प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

मनोज जरांगे पाटील यांची नारायण गडावरील 8 जूनची सभा रद्द

मनोज जरांगे पाटील यांची नारायण गडावरील 8 जूनची सभा रद्द

 

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा 4 जून पासून आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांची 8 जून रोजी नारायण गडावर सभा होणार होती. मात्र, बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे पाणी उपलब्ध नाही. तसेच उन्हाची तीव्रता देखील जास्त आहे. त्यामुळे एकत्र येणाऱ्या मराठा बांधवांची गैरसोय नको, यासाठी नारायण गडावरील सभा रद्द करण्यात आली आहे. आता पुढील सभा कधी होणार? याचा निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र, तुर्तास आठ जून रोजीची सभा रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.


मराठा आंदोलनाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरेची मागणी पुन्हा एकदा करत असल्याचे सांगितले जात आहे. या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी भाजपवर देखील निशाणा साधला आहे. मराठ्यांमुळे मोदींना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सभा घ्याव्या लागल्या. त्यामुळेच मोदी गोधड्या टाकूनच महाराष्ट्रात होते. मोदींवर ही वेळ फडणवीस आणि त्यांच्या चार-पाच लोकांमुळे आली असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. तसेच पुन्हा एकदा तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिलेला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आम्ही नाही. मात्र, जोपर्यंत सगेसोयरे आणि ओबीसी मराठा एकच असल्याचा अध्यादेश निघत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर तसा निर्णय झाला नाही तर येणारी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे देखील मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्ही राजकारणात पडणार नसल्याचे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट