इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

लाभ मिळाला नसल्यास ई -केवायसी करणेचे आवाहन

 शेतक-यांना नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टी मदतीचा लाभ वितरण सुरु 


लाभ मिळाला नसल्यास ई -केवायसी करणेचे आवाहन  


 


          बीड, दि. 9 (जि. मा. का.):- सप्टेबर व आक्टोंबर 2022 या कालावधीत आपत्तीमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना केंद्रीभूत पध्दतीने थेट लाभार्थी हस्तांतरण प्रणालीमार्फंत अन्वये राज्यातील शेतक-यांसाठी केली असून मदत दिली जाणार असून यासाठी शासन निर्णय घेण्यात आला आहे.


महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्तती योजना 2019 अंतर्गत कर्जमुक्ती योजनेचा लाभ या प्रणालीमार्फंत राज्यातील शेतक-यांच्या खात्यात दिला जात आहे. या धर्तीवर योजनेची अंमलबजावणी चालू झाली आहे.


सदर प्रणालीमध्ये शेतीपिकांच्या शेतजमिनीच्या नुकसानीपोटी द्यावयाच्या मदतीबाबतची लाभर्थ्याची माहिती PORTAL LINK   https://mh.disastermanagment.mahait.org प्रणालीमध्ये भरण्यात आली आहे. तरीही अद्यापपर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्या मध्ये निधी जमा झालेला नाही अशा लाभार्थी शेतकऱ्यांनी खाली दिल्यानुसार कार्यवाही करावी.


 1. आपले आधार आपल्या बँक खात्यासोबत लिंक करुन घ्यावे.


2. जर आधार इनअक्टीव्ह (Inactive ) असेल तर आधार केंद्रात जावून ॲक्टीव्ह करुन घ्यावे.


3. बँक खाते आधारला लिंक आहे का ते बँकेमध्ये जावून चेक करुन घ्यावे. बँक अकौन्ट ॲक्टीव्ह करुन घ्यावे.


 


4. वरील कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराने  आधार प्रमाणीकरणसाठी आपले VK LIST वरुन नंबर नोंद करुन आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन ई -केवायसी EKYC करावयाचे आहे. ई -केवायसी EKYC झाल्याशिवाय लाभार्थ्यांची लाभाची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होणार नाही.


ई -केवायसी (EKYC) साठी पुढील कागदपत्रे घेवून जावे.


1.       आधारकार्ड


2.       बचत खात्याचे पासबुक


3. यादीतील आपल्या नावासमोरील नमूद विशिष्ट क्रमांक  (स्वत: लिहून न्यावा)


4.काही विसंगती असल्यास त्याबाबत शेतकरी तशी तक्रार संबंधित पोर्टलवर असहमतीचे बटन दाबून नोंदवू शकतात.


5. आधार प्रमाणीकरण सेवा निशुल्क आहे.


6.विशिष्ट क्रमांकासह यादी वाचन करण्यासाठी व शेतक-यांचे आधार प्रमाणिकरणासाठी संबंधित


ग्रामसेवक व तलाठी मार्गदर्शन करतील असे तहसिलदार बीड यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....