युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

लाभ मिळाला नसल्यास ई -केवायसी करणेचे आवाहन

 शेतक-यांना नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टी मदतीचा लाभ वितरण सुरु 


लाभ मिळाला नसल्यास ई -केवायसी करणेचे आवाहन  


 


          बीड, दि. 9 (जि. मा. का.):- सप्टेबर व आक्टोंबर 2022 या कालावधीत आपत्तीमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना केंद्रीभूत पध्दतीने थेट लाभार्थी हस्तांतरण प्रणालीमार्फंत अन्वये राज्यातील शेतक-यांसाठी केली असून मदत दिली जाणार असून यासाठी शासन निर्णय घेण्यात आला आहे.


महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्तती योजना 2019 अंतर्गत कर्जमुक्ती योजनेचा लाभ या प्रणालीमार्फंत राज्यातील शेतक-यांच्या खात्यात दिला जात आहे. या धर्तीवर योजनेची अंमलबजावणी चालू झाली आहे.


सदर प्रणालीमध्ये शेतीपिकांच्या शेतजमिनीच्या नुकसानीपोटी द्यावयाच्या मदतीबाबतची लाभर्थ्याची माहिती PORTAL LINK   https://mh.disastermanagment.mahait.org प्रणालीमध्ये भरण्यात आली आहे. तरीही अद्यापपर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्या मध्ये निधी जमा झालेला नाही अशा लाभार्थी शेतकऱ्यांनी खाली दिल्यानुसार कार्यवाही करावी.


 1. आपले आधार आपल्या बँक खात्यासोबत लिंक करुन घ्यावे.


2. जर आधार इनअक्टीव्ह (Inactive ) असेल तर आधार केंद्रात जावून ॲक्टीव्ह करुन घ्यावे.


3. बँक खाते आधारला लिंक आहे का ते बँकेमध्ये जावून चेक करुन घ्यावे. बँक अकौन्ट ॲक्टीव्ह करुन घ्यावे.


 


4. वरील कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराने  आधार प्रमाणीकरणसाठी आपले VK LIST वरुन नंबर नोंद करुन आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन ई -केवायसी EKYC करावयाचे आहे. ई -केवायसी EKYC झाल्याशिवाय लाभार्थ्यांची लाभाची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होणार नाही.


ई -केवायसी (EKYC) साठी पुढील कागदपत्रे घेवून जावे.


1.       आधारकार्ड


2.       बचत खात्याचे पासबुक


3. यादीतील आपल्या नावासमोरील नमूद विशिष्ट क्रमांक  (स्वत: लिहून न्यावा)


4.काही विसंगती असल्यास त्याबाबत शेतकरी तशी तक्रार संबंधित पोर्टलवर असहमतीचे बटन दाबून नोंदवू शकतात.


5. आधार प्रमाणीकरण सेवा निशुल्क आहे.


6.विशिष्ट क्रमांकासह यादी वाचन करण्यासाठी व शेतक-यांचे आधार प्रमाणिकरणासाठी संबंधित


ग्रामसेवक व तलाठी मार्गदर्शन करतील असे तहसिलदार बीड यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या