नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन
नागरिकांच्या दीर्घ प्रतीक्षेला पूर्णविराम : अंबेवेस येथे नव्या पुलाच्या बांधकामास ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते प्रारंभ परळी वैजनाथ (प्रतिनिधी): जुन्या गावभातील महत्त्वाचा वाहतूक दुवा असलेला पुल आता पुनर्निर्माण होणार आहे. अंबेवेस परिसरातील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर मूर्त स्वरूप प्राप्त झाले असून, नव्या पुलाच्या बांधकामाचा शुभारंभ आज या भागातील जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते करण्यात आला. जनतेचे प्रतिनिधी म्हणून ज्येष्ठ नेते नारायणदेव गोपनपाळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ झाला.जुन्या व अरुंद नळकांडी पुलामुळे नागरिकांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात परिस्थिती अधिकच गंभीर होत असल्याने शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला व शेतकरी यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. नवीन, प्रशस्त व सुरक्षित पुलासाठी नागरिकांकडून सातत्याने मागणी होत होती. या मागणीची दखल घेत राज्याचे माजी मंत्री आ. धनंजय मुंडे तसेच राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या...