जेजुरीत दिंडीतील ट्रकच्या धडकेत तीन वारकरी महिलांचा मृत्यू; चार गंभीर जखमी श्रद्धा, भक्ती आणि नामस्मरणाच्या वातावरणात सुरू असलेल्या पंढरपूर वारीला सोमवारी सकाळी भीषण अपघाताचे ग्रहण लागले. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड–जेजुरी मार्गावरील दिवे घाट परिसरातून मार्गस्थ होत असताना ट्रकने मागून वारकऱ्यांना धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून 16 वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. नांदेडचा ट्रक, सांगलीच्या वारकरी बेलसर टोल नाक्यापासून जेजुरीच्या दिशेने साधारण ५०० मीटर अंतरावर हॉटेल शिपदीप लॉजिंगच्या समोर हा अपघात झाला. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता. स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य हाती घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत . धडक इतकी भीषण होती की, तिन्ही महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त केली जात असून परिसरात शोककळा पसरली आहे. अपघातात ३ ते ४ वारकरी गंभीर जखमी असून इतर वारकऱ्यांना किरकोळ दु...