ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे दिपक रणनवरे यांचे जालना येथे आमरण उपोषण
![इमेज](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh2J-jUbDoI-2PHyKDqXKd4VQegW3tYp_Yslb8FsEJWUFqcC6mnR35uEUh8C34AEyA0smhmxwkzTJTaoBrGgo4ALXQ6jLvt7HB3XYdg8JZ5S731I_HmsIlNrwjFlt3lQr4XvRTTmWtyFF-A-DrSZ6cNndfvrpebfBRtv-5etf5A16BoqDA0ysRp3NxBAdM/s320/IMG-20231121-WA0018.jpg)
ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे दिपक रणनवरे यांचे जालना येथे आमरण उपोषण ................ नांदेड दिनांक 21 नोव्हेंबर प्रतिनिधी समस्त ब्राह्मण समाज समिती यांच्यावतीने ब्राह्मण समाजाच्या प्रलंबीत मागण्यांसाठी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक दिपक रणनवरे हे जालना येथील गांधी चमनबाग मध्ये आमरण उपोषण दिनांक 28 नोव्हेंबर मंगळवार पासून सकाळी 11 पासून आमरण उपोषणास बसणार आहेत. आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या ब्राह्मण समाजाला शासनाने आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर करावे ही ब्राह्मण समाजाची मुख्य मागणी आहे. स्वातंत्र्य पूर्व काळात ब्राह्मण समाजाचे शिक्षणाचे प्रमाण हे इतर समाजाच्या तुलनेत व्यापक होते त्यामुळे ब्रिटीश सरकार मध्ये किंबा इतर तत्सम संस्थानात नौकरीचे प्रमाण अधिक होते. ही सत्यता असून नाकारता येत नाही. परंतु स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षाचा आढावा घेतला असता असे दिसून येते की, शैक्षणिक क्षेत्रात देशातील सर्व समाज जवळपास शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आलेला आहे. शैक्षणिक उन्नतीच्या माध्यमातून भारतीय समाजाच्या सर्व स्तरातील सामाजिक घट