पोस्ट्स

सप्टेंबर ३०, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

*पांगरी येथे 'आई महोत्सव' : श्रीमद भागवत संहिता पारायण व किर्तन सोहळ्याचे आयोजन!*

इमेज
* पांगरी येथे 'आई महोत्सव' : श्रीमद भागवत संहिता पारायण व किर्तन सोहळ्याचे आयोजन!*  परळी वैजनाथ /प्रतिनिधी. .....        तालुक्यातील पांगरी येथे 'आई महोत्सव' आयोजित करण्यात आला असून श्रीमद भागवत संहिता पारायण व किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्या विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तसेच  महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची किर्तनसेवा या महोत्सवात सादर होणार आहे.           पांगरी येथील स्व. उर्मिलाबाई धोंडीराम मुंडे यांच्या पाचव्या  पुण्यस्मरणानिमित्त 'आई महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात भागवतमर्मज्ञ ह. भ. प. सुरेंद्र(बाळु) महाराज उखळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमद भागवत संहिता पारायण होणार आहे. तसेच दि. १९, २० व २१ आॅक्टोबर  रोजी किर्तन महोत्सवात सर्वश्री ह. भ. प .प्रभाकर महाराज झोलकर, ह. भ. प. ज्ञानोबा माऊली महाराज लटपटे, ह. भ. प.विदर्भरत्न संजय महाराज पाचपोर , पंढरपूर येथील संत मानकोजी बोधले महाराज संस्थानचे फड प्रमुख  ह. भ. प. प्रभाकर दादा बोधलेयांची किर्तनसेवा होणार आहे.             या महोत्सवात वारकरी संप्रद

भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी अॅड. अरुण पाठक!*

इमेज
*भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी अॅड. अरुण पाठक!* ● *_परळीतील युवक कार्यकर्त्याला पक्षसंघटनेत संधी_*  ● परळी वै.।प्रतिनिधी      भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीत परळीतील युवक कार्यकर्त्याला पक्षसंघटनेत संधी देण्यात आली आहे. ना. पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या अॅड. अरुण पाठक यांची भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.      अॅड. अरुण पाठक यांनी महाविद्यालयीन जीवनापासून भाजप मध्ये सक्रिय काम केलेले आहे. भाजपा विद्यार्थी आघाडी व पक्ष संघटनेने वेळोवेळी दिलेली जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या उत्तुंग नेतृत्वांकडे पाहून प्रेरणा घेऊन राजकीय क्षेत्रात नव्या पिढीतील असंख्य युवक सक्रिय झाले त्यामध्ये परळीचे अॅड. अरुण पाठक यांनी ना. पंकजाताई मुंडे, आ.योगेश आण्णा टिळेकर, खा.डॉ.प्रीतमताई मुंडे, यांच्या  नेतृत्वाखाली पक्ष संघटनेने दिलेले काम केले आहे.       नुकतीच त्यांची भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या बाबतचे नियुक्तीपत्र आ.योगेश आण्णा टिळे

टोकवाडीत स्वच्छता अभियान !

इमेज
टोकवाडीत स्वच्छता अभियान ! ●राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य ● परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यातील टोकवाडी ग्रामपंचायतच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता हीच सेवा हा संदेशाचे पालन करून जिल्हा परिषद शाळेत स्वच्छता मोहीम सरपंच सौ.गोदावरी मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात आली. महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या विचारांची देशाला गरज असल्याचे सौ.मुंडे म्हणाल्या.  परळी तालुक्यातील टोकवाडी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. सरपंच सौ.गोदावरी मुंडे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. सौ.मुंडे म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी आपल्या आचार व विचारातून चळवळ उभाकरुन भारताला जुलमी इंग्रजी राजवटीच्या जोखडातून बाहेर काढण्याचे काम त्यांनी केले. माजी पंतप्रधान लालबाहदूर शास्त्री यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला. मिठाचा सत्याग्

सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक नौकरभरतीची चौकशी करण्याची मागणी*

इमेज
*राज्य सरकारने न्यायालयात योग्य बाजू न मांडल्यानेच त्या विद्यार्थ्यांवर अन्याय - धनंजय मुंडे* *सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक नौकरभरतीची चौकशी करण्याची मागणी* मुंबई दि 4 ...... सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकासाठी MPSC तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 830 विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. न्यायालयाने या विद्यार्थ्याच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. मात्र राज्य सरकारने न्यायालयात योग्य पद्धतीने बाजू न मांडल्याने ही स्थगिती आली आहे. या नोकरभरतीत गैरव्यवहार झाला असून त्याची चौकशी करण्याची मागणी  विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. सहाययक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या नियुक्तीवरून सध्या गोंधळ सुरू आहे... अनेक विद्यार्थ्यांनी तीन- तीन वर्षे अभ्यास करून ही परीक्षा दिली.. परीक्षेचा निकालही आला..परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 830 विद्यार्थ्याच्या नियुक्तीची शिफारसही mpsc ने राज्य सरकारकडे केली. मात्र नियुक्ती होण्याआधीच  त्यावर न्यायालयाकडून स्थगिती आली. न्यायालयाच्या या स्थगितीचा. फटका बसलेली ही 24 वर्षीय वर्षा बराटे, उस्मानाबाद जिल्ह्यातील वर्षा पुण्यात नोकरीसाठ

पेट्रोल आणि डिझेलचे भाव: _अभिनंदन कसले करता जनतेची माफी मागा- धनंजय मुंडे

इमेज
*चार वर्ष लुट केल्यानंतर आता दर कमी करणे म्हणजे उशीरा सुचलेले शहाणपण-धनंजय मुंडे* _अभिनंदन कसले करता जनतेची माफी मागा_ मुंबई दि.04.............केंद्रातील मोदी आणि राज्यातील फडणवीस सरकारमुळेच पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आता दर कमी केल्याबद्दल अभिनंदन कसले करून घेता उलट जनतेची माफी मागा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी केली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे भावअल्पसे कमी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले. त्यावरून सरकारला धारेवर धरतांना चार वर्ष लुट केल्यानंतर आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन दर कमी करण्याचा घेतलेला हा निर्णय म्हणजे सरकारला उशीरा सुचलेले शहाणपण आहे.  गुजरात राज्याने पेट्रोल आणि डीझेलच्या दरात कपात केली असतांना महाराष्ट्र सरकारने मात्र फक्त पेट्रोलच्या भावात कपात करून राज्यातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळणे असल्याची प्रतिक्रिया ही त्यांनी दिली आहे. ----------------------------------------------

धनंजय मुंडे यांना न्यायालयाचा दिलासा

इमेज
*धनंजय मुंडे यांना न्यायालयाचा दिलासा ; जगमित्र सुतगिरणी प्रकरणी प्रॉपर्टी अटॅचमेंटच्या अंमलबजावणीस न्यायालयाची  स्थगिती* अंबजोगाई दि.04.................संत जगमित्र सुतगिरणी प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या प्रॉपर्टी अटॅचमेंट बाबत अंबाजोगाई न्यायालयाने 5 सप्टेंबर रोजी दिलेल्या निकालास कोर्टाने सदर बाबीच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे धनंजय मुंडे यांना दिलासा मिळालेला आहे.      अंबाजोगाई न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय देशपांडे यांनी 5 सप्टेंबर रोजी दिलेल्या एका निकालात संत जगमित्र सुतगिरणी संदर्भात सुतगिरणीच्या व संचालकांची अर्जात नमुद केलेली मालमत्ता विक्री करता येणार नाही, गहाण खत करता येणार नाही किंवा त्यावर बोजा चढवता येणार नाही असे म्हटले होते.       या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी याच कोर्टात अर्ज करून या निकालास स्थगिती देण्याची विनंती केली होती. सदर कारवाई करतांना काही विशिष्ट लोकांवरच कारवाई करण्यात आली,  गृहमंत्रालयाकडुन या बाबत घ्यावयाची परवानगी कायद्याला अभिप्रेत संज्ञेप्रमाणे न केल्यामुळे तसेच या प

*जगद्गुरू द्वाराअचार्य अमृताश्रम स्वामी यांची गोपीनाथगडाला भेट !*

इमेज
*जगद्गुरू द्वाराअचार्य अमृताश्रम स्वामी यांची  गोपीनाथगडाला भेट !* परळी वैजनाथ। प्रतिनिधी. ...           महाराष्ट्रातील प्रसिध्द किर्तनकार तथा अध्यात्मिक क्षेत्रातील जनमान्य व्यक्तीमत्व असलेल्या जगद्गुरू द्वाराअचार्य अमृताश्रम स्वामी यांनी गोपीनाथ गडाला सदिच्छा भेट दिली. 

video...... _बघा पाउस न पडण्याची काय आहेत खरी कारणे. ......._

इमेज
Watch this video  _बघा पाउस न पडण्याची काय आहेत खरी कारणे. ......._ ●  *सोशल मीडियातून तुफान लोकप्रिय ठरत असलेले *हे बाबा* काय म्हणतायत व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एकदा बघाच....* ●

MPSC मध्ये पास झालेल्या 800 हून अधिक मुलांना सेवेत दाखल होण्यापूर्वीच नारळ मिळाला

इमेज
MPSC पास झालेल्या 800 विद्यार्थ्यांची नियुक्ती रद्द

मिस्त्री कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार - कामगार नेते उमेशे खाडे

इमेज
ना. पंकजाताई मुंडे व खा. प्रितम ताई मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली   मिस्त्री कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार -  कामगार नेते उमेशे खाडे परळी : प्रतीनिधी परळी येथील ऑल इंडिया मिस्त्री कामगार संघटनेची पेठ मोहल्ला परळी येथे बैठक घेण्यात आली. या बैठकी मध्ये कामगारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी व त्याना शासनाच्या योजने चा लाभ मिळवून देण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यानी जनजागृती करावी गरिब वंचित याना न्याय मिळवून द्यावा असे आवाहन  ऑल इंडिया मिस्त्री कामगार संघटने चे प्रदेश अध्यक्ष उमेश खाडे  यांनी केले आहे.

शेतमालास योग्य भाव मिळण्यासाठी शेतकरी कंपनी विकसीत करणे महत्वाचे आहे - हवामान तज्ञ डाँ.रामचंद्र साबळे

इमेज
शेतमालास योग्य भाव  मिळण्यासाठी शेतकरी कंपनी विकसीत करणे महत्वाचे आहे - हवामान तज्ञ डाँ.रामचंद्र साबळे परळी वै:  दि 02 प्रतिनिधी मराठवाड्यातील हवामानात प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल होत असुन या बदलत्या हवामानानुसार मराठवाड्यात कृञीम पर्जन्य पाडण्याचे केंद्र विकसीत करणे याच बरोबर सह्याद्रीच्या पर्वत रांगात पावसाचे पाणी अडवुन मराठवाड्याकडे वळविणे,वृक्षसवर्धनाकरीता ' कार्बन क्रेडीट ' योजना राबविने याच बरोबर  यांनी व्यक्त केले. मंगळवार ( दि 02)  रोजी तालुक्यातील मोहा येथे जेष्ठ स्वातंञसेनानी,बीड जिल्ह्याचे माजी खासदार तथा महाराष्ट्र शिक्षण संस्था,मोहाचे संस्थापक काँ.गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या 10 व्या स्मृती व्याख्यानमाले प्रसंगी जेष्ठ कृषी हवामान तज्ञ डाँ.रामचंद्र साबळे हे प्रमुख व्याख्याते म्हणुन उपस्थित होते . यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष काँ.डाँ.डि.एल कराड,कामगार नेते काँ.सईद अहमद,माकपाचे नाशिकचे जिल्हा सचिव काँ.देविदास आडोळे यांच्यासह स्मृती प्रतिष्ठान अंबाजोगाई,ग्राम पंचायत मोहा,महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा चे सर्व सन्माननिय

लोकसभेत स्वतःचा उमेदवार पाडण्यासाठी देशपातळीवरील नेत्याला बोलावून राष्ट्रवाादीचा 'संंकल्प' ! ● पंकजा मुंडे यांनी उडवली स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांची खिल्ली ●

इमेज
लोकसभेत स्वतःचा उमेदवार  पाडण्यासाठी देशपातळीवरील नेत्याला बोलावून राष्ट्रवाादीचा 'संंकल्प' ! ● पंकजा मुंडे यांनी उडवली स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांची खिल्ली ● *राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बीडचा विकास बारामती सारखा का केला नाही?* *ना. पंकजाताई मुंडे यांचा सवाल* * मला विरोध  करण्यासाठी देश पातळीवरच्या नेत्याला बीडमध्ये आणले* चौंडी (ता. धारूर) दि.०१ ----- मला विरोध करण्यासाठीच देश पातळीवरच्या नेत्याला बीडमध्ये मुक्कामास बोलावले आहे परंतू असे कितीही वादळे आली तरी मी घाबरत नाही. इतकी वर्षे सत्ता असून सुध्दा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बीडचा विकास बारामती सारखा का केला नाही? असा सवाल करून या जिल्हयाचा विकास करण्यासाठी आता इथल्या जनतेला बारामतीच्या नेत्याची गरज नाही, त्यासाठी आम्ही समर्थ आहोत असे सांगून राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा निवडणुकीत स्वतःचा उमेदवार पाडण्यासाठीच उमेदवार शोधत असल्याची खरमरीत टीका आज येथे केली.

बीडच्या ऐतिहासिक विजयी संकल्प सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे - बाजीराव धर्माधिकारी

इमेज
बीडच्या ऐतिहासिक विजयी संकल्प सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे - बाजीराव धर्माधिकारी परळी वैजनाथ  दि. 30............... राज्यात आणि केंद्रातील जनता विरोधी सरकार उलथवून टाकण्यासाठी बीडच्या भूमीतून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री खा.श्री. शरदचंद्रजी पवार  हे सोमवारी विजयी संकल्प सभेच्या माध्यमातून रणशिंग फुंकणार आहेत. बीडच्या  ऐतिहासिक सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष  बाजीराव धर्माधिकारी यांनी केले आहे.    बीड शहराच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासमोर असलेल्या बागलानी ईस्टेट येथे प्रथमच ही विजयी संकल्प सभा उद्या सोमवार दिनांक 01 ऑक्टोबर 2018 रोजी दुपारी 12 वाजता होणार असून, सभेचे अध्यक्षस्थान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब हे भूषवणार आहेत.          या मेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.

ऐतिहासिक विजयी संकल्प सभा :_हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे धनंजय मुंडे यांचे आवाहन_

इमेज
*केंद्रात आणि राज्यात परिवर्तन आणि विजयाच्या संकल्पासाठी आज बीडमध्ये श्री.शरदचंद्र पवार साहेब रणशिंग फुंकणार* _*ऐतिहासिक विजयी संकल्प सभेची जय्यत तयारी*_ _हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे धनंजय मुंडे यांचे आवाहन_ बीड दि. 30............... राज्यात आणि केंद्रातील जनता विरोधी सरकार उलथवून टाकण्यासाठी बीडच्या भूमीतून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री खा.श्री. शरदचंद्रजी पवार साहेब हे सोमवारी विजयी संकल्प सभेच्या माध्यमातून रणशिंग फुंकणार आहेत.   बीडच्या नगरीतील ही ऐतिहासिक सभा न भूतो न भविष्यती व्हावी, यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून, परिवर्तनाचे साक्षीदार होण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके, माजी आ.अमरसिंह पंडीत, जिल्हा अध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, युवक नेते संदिप क्षीरसागर आदींनी केले आहे.    बीड शहराच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासमोर असलेल्या बागलानी ईस्टेट येथे प्रथमच ही विजयी संकल्प सभा उद्या सोमवार दिनांक 01 ऑक्टोबर 2018 रोजी दुपारी 12 व

ग्राहक व ठेवीदारांच्या विश्‍वासावर वाटचाल -बाजीराव धर्माधिकारी*

इमेज
*स्वा.वि.दा.सावरकर नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न!* ●_सभासदांना १०  टक्के लाभांश जाहीर_● *ग्राहक व ठेवीदारांच्या विश्‍वासावर  वाटचाल -बाजीराव धर्माधिकारी* परळी वैजनाथ /प्रतिनिधी-दि. शहरातील अग्रगण्य पतसंस्था स्वा.वि.दा.सावरकर नागरी सहकारी पतंसस्थेने अ्रल्पावधीतच ग्राहकांचा विश्‍वास संपादन केला आहे.शहरातील बँकींग क्षेत्रात ग्राहक सेवेत तत्पर व बँकीग व्यवहारात विश्‍वासार्ह पतसंस्था म्हणुन असलेली ओळख कायम ठेवत पतसंस्थेने गेल्या आर्थिक वर्षात ठरवलेले ठेवींचे उद्दीष्ट पुर्ण केले आहे.पतसंस्थेने सरत्या आर्थिक वर्षात 15 कोटी रूपयांच्या ठेवीचे उद्दीष्ट गाठले असुन ग्राहक व ठेवीदारांच्या विश्‍वासावरच ही वाटचाल आहे.असा विश्‍वास पतसंस्थेचे चेअरमन बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी व्यक्त केला आहे. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली या वेळी ते बोलत होते.     संस्थेच्या कार्यालयात आज अध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या वेळी आहवाल व ताळेबंद सभेत सादर करण्यात आला. सरत्या आर्थिक वर्षात 31 मार्च