पूर्वी भारताचा आवाज ऐकू येत नव्हता, आता संपूर्ण जगात भारताचा डंका - पंकजाताई मुंडे
![इमेज](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEivkjCqG7z0NLoretu-HbN3gLmqvYjdbKjAFfLI1QIQuJlVKKnl21yuEROb5dJr599-F1qmcjTUDaqdAB3pP8NHTdRMYAx5dXXMr_0Xyc0P5At0FnDaf2AqMSGzuNkTizchEbQX56D0iYuI8kuRqBLV2gEtj5pUnYFZoOPBgSfgxKOaiS2GDHAHw_Uf/s320/IMG-20230613-WA0057.jpg)
पंकजाताई मुंडे यांचा मध्यप्रदेशात झंजावती दौरा ; मोदी @9 अभियानाला मोठा प्रतिसाद भारताने नऊ वर्षात गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या पूर्वी भारताचा आवाज ऐकू येत नव्हता, आता संपूर्ण जगात भारताचा डंका - पंकजाताई मुंडे _संघटनात्मक मुद्द्यांवर दिला भर_ जबलपूर (म.प्र.) ।दिनांक १३। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी गेल्या चार दिवसांत संघटनात्मक दृष्टया मध्यप्रदेशचा यशस्वी झंझावाती दौरा केला. मोदी @9 अभियानांतर्गत त्यांचे विविध जिल्हयात मोठया उत्साहात आणि उत्स्फूर्त वातावरणात कार्यक्रम पार पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात भारताने गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या आहेत. पूर्वी भारताचा आवाज ऐकू येत नव्हता, आता भारताचा डंका जगात वाजत असल्याचे त्यांनी विविध ठिकाणी कार्यक्रमात बोलतांना सांगितले. गेल्या नऊ वर्षांत गरीब आणि वंचितांची सेवा करणारा, महिला शक्तीला बळ देणारा, तरुणांची स्वप्ने पूर्ण करणारा आणि शेतकऱ्यांचे कल्याण करणारा भारत निर्माण झाला आहे. कलम ३७० रद्द करण्यात आले, तिहेरी तलाकची वाईट प्रथा संपली आणि दहशतवाद संपुष्टात आला. अयोध्येतील श्री रामजन्मभूमी