पोस्ट्स

ज्येष्ठ एक नव्हे, तर दोन महिने,.....मराठी पंचांगात अधिक मास का येतो, जाणून घ्या.....

इमेज
  आजपासून पुरुषोत्तम मास अर्थात ज्येष्ठ अधिक मास सुरू !        सध्या ज्येष्ठ महिना सुरू आहे. यावेळी ज्येष्ठ महिन्यात अधिक मास (पुरुषोत्तम मास) असेल, म्हणजेच ज्येष्ठ एक नव्हे, तर दोन महिने राहील. 16 मे पर्यंत ज्येष्ठ कृष्ण पक्ष राहील, त्यानंतर 17 मे पासून अधिक मास सुरू होईल, जो 15 जून पर्यंत चालेल. त्यानंतर ज्येष्ठ शुक्ल पक्ष सुरू होईल, जो 29 जून पर्यंत राहील. अधिक मासात विवाह, गृहप्रवेश, मुंडन, जानवे संस्कार यांसारख्या शुभ कार्यांसाठी मुहूर्त नसतात. अधिक मासात भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांची विशेष पूजा केली जाते. या महिन्याला विष्णूंच्याच पुरुषोत्तम या नावानेही ओळखले जाते. या दिवसांमध्ये तीर्थस्नान, मंदिरांमध्ये दर्शन-पूजन, सत्संग, मंत्र जप, दान-पुण्य, पूजन इत्यादी शुभ कार्ये केली जातात. इंग्रजी कॅलेंडरमध्ये लीप इयर असते आणि हिंदी पंचांगमध्ये अधिक मास. लीप इयरमध्ये फक्त एक दिवस वाढतो, तर अधिक मासामुळे मराठी वर्षात पूर्ण एक महिना वाढतो. खरं तर, हे सौर वर्ष आणि चंद्र वर्ष यांच्यातील फरकामुळे होते. लीप वर्षात एक दिवस वाढतो..... इंग्रजी कॅलेंडर   पृथ्वीच्...

हृदयद्रावक घटना....

इमेज
  सरस्वती तलावात बुडून दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू धारूर तालुक्यातील हिंगणी येथे हृदयद्रावक घटना; परिसरात शोककळा धारूर, प्रतिनिधी  धारूर तालुक्यातील हिंगणी येथील सरस्वती तलावात शनिवारी दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत दोन अल्पवयीन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर एका महिलेसह अन्य दोघींवर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे हिंगणी परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जोडहिंगणी (ता. धारूर) येथील मासेमारी व्यवसाय करणाऱ्या पारवे कुटुंबातील महिला व सहा मुली शनिवारी (दि. १६ मे) सकाळी सरस्वती तलावावर गेल्या होत्या. दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास काही मुली तलावात चप्पूच्या सहाय्याने पाण्यात फिरत असताना अचानक चप्पू पलटी झाला. यामध्ये पलक श्याम पारवे (वय १४ वर्षे), दिव्या विकास कांबळे (वय ९ वर्षे) आणि मोहिनी भीमा पारवे (वय १६ वर्षे) या तिघी पाण्यात पडल्या.तलावाच्या काठाजवळ असलेल्या जान्हवी कोंडीराम पारवे (वय १० वर्षे), तन्वी कोंडीराम पारवे (वय ८ वर्षे), माधवी शाम पारवे (वय १७ वर्षे) तसेच माया मालाजी शिंदे (वय ३० वर्षे) यांनी आरडाओरड...
इमेज
  शनिअमावस्येनिमित्त राक्षसभुवन दुमदुमले; एक लाख भाविकांनी घेतले दर्शन गेवराई : राक्षसभुवन शनी महाराज देवस्थान येथे शनिअमावस्येनिमित्त शनिभक्तांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली. राज्यातील विविध जिल्ह्यांसह परराज्यातून आलेल्या सुमारे एक लाख भाविकांनी दिवसभरात शनी महाराजांचे दर्शन घेतल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भगवान पुराणिक यांनी दिली. शनिअमावस्येनिमित्त पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली होती. “जय शनीदेव”च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता. अनेक भाविकांनी तेल अभिषेक, पूजा-अर्चा, नवसपूर्ती तसेच विविध धार्मिक विधी करून शनी महाराजांचे दर्शन घेतले. मंदिर परिसरात दिवसभर भक्तांची मोठी वर्दळ कायम होती. यंदा तीव्र उष्णतेची लाट आणि कडक उन्हाळा असूनही भाविकांची श्रद्धा कायम असल्याचे चित्र पाहायला मिळाले. उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून देवस्थान ट्रस्टतर्फे सकाळी व सायंकाळच्या वेळेत दर्शनासाठी येण्याचे आवाहन यापूर्वीच करण्यात आले होते. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन ट्रस्टकडून करण्य...

तरुणी कडून झालेला अपमान सहन न झाल्याने जीवन संपवले...

इमेज
"हा माझा शेवटचा फोन आहे" असे वडिलांना म्हणत युवकाची गळफास लावून आत्महत्या परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... "हा माझा शेवटचा फोन आहे" वडिलांना असे म्हणत युवकाची गळफास लावून  आत्महत्या  केल्याची  एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.परळी तालुक्यातील मोहा येथे ही घटना घडली. एका तरुणीने भररस्त्यात जाहीरपणे थोबाडीत मारल्याने झालेल्या तीव्र अपमानामुळे या तरुणाने लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे त्याच्या वडिलांनी फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात आरोपी तरुणीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेभाऊ रामभाऊ शिंदे (रा. मोहा) यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा चंद्रहार राजेभाऊ शिंदे याला गावातीलच एका तरुणीने १३ मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास करेवाडी रोडवरील लाल माती परिसरात सर्वांसमक्ष थोबाडीत मारले होते. या मारहाणीमुळे आणि झालेल्या जाहीर अपमानामुळे चंद्रहार अत्यंत नैराश्यात होता. हा मानसिक छळ सहन न झाल्याने त्याने १४ मे रोजी सायंकाळी आपल्या वडिलांना फोन ...

अभिष्टचिंतन लेख:::::::: हार्दिक शुभेच्छा!!!!!

इमेज
  रुग्णसेवेतून समाजसेवेचा वसा जपणारे व्यक्तिमत्त्व :डॉ. विवेक दंडे परळी वैजनाथ ही प्रभू श्री वैद्यनाथांच्या भक्तीने ओतप्रोत भरलेली नगरी जशी श्रद्धेचे केंद्र आहे, तशीच ती आरोग्यसेवेतील विश्वासाचेही प्रतीक बनली आहे. या विश्वासाला आपल्या सेवाभावी कार्यातून बळकटी देणारे नाव म्हणजे डॉ. विवेक दंडे. वैद्यकीय सेवा ही केवळ व्यवसाय नसून ती समाजसेवेची पवित्र जबाबदारी आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून वेळोवेळी सिद्ध केले आहे. आज दि. १७ मे रोजी डॉ. विवेक दंडे यांचा वाढदिवस साजरा होत असून, त्यानिमित्त त्यांच्या वैद्यकीय व सामाजिक  कार्याचा घेतलेला हा गौरवपूर्ण आढावा आहे. डॉ. विवेक दंडे यांना सेवाभावाची प्रेरणा त्यांच्या वडिलांकडूनच लाभली. स्वर्गीय डॉ. दिगंबर दंडे (दादा) हे परळीतील ज्येष्ठ, अनुभवी आणि अत्यंत आदरणीय डॉक्टर म्हणून ओळखले जात होते. त्यांनी आयुष्यभर रुग्णसेवेला माणुसकीची जोड दिली. त्यांचा हाच आदर्श आणि संस्कार डॉ. विवेक दंडे यांनी आपल्या जीवनात आत्मसात केला. त्यामुळे आज त्यांच्या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला केवळ औषधोपचारच नव्हे, तर आत्मीयतेचा आणि विश्वासाचा स...
इमेज
  20 मे रोजी देशभरातील मेडिकल स्टोअर्स राहणार बंद ? 12.4 लाख औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप परळी, प्रतिनिधी..  देशभरातील औषध विक्रेत्यांनी २० मे रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. या संपात १२.४ लाखांहून अधिक औषध विक्रेते आणि औषध वितरक सहभागी होणारा असल्यामुळे परिणामी, २० मे रोजी देशाच्या अनेक भागांमध्ये औषधांची दुकाने बंद ठेवण्यात आली आहे हा संप ऑल इंडिया केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स असोसिएशनने (AIOCD) पुकारला असून ऑनलाइन फार्मसी प्लॅटफॉर्म आणि मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या धोरणांमुळे पारंपरिक औषध व्यवसायावर परिणाम होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. लाखो औषध विक्रेत्यांची संपाची हाक ही ई-फार्मसीच्या वाढत्या आणि अनियंत्रित व्यवसायाचा निषेध करण्यासाठी 'ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स' या संघटनेने २० मे रोजी देशव्यापी पुकारलेल्या संपात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. या दिवशी देशभरातील सर्व औषध दुकाने आणि वितरक आपली प्रतिष्ठाने बंद ठेवणार असून यामध्ये सुमारे १२.४ लाखांहून अधिक केमिस्ट आणि औषध वितरकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या संघटनेने, ऑनलाइन फार्मसीच्या अनिय...

प्रमाणपत्र रोखण्यास देवेंद्र फडणवीस जबाबदार जरांगेंचे टीकास्त्र...

इमेज
राज्यात मराठ्यांचा पुन्हा एल्गार: मनोज जरांगेचे 30 मे पासून उपोषण मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाचे वादळ घोंगावणार असून, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येत्या ३० मे पासून जालन्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा बेमुदत आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. मराठा समाजाची वारंवार फसवणूक होत असल्याचा आरोप करत, जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आरक्षणाचा हा लढा अधिक तीव्र करण्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला पुन्हा एकदा एकवटण्याचे आवाहन केले आहे. प्रमुख मागण्याया आंदोलनामध्ये प्रामुख्याने खालील तीन मागण्या सरकारसमोर ठेवण्यात आल्या आहेत:कुणबी प्रमाणपत्र वाटप: मराठवाड्यातील मराठा समाजाला विनाविलंब कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू करण्यात यावे.५८ लाख बांधवांना लाभ: ज्या ५८ लाख मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना त्वरित प्रमाणपत्रे देण्यात यावीत.सातारा गॅझेटची अंमलबजावणी: ऐतिहासिक सातारा गॅझेटचा जीआर (शासकीय निर्णय) तातडीने लागू करावा. याव्यतिरिक्त, सध्या अस्तित्त्वात असलेली मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करून, मरा...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या