पोस्ट्स

जुलै ७, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

#mbnews# >>>>बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

इमेज
  गुटखा पकडला : एक कोटींचा मुद्देमाल हस्तगत  बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई  दिंद्रुड, प्रतिनिधी...  माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीत तेलगावहून परळी कडे जाणाऱ्या संशयित कंटेनरला बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी सायंकाळी चार वाजे दरम्यान भोपा पाटी वर पकडले असता जवळपास एक कोटी रुपयांचा राज निवास पानमसाला गुटखा आढळून आला. दिंद्रुड पोलीस  स्टेशनला कंटेनर जप्त करण्यात आले असून पुढील कारवाई शनिवारी रात्री उशिरापर्यंत चालू होती.        गोपनीय माहितीच्या आधारे तेलगावहून परळी कडे जाणाऱ्या एका कंटेनरला स्थानिक गुन्हे शाखेचा दोन पथकांनी पकडत दिंद्रुड पोलीस स्टेशनला आणले असता जवळपास 75 लाख रुपयांचा राजनिवास पानमसाला नावाचा गुटखा व अंदाजे 25 लाख रुपये किमतीचे कंटेनर असा एक कोटी रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला असून शनिवारी रात्री उशिरापर्यंत कारवाई चालू होती.  बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान चांद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय तुपे स...

भेल संकुलात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि निधी समर्पण सोहळा उत्साहात

इमेज
  भेल संकुलात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि निधी समर्पण सोहळा उत्साहात   परळी (प्रतिनिधी):                 येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित एक संस्कारक्षम पिढी घडविणारी, पालकांच्या प्रथम पसंतीस उतरलेले, एकमेवाद्वितीय भेल संकुलामध्ये इ .स 2023 -24 या शैक्षणिक वर्षातील सी.बी.एस.ई व स्टेट या शाखांमधील इयत्ता दहावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसमवेत गुणगौरव सोहळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मा. डाॅ.श्री हेमंत वैद्य (सहकार्यवाह, भा. शि. प्र. सं अंबाजोगाई) आणि मा श्री. शरद राठोड साहेब (वेल्फेअर ऑफिसर) यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली होती, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री. जीवनराव गडगूळ (सचिव ) यांनी भूषवले. या कार्यक्रमाची सुरुवात श्री. राहुल सूर्यवंशी सर व सौ.सुमेधा कुलकर्णी मॅडम आणि त्यांच्या संघाने 'सरस्वती स्तवन' व 'सामूहिक पद्य' सादर करून केली. त्यानंतर संकुलामधील सी.बी.एस.ई व स्टेट विभागातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच...

##mbnews# >>> आक्षेप अर्ज नोंदणी व पाठपुरावा शिबीर

इमेज
  आक्षेप अर्ज नोंदणी व पाठपुरावा शिबीर; रेल्वेमार्ग दुहेरीकरण बाधित नागरिकांनी आक्षेप अर्ज भरुन द्यावेत- अनंत इंगळे परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      परळी-परभणी  रेल्वे मार्ग दुहेरीकरण कामासाठी नागरी वस्त्यांमधील जमीनींचाही मोठ्या प्रमाणावर राजपत्रात समावेश आहे.हे अन्यायकारक असुन याबाबत नागरिकांनी अधिकाधिक आक्षेप नोंदवणे आवश्यक आहे.यासाठी पालकमंत्री ना.धनंजय मुंडे व न.प. गटनेते वाल्मीकअण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आक्षेप अर्ज नोंदणी व पाठपुरावा शिबीर आयोजित करण्यात आले आहे.यामध्ये रेल्वेमार्ग दुहेरीकरण बाधित नागरिकांनी आपले आक्षेप अर्ज भरुन द्यावेत असे आवाहन  रा.काॅ.शहर सरचिटणीस अनंत इंगळे यांनी केले आहे.         परळी- परभणी रेल्वे  मार्गासाठी जमीन आधिग्रहन करण्याची अधिसूचना रेल्वे मंत्रालयाने काढली आहे. याकामी जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.याबाबत रेल्वे मंत्रालयाने दि 18 जून 2024 रोजी काढलेल्या राजपत्रानुसार परळी रेल्वे स्थानक भागातून गंगाखेडच्या दिशेने असलेल्या नागरी वस्त्यांमधील व या भागातील अनेक जमिन...

#mbnews#>>महामॅरेथॉन स्पर्धा : मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - क्रीडा शिक्षक संघटना

इमेज
  महामॅरेथॉन स्पर्धा : मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - क्रीडा शिक्षक संघटना परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात आलेल्या  महामॅरेथॉन स्पर्धेत  मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन क्रीडा शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.         राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त परळी शहर पोलीस स्टेशन समोरुन 'संत सेवालाल महाराज चौक' येथून सोमवार दिनांक 15 जुलै रोजी सकाळी 7:00 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, परळी-वै च्या वतीने शालेय गट,खुला गट,ज्येष्ठ नागरिक गट,महिला गट या चार गटात 'महामॅराथॉन स्पर्धा' आयोजित केली असून 'Green Parli...Clean Parli' हा निर्धार या 'महामॅराथॉन' स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. 'महामॅराथॉन' स्पर्धेत प्रत्येक गटात आकर्षक पारितोषिक,मानचिन्ह प्राप्त होणार असून सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास सहभाग प्रविण्य प्रमाणपत्र आणि एक वृक्ष भेट दिले जाणार आहे.     नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून 'हरीत परळी.. स्वच्...

वरळी ते परळी एकच जल्लोष

इमेज
पंकजा मुंडेंचा विजय ; परळीसह बीड जिल्ह्यात शहरे,गावागावात, वाडी,वस्ती,तांड्यांपासून ते गल्लोगल्लीत आनंदोत्सव  विधानभवन परिसर, प्रदेश कार्यालयासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष ढोल ताशांचा निनाद, गुलालांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी   विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणला मुंबई।दिनांक०१।  भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज विधानपरिषद निवडणूकीत पहिल्या पसंतीची मते घेऊन दणदणीत विजय संपादन केला.  या विजयानंतर परळीसह जिल्ह्यात अक्षरशः आनंदोत्सव साजरा झाला. विधानभवन परिसर आणि भाजप प्रदेश कार्यालया समोर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी करत दिवाळी साजरी केली.  कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मोठा उत्साह यावेळी पहावयास मिळाला.     विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी आज मतदान झाले. सायंकाळी निकाल जाहीर झाला, यात पंकजाताई मुंडे पहिल्या पसंतीची मते घेऊन विजयी झाल्या, विजयासाठी २३ मतांचा कोटा असताना त्यांना २६ मते मिळाली. विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी त्यांचं अभिनंदन केलं. कार्यकर्त्यांचा जल्लोष ; वि...

मिलींद नार्वेकर यांचा विजय :परळीत अभयकुमार ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव

इमेज
मिलींद नार्वेकर यांचा विजय :परळीत अभयकुमार ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव परळी/प्रतिनिधी शिवसेना नेते मिलींद नार्वेकर यांचा महाराष्ट्र राज्य विधान परिषदेवर आमदार म्हणून विजय झाल्याबद्दल परळीत शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे नेते तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवार दिनांक 12 जुलै रोजी फटाके फोडून व गुलाल उधळून मोठा आनंदोत्सव साजरा केला. आज विधान परिषदेच्या निवडणूकीमध्ये शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर हे आमदार म्हणून विजयी झाले. ही बातमी समजताच परळी शहरातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौक येथे सायंकाळी शिवसेनेचे नेते अभयकुमार ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली मोठा जल्लोष करून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी शिवसैनिकांनी फटाके फोडून, गुलाल उधळला व एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी शिवसेनेचे युवा नेते प्रा.अतुल दुबे सर, मा.शहर संघटक संजय कुकडे, शिवसेना तळ विभाग प्रमुख श्रीनिवास सावजी,  युवा सेना परळी विधानसभा प्रमुख मोहन परदेशी, शिवाजीनगर युवा प्रमुख सुरेश परदेशी, छत्रपती शिवाजी महाराज चौक विभाग प्रमुख संजय सोमाणे, उप शहर प्रमुख किशन...

पंकजा मुंडे विधानपरिषदेवर विजयी: शहरात कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी जल्लोष

इमेज
पंकजा मुंडे विधानपरिषदेवर विजयी: शहरात कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी जल्लोष परळी वैजनाथ ता.१२ (प्रतिनिधी)           भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना पक्षाच्या वतीने विधानपरिषदेवर उमेदवारी घोषित करण्यात आली होती. शुक्रवारी (ता.१२) झालेल्या मतदानात विजयी झाल्याबद्दल शहरात विविध ठिकाणी गुलाल उधळून, फटाक्यांची आतिषबाजी करत  स्थानिक कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.            भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा मागच्या विधानसभेत पराभव झाल्यापासून त्यांचे पक्षाच्या वतीने पुर्नवसन करा अशी मागणी समर्थकांच्या माध्यमातून सातत्याने होत होती. पंकजा मुंडे यांचे राज्यसभा, विधानपरिषदेच्या निवडणूक वेळोवेळी संभाव्य यादीत नाव येत होते. पण पाच वर्षांत काही नंबर लागला नाही. यामुळे पक्षाने लोकसभेच्या निवडणूकीत डॉ प्रितम मुंडे यांच्या जागी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला. यानंतर महाराष्ट्रातील समिकरणे बघता व ओबीसी, मराठा आरक्षण प्रश्न तसेच...

#mbnews# 'विधानसभेला पुरे पाडा' चा फटका कोणाला बसणार?

इमेज
  लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही 'पुरे पाडा' चे शस्त्र - जरांगे-पाटलांचे बीडमधून सूचक वक्तव्य बी ड, प्रतिनिधी.....            बीड जिल्ह्यात मराठा समाजाच्या मुलांवर हल्ले झाले. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. शिरूर,गेवराई,आष्टीत आमच्या मुलांना मारले.आम्ही कोणालाच घाबरत नाहीत.आम्ही क्षत्रिय मराठे आहोत. आमचीच मते घ्यायची आणि आम्हालाच दमदाटी करायची हे चालणार नाही असे  ठणकावून सांगत लोकसभेप्रमाणे विधानसभेला पुरे पाडा. मराठ्याला त्रास देणारे बीड जिल्ह्यातील एकही निवडून  येऊ देऊ नका, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी  मराठा समाजाला केले.           मनोज जरांगे पाटील यांनी बीडमध्ये आज शांतता रॅलीला संबोधीत केले. यावेळी प्रचंड गर्दी जमली होती. आता जरांगेंनी पुन्हा एकदा 'विधानसभेला पुरे पाडा' असे आवाहन समाजाला केले आहे. मनोज जरांगे पाटील सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. ते मराठा समाजाला शांतता राखण्याचे आवाहन करत आहेत. त्यांच्या शांतता रॅलींनी संपुर्ण मराठवाड्यात मोठ्या प्...

धनंजय मुंडे यांचे महत्वपुर्ण ट्विट... बुद्धिभेद व अफवा करु नये

इमेज
  मराठा समाज शांतता रॅली: जिल्हा पोलीस प्रशासनाची रॅलीला परवानगी:जाणीवपूर्वक अफवा पसरवू नये -पालकमंत्री धनंजय मुंडे बीड, प्रतिनिधी.....      जिल्हा पोलीस प्रशासनाने रॅलीला परवानगी नाकारण्याचे कोणतेही कारण नाही.मराठा समाजाच्या शांतता रॅलीला जिल्हा पोलीस प्रशासनाने रॅलीला परवानगी नाकारली अशा  प्रकारची जाणीवपूर्वक कोणीही अफवा पसरवू नये असे आवाहन करणारे ट्विट पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.      मराठा समाज बांधवानी बीड जिल्ह्यात शांतता रॅली काढण्यास केलेल्या मागणीनुसार जिल्हा पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली असल्याची अफवा पसरवून जाणीवपूर्वक काहीजण तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही बातमी पूर्णपणे चुकीची, खोटी व दिशाभूल करणारी आहे. वस्तुतः जिल्हा पोलीस प्रशासनाने रॅलीला परवानगी नाकारण्याचे कोणतेही कारण नाही. रॅली होईल व नेहमीप्रमाणे माझ्या बीड जिल्ह्यातील समाजबांधव अत्यंत शांततापूर्ण मार्गाने रॅली पूर्ण करतील असा मला विश्वास आहे असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.         त्याचबरोबर, मी स्वतः मराठा समाजाला आरक्षण मिळावे...

महाविकास आघाडीच्या बैठकीला सर्व नेते, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे-बहादुरभाई

इमेज
रेल्वेजमीन अधिग्रहण:इंडिया आघाडीची उद्या बैठक  महाविकास आघाडीच्या बैठकीला सर्व नेते, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे-बहादुरभाई परळी, प्रतिनिधी....        परळी शहरातील सर्वे नंबर 75 मधील वास्तव्यात असलेल्या नागरिकांना रेल्वे प्रशासनाने परळी-परभणी रेल्वे मार्ग दुहेरी करणयासाठी जमीन अधिग्रहण करण्याचा घाट घातला असुन या विषयी परळी शहरातील महाविकास आघाडीची  आज बुधवार दि.10 रोजी सकाळी 11 वाजता काँग्रेस पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय,नेहरू चौक येथे आयोजित केली आहे.या महत्वपुर्ण बैठकीला महाविकास आघाडीच्या सर्व नेते, पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन काँग्रेसचे परळी शहराध्यक्ष बहादुरभाई यांनी केले आहे. काँग्रेस पक्षाचे मध्यवर्ती कार्यालयात होणाऱ्या बैठकीला काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख सह महाविकास आघाडी व घटक पक्षाचे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.बैठक संपताच परळी उपजिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा विनिमय करुन निवेदन देण्यात देण्यात येणार असुन रेल्वे प्रशासनाने जमीन अधिग्रहणाच्या नावाखाली आझादनगर,मिलिंद नगर, बरकत नगर,गंगा सागर नगर इत्यादी जागा अध...

MB NEWS:संत एकनाथमहाराज व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या पाटोदयातून रवाना

इमेज
संत भगवानबाबा पालखी सोहळा मंगळवारी पाटोद्यात; संत एकनाथमहाराज व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या पाटोदयातून रवाना                     पाटोदा/अमोल जोशी                           महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीचा पांडुरंग यांच्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी  दरवर्षीप्रमाणेच यंदाही पाटोद्यातून शेकडो दिंड्या व हजारो भाविक पाटोदा शहरातून रवाना झाले असून शेवटचा भगवानगड येथून येणारा भगवान बाबा पालखी सोहळा पाटोदा येथे उद्या सकाळी दहा वाजता  शहरात दाखल होणार आहे.          शहराच्या वतीने छत्रपती शिवाजी चौक येथे भव्य दिव्य स्वागत होईल या नंतर बस स्टँड , बाजारतळ मार्गे हा पालखी सोहळा भामेश्वर मंदिरात दाखल होऊन तिथे दर्शन सोहळा होणार आहे सर्व वारकऱ्यांची जेवणाची सोय कन्या शाळा नगरपंचायत जवळ येथे केलेली आहे भगवान बाबांच्या पादुका दर्शना साठी व स्वागतासाठी  तालुक्यातून मोठ्या संख्येने भाविक सकाळीच पाटोद्यात दाखल होतात, दुपारी हा सोहळा दीघोळ ...

राजाभाऊ फड यांची पत्रकार परिषदेत घोषणा

इमेज
आमजनतेचं प्रतिनिधित्व, डोळ्यांना दिसणारा प्रत्यक्ष विकास व भयमुक्त परळी यासाठी विधानसभा लढवणारच- राजाभाऊ फड  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        परळी मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या मनात या विधानसभा मतदारसंघात बदल हवा आहे. तशा प्रकारचा प्रतिसाद आपल्याला आम जनतेतून मिळत आहे. त्यामुळे आम जनतेचे प्रतिनिधित्व, कागदावर नव्हे तर सगळ्यांच्या डोळ्यांना दिसणारा प्रत्यक्ष विकास आणि भयमुक्त परळी मतदारसंघ करण्याच्या दिशेने आपण वाटचाल करणार असून यासाठी कोणत्याही परिस्थितीत आणि ठामपणे विधानसभा निवडणूक आपण लढवणारच असल्याची घोषणा राजाभाऊ फड यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.              महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या भेटी घेऊन परळी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी आपण उमेदवारीची मागणी करणार आहोत.काहीही झाले तरी परळी विधानसभा निवडणूक आपण लढविणारच असल्याची घोषणा रासप नेते, परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजाभाऊ फड यांनी केली. सोमवारी परळी वैजनाथ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलतांना राजेभाऊ फड म्हणाले की, रासपचे अध्यक्ष...

माधुरी शरद महाराज नेरलकर यांचे निधन

इमेज
  माधुरी शरद महाराज नेरलकर यांचे निधन  ............... नांदेड,प्रतिनिधी... नांदेड शहरातील ज्येष्ठ नागरिक श्रीमती माधुरी शरद महाराज नेरलकर यांचे सात जुलै रविवार रोजी निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 66 वर्षे होते. नांदेड येथील अमर, राजेश व योगेश नेरलकर यांच्या त्या मातोश्री होत.         गोवर्धन घाट येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

महाराष्ट्राला 'सर्वोत्कृष्ट कृषी राज्य' पुरस्कार!

इमेज
  महाराष्ट्राला 'सर्वोत्कृष्ट कृषी राज्य' पुरस्कार! 11 जुलै रोजी होणार दिल्लीत वितरण; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषीमंत्री धनंजय मुंडे स्वीकारणार पुरस्कार मुंबई (प्रतिनिधी) - माजी सरन्यायाधीश, केरळचे राज्यपाल न्यायमूर्ती पी. सथाशिवम यांच्यासह 15 जणांच्या अध्यक्षतेखालील कृषी नेतृत्व पुरस्कार  समितीने महाराष्ट्र राज्याला 2024 सालचा 'सर्वोत्कृष्ट कृषी राज्य' पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. येत्या 11 जुलै रोजी दिल्लीतील हॉटेल हॉलिडे इन मध्ये 15 व्या 'एग्रीकल्चर लीडरशिप कोन्क्लेव्ह'मध्ये या पुरस्काराचे वितरण केले जाणार असून राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कृषिमंत्री धनंजय मुंडे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. एग्रीकल्चर टुडे च्या वतीने या पुरस्काराची सुरुवात 2008 सालापासून करण्यात आलेली आहे.  महाराष्ट्र शासनाने मागील वर्षात पर्यावरणाच्या संरक्षणासह अन्नसुरक्षा, सर्वात मोठी बांबू लागवड, तृणधान्य अभियान, औष्णिक वीज निर्मितीत बायोमास चा वापर यांसारखे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले असून 1.7 दशलक्ष हेक्टर क्षेत्राचे 123 मेगा सिंचन प्रकल्प, ...

प्रा.डॉ.नयनकुमार आचार्य यांचे खास विवेचन >>>>>सार्थक व्हावे या जन्माचे!

इमेज
  सार्थक व्हावे या जन्माचे! जन्मास आलेल्या प्रत्येक मानवाने वरील तीन उद्दिष्टे आपल्यात आहेत काय? याचा विचार करावा. त्यांच्या प्राप्तीसाठी अहर्निश प्रयत्न करावेत. जीवनाची ही सर्वात मोठी साधना आहे. ज्याप्रमाणे धन, मान, प्रतिष्ठा इत्यादी मिळविण्याकरिता प्रत्येक माणूस धडपड करतो, त्याचप्रमाणे या तीन तत्त्वांना प्राप्त करण्याकरिता प्रयत्न करावयास हवा. त्याबरोबरच संततीला जन्मास घालू इच्छिणार्‍या दाम्पत्यानेदेखील वरील तीन उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवूनच गर्भाधान संस्कार करावा आणि जन्म दिल्यानंतरदेखील आपल्या मुलांबाळामध्ये वरील वेदोक्त उद्दिष्टांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करावा. जनिष्वा देववीतये सर्वताता स्वस्तये। आ देवान् वक्ष्य् अमृताँ ऋता वृधो यज्ञं देवेषु पिस्पृश:॥ (ऋग्वेद-6/15/18) अन्वयार्थ हे मानवा! तू (देव-वीतये) दिव्यत्वाच्या प्रकाशनासाठी (सर्व ताता= सर्व+तातये) सर्वांच्या विस्तार व विकासाकरिता (स्वस्तये) समग्र विश्वाच्या कल्याणाकरिता (जनिश्व) जन्म घे! सुसंततीला जन्माला घाल! याच त्रिविध उद्देशाकरिता (ऋता वृध:) सत्यवर्धनशील, सदाचारी अशा (अमृतान्) निर्दोष व अमृतमयी देवी-देवतांन...

वृक्ष हेच आपले खरे सगेसोयरे - प्रा . डॉ . माधव रोडे

इमेज
  वृक्ष हेच आपले खरे सगेसोयरे - प्रा. डॉ. माधव रोडे सिरसाळा : - दिनांक 07/07/2024 वार रविवार रोजी सिरसाळा येथील कुशीनगर बौध्द विहार येथे  वृक्षारोपण- संवर्धन - जतन उपक्रम राबविण्यात आला . यावेळी प्रमुख उपस्थिती बापु फाऊडेंशन च्या इंदुबाई नामदेव रोडे, प्रा. डॉ . माधव रोडे  यांच्या वतीने बौध्द विहार परिसरासाठी दहा वेगवेगळ्या प्रजातीची अंबा वृक्ष, पिंपळ, वड, जांभळ, चिंच, चाफा, फणस, रबर, आवळा, गुलमोहर निल अदी अशा ४१ वृक्ष विहारासाठी दान म्हणून देण्यात आली व त्याची लागवड परिसरात करण्यात आली . कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन व वंदना घेऊन करण्यात आली. प्रमुख पाहुणे डॉ माधव रोडे यांचा सत्कार आयु मधूकर नाना किरवले, सचिन रणखांबे यांचा सत्कार विलास बनसोडे सर  , इंदुबाई नामदेव रोडे यांचा सत्कार यशोधरा महिला मंडळाच्या अध्यक्ष मंगल ताई किरवले, चोपडे ताई, राहीबाई अरसुळे, पंचशीला किरवले, गायसमुद्रे ताई, बनसोडे ताई यांच्या हस्ते शाल, फेटा व पुष्पहार घालून करण्यात आला.       यावेळी प्रा . डॉ . माधव रोडे म्हणाले, वृक्ष हेच आपले खरे सगेसोयर...