पोस्ट्स

मोठी बातमी.....मोठी घडामोड

इमेज
स्व.विलास घुले खून प्रकरण: दहाव्या आरोपीला एसआयटीने केली अटक   केज :- प्रतिनिधी... बीड जिल्ह्यातील टाकळी ता. केज येथील स्व. विलास घुले खून प्रकरणात आणखी एका आरोपीला रविवारी लातूर येथून अटक करण्यात आली आहे. आता एकूण दहा आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. स्व. विलास घुले खून प्रकरणी रामेश्वर गायकवाड, बाबासाहेब कदम, मंगेश कदम, संतोष कदम, सूरज उर्फ भैय्यासाहेब कदम, शुभम गायकवाड, नवनाथ कदम, दीपक कदम, अजय कदम या नऊ जणां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणात एसआयटीच्या पथकाने राजकुमार मोरे (रा. सोनीजवळा ता. केज) यास लातूर येथून रविवारी दुपारी अटक केली आहे.  या खून प्रकरणात आता एकूण दहा आरोपींना अटक करण्यात आली असल्याने खळबळ उडाली आहे. टाकळी येथे कँडल मार्च काढला :-  स्व. विलास घुले यांच्या घरापासून रविवारी सायंकाळी ७ वाजता कँडल मार्चला सुरुवात झाली. ज्या ठिकाणी घुले यांची हत्या झाली, या घटनास्थळापर्यंत हा कँडल मार्च काढण्यात आला. कँडल मार्चमध्ये घुले कुटुंब, गावातील महिला व पुरुष हातात पेटत्या मेणबत्त्या घेऊन सहभागी झाले होते.  दोघांच्या पोलीस कोठडीत व...

छत्रपती शिवाजी महाराज चौकात जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी; घोषणांनी परिसर दणाणला

इमेज
परळीत शिवसैनिकांचा जल्लोष; उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जंगी स्वागत! छत्रपती शिवाजी महाराज चौकात जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी; घोषणांनी परिसर दणाणला परळी वैजनाथ | प्रतिनिधी शिवसेनेचे पक्षप्रमुख मा. श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आज धाराशिव येथे आयोजित निष्ठावंत शिवसैनिकांच्या विराट मेळाव्यासाठी जात असताना परळी वैजनाथ येथे शिवसेना परळी शहर व तालुक्याच्या वतीने त्यांचे अभूतपूर्व आणि जंगी स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक भगव्या झेंड्यांनी, ढोल-ताशांच्या गजराने आणि शिवसैनिकांच्या उत्साहाने अक्षरशः दुमदुमून गेला. यावेळी श्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत शिवसेनेचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली, तर फटाक्यांच्या आतिषबाजीने संपूर्ण परिसर उत्सवमय झाला. शिवसेनाच्या उप नेत्या सुषमा ताई अंधारे तालुकाप्रमुख भोजराज पालीवाल व शहरप्रमुख राजेश विभुते यांनी उद्धव ठाकरे यांना रुद्राक्षाची माळ, भगवी शाल आणि पुष्पगुच्छ अर्पण करून त्यांचे सन्मानपूर्वक स्वागत केले. यावेळी शिवसेना बिड जिला संपर्क प्रमुख परशुराम जाधव शिवसेना बिड जिल्हाप्रमुख र...
इमेज
रामचंद्र इंगळे सामाजिक सेवा पुरस्कार – २०२६’ च्या मानकरी आयु. करुणाताई धम्मानंद कांबळे यांची प्रेरणादायी जीवनगाथा "जीवनाला अर्थ प्राप्त होतो तो पद, प्रतिष्ठा आणि सत्तेमुळे नव्हे; तर समाजासाठी केलेल्या निःस्वार्थ कार्यामुळे!" समाजाच्या इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की त्यांची ओळख केवळ एका पदापुरती मर्यादित राहत नाही. त्यांचे अस्तित्वच एका विचाराचा, एका संघर्षाचा आणि एका परिवर्तनशील प्रवाहाचा अविभाज्य भाग बनून जाते. आपल्या कार्याने, संवेदनशीलतेने, ध्येयनिष्ठेने आणि समाजहिताच्या अखंड बांधिलकीने ज्यांनी जनमानसात आदराचे स्थान निर्माण केले, त्या व्यक्तिमत्त्वाचे नाव म्हणजे आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत आधारस्तंभ, बीड जिल्हा परिषदेचे अनुसूचित प्रवर्गातील सदस्य स्मृतिशेष रामचंद्रजी इंगळे (अप्पा) भारजकर! *आंबेडकरी चळवळीचे तत्त्वनिष्ठ आधारस्तंभ: स्मृतिशेष रामचंद्रजी इंगळे*: बीड जिल्ह्याचे अनुसूचित जाती प्रवर्गातील पहिले माजी जिल्हा परिषद सदस्य, स्मृतिशेष रामचंद्र मरीबा इंगळे यांचे २३ जून २०१८ रोजी झालेले निर्वाण ही आंबेडकरी चळवळीची मोठी हानी होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विच...

मोदीजींचे राष्ट्रहिताचे विचार उर्जा देणारे...

इमेज
ना. पंकजा मुंडेंनी भाजपा कार्यकर्त्यांसमवेत ऐकली पंतप्रधान मोदींची 'मन की बात' मोदीजींचे राष्ट्रहिताचे विचार उर्जा देणारे मुंबई दि. २८ -- राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मन की बात' कार्यक्रम आज माझगाव येथे भाजपा कार्यकर्त्यां समवेत बसून ऐकला. मोदींजीचे राष्ट्रहिताचे विचार उर्जादायी असतात अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मन की बात' कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी असतो, पंतप्रधान या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर जनतेशी संवाद साधत असतात. आज मुंबई भाजयुमो आयोजित 'मन की बात - जी नेक्स्ट सोबत' या कार्यक्रमात सहभागी होऊन ना. पंकजाताईंनी नरेंद्रजी मोदी यांचे विचार ऐकले. माझगाव येथील मॅकडोनाल्ड्समध्ये आजच्या तरुण पिढीसोबत राष्ट्रहिताचे हे विचार ऐकणे अतिशय ऊर्जादायी ठरले असल्याचे त्या म्हणाल्या.   ​याप्रसंगी दक्षिण मुंबई  भाजप जिल्हाध्यक्ष शलाका साळवी भाजयुमोचे मुंबई अध्यक्ष दिपक सिंह, महामंत्री नितीन बनकर, आणि आयोजक भाजयुमोचे मुंबई महामंत्री कमलेश ...

वैद्यनाथाची प्रतिमा दिसताच उद्धव ठाकरे नतमस्तक!!!

इमेज
परळीत उद्धव ठाकरे यांचे जोरदार स्वागत; ढोल ताशे, फटाक्यांची आतषबाजी आणि जेसीबीतून फुलांचा वर्षाव परळी वैजनाथ :  प्रतिनिधी....      शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे परभणी दौरा आटोपून धाराशिवकडे जात असताना परळी शहरात शिवसैनिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. छत्रपती संभाजी महाराज चौक तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या स्वागत सोहळ्यात जेसीबीमधून फुलांचा वर्षाव करण्यात आला. तसेच फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात परिसर दुमदुमून गेला.         या स्वागत सोहळ्यास मोठ्या संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. "कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला" अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.परळीतील नागरिकांच्या वतीने उद्धव ठाकरे यांना श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची प्रतिमा भेट देण्यात आली. ही प्रतिमा स्वीकारताना उद्धव ठाकरे यांनी ती मस्तकाला लावून  अभिवादन केले. अभयकुमार ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली जल्लोषात स्वागत -------------------   परळी वैजनाथ शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख तथा माज...

कल्याणी....!!!. ...... पहा: सर्व काही वरील... पंकजाताई चा संपूर्ण पॉडकास्ट

इमेज
"राजकारणाने मला निवडले; बाबांचे जाणे आयुष्याला कलाटणी देणारे ठरले" - पंकजाताई मुंडे  "मला कधीच राजकारणात यायचे नव्हते. माझी स्वतःची वेगळी स्वप्ने होती. बाबा असताना परिस्थिती अशी आली की एका दिवसांत सगळं बदललं आणि मी राजकारणात आले. मात्र ३ जून २०१४ रोजी घडलेल्या एका घटनेने माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. परिस्थिती अशी निर्माण झाली की, मी राजकारण निवडले नाही तर राजकारणानेच मला निवडले," अशी भावनिक प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजाते मुंडे यांनी एका विशेष मुलाखतीत व्यक्त केली.    दिवंगत नेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देताना पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या निधनानंतरच्या संघर्षाचा, राजकारणातील प्रवासाचा आणि वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांचा भावनिक प्रवास उलगडला. पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, ३ जून २०१४ हा दिवस त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणासाठीही अत्यंत धक्कादायक ठरला. "त्या दिवशी बाबांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. घरात आनंदाचे वातावरण होते. आईने कार्यक्रमासाठी पैठणी तयार ठेवली होती, मीदेखील नवीन पोशाख काढून ...

– नौशाद उस्मान यांनी लिहिलेला विशेष माहितीपूर्ण लेख.....

इमेज
  काय असतो मुहर्रमचा आशुरा?             – नौशाद उस्मान                सध्या इस्लामी दिनदर्शिकेतील मुहर्रम महिना सुरू आहे. मुहर्रम हा अरबी कॅलेंडरचा पहिला महिना असल्याने इस्लामी नववर्षाची सुरुवात याच महिन्यापासून होते. मात्र पाश्चिमात्य संस्कृतीप्रमाणे नवीन वर्ष साजरे करण्याची परंपरा इस्लाममध्ये नाही.        मुहर्रमपासून हिजरी सन १४४८ ची सुरुवात झाली आहे.               मुहर्रम महिन्याच्या दहाव्या दिवशी "आशुरा" असतो. कॅलेंडरमध्ये "आशुरा" असे लिहिलेले पाहून अनेक मुस्लिमेतर बांधवांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, हा दिवस नेमका कोणता आहे? भारतीय उपखंडात मुहर्रमच्या निमित्ताने काही रूढी, परंपरा आणि प्रथा पाळल्या जात असल्याने अनेकांना हाच संपूर्ण प्रकार म्हणजे आशुरा असावा असे वाटते. परंतु वास्तवात आशुरा हा एक ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेला दिवस आहे. इस्लाममध्ये केवळ दोन सण साजरे करण्याचा आदेश आहे—ईद-उल-फित्र (रमजान ईद) आणि ईद-उल-अजहा (बकरी ईद). या दोन सणांव्यत...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या