कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना शेतकऱ्याने घातली भावनिक साद
![इमेज](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhunuFN2ISOLg9LyDXnS6hlPoZqje52tWO-j2qmlfbKjV3EUk_YOJ4WLiaw8jJJCha9jYU45rrlTPxmk4yfuO_LBkd5wLVTJ0oc8xA05I76Cii86NnygK6l57FzMDOCayUOoc1ZSIk_5Sse17JrRVweMrA3fGciQaFsl9hI9isWysi6iJnjK3Kzd4gxSCA/s320/InShot_20231109_182718357.jpg)
"साहेब शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळाले, आता दिवाळी साजरी करा..." कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना शेतकऱ्याने घातली भावनिक साद मुंबई दि 9 नोव्हेंबर 2023- महाराष्ट्रातील दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दीपावली पूर्वी पीक विम्याची मदत नाही मिळवून दिली, तर मी सुद्धा दिवाळी साजरी करणार नाही, अशी प्रतिज्ञा करणाऱ्या कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना आज शेतकऱ्याने "साहेब पीक विम्याचे पैसे मिळाले आहेत, आता दिवाळी साजरी करा" अशी भावनिक साद घातली. दिवाळीची भेट वस्तू देऊन भावनिक पत्र सुद्धा दिले. यावर्षी राज्य शासनाने एका रुपयात पीक विमा देण्याची घोषणा करून त्याची यशस्वी अंमलबजावणी केली. मात्र पावसाने 21 दिवसापेक्षा जास्त खंड दिल्यामुळे या पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकरी पात्र ठरले. मात्र अनेक पिक विमा कंपन्यांनी तांत्रिक मुद्दे उपस्थित करत विम्याबाबत चाल ढकल, अपील केले. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून दिल्याशिवाय मी सुद्धा दिवाळी साजरी करणार नाही, अशी घोषणा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती. याबाबतची सर्व तांत्रिक प्रक्रिया