पोस्ट्स

इमेज
१६ वर्षीय मुलीवर दोघांकडून पाशवी अत्याचार; आरोपीं विरुद्ध 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        परळी तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. तालुक्यातील धारावती तांडा परिसरात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी पाशवी अत्याचार केल्याची घटना घडली असून, या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. *बहाण्याने बोलावून केला अत्याचार*         मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी पीडित मुलीला एका बहाण्याने घरात बोलावून घेतले. मुलगी घरात येताच नराधमांनी दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर तिचे हात-पाय बांधून आणि तोंडात बोळा कोंबून दोघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. इतकेच नव्हे तर, ही घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही त्यांनी पीडितेला दिली. *गुन्हा दाखल, पोलिसांकडून तपास सुरू        घटनेनंतर पीडितेने धीर एकवटून आपल्या पालकांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. पालकांनी तत्काळ परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून दोन्ही आरोप...
इमेज
  परळी लोकन्यायालयात प्रकरणे 86 प्रकरणे तडजोडीने निकाली परळी वैजनाथ  परळी तालुका विधी सेवा समिती व परळी वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी व फौजदारी तथा विविध बँका पतसंस्था महावितरण  इत्यादी संस्था यांचे प्रकरणे  सामंजस्याने व तडजोडीने निकाली काढण्यात आली.  दिनांक 14 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या या लोक अदालतीत दाखल पूर्व 24 व प्रलंबित प्रकरणे 62 मिळून 86 प्रकरणे निकाली निघाली आणि एकूण रक्कम वसुली 68 लाख 85 हजार 284  रुपयांची बँक पतसंस्था यांची वसुली झाली आहे .सदर लोकन्यायालयात पंच म्हणून परळी न्यायालयाचे न्या डि आर बोर्डे न्या डि वाय रायरीकर ॲड व्हि डी धुमाळ ॲड व्हि एम जगतकर यांनी काम पाहिले.सदर लोक न्यायालय यशस्वी करण्यासाठी न्या परळी वकील संघाचे अध्यक्ष ॲड डि बी कडबाने ॲड आर.व्हि.गित्ते अँड प्रदिप गिराम ॲड आर व्हि देशमुख ॲड मिर्झा मंजुर अली ॲड.माधवराव मुंडे ॲड वैजनाथ नागरगोजे ॲड दिलीप स्वामी ॲड प्रभाकर सातभाई ॲड वसंतराव फड उपाध्यक्ष ॲड धनाजी कांबळे सचिव ॲड विलास बडे ॲड डि.एल.उजगरे.ॲड नागापूरकर ॲड जीवनराव देशमुख  ॲड गजानन पारेकर ॲड ल...

परळीकरांचा बहुमान वाढवला...... मैथिली चे सर्व स्तरातून अभिनंदन

इमेज
  परळीच्या लेकीचा कलाविष्कार पाहून पुणेकर रसिक भारावले : मैथिली लोंढे यांना पुण्यात 'ललना कलारत्न पुरस्कार' प्रदान परळी वैजनाथ/ प्रतिनिधी..... जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुण्याच्या निवेदिता प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिमाखदार सोहळ्यात परळीची युवा कलाकार मैथिली बाळकृष्ण लोंढे हिला मानाचा 'ललना कलारत्न पुरस्कार २०२६' देऊन गौरविण्यात आले. पुण्यातील प्रसिद्ध बालगंधर्व रंगमंदिर येथे महिला कलाकारांसाठी आयोजित या विशेष कार्यक्रमात मैथिलीच्या कलागुणांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते मैथिलीने स्टेजवर सादर केलेले थेट चित्रकला प्रात्यक्षिक अत्यंत कमी वेळात तिने हिंदी चित्रपटसृष्टीतील सौंदर्याची खाण 'मधुबाला' यांचे हुबेहूब चित्र कॅनव्हासवर साकारले. परळीच्या या लेकीचा कलाविष्कार पाहून उपस्थित पुणेकर रसिक आणि मान्यवर भारावून गेले. टाळ्यांच्या कडकडाटात तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराला उत्तर देताना मैथिली म्हणाली की, "निवेदिता प्रतिष्ठानसारख्या संस्थेकडून कलेची पोचपावती मिळणे ही माझ्यासाठी...

ऊसाच्या फडात वृद्धाचा मृतदेह जळालेला अवस्थेत मिळाल्याने ममदापुर परिसरात खळबळ

इमेज
  ऊसाच्या फडात वृद्धाचा मृतदेह  जळालेला अवस्थेत मिळाल्याने ममदापुर परिसरात खळबळ  अंबाजोगाई (एमबी न्यूज वृत्त सेवा) :- अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर शिवारात आज पहाटे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेतातील ऊसाला लागलेल्या आगीत ६० वर्षीय वृद्धाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. विश्वनाथ पांचाळ (वय ६०) असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांनी आजाराला कंटाळून स्वतःला जाळून घेत आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. ममदापूर येथील शेतकरी दिलीप मोतीराम देशमुख यांच्या गावालगत असलेल्या दोन एकर ऊसाला अचानक आग लागली. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांच्या सालगड्याने ही माहिती दिली. जेव्हा आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले, तेव्हा ऊसाच्या सरीमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह पूर्णतः जळालेल्या अवस्थेत दिसून आला. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.             मृत विश्वनाथ पांचाळ हे उच्चशिक्ष...

आरोपींना चार दिवसात अटक न झाल्यास माजलगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा

इमेज
  जीव वाचवण्यासाठी कुऱ्हाड वापरा, अन्याय सहन करू नका” – प्रा. लक्ष्मण हाके  आरोपींना चार दिवसात अटक न झाल्यास माजलगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा  माजलगाव (प्रतिनिधी) – राज्यभरात मेंढपाळांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या घटनांमुळे संताप व्यक्त करत ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी धनगर समाज बांधवांना अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले. “महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार मेंढपाळांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत. माझे समाज बांधवांना आवाहन आहे की, आपल्या हातात ढाळा पाडण्यासाठी असलेली कुऱ्हाड गरज पडल्यास स्वतःचा जीव वाचवण्यासाठी वापरा. मी चिथावणी देत नाही, तर जबाबदारीने बोलत आहे,” असे ठाम वक्तव्य त्यांनी माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन समोरील धरणे आंदोलनात केले. माजलगाव तालुक्यात घळाटवाडी येथे काल मेंढपाळ बांधवांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाके यांनी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी पोलिस...
इमेज
  हवामान बदलावर नियंत्रणासाठी राज्याचा व्यापक आराखडा- पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे मुंबई, दि.१२: हवामान बदल हा केवळ पर्यावरणाचा मर्यादित विषय नसून तो जगाच्या भवितव्याशी निगडित अत्यंत गंभीर आणि व्यापक व संवेदनशील प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर  हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचा व्यापक आराखडा तयार असल्याची माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.     नियम ९२ अन्वये विधान परिषद  सदस्य सुनील शिंदे यांनी याविषयी अर्धा तास चर्चा उपस्थित केली.पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, २०२१ मध्ये राज्याने हवामान कृती आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यासाठी विशेष समिती स्थापन केली असून ३५० हून अधिक तज्ज्ञ आणि अधिकारी या प्रक्रियेत सहभागी आहेत. केंद्र शासनानेही या आराखड्याला मान्यता दिली आहे. २०१५ ते २०२५  या कालावधीत आणि विशेषतः २०२५ हे वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले. गेल्या ५० वर्षांत उष्ण आणि अतिउष्ण दिवसांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे अधोरेखित करत पर्यावरण व वातावरणीय ...

सत्ताधाऱ्यांच्या जाचातून गावाला मुक्त करणार -माधव मुंडे

इमेज
  गावच्या विकासाला खीळ : मनमानी कारभाराला कंटाळून हाळमच्या उपसरपंचाचा राजीनामा सत्ताधाऱ्यांच्या जाचातून गावाला मुक्त करणार  -माधव मुंडे  परळी वैजनाथ (प्रतिनिधी):              लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येताना गावकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण होत नसल्याने आणि ग्रामपंचायतीच्या कारभारात होत असलेल्या अनियमिततेवर संताप व्यक्त करत, परळी तालुक्यातील हाळमच्या उपसरपंचाने थेट आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देवनाथ सुखदेव दहिफळे असे या उपसरपंचाचे नाव असून, त्यांनी आपला राजीनामा गट विकास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला आहे.           परळी तालुक्यातील हाळमचे उपसरपंच देवनाथ सुखदेव दहिफळे यांनी आपल्या राजीनामा पत्रात ग्रामपंचायत प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून गावात ग्रामसभाच झाली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच ग्रामपंचायत कार्यालय नसणे, मासिक बैठकांचा अभाव, पथदिव्यांची दुरवस्था आणि स्वच्छतेचा प्रश्न यांमुळे ग्रामस्थ त्रस्त असल्याचे त्यांनी नमूद केले. केवळ मूलभूत सुविधाच नव्हे, तर महसुली कामांतही...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!