भगवानबाबाचे आशिर्वाद घेतले! वंजारी समाजाच्या आरक्षणाशिवाय लढाई थांबणार नाही-फुलचंद कराड
![इमेज](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgCcKpAcJRXvmK6USvucxye2-jLbe6HL6B_zwkaNxHi4FSiVTMJY-42AYljLJhllIHFU2pacbAmDUYqrlkNADrjDcZuMEpIs6NWoo01q9hTPsxFEa8ate0O6CNbjX1aoPf_2QygFYSjryU/s320/IMG-20180831-WA0061.jpg)
भगवानबाबाचे आशिर्वाद घेतले! वंजारी समाजाच्या आरक्षणाशिवाय लढाई थांबणार नाही-फुलचंद कराड परळी/प्रतिनिधी वंजारी समाज दोन टक्के आरक्षणावर फार पूर्वीपासूनच नाखूष असून चांगले शिक्षण असूनही आरक्षण नसल्याने नोकरीच्या अनेक संधी समाजाच्या मुलांना दवडाव्या लागल्या आहेत. आता हे सगळं काही थांबलच पाहिले असे समाजाचे मत असून आज जयंती दिनी आम्ही गडावर संतश्री भगवानबाबांचा आशिर्वाद घेतला असून वंजारी समाजाच्या आरक्षणाशिवाय आमचा लढा थांबणार नाही असा इशारा भगवानसेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी दिला. संतश्री भगवानबाबा यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर भगवानसेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी भगवान गडावर आज दि.31 ऑगस्ट रोजी बैठक आयोजित केली होती. मठाधिपतीनी बैठकीस परवानगी नाकारल्याने गडावर काय होणार याकडे सर्वाचेच लक्ष लागले होते. दरम्यान प्रचंड पोलीस बंदोबस्तात आज फुलचंद कराड यांनी गडावर जावून बैठक घेत आता मोठे आंदोलन करूनच आपण आरक्षण मिळवूत अशी घोषणा केली. दुपारी भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड गडाकडे निघाले असता गडाच्या पायथ्याशी पोलिसांनी त्यांच्यासोबत चर्चा केली. काही मोजक्याच समर्थकांसह आ