नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भारती पवार यांना प्रचंड मताधिक्याने संसदेत पाठवा
![इमेज](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjxmR62XZESr-q46zZ8xvux5eRvtWhfB03SVtyIXsXQkZZWmD7Cy8GdIN6GuOzENItoVx66QPmOjSFym-uN4H1oWE3r_1bf2Qqw8evT3NIpWaUFfpZuqqJjvGnH5h2lK-e0dewJxRG9g5VeayZDiajsCeg91WHQoqK0A3OnxSEEm_UvkRneNF34XEhZv1Q/s320/IMG-20240518-WA0045.jpg)
पंकजा मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ; डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भारती पवार यांना प्रचंड मताधिक्याने संसदेत पाठवा दिंडोरी ।दिनांक १८। नरेंद्र मोदींशिवाय देशाला पर्याय नाही. गेल्या दहा वर्षांत देशाची त्यांच्या नेतृत्वाखाली विकासाकडे वाटचाल सुरू आहे. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी डाॅ. भारती पवार यांना जास्तीत जास्त मताधिक्याने संसदेत पाठवा असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज जाहीर सभेत केले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा महायुतीच्या उमेदवार डाॅ.भारती प्रविण पवार यांच्या प्रचारार्थ आज श्रीरंग लाॅन्स सोनगांव सायखेडा येथे आयोजित केलेल्या जाहिर सभेत त्या बोलत होत्या. लोकनेते मुंडे साहेबांच्या विचाराचा वसा आणि वारसा मी पुढे घेऊन जात आहे, याबाबत कुणाचं दुमत असण्याचे कारण नाही कारण ते माझे केवळ माझे पिता नव्हते तर ते माझे नेते होते, त्यांनी जे संस्कार आम्हाला दिले आहेत त्यानुसार माझी वाटचाल सुरू आहे. आज भारतीताईंच्या मागे एक महिला म्हणून मी खंबीरपणे उभी आहे. नरेंद्रजी