इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

खा.डाॅ.प्रीतम मुंडेंच्या प्रयत्नाला यश परळी-परभणी रेल्वे मार्गाचे

खा.डाॅ.प्रीतम मुंडेंच्या प्रयत्नाला यश  



परळी-परभणी रेल्वे मार्गाचे लवकरच दुहेरीकरण



परळी- परभणी या मार्गाचे दुहेरीकरण करावे, या मागणीला आता यश आले आहे. लवकरच परळी- परभणी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण होणार आहे.

परळी वैजनाथ - परळी- परभणी या मार्गाचे दुहेरीकरण करावे, या मागणीला आता यश आले आहे. लवकरच परळी- परभणी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण होणार आहे. परळी-परभणी या मार्गावरुन परभणी, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अकोला, नागपूर, अमरावती व लातूर, हैदराबाद, तिरुपती, बिदर, कोल्हापूर, पंढरपूर, पुणे, मुंबई आदी ठिकाणी रेल्वे धावतात. या १६ च्यावर एक्स्प्रेस व पॅसेंजर, मालवाहतूक रेल्वेची ये-जा असते. मोठ्या प्रमाणावर प्रवासी प्रवास करतात. मात्र, या रेल्वे कधीही वेळेवर धावत नाहीत.

परभणीहून येणाऱ्या रेल्वे जवळच असलेल्या वडगाव निळा येथे तासनतास सिग्नलची वाट पाहत थांबवल्या जातात. या रेल्वे स्थानकावरून परळी दिसते; पण तास -दिडतास सिग्नल मिळेपर्यंत रेल्वे येथे थांबतात. परळीहून रेल्वे निघण्याच्या अगोदरपासून ती या स्थानकावरून पुढे जाईपर्यंत रेल्वेला याच स्थानकावर थांबवले जाते. तर, गंगाखेड येथून रेल्वे निघण्या अगोदरपासून ती या स्थानकावरुन पुढे जाईपर्यंत या रेल्वेला येथे थांबवले जाते.तसेच लातूरकडील मार्गावर लातूर रोडवर रेल्वे तासनतास थांबवल्या जातात. यासाठी लातूर रोड ते परळी, परभणी या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आवश्यक होते. यातील परळी- परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणास मंजुरी मिळून या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाल्यास रेल्वेला आता या कोणत्याही स्थानकावर थांबावे लागणार नाही.शिवाय दुहेरीकरणामुळे भविष्यात रेल्वेची संख्याही वाढू शकते. यामुळे प्रवासी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत रेल्वे संघर्ष समितीचे चंदुलाल बियाणी, जी. एस. सौंदळे आदींनी केले आहे.

खा.डाॅ.प्रीतम मुंडेंच्या प्रयत्नाला यश
जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी परळी-परभणी या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व्हावे, यासाठी वेळोवेळी रेल्वे मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. रेल्वे मंत्र्यांची भेट घेतली. यामुळे सदर मार्गाच्या दुहेरीकरणास मंजुरी मिळून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. या मार्गाचे दुहेरीकरण जलद गतीने होणार असल्याचे खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी सांगितले आहे.

परळी-परभणी रेल्वे मार्गाचे लवकरच दुहेरीकरण



परळी- परभणी या मार्गाचे दुहेरीकरण करावे, या मागणीला आता यश आले आहे. लवकरच परळी- परभणी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण होणार आहे.

परळी वैजनाथ - परळी- परभणी या मार्गाचे दुहेरीकरण करावे, या मागणीला आता यश आले आहे. लवकरच परळी- परभणी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण होणार आहे. परळी-परभणी या मार्गावरुन परभणी, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अकोला, नागपूर, अमरावती व लातूर, हैदराबाद, तिरुपती, बिदर, कोल्हापूर, पंढरपूर, पुणे, मुंबई आदी ठिकाणी रेल्वे धावतात. या १६ च्यावर एक्स्प्रेस व पॅसेंजर, मालवाहतूक रेल्वेची ये-जा असते. मोठ्या प्रमाणावर प्रवासी प्रवास करतात. मात्र, या रेल्वे कधीही वेळेवर धावत नाहीत.

परभणीहून येणाऱ्या रेल्वे जवळच असलेल्या वडगाव निळा येथे तासनतास सिग्नलची वाट पाहत थांबवल्या जातात. या रेल्वे स्थानकावरून परळी दिसते; पण तास -दिडतास सिग्नल मिळेपर्यंत रेल्वे येथे थांबतात. परळीहून रेल्वे निघण्याच्या अगोदरपासून ती या स्थानकावरून पुढे जाईपर्यंत रेल्वेला याच स्थानकावर थांबवले जाते. तर, गंगाखेड येथून रेल्वे निघण्या अगोदरपासून ती या स्थानकावरुन पुढे जाईपर्यंत या रेल्वेला येथे थांबवले जाते.तसेच लातूरकडील मार्गावर लातूर रोडवर रेल्वे तासनतास थांबवल्या जातात. यासाठी लातूर रोड ते परळी, परभणी या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आवश्यक होते. यातील परळी- परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणास मंजुरी मिळून या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाल्यास रेल्वेला आता या कोणत्याही स्थानकावर थांबावे लागणार नाही.शिवाय दुहेरीकरणामुळे भविष्यात रेल्वेची संख्याही वाढू शकते. यामुळे प्रवासी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत रेल्वे संघर्ष समितीचे चंदुलाल बियाणी, जी. एस. सौंदळे आदींनी केले आहे.

खा.डाॅ.प्रीतम मुंडेंच्या प्रयत्नाला यश
जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी परळी-परभणी या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व्हावे, यासाठी वेळोवेळी रेल्वे मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. रेल्वे मंत्र्यांची भेट घेतली. यामुळे सदर मार्गाच्या दुहेरीकरणास मंजुरी मिळून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. या मार्गाचे दुहेरीकरण जलद गतीने होणार असल्याचे खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी सांगितले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट