पोस्ट्स

बीडमध्ये भुकंप नव्हे, भुगर्भातील आवाज; घाबरू नका, जिल्हा प्रशासनाचे आवाहन

इमेज
  बीडमध्ये भुकंप नव्हे, भुगर्भातील आवाज; घाबरू नका, जिल्हा प्रशासनाचे आवाहन बीड, दि.6 (प्रतिनिधी) :- बीड जिल्ह्यातील बीड, गढी, गेवराई भागात मंगळवारी रात्री झालेल्या गुढ आवाजाने खळबळ माजली आहे. अशातच सदरच्या आवाजाचा भूकंपाशी संबंध नसून पाणी पातळी खालावल्यामुळे कधी कधी भूगर्भातून असे आवाज येतात, सदरील भुकंप नसून भुगर्भातील आवाज आहे, नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. बीड शहरात मंगळवारी रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी मोठा आवाज झाला. त्यामुळे खिडक्या, घराचे दरवाजे हादरली व भांडी पडली. अनेकांना भूकंप असल्याचे जाणवले. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, सदरचा प्रकार भूकंप नसल्याचे स्पष्ट झाले आहे. लातूरच्या भूकंप निरीक्षण केंद्रात कोणत्याही भूकंपाची नोंद झालेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पाणी पातळी खालावल्याने जमिनीत निर्वात पोकळी निर्माण होते आणि त्यामुळे असे काही आवाज येऊ शकतात. तरी जनतेने घाबरुन जाऊ नये असे आवाहन बीड जिल्हा प्रशासनाने केले आहे.
इमेज
  निवृत्त शिक्षिका सुशीलाबाई पाटणकर यांचे निधन  परळी - परळी जिल्हा परिषद शाळेच्या निवृत्त शिक्षिका सुशीलाबाई वसंतराव पाटणकर (वय ८८) यांचे मंगळवारी (दि. ६ फेब्रुवारी) सकाळी सावता माळी मंदिर मार्गावरील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा महेश पाटणकर, सून, नातवंडे, असा परिवार आहे.

मोठी बातमी! अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, निवडणूक आयोगाचा निकाल

इमेज
  मोठी बातमी! अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, निवडणूक आयोगाचा निकाल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती. त्यामुळे खरा पक्ष कोणता याबाबतचा निकाल निवडणूक आयोगाकडे होता. हा निकाल आता लागला असून अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.         जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधारी महायुतीबरोबर जात उपमुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारला. त्यांच्याबरोबर काही आमदारही गेले. तसंच, जवळपास ७ मंत्र्यांनी त्यांच्याबरोबर मंत्रिपदाची शपथही घेतली. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीतही फूट पडल्याने हे प्रकरणही निवडणूक आयोगाकडे गेले. गेल्या सहा महिन्यांपासून निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेस फुटीचं प्रकरण प्रलंबित होतं. गेल्या सहा महिन्यांत याप्रकरणी १० सुनावण्या निवडणूक आयोगाकडे झाल्या. या प्रत्येक सुनावणीत शरद पवार जातीने हजर होते.         अजित पवार गट आणि शरद प

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

इमेज
धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या परळी वैजनाथ , प्रतिनिधी...       शहरातील पवनराजे अर्बन निधी या अर्थपेढीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांनी आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी सात वाजता उघडकीस आली आहे. सध्याच्या परिस्थितीत पतसंस्था, मल्टीस्टेट, पतपेढ्या यांच्या आर्थिक अडचणीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. बीड जिल्ह्यात काही पतसंस्था बाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. यातच आता परळी शहरातील मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या पवन राजे अर्बन निधीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुढे आली आहे.           प्रेम प्रज्ञा नगर येथील एका अपॉर्टमेंट मध्ये प्रल्हाद सावंत यांनी काही दिवसापूर्वीच घर खरेदी केले होते. या घरात अद्याप ते राहयलाही गेले नव्हते. याच घरात आज दोरीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून त्यांच्या खिशात  कागदपत्रे सापडले आहेत. यातून आत्महत्येचे कारण पुढे येण्याची शक्यता आहे. उत्तरीय तपासणीसाठी उप

राष्ट्रीय सेवा योजनेच्या +२ स्तराच्या वतीने लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रावणी साबणे उत्कृष्ट स्वयंसेविका पुरस्काराने सन्मानित

इमेज
  राष्ट्रीय सेवा योजनेच्या +२ स्तराच्या वतीने लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रावणी साबणे उत्कृष्ट स्वयंसेविका पुरस्काराने सन्मानित परळी वैजनाथ दि.०६ (प्रतिनिधी)           शिक्षण संचलनालय पुणेच्या वतीने एक उत्कृष्ट स्वयंसेविका व उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी यांची निवड करण्यात येते. २०२२-२३ या वर्षात लक्ष्मीबाई देशमुख महिला कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रावणी शिवाजी साबणे हिची निवड करण्यात आली. याचा पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी (ता.०५) पार पडला. यामध्ये श्रावणीला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.                शिक्षण संचालनालय पुणे यांच्या वतीने दरवर्षी राज्यातील सर्व विभागातील कनिष्ठ महाविद्यालयातून एक उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी व एक उत्कृष्ट स्वयंसेविका निवडली जाते. हे पुरस्कार राष्ट्रीय सेवा योजनेच्या +२ स्तरावरील राज्यस्तरीय शिबीरात वितरण केले जाते. यंदा शिक्षण संचालनालय पुणे व शिक्षण संचलनालय विभाग अमरावतीच्या वतीने विवेकानंद आश्रम हिवरा (ता.मेहकर, जिल्हा बुलढाणा) येथे ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान आयोजित केले होते. या राज्यस्तरीय शिबीरात छत्रपती संभाजी

श्रीमती शांताबाई गोविंदराव आलूरकर यांचे देगलूर येथे निधन

इमेज
श्रीमती शांताबाई गोविंदराव आलूरकर यांचे देगलूर येथे निधन ...... नांदेड दिनांक 6 फेब्रुवारी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तथा देगलूर येथील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. सुरेंद्रजी आलुरकर व सेवानिवृत्त वनाधिकारी कृष्णा आलुरकर यांच्या मातोश्री श्रीमती शांताबाई गोविंदराव आलूरकर (वय 94 वर्ष ) यांचे वृद्धापकाळाने सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजता देगलूर येथे निधन झाले. वैकुंठधाम स्मशानभूमी,देगलूर येथे दि 6 फेब्रुवारी 24 रोजी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पाच मुली, दोन मुले, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. परोपकारी स्वभावाच्या,अत्यंत शांत व मनमिळावू स्वभावाच्या, धार्मिक वृत्तीच्या व संपूर्ण आलूरकर परिवाराला मायेने वाढविणाऱ्या आजी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. अंत्यसंस्काराच्या वेळी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य शंकरराव लासुणे( उदगीर ), माणिकराव भोसले ( नांदेड ), वट्टमवार , माजी आमदार सुभाष साबणे , नगराध्यक्ष शंकरराव कंठेवाड, देगलूरच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत रेखावार, स्थान

श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी लक्ष्मण वाकडे, उपाध्यक्ष संजय गोरे, तर सचिव सचिन मुंदडा

इमेज
  श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी लक्ष्मण वाकडे, उपाध्यक्ष संजय गोरे, तर सचिव सचिन मुंदडा  परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः-  नागरी सहकारी पतसंस्थेच्या क्षेत्रात परळी वैजनाथ तालुक्यात अग्रगण्य असलेल्या व परळीतील जुनी पतसंस्था म्हणून ओळख असलेल्या श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण वाकडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. यापूर्वी श्री वाकडे यांनी या पतसंस्थेवर सचिव म्हणून दीर्घकाळ काम केले आहे. संस्थेच्या बिनविरोध निवडल्या गेलेल्या नुतन संचालकांची बैठक नुकतीच सहकार विभागाचे अधिकारी निवडणुक निर्णय अधिकारी एस के चव्हाण व श्री भद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी श्री स्वामी समर्थ नागरी संस्थेच्या नुतन पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी संजय प्रभाकरराव गोरे व सचिवपदी सचिन ब्रिजलालजी मुंदडा यांची निवड करण्यात आली. यावेळी पतसंस्थेचे जेष्ठ संचालक पवनकुमार जैस्वाल, सौ.सुनीता वाघमोडे, श्रीकांत दामा, बालाजी जातकर, रमेश बागवाले, सौ.सुमन चव्हाण, सौ.सुवर्णा जंगले, सौ.विद्या मुंडलिक आदी संचालक उपस्थित होते. या निवडीनंतर नु

परीक्षेचे पेपर फोडणारांना आता १ कोटींचा दंड आणि १० वर्षांची जेल , संस्थेवरही कडक कारवाई

इमेज
  परीक्षेचे पेपर फोडणारांना आता १ कोटींचा दंड आणि १० वर्षांची जेल , संस्थेवरही कडक कारवाई … नवी दिल्ली : लोकसभेत पेपर फुटीचे विधेयक मांडण्यात आले असून आता पेपर फुटीसंदर्भात कठोर कारवाई ही केली जाणार आहे. या विधेयकानुसार पेपर फुटी करणाऱ्याला तब्बल 1 कोटी रूपयांचा दंड हा भरावा लागणार आहे. पेपर फुटीच नव्हे तर परीक्षा देणाऱ्या उमेदवाराच्या जागी जर दुसऱ्या कोणी परीक्षा देत असेल तर त्याच्याविरोधात देखील कठोर कारवाई ही केली जाणार आहे. लोकसभेत 5 फेब्रुवारी 2024 रोजी हा पेपर फुटीचा विधेयक मांडण्यात आले. हा विधेयक केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी मांडला आहे. जर एखादा व्यक्ती हा पेपर फुटीमध्ये दोघी आढळला तर त्याला तब्बल 10 वर्षांचा तुरुंगवास होणार आहे आणि 1 कोटी रूपये दंड भरावा लागणार. इतकेच नाही तर पेपर फुटीमध्ये एखादी संस्था सहभागी असेल तर त्या संस्थेला परत परीक्षा घेण्याचा सर्व खर्च हा उचलावा लागेल आणि कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. म्हणजेच काय तर पेपर फुटीमध्ये शाळेचा किंवा महाविद्यालयाचा सहभाग आढळून आला तर कठोर कारवाईला संस्थेला सामोरे जावे लागेल. या नव्या विधेयकानुसार पेपर फुटीम

पतसंस्थांना सरकार देणार मदतीचा आधार !

इमेज
  ठेवीदारांनी खुषखबर: पतसंस्थांना अर्थिक सहाय्य; मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय  मुंबई :   सहकारी पतसंस्थांच्या ठेवीदारांमध्ये विश्वासार्हता वाढवण्यासाठी पतंस्थाकडील १ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना सुरक्षा कवच पुरवण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. अशा ठेवी संरक्षित करण्यासाठी 'स्थिरीकरण व तरलता सहाय्य निधी योजना' सुरू करण्यास दि. ५ फेब्रुवारी रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार, या योजनेसाठी परतफेडीच्या अटीवर नियामक मंडळास १०० कोटी रुपये इतका निधी देण्यात येणार आहे. राज्यात जवळपास २० हजार नागरी, ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था आणि पगारदार नोकरांच्या सहकारी पतसंस्था कार्यरत आहेत. या पतसंस्थांकडे सुमारे ३ कोटी ठेवीदारांच्या अंदाजे ९० हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. या ठेवींना संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने सहकार कायद्यातील कलम १४४-२५ अ मध्ये 'स्थिरीकरण व तरलता सहाय्य निधी' निर्माण करण्याची तरतूद आहे. त्यानुसार राज्यातील सर्व पतसंस्थांनी या निधीमध्ये अंशदान जमा करावयाचे आहे. हा निधी सहकार आयुक्त व निबंधक यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या नि

महर्षी दयानंदांचे विचार व कार्य जगासाठी उपकारक -आंतरराष्ट्रीय संघटक विनय आर्य यांचे प्रतिपादन

इमेज
  महर्षी दयानंदांचे विचार व कार्य जगासाठी उपकारक -आंतरराष्ट्रीय संघटक विनय आर्य यांचे प्रतिपादन      परळी वैजनाथ दि.५-   महर्षी दयानंद यांनी अज्ञानयुगात वावरणाऱ्या मानव समूहाला वैदिक ज्ञानाच्या प्रकाशात आणून शाश्वत आनंदाने जगण्याचा मार्ग दाखविला. त्यांच्या  मूलभूत कार्याची व शिकवणीची  नव्याने मांडणी करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय आर्य समाज संघटक श्री विनय आर्य यांनी केले .         गेल्या तीन दिवसांपासून येथील श्रद्धानंद गुरुकुल आश्रमात सुरू असलेल्या महर्षी दयानंद द्विन्मशताब्दी सोहळ्याच्या सांगता समारंभात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी आर्य समाजाचे स्थानिक प्रधान श्री जुगलकिशोर लोहिया हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध वैदिक विचारवंत प्रा. सोनेराव आचार्य,पं. प्रियदत्त शास्त्री, पं. राजवीर शास्त्री, वैदिक विदुषी सविता आचार्या, महेश वेलानी,पं. सत्यवीर शास्त्री आदी उपस्थित होते.       श्री विनय आर्य यांनी यावेळी महर्षी दयानंद यांच्या ऐतिहासिक जीवन व कार्यातून समग्र समस्यांचे समूळ निवारण होते, असे सांगून  स्वराज्य, स्वदेशी, गोरक्षण, कृष

दुखःद वार्ता : भावपूर्ण श्रद्धांजली !!

इमेज
  राणूबाई ज्ञानदेव सोमवंशी यांचे निधन परळी वैजनाथ, प्रतिनिधी         येथील नेहरू चौकातील मेघराज हॉटेलचे मालक भरत सोमवंशी,मेघराज सोमवंशी,शत्रुघ्न सोमवंशी यांच्या मातोश्री राणूबाई ज्ञानदेव सोमवंशी यांचे वार्धक्याने आज दि.5 फेब्रुवारी रोजी सायं.5.30 वा.सुमारास निधन झाले.मृत्युसमयी त्या 95 वर्षे वयाच्या होत्या. पत्रकार महादेव शिंदे यांच्या त्या मावशी होत.       नेहरु चौक भागातील बाजीप्रभुनगर येथील रहिवाशी राणूबाई ज्ञानदेव सोमवंशी  या अतीशय मनमिळाऊ होत्या. वयोमानापरत्वे वयाच्या  95  व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या निधनाने सोमवंशी व शिंदे परिवाराचा आधारवड कोसळला आहे.त्यांच्या पश्चात तीन मुले,सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने  सोमवंशी कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.         दरम्यान, दिवंगत राणूबाई  सोमवंशी यांच्या पार्थिवावर मंगळवार दि.6 रोजी सकाळी 10 वा.मोक्षधाम स्मशानभूमी परळी वैजनाथ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बाजीप्रभुनगर येथील निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघेल.

निवड :हार्दिक अभिनंदन!!!!

इमेज
  वंजारी महासंघ परळी शहर उपाध्यक्षपदी अभिमन्यू गुट्टे परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....        वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य शाखेच्या परळी शहर उपाध्यक्षपदी अभिमन्यू अंबाजी गुट्टे यांची निवड करण्यात आली आहे.      वंजारी महासंघ, महाराष्ट्र राज्य युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष नितीन सोपानराव ढाकणे यांनी नुकतेच निवडीचे पत्र प्रदान केले आहे. परळी शहर उपाध्यक्षपदी अभिमन्यू अंबाजी गुट्टे हे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कला व क्रीडा तसेच अध्यात्मिक क्षेत्रात सतत अग्रेसर राहून काम करणारे परळी शहरातील सर्व परिचित व्यक्तिमत्व आहे.त्यांच्या कार्याची दखल घेऊन  निवड करण्यात आली आहे.या निवडीबद्दल अभिमन्यू  गुट्टे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

●अभिष्टचिंतन:पत्रकार संतोष जुजगर यांचा विशेष लेख >>>>प्रा.अतुल दुबे यांचे ‘अतुलनिय’ कार्य

इमेज
  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक प्रा.अतुल दुबे यांचे ‘अतुलनिय’ कार्य परळीच्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय सहभाग ने तृत्वाचा वारसा अनेकांना चालत येतो. या नेतृत्वात संवेदनशीलपणा असेलच असे नसते. परंतु ज्याला नेतृत्वाचा वारसाही नाही आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर  ज्याला कळवळा येतो असे नेतृत्व हे अपवादानेच उदयाला येते. सर्व सामान्यांतुन उदयास आलेल्या नेतृत्वामध्ये एक प्रकारचे संवेदनशीलता भरलेली असतेच त्याचबरोबरीने आक्रमताही तेवढ्याच तीव्रतेने असते हे दिसुन येते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे परळी शहरातील एक युवा नेतृत्व  प्रा.अतुल दुबे सर या धडपडत्या युवकाच्या रूपाने पहावयास मिळते. वेगवेगळ्या माध्यमातून व एक ध्येय समोर ठेवून सर्वसामान्यां प्रती असलेल्या जिव्हाळा अनेक आंदोलने व अनेक प्रश्नांची सोडवणुक करताना त्याच्यातील संवदेनशीलतेचा प्रत्यय नेहमीच पहावयास मिळाला. तसेच परळी शहराच्या सामाजिक धार्मिक शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात अतुलनिय असणारे  प्रा.अतुल दुबे सर यांचा आज वाढदिवस आहे. त्या निमीत्त त्यांना मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा.  प्रा.अतुल दु

दुखःद वार्ता : भावपूर्ण श्रद्धांजली

इमेज
  शकुंतला माणिकराव धर्माधिकारी यांचे निधन परळी वैजनाथ(प्रतिनिधी)दि.4 - येथील रहिवासी असलेल्या शकुंतला माणिकराव धर्माधिकारी (वय-87) यांचे रविवार दि.4 फेब्रुवारी रोजी सकाळी 6.50 वा.लातूर येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर परळीतील मोक्षधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शहरातील प्रतिष्ठित नागरिक सुरेश धर्माधिकारी,रमेश धर्माधिकारी,चंद्रकांत धर्माधिकारी यांच्या त्या आई होत तर माजी नगराध्यक्ष बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी यांच्या त्या आजी होत.त्यांच्या पश्चात तीन मुले,एक मुलगी, सूना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. धर्माधिकारी कुंटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

शिक्षणप्रेमी साहित्य रसिकांना मिळणार अभूतपूर्व मेजवानी

इमेज
  परळीत 11 फेब्रुवारी रोजी रंगणार 6वे  मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलन शिक्षणप्रेमी साहित्य रसिकांना मिळणार अभूतपूर्व मेजवानी परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात आलेल्या   6 व्या  मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलनात साहित्य रसिकांना दर्जेदार साहित्यिकांची साहित्यिक मेजवानी मिळणार असून या एक दिवसीय साहित्य संमेलनास साहित्यिक,शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संमेलनाचे मुख्य संयोजक रानबा गायकवाड व स्वागत समितीने केले आहे.       परळी येथे साप्ताहिक शिक्षण मार्गाच्या वतीने 6 वे मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलन रविवार दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आले आहे. संत तुकोबाराय साहित्य नगरी, औद्योगिक वसाहत सभागृह येथे होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षण तज्ञ ए.तु. कराड हे आहेत. संमेलनाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त लेखक, दिग्दर्शक डॉ. अनिलकुमार साळवे यांच्या हस्ते होणार आहे. तर नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव व कै. रामभाऊ अण्णा खाडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रदीप खाडे हे स्वागत अध्यक्ष आहेत.      या एकदिवसीय

डॉ. तुकाराम नेहरकर व सौ.रेखाताई नेहरकर यांची प्रतिवर्षी वामनभाऊंच्या पुण्यतिथी निमित्त सेवा

इमेज
  प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी गहिनीनाथ गडावर नेहरकर दाम्पत्याकडून हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी डॉ. तुकाराम नेहरकर व सौ.रेखाताई नेहरकर यांची प्रतिवर्षी वामनभाऊंच्या पुण्यतिथी निमित्त सेवा पाटोदा (प्रतिनिधी) - संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने डॉ.तुकाराम नेहरकर व सौ.रेखाताई नेहरकर यांच्या वतीने याही वर्षी संत वामनभाऊ समाधी मंदिरावर हेलिकॉप्टर द्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली.  मूळ घाटशीळ पारगाव येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते तथा जागतिक आरोग्य सल्लागार डॉ.तुकाराम नेहरकर व सौ.रेखाताई तुकाराम नेहरकर या दाम्पत्याने संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्ताने हेलिकॉप्टरमधून समाधीस्थळी पुष्पवृष्टी करण्याचा पायंडा सुरू केला आहे.  शनिवारी (दि.03) राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते समाधी स्थळी मानाची महापूजा करण्यात आली, यावेळी प्रथमच वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड.प्रकाश आंबेडकर हे ही उपस्थित होते.  दरम्यान पुण्यतीथी सोहळ्याची सांगता काल्याच्या हरिकीर्तनाने झाली. यावेळी संत वामनभाऊ यांच्या समाधीवर 11.45 वा नेहरकर दाम्पत्याने आयोजित केलेल्या हेलिकॉप्टर ने पुष्पवृष्टी करण्यात आली. 

ना. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये लावण्याई पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन: सिनेअभिनेत्री अपेक्षा चलवदेही राहणार उपस्थित

इमेज
  ना. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये लावण्याई पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन:  सिनेअभिनेत्री अपेक्षा चलवदेही राहणार उपस्थित परळी वैजनाथ ,  प्रतिनिधी......  परळी वैजनाथ येथील डी एस एम प्रतिष्ठान संचलित लावण्याई पब्लिक स्कूलचे महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या व लगन या मराठी  चित्रपटातील  सिनेअभिनेत्री अपेक्षा चलवदे (राजनंदिनी) त्यांच्या उपस्थितीमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन- 2024 दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता संपन्न होत आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष पत्रकार अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे.  या कार्यक्रमांमध्ये या शाळेचे चिमुकले विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लक्ष्मीबाई देशमुख महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विद्याताई देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाला सकारात्मक पत्रकारितेतून महाराष्ट्रात नवा मापदंड निर्माण करणारे बीड जिल्ह्यातील सृजनशील,जेष्ठ पत्रकार दैनिक दिव्य लोकप्रभाचे संपादक संतोष मानूरकर, परळी शहराचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी, दिव्यांग
इमेज
  शोभायात्रा: महर्षी दयानंदांच्या जयघोषाने परळी शहर दुमदुमले     परळी वैजनाथ,दि.३-             थोर समाजसुधारक व आर्य समाजाचे संस्थापक महर्षी स्वामी दयानंद सरस्वती यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शहरात महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा व आर्य समाज परळीच्या संयुक्त विद्यमाने येथील नंदागौळ मार्गावरील श्रद्धानंद गुरुकुल आश्रमात राज्यस्तरीय आर्य महासंमेलनास कालपासून उत्साहात सुरुवात झाली. यानिमित्त परळी शहरातून आज (दि.३) भव्य स्वरूपात शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. कालपासून येथील नंदागौळ मार्गावरील श्रद्धानंद गुरुकुल आश्रमात राज्यातील विविध ठिकाणाहून आर्य समाजाचे प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत.         सकाळी विविध यजमानांच्या उपस्थितीत यज्ञ संपन्न झाला.नंतर शहरातील शिवाजी चौकातून शोभायात्रा निघाली. यात शहरातील चौका - चौकात विविध शाळांचे विद्यार्थ्यांनी लेझीम, योगासने विविध कला प्रदर्शन इत्यादींचे सादरीकरण केले. या शोभायात्रेत सर्वात पुढे घोडेस्वार, नंतर शाळांचे विद्यार्थी, गुरुकुलाचे ब्रह्मचारी, राज्यातून आलेले आर्य कार्यकर्ते , महिला अपूर्व उत्साहात पुढे पुढे चालत

ज्योतिर्लिंग स्थानाबाबत पुन्हा खोडसाळपणा: राहुल गांधीच्या वृत्तांकनात झारखंडच्या वैद्यनाथ धामचा ज्योतिर्लिंग म्हणून उल्लेख

इमेज
  ज्योतिर्लिंग स्थानाबाबत पुन्हा  खोडसाळपणा: राहुल गांधीच्या वृत्तांकनात झारखंडच्या वैद्यनाथ धामचा ज्योतिर्लिंग म्हणून उल्लेख परळी वैजनाथ, प्रतिनिधी....           काँग्रेस नेते राहुल गांधी हे झारखंड येथील वैद्यनाथ धाम येथे दर्शनासाठी गेले होते. राष्ट्रीय वृत्तवाहिन्या यांनी वैद्यनाथ धाम चा उल्लेख बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असा केला परंतु यामध्ये महाराष्ट्रातील मराठी मीडियाने सुद्धा कोणतीही कसर न ठेवता व कुठलाही विवेक जागृत न ठेवता सरळ सरळ ज्योतिर्लिंग म्हणून झारखंड येथील वैजनाथ धामचाच उल्लेख करून वृत्तांकन केल्याने परळीतील शिवभक्त व तमाम महाराष्ट्रातील शिवभक्तांमध्ये या मीडियाचा तीव्र शब्दात निषेध केला जात आहे.          बारा ज्योतिर्लिंगाचा उल्लेख करत असताना अनेक वेळा जाणीवपूर्वक महाराष्ट्रातील पंचम ज्योतिर्लिंग स्थान असलेल्या परळी वैजनाथ चा उल्लेख टाळला जातो. हा मुद्दा वारंवार पुढे येत असतो. सर्व शास्त्रसंमत व धर्मशास्त्रसंमत त्याचबरोबर सर्व ऐतिहासिक पुरावे, सर्व शंकराचार्य व साधू समाजाचे मतप्रवाह हे पंचम ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील परळी वैजनाथ येथील वैद्यनाथच आहे. असे असतानाही आणि

मोठी बातमी! लालकृष्ण आडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून घोषणा

इमेज
  मोठी बातमी! लालकृष्ण आडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून घोषणा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे.         पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्टवर लिहिलंय की, मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. मी त्यांच्याशी संवाद साधला असून या पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.आमच्या काळातील सर्वांत प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असलेल्या आडवाणी यांचं भारताच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान आहे. संघटनेच्या तळापासून त्यांनी कामाला सुरुवात केली आणि उपपंतप्रधान पदापर्यंत मजल मारत देशाची सेवा करण्याचे काम केले. केंद्रीय गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी संसदेत उपस्थित केलेले मुद्दे, त्यांची भाषणे आमच्यासाठी दिशादर्शक आणि समृद्ध असा अनुभव देणारी ठरली आहेत. गेल्या काही वर्षांपासून लालकृष्ण आडवाणी सक्रिय राज

श्री सरस्वती विद्यालय, परळी वै, च्या माजी विद्यार्थ्यांचा ४१ वर्षांनंतरचा स्नेह मिलन सोहळा उत्सहात

इमेज
  श्री सरस्वती विद्यालय, परळी वै, च्या माजी विद्यार्थ्यांचा ४१ वर्षांनंतरचा स्नेह मिलन सोहळा उत्सहात परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... दि. २७ जानेवारी २०२४ रोजी स्नेह मिलनाच्या पुर्व संध्येला सायंकाळी सर्व वर्ग मित्र मैत्रिणींच्या ४१ वर्षानंतर भेटीचा योग जुळवून आणला त्यावेळी प्रत्येकाच्या चेहन्यावर एक आनंद दिसून येत होता, कांही वर्ग मैत्रिणीना आश्रू आनवर होत होते, जवळपास ६०-७० वर्ग मित्र मैत्रिणीची यावेळी भेट झाली, प्रत्येकांनी आपला परिचय देवून सायंकाळी भोजन करून दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या स्नेह मिलनाच्या कार्यक्रमाची चर्चा केली. दिनांक २८ जानेवारी रोजी श्री सरस्वती विद्यालय परळी वैजनाथ शाळेतील सन १९८२-८३ या दहावी वर्गाच्या विद्यार्थ्यांचा ४१ वर्षानंतर स्नेह मिलनाचा सोहळा अक्षता मंगल कार्यालय येथे पार पडला. या स्नेह मिलन सोहळयास सर्व दुरवर असलेली वर्ग मित्र मैत्रीणी एकत्र आले. पहिल्या सत्रामध्ये सकाळी जिजामाता उद्यान येथे जाऊन फोटो सेशन करून शाळेमध्ये जाऊन तिथे जुन्या आठवणींना उजाळा देत उपस्थित सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी आठवणीनां उजाळा दिला. शाळेमध्ये शिक्षकांनी वर्गात

सुरश्री संगीत विद्यालयाचे घवघवीत यश

इमेज
  सुरश्री संगीत विद्यालयाचे घवघवीत यश सौ. मीना सोमवंशी यांनी विद्यालयासह केंद्रात प्रथम येण्याचा पटकावला बहुमान अंबाजोगाई, प्रतिनिधी:-   अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ ,वाशी मुंबई तर्फे घेण्यात आलेल्या नोव्हेंबर-डिसेंबर 2023  परीक्षेत सौ. मीना सोमवंशी   यांनी घवघवीत यश संपादन केले. संपूर्ण भारतामध्ये व भारताबाहेरील अनेक देशांमध्ये शास्त्रीय संगीताचा प्रसार व प्रचार परीक्षेच्या माध्यमातून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ वाशी, मुंबई मार्फत केला जातो. नोव्हेंबर-डिसेंबर 2023 दरम्यान झालेल्या संगीत विशारद पूर्ण  परीक्षेत सौ.मीना सोमवंशी यांनी  सुरश्री संगीत विद्यालय आंबेजोगाई येथून फॉर्म भरून परीक्षा देऊन  सुयश प्राप्त केले आहे. बालगंधर्व संगीत महाविद्यालय अंबाजोगाई केंद्र तसेच सुरश्री संगीत विद्यालय या दोन्हीमध्ये सर्वप्रथम येण्याचा बहुमान त्यांनी मिळवला आहे. संगीत विशारद पूर्ण परीक्षेसाठी सुरश्री संगीत विद्यालयाचे संस्थापक-संचालक  संगीत अलंकार प्रा. शंकर सिनगारे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.ते पंडित शिवदासजी देगलूरकर यांचे शिष्य आहेत. सुरश्री संगीत विद्यालयातून अनेक विद्य

गायकवाड, साबणे ,फुटके ,ढाकणे, शिंदे, जोशी, आरबुने या पत्रकारांचा मूकनायक पुरस्काराने सन्मानित

इमेज
  अस्तित्व आणि अस्मितेसाठी मूकनायक दिशादर्शक-डॉ. सिद्धार्थ तायडे मूकनायक पत्रकारितेतील एक ऐतिहासिक अध्याय-  मुख्य अभियंता डॉ. अनिल काठोये समाजासाठी पत्रकार आणि पोलीस दोघांचेही कामे  महत्त्वाचे- पो नि उस्मान शेख गायकवाड, साबणे ,फुटके ,ढाकणे, शिंदे, जोशी, आरबुने या पत्रकारांचा मूकनायक पुरस्काराने सन्मानित परळी /प्रतिनिधी        अस्तित्व आणि अस्मितेसाठी महामानव, विश्वरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले वर्तमानपत्र मूकनायक आजही दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन प्रख्यात  लेखक-दिग्दर्शक प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे  यांनी केले. ते मूकनायक दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. तर मूकनायक पत्रकारितेतील एक ऐतिहासिक अध्याय असल्याचे मत परळी औष्णिक विद्युत  केंद्राचे मुख्य अभियंता डॉ. अनिल काठोये यांनी केले. संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख म्हणाले की, समाजासाठी पत्रकार आणि पोलीस दोघांचेही कार्य अतिशय महत्त्वाचे असून ते समाजाचे मार्गदर्शक बनू शकतात. परळी तालुका व शहर पत्रकार संघाच्या वतीने दि. ३१ जानेवारी रोजी परळी येथील व्हीआयपी रेस्ट हाऊस हॉल मध्ये आयोजित

परळीचे 'सुवर्णकाररत्न' रमेश मुंडीक यांचा सामाजिक योगदानाबद्दल धारासुर गावकऱ्यांच्या वतीने ह्रदय सत्कार

इमेज
  परळीचे 'सुवर्णकाररत्न' रमेश मुंडीक यांचा सामाजिक योगदानाबद्दल धारासुर गावकऱ्यांच्या वतीने ह्रदय सत्कार परळी वैजनाथ, प्रतिनिधी     परळी येथील सर्व परिचित सुवर्णकार व 'सुवर्णकाररत्न' पुरस्काराने सन्मानित असलेले रमेश मुंडीक यांच्या सामाजिक योगदानाबद्दल त्यांच्या मूळ गावी धारासुर येथे आयोजित वार्षिक सप्ताहात गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा हृदय सत्कार करण्यात आला.       धारासुर येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सुरू झाला असून प्रसिद्ध भागवत कथा प्रवक्ते भागवतमर्मज्ञ ह भ प बाळू महाराज उखळीकर यांच्या सुमधुर वाणीतून भागवत कथा सुरू आहे. या भव्य दिव्य सोहळ्यात परळी येथे आपल्या सामाजिक कार्यातून वेगळा ठसा उमटवलेले व 'सुवर्णकाररत्न' पुरस्काराने सन्मान झालेले रमेश मुंडे धारासुरकर यांच्या सामाजिक योगदानाबद्दल गावकऱ्यांच्या वतीने ह्रदय सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर रमेश मुंडीक यांनी गावातील विविध धार्मिक कार्यक्रमात अत्यंत आवश्यक असणाऱ्या पन्नास हजार रुपयांच्या मृदंगाच्या दोन घोड्या दान दिल्या. यावेळी रमेश मुंडीक व परिवाराच्या वतीने श्रीमद् भागवत ग्रं

पंकजा मुंडेंचा खांदा दुखवला: आठवड्याभराचा दौरा रद्द

इमेज
  पंकजा मुंडेंचा खांदा दुखवला: आठवड्याभराचा दौरा रद्द  भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांनी पुढील त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यांनी याबाबत एक्सद्वारे माहिती दिली आहे. एक्सवर पोस्ट करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “माझ्या खांद्याला दुखापत झाल्याने मला हा आठवडा treatment घ्यावी लागेल .. माझे सर्व कार्यक्रम पुढे ढकलत आहे … प्रवास करण्याची परवानगी नाही..” दुखापतीची माहिती देताच त्यांच्या पोस्टवर अनेकांच्या कमेंट्स आल्या आहेत. पंकजा मुंडे यांनी यापुढे काळजी घ्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.