जनता दरबारात प्रश्न लावले मार्गी

इमेज
  आ. पंकजाताई मुंडेंनी जिल्हा ढवळून काढला ; सलग दोन दिवस पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठकीत केली सविस्तर चर्चा परळी वैजनाथ।दिनांक २८। भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या  परळी मुक्कामात संपूर्ण जिल्हा ढवळून काढला. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या सलग दोन दिवस मॅरेथॉन बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.    आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या जोरात वाहू लागले आहे. त्या अनुषंगाने भाजप नेत्या आ. पंकजाताई मुंडे सध्या राज्यभर संघटनात्मक दौरे करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या मराठवाड्यातील कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत त्या उपस्थित होत्या. याठिकाणी त्यांनी विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी त्या थेट जिल्हयात दाखल झाल्या. परळी येथे निवासस्थानी त्यांनी सलग दोन दिवस आष्टी-पाटोदा-शिरुरकासार, केज, माजलगाव आणि परळी शहर व ग्रामीण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर अशी चर्चा केली. आगामी निवडणु

निवासी उपजिल्हाधिकारी यांचे आवाहन

 उष्माघात होऊ नये यासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांवर  लक्ष द्यावे


निवासी उपजिल्हाधिकारी यांचे आवाहन


        बीड, दि.16 (जि. मा. का.) :- आगामी दिवसामध्ये उष्णतेची लाट जाणवू शकते.  उष्माघात होऊ नये यासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांवर भर दयावा. उष्माघाताची लक्षणे जाणवू लागल्यास तातडीने  रुग्णाच्या शरीराचे तापमान खाली आणण्यासाठी जवळच्या रुग्णालयात उपचार करून घ्यावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी केले आहे. तसेच उष्माघात उपचारासाठी शासकीय रूग्णालयांत सज्जता ठेवण्याच्या सुचनाही जिल्हा रुग्णालय प्रशासनाला दिल्या आहेत.

उष्माघात होण्याची कारणे

        उन्हामध्ये शारिरीक श्रमाचे, मजूरीचे कामे फार वेळ करणे, कारखान्याचे बॉयलर रूममध्येकामकरणे, काचकारखान्यातीलकामकरणे, जास्त तापमानाच्या खोलीतकामकरणे, घट्‌ट कपडयांचा वापर करणे, उष्णतशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येणे.

उष्माघाताची लक्षणे

शरीरास घाम सुटणे, तहान लागणे, शरीर शुष्कहोणे, थकवा येणे, ताप येणे (102 पेक्षा जास्त) त्वचा कोरडी पडणे, भुक न लागणे, चक्कर येणे, निरूत्साही होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैन, अस्वस्थ, बेशुध्द अवस्था उलटी इत्यादी, होणे.

जोखीमेचा गट

   वय -5 वर्षापेक्षा कमी व 65 वर्षापेक्षा जास्त,  कष्टाची सवय नसणारे लोक,  धुम्रपान, मदयपान करणारे आणि कॉफी पिणारे व्यक्ती, मुत्रपिंड, हद्‌रोग, यकृत, त्वचा विकार, लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी रुग्ण, Diuretics, anti allergic, tranqilizers, stimulants etc.या औषधींचे सेवन सुरू असलेले रुग्ण, जास्त तापमान, अति आर्द्रता, वातुनूकलनाचा अभाव, तंग कपडे, शेतकाम, कारखान्यातीलकाम ऊन आणि उष्णतेशी संबधीत व्यवसाय करणा-या व्यक्ती.


प्रतिबंधात्मक उपाय


            वाढत्या तापमानाच्या वेळेत कष्टाचीकामे टाळणे, कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावी, उष्णता शोषून घेणारे कपडे उदा. काळया किंवा भडक रंगाचे कपडे वापरु नयेत. सैल व उष्णता परावर्तित करणारे पांढ-या रंगाचे कपडे वापरावेत. जलसंजीवनीचा वापर करावा, पाणी भरपूर प्यावे. सरबत प्यावे. उन्हामध्ये काम टाळावे व सावलीत विश्रांती घ्यावी. शक्यतो उन्हात फिरण्याचे टाळावे. आवश्यक कामे असल्यास उन्हात जाण्यापूर्वी भरपूर पाणी प्यावे. किंवा लिंबू शरबत प्यावे. उन्हात जाण्याअगोदर जेवण करावे, रिकाम्या पोटी उन्हात जावू नये, कान व डोक्याचा उन्हापासून बचाव करणे आवश्यक आहे. डोक्याभोवती पांढरा रुमाल गुंडाळावा. गॉगल्स व हेल्मेट वापरावी. वृध्दांना व बालकांना उन्हात फिरु देऊ नये.


उपचार


  रुग्णास हवेशीर खालीत ठेवणे, खोलीत पंखे, कुलर ठेवावेत. शक्यतो वातानुकुलीत खोलीत ठेवावेत., रुग्णाच्या शरिराचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. रोग्याला बर्फाच्या पाण्याने आंघोळ घालावी,रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवावे. आईसपॅक लावावेत, ओआरएससोल्युशन दयावे.


उन्हाळयामुळे उष्माघाताचे रुग्णावर उपाययोजनाकरणेसाठी व मृत्यू टाळण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांनी,कुटीर रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांनी आवश्यकती सर्व तयारी ठेवणेबाबत कळविण्यात आलेले आहे. (उदा.हवेशीर खोली, पुरेसा औषधी, सलाईनचा साठा, खोलीत पंखे, कुलर इ. सुस्थितीत ठेवावी) यांचीसोय करावी.


बर्फाच्या उपलब्धतेसाठी फ्रिज सुस्थितीत असणे आवश्यक आहे. उष्माघाताची कारणे लक्षणे प्राथमिक उपचार त्याचप्रमाणे उष्माघात होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी याची माहिती आरोग्य शिक्षणाद्वारे प्रचार माध्यमातून दयावी.


काय करावे काय टाळावे :-

     काय करावे -तहान नसलीतरी भरपूर पाणी / सरबत प्यावे, हवा खेळती राहण्याकरीता पंख्याचा वापर करावा.

सैल व सौम्य रंगाचे सुती कपडे वापरावे. सावलीत थांबणे, हळुवार चालावे, टोपी, फेटा चष्मा वापरणे, मजुर वर्गास वारंवार विश्रांती घेवु दयावी, उन्हातुन आल्यावर चेह-यावर आलेकापड ठेवावे.


काय टाळावे

मद्य,सोडा, कॉफी, अतीगार पाणी इ. पिणे, गरज नसतांना उन्हात बाहेर फिरणे, तंग, व गडदकपडे वापरणे, सवय आहे म्हणून उन्हात निघणे, अति व्यायाम करणे, बंद कार मध्ये राहणे, अति शारिरिककष्टाचेकामेकरणे. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये. दुपारी 12.00 ते 3.30 याकालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. तसेचमोकळया हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी.असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?