पोस्ट्स

इमेज
  परळी वैजनाथमध्ये जनक्षोभ; अल्पवयीन मुलींवरील अत्याचारा विरोधात परळीत ‘रास्ता रोको’ परळी वैजनाथ (प्रतिनिधी) राज्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचार आणि हत्येच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ सोमवार दि. ४ मे रोजी परळी वैजनाथ येथील छत्रपती संभाजी महाराज चौक (ईटके कॉर्नर) येथे नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. पुण्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अमानवीय अत्याचार आणि हत्येच्या घटनेचे पडसाद आज परळीत उमटले असून, दोषींना तात्काळ फाशी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना महसूल प्रशासना मार्फत निवेदन देण्यात आले. सकाळी ८ वाजेच्या सुमारास शहरातील मुख्य चौकात मोठ्या प्रमाणात नागरिक, महिला आणि तरुण एकत्र आले. आंदोलकांनी रस्त्यावर ठाण मांडल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.           अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कोणत्याही परिस्थितीत दया न दाखवता भरचौकात फाशी द्यावी., प्रलंबित असलेला...

परळीत उत्साहात कामगार मेळावा

इमेज
  असंघटित कामगारांना किमान ३० हजार रुपये वेतन मिळाले पाहिजे; कॉम्रेड किरण मोघे यांचे प्रतिपादन परळीत उत्साहात कामगार मेळावा परळी वैजनाथ (प्रतिनिधी):       असंघटित क्षेत्रातील कामगारांना किमान वेतन म्हणून दरमहा ३० हजार रुपये मिळालेच पाहिजेत, ही 'सीटू'ची आग्रही भूमिका आहे, असे प्रतिपादन सीटू महाराष्ट्र राज्य सचिव कॉ. किरण मोघे यांनी केले. बीड जिल्हा सीटूच्या वतीने जागतिक कामगार दिनानिमित्त परळी येथील विठ्ठल मंदिर परिसरात आयोजित कामगार मेळाव्यात त्या बोलत होत्या..          मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रा. बी. जी. खाडे होते. यावेळी व्यासपीठावर आशा संघटनेच्या नेत्या कॉ. किरण सावजी, जालिंदर गिरी, सुनिता ताटे, शालेय पोषण आहार संघटनेचे नेते कॉ. प्रभाकर नागरगोजे आणि सुवर्णा रेवले यांची प्रमुख उपस्थिती होती. मार्गदर्शन करताना कॉ. किरण मोघे म्हणाल्या की, १८८९ साली शिकागो येथील कामगारांच्या आंदोलनावर गोळीबार झाला होता. त्या बलिदानातून आणि कामगारांच्या प्रखर लढ्यातूनच '८ तास काम' असा जागतिक नियम ठरवण्यात आला. या लढ्याची आठवण म्हणून १ मे हा दिवस 'कामगार द...

अलोट गर्दीत प्रभावी जनता दरबार

इमेज
  ना. पंकजा मुंडे यांचा परळीत प्रभावी ‘जनता दरबार' परळी, बीडसह जिल्ह्यातील  नागरिकांच्या समस्यांचा जागेवर निपटारा परळी वैजनाथ  दि.०२ ---  परळीसह बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करता यावे, त्यांचे जीवन कष्टमुक्त व्हावे या उदात्त हेतूने ना. पंकजाताई मुंडे या त्यांच्या प्रत्येक दौऱ्यात ‘जनता दरबाराचे' आयोजन करतात. नेहमी प्रमाणे आजही त्यांचा भव्य जनता दरबार संपन्न झाला. यावेळी जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देऊन नागरिकांचे प्रश्न सोडविले. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शासकीय विश्रामगृहात ना. पंकजाताई मुंडे यांचा जनता दरबार पार पडला. यात बीड जिल्ह्यातील आणि परळी तालुक्यातील असंख्य नागरिकांनी त्यांच्या समस्या व गाऱ्हाणी मांडल्या. ना. पंकजाताई मुंडे यांनी तत्परतेने प्रत्येक विषयात लक्ष देऊन संबंधित शासकीय, निमशासकीय विभागांना बोलून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश दिले. अलोट गर्दीत प्रभावी जनता दरबार ---- ना. पंकजाताई मुंडे ...

बँकेच्या प्रगतीचे कौतुक

इमेज
वैद्यनाथ बँकेच्या प्रगतीचा ना. पंकजा मुंडे यांच्याकडून आढावा बँकेच्या आर्थिक कामगिरीचे केले कौतुक ; एनपीए शुन्य टक्के तर एकूण नफा ८ कोटी परळी वैजनाथ दि. ०२ -- लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या प्रेरणेने मराठवाड्‌यातील अग्रगण्य बँक असेलेल्या दि. वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. च्या कामकाजाचा व आर्थिक प्रगतीचा राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री तथा बँकेच्या  ना. पंकजाताई मुंडे यांनी आज बँकेची मार्गदर्शक या नात्याने आढावा घेतला.    बँकेचे चेअरमन विनोद सामत, व्हा चेअरमन रमेश कराड व संचालक मंडळ व अधिका-यांनी यहबँकेच्या आर्थिक स्थितीबाबत सविस्तर माहिती सादर केली. ३१ मार्च २०२६ रोजी अखेर बँकेच्या ठेवी ६९६ कोटी असून एकूण कर्ज ४६५ कोटी, गुंतवणूक ३९६ कोटी, सी.आर.ए.आर. १८.१७ टक्के, निव्वळ एन.पी.ए. शून्य टक्के, एकूण नफा ८.०१ कोटी व निव्वळ नफा ४.०४ कोटी इतका आहे. बँकेच्या प्रगतीचे कौतुक ------- ना. पंकजाताई मुंडे यांनी बँकेच्या आर्थिक कामगिरीचे कौतुक करत, बँकेने वित्तीय शिस्त राखत प्रगती साधल्याचे नमूद केले. तसेच बँकेचे निव्वळ एन.पी.ए. शून्य टक्के केल्याने संचालक मंडळ...

विज्ञान शाखेतून स्नेहल लक्ष्मण अनंतपुरे तर कला शाखेतून शेख मसिरा मोईझ प्रथम

इमेज
  लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाची बोर्ड परिक्षेत यशाची परंपरा कायम, विज्ञान शाखेचा १०० टक्के, तर कला शाखेचा ७६.८ टक्के  विज्ञान शाखेतून स्नेहल लक्ष्मण अनंतपुरे तर कला शाखेतून शेख मसिरा मोईझ प्रथम  परळी वैजनाथ दि.०२ (प्रतिनिधी)         लक्ष्मीबाई देशमुख महिला कनिष्ठ महाविद्यालयाने १२ वी बोर्ड परिक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली असून महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतून स्नेहल अनंतपुरे तर कला शाखेतून शेख मसिरा मोईझ प्रथम आली आहे. याबदल प्राचार्या व संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.              शहरातील लक्ष्मीबाई देशमुख कनिष्ठ महिला महाविद्यालयाने बारावी बोर्ड परिक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली असून काँलेजचा निकाल ९२.८१ टक्के लागला आहे. महाविद्यालयातून विज्ञान शाखेची विद्यार्थिनी विज्ञान शाखेतून प्रथम स्नेहल लक्ष्मण अनंतपुरे (७९.६७), द्वितीय- शेख अनम सिराज (७४.५०), तृतीय- सय्यद झवेरिया अफसर (७३.८३) तर कला शाखेची विद्यार्थिनी शेख मसिरा मोईझ (७८.८३) प्रथम, द्वितीय शेख इशरत बेगम सलीम  (७२.५०), त...

परळी औष्णिक विद्युत केंद्रात महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन उत्साहात...

इमेज
महाराष्ट्राच्या प्रगतीला महानिर्मितीची ऊर्जा : परळी केंद्रातील संच क्र. ६ चा ऐतिहासिक उच्चांक - मुख्य अभियंता सुनील इंगळे परळी औष्णिक विद्युत केंद्रात महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन उत्साहात परळी | प्रतिनिधी “महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात महानिर्मितीचा मोलाचा वाटा असून राज्याच्या औद्योगिक, कृषी आणि सामाजिक प्रगतीसाठी अखंडित वीजपुरवठा अत्यंत महत्त्वाचा आहे. परळी औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व संच सध्या पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. विशेष म्हणजे संच क्रमांक ६ ने सलग १४० दिवस पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करून ऐतिहासिक उच्चांक प्रस्थापित केला असून महाराष्ट्राच्या प्रगतीला महानिर्मितीची ऊर्जा प्रदान केली आहे,” असे प्रतिपादन परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता सुनील इंगळे यांनी केले.ते ६६ व्या महाराष्ट्र दिन तसेच जागतिक कामगार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. परळी औष्णिक विद्युत केंद्रात गुरुवार दि. १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्य अभियंता सुनील इंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ...
इमेज
सार्वजनिक बांधकाम विभागातील भरती: खेळाडूंना 'मॅट'चा मोठा दिलासा, दोन महिन्यांत नियुक्ती देण्याचे आदेश छत्रपती संभाजीनगर: सार्वजनिक बांधकाम विभागातील (PWD) 'स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक' (गट-क) पदाच्या भरती प्रक्रियेत ५ टक्के क्रीडा आरक्षणांतर्गत डावलण्यात आलेल्या दोन उमेदवारांना महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) औरंगाबाद खंडपीठाने मोठा दिलासा दिला आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे या उमेदवारांना नोकरीपासून वंचित ठेवता येणार नाही, असा निर्वाळा देत मॅटने या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार रिक्त पदांवर दोन महिन्यांच्या आत नियुक्ती देण्याचे महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. 'मॅट'चे उपाध्यक्ष न्यायमूर्ती व्ही. के. जाधव आणि सदस्य (प्रशासकीय) विनय कारगावकर यांनी हा निकाल दिला. नेमके प्रकरण काय? सार्वजनिक बांधकाम विभागाने १० ऑक्टोबर २०२३ रोजी २१०९ पदांसाठी भरतीची जाहिरात (क्र. ०१/२०२३) प्रसिद्ध केली होती. यामध्ये जळगाव येथील कल्पेश भगवान वंजारी याने 'भज-ड' (NT-D) क्रीडा प्रवर्गातून, तर छत्रपती संभाजीनगरच्या राधिका दिलीप पाटील हिने 'खुला' (Open) क्रीड...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....