पोस्ट्स

प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही

इमेज
  शिक्षक बदली प्रकरण ; दुसर्‍या दिवशीही हिवरा (गो.) ग्रामस्थांनी शाळा केली बंद  नियुक्त रद्द करावी अथवा रिक्त जागा भरण्याची मागणी  सिरसाळा  : परळी तालुक्यातील हिवरा गोवर्धन येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील एका शिक्षकाची प्रतिनियुक्ती बदली केली असल्याने संतप्त ग्रामस्थ व शालेय व्यावस्थापन समितीने एकत्र येत शाळेला टाळे ठोकले आहे. दिनांक ४ जुलै रोजी हिवरा ग्रामस्थांनी अंदोलन करत  शाळेला कुलूप ठोकले होते व काल दिनांक ६ जुलै देखील संतप्त ग्रामस्थांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे एकत्र येत अंदोलन करत शाळा बंद केली . शिक्षक बदली प्रकरणी संबंधित प्रशासन लक्ष देत नाही. या मुळे हिवरा ग्रामस्थ अधिकच आक्रमक होत आहेत. भानुदास संभाजी गुडदे असे प्रतिनियुक्ती झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. लाडझरी केंद्र अंतर्गत असलेल्या दौंडवाडी येथे त्यांची नियुक्त केली आहे. सदरील नियुक्ती माजी आमदार संजय दौंड यांच्या सूचनेवरुन तसेच शालेय व्यावस्थापन समिती दौंडवाडी यांच्या निवेदन मागणी वरुन संबंधित शिक्षकाची प्रतिनियुक्ती केली असल्याचे गट शिक्षण अधिकारी कार्यालय पंचायत समिती परळी वै...
इमेज
संपादक बालासाहेब कडबाने यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घ्याची परळी संपादक संघाची मागणी परळी वैजनाथ (प्रतिनिधी)ः-दै.जगमित्रचे संपादक बालासाहेब कडबाने यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी परळी संपादक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.  या संदर्भात परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक यांच्या मार्फत पोलीस महानिरिक्षक छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र) यांना आज दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दैनिक जगमित्र ह्या दैनिकाचे संपादक बालासाहेब कडबाने यांच्यावर राज्य वक्फ बोर्डचे अध्यक्ष समिर काझी यांच्या सहाय्याकाने गुन्हा दाखल केला आहे. दैनिक जगमित्र चे संपादक बालासाहेब कडबाने यांनी आपल्या दैनिकातून सत्य व पारदर्शक बातम्या प्रसिद्ध करुन लोकांसमोर व प्रशासना समोर सत्य मांडले आहे. काही दिवसापुर्वी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समिर काझी यांच्या भ्रष्टाचारी कारभाराबद्दल दैनिक जगमित्र दैनिकात वृत्त छापले परंतु लोकांसमोर व प्रशासना समोर पोलखोल झाल्याने या रागातून समिर काझी यांनी त्यांचे सहाय्यकाच्या मार्फत तक्रार देऊन दैनिक जगमित्र चे संपादक बालासाहेब कडबाने यांच्यावर...

पोलीस उपनिरीक्षक राजाराम शेळके यांच्या सेवा निवृत्ती सोहळ्यात पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे व प्रा. रवींद्र जोशी यांचे गौरवोद्गार

इमेज
पो.उपनि. राजाराम शेळके यांनी नेहमी कर्तव्याला प्राधान्य दिले– पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे ३६ वर्षे निष्कलंक सेवा हीच राजाराम शेळके यांची खरी ओळख- पत्रकार प्रा. रविंद जोशी पोलीस उपनिरीक्षक राजाराम शेळके यांच्या सेवा निवृत्ती सोहळ्यात पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे व प्रा. रवींद्र जोशी यांचे गौरवोद्गार परळी वैजनाथ, (प्रतिनिधी):-पोलीस दलातील सेवा ही २४ तासांची असते. अशा कठीण आणि तणावपूर्ण सेवेत राजाराम शेळके यांनी प्रत्येक जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. वैद्यनाथ मंदिर पोलीस चौकीत कार्यरत असताना देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेची आणि दर्शन व्यवस्थेची त्यांनी उत्कृष्ट जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कामाबाबत माझ्याकडे कधीही एकही तक्रार आली नाही. त्यांनी केलेले प्रत्येक काम परिपूर्ण आणि विश्वासार्ह होते.असे गौरवोद्गार पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी काढले. तर आपल्या "३६ वर्षांच्या सेवाकाळात एकही शिस्तभंगाची कारवाई न होणे हीच राजेभाऊ शेळके यांच्या चारित्र्याची आणि कर्तव्यनिष्ठेची सर्वात मोठी पावती आहे. उलट उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना सुमारे २८ वेळा पोलीस दलाकडून गौरविण्यात आले असल्य...

पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या कारवाईचा निषेध; निष्पक्ष चौकशीची मागणी

इमेज
संपादक बाळासाहेब कडबाने यांच्यावरील कथित खोटा गुन्हा मागे घ्या; सिरसाळा पत्रकार संघाची पोलीस प्रशासनाकडे मागणी पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या कारवाईचा निषेध; निष्पक्ष चौकशीची मागणी परळी वैजनाथ / सिरसाळा, दि. ५ जुलै : 'दैनिक जगमित्र'चे संपादक बाळासाहेब कडबाने यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला कथित खोटा गुन्हा तातडीने मागे घेण्यात यावा, अशी मागणी सिरसाळा पत्रकार संघाने पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून न्याय मिळावा, अशीही भूमिका संघटनेने मांडली आहे. पत्रकार संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांना अशा प्रकारे लक्ष्य करणे हे लोकशाही आणि प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यासाठी घातक असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ व निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे आणि बाळासाहेब कडबाणे यांच्यावरील कथित खोटा गुन्हा मागे घ्यावा, अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात ...

मुरूम, डस्ट टाकून रस्ता तातडीने चिखलमुक्त करण्याची मागणी

इमेज
पावसामुळे अंबेवेस पुलाचा पर्यायी रस्ता चिखलमय; वैद्यनाथ दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय ! मुरूम, डस्ट टाकून रस्ता तातडीने चिखलमुक्त करण्याची मागणी परळी वैजनाथ : प्रतिनिधी       आंबेवेस परिसरातील सरस्वती नदीवरील पुलाचे काम सुरू असल्यामुळे वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला पर्यायी रस्ता पावसामुळे चिखलमय झाला असून, प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसह नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या रस्त्यावर तातडीने मुरूम व डस्ट टाकून तो चिखलमुक्त करावा, अशी मागणी नागरिक आणि भाविकांकडून होत आहे.        या पर्यायी रस्त्याची दुरवस्था गुरुवारी समोर आली. प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी जात असलेल्या एका ज्येष्ठ महिलेचा चिखलामुळे तोल जाऊन पडल्याची घटना घडली. सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झाली नसली तरी या घटनेमुळे रस्त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सध्या पावसाळा सुरू असून, आगामी श्रावण महिन्यात प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी हजारो भाविक गावभागातून याच मार्गाचा वापर करतात. तसेच गुलाब महाराज पालखीसह विविध पालख्या याच मार्गाने जात असल्याने या र...
इमेज
  एटीएम फोडून रोकड लंपास करण्याचा प्रयत्न हाणून पाडला; २४ तासांत तिघांना अटक अंबाजोगाई, प्रतिनिधी : शहरातील बस डेपोजवळील अण्णाभाऊ साठे चौक परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) एटीएम मशीनमध्ये चोरीचा प्रयत्न करणाऱ्या तिघा सराईत आरोपींना अंबाजोगाई पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली. गुन्ह्यात वापरलेले वाहनही जप्त करण्यात आले असून, अन्य फरार आरोपींचा शोध सुरू आहे. ३ जुलै रोजी पहाटे सुमारे २.१५ वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी बस डेपोजवळील एसबीआयचे एटीएम मशीन फोडून त्यातील रोकड चोरण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी परिसरात गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या वाहनाचा सायरन ऐकताच आरोपींनी रोकड न घेता घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही चित्रफितींची तपासणी केली. त्यामध्ये संशयित वाहन परळीच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न झाले. परळी शहर पोलिसांच्या मदतीने वाहनावरील सांकेतिक चिन्हाच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर आरोपी परभणी जिल्ह्याकडे गेल्याची माहिती मिळताच स्थानिक...

संतापाच्या भरात उच्चारलेले एक वाक्य न्यायालयीन निर्णयात किती महत्त्वाचे ठरू शकते ?

इमेज
एका वाक्याने बदलला खटल्याचा निकाल; पत्नीच्या वक्तव्यामुळे जन्मठेपेची शिक्षा कमी होऊन झाली केवळ ७ वर्षांची !      एखाद्या व्यक्तीने संतापाच्या भरात उच्चारलेले एक वाक्य न्यायालयीन निर्णयात किती महत्त्वाचे ठरू शकते, याचे उदाहरण मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या एका निर्णयातून समोर आले आहे. पत्नीने वादाच्या वेळी 'मी तुझ्यासारखे हजार नवरे पाळू शकते,' असे म्हटल्याने संतप्त होऊन तिची हत्या करणाऱ्या पतीची जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने कमी करून ७ वर्षे सश्रम कारावासाची केली आहे. हे वक्तव्य आरोपीसाठी 'तात्कालिक आणि गंभीर चिथावणी' ठरल्याचे न्यायालयाने नमूद केले. न्यायमूर्ती विवेक अग्रवाल आणि न्यायमूर्ती अवनेंद्र कुमार सिंग यांच्या खंडपीठाने १८ जून रोजी हा निर्णय दिला. न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, पत्नीचे वक्तव्य हे पतीच्या स्वाभिमानाला धक्का देणारे आणि त्याचे मूल्य शून्य असल्याचे सूचित करणारे होते. त्यामुळे आरोपीने क्षणिक आवेशात स्वतःवरील ताबा गमावला. या घटनेत हत्या करण्याचा पूर्वनियोजित हेतू आढळून येत नसल्याने जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवणे योग्य ठरणार नाही, असे न्यायालयाने स...