शिक्षणामुळेच बाबासाहेबांनी क्रांती केली - अजयकुमार गंडले
- लिंक मिळवा
- ईमेल
- अन्य अॅप्स
शिक्षणामुळेच बाबासाहेबांनी क्रांती केली - अजयकुमार गंडले
एक वही एक पेन अभियानास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद
परळी प्रतिनिधी. विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणामुळेच भारतात महान अशी क्रांती केली असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत व लेखक अजयकुमार गंडले यांनी केले .ते परळी येथे 14 एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या एक वही एक पेन या अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
परळी येथील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या डॉ .बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रांगणात काल दिनांक 14 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता एक वही एक पेन या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ .अरुण गुट्टे हे होते .तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत अजयकुमार गंडले ,सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ सावंत ,डॉ.आकाश वाघमारे, सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार ससाने,मनसेचे शहर उपाध्यक्ष विठ्ठलराव झीलमेवाड, पत्रकार संभाजी मुंडे, पत्रकार दत्ता काळे, सेवानिवृत्त स.पो.नि.मधुकर निर्मळ पत्रकार विजय रोडे ,भीम शाहीर राहुल सूर्यवंशी ,परळी वीज निर्मिती केंद्राचे विलास ताटे,शिल्पा मुंडे, श्रीमती नंबरदार आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .
याप्रसंगी पुढे बोलताना अजयकुमार गंडले म्हणाले की ,एक काळ असा होता की बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले होते .माणसाच्या विकासाची सर्व ताकद शिक्षणामध्ये आहे हे ओळखून बाबासाहेबांनी उच्च शिक्षण प्राप्त केले .शिक्षणाच्या बळावर त्यांनी भारतातील विषम सामाजिक व्यवस्था उलथावून टाकली .यावेळी बोलताना वैद्यकीय अधीक्षक डॉ.अरुण गुट्टे यांनी सांगितले की बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम आजच्या पिढीने केले पाहिजे.
आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत या अभियानाचे प्रमुख पत्रकार विकास वाघमारे,सामाजिक कार्यकर्ते विकास रोडे यांनी केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड यांनी केले .या कार्यक्रमात शहरातील अनेक नागरिक , सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर आदिनी एक वही एक पेन अभियानास वही आणि पेन देऊन मदत केली .अभियानात जमा झालेले साहित्य शाळा सुरू झाल्यानंतर होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनायक काळे ,प्रशांत रोडे ,गौतम रोडे ,नवनाथ दाने ,विद्याधर सिरसाट , विनोद रायभोळे,बळी व्हावळे,राजू जोगदंड,संघपाल बनसोडे, मंगेश सरवदे आदिंनी परिश्रम घेतले.
- लिंक मिळवा
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा