पोस्ट्स

ऑक्टोबर ७, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अन्यथा करावी लागणार तुरुंगवारी...

इमेज
  बीड जिल्ह्यात निवडणूक निकालानंतर मिरवणुकांवर बंदी - पोलीस अधीक्षकांनी दिले सक्त निर्देश बीड : पोलीस अधीक्षक नवनीत कावत, बीड जिल्हा यांच्याकडून सर्व नगरपरिषद उमेदवारांना तसेच त्यांच्या समर्थकांना सक्त निर्देशित करण्यात आले आहे.बीड जिल्ह्यात निकालानंतर मिरवणुकांवर बंदी असुन कायद्याच्या विरोधात जाईल असे कोणतेही कृत्य करण्याचे टाळावे असे पोलीस अधीक्षकांनी  सक्त निर्देश दिले आहेत.        आज होणाऱ्या मतमोजणीच्या निकालानंतर कोणत्याही प्रकारची मिरवणूक, रॅली, विजयी जल्लोष, घोषणा, फटाके फोडणे किंवा जमाव जमविण्यास पोलीस प्रशासनातर्फे कोणतीही परवानगी देण्यात येणार नाही.तसेच  जिल्हाधिकारी, बीड यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37(1)(3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले असून, सदर आदेश दि. 19/12/2025 रोजी रात्री 00.01 वा. पासून ते दि. 02/01/2026 रोजी रात्री 24.00 वा. पर्यंत लागू राहतील. विनापरवाना मिरवणूक काढणे, जमाव करणे, रस्ते अडविणे किंवा सार्वजनिक शांतता भंग होईल असा कोणताही प्रकार पूर्णतः प्रतिबंधित आहे.         आदेशाचे उल...

अन्यायकारक भारनियमन : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १५ रोजी कंदील मार्च!*

इमेज
* अन्यायकारक भारनियमन : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १५ रोजी कंदील मार्च!*  ● _मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - बाजीराव भैय्या धर्माधिकारी_ ●  परळी वैजनाथ |प्रतिनिधी. .....           अन्यायकारक व  चुकीच्या भारनियमनामुळे जनता त्रस्त झाली असुन जनतेचा मोठा असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत विधान परिषद विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १५ रोजी पावर हाउसवर  कंदील मार्च आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती  माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिली आहे.      सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे राज्य अंधारात आहे. भार नियमनमुक्त महाराष्ट्र करण्याच्या पोकळ घोषणा करणार्‍या सरकारला जाब विचारावाच लागेल. परळी शहरावर अन्यायकारक व चुकीच्या पद्धतीने भारनियमन लादले आहे. शहराचा वीज पुरवठा कोणत्याही क्षणी बंद करणे, कोणत्याही क्षणी चालू करणे असा नियम करण्यात आला आहे. वास्तविक वीज निर्मिती केंद्र असलेले परळी  शहर भारनियमन मुक्त ठे...
इमेज
परळीत नवरात्रोत्सवाची लगबग; ३० दुर्गोत्सव मंडळे !  आॅनलाईन परवाने मिळवण्याची मंडळांची घाई    परळी वैजनाथ /प्रतिनिधी . .............        नवरात्रोत्सव काळातील विविध परवानग्या प्राप्त करण्यासाठी  मंडळे सध्या  प्रयत्नशील आहेत. परळीत ३० दुर्गोत्सव मंडळे असणार आहेत. मात्र तूर्तास परवाना प्रक्रिया सुरू आहे. परळीतील ३०  मंडळे  या परवान्याच्या  प्रतिक्षेत आहेत. आॅनलाईन परवाने मिळवण्याची मंडळांची घाई  सुरू असल्याचे दिसून येत आहे.         सध्या नवरात्रोत्सवाची लगबग सुरू आहे. शहरात दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिळून २३ दुर्गोत्सव  मंडळे आहेत.तर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७ दुर्गोत्सव  मंडळे आहेत.  शहर पोलीस ठाणे व संभाजीनगर पोलीस ठाणे या हद्दीत मंडळांना ध्वनिक्षेपक, मिरवणूक आदी परवानग्या देण्यात येतील. मंडळांनी वीज जोडणीबाबतचा अधिकृत परवाना वीज वितरण कंपनीकडून घेणे बंधनकारक आहे. तसेच धर्मादाय कार्यालयाकडील नोंदणीचे अधिकृत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. त्या...

*....तर मोदी 2022 साली संपूर्ण संविधान बदलून टाकतील - धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली भीती*

इमेज
*....तर मोदी 2022 साली संपूर्ण संविधान बदलून टाकतील - धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली भीती* औरंगाबाद दि 9 ----  डॉ. ए.पी.जे. कलाम हे 2020 साली भारत महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत होते, मात्र सध्याचे सरकार 2022 साली संपूर्ण संविधानच बदलून टाकण्याचे स्वप्न पाहत आहे अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी  आयोजित संविधान बचाव परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सौ. सुप्रियाताई सुळे, माजी मंत्री फोजिया खान, आ. राजेश टोपे, आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, भाऊसाहेब चिकटगावकर, प्रकाश गजभिये, विजय भाम्बळे, सौ. चित्राताई वाघ, सुरेखाताई ठाकरे, कदिर मौलाना आदी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच देशाची वाटचाल योग्य रितीने चालली होता. मात्र आज या संविधानावर घाला घातला जात आहे. मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आले तर 2022 साली संपूर्ण संविधान बदलून टाकतील अशी भीती धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. काही वृत्तवाहिनीच्या पत्रकारांनी सरकारची पोलखोल केली म्हणून त्य...

अन्यायकारक व चुकीच्या भारनियमनामुळे जनता त्रस्त

इमेज
अन्यायकारक व   चुकीच्या भारनियमनामुळे जनता त्रस्त  ! **_राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व्यापक जन आंदोलन उभे करणार -  बाजीराव भैय्या धर्माधिकारी_* ●  परळी वैजनाथ |प्रतिनिधी. .....    ऐन सणासुदीच्या तोंडावर  अन्यायकारक व    चुकीच्या भारनियमनामुळे जनता त्रस्त   झाली आहे. या प्रश्नी आता जनतेचा मोठा असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत विधान परिषद विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व्यापक जन आंदोलन उभे करणार असल्याचा इशारा माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिला आहे.     माजी उपमुख्यमंत्री आ.अजितदादा पवार यांनी भाररनियमनमुक्ती करून दाखवली होती . अजितदादांचा भारनियमन मुक्तीचा हा वारसा या सरकारने ना चालवला ना टिकवला. आता  ग्रामीण भाग आणि महानगरेही अंधारात आहेत. लोड शेडिंगमुळे त्रस्त जनतेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.राष्ट्रवादी काँग्रेस याप्रश्नी तीव्र आंदोलन करणार आहे.सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे र...

_ह.भ.प.वै.दादासाहेब महाराज बोरखेडकर यांचा चौदावा पुण्यस्मरण महोत्सव_ *भागवत मर्मज्ञ ह-भ-प सुरेंद्र(बाळु) महाराज उखळीकर यांच्या सुश्राव्य वाणीतुन श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ*

इमेज
_ह.भ.प.वै.दादासाहेब महाराज बोरखेडकर यांचा चौदावा पुण्यस्मरण महोत्सव_  *भागवत मर्मज्ञ ह-भ-प सुरेंद्र(बाळु) महाराज उखळीकर यांच्या सुश्राव्य वाणीतुन श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ*  परळी वैजनाथ। प्रतिनिधी ...      तालुक्यातील बोरखेड येथे महान संत ह.भ.प. वै. दादासाहेब महाराज बोरखेडकर यांचा चौदावा पुण्यस्मरण महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त भागवतमर्मज्ञ ह-भ-प सुरेंद्र(बाळु) महाराज उखळीकर यांच्या सुश्राव्य वाणीतुन श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात नामांकित कीर्तनकार यांची कीर्तन सेवा होणार आहे.

मराठवाडा आणि राज्यात अभुतपुर्व, भिषण दुष्काळी परिस्थिती असतांनामुख्यमंत्री गप्प का ?* - धनंजय मुंडे

इमेज
* मराठवाडा आणि राज्यात अभुतपुर्व, भिषण दुष्काळी परिस्थिती असतांनामुख्यमंत्री  गप्प का ?*  * _तातडीने दुष्काळ जाहिर करण्याची धनंजय मुंडे यांची मागणी_* मुंबई दि.07...............मराठवाड्या सोबतच संपुर्ण राज्यात या वर्षी अभुतपुर्व आणि भिषण दुष्काळाची परिस्थिती असतांना अनेक विषयांवर बोलणारे मुख्यमंत्री दुष्काळाच्या प्रश्नावर गप्प का ? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला असुन सरकारी कागद रंगवण्यापेक्षा तातडीने दुष्काळ जाहिर करा अशी अग्रही मागणी त्यांनी केली आहे. मराठवाड्यात या वर्षी पावसा आभावी भिषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकर्‍यांची पेरणी वाया गेली असुन, आलेली थोडीफार पीके ही करपुन आणि विविध रोगांनी ग्रासली आहेत. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही अशीच परिस्थिती असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेती सोबतच पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चार्‍याचाही प्रश्न आता पासुनच गंभीर बनला आहे. राज्यातील या भिषण परिस्थितीबद्दल धनंजय मुंडे यांनी आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पत्र...

आजचे दै. पुढारी परळी वैजनाथ वार्तांकन ....

इमेज
आजचे दै. पुढारी परळी वैजनाथ वार्तांकन 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!