अभिनंदन: राजाराम शेळके बनले पी एस आय

इमेज
राजाराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षकपदी म्हणून पदोन्नती परळी/  प्रतिनिधी-          गेली 30 वर्ष पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले  परळी संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे.            महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय, क्र. पीएमएन- ०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ आदेशानुसार सदरची पदोन्नती करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील 28 पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली असून यात परळी  शहर  संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांनाही पदोन्नती मिळाली असून ते आता पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. अविनाश बारगळ ,पोलीस अधिक्षक बीड जिल्हा यांच्या स्वाक्षरीने पदोन्नतीचे पत्र त्यांना देण्यात आले आहे.   मा. अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके म.रा.मुंबई यांचेकडील पत्र क्र.पोमसं/पदोन्नती/ ग्रेड पिएसआय/३४/२०२२ दि. २२.०४.२०२२ महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय क्र.पीएमएन-०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ व दिनांक २५/०२/२०२२ अन्वये पोलीस नाईक हा संवर्ग रद्द करुन या संवर्गातील पदे पोलीस शिपाई, पोलीस हवालदार, व

MB NEWS:.भ.प.नारायण महाराज बारटक्के यांच्या ओजस्वी वाणीतून पारायणास सुरुवात

 मिरवट येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास उत्साहात प्रारंभ


ह.भ.प.नारायण महाराज बारटक्के यांच्या ओजस्वी वाणीतून पारायणास सुरुवात


परळी वैजनाथ/ प्रतिनिधी


परळी तालुक्यातील मौजे मिरवट येथे गुरुवार दिनांक 27 एप्रिल पासून अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच कलशारोहणाच्या कार्यक्रमाचा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला आहे. ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे व्यासपीठ प्रमुख श्री ह भ प नारायण महाराज बारटक्के यांच्या रसाळ व ओजस्वी वाणीतून होत असून गाथा भजन प्रमुख सोपान महाराज गवळी नसगाव जालना हे आहेत तसेच कलश पूजन श्री ह भ प कांतादेव महाराज वडगावकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाची सांगता बुधवार दिनांक 3 मे रोजी होणार आहे.

परळीपासून जवळच असलेल्या मौजे मिरवट येथे गुरुवार दिनांक 27 एप्रिल ते बुधवार दिनांक 3 मे दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व कलशारोहणाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज पहाटे चार ते पाच काकडा आरती, सहा ते सात विष्णू सहस्त्रनाम ,सकाळी सात ते दहा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 11 ते तुकाराम गाथा भजन, दुपारी दोन ते चार भावार्थ रामायण, दुपारी चार ते पाच राम कृष्ण हरी जप, सायंकाळी सहा ते सात तीस वाजता धुपारती रात्री नऊ ते 11 हरिकीर्तन तसेच बारा ते चार हरीजागर असे दैनंदिन कार्यक्रम होत आहेत.

दरम्यान 27 एप्रिल रोजी ह भ प भागवताचार्य दत्ता महाराज बोर्डीकर बोंदरगाव व शुक्रवार दिनांक 28 एप्रिल रोजी ह भ प वैराग्यमूर्ती प्रभाकर महाराज झोलकर भिसेगाव तर 29 एप्रिल रोजी ह भ प भागवताचार्य वैजनाथ महाराज थोरात वडगाव दादाहरी, 30 एप्रिल रोजी ह भ प भागवताचार्य संतोष महाराज वनवे बीड यांचे हरिजागर संपन्न झाले.  1 मे रोजी ह भ प विश्वंभर महाराज उखळीकर, दोन मे रोजी ह भ प भागवताचार्य रूपालीताई सवणे  यांचे किर्तन होणार आहे. 


बुधवार दिनांक 3 मे रोजी दुपारी बारा वाजता कलश स्थापनेचे कीर्तन ह भ प शिवाजी महाराज बोकारे पूर्णा यांचे होणार असून दुपारी एक ते तीन वाजता श्री गुरु सोपानकाका संस्थान परळी येथील ह भ प भागवताचार्य विठ्ठल महाराज उखळीकर यांचे कीर्तन होणार आहे तसेच रात्री नऊ ते अकरा वाजता ह भ प मधुकर महाराज सायाळकर यांचे कीर्तन होईल. या धार्मिक कार्यक्रमास पंचक्रोशीतील नामवंत गायनाचार्य मृदंगाचार्य तसेच भाविक भक्तांनी या ज्ञानामृत व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मुंबई मित्र मंडळ मिरवट व समस्त गावकरी मंडळ मिरवट यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?