युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

भगवानगडावर कोणताही मेळावा किंवा बैठक नाही ; वंजारी समाजाच्या आरक्षण आंदोलनाची घोषणा करणार - फुलचंद कराड

भगवानगडावर कोणताही मेळावा किंवा बैठक नाही
वंजारी समाजाच्या आरक्षण आंदोलनाची घोषणा करणार - फुलचंद कराड
बीड । प्रतिनिधी
दि.31 ऑगस्ट रोजी संत श्री भगवानबाबा यांची जयंती असुन याच दिवशी वंजारी समाजाच्या आरक्षण प्रश्नावर केवळ आंदोलनाची घोषणा किंबहुना आंदोलनाची सुरूवात केली जाणार आहे. भगवानगड आमचे श्रद्धास्थान असुन या दिवशी गडावर आम्ही जाणार आहोत परंतु तेथे कोणती बैठक अथवा मेळावा होणार नाही तर संत श्री भगवानबाबाचे आशिर्वाद घेवून आंदोलनाच्या प्रश्नावर आम्ही मार्गस्थ होणार आहोत अशी माहिती भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भगवानगडावर दि. 31 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय संत श्री भगवानबाबा यांच्या जयंतीचा कार्यक्रम असुन याचवेळी गडावर भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड आपल्या समर्थकांसह जाणार आहेत. भगवानगडावर आरक्षण प्रश्नावर बैठक अथवा मेळावा घेण्याचा आमचा यापुर्वीही कधीही विचार नव्हता, आणि आताही नाही. आम्ही भगवानगडाला आमचे श्रद्धास्थान मानत असुन गडाचा सन्मान राखणे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे जयंतीच्या दिवशी आम्ही गडावर जावुन भगवानबाबांचे दर्शन घेणार आहोत. याठिकाणी बाबांचे आशिर्वाद घेवुन आम्हाला आंदोलनाचे रणशिंग फुंकायचे असल्याचे फुलचंद कराड म्हणाले. वंजारी समाजास दोन टक्के आरक्षण असुन त्यावर संपुर्ण समाज नाखुश आहे. सध्या सर्वच समाज आरक्षणाची मागणी करीत असुन त्यास आमची कोणतही हरकत नाही.
वंजारी समाजाला ओबीसी मध्ये टाकावे व ओबीसीचे आरक्षण 21 टक्के करावे अशी आमची मागणी आहे. या मागणीसाठी आम्ही राज्यव्यापी आंदोलन करणार असुन दि. 16 सप्टेंबरला पुणे येथे राज्यव्यापी बैठक होणार असल्याचेही फुलचंद कराड यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या