पोस्ट्स

सप्टेंबर १३, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MB NEWS:सोमवारच्या आंदोलनात उसतोड कामगारांनी सहभागी व्हावे- काॅ.सुदाम शिंदे

इमेज
  सोमवारच्या आंदोलनात उसतोड कामगारांनी सहभागी व्हावे- काॅ.सुदाम शिंदे परळीवै(प्रतिनिधि) ....    ऊसतोडणी कामगार   वाहतुकदार, मुकादम च्या विविध  मागण्यासाठी जिल्ह्यातील गावा-गावत  सोमवार दि 21 रोजी  होणाऱ्या आंदोलनात वाहतूकदार, मुकादम व उसतोडणी कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सिटु संलग्न असलेल्या उसतोडणी कामगार संघटनेचे कॉ सुदाम शिंदे यांनी केले आहे. ऊसतोडणी कामगारांच्या मजुरीत व वाहतूकदारांच्या दरात वाढ करावी व मुकादमाच्या कमिशन मध्ये वाढ करावी. नवीन  त्रिपक्षीय करार करावा. वाहतुकीचे दर डिझल दरवाढी नुसार करावे. मुकादमचे कमिशन 35% करावे. उसतोड़नी कामगार महामंडळची अंमलबजावणी करावी यासह उसतोडणी मजुरांच्या प्रलंबित मागण्यासाठी सोमवारी परळी तालुक्यातील सिरसाळा, मोहा, करेवाडी, गर्देवाड़ी, कावळेवाडी, मांडेखेल, माळहिवरा, भिलेगाव, वाघाळा, बोधेगाव, यासह इतर गावातील ग्रामपंचायतीसह प्रशासकीय कार्यालयसमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. या आंदोलनात  वाहतूकदार, मुकादम व उसतोडणी कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सिटु संलग्न असलेल्या उसतोडणी कामगार संघटनेचे कॉ सुदाम शिंदे

MB NEWS:पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त भाजयुमो आयोजीत सेवा सप्ताहात , जिल्ह्यात विविध कार्यक्रम संपन्न; परळीत 70 जणांनी केले रक्तदान

इमेज
 * पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त भाजयुमो आयोजीत सेवा सप्ताहात  , जिल्ह्यात विविध कार्यक्रम संपन्न; परळीत 70 जणांनी केले रक्तदान आजच्या कठीण काळात समाजोपयोगी उपक्रमांची गरज-निळकंठ चाटे* परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-    देशाचे प्रभावी प्रधानमंत्री मा.श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्हा भाजपा युवा मोर्चाच्या वतिने सेवा सप्ताह साजरा करण्यात येत असुन या अंतर्गत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परळी शहरात आयोजीत रक्तदान शिबिरात 70 जणांनी रक्तदान केले. सध्या कोरोनामुळे देशात बिकट परिस्थिती असुन या काळात रक्तदान शिबिरासारख्या समाजोपयोगी कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याची गरज असुन भाजयुमोच्या वतिने बीड जिल्ह्यात असेच सामाजीक उपक्रम राबविले जात असल्याचे भाजयुमो बीड जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी सांगितले.          पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजयुमो जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांच्या वतीने दि.14 ते 20 सप्टेंबर रोजी जिल्हाभरात सेवा सप्ताह राबविण्यात येत आहे.यात बी

MB NEWS:भारतीय जनता युवा मोर्चा बीड आयोजीत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण ! धारुरच्या कु.साक्षी मुंडे ने पटकावलं प्रथम पारितोषिक

इमेज
  भारतीय जनता युवा मोर्चा बीड आयोजीत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण ! धारुरच्या कु.साक्षी मुंडे ने पटकावलं प्रथम पारितोषिक परळी, प्रतिनिधी...  लोकनेत्या मा.पंकजाताई मुंडे यांच्या  वाढदिवसानिमित्त विद्यार्थी व युवकांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने भारतीय जनता युवा मोर्चा बीड यांनी जिल्हास्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेत एकूण 93 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.आज परळी येथे अक्षदा मंगल कार्यालय येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न झाले. यात कु.साक्षी मुंडे,(धारूर) हिने प्रथम पारितोषिक पटकावले  5001/- रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. चि.दिलीप शिंदे (परळी) द्वितीय पारितोषिक पटकावले 3001/- रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. तसेच कु.पूनम दुतारमाल (बीड)तृतीय पारितोषिक पटकावले 1501/-रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले तसेच वकृत्व स्पर्धेतील सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी भारतीय जनता पार्टी चे प्रदेश सचिव राजेश जी देश

MB NEWS:परळी औष्णिक विद्युत केंद्राला पाणी पुरवठा करणारा खडका बंधारा १०० टक्के भरला !

इमेज
  परळी औष्णिक विद्युत केंद्राला पाणी पुरवठा करणारा  खडका बंधारा १०० टक्के भरला ! एक दरवाजा उघडला; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा परळी वैजनाथ, प्रतिनिधी......       परळी औष्णिक विद्युत केंद्राला पाणी पुरवठा करणारा  खडका बंधारा १०० टक्के भरला आहे.तसेच या बंधार्याचा एक दरवाजा उघडला असुन नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हा बंधारा पुर्ण ओसंडून वाहत असल्याने परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राला लागणार्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.अखंडीत वीजनिर्मिती करण्याच्या दृष्टीने ही अतिशय समाधानाची बाब आहे.        गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली. या पावसाने परळी औष्णिक विद्युत केंद्राला पाणी पुरवठा करीत असलेला सोनपेठ तालुक्यातील खडका बंधारा १०० टक्के पूर्ण भरला. शुक्रवारी १० पैकी एक दरवाजा दुपारी एक तास उघडून पाणी सोडण्यात आले.  नदी काठावरील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हा बंधारा भरल्याने या बंधार्याखालील गावांचा पाणीप्रश्न मिटला आहे.तसेच परळी औष्णिक विद्युत केंद्राला याच ठिकाणाहून  पाणी पुरवठा होतो  त्यामुळे परळी वीज केंद्रासह सोनपेठ तालु

MB NEWS:बीड जिल्हा कोरोना अपडेटस्: आज दि.१९ दुपारी दोन वाजता प्राप्त अहवाल....

इमेज
  बीड जिल्हा कोरोना अपडेटस्: आज दि.१९ दुपारी दोन वाजता प्राप्त अहवाल.... जिल्ह्यात तब्बल १५५ रिपोर्ट पाॅझिटिव्ह. १२१५ अहवाल प्राप्त झाले. परळीत ११ रिपोर्ट पाॅझिटिव्ह. जिल्ह्यात १०६० रिपोर्ट निगेटिव्ह.

MB NEWS: परळी-बीड रस्त्यावर सिरसाळा जवळ भररस्त्यात मोटारसायकल टाकली जाळून ; काही काळ वाहतूक ठप्प

इमेज
  परळी-बीड रस्त्यावर सिरसाळा जवळ भररस्त्यात मोटारसायकल टाकली जाळून ; काही काळ वाहतूक ठप्प  परळी वैजनाथ,प्रतिनिधी...    परळी बीड रस्त्यावर भररस्त्यात एक मोटारसायकल  जाळून टाकण्यात आली.भररस्त्यात मधोमध जळती मोटारसायकल बघून रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प  झाल्याचे दिसून आले.सिरसाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचुन वाहतूक पुर्ववत केली आहे.       सिरसाळा रस्त्यावर गाढेपिंपळगाव फाट्याजवळील हायवेवर भररस्त्यात एक मोटारसायकल जळत असल्याची घटना घडली.नेमकी मोटारसायकल पेटली कशी?कोणी जाळली?का जाळली? याबाबत सिरसाळा पोलीस तपास करत आहेत.दरम्यान भररस्त्यात मधोमध जळती मोटारसायकल बघून रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प  झाल्याचे दिसून आले.

MB NEWS:पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांच्या १४ महिन्यांच्या कार्यकाळातील कार्यआहवाल !

इमेज
पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांच्या १४ महिन्यांच्या कार्यकाळातील कार्यआहवाल ! बीड, दि (प्रतिनिधी) :   बीड जिल्हापोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या  काळात या जिल्ह्यातील गुन्हेगारांवर मोठा वचक निर्माण केला होता.अट्टल गून्हेगारांविरूध्द मोहिमच राबवली. जिल्ह्यात कायम कायदा व सूव्यवस्था  रहावी यासाठी यशस्वी प्रयत्न केले.पोद्दार यांची प्रसाशनावर मोठी पकड होती.अगदी छोट्या मोठ्या हालचालीवर लक्ष असायचे.पोलिस खात्यात शिस्त असावी यासाठी ते सदैव प्रयत्न करीत. विशेष म्हणजे चांगले काम करणाऱ्यांचे कौतूक,कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी - कर्मचारांविरध्दही  कठोर भूमिका घेतल्या.त्यांच्या जागी आता नवे पोलीस अधीक्षक म्हणून राजा रामस्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

MB NEWS:परळीकरांना जलक्रीडेचा आनंद देणारा चांदापुर लघुतलाव काठोकाठ भरला !

इमेज
  परळीकरांना जलक्रीडेचा आनंद देणारा चांदापुर लघुतलाव काठोकाठ भरला ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      परळी तालुक्यातील लघुतलावांपैकी एक व परळी शहरापासून जवळच असलेला चांदापुर लघुतलाव काठोकाठ भरला आहे.परळीकरांना जलक्रीडेचा आनंद देणारा चांदापुर लघुतलाव काठोकाठ भरल्याने समाधान व्यक्त होत आहे.तसेच या तलावाखालील सिंचन क्षेत्रात या जलसाठ्याचा लाभ होणार आहे.            परळी शहरात लहान मुले व युवकांना पोहण्यासाठी स्विमिंग पूलच नाही. शहरापासून जवळच सात किलोमीटर अंतरावर असलेला चांदापुर चा तलाव आहे.  त्यामुळे शहरातील नागरिकांनी या तलावालाच स्विमिंग पूल केलेले आहे. सकाळी पाच पासून ते दहा अकरा वाजेपर्यंत या तलावावर सुमारे चारशे ते पाचशे नागरिक आपल्या बच्चे कंपनीला घेऊन या तलावावर गर्दी करतात. यावर्षी धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे . त्यामुळे हा लघुतलाव आता पुर्ण भरुन ओसंडून वाहण्याच्या मार्गावर आहे. या ठिकाणी पोहण्यासाठी जाणार्या नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

MB NEWS:31 डिसेंबरला 3 वर्षे पूर्ण झालेल्या बालकास नर्सरी, 6 वर्षे झालेल्यास पहिलीत प्रवेश

इमेज
  31 डिसेंबरला 3 वर्षे पूर्ण झालेल्या बालकास नर्सरी, 6 वर्षे झालेल्यास पहिलीत प्रवेश मुंबई इयत्ता पहिली प्रवेशासाठी सहा वर्षे वयाची अट असली तरी ही अट गेल्यावर्षी 15 दिवसांनी कमी करत मानिव दिनांकानुसार 15 नोव्हेंबरपर्यंत केला होता. याबाबतही तक्रारी केल्यानंतर आता 31 डिसेंबरला ज्या बालकांचे वय 3 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक असेल तरच प्ले ग्रुपमध्ये प्रवेश मिळणार आहे. याच तारखेला 6 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक असल्यास पहिलीला प्रवेश मिळणार आहे. ही अंमलबजावणी 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार आहे. यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी जारी केला आहे. आरटीई निकषानुसार इयत्ता पहिलीत किती वर्षाच्या मुलांना प्रवेश द्यावा याबाबतचे निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून वेगवेगळ्या टप्प्यांत जाहीर झाले आहेत. टप्प्याटप्प्याने दरवर्षी वयाचा निकष बदलण्यात आला. दहा वर्षांपूर्वी पहिलीतील प्रवेशासाठी सहा वर्षांची अट निश्चित करताना मुलांचे 31 जुलैपर्यंतचे वय ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे यानंतर जन्माला आलेल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप पाल

MB NEWS:राज्य निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायत निवडणुकीची चाचपणी सुरू, जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला

इमेज
 राज्य निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायत निवडणुकीची चाचपणी सुरू, जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला राज्य निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायत निवडणुकीची चाचपणी सुरू केली आहे. ग्रामपंचायत निवडणुका घेता येतील का याबाबत राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे. 21 सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एप्रिल ते जून 2020 कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकाबाबत राज्य निवडणूक आयोगाने पत्र दिले आहे.

MB NEWS:सर्वांच्या सहभागाने पुढील काही दिवसांत इंदू मिल येथील पायाभरणी समारंभ होणार ! राजकारण करू नये असे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

इमेज
सर्वांच्या सहभागाने पुढील काही दिवसांत इंदू मिल येथील पायाभरणी समारंभ होणार ! राजकारण करू नये असे मुख्यमंत्र्यांचे आवाहन मुंबई.... इंदू मिल येथे महामानव डॉ बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे, यामध्ये कुठलाही पक्ष- संघटना असा भेदभाव असूच शकत नाही.  एमएमआरडीएने देखील राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर पुतळ्याच्या सुधारित संरचनेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण केली आणि त्यानुसार पायाभरणी कार्यक्रम करण्याचे नियोजन केले मात्र अशा महत्वपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे हे मी लक्षात आणून दिले आहे आणि त्यामुळेच ठरविल्याप्रमाणे एक चांगला कार्यक्रम सर्व  आवश्यक मान्यवरांना निमंत्रित करून पुढील काही दिवसांत करावा असे निर्देश देण्यात आले  आहेत.  त्यामुळे कुणीही या मुद्द्यावरून राजकारण करू नये अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे

MB NEWS:पीककर्ज प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार

इमेज
पीककर्ज प्रक्रिया  ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार  बीड,  दि. १८--- जिल्हयातील खरीप पिक कर्जासाठी अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांनी एकदाही कर्ज घेतलेले नाही, अशा जुन्या व ज्यांनी कर्ज घेतलेले आहे. व जे पुन्हा कर्ज घेण्यास पात्र आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांनी संबंधीत बँकेकडे खरीप पिक कर्ज मागणीसाठी ३० सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करावेत.जे शेतकरी ३० सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करतील अशा सर्व शेतक-यांचे अर्ज बँकांनी स्विकारावेत. जे बँक व्यवस्थापक अर्ज स्विकारणार नाहीत किंवा स्विकारण्यास टाळाटाळ करतील अशा बॅक व्यवस्थापका विरुध्द कडक कार्यवाही करण्यात येईल. तसेच ज्या शेतकऱ्यांनी व शेतक-यांची माहिती तलाठी व सोसायटी यांच्या मार्फत बँकेला दिलेली आहे. पात्र शेतकऱ्यांचे अर्ज संबंधीत बँकेकडे प्रलंबीत आहेत. अशा बँक व्यवस्थापकांनी पिक कर्जास पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाची कार्यवाही जलद गतीने करावी. यात हयगय करणा-या बँक व्यवस्थापकांवर नियमानुसार कार्यवाही अनुसरन्यात येईल, यांची गंर्भीर नोंद सर्व बँक व्यवस्थापकांनी घ्यावी. असे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे  ०००

MB NEWS:आर्य समाजामुळे हैदराबाद संग्रामास पूर्णत्व प्राप्त झाले"---------अभ्यासक डॉ सोमनाथ रोडे यांचे प्रतिपादन.

इमेज
  आर्य समाजामुळे हैदराबाद संग्रामास पूर्णत्व प्राप्त झाले -अभ्यासक डॉ. सोमनाथ रोडे यांचे प्रतिपादन                                          परळी वैजनाथ ,दि.१८-.                निजामाच्या जुलमी राजवटीतून सामान्य जनतेला मुक्त करण्यासाठी आर्य समाजाने जो संघर्षमय लढा दिला, तो अतिशय जाज्वल्य असून युगानुयुगांपर्यंत प्रेरणा देत राहील. आर्य समाजाच्या बलिदानामुळे हैदराबादच्या क्रांतिकारी लढ्यास पूर्णत्व प्राप्त झाले, असे उद्गार प्रसिद्ध इतिहासतज्ञ प्राचार्य डॉ सोमनाथ रोडे यांनी काढले .            महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेच्या वतीने गेल्या सप्ताहभर चाललेल्या "हैदराबाद संग्रामातील आर्यांची शौर्यगाथा" या वेबिनार व्याख्यानमालेच्या समारोपात काल(दि.१७) श्री रोडे प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते.  अध्यक्षस्थानी आर्य सभेचे प्रधान श्री योगमुनीजी हे होते .                                             आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून श्री रोडे यांनी आर्यसमाजाच्या क्रांतिकारी चळवळीचा इतिहास विशद केला. ते म्हणाले ,' आर्य समाजाची चळवळ ही सर्वव्यापी होती. धार्मिक ,सामाजिक आणि राष्ट्रीय स्वातंत्र

MB NEWS:मराठा आरक्षणासाठी राजीनामा द्यावा लागला तर देणारच- खासदार उदयनराजे भोसले

इमेज
मराठा आरक्षणासाठी राजीनामा द्यावा लागला तर देणारच- खासदार उदयनराजे भोसले सातारा ........ मराठा आरक्षणप्रश्नी खासदार उदयनराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आरक्षणासाठी राजीनामा द्यावा लागला तर देणारच, अशी ग्वाही उदयनराजे यांनी दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आपली भूमिका मांडली.     सर्व समाजांप्रति आदर आहे. पण इतर समाजांप्रमाणे मराठा समाजाला न्याय मिळायला हवा, असे त्यांनी म्हटले आहे.  मला कोणत्याही पक्षाचं लेबल लावू नका. माझी बांधिलकी लोकांशी आहे. वेळ पडली तर राजीनामा द्यावा लागला तर देणार, असे त्यांनी स्पष्ट केले.  आरक्षण प्रश्नी कोणीही श्रेय घेऊ नये. प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे. न्याय नाही मिळाला तर उद्रेक होईल. जे मी बोलतो ते मी करतो. मनाला पटतं तेचं मी करतो, असा इशारा त्यांनी दिला आहे. मराठा समाजाला न्याय देण्यात काय अडचण? इतर समाजांना जसे आरक्षण दिले तसे मराठा समाजाला द्या. मराठ्यांना न्यायांपासून वंचित का ठेवता? असे अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले.

MB NEWS:कोविडसंदर्भात राज्यात २ लाख ५७ हजार गुन्हे दाखल; ३४ हजार ९५८ व्यक्तींना अटक

इमेज
कोविडसंदर्भात राज्यात २ लाख ५७ हजार गुन्हे दाखल; ३४ हजार ९५८ व्यक्तींना अटक मुंबई दि. १७ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ५७ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३४ हजार ९५८ व्यक्तींना अटक करण्यात आली असून २५ कोटी २५ लाख ४४ हजार ६६४ रु. दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते १६ सप्टेंबर या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३५६ (८९४ व्यक्ती ताब्यात) १०० नंबरवर आलेले फोन – १ लाख १३ हजार ०४४ अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३४७ जप्त केलेली वाहने – ९६,१६० कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने राज्यातील १८७ पोलीस व २१ अधिकारी अशा एकूण २०८ पोलिस कर्मचारी/अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यात

MB NEWS:माजलगाव धरण 100 टक्के भरले

इमेज
  माजलगाव धरण 100 टक्के भरले ! माजलगाव धरणाचे ११ दरवाजे उघडले माजलगाव, प्रतिनिधी..... जायकवाडी धरणाचे सगळे दरवाजे उघडल्यामुळे व कुंडलिका, बिंदुसरा प्रकल्पातून होत असलेल्या विसर्गामुळे माजलगाव धरण 100 टक्के भरले असून प्रकल्पात पाण्याचा वाढता ओघ पहाता माजलगाव धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. माजलगाव धरणाच्या पाच दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू होता मात्र आता अकरा दरवाजे उघडण्यात आलेत. जायकवाडी धरणातून गोदावरी नदीच्या पात्रात 94 हजार 320 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सिंधफना नदी पात्रालगतच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी पात्रालगत कोणीही विनाकारण जाऊ नये. याबाबत सर्व नदी लगतच्या गावांमध्ये संबधीत ग्रामयंत्रणेमार्फत अवगत करण्यात यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

MB NEWS:जायकवाडी धरणातून 94 हजार क्युसेक एवढा विसर्ग

इमेज
-----------------------------------  *◼️ औरंगाबाद जिल्ह्यात ढगफुटीसारखा पाऊस, ग्रामीण भागात उडाली दाणादाण * 🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️ * जायकवाडी धरणातून 94 हजार क्युसेक एवढा विसर्ग * 🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️ * माजलगाव धरण 100 टक्के भरले* -----------------------------------  औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात रात्री अक्षरशः ढगफुटी सारखा पाऊस झाला आहे. या पावसामुळे ग्रामीण भागात दाणादाण उडाली आहे. जिल्ह्यातील अनेक लहान नद्यांना, ओढ्यांना पूर आला तर पिके आडवी झाली आहेत. या वर्षातला सर्वाधिक मुसळधार पाऊस रात्री झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. अनेक गावांमध्ये नागरिकांना रात्र जागून काढावी लागली आहे. अनेक ठिकाणी घरात पाणी शिरले. कन्नड तालुक्यातील करंजखेड, चिंचोली, घाटशेन्द्रा भागात पावसाने कहर केला.  अनेक ठिकाणी पाणी शेतात साचले तर गावात देखील पाणी शिरले. *जायकवाडी धरणातून 94 हजार क्युसेक एवढा विसर्ग* औरंगाबाद पैठण जायकवाडी धरणातून 94 हजार क्युसेक एवढा विसर्ग करण्यात आला आहे. जायकवाडी धरणाच्या 27 दरवाजांपैकी काही दरवाजे दीड फूट काही दोन फूट तर काही दरवाजे चार फुटाने उ

बीड जिल्हा कोरोना अपडेटस्: आज दि.१८ दुपारी दोन वाजता प्राप्त अहवाल.... जिल्ह्यात तब्बल १७८ रिपोर्ट पाॅझिटिव्ह. १४९७ अहवाल प्राप्त झाले. परळीत २७ रिपोर्ट पाॅझिटिव्ह. जिल्ह्यात १३१९ रिपोर्ट निगेटिव्ह.

इमेज
  बीड जिल्हा कोरोना अपडेटस्: आज दि.१८ दुपारी दोन वाजता प्राप्त अहवाल.... जिल्ह्यात तब्बल १७८ रिपोर्ट पाॅझिटिव्ह. १४९७ अहवाल प्राप्त झाले. परळीत २७ रिपोर्ट पाॅझिटिव्ह. जिल्ह्यात १३१९ रिपोर्ट निगेटिव्ह.

MB NEWS:राज्यात आज एका दिवसात १९ हजार ५२२ एवढ्या सर्वाधिक संख्येने रुग्ण बरे* *आतापर्यंत ८ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त* - *आरोग्यमंत्री राजेश टोपे*

इमेज
 *राज्यात आज एका दिवसात १९ हजार ५२२ एवढ्या सर्वाधिक संख्येने रुग्ण बरे* *आतापर्यंत ८ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त* - *आरोग्यमंत्री राजेश टोपे*           मुंबई, दि.१७: राज्यात आज एका दिवसात १९ हजार ५२२ रुग्ण बरे होऊन घरी  सोडण्यात आले असून ही संख्या आतापर्यंत सर्वाधिक आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८ लाख १२ हजार ३५४ पोहोचली आहे. आज २४ हजार ६१९ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत सध्या  ३ लाख १ हजार  ७५२ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.   *आज निदान झालेले २४,६१९ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३९८ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू)* : मुंबई मनपा-२४११ (४३), ठाणे- ४७१ (७), ठाणे मनपा-४२३ (२), नवी  मुंबई मनपा-३१८ (७), कल्याण डोंबिवली मनपा-६२५ (२), उल्हासनगर मनपा-६८ (१), भिवंडी निजामपूर मनपा-४८ (१), मीरा भाईंदर मनपा-२५० (७), पालघर-१७८ (११), वसई-विरार मनपा-२९६ (४), रायगड-५२२ (७), पनवेल मनपा-३४६, नाशिक-४४४ (७), नाशिक मनपा-१४१५ (५), मालेगाव मनपा-५० (२), अहमदनगर-६२६ (१०),अहमदनगर मनपा-१३८२ (७), धुळे-१०४ (१)

MB NEWS:पुणे कोरोना अपडेटस्...... *जिल्हा आरोग्य अधिकारी अहवाल, पुणे दि.17 सप्टेंबर 2020*

इमेज
 पुणे कोरोना अपडेटस्...... *जिल्हा आरोग्य अधिकारी अहवाल, पुणे दि.17 सप्टेंबर 2020* पुणे जिल्हा नवीन रुग्ण - 4,571 एकूण रुग्ण - 2,40,423 आज पुणे शहर - 1,964 पिंपरी चिंचवड -  1,113 ग्रामीण, नगरपरिषद व कन्टोनमेंट - 1,494 आजचे मृत्यू  - 85 (पुणे शहर - 45 पिंपरी - चिंचवड - 17 पुणे ग्रामीण- 13 नगरपरिषद- 8 कंन्टोन्मेंट- 2) एकूण मृत्यू  - 5,451 आजचे डिस्चार्ज - 4,617 एकूण डिस्चार्ज- 1,92,771 ---------------------------

MB NEWS: पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांची बदली;राजा रामस्वामी यांची नियुक्ती

इमेज
 पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांची बदली;राजा रामस्वामी यांची नियुक्ती बीड, दि.18 (प्रतिनिधी) :  जिल्हा पोलीस अधीक्षकपदी राजा रामस्वामी यांची नियुक्ती केली आहे.गुरुवारी रात्री या संबंधी शासनाने आदेश  काढले आहेत.           पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या  काळात या जिल्ह्यातील गुन्हेगारांवर मोठा वचक निर्माण केला होता.अट्टल गून्हेगारांविरूध्द मोहिमच राबवली. त्यापैकी बहूतांशी गुन्हेगारांना हद्दपार केले. जिल्ह्यात कायम कायदा व सूव्यवस्था  रहावी यासाठी यशस्वी प्रयत्न केले.त्यामूळेच कोणाही समाजकंटकांनी,उपद्रवी व्यक्तींनी दहशतीपोटी डोकेवर काढण्याचे धाडस केले नाही.पोद्दार यांची प्रसाशनावर मोठी पकड होती.अगदी छोट्या मोठ्या हालचालीवर लक्ष असायचे.पोलिस खात्यात शिस्त असावी यासाठी ते सदैव प्रयत्न करीत. विशेष म्हणजे चांगले काम करणाऱ्यांचे कौतूक,कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी - कर्मचारांविरध्दही  कठोर भूमिका घेतल्या.कामात घोडचूक करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तात्काळ पोलिस नियंत्रण कक्षात बदल्या करित कर्तव्यात कुचराई जमणार नसल्याचे स्पष्ट केले. वेळप्रसंगी काही  कर्मचाऱ्याना निलंबित तर काही कर्मचारी सेवेतुन

MB NEWS:तहसीलदारांच्या आश्वासनानंतर तिसऱ्या दिवशी उपोषण मागे -दोन महिन्यांत अतिक्रमणांवर कारवाईचे आश्वासन

इमेज
 तहसीलदारांच्या आश्वासनानंतर तिसऱ्या दिवशी  उपोषण मागे    -दोन महिन्यांत अतिक्रमणांवर कारवाईचे आश्वासन  सिरसाळा न्यूज  :           ग्रामसेवक यांची बदली करा व रेणुकादेवी मंदिर परिसरातील गट नं 343 मधील अतिक्रमण पाडण्याच्या मागणीसाठी युवकांनी सोमवारी सुरु केलेले उपोषण तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.          सोमवारी युवकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामसेवकाची बदली करावी व गट न.343 मधील अतिक्रमण पाडावे या मागणीसाठी उपोषण सुरू केले होते.उपोषणाचा पहिल्याच दिवशी ग्रामविकास अधिकारी यांचे बदली आदेश प्रशासनाने काढले.तर दुसऱ्या मागणीच्या पुर्ततेसाठी उपोषणावर ठाम राहिलेल्या उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी  स्वतः तहसीलदार यांनी येत 15 नोव्हेम्बर 2020 पर्यंत कारवाईची करण्यासाठी मुदतीचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आल्याचे मिलिंद चोपडे,धर्मा मेंडके,केशव बनसोडे यांनी सांगितले.

MB NEWS:माजी उपमुख्यमंत्री स्व सुंदरराव सोळंके जयंती निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

इमेज
 माजी उपमुख्यमंत्री स्व सुंदरराव सोळंके जयंती निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न दिंद्रुड, प्रतिनिधी.. महाराष्ट्र राज्याचे भूतपूर्व उपमुख्यमंत्री तथा धारुर तालुक्यातील मोहखेड चे भुमीपुत्र स्व.सुंदररावजी सोळंके यांच्या जयंती निमित्त मोहखेड ग्रामस्थांनी वृक्षारोपणाचे आयोजन गुरुवारी सकाळी मोहखेड येथे केले होते. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा मोहखेड चे भुमीपुत्र स्व सुंदररावजी सोळंके साहेब यांच्या जयंतीच्या औचित्याने मोहखेड करांनी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाचा वसा जोपासत स्तुत्य उपक्रम राबविला.मोहखेड व परिसरात शेकडो रोपट्यांची लागवड याप्रसंगी करण्यात आली. युवानेते विरेन सोळंके, धारुर कृ.उ.बा.समिती चे माजी सभापती रविंद्र सोळंके व हिंगणीचे माजी सरपंच नंदकुमार सोळंके,सरपंच शिवराज सोळंके, बालासाहेब सोळंके,बब्रुवान सोळंके, संतोष सोळंके सह मोहखेड येथील जेष्ठ मंडळी, तरुणांनी या कार्यक्रमात उपस्थिती देत वृक्षाची लागवड करत हातभार लावला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी चा तंतोतंत नियम पाळत वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न झाला.

MB NEWS:पोलीस भरतीत 13 टक्के जागा मराठा समाजासाठी बाजूला काढणार-गृहमंत्री*

इमेज
 🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑 ---------------------------------  *🔷पोलीस भरतीत 13 टक्के जागा मराठा समाजासाठी बाजूला काढणार-गृहमंत्री* -----------------------------------  ◼️मुंबई, 17 सप्टेंबर: राज्यात 12 हजार 500 पोलिसांची भरती ( Maharashtra police bharti 2020) करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मात्र, ही भरती करताना मराठा समाजासाठी 13 टक्के जागा बाजूला काढणार असल्याची  माहिती, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. पण ही बाब कायद्यानुसार तपासून मराठा समाजाला योग्य तो न्याय देण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे. मराठा आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचंही अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.  सरकार पुढील दोन दिवसात मराठा आरक्षणाचा मसुदा घटनापीठासमोर सादर करणार आहे. राज्यात 12 हजार 500 पोलिसांची भरती लवकरच केली जाणार आहे. या प्रस्तावाला बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, असं असलं तरी या भरतीचा लाभ मराठा समाजातील विद्यार्थ्यांना होणार नसल्यामुळे र

MB NEWS:विठ्ठल दहिफळे यांना पीएचडी प्रदान*

इमेज
  * विठ्ठल दहिफळे यांना पीएचडी प्रदान * परळी वैजनाथ, प्रतिनिधी..            आदर्श विद्यालय मांडवा येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेले व किनगाव तालुका अहमदपूर येथील रहिवाशी विठ्ठल ज्ञानोबा दहिफळे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने नुकतीच पीएचडी पदवी प्रदान केली आहे. दहिफळे यांना हिंदी विषयात पीएचडी प्राप्त झाली असून उषा प्रियवंदा के कथात्मक साहित्य मे व्यक्त  परिवेश या विषयावर ग्रामीण महाविद्यालय वसंत नगर तालुका मुखेड माजी प्राचार्य डॉक्टर रामकृष्ण बदने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शोध प्रबंध सादर केला होता.     या  यशाबद्दल इंद्रायणी व सरस्वती नागरगोजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम बापू नागरगोजे, सचिव विजयकुमार नागरगोजे, शाळेचे मुख्याध्यापक व्हि.एस.भताने, केंद्रे एस.बी., कातकडे आर.डब्ल्यू.,फड आर.  एस., फड  बी.बी., फड पी.एन., गित्ते के.डी., लव्हारे पी.एस., कांबळे व्हि.जी., फड बि.के., आदींनी अभिनंदन केले आहे.

MB NEWS:बीड जिल्हा कोरोना अपडेटस्: आज दि.१७ दुपारी तीन वाजता प्राप्त अहवाल....

इमेज
 बीड जिल्हा कोरोना अपडेटस्: आज दि.१७ दुपारी तीन वाजता प्राप्त अहवाल.... जिल्ह्यात तब्बल ३०३ रिपोर्ट पाॅझिटिव्ह. ३३४८ अहवाल प्राप्त झाले. परळीत २० रिपोर्ट पाॅझिटिव्ह. जिल्ह्यात ३०४५ रिपोर्ट निगेटिव्ह