पोस्ट्स

ऑगस्ट २०, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महिला महाविद्यालयात आचार्य सानंदजी शास्त्री यांचे प्रतिपादन

इमेज
  भारतीय संस्कृतीत  महिलांना ब्रम्हाचा दर्जा महिला महाविद्यालयात आचार्य सानंदजी शास्त्री यांचे प्रतिपादन परळी वार्ताहर  दिनांक 26 .8 . 2023                 संस्कृत दिनानिमित्त कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयामध्ये आयोजन केलेल्या विशेष व्याख्यान सत्रात आचार्य सानंदजी शास्त्री यांनी 'संस्कृत साहित्यातील महिलांचे स्थान' या विषयावर बोलताना वेदांनी महिलांना ब्रम्हाचा दर्जा दिलेला आहे असे प्रतिपादन केले.यासंदर्भात त्यांनी 'स्त्री हि ब्रम्हा बभूविथ'असे ऋग्वेदाचे वचन उद्धृत केले. महिलांच्या उन्नती विषयक विचारांची पेरणी त्यांनी या व्याख्यानातून केली. नास्ति वेदात् परं शास्त्रं नास्ति मातुः परो गुरुः । अर्थात् वेदापेक्षा श्रेष्ठ शास्त्र नाही आणि आईपेक्षा श्रेष्ठ गुरु नाही ,असे प्रतिपादन त्यांनी केले. या व्याख्यानातून संस्कृत साहित्यात महिलेला दिलेल्या श्रेष्ठ आणि सन्माननीय स्थानाचे प्रभावी विवेचन त्यांनी केले.        समारोहात प्रारंभी दीप प्रज्वलन करण्यात आले.पाहुण्यांच्या परिचयानंतर प्रास्ताविकात महिला महाविद्यालयातील संस्कृत विभागाच्या कार्याचा आलेख मांडण्यात आला. त्या

श्रावणी वेदप्रचार सप्ताहात आचार्य सानंद यांचे प्रतिपादन

इमेज
  परमेश्वराशी नाते जोडल्यास शाश्वत आनंदाची प्राप्ती     श्रावणी वेदप्रचार सप्ताहात आचार्य सानंद यांचे प्रतिपादन                 *परळी वैजनाथ-* दि.२६-                  सुखाच्या शोधात भटकत असलेला  आजचा मानव भौतिक ऐश्वर्यातून सुखी बनू इच्छितोय, पण त्याची ही इच्छा भगवंताची नाते जोडल्याशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही. यासाठी मानवाने परमेश्वराच्या गुण ,कर्म व स्वभावांना ओळखून ते आत्मसात करणे आणि त्याच्याशी तादात्म्यभाव ठेवणे गरजेचे आहे. यातूनच मानवाला खऱ्या अर्थाने शाश्वत आनंद मिळू शकतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध वैदिक विद्वान आचार्य श्री सानंद शास्त्री (पानिपत, हरियाणा) यांनी केले.               येथील आर्य समाजाच्या वतीने गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या श्रावणी वेदप्रचार उत्सवात श्री सानंदजी यांची सकाळी  आध्यात्मिक व धार्मिक विषयावर तर रात्री सामाजिक व राष्ट्रीय विषयावर रात्री प्रवचने सुरू आहेत. यासाठी श्रोत्यांची मोठी गर्दी होत आहे. आजच्या आजच्या सत्रात श्री आचार्य यांचे "मानवी जीवनाचे लक्ष- ईश्वर प्राप्ती !" या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. मानवाने परमेश्वराच्या व्यापक स्वरूपाला ओ

यापुढे तीव्र आंदोलन......!

इमेज
  जातीय विष पेरण्याचे काम बंद करा:ब्राह्मण समाजाचा शांततेत इशारा    बीड(प्रतिनिधी)सामाजिक ऐक्य जपण्यासाठी ब्राह्मण समाज वर्षानुवर्ष सलोखा ठेवून काम करत आहे. एखादा ब्राह्मण व्यक्ती कुठे बरळला  तर संपुर्ण समाजाला दोषी धरायचे,या समाजा विषयी इतर जाती,धर्मांमध्ये विष पेरायचे. इतिहासातील कुठले तरी संदर्भ उकरुन आजच्या निरपराध ब्राह्मण समाजाला गुन्हेगार समजायचे. असे जे कट कारस्थान काही राजकिय लोक करत आहेत ते बंद करावे यासाठी बीड शहरातील ब्राह्मण समाजाच्या नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अत्यंत शांततेमध्ये  सत्याग्रह आंदोलन केले. या आंदोलनात कोणत्याही व्यक्तीचा,पक्षाचा निषेध करण्यात आला नाही. आमचा विरोध व्यक्तीला नसून प्रवृत्तीला आहे अशी भूमिका या प्रसंगी समाजाच्या वतीने मांडण्यात आली.हे पहिले आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात आले आहे. या पुढे जर असेच जातीयवादी विष कुणी पेरण्याचा प्रयत्न केला तर मग तो ब्राह्मण समाजातील असो वा इतर कोणत्या समाजातील. त्याच्या विरुध्द बीडमध्ये या पेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.           या सत्याग्रह आंदोलनाला ब्राह्मण समाजाच्या नागरि

जिल्ह्याची अस्मिता, सन्मान व विकासाची नांदी ठरणारी सभा

इमेज
  जिल्ह्याची अस्मिता, सन्मान व विकासाची नांदी ठरणाऱ्या बीडच्या जाहीर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा -बाजीराव भैय्या धर्माधिकारी परळी वैजनाथ(दि. 26) - रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बीड शहरात होत असलेली सभा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास करण्याच्या उत्तरदायित्वाची सभा आहे.या सभेचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार नियोजन करण्यात आले आहे.अजितदादांसह सर्वच मंत्र्यांच्या व मान्यवरांच्या स्वागतासाठी बीड जिल्हा उत्सुक आहे.या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.       बीड येथे रविवारी दि.27 रोजी दुपारी 3 वा. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खा.प्रफुल पटेल, खा.सुनील तटकरे, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम, महिला व बालविकास मंत्री कु. आदीतीताई तटकर

मंत्री छगन भुजबळ व हसन मुश्रीफ यांचा बीड जिल्हा दौरा

इमेज
  अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा बीड जिल्हा दौरा           बीड, दि. 25 (जि. मा. का.) :-  अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.            रविवार दि. 27 ऑगस्ट 2023 रोजी मोटारीने बीडकडे प्रयाण, दुपारी 12.45 वाजता शासकीय विश्रामगृह बीड येथे आगमन व राखीव. सांयकाळी 5.00 वाजता स्थळ  छत्रपती श्री संभाजी महाराज क्रीडांगण (मल्टीपर्पज ग्राऊड) बीड येथे राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी जाहिर सभेस उपस्थिती. सोईनुसार मोटारीने औरंगाबादकडे  प्रयाण. वैद्यकीय,शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांचा बीड जिल्हा दौरा           बीड, दि. 25 (जि. मा. का.) :-  वैद्यकीय,शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.            रविवार दि. 27 ऑगस्ट 2023 रोजी उस्मानाबाद येथून दुपारी 1.00 वाजता  मोटारीने बीडकडे प्रयाण, दुपारी 3.00 वाजता सनराईज हॉटेल बीड येथे आगमन व राखीव, दुपारी 3.30 वाजता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडील आयोजित कार्यक्रमास व बीडच्या विकासाची व सन्मानाची सभेस

मृद, वनस्पती पाणी व उती तपासणी

इमेज
 मृद, वनस्पती पाणी व उती तपासणी प्रयोगशाळा      बीड, दि. 25 (जि. मा. का.) :-   जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र दहा लाख 68 हजार 67 हेक्टर आहे जिल्ह्याचे लागवडी खालील क्षेत्र 8 लाख 76 हजार हेक्टर आहे. यातील खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र 7 लाख 85 हजार हेक्टर तर रब्बी हंगामाची सरासरी क्षेत्र 3 लाख 78 हजार हेक्टर आहे. उन्हाळी हंगाम क्षेत्र 32 हजार हेक्टर व सिंचना खालील क्षेत्र 12 हजार  हेक्टर असून 20 हजार हेक्टरवर फळबाग लागवड आहे. कृषी व्यवस्थापनामध्ये मृदा आरोग्य हा महत्त्वाचा घटक आहे. त्याचबरोबर पिकांची अनपेक्षित वाढ हा महत्त्वाचा भाग आहे. शेती पिकांच्या आणि फळ पिकांच्या चांगल्या वाढीसाठी तसेच अधिक उत्पादनासाठी खतांचा समतोल आणि कार्यक्षम वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी माती तपासणी सोबतच वनस्पतीची पाने व उती तपासणी करावी आणि त्यानुसार दिलेल्या शिफारशीनुसार खतांचा वापर करण्यात यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड यांनी केले आहे.       जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळेमध्ये नव्याने वनस्पती पाणी व उती तपासणी प्रयोगशाळा स्थापन झालेली आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा स्तरावर न

माझा गणेश उत्सव माझा मताधिकार

इमेज
  माझा गणेश उत्सव माझा मताधिकार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी देखावा सजावट स्पर्धा 2023     बीड, दि. 25 (जि. मा. का.) :-   गणेश चतुर्थीला महाराष्ट्रातील गणेश भक्तांच्या घरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये गणेशाचे आगमन होते आणि वातावरण चैतन्यांनी भरून जाते. स्वतंत्रपूर्वकाळात समाज प्रबोधनासाठी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा महाराष्ट्र आजही त्याच हिरीरीने जपतो आहे. याच प्रयत्नचा एक भाग म्हणून महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘माझा गणेश उत्सव माझा मताधिकार’ या विषयासंबंधी गणेशोत्सव देखावा-सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे.        गणेश उत्सवात सार्वजनिक मंडळे प्रबोधनपर देखावे साकार करून सामाजिक संदेश देतात. या स्पर्धेत मंडळांनी देखावे व सजावटीद्वारे मताधिकार बजावण्यासाठी मतदार नोंदणी, मताधिकार, लोकशाहीचे सक्षमीकरण इत्यादी विषयावर प्रबोधन करता येईल. देखावे सजावटीसाठी काही विषय पुढील प्रमाणे दिलेले आहेत.        लोकशाही टिकवण्यासाठी मतदानाला पर्याय नाही, मतदार यादीतला तरुणाईचा टक्का वाढावा म्हणून, आम्ही मतदान करणार कारण, हक्क वंचिताचे

दोघांचा जागिच मृत्यू ,सहा गंभिर जखमी ,गाडीचा चक्काचूर

इमेज
  मोहटा देविच्या दर्शनासाठी चाललेल्या गाडीचा भिषण अपघात  दोघांचा जागिच मृत्यू ,सहा गंभिर जखमी ,गाडीचा चक्काचूर  शिरूर कासार : तालुक्यातील तांगडगांव येथील एक कुटूंब मोहटा देवीच्या दर्शनाला जात असतांना मानूरच्या पुढे साधारण एक किलोमिटर अंतरावर शेंदूरकर यांचे घराजवळ गाडीचा भिषण अपघात झाला त्यात गाडीचा चक्काचूर झाला तर दोघाचा जागिच मृत्यू झाला तर अन्य सहा गंभिर जखमी झाल्याने पुढील उपचारासाठी बीड शासकिय रूग्णालयात पाठवण्यात आले .घटना स्थळी पोलीस हजर झाले ,पंचनामा केल्यानंतर मयताचे शवविच्छेदन प्राथमीक आरोग्य केंद्रात वैद्यकिय अधिकारी डॉ प्रगती पवळ यांनी केले ,मयताचा भाऊ कृष्णा अंबादास नाईकनवरे यानी पोलीसात खबर दिली . ऊसतोड मजुर म्हणून काम करत असलेले नाईकनवरे कुटूंब शुक्रवारी मोहटा देवी दर्शनासाठी ईंडीका व्हिस्ट गाडी घेऊन जात असतांना सकाळी अकराच्या सुमारास भरधाव वेगावर नियंत्रण मिळवता न आल्याने झाडावर धडकली त्यात गाडीचा चक्काचूर झाला ,गाडी चालवत असलेले गोकुळ बापुसाहेब नाईकनवरे वय ४० वर्ष यांचेसह त्यांची आठ महिण्याची भाची दिव्या आदिनाथ मडके रा. देवी निमगाव यांचा जागीच मृत्यू झाला तर मयताची आ

भरत गित्ते यांची राज्यपालांकडून नियुक्ती

इमेज
तंत्रज्ञान विद्यापीठाच्या नियामक मंडळावर परळीच्या भरत गित्ते  यांची राज्यपालांकडून नियुक्ती  परळी वैजनाथ, प्रतिनिधी... कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे (सीओईपी )तंत्रज्ञान विद्यापीठाच्या नियामक मंडळावर 'राज्यपाल नामनिर्देशित सदस्य' म्हणुन परळी तालुक्यातील नंदागौळ येथील भूमिपुत्र व पुणे येथील उद्योजक  ,तौराल इंडिया कंपनीचे सीईओ भरत केशवराव गित्ते यांची  नियुक्ती करण्यात आली आहे.  भरत गीते यांच्या नियुक्तीमुळे परळी तालुक्याच्या शिरपेचात  मानाचा तुरा रोवला गेला आहे                                               जुलै १८५४ मध्ये स्थापन झालेल्या जगविख्यात असलेल्या व भारत देशाचा प्रथम अभियंता जिथे नावारूपास आलेल्या व शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यातील सीओईपी महाविद्यालयाचे आता  सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठामध्ये रूपांतर झाले आहे. नुकत्याच सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या  झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत राज्यपालांनी निवड केलेल्या काही सदस्यांची नियुक्ती झाली आहे त्यामध्ये सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी मंडळाचे  अध्यक्ष श्री. भरत गीते (एम.डी तथा सी. ई.ओ;तौराल इंडिया, पुणे

बीडमध्ये धरणे आंदोलन

इमेज
  ब्राह्मण समाजाच्या वतीने उद्या बीडमध्ये धरणे आंदोलन बीड (प्रतिनिधी)  ब्राह्मण समाजा बद्दल महाराष्ट्रात सातत्याने गैर उद्गार काढण्याचे प्रकार वाढत आहेत. समाजातील एखादी व्यक्ती चुकीच्या पध्दतीने विधान करत असेल तर त्या व्यक्ती विषयी आक्षेप घेणे आवश्यक असताना जाणिवपुर्वक संपुर्ण ब्राह्मण समाजालाच दोष देणे, समाजा विषयी आक्षेपार्ह विधान करणे,समाजाची बदनामी करणे, या समाजाबद्दल इतर समाजात  व्देष निर्माण होईल असे जाणिवपुर्वक प्रयत्न करणे. हे प्रकार सुरु आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी आज 26 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह (धरणे)आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात ब्राह्मण समाजाचे जेष्ठ नागरिक,माता,भगिनी,युवा, युवती या सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.   या आंदोलनाचे नेतृत्व जिल्ह्यातील ब्राह्मण समाजाचे सर्व संपादक आणि पत्रकार करणार आहेत.या मध्ये नामदेवराव क्षीरसागर (संपादक),सर्वोत्तम गावरस्कर(संपादक),राजेंद्र आगवान (संपादक),अशोक देशमुख ( पत्रकार),प्रा.सतीश पत्की( पत्रकार),जगदिश पिंगळे ( पत्रकार),दिलीप खिस्ती(संपादक),संतो

सत्काराला नकार: मराठवाड्याला आश्‍वासक बैठक

इमेज
  मराठवाड्यातील दुष्काळ सदृश भागात तात्काळ पंचनामे सुरू करा - कृषिमंत्री धनंजय मुंडेंचे प्रशासनाला निर्देश  शेतकऱ्यांना नुकसानीची अंतरिम भरपाई देण्यासाठी महसूल व कृषी विभागासोबतच विमा कंपन्याही असणार सहभागी पावसाच्या खंडाबाबत आलेल्या अहवालाबाबत धनंजय मुंडेंनी व्यक्त केली तीव्र नाराजी छत्रपती संभाजीनगर (दि. 25) - मराठवाड्यात नांदेड व हिंगोली या दोन जिल्ह्यात काही भागात अतिवृष्टी असून उर्वरित संपूर्ण मराठवड्यामध्ये पावसाचा मोठा खंड असल्यामुळे खरीप पिके अडचणीत आहेत. यामुळे शेतकरी संकटात सापडला असून त्यांना अंतरीम दिलासा मिळवून देण्यासाठी सर्व मंडळांमध्ये तात्काळ पंचनामे सुरू करा. या पंचनाम्यांसाठी कृषी, महसूल त्याचबरोबर पिक विमा कंपनीलाही सोबत घ्या, असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज प्रशासनास दिले आहेत. अग्रीम पिक विमा असेल किंवा अंतरिम पीक विमा असेल याचा नुकसान भरपाई मध्ये शेतकऱ्याला मोठा आधार मिळतो. सध्याची मराठवाड्यावरील परिस्थिती ही संकटाची असून शेतकऱ्यांना अंतरिम दिलासा मिळावा यासाठी संबंधित सर्व पीक विमा कंपन्यांनी महसूल व कृषी विभागासोबत मिळून मंडळ व गावनिहाय पंच

पती स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर

इमेज
  डोक्यात दगड घालून पत्नीचा खून:पती स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर गेवराई..... चारित्र्यावर संशय घेत पतीने झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा निर्घृण खून केल्याची घटना आज पहाटे गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील परिसरात घडली. पत्नीच्या डोक्यात दगड घातल्यानंतर पती स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला आणि मी पत्नीच्या डोक्यात दगड घातल्याचे पोलीसांना सांगितले. या प्रकरणात पोलीसांनी स्वतः फिर्याद दिली असुन पतीविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की  औरंगाबाद जिल्ह्यातील आखदवाडा (ता. पैठण) येथील समीर कादर शेख (वय ३५) हा पत्नी, दोन वर्षाची मुलगी व स्वतःच्या बहिणीसह चकलांबा (ता. गेवराई) येथे काही कामानिमित्त   काल दि. २४ ऑगस्टरोजी आले होते काल रात्री हे कुटूंब  झोपले असता. या दरम्यान शरामद उर्फ समीर शेख याने झोपेत असलेल्या पत्नी शबाना शेख (वय २७) हिच्या डोक्यात दगड घातला. आवाज ऐकुन सोबतची बहिण व अन्य लोक जागे झाले. समीर शेख याने बहिणीच्या मदतीने गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या पत्नी शबानाला जवळच्या एका खाजगी रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर स्वतः पोलीस ठाण्यात हजर होवू

संत भगवान बाबा विद्यालय सोडून आम्ही कुठेच जाणार नाही, विद्यार्थ्यांचे भावनिक उद्गगार

इमेज
  संत भगवान बाबा विद्यालय सोडून आम्ही कुठेच जाणार नाही, विद्यार्थ्यांचे भावनिक उद्गगार शैक्षणिक क्षेत्रात राजकारण आणू नका-  फुलचंद कराड परळी प्रतिनिधी.  श्री संत भगवान बाबा विद्यालयात आमचे आई-वडील शिकले आम्ही सुद्धा याच शाळेत शिक्षण घेत आहोत. त्यामुळे ही शाळा सोडून आम्ही दुसरीकडे कुठेही जाणार नाही आणि शाळेचे स्थलांतरही होऊ देणार नाही असे भावनिक उदगार शाळेतील विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी विद्यार्थी व पालकांशी बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड म्हणाले की, शैक्षणिक क्षेत्रात आणि शाळेच्या संदर्भात राजकारण आणू नका माझ्याशी राजकारण करा पण मुलांचे वाटोळे करण्याचा प्रयत्न करू नका असे प्रतिपादन केले. याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना सरसेनापती गहिवरले. त्यामुळे उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांच्या डोळ्यात नकळत पाणी आले.    ‌ पांगरी येथील श्री संत भगवान बाबा शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री संत भगवान बाबा विद्यालय आहे. 1991 पासून सुरू झालेली ही शाळा सध्या बारावीपर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. पांगरी, लिंबूटा, कौठळी, कौडगाव घोडा, नात्रा आधी परिसराती

स्वागत- सत्कार

इमेज
  परदेश दौऱ्यावरुन आल्याबद्दल सत्कार करून स्वागत परळी वैजनाथ, प्रतिनिधी.. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी तर्फे दक्षिण आफ्रिका येथून दहा दिवसाचा दौरा यशस्वी पणे  पूर्ण करून आज परळी शहरात आगमन झाल्याबद्दल महिंद्रा चे डिस्ट्रीब्यूटर गोविंद मोटर्सचे संचालक अजित दिलीपराव देशमुख यांचे स्वागत करण्यात आले.                  लोकमतचे तालुका प्रतिनिधी संजय खाकरे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, माजी उपनगराध्यक्ष शकील कुरेशी माजी उपनगराध्यक्ष रवींद्र परदेशी ,रामेश्वर महाराज कोकाटे यांनी अजित देशमुख यांचे परळीत स्वागत केले तसेच भाजपाचे  अश्विन मोगरकर, शिवसेनेचे सचिन स्वामी,नाना जाधव, यांनीही त्यांचे स्वागत केले.               महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी तर्फे दहा दिवसांचा अभ्यास दौरा दक्षिण आफ्रिका  मधील जोहान्सबर्ग ,केप टाऊन मोजल बे नाईजना येथे होता,जगभरातील  निवडक तीनशे डीलर्स आले होतें,त्यात परळीतील शंकर पार्वती नगर भागातील अजित देशमुख यांचा समावेश होता,अजित देशमुख हे महिंद्रा ट्रॅक्टर, श्रीजित  फायनान्स, हिरो शोरूम चा कार्यभार  मागील सहा वर्षापासून सांभाळत आहेत.यापूर्वी  त्यां

परळीमध्ये 26 ऑगस्ट रोजी प्रकाशन

इमेज
  लढा! मराठवाडा मुक्ती संग्रामाचा !! विशेषांकाचे परळीमध्ये 26 ऑगस्ट रोजी प्रकाशन .................. परळी वैजनाथ दिनांक 25 ऑगस्ट नव्या पिढीला मराठवाडा मुक्ती संग्रामाचा जाज्वल्य इतिहास कळावा यासाठी भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई यांच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्रामाला 75 वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून सांस्कृतिक वार्तापत्राने संपादित केलेल्या " लढा! मराठवाडा मुक्ती संग्रामाचा !! " या विशेषांकाचे प्रकाशन परळी येथील भाशिप्र संचलित भेल सेकंडरी स्कूलमध्ये दिनांक 26 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. या विशेषांकाचे प्रकाशन ख्यातकीर्त सिनेअभिनेते व सुप्रसिद्ध वक्ते श्री राहुल सोलापूरकर यांच्या हस्ते होणार आहे.        या कार्यक्रमाला सांस्कृतिक वार्तापत्र, पुणेच्या सौ. सुनीताताई पेंढारकर व किरण देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री जुगलकिशोर लोहिया राहणार आहेत. या प्रकाशन कार्यक्रमानंतर राहुल सोलापूरकर यांचे व्याख्यान होणार आहे. परळी वैजनाथ येथील टीपीएस कॉलनी मधील शाळेच्या केजी हॉलमध्ये सकाळी साडेअकरा वाजता हे व्याख्यान होणार

कापुस, सोयाबीन सरासरी ६० टक्क्यांपेक्षा अधिक तर मुग, उडीद ८० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान

इमेज
  परळी तालुका अवर्षणग्रस्त: शेतकऱ्यांना २५ % विमा अग्रिम मिळणारच! कापुस, सोयाबीन सरासरी ६० टक्क्यांपेक्षा अधिक तर मुग, उडीद ८० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान परळी वैजनाथ , प्रतिनिधी           गेल्या महिनाभरापासून परळी तालुक्यात पाऊस आलेलाच नसल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जवळजवळ खरीप हंगाम हा उध्वस्त झाल्यात जमा आहे. त्यामुळे विम्याच्या निकषानुसार 25% विमा आग्रीम शेतकऱ्यांना मिळण्यासाठी बंधनकारकच आहे. त्याबरोबरच कृषी विभागाच्या क्षेत्रीय पाहणीचा अहवाल हीच परिस्थिती दाखवतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्या बदल्यात 25 टक्के विमा अग्रीम मिळणारच हे आता निश्चित आहे.           परळी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने  अवर्षणग्रस्त तालुका म्हणून प्रशासनानेही नोंद घेतलेली आहे.शासनास अहवाल पाठवून व पीक विम्याची अग्रीम मंजुर करण्याबाबत शिफारस कृषी कार्यालयाने पाठवलेल्या आहवालात करण्यात आलेली आहे. कापुस, सोयाबीन सरासरी ६० टक्क्यांपेक्षा अधिक तर मुग, उडीद ८० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान  झाल्याचा कृषी विभागाचा आहवाल आहे. परळी तालुक्यातील मंडळनिहाय क्षेत्र पाहणीचा अहवाल कृषी

शारदा नगरमध्ये सात दिवसांचे शिवलीलामृत पारायण उत्साहात

इमेज
  शारदा नगरमध्ये सात दिवसांचे शिवलीलामृत पारायण उत्साहात  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील शारदा नगर भागातील हनुमान मंदिरात श्रावण मासानिमित्त निर्मला पाठक यांच्या प्रेरणेने सात दिवसांचे शिवलीलामृत पारायण भक्तीभावाने संपन्न झाले. शिवलीलामृत पोथी पारायण भगवान शंकराचा महिना सोबतच अध्यात्माच्या दृष्टीने अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिन्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासून भाविक- भक्त भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी पुराण, वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या मनोकामना पुर्ण करण्यासाठी आराधना करत असतात. याच पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, आपली दुःख, रोग, चिंता हटावी यासाठी पुराणांमध्ये श्रावणमहिन्याच्या पर्वकाळात शिवलिलामृत पोथीचे पारायण करण्याची मान्यता आहे. त्यामुळे या भागातील महिलांनी पुढाकार घेऊन सात दिवसांचे पारायण केले. या पारायणात निर्मला पाठक, लता अवचट, भाग्यश्री जोशी, विजया जोशी, जयमाला धारूरकर, विद्या शिंदे, ललिता नागरगोजे, सुमेधा चप्पे, अश्विनी बदने, मोहिनी चाटे, आशा स्वामी,

मराठवाड्यातील दुष्काळ सदृश परिस्थितीचा आढावा घेणार

इमेज
  राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयात घेणार मराठवाड्यातील पीक-पाणी व परिस्थितीचा आढावा छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयात घेणार बैठक, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हेही राहणार व्हर्च्युअली उपस्थित मराठवाड्यातील दुष्काळ सदृश परिस्थितीचा आढावा घेणार छत्रपती संभाजीनगर (दि. 24) - राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे सध्या मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांच्या पीक पाणी व पावसाच्या एकूण परिस्थितीचा शुक्रवारी आढावा घेणार आहेत.  राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील हेही या बैठकीस व्हर्च्युअली उपस्थित राहणार असून मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यातील मंत्रीही या बैठकीस उपस्थित राहण्याची शक्यता आहे.  या बैठकीत बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव या आठही जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण, ओढ दिलेल्या क्षेत्रात पिकांची परिस्थिती तसेच शेतकऱ्यांना अंतरिम दिलासा देण्यासाठी कर

बाजीराव धर्माधिकारी यांनी चांदोबाला लिहिलेले पत्र!

इमेज
  बाजीराव धर्माधिकारी यांनी चांदोबाला लिहिलेले पत्र! प्रिय चांदोबा मामा! सप्रेम नमस्कार!! प्रिय चंदामामा...होय बालपणापासून तू  आमचा आवडता चंदामामाच ...तुझं दिसणं मनाला प्रसन्न करणारं ...तुझे ते शीतल चांदणे आल्हादायकच ..नेहमी हवेहवेसे ...म्हणून बालपणापासूनच तुला भेटण्याची ओढ आमच्या मनात सुप्त स्वरूपात होती.आज तुझ्या भेटीसाठी आम्ही प्रत्यक्षात येऊ शकलो नसलो तरी आमच्या इस्रोच्या सहाय्याने चंद्रयान- ३ हा आमचा पाहुणा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तुझ्याजवळ आलाय ...त्यामुळे आज सुप्रसिद्ध हिंदी चित्रपटातील 'इन्सान जाग उठा' मधील मोहंमद रफीसाहेब यांनी गायलेले आणि मधुबाला-सुनील दत्त यांच्यावर चित्रित झालेले एक जुने गीत पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहे असे वाटते..ते गीत म्हणजे -    "ये चंदा न रुस का..न जापान का..न अमेरिका का..ये तो हैं हिंदुस्थान का..!!"    हे आज पुन्हा सिद्ध झाले ते इस्रोच्या चंद्रयान ३ टीममुळे !     आज कित्येक वर्षांनी केवळ तुझ्यामुळे अवघा भारत देश एक झाला.सकळ भारतीय समाज जात-पात,धर्म-पंथ,पक्ष-गट विसरुन तिरंगा ध्वजाखाली एक झाला...! आमच्या इस्रोच्या या मोहिमेने व तुझ

चांद्रयान-3 'लाइव्ह स्ट्रीमिंग'ने केला नवा रेकॉर्ड...

इमेज
  चांद्रयान-3 'लाइव्ह स्ट्रीमिंग'ने केला नवा रेकॉर्ड... भारताच्या चांद्रयान-3 ने बुधवारी (दि. २३) चंद्रावर यशस्वी लँडिंग केले. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश ठरला आहे. त्याचबरोबर इस्रोच्या लाइव्ह स्ट्रीमिंग लिंकनेही यूट्यूबवर इतिहास रचला आहे. चांद्रयान- 3 च्या लँडिंगचे लाईव्ह स्ट्रीमिंग एकाच वेळी ८.०६ दशलक्ष लोकांनी पाहिले. या लाईव्ह स्ट्रीमिंगने यूट्यूब (YouTube) इतिहासातील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. जगातील सर्वाधिक पाहिला जाणारा हा थेट प्रक्षेपण ( लाईव्ह) ठरले आहे. (ISRO YouTube) ISRO YouTube : भारताने पुन्हा एक इतिहास रचला आतापर्यंत YouTube वर, ब्राझील वि. कोरियाच्या फुटबॉल सामन्याचे थेट प्रक्षेपण ६.१५ दशलक्ष लोकांनी एकावेळी पाहिले होते. ज्याचा बुधवारी (दि. २३) चांद्रयान- 3 च्या थेट प्रक्षेपणाने विक्रम मोडला आहे. यूट्यूब लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेला ब्राझील विरुद्ध क्रोएशिया फुटबॉल सामना जो एकाच वेळी ५.२ दशलक्ष लोकांनी पाहिला होता. YouTube वर आतापर्यंत सर्वाधिक पाहिलेले लाइव्ह स्ट्रीमिंग इस्रो चांद्रयान : ८.०६ दशलक्ष ब्राझी

चांद्रयान-३ अंतराळ मोहिमेबद्दल गुगल कडून अभिनंदन!

इमेज
  चांद्रयान-३ अंतराळ मोहिमेबद्दल गुगल कडून अभिनंदन! गुगलकडून आज खास डुडल आजचे डूडल चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्रथमच उतरण्याचा उत्सव साजरा करत आहे! चांद्रयान-3 हे अंतराळयान 14 जुलै 2023 रोजी आंध्र प्रदेश, भारतातील श्रीहरिकोटा रेंजमधील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केले गेले आणि 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या जवळ यशस्वीरित्या स्पर्श केले गेले. चंद्रावर उतरणे हे सोपे काम नाही. यापूर्वी, केवळ युनायटेड स्टेट्स, चीन आणि माजी सोव्हिएत युनियनने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग पूर्ण केले होते - परंतु आतापर्यंत कोणत्याही देशाने दक्षिण ध्रुव प्रदेशात प्रवेश केलेला नाही.  चंद्राचा दक्षिण ध्रुव हे अंतराळ संशोधकांसाठी अधिक आवडीचे क्षेत्र बनले आहे कारण त्यांना कायमस्वरूपी सावली असलेल्या खड्ड्यांच्या आत बर्फाचे साठे असल्याचा संशय आहे. चांद्रयान-३ ने आता ही भविष्यवाणी खरी ठरली आहे. हा बर्फ भविष्यातील अंतराळवीरांसाठी हवा, पाणी आणि अगदी हायड्रोजन रॉकेट इंधन यांसारख्या महत्त्वपूर्ण संसाधनांची क्षमता प्रदान करतो.  आणि ही ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर चांद्रयान-३ चे पहिले विचार काय होते?: “भार

परळीचे आवघड महसुलायन

इमेज
परळीचे आवघड महसुलायन: दोन महिन्यांत चार तहसीलदार; परळीत सातबारा दुरुस्ती रखडली : पुरवठ्याची डाटा एण्ट्री बंद परळी वैजनाथ, प्रतिनिधी तहसीलदार सुरेश शेजुळ यांची गेल्या दोन महिन्यांपुर्वी बदली झाल्यानंतर दोन महिन्यात चार तहसीलदार आले. यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम सुरु असल्याने सातबारा दुरुस्तीसाठी लागणारी डिजिटल स्वाक्षरी नसल्याने तालुक्यातील 3 हजार शेतकऱ्यांच्या सातबारा दुरुस्तीचे रखडल्याने काम शेतकऱ्यांचे कर्ज प्रकरणे रखडली आहेत. परळीचे तहसीलदार सुरेश शेजुळ यांची दोन महिन्यापूर्वी अकलूज येथे बदली झाल्यानंतर आतापर्यंत चार तहसीलदार झाले आहेत. या पैकी कोणीच डिजिटल स्वाक्षरी बनवली नसल्याने सातबारा दुरुस्तीचे काम आहे.  सुरेश शेजुळ गेल्यानंतर आईलनवाड यांनी काही दिवस कारभार पहिला व ते सेवानिवृत्त झाले.त्यांच्या नंतर १० दिवस नायब तहसीलदार अविनाश निळेकर यांनी कार्यभार घेतला व ते ही बदलीवर माजलगावला गेले. त्यानंतर संदीप पाटील यांनी पदभार घेतला ते २५ दिवस राहिले त्या नंतर परत ते ही पोलिस प्रशासनात रुजू होण्यासाठी नाशिकला गेले.त्या नंतर तहसीलदार पेंदेवाड यांनी १५ ऑगस्ट पासुन पदभार घेतला आहे.

शिकवणाऱ्या मौलानाकडून १३ वर्षीय मुलीचा विनयभंग,

इमेज
  अरबी शिकवणाऱ्या मौलानाकडून १३ वर्षीय मुलीचा विनयभंग, गुन्हा दाखल परळी वैजनाथ, एमबी न्युज वृत्तसेवा...              परळी शहरात अरबी भाषेची शिकवणी घेणाऱ्या मौलानाने शिकवणीला येणाऱ्या १३ वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन मौलानाविरुध्द संभाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.          परळी शहरातील खुदबे नगर भागात शेख सोहेल गणी रा. जुना रेल्वे स्टेशन हे आरबी भाषा शिकवण्याची शिकवणी घेतात. याच भागातील १३ वर्षीय विद्यार्थीनी मागील आठ दिवसांपासून त्या मौलानाकडे आरबी शिकण्यासाठी येत होती. दि. २२ ऑगस्ट रोजी शिकवणीहून घरी आल्यानंतर सदरील मुलगी रडू लागल्याने तिच्या आईने समजावुन सांगत कारण विचारले असता तीने  मौलाना हा मला समोर बोलावुन विनयभंग करत असल्याचे सांगितले. याप्रकरणी या मौलानाविरुध्द संभाजीनगर पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करत आहेत. 

बीड जिल्ह्यातील विविध प्रलंबित विकास कामांच्या संदर्भात बैठकांचे सत्र

इमेज
  बीड जिल्ह्यातील विकास कामासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  केली लोकप्रतिनिधींशी चर्चा *कृषिमंत्री धनंजय मुंडे, आ.प्रकाशदादा सोळंके, मा.आ.अमरसिंह पंडित, मा.आ.संजय दौंड, राजकिशोर मोदी आदींची उपस्थिती धनंजय मुंडेंच्या दालनातही बीड जिल्ह्यातील विविध प्रलंबित विकास कामांच्या संदर्भात बैठकांचे सत्र मुंबई (दि. 24) - बीड जिल्ह्यातील विकासकामे, दुष्काळी परिस्थिती, विविध प्रस्तावित जलप्रकल्प, वीजपुरवठा व महावितरण कडील अन्य समस्यांचे निराकरण आदी विषयी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडेंसह लोकप्रतिनिधींशी चर्चा केली.  कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह बीड जिल्ह्यातील आ.प्रकाशदादा सोळंके, मा.आ.अमरसिंह पंडित, मा.आ.संजय  दौंड, राजकिशोर मोदी आदींची या बैठकीला उपस्थिती होती. या सर्वांनीच बीड जिल्ह्यातील विविध प्रलंबित कामांसह अन्य प्रस्तावित व तातडीची कामे तसेच दुष्काळी परिस्थिती संदर्भात माहिती दिली. यावर उपाययोजना करण्यासाठी सर्व संबंधित विभागाच्या स्वतंत्र बैठका घेऊन निर्णय घेण्याचे अजितदादा पवार यांनी निर्देश दिले आहेत.  द

परळीच्या संगीत क्षेत्राचा सर्वोच्च गौरव

इमेज
  परळीच्या संगीत क्षेत्राचा सर्वोच्च गौरव: भक्ताश्रमच्या गणेशअण्णा चौधरी व सतीशचंद्र चौधरी यांना अ.भा. गांधर्व मंडळाचा मरणोत्तर संगीत रत्न आणि कलागौरव पुरस्कार परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        परळी शहराचे संगीत क्षेत्रात गौरवशाली नावलौकिक करणारे परळीतील भक्ताश्रमाचे संस्थापक कै. गणेशअण्णा चौधरी व त्यांचा वारसा पुढे चालवणारे कै. सतीश चंद्र चौधरी यांना अखिल भारतीय गांधर्व मंडळाच्या वतीने दिला जाणारा संगीत क्षेत्रातील गौरवाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. अ.भा. गांधर्व मंडळाच्या मरणोत्तर संगीत रत्न आणि कला गौरव पुरस्कारासाठी झालेली ही निवड खरोखरच परळीच्या संगीत क्षेत्राचा मोठा सन्मान आहे.           परळी नगरीतील भक्ताश्रम हे संगीत साधनेचे एक मौलिक संस्थान आहे. या संस्थांनाचे सर्वेसर्वा शास्त्रीय संगीताचे साधक आणि उपासक कै. अण्णासाहेब चौधरी हे संगीत क्षेत्रातील एक  बडे प्रस्थ होऊन गेले.त्यांनी केलेली संगीत सेवा ही अखिल भारतीय पातळीवर गौरविली गेलेली आहे. स्व.अण्णांचे जेष्ठ चिरंजीव कै.सतीशचंद्र चौधरी यांनी सुद्धा तबलावादनातील तालयात्री म्हणून केलेली संगीत सेवा ही राष्ट्रीय पातळीवर ठ

मौजे जवळगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास उत्साहात प्रारंभ

इमेज
  गुरू-शिष्य परंपरेतूनच विश्वात्मक कल्याण साध्य होते-ह.भ.प.श्री.नारायण महाराज बारटक्के मौजे जवळगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास उत्साहात प्रारंभ परळी  (प्रतिनिधी) भारत हा गुरू परंपरेवर विश्वास ठेवणारा, त्यांना मानणारा असून गुरू-शिष्य परंपरेतूनच विश्वात्मक कल्याण साध्य होते. अर्थातच श्रद्धा, विश्वास, विनम्रता व शालीनता शिष्यात असणे आवश्यक असून अशा सदाचारी व्यक्तीला गुरूवर्य योग्य मार्ग दाखवून त्याचे कल्याण करतात असे विचार प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.श्री.नारायण महाराज बारटक्के यांनी व्यक्त केले.  मौजे जवळगाव येथे गुरुवर्य दौलतराव गुरुजी खानापूरकर व समस्त जवळगाव येथील ग्रामस्थांच्या  मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळयास दिनांक 22 ऑगस्टपासून उत्साहात प्रारंभ झाला आहे. कथा वाचन पंडित पुरुषोत्तम तिवारी महाराज जवळगाव वृंदावन धाम हे करीत आहेत.याप्रसंगी ह.भ.प.श्री.नारायण महाराज बारटक्के हे बोलत होते. कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे पहाटे 4 ते 6 काकड आरती ,6ते 6.30 विष्णुसहस्त्रनाम, 7 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण ,11 ते 12 गाथा भजन

दुखःद वार्ता: भावपूर्ण श्रद्धांजली

इमेज
 डॉ. शाम काळे यांना पितृशोक:तुकाराम काळे यांचे निधन परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शाम काळे यांचे वडील तुकाराम सखाराम काळे यांचे आज बुधवार (दि.२३) रोजी रात्री ९ वा.  निधन झाले.मृत्युसमयी  ते ८० वर्षे वयाचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुले,तीन मुली ,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.          तुकाराम सखाराम काळे  हे  काळे परिवारातील जेष्ठ व जुन्या पिढीतील अनुभवी व्यक्तिमत्व म्हणून सर्व परिचित होते. अतिशय मनमिळाऊ व धार्मिक वृत्तीचे सुस्वभावी व्यक्तिमत्व होते.वार्धक्याने आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर उद्या गुरुवार दि 24/8/23 गुरुवार सकाळी 10 वाजता मूळ गावी,कुंडी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाने काळे कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

पंकजाताई मुंडेंनी केले पंतप्रधान मोदींसह शास्त्रज्ञांचं अभिनंदन

इमेज
  जागतिक महासत्ता बनण्याकडे भारताचं फार मोठं पाऊल चांद्रयान मोहिमेच्या यशस्वीतेबद्दल पंकजाताई मुंडेंनी केले पंतप्रधान मोदींसह शास्त्रज्ञांचं अभिनंदन मुंबई । दिनांक २३। चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान मोहिम यशस्वी करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब तर आहेच पण त्याचबरोबर ही कामगिरी भारताची जागतिक महासत्ता बनण्याकडे फार मोठं पाऊल आहे अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी मोहिम यशस्वी करणाऱ्या शास्त्रज्ञांसह भारत सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे.   आज सर्वांच्या आनंदाला त्याचप्रमाणे आपल्या नवीन भारताच्या त्याच्या सन्मानाला आणि त्याने केलेल्या विश्व विक्रमालाही कुठलीही सीमा राहिलेली नाही आपण जगाच्या नव्हे तर आता विश्वाच्या सीमा गाठलेल्या आहेत. देशाच्या इतिहासात पन्नास वर्षे प्रयत्न केल्यानंतर चांद्रयान तीन हे यशस्वी झालं आहे. हा आपल्यासाठी गौरवाचा विषय आहे. देशाचा प्रत्येक नागरिक आज सन्मानाने डौलत आहे. भारत जगाची सत्ता बनण्याकडे हे फार मोठं पाऊल आहे. मी आपल्या सर्वाच्या आनंदात