पोस्ट्स

इमेज
  परळी वैजनाथ शहरात १४ जुलै रोजी भव्य रिंगण सोहळ्याचे आयोजन सर्व वारकरी-भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे : नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांचे आवाहन परळी वैजनाथ : प्रतिनिधी...        आषाढी वारीनिमित्त परळी वैजनाथ शहरात मंगळवार, दि. १४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ३.३० वाजता भव्य रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पालखीतील सर्व वारकरी तसेच वारकरी महिला भजनी मंडळांच्या सहभागातून हा सोहळा उत्साहात पार पडणार आहे.सर्व वारकरी-भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे  असे आवाहन नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी केले आहे.      अखिल भारतीय वारकरी मंडळ व परळी नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक कार्यक्रमात शहर व तालुक्यातील सर्व महिला भजनी मंडळे सहभागी होणार आहेत. वारकरी संप्रदायाची परंपरा, हरिनामाचा गजर आणि भक्तिमय वातावरण यामुळे परळी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे. रिंगण सोहळा कॉटन मार्केट यार्ड (जत्रा मैदान),  वेअरहाऊस शेजारी, प...
इमेज
  बंजारा समाज एकता यात्रा रविवारी परळीत संत सेवालाल महाराज चौकात होणार स्वागत-अमर पवार परळी(प्रतिनिधी)  धर्मगुरू बाबुसिंग महाराज पोहराड गड तसेच धर्माधिकारी आंध्र प्रदेशचे संत सेवालाल महाराज चॅरिटेबल  ट्रस्ट सेवागड श्री जी महाराज यांनी आयोजित केलेली बंजारा समाज एकता संकल्प यात्रा रविवार दि.१२ जुलै रोजी परळीत येत असुन संत सेवालाल महाराज चौकात या यात्रेचे भव्य स्वागत केले जाणार असुन या यात्रेच्या स्वागतास समाजबांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन बंजारा समाजाचे सेवागड विश्वस्त परळी वैजनाथ  अमर पवार यांनी केले आहे.  बंजारा समाज एकता यात्रा बंजारा धर्मगुरू बाबुसिंग महाराज पोवाडा गड तसेच धर्माधिकारी आंध्र प्रदेशचे संत सेवालाल चॅरिटेबल ट्रस्ट सेवागड श्री जी महाराज यांनी आयोजित केली असुन ही यात्रा ही ५ जुलै सेवागढ आंध्र प्रदेश येथून निघणार आहे १८ राज्यातुन बंजारा एकतेचा संदेश देत दि.२६  जुलै रोजी दिल्ली येथे पोंहोचणार आहे.यात्रेदरम्यान भगवंतसेवक किशन राठोड यात्रेनिमित्त देशातील बंजारा समाजांना पांढर्या ध्वजाखाली एकत्र आणण्याचा संकल्प करणार आहेत.यात्रेचे नियोजन प्रवीण ...
इमेज
महायुती सरकारचा मोठा निर्णय! आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सदस्यांची थेट नियुक्ती होणार, समीकरणे बदलणार महाराष्ट्र सरकारने महानगरपालिकांच्या उदाहरणाचे अनुकरण करून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद सदस्यसंख्येच्या दहा टक्के आणि पंचायत समिती सदस्यसंख्येच्या २० टक्के सदस्य हे नामनिर्देशित सदस्य असतील. ग्रामीण भागात सक्रिय सामाजिक कार्यकर्ते आणि सक्षम व्यक्तींना विकास प्रक्रियेत सहभागी करून घेणे हे उद्दिष्ट आहे. नामनिर्देशित सदस्यांच्या नावाने हे लोकांच्या राजकीय पुनर्वसनाचे साधन बनेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. १९९३ मध्ये पंचायत राज कायदा लागू होईपर्यंत नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्याची पद्धत अस्तित्वात होती, परंतु नंतर ती बंद करण्यात आली. आता राज्य सरकार ती पुन्हा सुरू करणार आहे. या निर्णयानंतर नागपूर जिल्हा परिषदेत सहा नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती केली जाईल. २० टक्के पंचायत समिती सदस्यांची नियुक्ती केली जाईल. याबाबतचा कायदा लवकरच विधानसभेत मंजूर केला जाईल. महसूल मंत्री चंद्रशेखर ...
इमेज
गांज्याच्या शेतीवर चकलांबा पोलिसांची धाड ;  ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त  गेवराई, प्रतिनिधी: चकलांबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे यांच्या टीमने अवैध धंद्यावरील कारवाया आणखी गतिमान केल्या असून शुक्रवारी (दि.१०) गांज्याची शेतीच पोलिसांनी उघडकीस आणली आहे.या कारवाईत तब्बल ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.    चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरळेगावच्या गट ११३ मधील उसाच्या शेतात गांज्याची लागवड करण्यात आली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या टीमला पाठवून खात्री केली असता उसाच्या शेतात गांज्याची लहान मोठी अशी २५३ झाडे लावल्याचे समोर आले.यात काही झाडांचे वजन १८४.४ किलो असून त्याची किंमत ४८ लाख १० हजार व ४ किलो ३०० ग्रॅम सुका गांजा ज्याची किंमत २ लाख ६ हजार ४०० रुपये तसेच ४५० ग्रॅम निमसुका गांजा ज्याची किंमत ११ हजार २५० रुपये असून एकूण ४८ लाख २७ हजार ६५० किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे...
इमेज
स्व.अजितदादा पवार जयंती तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ. धनंजय मुंडे व ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळी वैजनाथ नगर परिषदेच्या वतीने १५ ते २९ जुलैदरम्यान लोककल्याणकारी सेवा पंधरवडा-- नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी परळी वैजनाथ | प्रतिनिधी       नगर परिषद परळी वैजनाथच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री आ.धनंजय मुंडे आणि पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त १५ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत ‘लोककल्याणकारी सेवा पंधरवडा’ आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील नागरिकांसाठी विविध सामाजिक, आरोग्य, पर्यावरण व जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी दिली आहे.       या लोककल्याणकारी सेवा पंधरवड्याची सुरुवात १५ जुलै रोजी होणार आहे. यानिमित्ताने शासकीय- निमशासकीय कार्यालये याठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून याचा शुभारंभ वैद्...

पोलिसांच्या तत्परतेचे नागरिकांकडून अभिनंदन...

इमेज
चार तासांत अल्पवयीन मुलाचा शोध; परळी ग्रामीण पोलिसांची तत्पर कारवाई परळी वैजनाथ, प्रतिनिधी —     परळी तालुक्यातील नागापूर येथील १४ वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या चार तासांत त्याचा शोध घेण्यात परळी ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. या तत्पर कारवाईबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.       पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागापूर येथील उर्मिला सुभाष सौंदडे (वय ४४) यांनी आपल्या मुलाला अज्ञात व्यक्ती फूस लावून घेऊन गेल्याची तक्रार शुक्रवारी (दि. १०) परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल केली होती. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक एम. डी. शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून मुलाच्या हालचालींचा मागोवा घेतला. त्यानुसार एक पथक गंगाखेड परिसरात तर दुसरे पथक परळी शहरात शोधमोहीम राबवत होते.     तपासादरम्यान संबंधित मुलगा परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात आढळून आला. त्यानंतर त्याला सुरक्षित...

SIR ला दोन महिन्यांची मुदतवाढ द्या.... यासह अन्य महत्त्वपूर्ण मागण्या

इमेज
  पात्र मतदारांच्या संरक्षणासाठी फेडरेशन ऑफ महाराष्ट्र मुस्लिम्स ची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे धाव! परळी वैजनाथ, प्रतिनिधी १० जुलै : राज्यात सुरू असलेल्या विशेष सघन मतदार यादी पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेदरम्यान पात्र मतदारांचे हक्क अबाधित राहावेत, यासाठी फेडरेशन ऑफ महाराष्ट्र मुस्लिम्स (FMM)च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. शिष्टमंडळाने नोंदणी प्रक्रियेसाठी देण्यात आलेला कालावधी अपुरा असल्याचे नमूद करत किमान दोन महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी केली. मुसळधार पाऊस, शेतीची कामे, स्थलांतर आणि पुनर्विकासामुळे अनेक नागरिकांना नोंदणी प्रक्रियेत अडचणी येत असल्याचा मुद्दा यावेळी मांडण्यात आला. बूथ लेव्हल ऑफिसर्स (BLO) यांच्यावरील वाढता कामाचा ताण कमी करण्यासाठी त्यांना इतर शासकीय कामांतून तात्पुरती सूट द्यावी, आवश्यकतेनुसार सहाय्यक BLO नियुक्त करावेत आणि त्यांना अद्ययावत प्रशिक्षण द्यावे, अशी मागणीही करण्यात आली. तसेच BLO यांची संपर्क माहिती आणि कार्यक्षेत्राची माहिती नागरिकांना सहज उपलब्ध करून देण्याची सूचनाह...