इमेज
  घरकुल लाभार्थ्यांची थट्टा थांबवा, अन्यथा आंदोलन; महादेव गंगणे पाटील यांचा परळी पालिकेला इशारा परळी वैजनाथ (प्रतिनिधी) रमाई घरकुल योजनेंतर्गत १५४ लाभार्थ्यांना १ कोटी १ लाख ८१ हजार २५० रुपयांचा निधी वर्ग केल्याच्या बातम्या प्रसिद्ध करून स्वतःची पाठ थोपवून घेणाऱ्या परळी नगर परिषदेचा फुगा फुटला आहे. प्रत्यक्षात एकाही लाभार्थ्याला रुपया देखील मिळाला नसून, नगर परिषदेने केवळ कागदी घोडे नाचवले असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी प्रशासनाला तीव्र जाब विचारला आहे. प्रसिद्धीचा स्टंट, प्रत्यक्षात लाभार्थी वंचित महादेव गंगणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे नगर परिषदेच्या कारभारावर तीव्र आक्षेप घेतला आहे. नगर परिषदेने काही दिवसांपूर्वी रमाई आवास योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी वाटप केल्याचा दावा प्रसिद्धी माध्यमांद्वारे केला होता. मात्र, प्रत्यक्षात जेव्हा लाभार्थ्यांनी त्यांच्या बँक खात्यांची तपासणी केली, तेव्हा त्यांच्या हाती निराशाच आली. अनेक गरीब आणि गरजू लाभार्थी अद्यापही पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्यापासून वंचित आहे...

श्री सरस्वती विद्यालयाच्या सन २००१ च्या इ. दहावी बॅचचे हर्षोल्हासात स्नेहमिलन

श्री सरस्वती विद्यालयाच्या सन २००१ च्या इ. दहावी बॅचचे हर्षोल्हासात स्नेहमिलन  


परळी (प्रतिंनिधी): श्री सरस्वती विद्यालयाच्या सन २००१ च्या इ. दहावी बॅचचे स्नेहमिलन रविवार, दि. १९ रोजी श्रद्धा मंगल कार्यालयात हर्षोल्हासात संपन्न झाले. सर्वप्रथम सकाळी ठीक ८:०० वाजता शाळेत राष्ट्रगीत व प्रार्थना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात अगदी आनंदाने झाली. यात तत्कालीन अ, ब, क, ड या चार तुकड्यांमध्ये माजी शिक्षकांनी ३० मिनिटांचा तास भरविला व अध्यापन केले. शाळेतील छोट्या मध्यांतर मध्ये चिवडा, खारे शेंगदाणे, वाटाणे, फुटाणे, लेमन गोळ्या, शेंगदाणा चिक्कीची लज्जतसुद्धा माजी विद्यार्थ्यानी चाखली. 

नाश्त्यानंतर पुढील मुख्य कार्यक्रमाची सुरुवात श्रद्धा मंगल कार्यालय येथे झाली. सर्व मान्यवर गुरुजनांचे यावेळी पाद्यपुजन करून स्वागत करण्यात आले. शाळेतील आजी- माजी शिक्षकांमध्ये रोडगे मॅडम, टाले मॅडम, चांडक मॅडम, तोतला मॅडम, हजारे मॅडम, मुंदडा सर, नानेकर सर, चाटे सर, रोडे सर, सौंदळे सर, तांबडे सर, खरबड सर, पोहनेरकर सर, देशमाने सर, जुनाळ सर, चौधरी सर, नाईकवाडे सर, ढाकणे सर, देशमुख सर, गजाकोष सर, मोगरकर सर, कांबळे सर, मैद सर, बेजगमवार यांच्यासह १२८ माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. 

शिक्षकांच्या मनोगतात आनंदी मन व सुदृढ प्रकृती सांभाळण्याबाबत नानेकर सरांनी मोलाचे विचार मांडले. देशमाने सरांनी वसुंधरेचे व पर्यावरणाचे जतन करणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. कवडे सरांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. सौंदळे सरांनी ऊर्जेच्या संवर्धनाबाबत विचार मांडले तर तांबडे सरांनी दैनंदिन कामकाजात नैराश्याने ग्रासून न जाता सकारात्मकतेने वाटचाल करण्याचा संदेश दिला. कार्यक्रमात सुरुचि भोजनासह सांघिक खेळांचे देखील आयोजन करण्यात आले. यात माजी विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा सोनी व राहुल गिरी यांनी केले. प्रास्ताविक अजित लिंबकर व वैभव झरकर यांनी सादर केले तर आभार प्रदर्शन स्वानंद भंडारे व अर्चना मैड यांनी केले. स्नेह-मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....