पोस्ट्स

जुलै ३०, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुन्हा संसदेत राहुल गांधींचा आवाज बुलंद होणार-बहादुरभाई _

इमेज
  सर्वोच्च न्यायालयाचा राहुल गांधींना मोठा दिलासाःपरळी काँग्रेस पक्षाकडून आनंदोत्सव पुन्हा संसदेत राहुल गांधींचा आवाज बुलंद होणार-बहादुरभाई  परळी, प्रतिनिधी....            मोदी आडनावाची मानहानी केल्या प्रकरणी काँग्रेसनेते राहुल गांधी यांना गुजरातच्या उच्च न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना मोठा दिलासा दिल्याने परळीत काँग्रेस पक्षाच्या वतिने शहराध्यक्ष बहादुरभाई यांच्या नेतृत्वाखाली फटाके फोडुन व पेठे वाटुन आंनदोत्सव साजरा करण्यात आला. या खटल्यामुळे लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींची खासदारकी रद्द केली होती. या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे त्यामुळे राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असुन पुन्हा खा.राहुल गांधीचा आवाज संसदेत बुलंद होणार असल्याने काँग्रेस पक्षाच्या वतिने परळी शहरातील काँग्रेस पक्षाच्या सर्व आघाडी प्रमुखानी एकञ येत  शहरातुन मोटार सायकल  रॕली काढत छ.शिवाजी महाराज,राणी लक्ष्मीबाई टावर येथे राहुल गांधी तुम आ
इमेज
  शेतकऱ्याला प्रत्येक वर्षी खरीप व रब्बी पेरणीसाठी हेक्टरी २५ हजार रुपये आर्थिक मदत करा-वसंत मुंडे  परळीवैजनाथ(प्रतिनिधी) महाराष्ट्र मधील शेतकरी हा निसर्गावर अवलंबून आसुन सतत पाऊस वेळेवर न पडत गेल्यामुळे पेरणीला विलंब होतो. प्रत्येक वर्षी बोगस खते बी बियाणे कीटकनाशके औषधी पुरवठा विक्रेत्यामार्फत केल्यामुळे दुहेरी पेरणी करण्याचे संकट शेतकऱ्यावर येते.शासनाचे कोणते कृषी अधिकारी बोगस लायसन देतात त्यावर शासन कंपनी व त्या अधिकाऱ्यावर का कारवाई करीत नाही याची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र शासनाकडे ओबीसी काँग्रेसचे उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केली. महाराष्ट्रात मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांनी जास्त आत्महत्या केल्या असून संपूर्ण मुद्देनिहाय चौकशी करून शासन स्तरावर योग्य निर्णय घेण्याची जबाबदारी शासनाची आहे. पेरणीपूर्वी शेतकऱ्याला खरीप व रब्बी पीक पेरणीसाठी हेक्‍टरी २५ हजार रुपयाची आर्थिक मदत प्रत्येक वर्षी बी बियाणे औषधी खते शेतीतील नियमित कामे करण्यासाठी मदत करणे काळाची गरज आहे. शासन स्तरावर पिक विमा व अतिवृष्टीचे अनुदान हे विविध निकषाखाली डावलून शेतकऱ्यांना सहकार्याची भावना पिक

सर्वांनी मिळून ठरवली पुढील रणनीती

इमेज
विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केली भाजीपाला विक्रेत्यांशी चर्चा सर्वांनी मिळून ठरवली पुढील रणनीती परळी वैजनाथ (प्रतिनिधी) भाजीपाला व फळ विक्रेत्यांच्या स्थलांतर प्रश्नी विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने भाजीपाला विक्रेत्यांशी भेटून चर्चा केली. त्यांचे प्रश्न जाणून घेतल्यावर सर्वांनी मिळून पुढील रणनीती ठरवली. यात प्रामुख्याने भाजीपाला विक्रेते व फळ विक्रेते यांना एकाच ठिकाणी व्यवसायाची व्यवस्था करून द्यावी असे ठरले. यात प्रामुख्याने शेड, बसायला ओटे, पिण्याच्या पाण्याची सोय,दिवाबत्ती,  स्वच्छता गृह, सुरक्षा अश्या मूलभूत सुविधा बाजार समितीने उपलब्ध करून द्याव्यात असे ठरले. कृषी उत्पन्न बाजार समिती भाजीपाला व फळ विक्रेत्यांकडून दररोज २० रुपये प्रमाणे कर वसूल करते. मात्र कोणत्याही सुविधा भाजीपाला व फळ विक्रेत्यांना मिळत नाहीत त्या सुविधा उपलब्ध होईपर्यंत सोमवार दि. ७ ऑगस्ट २०२३ पासून कोणत्याही भाजीपाला व फळ विक्रेत्यांकडून 'ते' २० रुपये कृषी उत्पन्न बाजार समितीने वसूल करू नयेत. यासोबतच गांधी मार्केमधील महात्मा फुले भाजी मंडईचे पुनरुज्जीवन करणे, खाडी नाल्यावरील जागेच
इमेज
  परळीत उद्या शासन आपल्या दारी आणि मराठवाडा मुक्ति संग्राम अमृतमहोत्सवी वर्ष सन-२०२३ महसुल सप्ताह समारोप कार्यक्रम परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        बीड जिल्हा प्रशासनाकडून  परळीत उद्या रविवारी  (दि.६) शासन आपल्या दारी आणि मराठवाडा मुक्ति संग्राम अमृतमहोत्सवी वर्ष सन-२०२३ महसुल सप्ताह समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास कृषीमंत्री धनंजय मुंडे,खा.डॉ.प्रितम मुंडे उपस्थित राहणार आहेत.          रविवार, दि. ६ ऑगस्ट २०२३ वेळ : दुपारी ३:०० वाजता ठिकाण : हालगे गार्डन, परळी वैजनाथ येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने शासन आपल्या दारी आणि मराठवाडा मुक्ति संग्राम अमृतमहोत्सवी वर्ष सन-२०२३ महसुल सप्ताह समारोप कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी - बीड श्रीमती दिपा मुधोळ मुंडे (भा.प्र.से.) या राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी मंत्री धनंजय मुंडे, बीड लोकसभा मतदारसंघाच्या खा.डॉ.प्रितम मुंडे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.  ••• VIDEO NEWS GALLERY   ••• VIDEO NEWS

दुःखद वार्ता: भावपूर्ण श्रद्धांजली

इमेज
  गोविंद मुंडे यांना मातृशोक: सुमित्राबाई बालाजी मुंडे यांचे  निधन परळी (प्रतिनिधी):- खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन तथा माजी नगरसेवक गोविंद बालाजी मुंडे यांच्या मातोश्री सुमित्राबाई बालाजी मुंडे यांचे वर्धापकाळाने दि.4ऑगस्ट 2023 रोजी  निधन झाले. सायंकाळी 5.30 वा. त्यांची प्राणज्योत शिवाजीनगर येथील निवासस्थानी मालवली.मृत्यू समयी त्यांचे वय 75 वर्षे होते. सुमित्राबाई बालाजी मुंडे यांच्या पार्थिवदेहावर दि. 5 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 8 वैद्यनाथ मंदिर जवळील स्मशानभुमी  येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्या धार्मिक कार्यात हिरीरीने सहभाग घेत होत्या. तसेच पंढरपूर, आळंदी  वारीही त्या नित्यनेमाने करीत असत.अत्यंत मनमिळावू व मायाळू असा त्यांचा स्वभाव होता त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.मुंडे कुटुंबीयांच्या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

धनंजय मुंडेंनी यासंदर्भात मांडली एकूण पाच विधयेके

इमेज
  बोगस बियाणे, खते व कीटकनाशके तसेच शेतकऱ्यांची फसवणूक यावर आळा घालणारे विधेयक धनंजय मुंडेंनी केले विधानसभेत सादर धनंजय मुंडेंनी यासंदर्भात मांडली एकूण पाच विधयेके अधिवेशनाच्या सुरुवातीला धनंजय मुंडेंनी केली होती घोषणा मुंबई (दि. 04) - राज्यात बोगस व अप्रमाणीत बियाणे, खते तसेच कीटकनाशके यांच्या निर्मिती व विक्रीवर आळा घालणे तसेच यासंदर्भात शेतकऱ्यांची होणारी फसवणूक यावर प्रतिबंध घालून शेतकऱ्यांना अशी फसवणूक झाल्यास अर्थसहाय्य मिळवून देणे यासंदर्भात राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत विधेयक सादर केले.  यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी एकूण 5 विधेयके विधानसभेत सादर केली आहेत. यामध्ये महाराष्ट्र भेसळयुक्त, अप्रमाणित किंवा गैर छापाची बियाणे, खते किंवा कीटकनाशके यांच्या विक्रीमुळे झालेल्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी विधेयक - 2023, महाराष्ट्र कीटकनाशके कायदा 1968 मध्ये सुधारणा विधेयक - 2023, महाराष्ट्र बियाणे अधिनियम 1966 मध्ये सुधारणा विधेयक - 2023, अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 मध्ये सुधारणा करणे याचबरोबर महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हात भट्टीवाले, औषधी द्र
इमेज
 प्रा. मधुकर शिंदे महाराष्ट्र समता गौरव पुरस्काराने होणार सन्मानित परळी वैजनाथ दि.०४ (प्रतिनिधी)          शहरातील विश्वमंगल फांऊंडेशनचे सचिव प्रा. मधुकर शिंदे यांना जनहित फांऊंडेशनच्या वतीने महाराष्ट्र समता गौरव पुरस्कार घोषित करण्यात आला असून ९ आँगस्ट क्रांतीदिनी मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात येणार असल्याचे जनहित फांऊंडेशनच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.      परभणी येथे ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिवसाचे औचित्य साधून जनहित फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने महाराष्ट्र समता गौरव पुरस्कार वितरण सोहळा हॉटेल विसावा कॅफे पार्क परभणी येथे आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा विनोद सम्राट विजय पाटकर, उद्घाटक माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, माजी राज्यमंत्री गणेशराव दुधगावकर, अँटी करप्शन कमिटीचे रवींद्र दिवेदी, खासदार संजय जाधव,आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राहुल पाटील, विशेष सत्कार मूर्ती परभणीचे जिल्हाधिकारी श्री गावंडे, पोलीस अधीक्षक आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सर्वांच्या प्रमुख उपस्थिती
इमेज
  गेवराई शहरातील ज्येष्ठ नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात-अनिल बोर्डे गेवराई, (प्रतिनिधी)- गेवराई शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांबाबत ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने येथील ग्राहक पंचायतचे ज्येष्ठ कार्यकर्ते व बीड जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे माजी अशासकीय सदस्य अनिल बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार व नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे. गेवराई शहरातील ज्येष्ठ नागरिक व अपंग व्यक्तींना नगरपरिषदेमार्फत एक गाळा किंवा हॉल उपलब्ध करून देण्याबाबत दिनांक २७ एप्रिल २०२३ रोजी निवेदन देऊन प्रत्यक्ष चर्चा करण्यात आली होती. परंतु अद्यापपर्यंत हॉल किंवा गाळा उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. याची गांभीर्याने दखल घेऊन मागणीची पूर्तता करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे. दिवसेंदिवस गेवराई शहराचा विस्तार चोहोबाजूंनी झपाट्याने होत आहे. प्रत्येक वार्डात ज्येष्ठ नागरिक व अपंगांना बसण्यासाठी बेंच उपलब्ध नाहीत तसेच शास्त्री चौक, कोल्हेर रोड, ताकडगाव रोड आदी महत्त्वाच्या ठिकाणी बसण्यासाठी बेंच किंवा खाली बसण्याची व्य
इमेज
  जि प प्रा शा संगम शाळेत शालेय गणवेशाचे वाटप  परळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संगम येथे आज शाळेतील सर्व मुली सर्व मुले यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगम गावचे सरपंच अच्युतराव चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून गटसाधन केंद्राचे लेखा सहाय्यक श्री बाळासाहेब बोंदर साहेब , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नवनाथराव नागरगोजे व  शिक्षणप्रेमीअंकुशराव गिराम यांच्यासह मुख्याध्यापक अशोक नावंदे सर उपस्थित होते. यावेळी समग्र शिक्षा अभियानांतर्गत सर्व मुली , अनुसूचित जाती/जमाती व दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील  विद्यार्थ्यांना गणवेश प्राप्त झाले होते परंतु शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना हे गणवेश वाटण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, संगम गावचे सरपंच व शाळा व्यवस्थापन समितीने च्या मदतीने शाळेतील शंभर टक्के विद्यार्थ्यांना शासनाच्या निर्देशानुसार व शासनाने विहित केलेले गणवेश वाटप करण्यात आले,यावेळी शिक्षक वर्ग सर्वश्री महादेव गीते सर श्री सुभाष कोंकेवाड सर श्रीम. कल्पना बडे मॅडम श्रीमती बबिता शिंदे मॅडम  यांच्यासह  विद्यार्थी उपस्थित होते .सर्व विद्यार्थ्यांना गणव

आंदोलन : मागण्या: सहभागी व्हा :आवाहन

इमेज
  बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचा 9 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा परळी वैजनाथ, प्रतिनिधी...  बीड जिल्हा सिटूच्या वतीने नऊ ऑगस्ट रोजी बीड जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे बांधकाम कामगार मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रा. बी. जी. खाडे यांनी दिली आहे.        ग्रामीण भागातील सर्व बांधकाम कामगारांना नोंदणीसाठी मागील वर्षी 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देण्याची ग्रामसेवकांना लेखी सूचना द्या, ग्रामीण भागातील बांधकाम कामगाराचे अटल घरकुल बांधकाम योजनेचे प्रलंबित प्रस्ताव मंजूर करा, शहरातील बांधकाम कामगारांसाठी घरकुल योजना सुरू करा, साठ वर्षावरील बांधकाम कामगारांना पेन्शन द्या, बांधकाम कामगारांचे योजनेअंतर्गत लाभाचे अर्ज एक महिन्यात मंजूर करून खात्यात रक्कम जमा करा, बोगस आरोग्य तपासणी योजना बंद करून मेडिक्लेम योजना सुरू करा, माध्यान्ह भोजनासाठी प्रत्येक कामगारांना खात्यावर दोन हजार रुपये जमा करा, दरवर्षी बांधकाम कामगारांना बोनस द्या इत्यादी प्रमुख मागण्यासाठी हा मोर्चा
इमेज
  मणिपूर राज्यातील हिंसाचार व महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ परळीत इंडिया समन्वय समितीने काढली रॅली व निषेध सभा  परळी वै ता.४ प्रतिनिधी     मणिपूर येथील गेल्या तीन महिन्यापासून चालू असलेला हिंसाचार आणि महिलांची नग्न धिंड काढून करण्यात आलेला अत्याचार यांच्या विरोधात केंद्र सरकारनी मनिपुर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी या प्रमुख मागण्यांसाठी इंडिया व समन्वय समितीच्या वतीने परळीत शुक्रवारी (ता.४) भव्य रॅली काढून मोंढा मार्केट येथे निषेध सभा घेऊन या घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी बोलताना काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादूरभाई म्हणाले की, मणिपूर येथील घटनेस केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार आहे. माकप चे जिल्हा सचिव कॉ. अजय बुरांडे यांनी देशात ज्या ज्या वेळी महिलावर अन्याय अत्याचार झाला तेंव्हा देश एकजूट झाला आणि अशा अन्याय अत्याचाराला पाठशी घालणाऱ्या सरकारला धडा शिकवला असे प्रतिपादन केले.      मणिपूर येथील हिंसा व महिला अत्याचाराच्या निषेधार्थ आज शुक्रवारी (ता.४) सकाळी ११:०० वाजता राणी लक्ष्मीबाई टावर येथून भव्य अशा निषेध रॅलीला सुरुवात झाली. मनिपुर वाचवा देश वाचवा, संविधान बचाव देश बचा

तयारी स्वातंत्र्य दिनाची :हर घर तिरंगा अभियान

इमेज
  Independence Day | Buy flag online post office : राष्ट्रध्वज मिळणार घरपोच; पोस्टाची सुविधा           येणारा १५ ऑगस्ट हा देशाचा ७६वा स्वातंत्र्य दिन आहे. या निमित्ताने केंद्र सरकारने हर घर तिरंगा अभियना २.० सुरू केले आहे. या अंतर्गत देशभरात पोस्टाकडून राष्ट्रध्वजाची विक्री करण्यात येणार आहे. शिवाय पोस्ट खात्याकडून राष्ट्रध्वजाची ऑनलाईन विक्री ही केली जाणार आहे. ऑनलाईन ध्वजाची मागणी केल्यानंतर ध्वज घरपोच मिळणार आहे. (Buy flag online post office) एका ध्वजाची किंमत २५ रुपये असून डिलिव्हरीसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. तर १ लाख ६० हजार पोस्ट कार्यालयांत ध्वजांची विक्री ऑफलाईन पद्धतीनेही होणार आहे. केंद्र सरकारने १३ ते १५ ऑगस्ट या कालावधित हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येणार आहे. यानिमित्त प्रत्येक नागरिकांने आपल्या घरी राष्ट्रध्वज लावावा असे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. पोस्टातून राष्ट्रध्वज ऑनलाईन मागवण्याची प्रक्रिया 1. पोस्ट खात्याच्या https://www.indiapost.gov.in/  या वेबसाईटवर जा. तेथून E Post ऑफिसवर जा. २. इ पोस्ट ऑफिसच्या पेजवर प्रॉडक्टमध्ये जा. तेथे नॅश
इमेज
  आर्ट ऑफ लिव्हिंगचे 'सहज समाधी ध्यान' सत्र उत्साहात  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील नवगण महाविद्यालयात गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या कृपाशीर्वादाने १ ते ३ ऑगस्ट दरम्यान श्री. रत्नेश्वर शेटे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसीय 'सहज समाधी ध्यान' सत्र उत्साहात संपन्न झाले. तब्बल ४२ जणांनी या कोर्सचा लाभ घेतला. प्रत्येकाने खूप आनंदाच्या क्षणी तसेच एखाद्या कामात पूर्ण बुडून गेलेले असताना असा अनुभव घेतला असेल की ध्यानाचा एक क्षण असा येतो जेंव्हा मन खूप हलके आणि तरल होते. आपण जरी असे क्षण अनुभवले असेल तरी आपण आपल्या इच्छेने तो पुन्हा पुन्हा अनुभवू शकत नाही. सहज समाधी ध्यान आपल्याला तो अनुभव पुन्हा पुन्हा कसा मिळवावा हे शिकवतो. सहज समाधी ध्यान मध्ये सहभागी होणाऱ्याला तणावापासून तत्काळ मुक्ती मिळते, मन खोलवर मोकळे होते आणि सर्व शरीराला पुनर्नवे करते. 'सहज' एक संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ नैसर्गिक किंवा सुलभ असा आहे. 'समाधी' ही एक खूप खोलवर अशी प्रसन्न ध्यानाची स्थिती आहे. 'सहज समाधी ध्यान 'म्हणजे ध्यानाची नैसर्गिक सुलभ प्रक्रिया होय. हे ध्यान

विशेष भेट :महत्त्वपूर्ण प्रश्न :सकारात्मक प्रतिसाद

इमेज
  खा.डॉ. प्रितम मुंडेंनी नितीन गडकरींची भेट घेत मांडले बीड जिल्हयातील विविध रस्तेविषयक प्रश्न  परळी वैजनाथ: बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री  नितीन गडकर यांची खा.डॉ. प्रितम मुंडेंनी  त्यांच्या दिल्लीस्थित कार्यालयात भेट घेतली. यावेळी बीड जिल्हयातील विविध रस्तेविषयक प्रश्न मांडले लातूर जिल्ह्याच्या हद्दीपासून आपल्या जिल्ह्यातील लोखंडी सावरगाव दरम्यानचा महामार्ग चौपदरी करण्यात यावा, याकरिताचा प्रस्ताव रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वार्षिक नियोजनात समाविष्ट करून चौपदरीकरणाला मंजुरी देण्यात यावी ही मागणी यावेळी सादर केली. तसेच तेलगाव-सिरसाळा ( राष्ट्रीय महामार्ग 361 F ) या वीस कि.मी रस्त्याचे पदपथासह चौपदरीकरण करण्यात यावे व वार्षिक योजनेत सदरील रस्त्याचा समावेश करून मंजुरी द्यावी ही मागणी केली. तसेच धारूर तालुक्यातील घाटात असलेल्या अरुंद रस्त्याविषयी त्यांच्याशी चर्चा केली. धारूर घाटात राष्ट्रीय महामार्ग ( 548 C ) अरुंद असल्यामुळे येथे अपघात प्रवण क्षेत्र तयार झाले आहे, याठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण करणे अत्यंत आवश्यक असल्या
इमेज
इयत्ता १० वी व १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार - राजेश कौलवार        आर्य वैश्य मंगल कार्यालय परळी वैद्यनाथ येथे  दि. ०२/०७/२०२२ रोजी आर्य वैश्य समाज परळी वैद्यनाथ व स्व. वंदना नागनाथ पारसेवार प्रतिष्ठान च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला. पुरुषोत्तम अधिक मासानिमित्त ह.भ.प. माऊली महाराज रुमणेकर यांच्या रसाळ वाणीतुन गाथा पारायणाची काल सांगता झाली. या कार्यक्रमात आर्य वैश्य समाजातील इयत्ता १० व १२ च्या ८०% पेक्षा जास्त गुण असलेले विद्यार्थी गुणवंत ठरविण्यात आले.तसेच १० वर्गात परळी आर्य वैश्य समाजात ९६.६०% गुण घेऊन कु. स्वाती राजेश्वर गडगुळ ही प्रथम तर अभिषेक अमोल रुद्रवार हे ९१.६०% गुण प्राप्त करुन द्वितीय आले तर १२ वर्गात वरद प्रकाश चिद्रेवार हा ८३.६७ तर वेदांती अनिल बोतकुलवार ही ८३% गुण संपादन करुन द्वितीय* *आली तसेच ७ विद्यार्थ्यांचा प्रोत्साहन पर  सत्कार करण्यात आला. या सर्वांचा रुमणेकर महाराज व ईतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.       या प्रसंगी विकासदादा डुबे , नागनाथ पारसेवार, सतीश चौलवार, रमेश कोमावार,  सुरेश गडम, रामकिशन देवषटवार,  श्रीन
इमेज
पुरूषोत्तम मासानिमित्त परळी महात्म्य कथा, किर्तन महोत्सव  ह.भ.प.युवा किर्तनकार प्रकाश महाराज फड यांचे किर्तन परळी वैजनाथ  आई - वडीलांच्या स्मरणार्थ आणि पुरूषोत्तम मासानिमित्त भास्कर मामा चाटे परिवाराच्या वतीने परळी महात्म्य कथा, संत तुकाराम गाथा पारायण व किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते भास्कर मामा चाटे यांनी केले आहे. बुधवार दि. 2 ते 10 ऑगस्ट दरम्यान मुक्ताई लॉन्स शिवाजी नगर, येथे हा कार्यक्रम होणार आहे. आज दि.3 रोजी युवा किर्तनकार प्रकाश महाराज फड यांचे किर्तन सायं.6 ते 8 या वेळेत संपन्न होणार आहे.     यात कथा प्रवक्ते ह. भ. प. भरत महाराज जोगी असुन गाथा पारायण प्रमुख ह. भ. प. माऊली महाराज रूमणेकर आहेत. दुपारी 1 ते 4 वाजेदरम्यान परळी महात्म्य कथा होणार आहे तर 7 ते 11 गाथा पारायण तर रात्री 6 ते 8 या वेळेत हरि कीर्तन होणार आहे. दरम्यान दि. 2 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट या दरम्यान रोज रात्री 6 ते 8 या वेळेत अनुक्रमे ह. भ. प. भागवताचार्य मंगेश महाराज डाबीकर यांची किर्तन सेवा संपन्न झाली. ह. भ. प. प्रकाश महाराज फड आळंदीकर

संवेदनशिल मनाचे चतुरस्त्र व्यक्तीमत्व जाण्याने पत्रकारीता क्षेत्राचे मोठे नुकसान

इमेज
  संवेदनशिल मनाचे चतुरस्त्र व्यक्तीमत्व जाण्याने पत्रकारीता क्षेत्राचे मोठे नुकसान जेष्ठ पत्रकार प्रशांत जोशी यांना शोकसभेतून श्रध्दांजली; अनेकांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना परळी (प्रतिनिधी) मराठवाडा साथीचे कार्यकारी संपादक तथा जेष्ठ पत्रकार प्रशांत जोशी यांचे दि.३० जून रोजी दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने पत्रकारीतेबरोबरच परळीच्या पत्रकारीतेबरोबरच सामाजिक, सांस्कृतीक, धार्मीक आणि शैक्षणीक क्षेत्रातील एक अष्टपैलू व्यक्तीमत्व आपण गमावले आहे. अशा व्यक्तीमत्वाच्या जाण्यामुळे परळीच्या सांस्कृतीक क्षेत्राची खूप मोठी हाणी झाली असून, ती कशानेच भरून निघणार नाही अशा शोकभावना अनेकांकडून व्यक्त करण्यात आल्या. बुधवार, दि.०२ जुलै रोजी परळीच्या औद्योगीक वसाहत सभागृह येथे पत्रकार प्रशांत जोशी यांच्याप्रती शोकसंवेदना व्यक्त करण्यासाठी शोकसभा घेण्यात आली. या शोकसभेत राजकीय, सामाजिक, सांस्कृतीक, साहीत्य, कला, क्रिडा, पत्रकारीता, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील अनेकांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. जेष्ठ पत्रकार प्रशांत जोशी यांच्या निधनाने संपूर्ण पत्रकारीता क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. परळी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

इमेज
खा. डॉ. प्रीतम मुंडे यांच्या पाठपुराव्यामुळे अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाचे रूप पालटणार  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन परळी वैजनाथ बीड जिल्ह्यच्या खा. डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र सरकारच्या अमृत भारत  योजनेअंतर्गत परळी वैजनाथ रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकास होणार आहे. रविवार, 6 ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते या कामाचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यामुळे आता परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाचे रूप पालटणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने साऊथ सेंट्रल रेल्वेचे अपर मंडळ प्रबंधक राजीव कुमार गंगेले यांची भेट घेतली. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत देशभरातील अनेक रेल्वे स्टेशनचा चेहरा मोहरा बदलला जाणार आहे. सदरील योजनेत परळी वैजनाथ रेल्वेस्थानकाचा समावेश करावा यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे खा. प्रीतमताई मुंडे यांनी सतत पाठपुरावा केला. या योजनेत आता परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे. रविवार 6 ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
इमेज
  महिला महाविद्यालयातील प्रा.शेप नेट परिक्षा उत्तीर्ण; महाविद्यालयाच्या वतीने सत्कार परळी वैजनाथ दि.०२ (प्रतिनिधी)            येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील प्राध्यापिका पृथ्वी देविदास शेप या नुकतीच राष्ट्रीय स्तरावरील रसायनशास्त्रातील युजीसी नेट परिक्षा पास झाल्या असून महाविद्यालयाच्या वतीने बुधवारी (दि.०२) शाल, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.                 लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील प्राध्यापीका पृथ्वी देविदास  शेप यांनी यापूर्वी वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असलेली अत्यंत कठीण असलेली सेट परिक्षा उत्तीर्ण झाल्या असून आता नुकतीच रसायनशास्त्र विषयातून राष्ट्रीय स्तरावर असलेली पात्रता परिक्षा युजीसी नेट या उत्तीर्ण झाल्या आहेत. लग्न झाल्यानंतरही अत्यंत कठीण परिस्थितीत मुलेबाळे संभाळून शिक्षणा संदर्भात जिद्द असल्याने युजीसी नेक परिक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. याबद्दल महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या वतीने बुधवारी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्या डॉ विद्याताई देशपांडे यांच्या हस्ते शाल
इमेज
  जागृत विद्यार्थ्यांच्या मतदानाच्या अधिकारातून उज्वल राष्ट्र निर्माण होते- तहसीलदार संदीप पाटील    परळी, प्रतिनिधी.... जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही विषयी जनजागृती घडून आणण्यासाठी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ.आर डी राठोड, प्रमुख मार्गदर्शक परळी नगरीचे तहसीलदार श्री संदीप पाटील मंडल अधिकारी श्री कुमुटकर, उपप्राचार्य हरिष मुंडे, प्रा.डी के आंधळे, प्रा उत्तम कांदे, प्रा मंगला पेकंमवार यांची उपस्थिती होती.एक ऑगस्ट पासून महसूल दिनानिमित्त महसूल सप्ताह साजरा करीत आहे . सप्ताह च्या माध्यमातून युवा वर्गामध्ये संवाद साधण्यासाठी महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डी.के आंधळे यांनी  लोकशाहीच्या तंत्र या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व लोकशाहीचे महत्त्व ही आजच्या काळाची गरज आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते तहसीलदार संदीप पाटील यांनी तरुणांनी या स्पर्धेच्या युगा

माती परिक्षण आणि बीज संशोधनावर भर देणार

इमेज
  नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे सामर्थ्य -कृषी मंत्री धनंजय मुंडे - कृषी मंत्री धनंजय मुंडे उत्पादन वाढविण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून माती परिक्षण आणि बीज संशोधनावर भर देणार मुंबई, दि. 2: नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे सामर्थ्य आहे. यासाठी खरीप व रब्बी हंगामात  शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी हवामान बदलाचा अंदाज घेऊन माती परीक्षण आणि बीज संशोधनावर अधिकाधिक भर द्यावा, अशा सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. आज मंत्रालयात नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पासंदर्भात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कृषी मंत्री श्री.  मुंडे बोलत होते. या बैठकीस कृषी विभागाचे प्रधान सचिव परिमल सिंह, उपसचिव संतोष कराड, अवर सचिव महेंद्र घाडगे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.   कृषी मंत्री मुंडे म्हणाले की, हवामान बदलामुळे उद्धवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास आणि त्यानुसार पिकाचे उत्पादन घेण्यासंदर्भात तसेच बीज निर्मिती प्
इमेज
  मणिपुर मधील जातीय हिंसा व महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ विद्यार्थी व युवक युवतींची तीव्र निदर्शने एसएफआय, डीवायएफआय विद्यार्थी युवक संघटनेचे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निदर्शने परळी / प्रतिनिधी मणिपुर मधील जाती हिंसा थांबवून केंद्र सरकारने तेथील राज्य सरकार बरखास्त करावे, कुकी आदीवासी महिलांची नग्न धिंड काढणार्‍या जमावावर त्यांना शोध घेऊन  गुन्हे दाखल करावेत. या गुन्हेगारांना फासावर लटकवा या प्रमुख मागणीसाठी परळी येथे बुधवार, दि.02 ऑगस्ट रोजी एसएफआय, डीवायएफआय या विद्यार्थी युवक संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज परळी येथे  जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करून निवेदन देण्यात आले. एसएफआय, डीवायएफआय या विद्यार्थी,युवक,युवती संघटनेच्या वतीने बुधवार रोजी जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,गेल्या अडीच महिन्यांपासून मणिपूर जळत आहे, केंद्र सरकारने कुकी आदिवासींचे आरक्षण गैर आदिवासी मैतई जातीस देणे बाबत आश्वासन देऊन दोन भिन्न जात जमातीत आग लावली, संपुर्ण देशात लोकांचे जिवन जगण्याचे प्रश्न सोडून हिंदु, मुसलमान, हिंदु, खिश्चन आ
इमेज
संत विचारानेच टिकेल राष्ट्रीय एकात्मता -बापूसाहेब देहूकर यांनी व्यक्‍त केला आशावाद! पंढरपूर (प्रतिनिधी) : वारकरी संतांनी कायम सामाजिक ऐक्याची भूमिका मांडली. सर्व जाती-धर्मांतील संत वारकरी परंपरेत पहायला मिळतात. म्हणूनच या देशातील एकात्मता ही संत विचारानेच भक्कम होईल, असा आशावाद तुकाराम महाराज यांचे वंशज, देहूकर फडाचे प्रमुख बापूसाहेब महाराज देहूकर यांनी व्यक्‍त केला. तर संताचे विचार आणि त्यातील एकात्मतेचं मूल्य टिकवून ठेवण्याचे काम दिंडीकरी-फडकरी परंपरेने केले आहे, असे मत विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे संचालक, दिंडीकरी, फडकरी संघटनेचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी व्यक्‍त केले. संविधानाचा सन्मान आणि राष्ट्रीय प्रतिकांचा स्वाभिमान जागविण्यासाठी संविधान समता दिंडी आयोजित राष्ट्रचेतना अभियानाचा प्रारंभ पंढरपूर येथील 'तुकाराम भवन' सभागृहात झाला. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रध्वज तिरंगा झेंडा, राष्ट्रगीत जन-गण-मन, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्ट या राष्ट्रीय प्रतिकांबद्दल समाजातील आदराची भावना भक्कम व्हावी यासाठी संविधान समता दिंडीच्या वतीने

अण्णाभाऊ साठे जयंती

इमेज
  आजच्या समाजाला थोर महापुरुषांचे विचार प्रेरणादायी -प्राचार्य डॉ आर. डी. राठोड      परळी वैजनाथ,  प्रतिनिधी....           जवाहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर डी राठोड यांनी अशा थोर महापुरुषांचे विचार आजच्या समाजाला प्रेरणादायी आहेत असे मत व्यक्त केले.       साहित्यकार अण्णाभाऊ साठे यांनी वंचित, उपेक्षित, दुर्लक्षित समाजाला लेखणीच्या माध्यमातून दिशा देण्याचे कार्य केले. त्याचबरोबर लोकमान्य टिळकांनी आपले प्रखर विचार राष्ट्रवादी दृष्टिकोनातून मांडनीं केली. तसेच लोकमान्य टिळकांनी चतुसूत्री च्या माध्यमातून ब्रिटिश सरकारच्या विरोधात आक्रमक पावले उचलली होती असेही मत याप्रसंगी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.दिलीप गायकवाड यांनी केले. तर आभार डॉ बी के शेप यांनी मानले. या कार्यक्रमाला  महाविद्यालयाचे उपप्राचार्य हरिश मुंडे, डॉ.बा आं.म विद्यापीठ परिषदेचे सदस्य,डॉ पी एल कराड, कार्यालयीन प्रमुख अशोक रोडे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.