पोस्ट्स

इमेज
  परळी संचारच्या वतीने महिला दिनी होणार परळीतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव-अनंत कुलकर्णी परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः- जागतिक महिला दिनानिमित्त परळी शहरात विविध क्षेत्रात कार्य करणार्‍या कर्तृत्ववान महिलांचा सा.परळी संचारच्या वतीने गौरव करण्यात येणार आहे. परळी संचारचे संपादक अनंत शामराव कुलकर्णी यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे. परळीच्या सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, वैद्यकिय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या अकरा कर्तृत्ववान महिलांचा सा.परळी संचारच्या वतीने महिला दिनी येत्या रविवारी ८ मार्चला गौरव करण्यात येणार आहे. त्यात नगराध्यक्षा सौ.पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, डॉ.शालीनी बालासाहेब कराड, सौ.शर्मिला अशोक जैन, सौ.वर्षाराणी लक्ष्मणराव हाके, नगरसेविका सौ.अर्चना महेंद्र रोडे, सौ.सुमन लक्ष्मण वाकडे, श्रीमती दुर्गा  वैजनाथ दहातोंडे सौ.गौरी सुनील जोशी, कु.राधिका रामप्रसाद शर्मा, स्नेहा एकनाथ बनसोडे, जनाई महाराज कोकाटे आदी महिलांचा यानिमित्ताने गौरव करण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शहरातील नाथ चित्...

लाळखुरकूत रोग प्रति बंधात्मक लसीकरण..

इमेज
  जिल्ह्यात पशुधनासाठी लाळखुरकूत उपलब्ध प्रतिबंधात्मक  लसीचा लाभ घ्यावा - अनिल बोर्डे गेवराई (प्रतिनिधी) जिल्ह्यातील पशुधनास दर सहा महिन्यांनी लाळखुरकूत रोग प्रति बंधात्मक लसीकरण करण्यासाठी लस उपलब्ध झालेली आहे. जिल्ह्यात  लाळ खुरकूत प्रतिबंधात्मक लसीकरण फेरी क्रमांक ८ ही जिल्ह्यात दिनांक १३/२/२०२६ते २९/३/2०२६ राबविण्यात प्रारंभ झालेला आहे.    केंद्र पुरस्कृत पशु स्वास्थ रोग नियंत्रण समूह गट योजनेमधील राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण  कार्यक्रमांतर्गत लाळखुरकूत प्रतिबंधात्मक लस मोहीम दिनांक १३/२/२०२६ ते२९/३/२०२६ नुसार मोहीम फेरी क्रमांक ८ सुरू झालेली आहे.      बीड जिल्ह्यासाठी एकूण (५०५३००) एवढ्या  प्रतिबंधात्मक लसी प्राप्त झालेल्या आहेत. लसीचा तालुकास्तरावर पुरवठा करण्यात आलेला आहे असे समजते .तरी पशुधन चालकाने  किंवा शेतकरी ग्राहकाने लस घेण्यासाठी जवळच्या पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे तात्काळ संपर्क करणे आवश्यक आहे.  त्यासाठी जनावराच्या कानात बिल्ला असल्याची व संबंधित पशुचालकाच्या भ्रमणध्वनी द्वारे पडताळणी करण्यात येणार आहे.  ...

अभिष्टचिंतन.....

इमेज
  ईटके गुरूजी म्हणजे आदर्श व्यक्तिमत्व-विलास ताटे परळी वै....... - ईटके गुरूजी म्हणजे आदर्श व्यक्तिमत्व असल्याचे प्रतिपादन ओबीसी परिषदेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते विलास ताटे यांनी केले आहे. दि.3 मार्च 2026 रोजी 80 वा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला. गुरूजी वैद्यनाथ विद्यालयात शिक्षक असतांना पूर्णतः चांगला विद्याथ घडवण्यामध्ये त्यांचा हातखंडा असायचा फक्त विद्यार्थ्यांना शिकवणे हा उद्देश न ठेवता त्याच्या सुख-दुःखाची जाणीव ठेवून त्या विद्यार्थ्याला सर्वतोपरी सहकार्य करण्यामध्ये त्यांचा रस असायचा. राजकारणात राहूनही कसल्याही प्रकारच्या आमिषाला न बळी पडता कोणत्याही वाईट सवयीला जवळ न येवू देता दुसऱ्यांचे चांगले व्हावे यासाठीच अहोरात्र प्रयत्न करित असत. एखाद्या व्यक्तिने दुसऱ्या व्यक्तिबद्दल तो व्यक्ति वाईट आहे असे सांगितल्यास ते कधीही त्या व्यक्तिस नाव ठेवण्याचे काम करित नसत आजही व्यायामाला प्रथम प्राधान्य देवून भारतीय संस्कृतीचे जतन करण्याच्या दृष्टिने सर्वांना विनाशुल्क कसल्याही प्रकारच्या आमिषाची अपेक्षा न करता ते मार्गदर्शन करतात. म्हणुनच त्यांना सर्व राजकीय पक्षातील, सर...

पुढील अधिवेशनापर्यंत मोठ्या प्रमाणात भरती होईल....

इमेज
पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदांवर लवकरच पदभरती – मंत्री पंकजा मुंडे मुंबई, दि.४ : पशुसंवर्धन विभागातील नवीन आकृतीबंध ऑक्टोबर 2024 मध्ये मंजूर झाल्यामुळे काही संवर्गांतील पदसंख्या वाढली आहे. पदभरतीची प्रक्रिया गतीने सुरू असून पुढील अधिवेशनापर्यंत मोठ्या प्रमाणात भरतीचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानपरिषदेत व्यक्त केला. विधानपरिषद सदस्य संजय खोडके यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, वाढीव पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) सोबत सातत्याने पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यानुसार 25 एप्रिल 2025 रोजी एलडीओ (पशुवैद्यकीय विकास अधिकारी) पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. तसेच 12 ऑगस्ट रोजी वर्ग-एक दर्जाच्या सहा सहाय्यक आयुक्तपदांची जाहिरातही काढण्यात आली आहे. परीक्षेसाठी पेपर सेटिंग प्रक्रियेसाठी तज्ज्ञ अधिकारी व प्राध्यापकांची नियुक्ती आवश्यक असून पेपर सेटिंगचे काम पूर्ण होताच परीक्षा घेण्यात येईल, असेही मंत्री मुंडे यांनी सांगितले. त्याचबरोबर, एमपीएससीकडूनही भरती प्रक्रियेला गती देण्याचे आश्वासन देण्यात आले...

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन

इमेज
बीड जिल्ह्यात इंधन तुटवडा नसल्याचे प्रशासनाचे स्पष्टीकरण अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन बीड, दि. ४ मार्च २०२६  आखाती देशातील काही भागात निर्माण झालेल्या युद्धाच्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात इंधन तुटवडा निर्माण झाल्याची अफवा काही ठिकाणी पसरत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन करत स्पष्ट केले आहे की, जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून इंधन पुरवठा सुरळीत सुरू आहे. अफवांमुळे काही पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी अतिरिक्त इंधन साठवण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. मात्र, जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा इंधन तुटवडा नसून सर्व पेट्रोल पंपांवर नियमितपणे इंधन पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सर्व पेट्रोल पंप कंपनीचे विक्री अधिकारी व प्रतिनिधींना इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. चुकीची माहिती पसरविणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.नागरि...

पैठण येथे १० मार्च रोजी गौरव सोहळा

इमेज
ह.भ.प. पूज्य श्री अमृताश्रम स्वामी महाराज यांना 'वारकरी भूषण' पुरस्कार जाहीर पैठण येथे १० मार्च रोजी गौरव सोहळा; शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराज मिशनचा उपक्रम बीड: प्रतिनिधी        शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराज मिशन आणि नाथवंशज श्री. योगिराज महाराज पैठणकर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी देण्यात येणारा मानाचा 'वारकरी भूषण पुरस्कार' यावर्षी ह.भ.प. आचार्य पूज्यश्री अमृताश्रम स्वामी महाराज (जोशी बाबा, बीड) यांना जाहीर करण्यात आला आहे. मंगळवार, १० मार्च २०२६ रोजी दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठण नगरीत हा गौरव सोहळा संपन्न होणार आहे.      दंडवत स्वामींच्या परंपरेतील वारसा असलेले अमृताश्रम स्वामी महाराज यांचा जन्म बीड जिल्ह्यातील नवगणराजुरी येथील एका सात्विक कुटुंबात झाला. ते शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराजांचे परमशिष्य परमहंस 'दंडवत स्वामी' यांच्या परंपरेतील वारसदार आहेत. वारकरी संप्रदायातील त्यांचे प्रदीर्घ कार्य आणि आध्यात्मिक योगदानाची दखल घेऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येत आहे.      दिग्गजांच्या उपस्थितीत सोहळा हा ...
इमेज
  राष्ट्रसंत संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त परळीत विचारांचा जागर परिवर्तनासाठी संत, सुधारक आणि समाजक्रांतीकारक या तिन्ही भूमिका गाडगेबाबांनी आपल्या आयुष्यातून साकारल्या- ज्येष्ठ विचारवंत श्रीपाल सबनीस झोपडपट्टीतून उभा राहिलेला प्रवास म्हणजेच विचारांची ताकद –विशाल लोंढे संविधानातील मूल्ये रुजविणे हेच संतांचे कार्य” – ज्ञानेश्वर महाराज वाबळे परळी वैजनाथ (प्रतिनिधी):– समाजप्रबोधन, स्वच्छता आणि समतेचा अखंड संदेश देणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त परळी येथे भव्य सुवर्ण शतकोत्तर महोत्सवी वर्ष सोहळा दि.23 फेब्रुवारी 2026 रोजी उत्साहात संपन्न झाला. संत गाडगेबाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था परळी आयोजित या कार्यक्रमाला समाजातील विविध स्तरांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक व ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी भूषविले. उद्घाटक म्हणून समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कीर्तनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!