इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

भाजपच्या सत्ता परिवर्तनात रासपचे योगदान मोलाचे - ना. पंकजा मुंडे


*भाजपच्या सत्ता परिवर्तनात रासपचे योगदान मोलाचे*
*_ना. पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत पार पडला रासपचा स्थापना दिवस_*

नवी दिल्ली दि. २९ ---- रासप हा अठरा पगड जाती जमातीला सोबत घेवून काम करणारा पक्ष असून भाजपच्या सत्ता परिवर्तनाच्या लढाईत त्यांचे मोलाचे योगदान ठरले आहे. या पक्षाचे भविष्य अतिशय उज्ज्वल आहे अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी राष्ट्रीय समाज पक्षाला त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

   रासपचा पंधरावा स्थापना दिन समारोह आज दिल्लीतील काॅन्स्टीट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला त्यावेळी त्या बोलत होत्या. रासपचे अध्यक्ष तथा राज्याचे पशूसंवर्धन मंत्री महादेव जानकर व रासपचे वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते.

   रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे माझे बंधू आहेत, लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पश्चात आमचे बहिण-भावाचे नाते अतूट असं आहे, मुंडे साहेबांच्या संघर्षाच्या लढाईतून आम्ही खूप कांही शिकलो, त्यांनी दाखविलेल्या साहस आणि संयमाच्या मार्गावर वाटचाल करत पुढे जात असल्याचे ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या. रासपने माझा घोंगडी व काठी देवून केलेला सत्कार हा  साहस व आपल्या सारख्या तमाम बांधवांच्या प्रेमाचे प्रतिक आहे असे सांगून त्या म्हणाल्या की, रासप हा सर्व जाती धर्माला सोबत घेऊन काम करणारी संघटना आहे, अनेक सामाजिक प्रश्नांवर जानकर यांनी लढा दिला. आयुष्यभर अविवाहित राहून फक्त आईचा आशीर्वाद घेवून ते समाजाच्या भल्यासाठी घराबाहेर पडले. आपले सर्व आयुष्य त्यांनी यासाठी समर्पित केले आहे त्यांचे काम खरोखरीच धाडसी व कौतुकास्पद आहे. रासप हा भाजपचा चांगला मित्र आहे, सत्ता परिवर्तनात त्यांचे मोलाचे योगदान ठरले आहे, धनगर समाज हा लढवय्या समाज आहे, जानकरांसारखे कणखर नेतृत्व त्यांना लाभल्याने त्यांचे प्रश्न निश्चित मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त करून त्यांनी रासपच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!