पोस्ट्स

आनंद शिंदे यांच्या भीमगीतांचा रंगणार जल्लोष...

इमेज
  सिरसाळा येथे बुद्धरूप अनावरण व बुद्ध विहार लोकार्पण सोहळ्याचे आयोजन ना. संजय शिरसाट,ना. पंकजाताई मुंडे, माजी मंत्री  आ.धनंजय मुंडे व डॉ. हर्षवर्धन कांबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम परळी प्रतिनिधी - परळी तालुक्यातील सिरसाळा येथे रविवार दि. २४ मे २०२६ रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या बुद्धरूपाचे अनावरण तसेच सम्राट अशोक बुद्ध विहाराच्या लोकार्पणाचा भव्य दिव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवानिमित्त परिसरात उत्साहाचे आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले असून पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. सम्राट अशोक बुद्ध विहार, कुशी नगर, सिरसाळा येथे होणाऱ्या या कार्यक्रमास विविध मान्यवर, भन्तेजी, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी तसेच बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. आयोजकांनी सर्व नागरिकांना उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता पंचशील धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करून होणार असून पूज्य भन्ते डॉ. धम्मप्रिय महास्थवीर (अध्यक्ष, भीम जन्मभूमी महू, मध्यप्रदेश) यांच्या हस्ते हा विधी पार पडणा...
इमेज
 डॉ. श्रीगणेश मुंडे यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव परळी प्रतिनिधी: परळी वैजनाथ येथील मूळ रहिवासी तथा महानिर्मिती कंपनीमध्ये कार्यरत असलेले डॉ. श्रीगणेश महादेव मुंडे यांना प्रशासकीय कार्य, मानव संसाधन व्यवस्थापन, सुनियोजन आणि सामाजिक बांधिलकीच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांकडून गौरविण्यात आले आहे. आयएफईए संस्थेच्या वतीने उत्कृष्ट प्रशासकीय व मानव संसाधन व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. तसेच ग्लोबल एक्सेललेन्स समिट २०२६ तर्फे त्यांच्या विशेष कार्याबद्दल अभिनंदन पत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या सर्वांगीण कार्याची दखल घेत अमेरिकन मॅनेजमेंट युनिव्हर्सिटीने त्यांना मानद पीएच.डी. पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. डॉ. श्रीगणेश मुंडे यांनी D. Pharm, B. Pharm, MBA (HR) तसेच YCMOU अंतर्गत PhD Scholar म्हणून शिक्षण घेतले आहे. सध्या महानिर्मिती कंपनीच्या मुख्यालय मुंबई येथे मुख्य लिपिक म्हणून ते कार्यरत असून यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषद जालना येथे औषध निर्माण अधिकारी तसेच परळी वैजनाथ थर्मल विद्...

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-४ अंतर्गत निधी मंजूर; ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण

इमेज
  खा.बजरंग सोनवणे यांच्या प्रयत्नांना मोठे यश गेवराई तालुक्यातील 'एमडीआर-२० ते यमगरवाडी' रस्ता कामाला मंजुरी! प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-४ अंतर्गत निधी मंजूर; ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण  बीड: गेवराई तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांचा आणि दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर गेवराई तालुक्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तालुकयातील L021 एमडीआर-२० ते यमगरवाडी या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाला अखेर 'प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-४' (PMGSY-IV) अंतर्गत प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. बीडचे खा. बजरंग सोनवणे यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक प्रयत्नांना यामुळे मोठे यश आले असून, या रस्त्यासाठी १ कोटी ३७ लक्ष २९ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने (नवी दिल्ली) १८ मे २०२६ रोजी या कामाला अधिकृत मंजुरी दिली असून, यामुळे परिसरातील ग्रामस्थांची अनेक वर्षांची मोठी अडचण दूर होणार आहे.  गेवराई तालुक्यातील एमडीआर-२० ते यमगरवाडी...

अभिष्टचिंतन लेख >>>>>>प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे

इमेज
  डॉ. बळीराम पांडे :  प्रबोधनाचा  प्रेरणास्त्रोत     मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण देशभर आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या देवगिरी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागात कार्यरत असलेले आमचे जिवलग सन्मित्र, संघर्ष योद्धा, विचारवंत, साहित्यिक तथा प्रबोधनाचा प्रेरणास्त्रोत प्रा. डॉ. बळीराम पांडे यांचा २० मे हा जन्मदिन. या निमित्ताने त्यांच्या संघर्षमय, प्रेरणादायी आणि समाजाभिमुख जीवनप्रवासाकडे पाहताना मन अभिमानाने भरून येते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले. संकटे, अभाव, संघर्ष आणि जीवनातील असंख्य वादळांना सामोरे जात त्यांनी स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडविले. सामान्य परिस्थितीतून असामान्य उंची गाठणाऱ्या व्यक्तिमत्त्वांमध्ये डॉ. बळीराम पांडे यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. आज ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, जीवाला जीव देणारे मित्र, एकनिष्ठ कार्यकर्ते, अभ्यासू विचारवंत आणि कुशल संघटक म्हणून सर्वपरिचित आहेत. मराठवाड्यातील शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय चळवळींमध्ये त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. परिवर्तनवादी विचारांचा ध्यास घेत त्यांनी ...

अभिष्टचिंतन लेख >>>>>> बालाजी ढगे

इमेज
  सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा  फोडणारे व्यक्तिमत्व - पत्रकार  संतोषभाऊ जुजगर    लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेमध्ये सत्य, सामाजिक बांधिलकी आणि जनहित जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे मा. श्री. संतोषभाऊ जुजगर. पत्रकारिता ही फक्त बातम्या देण्यापुरती मर्यादित नसून समाजातील वास्तव परिस्थिती लोकांसमोर मांडण्याचे मोठे माध्यम आहे. ही जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे आणि धाडसाने पार पाडण्याचे कार्य संतोषभाऊ जुजगर यांनी सातत्याने केले आहे. आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवले. गावपातळीवरील अनेक समस्या, नागरिकांच्या अडचणी, शेतकरी, युवक आणि वंचित घटकांचे प्रश्न यांना त्यांनी आपल्या बातम्यांमधून प्रभावीपणे वाचा फोडली. त्यांच्या निर्भीड पत्रकारितेमुळे अनेक प्रश्नांना न्याय मिळण्यास मदत झाली आहे. संतोषभाऊ जुजगर यांची पत्रकारिता ही कोणत्याही दबावाखाली न येता सत्य मांडणारी आहे. स्पष्ट भूमिका, अभ्यासू वृत्ती आणि समाजाविषयीची तळमळ यामुळे त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक वेळा त्...

कृषीमंत्री दत्ता भरणे यांच्या दालनात होणार बैठक...

इमेज
  खरीप २०२५ मधील प्रलंबित पीक विम्यासाठी धनंजय मुंडेंच्या मागणीनुसार २६ मे रोजी मुंबईत बैठक प्रचंड अतिवृष्टी होऊनही शेतकरी पिकविम्यापासून वंचित, धनंजय मुंडेंनी तोडगा काढण्यासाठी राज्य स्तरावर बैठकीची केली होती मागणी मुंबई (प्रतिनिधी) - मागील वर्षी सन २०२५ मध्ये खरीप हंगामात प्रचंड अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते मात्र बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप पीकविमा मिळालेला नाही, याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार येत्या २६ तारखेला (मंगळवार) कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या अध्यक्षतेखाली व आ. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत मुंबईत बीड जिल्ह्यातील प्रलंबित पीक विम्याच्या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीस कृषी विभाग, जिल्हा प्रशासन तसेच संबंधित विमा कंपनीचे राज्यस्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.  मागील वर्षी बीड जिल्ह्यात विशेषकरून खरीप हंगामाच्या शेवटी पिके काढणीच्या तोंडावर सातत्याने प्रचंड अतिवृष्टी, ढगफुटी व जिल्हाभर पूरपरिस्थिती निर्माण होऊन शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले होते, मात्...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दिले निवेदन

इमेज
मे, २०२६ मध्ये पशुवैद्यकीय पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पशु वैद्यकीय अधिकारी (गट - अ) परीक्षेस पात्र करा - धनंजय मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सचिवांना तपासून योग्य कार्यवाहीचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) - मे, २०२६ मध्ये पशु वैद्यकीय पदवी प्राप्त करून इंटर्नशिप करत आलेल्या विद्यार्थ्यांना राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने एप्रिल, २०२५ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या पशु वैद्यकीय अधिकारी (गट - अ) या परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात यावे, अशी विनंती माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत सोमवारी सायंकाळी धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.  २५ एप्रिल, २०२५ रोजी लोकसेवा आयोगाने पशु वैद्यकीय अधिकारी, महाराष्ट्र पशु संवर्धन सेवा, गट अ या पदासाठी २७९७ जागांची जाहिरात प्रसिद्ध केली होती, या जागांची परीक्षा येत्या ११ जून रोजी संपन्न होणार आहे.  सदर जाहिरातीत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात internship करत असलेल्या विद्यार्थ्यांची अर्हता पूर्ण नसल्याने त्यांना...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या