पोस्ट्स

जून ११, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
  लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. विद्याताई देशपांडे- देशमुख यांची निवड परळी वैजनाथ (प्रतिनिधी)           तालुक्यातील एकमेव असलेल्या कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. विद्याताई देशपांडे - देशमुख यांची नुकतीच निवड समितीच्या माध्यमातून निवड करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.               येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या दिवंगत प्राचार्या डॉ रेखा परळीकर यांचे निधन झाल्याने हि जागा रिक्त झाली होते. यानंतर गेली दोन वर्षे प्रभारी प्राचार्य म्हणून डॉ. लक्ष्मण मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. शासनाच्या परवानगी नंतर प्राचार्यपदाची भरती करण्यात आली. या प्राचार्य पदाच्या भरती प्रकियेतील निवड समितीने प्राचार्य म्हणून डॉ विद्याताई देशपांडे- देशमुख यांची निवड केली. विद्याताई देशपांडे यांनी प्राचार्यपदाचा कार्यभार गुरुवारी (ता.१५) स्विकारला. प्राचार्यपदी विद्याताई देशपांडे यांची निवड झाल्याबदल संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक अनिलराव देशमुख, संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, सचिव रविंद्र देशमुख, कोषाध्यक्ष प

शासनकर्त्यांनी शेतकऱ्यांचे ससेहोलपट थांबवावी अन्यथा पुन्हा एल्गार ; काॅ.एड. अजय बुरांडे

इमेज
 ■ कोरड्या घोषणांचा सुकाळ; शेतकऱ्यांच्या माथी मात्र कायम दुष्काळ ● शासनकर्त्यांनी शेतकऱ्यांचे ससेहोलपट थांबवावी अन्यथा पुन्हा एल्गार ; काॅ.एड. अजय बुरांडे परळी / प्रतिनिधी मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतातुर झालेला असताना किसान सभेच्या प्रदीर्घ लढ्यानंतर अखेर राज्य सरकारने सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दीड हजार कोटी रुपयाच्या मदतीची घोषणा केली खरी; पण ही मदत केव्हा वितरित होणार हा प्रश्नच अनुत्तरितच आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी नुकसानीच्या मदतीसाठी केलेल्या संघर्षांती राज्य सरकारने मोठ्या अविर्भावात डांगोरा पीठून मदतीची घोषणा केली; पण या मदतीपासून निम्म्यापेक्षा जास्त शेतकरी अजूनही वंचित आहेत. ही मदत कधी शेतकऱ्यांना मिळेल याचे ना शासन ना प्रशासन कुणीही उत्तरदायित्त्व घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यायला तयार नाही की साधं बोलायला तयार नाही. म्हणून या घोषणा 'बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी' होऊ नयेत म्हणून किसान सभा रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. शेतकऱ्यांना छळणाऱ्या शेतमालाचे भाव पाडणाऱ्या लॉबीला पाठीशी घालून शेतकरी विरोधी धोरणे राबवणाऱ्या शास

एमपीलच्या आयोजनाबद्दल रोहित पवारांचे केले अभिनंदन

इमेज
  एमसीएच्या पुण्यातील स्टेडियमला खा.शरदचंद्र पवार यांचे नाव द्यावे - धनंजय मुंडेंची मागणी एमपीलच्या आयोजनाबद्दल रोहित पवारांचे केले अभिनंदन पुणे (दि. 16) - पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानास बीसीसीआय व आयसीसीचे माजी अध्यक्ष, पद्मविभूषण खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांचे नाव देण्याची मागणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहितदादा पवार यांच्याकडे केली आहे. धनंजय मुंडे यांनी रोहित दादा पवार यांना या संदर्भात एक पत्र लिहिले आहे. या पत्रात आयपीएलच्या धर्तीवर एम पी एल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन व आमदार रोहित दादा पवार यांचे अभिनंदनही केले आहे. एमपीएल स्पर्धेत धनंजय मुंडे यांच्या मालकीचा छत्रपती संभाजी किंग्स हा मराठवाड्याचा संघ सहभागी झाला आहे. या संघाच्या सामन्यांच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी ही मागणी केली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन, बीसीसीआय त्याचबरोबर आयसीसीचे अध्यक्ष राहिलेल्या पद्मविभूषण खासदार शरदचंद्र पवार यांचे क्री

परळीच्या ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा पोहोचवणारा भगीरथ हरवला

इमेज
  परळीच्या ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा पोहोचवणारा 'भगीरथ' हरवला: गौतमबापू  नागरगोजे यांचे निधन परळी ---         ग्रामीण भागात शिक्षणाची  गंगोत्री निर्माण करणारे , शिक्षण महर्षी गौतम बापू नागरगोजे यांचे वृद्धापकाळाने आज दि.16 जून रोजी निधन झाले.        मागील काही महिन्यांपासून ते  आजारी होते. आज शुक्रवारी सकाळी 7 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. ते 81 वर्षांचे होते .ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी,त्यांना उत्तम शिक्षण मिळावे या हेतूने त्यांनी इंद्रायणी प्रतिष्ठान व सरस्वती प्रतिष्ठानची निर्मिती केली.मागील तीन दशकांपासून या प्रतिष्ठान मार्फत अनेक शाळा महाविद्यालय स्थापन करून गौतम बापू यांनी एकप्रकारे ग्रामीण भागात शिक्षणाची गंगोत्री खेचून आणली.धर्मापुरी,दैठणा घाट,लाडझरी,घाटनांदूर,डोंगर पिंपळा , मांडवा,आचार्य टाकळी,अशी खेडी पाडी,वाडी वस्त्यांवर शाळा उघडल्या.या ठिकाणच्या सर्व शाळा, महाविद्यालय मधून असंख्य विद्यार्थी शिक्षण घेवून आज विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवून अग्रेसर आहेत.         प्रशासनावर मजबूत पकड,सर्व विषयांचे प्रगल्भ ज्ञान असणारे गौतमबापू  यांनी ग
इमेज
  अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा बसवलिंग पत्रवाळे यांचे नीट परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल परचुंडी गावकऱ्यांच्या वतीने सत्कार परळी वैजनाथ/ प्रतिनिधी  परळी तालुक्यातील मौजे परचुंडी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा बसवलींग पत्रवाळे याने नीट परीक्षेत 620 गुण घेऊन यश संपादन केले त्याबद्दल त्याचा परचुंडी गावकऱ्यांच्या वतीने गुरुवार दिनांक 15 जून रोजी शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. अल्पभूधारक शेतकरी देवराव पत्रवाळे यांचे चिरंजीव बसवलिंग पत्रवाळे उर्फ बंडू याने नीट परीक्षेत 620 गुण घेऊन आपला डॉ होण्याचा मार्ग मोकळा केला,अत्यंत हालखीच्या परिस्थितीस लढा देत त्याने हे यश संपादन केले. आपल्या परचुंडी गावाचा भूमिपुत्र बंडू हा डॉ होणार याचा आनंद अख्या गावाने साजरा केला.        वडील देवराव पत्रवाळे, आई महानंदा पत्रवाळे व बसवलिंग पत्रवाळे यांचा हृदय सत्कार करण्यात आला. यावेळी फेटा बांधून,शाल,श्रीफळ,पुष्पहार, पुष्पगुच्छ, पेढे भरून आनंद साजरा करण्यात आला. कार्यक्रमास सुभाष पाटील, वसंतआप्पा नावंदे,आदर्श शिक्षक अशोक नावंदे,वैजाप्पा पत्रवाळे,अजय गडदे,गणेश गडदे,सुनील नावंदे,नितीन सरांडे, वश

एसटी वाहकाची आत्महत्या

इमेज
एसटी वाहकाची आत्महत्या केज :- केज तालुक्यातील सारणी (सांगवी) येथे धारूर एस टी आगारातील वाहकाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या बाबतची माहिती अशी की, गुरुवार दि. १५ जून रोजी धारूर एसटी आगारात वाहक असलेले महादेव ज्ञानोबा धस वय ३५ वर्ष रा. सारणी (सांगवी) यानी सारणी (सांगवी) शिवारातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजलेले नसून घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राम यादव यांनी पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासमीसाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे हलविले. मयत वाहक महादेव धस यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी विशेष पथके नेमावीत - मुंडेंचे कृषी मंत्र्यांना पत्र

इमेज
  बोगस बियाणे, चढ्या भावाने विक्री, खत-बियाण्यांची साठेबाजी रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा - धनंजय मुंडे ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी विशेष पथके नेमावीत - मुंडेंचे कृषी मंत्र्यांना पत्र 850 रुपयांची कापसाची बॅग 2000 हजाराला विकतात, मुंडेंनी मांडली वस्तुस्थिती मुंबई (दि.15) - खरीप हंगामाच्या तोंडावर मराठवाड्यात काही क्षेत्रात पाऊस झाला तर काही क्षेत्रांमध्ये अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे परंतु शेतकरी वर्गात सोयाबीन कपाशी यासह विविध बियाणे खरेदी करण्याबाबत लगबग सुरू आहे. याचाच फायदा घेऊन अनेक प्रकारचे बोगस बियाणे राज्यभरात बाजारात आणून प्रसिद्ध ब्रँडची नावे वापरून, चढ्या भावाने विक्री केली जात आहेत. शेतकऱ्यांची संभाव्य फसवणूक टाळण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने यावर तात्काळ उपाययोजना करावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांनी पत्राद्वारे कृषिमंत्र्यांकडे केली आहे.  धनंजय मुंडे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. एक जून रोजीच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यातील चिखली एमआयडीसी परिसरात छत्रपती संभाजी नगर येथील एका नामांकि
इमेज
  MPL : धनंजय मुंडेंच्या छत्रपती संभाजी किंग्स संघात मराठवाड्यातील 12 खेळाडूंचा समावेश! पुणे : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने पुण्यात 15 जून पासून सुरू होत असलेल्या महाराष्ट्र प्रीमिअर लीग (MPL) मध्ये मराठवाड्याची छत्रपती संभाजी किंग्स ही टीम सहभागी होत आहे. या टीम मध्ये मराठवाड्यातील तब्बल 12 खेळाडूंचा समावेश आहे.  आ. धनंजय मुंडे यांच्या वेंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने मराठवाड्याच्या छत्रपती संभाजी किंग्स संघाने या स्पर्धेत भाग घेतला आहे. मराठवाड्यातल्या जास्तीत जास्त प्रतिभावान खेळाडूंना संधी मिळावी या दृष्टीने धनंजय मुंडे यांनी खेळाडूंच्या लिलावात सहभागी होऊन मराठवाड्यातील  जास्तीत जास्त खेळाडू आपल्या संघात घेण्यासाठी प्रयत्न केले.  या संघाचा आयकॉन प्लेयर असलेला धाराशिवचा राजवर्धन हंगरकेर हा वेगवान गोलंदाज असून, तो नुकत्याच संपलेल्या आयपीएल मध्ये धोनीच्या सीएसके संघाकडून खेळला आहे. त्याचबरोबर इंडिया अंडर नाइंटिन संघात विश्वचशक देखील खेळलेला आहे.  याच संघात जालन्याचा वेगवान गोलंदाज रामेश्वर दौंड आणि ऑल राउंडर आकाश जाधव यांचाही समावेश
इमेज
  शासन आपल्या दारी हा उपक्रमात लाभार्थ्यांना विविध योजनांच्या लाभाचे वितरण जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे व आमदार नमिता मुंदडा यांच्या हस्ते प्रमाणपत्र, विविध दाखले व लाभ वितरित  शासन आपल्या दारी हा उपक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे , आमदार नमिता मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अंबाजोगाई येथे करण्यात आले होते. त्यांच्या हस्ते यावेळी लाभार्थ्यांना विविध योजनांच्या लाभाचे वितरण करण्यात आले. अंबाजोगाई, कैज, परळी या तालुक्यातील लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ तसेच प्रमाणपत्र व विविध दाखले यांचे वितरण करून संपन्न झाला. शासन आपल्या दारी हा उपक्रमांतर्गत तिन्ही तालुक्यातील निवड केलेल्या पात्र लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण साठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .   याप्रसंगी आमदार नमिता मुंदडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार सर, अप्पर जिल्हाधिकारी (अंबाजोगाई) सुनील यादव, उपविभागीय अधिकारी शरद झाडगे, तिन्ही तालुक्यातील तहसीलदार गटविकास अधिकारी व विविध शासकीय अधिकारी आणि विविध योजनांचे लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
इमेज
  माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांची श्रद्धानंद गुरुकुल आश्रमास सदिच्छा भेट व पाहणी  "सद्यस्थितीत आर्य समाजाच्या विचाराची राष्ट्राला गरज !" सेवेकरी पालक म्हणून गुरुकुलास  सर्वतोपरी सहकार्य करणार !           परळी वैजनाथ,दि.१४-                        सध्याच्या परिस्थितीत समाज व राष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी  आर्य समाजाच्या विचारांची मोठ्या प्रमाणात  गरज असून परळी आर्य समाजाद्वारे चालविण्यात येणारे श्रद्धानंद गुरुकुल आश्रम हे आगामी काळात प्राचीन आदर्श मूल्यांच्या संवर्धनाचे प्रमुख केंद्र ठरेल. या संस्थेचा कायापालट करण्यासाठी एक सेवेकरी पालकाच्या रूपात सर्वतोपरी सहकार्य केले जाणार असून येथील उपक्रम चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन माजी  मंत्री आमदार श्री धनंजय मुंडे यांनी दिले.                परळी शहरालगतच्या नंदागौळ मार्गावरील स्वामी श्रद्धांनंद गुरुकुल आश्रमास श्री मुंडे यांनी काल (दि.१४)सदिच्छा भेट दिली. यावेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात आ.श्री मुंडे बोलत होते. आश्रम संस्थेच्या वतीने सचिव श्री उग्रसेन राठौर व  वयोवृद्ध वानप्रस्थी श्री सोममुनि
इमेज
  नीट परिक्षेत ओंकार प्रभाकर गित्ते याचे 588 गुण घेऊन नेत्रदीपक यश परळी वैजनाथ/प्रतिनिधी परळी वैजनाथ येथील ओंकार प्रभाकर गित्ते याने कोणतेही क्लासेस न लावता  नीट परीक्षेत 588 गुण घेऊन नेत्रदीपक यश संपादन केले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. येथील ओंकार प्रभाकर गित्ते याने वैद्यकीय क्षेत्रासाठीची नीट ही परिक्षा दिली होती. त्याचा काल निकाल लागला असून ओंकार गित्ते याने या परिक्षेत 588 गुण घेवुन घवघवीत यश संपादीत केले आहे. ओंकार याचे इयत्ता पहिली ते दहावीचे शिक्षण परळी वैजनाथ येथील न्यू हायस्कूल येथे झाले असून अकरावी व बारावीचे शिक्षण टोकवाडी येथील रत्नेश्वर महाविद्यालय येथे झाले आहे. लहानपणापासूनच तो अत्यंत गुणी असून त्याने विविध स्पर्धा परीक्षांमध्ये ही यश संपादन केलेले आहे.ओंकार यास लहानपणापासून परळी येथील आदर्श शिक्षक अरुण गीते यांचे मार्गदर्शन लाभले असे तो म्हणाला. त्याच्या या यशाबद्दल शाळा, महाविद्यालयाचे शिक्षक वृंद, यांच्यासह नातेवाईक, आप्तेष्ट, हितचिंतक यांनी अभिनंदन केले आहे. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दरम्यान या यशाबद्दल यशचे सर्व स्तरातून कौतूक ह
इमेज
  पोस्टाची महिला सन्मान बचतपत्र योजना ही महिलांचा सन्मान करणारी योजना...जिल्हाधिकारी ●श्रीमती दीपा मुधोळ-मुंढे जिल्हाधिकारी यांचाही योजनेत सहभाग बीड ,दि.13: -भारत सरकारच्या वतीने आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने खास महिला व मुलीकरिता *महिला सन्मान बचत पत्र* ही योजना जाहीर केली व त्याची सुरवात दि 1 एप्रिल 2023 पासून देशभरातील सर्वच पोस्ट ऑफिसमधून प्रारंभ करण्यात आला. पोस्ट ऑफिसच्या इतर अल्पबचत योजनेपेक्षा अधिक व्याजदर असणारी ही योजना अल्पावधीतच देशभर लोकप्रिय ठरत असून, मोठ्या प्रमाणात महिला व मुलीचा सहभाग या योजनेत वाढत आहे.  डी आर शिवणीकर डाकघर अधिक्षक , प्रमोद गाढवे सहायक अधिक्षक, हेमंत पानखडे पोस्टमास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी नवले जनसंपर्क अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन या योजनेची सविस्तरपणे माहिती दिली. जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या स्वतःच्या नावे या योजनेत खाते उघडले. जिल्हाधिकारी बीड यांच्या या योजनेतील सहभागी होण्यामुळे निश्चितच या बाबीचा सकारात्मक प्रचार प्रसार होईल या योजनेत अधिकाधिक सहभाग वाढेल.     याप्रसंगी
इमेज
  Photo feature:संत गजानन महाराज दिंडी परळी-अंबाजोगाई रस्त्यावर टिपलेली मनमोहक दृष्ये टाळ-मृदुंगाच्या गजरेत श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे अंबाजोगाईत आगमन *पालखीचे ५४ वे वर्ष ;तीन अश्व, ७०० वारकऱ्यांचा पालखीत समावेश* अंबाजोगाई / एमबी न्युज वृत्तसेवा बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे श्री संत गजानन महाराज पालखीचे टाळ-मृदुंगाच्या गजरेत आज दुपारी आगमन झाले आहे.त्यांच्या स्वागतासाठी अंबानगरी सज्ज होऊन रस्त्यावर रांगोळी काढली होती. २६ मेला आषाढी वारीसाठी श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे शेगाव येथुन प्रस्थान झाले आहे. दोन दिवसांच्या परळी येथील मुक्कामानंतर पालखीचे आज सकाळी अंबाजोगाई शहरात आगमन झाले. टाळ मृदंगाच्या तालावर शेकडो वारकऱ्यांनी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारामांच्या गजरात ठेका धरला. पंढरीनाथ महाराज की जय, विठ्ठल विठ्ठल श्रीहरी विठ्ठल, संत गजानन महाराज की जय, गण गण गणात बोते या जयघोषाने एकापाठोपाठ सुंदर अश्या चालीवर भजन करत या वारकऱ्यांनी अंबाजोगाई शहर अक्षरशः दणाणून सोडले. पूर्वी या पालखी सोहळ्यामध्ये हत्ती घोडे असा लवाजमा असायचा परंतु गेल्या काही वर्षापासून फक्त आश्
इमेज
  सायबर पोलीसांची ऑनलाईन चक्री /जुगारावर धडक कारवाई; मुद्देमालासह आरोपी अटक बीड....    सायबर पोलीस बीड यांनी दिनांक 13/06/2023 रोजी पाटोदा हद्दीत बस स्थानक समोर पत्र्याच शेड मध्ये चालू असलेल्या ऑनलाईन चक्रों जुगार अड्ड्यावर धाड टाकून धडक कारवाई केली. सदर कारवाईत ऑनलाईन चक्री जुगार खेळणारे व खेळविणारे असे एकुन नक आरोपींना ताब्यात घेण्यात आले, आरोपीतांच्या ताब्यातून दोन मोबाईल, दोन लॅपटॉप ईन्टरनेट मोडेम, तीन दुचाकी व रोख रक्कम असे सर्व मिळून एकून 2.81,430/- रुपयांचा मुद्देमाल व रोख रक्कम जप्त करण्यात आले आहेत. पांअ 955 अजय जाधव नेमणुक सायबर पोलीस स्टेशन यांचे फिर्यादीवरुन पाटोदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पाटोदा पोलीस करत आहेत. सदर कामगिरी पोलीस अधीक्षक बीड श्री नंदकुमार ठाकुर,अप्पर पोलीस अधीक्षक श्री पांडकर, बोड यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक आर.एस. सानप, पोउपनि श्री शैलेश जोगदंड, मपोउपनि टी. एम. खुळे, पोहा बप्पासाहेब दराडे, मोह आशिष बडमारे, पोना विजय घोडके, पोना अनिल डोंगरे, पोना/ 22 श्रीकांत बारगजे, पोअ प्रदिप बायभट, पोअ अमोल

620 गुण घेऊन डॉक्टर होण्याचा मार्ग सुकर केला

इमेज
  परचुंडीच्या अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा बंडू पत्रावळे याचे नीट परीक्षेत घवघवीत यश 620 गुण घेऊन डॉक्टर होण्याचा मार्ग सुकर केला परळी वैजनाथ/प्रतिनिधी  *जिद्द, चिकाटी, प्रयत्न त्याचबरोबर आहे त्या परिस्थितीत आढेवेढे न घेता शिक्षण घेण्याची आवड असेल तर अशा मुळातच टॅलेंट असलेल्या विद्यार्थाला नशीब कधीच हुलकावणी देत नाही. अशीच मनाशी खूणगाठ बांधून बालाघाटच्या दुष्काळी पट्ट्यात असलेल्या एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुलाने नीट परीक्षेत 620 गुण घेऊन आपला वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचा मार्ग मोकळा केला आहे.* परचुंडी ता.परळी वैजनाथ येथील सामान्य अल्पभूधारक होतकरू व प्रयोगशिल शेतकरी देवराव पत्रावळे व महानंदा पत्रावळे यांचा मुलगा बसवलिंग उर्फ बंडू याने माजलगाव येथील आपले आजी आजोबा सीताबाई व रामाप्पा शेटे यांचे कडे राहून सिध्देश्वर विद्यालयात प्राथमिक व दहावी पर्यंतचे माध्यमिक शिक्षण घेतले परिस्थिती सामान्य असतानाही अकरावी लातूर येथे तर बारावी पुणे येथे चिकाटीने पूर्ण केली. आई वडील व आजीचे कष्टाळू जीवन जवळून बघितलेल्या बंडूने घरची परिस्थिती बदलण्यासाठी डॉक्टर व्हायचे स्वप्न उरी बाळ

सौ.दुर्गाताई कुलकर्णी यांचे निधन

इमेज
  सौ.दुर्गाताई कुलकर्णी यांचे निधन बीड/प्रतिनिधी  येथील जालनारोड वरील सहयोगनगर भागातील ज्येष्ठ नागरिक सौ.दुर्गाताई मधुकरराव कुलकर्णी रायमोहकर यांचे वयाच्या 81 व्या वर्षी शुक्रवारी निधन झाले.  येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले। बीड शहरातील विविध स्तरातील लोक यावेळी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पती मधुकरराव; मुले संतोष आणि डाॅ आनंद; तीन विवाहित मुली ; लेकी सूना असा परिवार आहे .बीडचे लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार जगदीश पिंगळे यांच्या त्या ज्येष्ठ भगिनी होत्या.
इमेज
  संशयकल्लोळ :परळी शहर पोलिसांच्या ताब्यातील एका आरोपीचा मृत्यू : नातेवाईकांचा पोलिसांवर आरोप; शहरात मोठा बंदोबस्त परळी वैजनाथ, प्रतिनिधी ...             परळी शहरात सध्या मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून ठीक ठिकाणी पोलीसच पोलीस दिसत आहेत. यामुळे नागरिकात मोठ्या प्रमाणावर हा बंदोबस्त कशाचा याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान परळी शहर पोलिसांच्या ताब्यातील चोरी प्रकरणातील एका आरोपीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. परंतु हा मृत्यू पोलिसांनी केलेल्या मारहाणीत झाल्याचे मयताच्या नातेवाईकांनी म्हटले आहे. काल रात्रीपासूनच मोठा जमाव उपजिल्हा रुग्णालयात जमा झाल्याने पोलीस प्रशासनाने बंदोबस्तात वाढ केली आहे.          परळी शहर पोलिसांनी चौकशीसाठी बोलविलेल्या एका संशयित आरोपीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडली आहे. झरीन खान ( 48,  रा मलीकपुरा, परळी) असे मृताचे नाव आहे. त्यांचा पोलीस ठाण्यात मृत्यू झाल्याचे त्यांच्या मुलाने म्हटले आहे. दरम्यान मयत झरीन खान यांच्या मृतदेहाची उत्तरिय तपासणी (पोस्ट मार्टम )इन कॅमेरा होणार आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले क

पूर्वी भारताचा आवाज ऐकू येत नव्हता, आता संपूर्ण जगात भारताचा डंका - पंकजाताई मुंडे

इमेज
पंकजाताई मुंडे यांचा मध्यप्रदेशात झंजावती दौरा ; मोदी @9 अभियानाला मोठा प्रतिसाद भारताने नऊ वर्षात गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या पूर्वी भारताचा आवाज ऐकू येत नव्हता, आता संपूर्ण जगात भारताचा डंका - पंकजाताई मुंडे _संघटनात्मक मुद्द्यांवर दिला भर_ जबलपूर (म.प्र.) ।दिनांक १३। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी गेल्या चार दिवसांत संघटनात्मक दृष्टया मध्यप्रदेशचा यशस्वी झंझावाती दौरा केला. मोदी @9 अभियानांतर्गत त्यांचे विविध जिल्हयात मोठया उत्साहात आणि उत्स्फूर्त वातावरणात कार्यक्रम पार पडले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात भारताने गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या आहेत.  पूर्वी भारताचा आवाज ऐकू येत नव्हता, आता भारताचा डंका जगात वाजत असल्याचे त्यांनी विविध ठिकाणी कार्यक्रमात बोलतांना सांगितले.   गेल्या नऊ वर्षांत गरीब आणि वंचितांची सेवा करणारा, महिला शक्तीला बळ देणारा, तरुणांची स्वप्ने पूर्ण करणारा आणि शेतकऱ्यांचे कल्याण करणारा भारत निर्माण झाला आहे.  कलम ३७० रद्द करण्यात आले, तिहेरी तलाकची वाईट प्रथा संपली आणि दहशतवाद संपुष्टात आला. अयोध्येतील श्री रामजन्मभूमी

VIDEOS: व्हिडीओ:संत गजानन महाराज दिंडी परळीत

इमेज
VIDEOS: व्हिडीओ:संत गजानन महाराज दिंडी परळीत श्री क्षेत्र शेगाव येथील श्री संत गजानन महाराज व चांदूरबाजार येथील श्री संत गुलाब महाराज यांच्या पालखीचे 13 जून रोजी सकाळी 7 वाजता मोंढा मार्केट येथील संकटमोचन हनुमान मंदिर येथे आगमन झाले. यावेळी परळीकरांच्या वतीने पालखी दिंडीचे जल्लोषात, उत्साहात स्वागत केले. टाळ मृदुंगाच्या तालावर दिंडीतील हजारो वारकर्‍यांनी ‘ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम’च्या गजरात ठेका धरला. ‘पंढरीनाथ महाराज की जय‘, ‘विठ्ठल विठ्ठल श्रीहरी विठ्ठल’ ‘संत गजानन महाराज की जय’, ‘गण गण गणात बोते’ या जयघोषाने एकापाठोपाठ एक सुंदर अशा चालीवर भजन करीत या वारकर्‍यांनी परळी शहर अक्षरशः दणाणून सोडला. परळी विविध व्यापारी महासंघाच्या वतीने वारकर्‍यांचे, श्रींच्या पालखीचे जल्लोषात स्वागत दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मोंढा मार्केट येथील श्री संकटमोचन हनुमान मंदिरात भाविकांकरीता अल्पोपहारासह फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. वारकर्‍यासह अन्य भाविकांनीही या फराळाचा आस्वाद घेतला. तेथून दिंडीने राणी लक्ष्मीबाई टॉवर मार्गे श्री संत जगमित्र नागा मंदिरकडे प्रस्थान केले. शेकडो व्यापार्‍य
इमेज
  परळीकरांच्या वतीने संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज व  गुलाब महाराज यांच्या दिंडीचे उत्साहात स्वागत परळी वैजनाथ/ संतोष जुजगर  श्री क्षेत्र शेगाव येथील श्री संत गजानन महाराज व चांदूरबाजार येथील श्री संत गुलाब महाराज यांच्या पालखीचे 13 जून रोजी सकाळी 7 वाजता मोंढा मार्केट येथील संकटमोचन हनुमान मंदिर येथे आगमन झाले. यावेळी परळीकरांच्या वतीने पालखी दिंडीचे  जल्लोषात, उत्साहात स्वागत केले. टाळ मृदुंगाच्या तालावर दिंडीतील हजारो वारकर्‍यांनी ‘ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम’च्या गजरात ठेका धरला. ‘पंढरीनाथ महाराज की जय‘, ‘विठ्ठल विठ्ठल श्रीहरी विठ्ठल’ ‘संत गजानन महाराज की जय’, ‘गण गण गणात बोते’ या जयघोषाने एकापाठोपाठ एक सुंदर अशा चालीवर  भजन करीत या वारकर्‍यांनी परळी शहर अक्षरशः दणाणून सोडला. परळी विविध व्यापारी महासंघाच्या वतीने वारकर्‍यांचे, श्रींच्या पालखीचे जल्लोषात स्वागत  दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मोंढा मार्केट येथील श्री संकटमोचन हनुमान मंदिरात भाविकांकरीता अल्पोपहारासह फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. वारकर्‍यासह अन्य भाविकांनीही या फराळाचा आस्वाद घेतला. तेथून दिंडीने राणी लक्ष्
इमेज
निवृत्त शिक्षणाधिकारी राघवेंद्र उर्फ आर आर कुलकर्णी यांचे निधन  बीड- येथील निवृत्त शिक्षणाधिकारी राघवेंद्र उर्फ आर आर कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय 90 वर्षे होते.                                   एक प्रामाणिक आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ते सुपरिचित होते.त्यांनी आपल्या शिक्षणाधिकारी पदाच्या काळात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले होते.अधिकारी आणि कर्मचारी वर्गात आदराचे स्थान असलेले आर आर कुलकर्णी गेल्या काही दिवसापासून बीडच्या लोटस हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते.सोमवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.         त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा श्याम,दोन मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे. बीड येथील विशेष लेखा परीक्षक वर्ग 2 श्याम पिंपरकर कुलकर्णी यांचे ते वडील होते.       त्यांच्या पार्थिव देहावर मंगळवारी सकाळी नऊ वाजता बीडच्या अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

अग्निशमन वेळीच पोहोचल्याने आग आटोक्यात

इमेज
  कॉटन इंडस्ट्रीजला आग; वीस लाखांचे नुकसान अग्निशमन वेळीच पोहोचल्याने आग आटोक्यात गेवराई...  गेवराई शहराजवळ असलेल्या महाबली कॉटन इंडस्ट्रीजला आज दि. 12 जून सोमवार रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास प्रेसिंग मध्ये काम चालू असताना अति उष्णतेमुळे व स्पार्किंग मुळे आगीची ठिणगी पडून आग लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून या आगीमध्ये प्रेसिंग मध्ये चालू असलेला कापूस, रुई व गठान जळून वीस लाखांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. वेळीच कृषी उत्पन्न बाजार समितीची अग्निशमन गाडी पोहोचल्याने आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाबली कॉटन इंडस्ट्रीज गेल्या तेरा वर्षापासून कार्यरत असून कापूस व्यापारामध्ये महाबली कॉटन इंडस्ट्रीजचे मोठे नाव आहे. गेवराई तालुक्यातील कापूस व्यापारामध्ये महाबली इंडस्ट्रीज चा मोठा हातभार आहे. शेतकऱ्यांना वेळोवेळी इंडस्ट्रीजच्या माध्यमातून मदत करण्यात येते. गेल्या तेरा वर्षांमध्ये एकदाही आग लागण्याचा असा अनुचित प्रकार घडलेला नाही. परंतु दिनांक 12 जून रोजी अति उष्णतेमुळे व स्पार्किंग मुळे आगीची ठिणगी पडू

मुख्यमंञ्यांनी जाहिर केलेले जनहिताच्या योजना घराघरात पोहचविणार - सचिन स्वामी

इमेज
  रस्त्यावरील झालेल्या अपघातात जखमी झालेल्याना मोफत उपचारा संबंधितीचा जीआर त्वरित लागु करा- शिवसेनेने दिले निवेदन मुख्यमंञ्यांनी जाहिर केलेले जनहिताच्या योजना घराघरात पोहचविणार - सचिन स्वामी परळी वैद्यनाथ    राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारने रस्तावरील अपघातात जखमींना त्वरित ७२ तास मोफत उपचार हा सर्वसामान्य नागरिकांना दिलासादायक विधायक नविन जीआर काढला असून यामुळे राज्यातील जनतेला अतिशय मोठा दिलासा मिळाला आहे. या जीआरचे सर्वच क्षेत्रात स्वागत केले जात आहे.या जनउपयोगी नविन जीआरची त्वरित अमलबजावणी  करण्यासाठी परळी उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांना शिवसेनेच्या वतिने सोमवार दि.12 जुन रोजी निवेदन देण्यात आले आहे. या योजनेचा  रस्त्यावरील झालेल्या अपघातात जख्मी झालेल्याना मोफत उपचारा संबंधितीचा जीआर परळी उपजिल्हा क्षेत्रातील सर्वच रुग्णालयाना आदेश काढावा असे निवेदन देण्यात आले. शिवसेनेचे खा डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव संजय मोरे यांच्या सूचनेनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात राज्य सरकार विविध लोकाभिमुख योजना लागू करत असून त्
इमेज
  संविधान समता दिंडी:एक दिवस तरी वारी अनुभवावी जय हरी  संतांनी सांगितलेला समतेचा विचार आणि भारतीय संविधानातील मूल्ये एकमेकांना पूरक आणि सुसंगत आहेत. त्यामुळेच आम्ही हा विचार मनात ठेवून गेली १० वर्षे ''एक दिवस तरी, वारी अनुभवावी'' या उक्तीनुसार वारी सहभागी असतो. तसेच, गेली गेली ५ वर्षांपासून आम्ही ''संविधान समता दिंडी'' च्या माध्यमातून पंढरपूरपर्यन्त दिंडी नेत आहोत. संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकोबाराय, संत एकनाथ महाराज, संत सोयराबाई, संत जनाबाई आदी सर्व संत मांदियाळीने सांगितलेला समतेचा विचार आम्ही लोकांपर्यंत घेवून जात आहात. याच विचाराला जोडून आम्ही समतेचा झेंडा खांद्यावर घेवून  पंढरपूरला निघालो आहोत. मंगळवार, दि. १३ जून २०२३ रोजी संध्याकाळी ५ ते ७ या वेळात पंढरपूरला जाणाऱ्या समता दिंडीला शुभेच्छा देण्यासाठी महात्मा जोतिबा फुले यांच्या गंजपेठेतील वाड्यावर आपण यावे, यासाठी हे आग्रहाचे निमंत्रण ! संताचा समतेचा विचार आपणही आपल्या वारकरी भावा-बहिणीसोबत  पंढरपूरपर्यंत नेत आहात. तुमच्या दिंडीचा सत्कार देखील आम्ही करू इच्छित आहोत. आपण उपस्थ
इमेज
  नगर परिषदेची कर वसुलीची विशेष मोहीम नागरिकांनी विविध करांचा भरणा करून संभाव्य कारवाई टाळावी - मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-         परळी नगर परिषदेच्या वतीने शहरामध्ये विशेष वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी त्यांच्याकडे थकीत असलेल्या विविध करांचा भरणा करून संभाव्य कारवाई टाळावी असे आवाहन मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांनी केले आहे.         परळी नगर परिषदेने सन 2023 -24 या आर्थिक वर्षाचे वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्या उद्दीष्ट्यपुर्तीसाठी नगर परिषदेने शहरामध्ये विशेष वसुली मोहीम सुरू केली आहे. यासाठी कर्मचाऱ्यांची पथके तयार करण्यात आली आहेत. नागरिकांनी त्यांच्याकडे घरपट्टी, मालमत्ता कर, जमीन कर, इमारत किराया, मोबाईल टाॅवर भाडे, दुकान भाडे, नळपट्टी आदी करांचा तातडीने भरणा करावा. विविध करांचा वेळेवर भरणा केला नाही तर संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही मुख्याधिकारी कांबळे यांनी दिला आहे.       करांच्या वसुलीसाठी नगर परिषदेने विविध पथके तयार करण्यात आली आहेत. पथकातील कर्मचारी नागरीकांकडे जाऊन
इमेज
 खा.शरद पवार  व खा.संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी; महाविकास आघाडीचा बीडमध्ये  मूक मोर्चाचे आयोजन  आ.धनंजय मुंडे, प्रकाश दादा सोळंके, सतिश चव्हाण, विक्रम काळे, बाळासाहेब आजबे, संदीप क्षीरसागर, माजी आ.अमरसिंह पंडित आदींची उपस्थिती या भव्य मूक मोर्चास उपस्थित रहा - ऍड.राजेश्वर चव्हाण, बाळा बांगर बीड दि.११ (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.शरद पवार व शिवसेना (उबाठा) चे खा.संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी काही समाज कंटकांकडून देण्यात आली आहे. राज्यभरातून अश्या माथेफिरूविरोधात संतापाची लाट निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज (दि.१२) बीडमध्ये महाविकास आघाडी आणि   समविचारी पक्ष, संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मूक मोर्चा काढण्यात येणार असून यात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह बाळा बांगर यांनी केले.            राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ठार मारण्याची धमकी मिळाल्‍यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच त्यांना धमकी देणारा हा अ
इमेज
  शिक्षणाधिकारी कार्यालयावर शालेय पोषण कामगार विराट मोर्चाचे आयोजन  परळी / प्रतिनिधी बीड जिल्हयातील शालेय पोषण कामगारांचा विविध प्रलंबीत न्याय मागण्या मंजुर करून घेण्यासाठी शिक्षणाधिकारी (प्रा.) जि.प.बीड यांच्या कार्यालयावर विराट मोर्च्याचे आयोजन केले असल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर नागरगोजे, सरचिटणीस डॉ. अशोक थोरात यांनी प्रसिध्दी पत्रकात नमुद करून कामगारांना मोर्चात सामील होण्याचे आवाहन केले आहे. सन २००२ पासून राज्यात शालेय पोषण आहार योजना सुरू आहे. जि.प.शाळा व खाजगी संस्थेतील शाळेत पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या मुला-मुलीसाठी या योजने मार्फत दुपारचे भोजन दिले जाते. मध्यान्ह भोजन बनवणाऱ्या स्वयंपाकी, मदतनिस यांना दरमहा १५००/- रूपये मानधन म्हणजे दररोज ५० रुपये दिले जाते. २० वर्षापासून शाळेत काम करत असलेल्या शालेय पोषण कामगारांच्या अनेक मागण्या प्रलंबीत आहेत. म्हणुन या मोर्चाचे आयोजन अध्यक्ष प्रभाकर नागरगोजे, सरचिटणीस डॉ. अशोक थोरात यांच्या नेतृत्वात केले आहे. संघटनेच्या संघर्षातुन काही मागण्या मान्य झाल्या आहेत. आणि  बऱ्याच मागण्या प्रलंबीत आहेत. केरळ सरकारच्या धर्तीवर शालेय पोषण

Video- आळंदी देवाची- माऊली संजीवन समाधी मंदिरात आकर्षक पुष्पसजावट

इमेज
  आळंदी देवाची येथून आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचे आषाढी वारीसाठी प्रस्थान झाले.या अनुषंगाने माऊली संजीवन समाधी मंदिरात आकर्षक पुष्पसजावट करण्यात आली आहे.  
इमेज
  कृषिमंत्री अब्दुल सत्तार चा राजीनामा तात्काळ घ्या !  वसंत मुंडे                                   परळी (प्रतिनिधी) महाराष्ट्राच्या कृषी खात्याच्या इतिहासात कर्मचारी अधिकारी बदल्या पदोन्नती, पिक विमा, खते बी बियाणे औषधी, कृषी विद्यापीठे व कृषी खात्यातील विविध अनुदानात  कृषी मंत्र्यांनी  रेट कार्ड(दरसुची) ठरवून ६० कोटी पेक्षा जास्त भ्रष्टाचार केलाच आरोप महाराष्ट्र प्रदेश ओबीसी काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केला. नागरी सेवा मंडळाने अपात्र केल्यावरही संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण या पदावर पात्र नसताना विकास पाटील यांचे नियुक्ती करून ५ कोटी रुपये घेतले व रवींद्र भोसले नागपूर विभागीय कृषी संचालक या पदावरून पदोन्नतीने संचालक मृदा संधारण या पदासाठी २ कोटी रुपये घेऊन नियुक्ती देण्यात आली व माजी कृषी मंत्री दादा भुसे यांनी भोसले यांना पदोन्नती मध्ये वगळलेले होते. औरंगाबाद विभागीय कृषी सहसंचालक दिनकर जाधव यांची एका दिवसासाठी सेवानिवृत्तीचा कार्यकाल शिल्लक असताना व भ्रष्टाचाराच्या चौकशी चालू असतानाही संचालक पदासाठी १ कोटी रुपये घेऊन नियमबाह्य नियुक्त केल्याचा आरोप काँग्रेसचे नेते

राष्ट्रीय महामार्गावरच्या पुलाचे लोखंडी कठडे गायब होण्याच्या वाटेवर

इमेज
  राष्ट्रीय महामार्गावरच्या पुलाचे लोखंडी कठडे गायब होण्याच्या वाटेवर  केज :- राष्ट्रीय महामार्गा वरील पूल आणि धोकादायक वळणावर लावलेले संरक्षक कठडे हे गायब होण्याच्या मार्गावर असून अनेक ठिकाणी ते अर्धवट निघून पडलेले आहेत. त्यामुळे अपघात घडण्याची व जिवीत हानी होण्याचा ढोका आहे. केज तालुक्यातून महामार्ग क्र ५४८ सी ५४८ डी हे दोन महामार्ग जात आहे. या महामार्गावरील अनेक पुलाला लावलेले लोखंडी बॅरिकेटिंग व पुलाचे लोखंडी संरक्षक कठडे काही ठिकाणी निघून पडलेले आहेत. तर काही ठिकाणी अज्ञात ईसमानी अज्ञात कारणासाठी  अर्धवट अवस्थेत काढून ठेवलेले आहेत. सदर कठडे चोरी देखील होण्याची दाट शक्यता असून पुलाला आणि धोकेदायक वळणावरील कठडे नसल्यामुळे अपघात होऊन जिवीत हानी होऊ शकते. अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि सदोष कामामुळे अपघात आणि जिवीत हानित वाढ :- या राष्ट्रीय महामार्गा वरील रस्त्याला अनेक ठिकाणी तडे गेलेले आहेत तर पूल खचून त्याला भेगा पडून लोखंडी सळया उघड्या पडलेल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी जम्पिंग रस्ता असल्याने भरधाव वेगाने जाणारी वाहने आढळून अपघात होत आहेत. मात्र याकडे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंड