MB NEWS:राजमाता जिजाऊ यांची जयंती पवनराजे अर्बन निधीत उत्साहात साजरी
![इमेज](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgNaEaBmoutpyoc1uSsH53nLWx63WYK5loMuIS5D6f-EYzLVW8PE0YP7-8gd_jFN7Pvd7wisfX2tXua3xpaUIjZXs8ffrjoHdKgYX-hqiHpbzdn5nNguhn-8Qk5mF0sN7JrAM9nOyNqgegDJ7nnAkwnG9M3rl4T4ymxzJAcfTZRy61R9EGM26HD8LA9/s320/IMG-20230112-WA0019.jpg)
राजमाता जिजाऊंचे संस्कारच हिंदवी स्वराज्याचा पाया होता-प्रल्हाद सावंत राजमाता जिजाऊ यांची जयंती पवनराजे अर्बन निधीत उत्साहात साजरी परळी वैजनाथ/ प्रतिनिधी राजमाता जिजाऊ यांची जयंती आज गुरुवार दिनांक 12 जानेवारी रोजी पवनराजे अर्बन मल्टीपर्पज निधीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक जवळील पवनराजे अर्बन मल्टीपर्पज निधीत राजमाता जिजाऊ यांची जयंती आज 12 जानेवारी रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस अध्यक्ष श्री प्रल्हाद सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना श्री प्रल्हाद सावंत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. रयतेला भरडणाऱ्या आणि रयतेवर अनन्वित अन्याय करणाऱ्या जुलमी राजवटींविरोधात छत्रपती शिवरायांनी शड्डू ठोकला. सोबत होते फक्त मुठभर मावळे...स्वराज्यावर आलेली अनेक संकट या मावळ्यांनी अंगावर झेलली. प्रसंगी बलिदान दिलं पण स्वराज्याची ज्योत नेहमीच तेवत ठेवली. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य घडवलं खरं, पण त्यामागं मोठ