मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

MB NEWS:राजमाता जिजाऊ यांची जयंती पवनराजे अर्बन निधीत उत्साहात साजरी

 राजमाता जिजाऊंचे संस्कारच हिंदवी स्वराज्याचा पाया होता-प्रल्हाद सावंत

राजमाता जिजाऊ यांची जयंती पवनराजे अर्बन निधीत उत्साहात साजरी


परळी वैजनाथ/ प्रतिनिधी


राजमाता जिजाऊ यांची जयंती आज गुरुवार दिनांक 12 जानेवारी रोजी पवनराजे अर्बन मल्टीपर्पज निधीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक जवळील पवनराजे अर्बन मल्टीपर्पज निधीत राजमाता जिजाऊ यांची जयंती आज 12 जानेवारी रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस अध्यक्ष श्री प्रल्हाद सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 


याप्रसंगी बोलताना श्री प्रल्हाद सावंत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. रयतेला भरडणाऱ्या आणि रयतेवर अनन्वित अन्याय करणाऱ्या जुलमी राजवटींविरोधात छत्रपती शिवरायांनी शड्डू ठोकला. सोबत होते फक्त मुठभर मावळे...स्वराज्यावर आलेली अनेक संकट या मावळ्यांनी अंगावर झेलली. प्रसंगी बलिदान दिलं पण स्वराज्याची ज्योत नेहमीच तेवत ठेवली. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य घडवलं खरं, पण त्यामागं मोठा वाटा होता तो राजमाता जिजाऊंचा...जर जिजामाता नसत्या तर कदाचित हिंदवी स्वराज्य निर्माण होऊ शकलं नसतं. राजमाता जिजाऊंचे संस्कार हे हिंदवी स्वराज्याचा पाया होते. त्याच जीवावर छत्रपती शिवरायांनी बलाढ्य अशा जुलमी राजवटांशत्रूचा सामना करण्याचं अशक्यप्राय कार्य सिद्धीस नेलं असे सांगितले.

त्यावेळी कार्यक्रमास पवनराजे अर्बन मल्टीपर्पज निधी चे सचिव श्री गोविंद दिलीपराव भरबडे यांच्यासह सर्व संचालक ,सभासद ,कर्मचारी, नागरिक व पिग्मी एजंट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....