कौशल्य विकास उद्योजक्ता प्रशिक्षणासाठी अर्ज सादर करावेत
कौशल्य विकास उद्योजक्ता प्रशिक्षणासाठी अर्ज सादर करावेत
बीड, दि. 17 (जिमाका): साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), जिल्हा कार्यालय बीड मार्फत मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील कुंटुबाचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उन्नती व्हावी त्यांना रोजगार व स्वयं रोजगाराची साधने उपलब्ध व्हावी म्हणून समाजातील गरजूना आवश्यक त्या व्यवसायाचे प्रशिक्षण देवून त्यांना उपजिविकेचे साधन उपलब्ध होण्याकरिता प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. बीड जिल्हा कार्यालयास सन 2024-25 या आर्थिक वर्षांकरिता एकुण 500 प्रशिक्षणार्थींचे कौशल्य विकास उद्योजक्ता प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्दिष्ट मुख्यालयाकडून प्राप्त झालेले आहे.
बीड जिल्हातील ज्या संस्थेने कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षण पोर्टल वरिल नोंदणी केलेली आहे. अशा प्रशिक्षण संस्थेने 31 मे 2024 पर्यत शासनाच्या नियमानूसार सर्व आवश्यक कागदपत्रासह दोन प्रतित प्रस्ताव व्यवस्थापकीय संचालक यांनी मान्यता दिलेली आहे. अटी, शर्ती / निकषा नुसार प्रस्ताव सादर करावेत. तसेच खालील अटी, शर्ती / निकष लागु राहतील.
प्रशिक्षणार्थीने निवडलेल्या प्रशिक्षणाची फी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे करण्या दिनांक 20 ऑगस्ट 2019 मध्ये नमुद केलेल्या कोर्सेसची निवड प्रशिक्षणार्थींने करणे बंधनकारक राहिल. 2)प्रशिक्षण संस्थेने निकर्षांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण कालावधी पुर्ण केल्यानंतर शासनाच्या नियमानूसार आवश्यक त्या परिक्षेला बसविण्याची जबाबदारी संस्था चालकाची राहिल त्या शिवाय संस्थेची फी अदा केल्या जाणार नाही. प्रशिक्षण संस्थेला प्रशिक्षण कालावधी नुसार 20 % 30% 30% 20% च्या प्रमाणात प्रशिक्षण फी अदा करण्यात येईल. संस्थेने KVIC अंतर्गत प्रशिक्षण पुर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींनां PMEGP अंतर्गत निवडलेल्या व्यवसायाचा कर्जाचा अर्ज सादर करण्यासाठी सुचित करावे.जिल्हा स्तरावर एका कोर्सेसाठी प्रशिक्षण देण्यासाठी एकाच प्रशिक्षण संस्थेची निवड करण्यात येईल. प्रशिक्षणार्थींची बायोमॅट्रीक पध्दतीने व हजेरी पटावर स्वाक्षरीने हजेरी घेणे बंधनकारक राहिल. संस्थेने विद्यार्थी निहाय प्रमाणित केलेली हजेरी पाठविल्या शिवाय संबधीत प्रशिक्षण संस्थेची प्रशिक्षण फी अदा केली जाणार नाही.
प्रशिक्षण घेण्याची ईच्छा असलेल्या अर्जदारासाठी अटी / निकष खालील प्रमाणे आहे.
अर्जदार मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील असावा.अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष असावे.अर्जदाराने यापुर्वी शासनाच्या / महामंडळाच्या कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसावा.अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 300000/- या पेक्षा जास्त नसावे. एका कुंटुबातील एकाच व्यक्तीस सदर योजनेचा लाभ घेता येईल. अर्जदाराने आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याच्या तपशिल सादर करावा.
वरील अटी शर्ती नुसार संस्था चालकाने 31 मे 2024 पर्यंत प्रशिक्षण संस्थेने प्रस्ताव दोन प्रतीत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय विश्रामगृहासमोर नगर रोड बीड जिल्हा कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत सकाळी 09:45 ते संध्याकाळी 06:15 पर्यंत सादर करावेत. दि. 31 मे 2024 नंतर प्रस्ताव स्विकारले जाणार नाही यांची संबधितानी नोंद घ्यावी. असे आवाहन साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थपाक यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा