पोस्ट्स

जुलै १६, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

श्रीशैल जगद्गुरूंच्या हस्ते परळी-कपीलधार थेट बससेवा सुरू

इमेज
    जगद्गुरूंच्या हस्ते परळी-कपीलधार थेट बससेवा सुरू भाविकांतून मागणी आली: परळीतून ' धनुभाऊंनी' लगेच बस सुरु केली परळी (प्रतिनिधी)....      परळी ते कपीलधार  बससेवा सुरू करण्याची भाविकांतून मागणी करण्यात आली होती.याबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनाही निवेदन करण्यात आले होते.या मागणीची तात्काळ दखल घेत संबंधितांना  ही बससेवा सुरु करण्याचे निर्देश दिले.विशेष म्हणजे परळी येधे अनुष्ठानाला आलेल्या श्रीशैल जगद्गुरूंच्या हस्ते परळी-कपीलधार थेट बससेवेचा प्रत्यक्ष शुभारंभही करण्यात आला आहे. प्रभू वैद्यनाथ ज्योतीर्लिंग परळी-वैजनाथ ते श्रीसंत मन्मथ स्वामी मंदीर,कपीलधार(मांजरसुंभा) नियमित थेट बससेवा सुरू करण्याचा शुभारंभ शनिवार दि.22जुलै रोजी श्रीश्रीश्री 1008 सूर्य सिंहासनाधिश्वर जगद्गुरू डॉ.चन्नसिध्दराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी श्रीशैल यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ष.ब्र.नंदीकेश्वर शिवाचार्य महाराज,सोनपेठ,अमृतेश्वर शिवाचार्य महाराज,जिंतूर,शंभूलिंग शिवाचार्य महाराज,अंबाजोगाई यांची  प्रमुख उपस्थिती होती.परळी-कपीलधार थेट बससेवेची मागणी श्री.वैजनाथ मंदीर देवस्थानचे विश्वस्त
इमेज
  गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप पिकविमा योजनेचा एक रुपयामध्ये लाभ घ्यावा - अनिल बोर्डे गेवराई,(प्रतिनिधी)-  गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप पिकविमा योजनेचा एक रुपयामध्ये लाभ घ्यावा, असे आवाहन बीड जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे माजी सदस्य तथा गेवराई ग्राहक पंचायत मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख अनिल बोर्डे यांनी केले आहे.   कृषी कार्यालय गेवराई व ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २२ जुलै २०२३ रोजी दुपारी १-३० वाजता चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रामध्ये बीड जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे माजी शासकीय सदस्य तथा गेवराई ग्राहक पंचायत मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख अनिल बोर्डे यांनी शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मांडले. या प्रश्नाबाबत तालुका कृषी अधिकारी अभय वडकुते यांनी योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांवर कधीही नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. त्यासाठी शेतकऱ्यांनी तात्काळ विमा भरणे आवश्यक आहे. विम्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ असून त्यापूर्वी शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये विमा काढून घ्यावा. विमा भरताना शेतकरी वर्गाने सतर्क राहावे. शेतकऱ

रविवारी परळी वैद्यनाथ तालुक्यातील गोगलगाय बाधित शेतीची करणार पाहणी

इमेज
  तत्परता: कृषीमंत्री धनंजय मुंडे जिल्ह्यात येताच जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर रविवारी परळी वैद्यनाथ तालुक्यातील गोगलगाय बाधित शेतीची करणार पाहणी परळी वैद्यनाथ (दि. 22) - राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे रविवारी सकाळी कृषी विभागाचे मंत्री पद स्वीकारल्यानंतर प्रथमच बीड जिल्ह्यात येत असून आल्याबरोबर ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन गोगलगायींनी नुकसान केलेल्या क्षेत्राची पाहणी करणार आहेत.  कृषिमंत्री धनंजय मुंडे हे सकाळी 11:00 वाजल्यापासून परळी वैद्यनाथ तालुक्यातील वाघबेट, बेलंबा आदी गावांना भेटी देऊन गोगलगायींनी बाधित क्षेत्राची पाहणी करतील व प्रशासनास आवश्यक सूचना देतील असे ना. धनंजय मुंडे यांच्या संपर्क कार्यालयातून कळवण्यात आले आहे.  मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी परळी, अंबाजोगाई व केज या तीन तालुक्यात प्रामुख्याने सोयाबीन पिकास गोगलगायी नष्ट करत असल्याच्या अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत, त्याच पार्श्वभूमीवर कृषीमंत्री धनंजय मुंडे हे स्वतः या क्षेत्राची पाहणी करणार असून, कृषी विभागाचे अधिकारीही या दौऱ्यात सहभागी असतील.

मणिपूर:आंदोलन

इमेज
  मणिपुरातील हिंसाचाराच्या निषेधार्थ माकपची रविवारी परळीत निदर्शने परळी / प्रतिनिधी      मणिपुर राज्यात मागील तीन महिन्यापासुन हिंसाचार सुरू आहे. त्या राज्यातील सरकार व केंद्र सरकार हिंसाचार रोखण्यात अपयशी ठरले आहे. त्याचा विपरीत परीणाम तेथील महिलांवर अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. त्याच्या निषेधार्थ रविवारी दि. 23 रोजी सकाळी 11 वाजता परळी येथील राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे माकपची निदर्शने करण्यात येणार आहेत.  मणिपुर राज्यात सत्तेत असलेले सरकार व केंद्र सरकार यांनी हिंसाचार थांबविण्यासाठी कठोर निर्णय घेणे अपेक्षित आहे. त्यातच महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर सामुहिक आत्याचार केल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर प्रसारीत झाल्याने देशातील जनतेत प्रचंड संताप निर्माण झाला आहे. या हिंसाचाराचा माकप जाहिर निषेध करीत आहे. मणिपुर राज्य सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लावावी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत मणिपुर राज्यातील हिंसाचार प्रकरणी निवेदन करावे व दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी व त्या राज्यात शांतता प्रस्थापीत करण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ पावले उचलावीत या मागणीसाठी

'युनिक' योग-'युनिक' शुभेच्छा.....!

इमेज
 ' युनिक'  योग-'युनिक' शुभेच्छा: पंकजा मुंडेंनी केलं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं अभिष्टचिंतन परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....          भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस या दोघांचेही वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले असुन पंकजा मुंडेंनी दोघांनाही वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.      राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांचा आज २२ जुलै रोजी एकाच दिवशी वाढदिवस आहे.सर्व स्तरातून वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे.दरम्यान भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस या दोघांचेही वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले आहे. ट्विट करत पंकजा मुंडे यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा वाढदिवस एकाच दिवशी हा योग युनिक आहे असे म्हटले आहे.तसेच हे वर्ष आपल्या नेतृत्त्वात महाराष्ट्राला उत्तम जावो अशा शुभेच्छा दिल्या आहेत. • असे आहे पंकजा मुंडेंचे ट्विट..... दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा वाढदिवस एकाच दिवशी हा योग युनिक आहे. @Dev_Fadnavisजी आणि @AjitPawarSpea
इमेज
  उसाच्या शेतात बिबट्या मृत अवस्थेत सापडला वडवणी.....               एका शेतकऱ्याच्या उसाच्या शेतामध्ये मृत अवस्थेत बिबट्या आढळून आला आहे.हा मयत बिबट्या हा किमान 24 तासाच्या आतच मयत झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील चिखलबीड येथे शेतकरी बाबुराव तांदळे यांच्या शेतामध्ये, चिखलबीड गावापासून काही किलोमीटर अंतरावर उसाच्या शेतात , एक बिबट्या मयत अवस्थेत आढळून आला. तांदळे यांचे सालगडी शेतामध्ये दुर्गंधीयुक्त वास येत असल्याने, सर्व शेतात शोधून पाहिले असता, त्यास मयत अवस्थेत हा बिबट्या आढळला. मानवी रहदारीच्या शिवारात उसाच्या शेतात सदरील बिबट्या आढळल्याने, परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.  तात्काळ शेतकऱ्यांनी वन विभागाशी संपर्क साधला आणि घटनास्थळी तात्काळ वन विभागाची टीम दाखल झाली व सदरील घटनेचा पंचनामा केला.

ऐतिहासिक विशेष रेल्वेने रामकथा व ज्योतिर्लिंग यात्रा

इमेज
  संत मोरारी बापुंची २२ जुलै पासून बारा ज्योतिर्लिंग यात्रा: परळी वैजनाथ मात्र यात्रेतून वगळले परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        प्रसिद्ध रामकथा प्रवक्ते संत मोरारी बापू हे दिनांक 22 जुलै पासून १८ दिवसांच्या  ऐतिहासिक अशा बारा ज्योतिर्लिंग यात्रेवर निघणार आहेत. आपल्या हजारो अनुयायांसह दोन  विशेष रेल्वेने 18 दिवसांची ही यात्रा  करणार आहेत. बारा ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी काही वेळ थांबून ते कथाही करणार आहेत. त्यांच्या या बारा ज्योतिर्लिंग यात्रेमध्ये महाराष्ट्रातील चार ज्योतिर्लिंगांचा समावेश करण्यात आलेला आहे परंतु यातून परळी वैजनाथ वगळण्यात आलेले आहे.        आद्य शंकराचार्यांनी ज्या ज्या ठिकाणी ज्योतिर्लिंग यात्रा केली त्या सर्व ठिकाणी आपली यात्रा जाणार असल्याचे मोरारी बापू यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे ' एक भारत'  व 'एक भारत संवादसेतू' अशी या यात्रेची संकल्पना आहे परंतु या यात्रेच्या ज्योतिर्लिंग यादी मधून परळी वैजनाथ वगळण्यात आले आहे.त्याऐवजी झारखंड येथील वैद्यनाथधामला ही यात्रा जाणार आहे. महाराष्ट्रात ही यात्रा औंढा नागनाथ, घृष्णेश्वर ,भीमाशंकर व त्र्यंबकेश्वर

महत्त्वपूर्ण विषय:अत्यंत आवश्यक मुद्दा

इमेज
  वैद्यनाथ मंदिरात भाविकांशी असभ्यवर्तन करणाऱ्या सुरक्षारक्षकांना शिस्त लावा संभाजी ब्रिगेडची  मागणी परळी वैजनाथ.... येथील वैद्यनाथ मंदिरातील सुरक्षारक्षकांना शिस्त लावावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.प्रभू  वैद्यनाथाच्या दर्शनासाठी देशासह जगभरातून भावीक भक्त येतात. मंदिरात शिस्त लावण्यासाठी महिला सुरक्षारक्षक आहेत पण या सुरक्षारक्षक भाविकांसोबत असभ्यवर्तन करत असतात असे अनेक वेळा आढळून आले आहे. आरडाओरडा करून बोलणे, भाविकांवर रागावणे, भाविकांसोबत गैरवर्तन करणे, भाविकांना अपमानास्पद वागणूक देणे अशा घटना सातत्याने घडत आहेत. तसेच मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या महिला सुरक्षारक्षकांची दुसऱ्या ठिकाणी ड्युटी लावून त्या ठिकाणी सभ्य वागणुकीसाठी तंबी देऊन दुसऱ्या महिला सुरक्षारक्षक नेमाव्यात अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने वैद्यनाथ देवल कमिटी अध्यक्ष तथा परळी तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी दिली आहे.

अधिक मासानिमित्त विश्व शांती व लोक कल्याणार्थ

इमेज
  अधिक मासानिमित्त विश्व शांती व लोक कल्याणार्थ परळी वैद्यनाथ येथे पंचकुंडात्मक हरिहर याग व शिव महापुराण कथेचे आयोजन, यज्ञशाळा व मंडप उभारणीस वेग  परळी वैजनाथ (प्रतिनिधी)        पुरूषोत्तम मास (अधिक मास) पर्वकाळ निमित्ताने विश्व शांती तथा लोक कल्याणार्थ येथील श्री सुर्वेश्वर प्रभूंच्या सानिध्यात दिनांक 26 जुलै 2023 ते 1 ऑगस्ट 2023 पर्यंत सकाळी 8 ते 12 या वेळेत पं. विजयजी पाठक यांच्या आचार्यत्वात पंचकुंडात्मक हरिहर याग व दुपारी 2 ते 6 या वेळेत पं. उत्तमजी शास्त्री यांच्या रसाळ वाणीतून शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्यदिव्य धार्मिक कार्यासाठी विधिवत यज्ञशाळा व वॉटरप्रूफ कथामंडप उभारणीच्या कामास वेग आला असून यज्ञशाळा निर्माण कार्य अंतिम टप्प्यात आले असल्याचे संयोजकांनी सांगितले आहे. परळी वैजनाथ तीर्थक्षेत्रातील भाविकांना शिव महापुराण कथा आणि पंचकुंडात्मक हरिहर यागाचा लाभ व्हावा यासाठी श्री सुर्वेश्वर मंदिर विकास समितीच्या वतीने प्रयत्न केले जात असून जास्तीत जास्त संख्येने भाविक भक्तांनी या पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री सुर्वेश्वर मंदिर विकास समितीच्या वतीने करण्यात

मुख्याधिकारी साहेब काँग्रेसनी नागरी प्रश्नावर दिलेल्या निवेदनावर दुर्लक्ष करु नका-बहादुरभाई

इमेज
  मुख्याधिकारी साहेब काँग्रेसनी नागरी प्रश्नावर दिलेल्या निवेदनावर दुर्लक्ष करु नका-बहादुरभाई शहर काँग्रेसचे न.प.ला अल्टिमेटम   परळी प्रतिनिधी  परळी नगर परिषदेच्या उदासीन धोरनामुळे शहरातील विविध भागात आधुरे कामे,काही भागात पाण्याची पाईप लाईन त्वरित टाका,स्वच्छता अदी नागरी प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी परळी शहर काँग्रेसच्या अनुसुचित जाती जमातीचे शहराध्यक्ष दिपक सिरसाट यांनी आज शहराध्यक्ष बहादुरभाई यांच्या नेतृत्वाखाली परळी नगर प्रशासनाला निवेदन दिले आहे. नगर परिषदेला दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे कि, मागील एक वर्षाचा कालावधी पूर्ण होवून सुध्दा उखळवेस पांदन रोड वेताळ मार्गाचे प्रलंबीत काम रखडले आहे. त्यामुळे या भागातील नागरीकांना रस्त्यावरील खडयामुळे  अँटो, मोटार सायकल स्लिप होण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे छोटेमोठे अपघात होत आहेत. हा रस्ता व नाली मंजूर होवून एकवर्ष होऊन गेले आहे सुध्दा खुपच मंद गतीने रस्त्याचे काम चालू असून हे काम जलद गतीने पुर्ण करावे, भिमनगर / साठेनगर रोडे गल्ली प्रभागात पाण्याची टाकी अस्तिवात आहे परंतु गल्लीमध्ये पाण्याची पाईप लाईन टाकुन नळाचे कनेक्शन नाही त

नजीकच्या भविष्यात अंबाजोगाई जिल्हा होणे केवळ अशक्य

इमेज
  जिल्हा विभाजनाचे निकष शासनाने जाहिर करावे; नजीकच्या भविष्यात अंबाजोगाई जिल्हा होणे केवळ अशक्य-अ‍ॅड.अतुल तांदळे परळी वैजनाथ (प्रतिनिधी) सध्या सोशल मिडीयावर अंबाजोगाई जिल्हा निर्मितीबाबत एक पत्र फिरवले जात आहे. या अनुषंगाने शासनाने जिल्हा विभाजनाचे निकष जाहिर करावे तसेच शासकीय समितीचा अहवाल देखील सार्वजनिक करावा अशी मागणी परळी जिल्हा निर्मिती कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड.अतुल तांदळे यांनी केली आहे. नजीकच्या भविष्यात अंबाजोगाई जिल्हा होणे केवळ अशक्य असल्याचे प्रतिपादन अ‍ॅड.अतुल तांदळे यांनी केले.  गेल्या 2 दिवसापासून समाज माध्यमांवर बीड जिल्हा विभाजनाबाबत चर्चांना उधाण आले आहे. याबाबत जिल्हा निर्मिती कृती समितीने संबंधीत यंत्रणेकडे चौकशी केली असता महाराष्ट्रातील नवीन जिल्हा निर्मिती बाबत शासनाकडे कोणतेही स्वरुपाचे निकष नसल्यामुळे मा.अप्पर सचिव (महसुल) यांच्या अध्यक्षतेखाली एखाद्या जिल्ह्याचे विभाजन करुन नविन जिल्हा निर्मिती करण्याबाबत कोणते निकष असावे यासाठी एक समिती नेमली होती. याबाबत समितीने आपला अहवाल शासनकडे दिला असल्याचे समजते. शासनाने निकषास मान्यता दिल्यानंतर निश्‍चित केलेल्या निकषा

तीन दिवसीय ईष्टलिंग पुजा व अनुष्ठान

इमेज
  पुजा सार्थकी लागण्यासाठी भक्ती ही  सर्वश्रेष्ठ - श्रीशैल्य जगद्गुरु महास्वामीजी             परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....         ईष्टलिंग  धारण केल्याने प्रेरणा मिळते असे सांगून   देवाची पूजा करताना जल,बेल, आगरबती, फुल अश्या सामुग्री सोबतच भक्ती आवश्यक आहे,भक्ती शिवाय पूजा पूर्ण होऊ शकत नाही ,मनात भक्ती हवी तरच पूजा सार्थकी लागते म्हणून भक्ती ही सर्वश्रेष्ठ समजले जाते असे विचार श्री श्री श्री  1008 सूर्य सिंहासनाधीश्वर जगद्गुरु डॉक्टर चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी श्रीशैल पीठ  यांनी येथे आपल्या आशीर्वाचनात मांडले येथील हालगे गार्डन मध्ये वीरशैव लिंगायत समाज परळी च्या वतीने जगद्गुरू यांच्या   उपस्थितीत ईष्टलिंग  महापूजा व तीन दिवसीय अनुष्ठानचे परळीत आयोजन करण्यात आले आहे . दि 21 जुलै रोजी सकाळी ईष्टलिंग  महापूजा करण्यात आली ,ईष्टलिंग  महापूजा जगद्गुरू महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आली ,या वेळी परळी चे माजी नगराध्यक्ष सोमनाथअप्पा हालगे व नगराध्यक्षा सरोजिनी सोमनाथ अप्पा हालगे हे दाम्पत्य उपस्थित होते,    उपस्थित  भाविकांना जगद्गुरू महास्वामी यांच्या हस्ते तीर्थ प्रस
इमेज
  ग्रामिण भागतील बांधकाम कामगारांनी ९० दिवस किंवा जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र ग्रामसेवकाकडून घ्यावे - प्रा. खाडे बी.जी. परळी वैजनाथ, प्रतिनिधी......ग्रामिण भागतील बांधकाम कामगारांनी ९० दिवस किंवा जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र ग्रामसेवकाकडून घ्यावे असे आवाहन बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटना अध्यक्ष प्रा. खाडे बी.जी. यांनी केले आहे       इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची महाराष्ट्र सरकारने २००७ मध्ये स्थापना केली. बांधकाम कामगाराच्या कल्यानासाठी २९ योजना मंडळ राबवत आहे. बांधकाम कामगारास कल्यानकारी मंडळात बांधकाम कामगार म्हणून नोंद करण्यासाठी मागील वर्षी ९० दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते. रजिस्टर्ड गुतेदार ( नोंदणीकृत ) गुतेदाराचे १० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र नोंदणीसाठी चालते. परंतु जे कामगार नोंदणीकृत गुतेदारांकडे काम करत नाहीत त्यांना गुतेदार प्रमाणपत्र देत नाहीत. ग्रामीण भागातील रोज वेगवेगळया मालकाकडे काम करणारे बांधकाम कामगारानी ( नाका कामगार ) ग्रामसेवकांकडून व शहरी भागातील (नाका कामगारांनी) मुख्याधिकाऱ्यांकडे प्रमाणप

खते, बी, बियाणे, कीटकनाशके आदींच्या किंमती, लिंकिंग यासंबंधीच्या तक्रारी थेट विभागाकडे करण्यासाठी व्हाट्सअप्प नंबर जाहीर

इमेज
अर्थसंकल्पातील 'शाश्वत शेती - समृद्ध शेती' या सूत्रावर कृषी विभागाची वाटचाल राहील धनंजय मुंडे एक रुपयात पीकविमा ही योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची, कंपन्यांच्या नफेखोरीवर आळा घालणारा बीड पॅटर्न विकसित करणार - धनंजय मुंडेंची सभागृहाला माहिती दररोज 6 ते 7 लाख शेतकरी 1 रुपयात विमा भरत आहेत, मुंडेंनी दिली आकडेवारी खते, बी, बियाणे, कीटकनाशके आदींच्या किंमती, लिंकिंग यासंबंधीच्या तक्रारी थेट विभागाकडे करण्यासाठी व्हाट्सअप्प नंबर जाहीर 293 च्या प्रस्तावाला धनंजय मुंडेंचे विधानसभेत उत्तर, कृषी विभागाच्या योजना व यशाची खात्री मुंडेंनी केली व्यक्त! नमो शेतकरी महासन्मान योजनेतील 6 हजार रुपये दोन टप्प्यात देण्यासाठी प्रयत्न करणार पोकरा योजना, काजू विकास महामंडळास गती देणार *निसर्गाने साथ सोडली तरी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे - धनंजय मुंडेंनी व्यक्त केला विश्वास* मुंबई (दि. 20) - राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचामृत तर मागील अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पंचसूत्री सांगितली. शेती क्षेत्रासाठी 'शाश्वत शेती-समृद्ध शेती' हे

धरणे आंदोलनात शिक्षकांनी सहभागी व्हा-मराठवाडा शिक्षक संघ

इमेज
  धरणे आंदोलनात शिक्षकांनी सहभागी व्हा-मराठवाडा शिक्षक संघ  परळी / प्रतिनिधी राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध मागण्यासाठी मराठवाड्यातील सर्व माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर मराठवाडा शिक्षक संघाकडून शुक्रवार दि 21 रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत धरणे/ निदर्शने आंदोलन करण्यात येणार असून या धरणे आंदोलनात परळी तालुक्यातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मराठवाडा शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष अनुप कुसुमकर (भावसार) यांनी केले आहे. राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या अनेक मागण्या शासन आणि प्रशासन  दरबारी प्रलंबित असून मराठवाडा शिक्षक संघ सातत्याने या कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्नी पाठपुरावा करत आहे. सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी, सर्व शाळांना 100% अनुदान देण्यात यावे, सातव्या वेतन आयोगाचा 3,4 थकित हप्ता त्वरित जमा करावा,2005 पूर्वी नियुक्त शिक्षक कर्मचारी यांची जीपीएफ खाती पुर्ववत सुरू करावी,इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 10,20,30, आश्वाशित प्रगती योजना शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांना लागू करावी,राज्
इमेज
  गेवराई आगारप्रमुखांना ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा गेवराई यांच्यावतीने विविध मागण्याचे निवेदन गेवराई:- गेवराई आगार प्रमुखांना ग्राहक पंचायत शाखा गेवराई यांच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन प्रत्यक्ष सादर करण्यात आले या प्रश्नाबाबत आगर प्रमुखाची सविस्तर चर्चा करण्यात आली खालील समस्याबाबत त्यांना अवगत करण्यात आले सध्या आपल्या बसस्थानकात पाण्याची बाटली नाथ जल ची किंमत (15) रुपये असताना त्याची बस स्थानकात(20) रुपये याप्रमाणे विक्री होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले सदरील पाण्याची बाटली ग्राहकांना योग्य किमतीत(15) रुपये प्रमाणे मिळणे आवश्यक आहे याची कल्पना देण्यात आली व यावर योग्य ती कारवाई करण्याबाबत निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली तसेच ग्राहकाच्या विविध इतर मागण्या बाबत आगारप्रमुखाशी चर्चा करून कारवाई करण्याबाबत विनंती करण्यात आली आगार प्रमुखांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कारवाई करण्याबाबत आश्वासन देण्यात आले बस स्थानकात मोठ्या प्रमाणात स्वच्छता ठेवण्यात यावी जेणेकरून बीड जिल्ह्यात गेवराई आगार स्वच्छतेच्या दृष्टीने प्रथम राहील असा प्रयत्न करण्यात यावा असे चर्चेनुसार सांगण्यात आ

वेळ जाण्याआधी योग्य उपाय योजना व्हाव्यात

इमेज
  पंकजा मुंडेंची महत्त्वपूर्ण लक्षवेधी:कमी पर्जन्यमान: जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये केवळ १४ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक वेळ जाण्याआधी योग्य उपाय योजना  व्हाव्यात बीड  ।दिनांक २०। जुलै महिना संपत आला तरी जिल्हयात पुरेसा पाऊस झालेला नाही. कमी पावसामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले आहे, जिल्हयात केवळ चौदा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, शेतकरी व नागरिकांच्या दृष्टीने ही बाब गंभीर आहे, या परिस्थितीवर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी चिंता व्यक्त केली आहे. वेळ जाण्या आधी योग्य त्या उपाय योजना व्हाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.     यावर्षी कमी पावसामुळे उशिरा पेरण्या झाल्याने मूग आणि उडदाचे क्षेत्र कमी झाले. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ७८ टक्के एवढाच पाऊस झाला असून बीड जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये केवळ १४ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. जिल्ह्यातील एकाही तालुक्यात अद्यापही शंभर टक्के पाऊस झालेला नाही.  जुलै महिना संपत आला  अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने अद्यापही काही ठिकाणी पेरणा रखडल्या आहेत. *पंकजाताई मुंडेंनी व्यक्त केली चिंता* ------------ जिल्हयात निर

गोंधळून जाण्याचं किंवा काळजीचं कोणतंही कारण नाही.

इमेज
  आज सकाळी असंख्य स्मार्टफोन का वाजले? दूरसंचार मंत्रालयाकडून इमर्जन्सी अलर्ट टेस्टिंग? वाचा नेमकं काय घडलं… पुणे:  विविध प्रकारच्या जाहिरातींचे लघुसंदेश मोबाईल फोनवर येत असतात. मात्र आज सकाळी १०.२० ते १०.३० दरम्यान आज असंख्य स्मार्टफोन ‘व्हायब्रेट’ होऊन त्यावर एक संदेश दिसला. त्यामुळे एकाएकी असे का झाले, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याबाबत अनेकांनी समाजमाध्यमांत पोस्ट करून प्रश्न विचारले आहेत. मात्र केंद्रीय तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ही तातडीची चाचणी केली जात असल्याची चर्चा आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना जागरूक करणे शक्य आहे. त्यामुळे सरकारकडून अनेकदा नैसर्गिक आपत्तीविषयी लघुसंदेश पाठवून सूचना दिली जाते. मात्र सर्व नागरिक ते संदेश गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे एकाचवेळी अनेकांना असे इमर्जन्सी अलर्ट पाठवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या अनुषंगाने शोध घेतला असता, काही महिन्यांपूर्वी २३ एप्रिल रोजी युनायटेड किंग्डमनेही अशा प्रकारे इमर्जन्सी अलर्टची चाचणी घेतल्याचे निदर्शनास आले. तुमच्याही मोबाईलवर असा अलर्ट आला असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. सध्या कोणताही धोका आलेला नस

स्वओळख सिद्ध करावी-कविवर्य प्रा.अरुण पवार

इमेज
  देशाची संस्कृती आणि संगीत युवकांनी जपावी- पंडित उद्धवबापू आपेगावकर स्वओळख सिद्ध करावी-कविवर्य प्रा.अरुण पवार परळी / प्रतिनिधी देशाचे उज्वल भविष्य ज्यांच्या हाती आहे अशा बालकांनी आणि युवकांनी आपल्या देशाची संस्कृती आणि संगीत हे जपणे गरजेचे आहे प्रतिपादन जागतिक कीर्तीचे पखवाज वादक पंडित उद्धवबापूआपेगावकर यांनी केले तर विद्यार्थी दशेपासून मुलांनी स्वतःची ओळख सिद्ध करून दाखवण्यासाठी प्रयत्न करावेत असे मत कविवर्य प्रा.अरुण पवार यांनी केले.परळी तालुक्यातील मोहा येथील महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक संचालक कॉ. बापूसाहेबअण्णा देशमुख यांच्या 21 व्या स्मृती व्याख्यानमालेस प्रमुख आथिती म्हणून ते उपस्थित होते. कॉ.बापुसाहेबअण्णा देशमुख यांचा 21 वा स्मृती व्याख्यानमाला कार्यक्रम बुधवार दि 19 रोजी परळी तालुक्यातील महाराष्ट्र माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय मोहा येथे संपन्न झाला.या व्याख्यानमालेस पंडित उद्धवबापू आपेगावकर,कविवर्य प्रा.अरुण पवार यांच्या प्रमुख उपस्थितीसह संस्थेचे सचिव कॉ. एड.अजय बुरांडे, जेष्ठ संचालक कॉ.सुदामदादा देशमुख, कॉ.सुदाम शिंदे, कॉ.सखाराम शिंदे, प्राचार्य धनंजय देशमुख, उप

अधिकाऱ्यांचे गाव होईल यासाठी प्रोत्साहन देवू- ॲड. गोविंद फड

इमेज
  फौजदार झाल्याबद्दल प्राजक्ता फड चा धर्मापुरी ग्रा.पं च्या वतीने सत्कार अधिकाऱ्यांचे गाव होईल यासाठी प्रोत्साहन देवू- ॲड. गोविंद फड परळी  अत्यंत मेहनत, कष्ट, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर प्रचंड अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उच्चतम गुण प्राप्त करून फौजदार पदी निवड झाल्याबद्दल धर्मापुरी गावची कन्या प्राजक्ता महादेव फड हिचा बुधवारी ग्रामपंचायत च्या वतीने सत्कार करण्यात आला. दरम्यान, धर्मापुरी हे गाव अधिकाऱ्यांचे गाव बनवू.. असा विश्वास सरपंच तथा परळी पंचायत समितीचे माजी सभापती ॲड. गोविंदराव फड यांनी व्यक्त केला. परळी तालुक्यातील धर्मापुरी येथील महादेव लिंबाजी फड (महादू गुरुजी) यांची कन्या प्राजक्ता फड हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या माध्यमातून यश मिळवत फौजदार पदाला गवसनी घातली आहे.  या यशाबद्दल धर्मापुरी ग्रामपंचायत च्या वतीने शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन तसेच फेटा बांधून आज सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाच्या अध्यक्ष स्थानावरुन ॲड. गोविंदराव फड बोलत होते. समस्त ग्रामस्थांच्या वतीने हा सत्कार करण्यात आला. यावेळी धर्मापुरी चे विकासाभिमुख

लक्षवेधी वरील चर्चेदरम्यान कृषीमंत्री धनंजय मुंडेंची माहिती

इमेज
दुबार पेरणीचे संकट आल्यास राज्य शासन शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील - धनंजय मुंडे जलयुक्त शिवार टप्पा दोन मध्ये 5 हजार गावांचा समावेश वॉटर ग्रीड व जायकवाडीची तूट भरून काढण्यासाठी जलसंपदा विभागाकडे स्वतंत्र बैठक लावण्याबाबत विनंती करणार पीएम किसान योजनेतील पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, यासाठी यंत्रणा राबवू कापसावर काही जागी लाल्या सदृश रोग पडल्याच्या तक्रारी, तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश लक्षवेधी वरील चर्चेदरम्यान कृषीमंत्री धनंजय मुंडेंची माहिती मुंबई दि.19ः- राज्यात कालपासून पावसाने पुन्हा एकदा सर्वदुर हजेरी लावली असून, कृषी विद्यापीठामधील तज्ञांच्या मते 22 जुलै किंवा 31 जुलैपर्यंत ज्या पेरण्या होतील किंवा पुर्ण झालेल्या असतील, ते बियाणे न उगवल्याने किंवा अन्य कारणाने शेतकर्‍यावर दुबार पेरणीचे संकट आल्यास राज्य सरकार शेतकर्‍यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहील व शेतकर्‍यांना आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देईल; असे आश्वासन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेतील एका लक्षवेधीच्या प्रश्नावर बोलताना दिले आहे.  राज्यात व विशेष करून मराठवाड्यात कमी पाऊस झाला असून, दुबा

अध्यक्षा सौ.रमा आनंद आलदे यांचा पुढाकार

इमेज
 श्री शंभू महादेव सेवाभावी महिला भजनी मंडळाकडून विविध मान्यवरांचा सत्कार सोहळा अध्यक्षा सौ.रमा आनंद आलदे यांचा पुढाकार परळी (प्रतिनिधी) परळीच्या माजी नगराध्यक्षा श्रीमती राधाबाई बियाणी व वैद्यनाथ बँकेच्या संचालिका सौ. सुरेखाताई मेनकुदळे यांना अंबेजोगाई येथील दि.वा. संस्थेच्या वतीने श्री वैद्यनाथ रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल तर ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांची अ.भा.वारकरी मंडळाच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी निवड व विरशैव सभा शाखेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सौ.उमाताई समशेट्टे तर श्री काशी जगद्गुरू विश्वराध्य वीरशैव विद्यापीठ, वाराणसी वीरशैव सिध्दांत परिक्षा, बीड जिल्हा प्रमुख म्हणून निवड झाल्या बद्दल सौ.चेतनाताई गौरशेटे यांचा शंभू महादेव सेवाभावी महिला भजनी मंडळाच्या वतीने जाहिर सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात बालकिर्तनकार जनाई कोकाटे यांचाही गौरव करण्यात आला. परळी शहरातील नामांकीत अशा शंभू महादेव सेवाभावी महिला भजनी मंडळाच्या वतीने या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्षा सौ.रमा आनंद आलदे यांच्या पुढाकारातून त्यांच्या निवासस्थानी करण्यात आले
इमेज
  सिरसाळ्यात दोन कारचा समोरासमोर अपघात, शिर्डीला जाणारे आंध्र प्रदेशातील कुटुंब गंभीर जखमी सिरसाळा : सिरसाळ्यातील तेलगाव रोडवर दोन करचा समोरासमोर अपघात होऊन शिर्डी ला जाणारे आंध्र प्रदेशाचे कुटुंबातील व्यक्ती गंभीर जखमी झ आहेत. हि घटना आज दिनांक १९ रोजी दुपारी : ३० मिनिटांनी घडली आहे. आंध्र प्रदेशातील एक कुटुंब एपी २७ सिजी १४५ ह्या ब्रिजा कंपनी च्या गाडीतून परळी-सिरसाळा शिर्डी कडे जात होते. सिरसाळ्यात तेलगाव रोड वळणी रस्त्यात पुण्या कडून आलेली कार एम ए ) १२ पिएन ७६७५ ह्या कारशी समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यात आंध्र प्रदेशातील एक महिला, दोन मुली, एक पुरूष गंभीर जखमी झाला आहे. अपघात एवढा भिषण होता कि, दोन्ही गाड्या एकमेकांना धडकून चुरा झाल्या आहेत. घटनास्थळी सिरसाळा पोलीस स्टेशन चे सपोनि संदिप दहिफळे यांनी पोलीस कर्मचारी मुंडे, मेंडके, पोकळे, सय्यद, जेटेवाड यांना पाठवले, पोलीसांनी तात्काळ पोहचत स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने जखमींना उपचारार्थ दवाखान्यात हलवले आहे.

मंत्रिमंडळाची बैठक एकदा छत्रपती संभाजी नगरला घ्यावी - धनंजय मुंडेंची मागणी

इमेज
  मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलवा - धनंजय मुंडेंची मागणी यंदाचा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन 'घरोघरी तिरंगा' फडकवून साजरा करण्याचा अध्यादेश काढावा - धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांना मागणी मंत्रिमंडळाची बैठक एकदा छत्रपती संभाजी नगरला घ्यावी - धनंजय मुंडेंची मागणी मुंबई (दि. 19) - मराठवाडा मुक्ती संग्रामाचा जाज्वल्य इतिहास मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त मराठवाड्यासह सबंध देशाला माहित व्हावा व या इतिहासाची जाणीव पुढच्या पिढीला असावी या दृष्टीने यंदाचा अमृत महोत्सवी मुक्तिसंग्राम दिन साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमास देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांना निमंत्रित करावे अशी विनंती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.  मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्य सेनानी व हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा सभागृहात मांडला होता; त्याचे समर्थन कर
इमेज
  सदोष व निकृष्ट बियाणांमध्ये नुकसान शेतकऱ्यास झाल्यास भरपाई देण्याची तरतूद करा- वसंत मुंडे  परळी (प्रतिनिधी)   महाराष्ट्र मध्ये २०१९ पासून आजतागायत अनेक कंपन्यांनी शेतकऱ्यांना बोगस निकृष्ट बी बियाणे,खत,औषधी पुरवून करोडो रुपयांना लुटले.नुकसान झालेल्या शेतकर्यांना कायद्यात भरपाईची तरतुद करावी अशी मागणी ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केली आहे.  माजी कृषिमंत्री दादा भुसे व अब्दुल सत्तार यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर मराठवाडा विदर्भात सोयाबीन व कापसाचे बोगस बियाणे शेतकऱ्यांना खरेदी करून पेरणी करावी लागल्याने बियाणे उगवलेच नाही.याबाबत शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडे तक्रारी करून ही आज तागायत नुकसान भरपाई दिली गेली नाही.कृषी खात्याचे संचालक व मुख्य गुणनियंत्रण व निविष्ठा कृषी आयुक्त कार्यालयामार्फत बोगस खत बियाणे औषधी पुरवणाऱ्या कंपन्यांना परवाने कोणी दिले याची चौकशी करावी व प्रयोगशाळेतील प्रमाणित अप्रमानीत अहवाल देणे बंधनकारक परवान्याच्या बाबतीत नियमावची तरतूद कायद्यात असतानाही बोगस कंपनीला परवाने कोणी दिले याची चौकशी मुद्दे निहाय करण्यासाठी अनेकवेळा मागणी करुनही कुठलीच

प्रश्नोत्तराच्या तासात धनंजय मुंडे यांचे विरोधकांना संवेदनशील उत्तर

इमेज
  राज्यात मागील वर्षीच्या तुलनेत खतांच्या किंमती स्थिर, केंद्र सरकारने वाढीव अनुदान दिले - धनंजय मुंडे बोगस बियाण्यांच्या विरोधात कडक कायदा याच अधिवेशनात आणणार - धनंजय मुंडे यांचे विधानसभेत स्पष्टीकरण पीक कर्ज वाटपाची रक्कम 24 हजार कोटींवरून 28 हजार कोटीने वाढली, पीक कर्जापासून एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या अडचणी मांडा, त्या सोडवू - कृषीमंत्री धनंजय मुंडे मुंबई (दि. 19) - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खतांच्या किमती वाढल्यास देशातील बाजारपेठेत त्याचा परिणाम होऊ नये यासाठी केंद्र सरकार वाढीव अनुदान देत असते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खतांच्या किमती स्थिर राहिल्यास त्या देशातील बाजारपेठेतही स्थिर राहतात म्हणूनच 2022 सालच्या तुलनेत 2023 मध्ये ही महाराष्ट्र राज्यात खतांच्या किमती स्थिर असून उलट काही ठराविक खतांच्या किमतींमध्ये घट देखील झाली आहे, असे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत बोलताना म्हटले आहे. काँग्रेसचे आ. विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केलेल्या प्रश्नास द्यावयाच्या उत्तरामध्ये धनंजय मुंडे बोलत होते. धनंजय मु

प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे यांचा विशेष ब्लाॅग: "बालाघाटातील स्वर लेणं : संगीत अलंकार प्रा. शंकर सिनगारे"

इमेज
 "बालाघाटातील स्वर लेणं : संगीत अलंकार प्रा. शंकर सिनगारे" "हळव्या मनाचा अत्यंत संवेदनशील माणूस, माणसांचे मधुकण गोळा करणारा अवलिया,प्रतिभासंपन्न गायक,विद्यार्थीप्रिय शिक्षक अशी ओळख निर्माण करणारे उपक्रमशील शिक्षक अर्थातच बालाघाटातील स्वर लेणं  संगीत अलंकार प्रा. शंकर सिनगारे .......!" "संगीतात सूर, ताल आणि लय मिसळण्याची कला करणारे अनेक असतात. पण प्रा.शंकर सिनगारे  म्हणजे माणुसकीचे गाणे गुणगुणत चैतन्य निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या गायकी मध्ये स्वरांची  नजाकत फार सुंदरतेने दिसते. "कोठेही जा दूरदूर तू माझ्यापासून... माझे गीत तुला तेथेही काढील शोधून !" माणुसकीचे भान जपणारे  गझलकार सुरेश भट यांच्या ओळींची आर्तता प्रा. शंकर सिनगारे यांच्या गायनात आढळते. प्रा.शंकर सिनगारे  "गायन अलंकार"  पदवीने सन्मानित असून प्रख्यात संगीत गुरू आदरणीय पंडित शिवदासजी देगलूरकर गुरुजी  यांचे शिष्य आणि "ह.भ.प. दशरथ महाराज सिनगारे" बर्दापूरकर यांचे सुपुत्र आहेत. प्रा.शंकर सिनगारे यांना संगीत क्षेत्रातील गायन अलंकार या विशेष पदवीने गौरविण्यात आल