इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

MB NEWS:राजमाता जिजाऊ यांची जयंती पवनराजे अर्बन निधीत उत्साहात साजरी

 राजमाता जिजाऊंचे संस्कारच हिंदवी स्वराज्याचा पाया होता-प्रल्हाद सावंत

राजमाता जिजाऊ यांची जयंती पवनराजे अर्बन निधीत उत्साहात साजरी


परळी वैजनाथ/ प्रतिनिधी


राजमाता जिजाऊ यांची जयंती आज गुरुवार दिनांक 12 जानेवारी रोजी पवनराजे अर्बन मल्टीपर्पज निधीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक जवळील पवनराजे अर्बन मल्टीपर्पज निधीत राजमाता जिजाऊ यांची जयंती आज 12 जानेवारी रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस अध्यक्ष श्री प्रल्हाद सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 


याप्रसंगी बोलताना श्री प्रल्हाद सावंत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. रयतेला भरडणाऱ्या आणि रयतेवर अनन्वित अन्याय करणाऱ्या जुलमी राजवटींविरोधात छत्रपती शिवरायांनी शड्डू ठोकला. सोबत होते फक्त मुठभर मावळे...स्वराज्यावर आलेली अनेक संकट या मावळ्यांनी अंगावर झेलली. प्रसंगी बलिदान दिलं पण स्वराज्याची ज्योत नेहमीच तेवत ठेवली. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य घडवलं खरं, पण त्यामागं मोठा वाटा होता तो राजमाता जिजाऊंचा...जर जिजामाता नसत्या तर कदाचित हिंदवी स्वराज्य निर्माण होऊ शकलं नसतं. राजमाता जिजाऊंचे संस्कार हे हिंदवी स्वराज्याचा पाया होते. त्याच जीवावर छत्रपती शिवरायांनी बलाढ्य अशा जुलमी राजवटांशत्रूचा सामना करण्याचं अशक्यप्राय कार्य सिद्धीस नेलं असे सांगितले.

त्यावेळी कार्यक्रमास पवनराजे अर्बन मल्टीपर्पज निधी चे सचिव श्री गोविंद दिलीपराव भरबडे यांच्यासह सर्व संचालक ,सभासद ,कर्मचारी, नागरिक व पिग्मी एजंट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....