: धर्मापुरीत गांज्याचा साठा उघड;  9.77 लाखांचा मुद्देमाल जप्त परळी वैजनाथ, दि. 11: पुढारी वृत्तसंस्था.....      परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 20 किलो 340 ग्रॅम गांजा जप्त केला असून त्याची अंदाजे किंमत 9 लाख 77 हजार 320 रुपये इतकी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.        पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख बाबुलाल शेखलाल अत्तार (वय 55, रा. धर्मापुरी, ता. परळी) व वसीम बाबुलाल अत्तार (रा. धर्मापुरी, ता. परळी) यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. धर्मपुरी येथील त्यांच्या राहत्या घरात अंमली पदार्थाची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 11 जून रोजी सायंकाळी छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान एका पांढऱ्या पोत्यात ठेवलेला उग्र वास येणारा हिरवट रंगाचा गांजा आढळून आला. वजन केल्यानंतर तो 20 किलो 340 ग्रॅम असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी धनराज जारवाल यांच्या ...

पोलिसांकडून तपास सुरू....

इमेज
  खळबळ घटना: किराणा दुकानात रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला धारूर: तालुक्यातील पहाडी दहिफळ येथे शरद आश्रुबा धनवे (वय ४५, रा. सोन्नाखोटा) या व्यक्तीचा अज्ञात कारणावरून निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गावातीलच एका किराणा दुकानात त्यांचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून घटनेनंतर धनवे यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.       या घटनेची माहिती मिळताच धारूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र घुगे, पोलीस उपनिरीक्षक गिराम आणि पोलीस कॉन्स्टेबल कदम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी सतर्कता बाळगत पहाटे दोन वाजता मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात हलवला. खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून धारूर पोलीस विविध अंगांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार हा घातपात असल्याचा संशय असून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण आणि गुन्ह्याची अचूक दिशा स्पष्ट होई...
इमेज
आईचा चारधाम दर्शनाचा संकल्प लेक करतेयं पूर्ण! ना. पंकजाताई मुंडेंनी आई आणि बहिण प्रीतमताईंसह द्वारकेत घेतले दर्शन देशातील एकमेव गो हाॅस्पीटलला दिली भेट ; वृक्षारोपणही केले मुंबई दि. ११ -- चारधाम यात्रेचे दर्शन घडवून आणण्याचा आईसाठी केलेला संकल्प राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे पूर्ण करत आहेत. आज त्यांनी आई प्रज्ञाताई व बहिण माजी खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे यांच्यासह द्वारकेत भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. याठिकाणी देशातील एकमेव असलेल्या गो हॉस्पिटलला भेट दिली तसेच पंतप्रधान मोदींच्या यशस्वी कारकिर्दीबद्दल वृक्षारोपणही केले.    यासंदर्भात एक पोस्ट करत ना. पंकजाताईंनी आईचा चारधाम करण्याचा संकल्प पूर्ण करत असल्याचे म्हटले आहे. एक दिवस मिळाला की आई आणि बहिण प्रीतमताईंसह आम्ही निघालो.आज देवभूमी द्वारका येथे श्री द्वारकाधीश मंदिराचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी द्वारकाधीश मंदिर ट्रस्ट आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. काही दिवसांपूर्वीच ना. पंकजाताईंनी आईला घेऊन बद्रिनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्रीला जाऊन दर्शन ...

मग्रूर बॅंक व्यावस्थापकावर कार्यवाहीची मागणी ...

इमेज
  बॅंक व्यावस्थापक विरोधात १६ जून रोजी अंदोलन  सिरसाळ्यातील महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या शाखे समोर बेमुदत ठिय्या अंदोलन  सिरसाळा  :  पत्रकार,शेतकरी,नागरिक यांच्याशी उद्धट वर्तन करणाऱ्या सिरसाळ्यातील महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शाखेच्या व्यावस्थापक संदिप रेड्डी वर तात्काळ कार्यवाही करावी , या ठिकाणाहून बदली करावी या मागणी साठी पत्रकार मिलिंद चोपडे व इतर दिनांक १६ जून रोजी महाराष्ट्र ग्रामीण बॅंके समोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहेत. या बाबत काल दिनांक ११ जून रोजी बॅंक प्रशासनास निवेदन दिले आहे.  या बाबत सविस्तर वृत्त असे कि, केसीसी खातेदार किती आहेत ? आपल्या शाखेतील कर्जमाफीत किती शेतकरी पात्र ठरत आहेत अशी विचारणा सिरसाळ्यातील महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शाखा व्यवस्थापकांना पत्रकार मिलिंद चोपडे यांनी विचारली असता व्यावस्थापकाने उद्धट वर्तन करत अंत्यत मग्रूरीने थेट गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार घडला आहे, दिनांक १० जून रोजी पत्रकार मिलिंद चोपडे व इतर दोन शेतकरी समावेत परळी तालुक्यातील सिरसाळा येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेत गेले होते. या ठिकाणी उपस...
इमेज
फसव्या कर्जमाफी निर्णयाची किसान सभेनी केली होळी परळी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर निदर्शने परळी वै. 12 प्रतिनिधी  शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा, बीड जिल्हा समितीच्या वतीने गुरुवार ता 11रोजी सकाळी अकरा वाजता परळी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर निदर्शने करण्यात येऊन राज्य सरकारच्या फसव्या कर्जमाफी निर्णयाची होळी करण्यात आली. कर्जमाफी, पीकविमा, देवस्थान व गायरान जमिनी, खते-बियाणे उपलब्धता तसेच शेतकरी हिताच्या इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. अखिल भारतीय किसान सभेच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवार ता 11 रोजी सकाळी 11 वाजता परळी कृषी उत्पन्न बाजार बाजार समितीसमोर शेतकरी एकत्र येऊन सरकारच्या चुकीच्या शेतकरी धोरणा विरूद्ध घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी व्यापक स्वरूपाची कर्जमाफी लागू करावी, कर्जमाफीतील जाचक अटी व शर्ती रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप पीकविमा मिळालेला नसल्याने खरीप 2025 हंगामासाठी म...
इमेज
  कर्णबधिर विद्यार्थिनी शाश्वती कांबळेची यशोगाथा : जिद्द, चिकाटी आणि परिश्रमांच्या बळावर एसएससी बोर्डात प्रथम क्रमांक परभणी | प्रतिनिधी दिव्यांगत्व हे यशाच्या मार्गातील अडथळा नसून जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे स्व. रामराव कान्हेकर निवासी मूकबधिर विद्यालय, परभणी येथील विद्यार्थिनी शाश्वती माधव कांबळे (बिट्टू) हिने आपल्या उल्लेखनीय यशातून सिद्ध करून दाखविले आहे. कर्णबधिर दिव्यांगत्वावर मात करत शाश्वतीने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून एसएससी बोर्डामध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याने तिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शाश्वतीच्या या यशामुळे तिच्या आई-वडिलांची मान अभिमानाने उंचावली असून त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले आहेत. तिची जिद्द, कठोर परिश्रम, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यास यांचे हे यशस्वी फलित असल्याची भावना व्यक्त होत आहे. या प्रसंगी तिचे कौतुक करताना मान्यवरांनी सांगितले की, दिव्यांगत्व हे यशाच्या आड येत नाही. सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षण घेऊन आणि ज्ञानाची कसोटी पार करत उल्लेखनीय यश मिळविता येते, याचे जिवंत उदा...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या