युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

भगवानबाबाचे आशिर्वाद घेतले! वंजारी समाजाच्या आरक्षणाशिवाय लढाई थांबणार नाही-फुलचंद कराड


भगवानबाबाचे आशिर्वाद घेतले! वंजारी समाजाच्या आरक्षणाशिवाय लढाई थांबणार नाही-फुलचंद कराड
परळी/प्रतिनिधी
वंजारी समाज दोन टक्के आरक्षणावर फार पूर्वीपासूनच नाखूष असून चांगले शिक्षण असूनही आरक्षण नसल्याने नोकरीच्या अनेक संधी समाजाच्या मुलांना दवडाव्या लागल्या आहेत. आता हे सगळं काही थांबलच पाहिले असे समाजाचे मत असून आज जयंती दिनी आम्ही गडावर संतश्री भगवानबाबांचा आशिर्वाद घेतला असून वंजारी समाजाच्या आरक्षणाशिवाय आमचा लढा थांबणार नाही असा इशारा भगवानसेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी दिला.
संतश्री भगवानबाबा यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर भगवानसेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी भगवान गडावर आज दि.31 ऑगस्ट रोजी बैठक आयोजित केली होती. मठाधिपतीनी बैठकीस परवानगी नाकारल्याने गडावर काय होणार याकडे सर्वाचेच लक्ष लागले होते. दरम्यान प्रचंड पोलीस बंदोबस्तात आज फुलचंद कराड यांनी गडावर जावून बैठक घेत आता मोठे आंदोलन करूनच आपण आरक्षण मिळवूत अशी घोषणा केली.

दुपारी भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड गडाकडे निघाले असता गडाच्या पायथ्याशी पोलिसांनी त्यांच्यासोबत चर्चा केली. काही मोजक्याच समर्थकांसह आपण गडावर जावून दर्शन घ्यावे अशी सूचना पोलिसांनी केली. या पार्श्वभूमीवर कराड गडावर गेले, त्यांनी संत भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेवून गाभाऱ्याबाहेर कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.
गडाच्या बाहेर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतंाना फुलचंद कराड म्हणाले की, वंजारी समाजाची एकुण संख्या लक्षात घेता दोन टक्के अत्यंत अपुरे असून आम्हाला पुन्हा ओबीसीत घ्यायला हवे. चांगले आरक्षण नसल्याने वंजारी समाजाचे तरूण विद्यार्थी चांगले शिक्षण घेवून सुद्धा नोकरीपासून वंचित असून आता आरक्षणाशिवाय ही लढाई थांबणार नसल्याचेत्यांनी सांगितले. 16 सप्टेंबरला पुण्यात वंजारी समाजाची आरक्षण प्रश्नी राज्यव्यापी बैठक होत असून नियोजनबद्ध पद्धतीने एकुण आंदोलनाची आखणी करण्यासोबतच आरक्षणाच्या मुद्यावर आता कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही असा इशारा कराड यांनी दिला. एकुण आजचा कार्यक्रम पुर्णपणे शांततेत पार पडला असून गडाच्या कोणत्याही आचारसंहितेचे आम्ही उल्लंघन केले नसल्याचे भगवानसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या