पोस्ट्स

सप्टेंबर २९, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आयोजन.....

इमेज
  7 ऑक्टोबर रोजी अंबाजोगाई येथे असीम सरोदे यांच्याशी संविधान संवाद! --------------------------------------------- अंबाजोगाई (प्रतिनिधी) : शेतकरी, कामगार, कष्टकरी दीन-दलित सर्वहारा वर्गाच्या न्यायासाठी जीवन वेचणारे झुंजार स्वातंत्र सेनानी, बीड जिल्ह्याचे माजी खासदार, अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने अंबाजोगाई येथे ज्येष्ठ विधितज्ञ एड. असीम सरोदे यांच्याशी संविधान संवाद आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ पत्रकार, संविधान कीर्तनकार ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर त्यांच्याशी 'संविधानाची पायमल्ली होत आहे का?' याविषयावर संवाद साधणार आहेत. काॅ. गंगाधरअप्पा बुरांडे प्रतिष्ठानच्या वतीने 7 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजता अद्यकवी मुकुंदराज सभागृहात या संविधान संवादाचे आयोजन केले आहे. बदलत्या राजकीय, सामाजिक परिस्थितीत संविधानाची गळचेपी होत असल्याची चर्चा आहे. या परिस्थितीत समाजमन भक्कम करण्यासाठी एड. असीम सरोदे सातात्याने प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याशी संवाद साधणारे ह.भ.प. शामसुंदर मह

आयोजन.....

इमेज
  7 ऑक्टोबर रोजी अंबाजोगाई येथे असीम सरोदे यांच्याशी संविधान संवाद! --------------------------------------------- अंबाजोगाई (प्रतिनिधी) : शेतकरी, कामगार, कष्टकरी दीन-दलित सर्वहारा वर्गाच्या न्यायासाठी जीवन वेचणारे झुंजार स्वातंत्र सेनानी, बीड जिल्ह्याचे माजी खासदार, अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने अंबाजोगाई येथे ज्येष्ठ विधितज्ञ एड. असीम सरोदे यांच्याशी संविधान संवाद आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ पत्रकार, संविधान कीर्तनकार ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर त्यांच्याशी 'संविधानाची पायमल्ली होत आहे का?' याविषयावर संवाद साधणार आहेत. काॅ. गंगाधरअप्पा बुरांडे प्रतिष्ठानच्या वतीने 7 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजता अद्यकवी मुकुंदराज सभागृहात या संविधान संवादाचे आयोजन केले आहे. बदलत्या राजकीय, सामाजिक परिस्थितीत संविधानाची गळचेपी होत असल्याची चर्चा आहे. या परिस्थितीत समाजमन भक्कम करण्यासाठी एड. असीम सरोदे सातात्याने प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याशी संवाद साधणारे ह.भ.प. शामसुंदर मह

डॉ. फुलचंद मुंदडा यांचे निधन

इमेज
  महेश बँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. फुलचंद  मुंदडा यांचे निधन परळी /प्रतिनिधी -शहरातील महेश अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर फुलचंदजी मुंदडा यांचे आज दि. ४ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास अल्पशा आजाराने  निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ८९ वर्षे होते. त्यांच्यावर परळी वैजनाथ येथे दि. ५ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता राजस्थानी स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, दोन मुलं, तीन मुली, सुना, नातवंड असा परिवार आहे. बँकेच्या स्थापनेपासून तहयात त्यांनी अध्यक्षपद  भूषवले होते .

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

इमेज
जैन समाज अल्पसंख्याक आर्थिक विकास मंडळ स्थापनेचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय आज 4 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जैन समाज समाज आथिर्क विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला,या सोबतच लोणारी,बारी आणि हिंदू खाटीक समाजासाठी देखील आर्थिक महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. आजच्या बैठकीत घेण्यात आलेले शासन निर्णय खालील प्रमाणे आहेत. o राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ ( महसूल विभाग) o महसूल न्यायाधीकरणाच्या अध्यक्ष व सदस्यांसाठी जाहिरातीद्वारे अर्ज मागवणार (महसूल विभाग) o दौंड येथे बहुउद्देशीय सभागृह नाट्यगृहासाठी शासकीय जमीन (महसूल विभाग) o त्र्यंबकेश्वर तालुक्यातील किकवी प्रकल्पाच्या कामास मान्यता (जलसंपदा विभाग) o टेंभू उपसा सिंचन योजनेस स्व. अनिल भाऊ बाबर यांचे नाव ( जलसंपदा विभाग) o पूर्णा नदीवर दहा साखळी बंधाऱ्यांच्या कामांना गती देणार सिल्लोड मधील जमिनीला सिंचन (जलसंपदा विभाग) o प्राचीन व ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास आता दोन वर्षाचा तुरुंगवास, एक लाख दंडाची तरतूद (पर्यटन) o राज्यातील खेळाडूंसाठी पारितोषिक रक्कम वाढवली (क्रीडा विभाग) o राज्

स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या एका स्वप्नपूर्तीत माझा वाटा आहे, याचा आनंद वाटतो - धनंजय मुंडे

इमेज
  धनंजय मुंडेंच्या पाठपुराव्यास मोठे यश; ऊसतोड कामगारांसाठी 'संत भगवानबाबा ऊसतोड कामगार अपघात विमा' योजना लागू मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, ऊसतोड कामगार, वाहतूकदार, मुकादम तसेच बैलजोडी व झोपडीला सुद्धा मिळणार विम्याचे कवच स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या एका स्वप्नपूर्तीत माझा वाटा आहे, याचा आनंद वाटतो - धनंजय मुंडे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे मुंडेंनी मानले आभार मुंबई (दि. 04) - राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी स्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करून त्याअंतर्गत ऊसतोड कामगार व वाहतूकदार, मुकादम आदींसाठी संत भगवानबाबा ऊसतोड कामगार विमा योजना प्रस्तावित केली होती, त्या योजनेस आज संपन्न झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.  या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 10 लाख ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार, मुकादम तसेच सुमारे दीड ते दोन लाख बैलजोड्या त्याचबरोबर कामगारांच्या झोपड्या यांना सुद्धा विम्याचे कवच आज झालेल्या निर्णयानुसार लागू करण्यात येत असून या योजनेचा संपूर्ण खर्च स्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड का

जोरदार चर्चा: परळी वैजनाथ मतदारसंघात आणखी एक नवी दावेदारी

इमेज
  परळी वैजनाथ विधानसभा मतदार संघात नव्या दावेदारीची जोरदार चर्चा ! जाणीव झाली, बदल हवा :अभिजित देशमुख पर्याय नवा परळी वैजनाथ (प्रतिनिधी)....         परळी वैजनाथ विधानसभा मतदार संघात नव्या दावेदारीची जोरदार चर्चा सध्या सुरु झाली आहे.अनेकजण इच्छुक आहेत पण मतदार संघाला अनुरुप,सर्वंकष चेहरा म्हणून परळी व मतदारसंघातील अश्वासक व विश्वासक चेहऱ्याची आवश्यकता आहे.राजकीय पटलावर याच अनुषंगाने घडामोडी घडत असुन परळी वैजनाथ मतदारसंघात युवानेतृत्व अभिजित देशमुख यांची उमेदवारी येण्याची दाट शक्यता असुन जाणीव झाली, बदल हवा :अभिजित देशमुख पर्याय नवा अशी नव्या दावेदारीची जोरदार चर्चा सुरू आहे.             विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघाकडे  सर्वांचेच लक्ष आहे. अनेकजण दावेदारी करत आहेत.यात दैदिप्यमान कौटुंबिक वारसा, उत्तम संस्कार, अगदी तारुण्यातच विविध प्रकारच्या व्यवसायांचा अनुभव असणारे अभिजीत  देशमुख यांचे नाव आता पुढे येत आहे. परळी वैजनाथचे यशस्वी नगराध्यक्ष एन. के. देशमुख यांचा राजकीय, सामाजिक वारसा अभिजीत  देशमुख यांना आहे.त्यांच्या कुटुंबाकडे परळी शहर व मतदारसंघात

दुःखद वार्ता: कांताबाई मव्हाळे यांचे निधन

इमेज
  भाजप नेते शिवाजीराव मव्हाळे यांना मातृशोक; कांताबाई मव्हाळे यांचे निधन  सोनपेठ, प्रतिनिधी...             परभणी जिल्हा भाजपाचे नेते शिवाजीराव मव्हाळे यांच्या मातोश्री कांताबाई बाबुराव मव्हाळे यांचे आज दि.4 ऑक्टोबर रोजी निधन झाले. मृत्यू समयी त्या 70 वर्षे वयाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले,  सुना, नातवंडे,पतवंडे असा मोठा परिवार आहे.          दिवंगत कांताबाई बाबुराव मव्हाळे  या अतिशय कुटुंबवत्सल गृहिणी म्हणून सर्वपरिचित होत्या. आपल्या कुटुंबाचा एक आधारवड म्हणून त्यांची ओळख होती. वृद्धापकाळाने आज दि. ४ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर खडका येथे आज दि. 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने मव्हाळे कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.

यंदा १००० मोफत श्रवणयंत्र (कानाच्या मशीन) वाटपाचे उद्दिष्ट

इमेज
 ना. धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांतून कमी ऐकू येणाऱ्या / कर्णबधिर रुग्णांसाठी मोफत डिजिटल श्रवणयंत्र (कानाच्या मशीन) वाटप : डॉ. संतोष मुंडे यंदा १००० मोफत श्रवणयंत्र (कानाच्या मशीन) वाटपाचे उद्दिष्ट परळी वैजनाथ (प्रतिनिधी) कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांतून ७ व ८ ऑक्टोबर रोजी श्रीनाथ हॉस्पिटलमध्ये कमी ऐकू येणाऱ्या / कर्णबधिर रुग्णांसाठी मोफत डिजिटल श्रवणयंत्र (कानाच्या मशीन) वाटप शिबीर आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती दिव्यांग मंत्रालयाचे उपाध्यक्ष व शिबिराचे संयोजक डॉ. संतोष मुंडे यांनी दिली आहे. आजवर ना. धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांतून सुमारे ४६०० गरजूंना मोफत श्रवणयंत्र (कानाच्या मशीन) वाटप केले आहे. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून आगामी शिबिराद्वारे १००० गरजूंना श्रवणयंत्र (कानाच्या मशीन) वाटपाचे उद्दिष्ट ठेवल्याचे डॉ. संतोष मुंडे यांनी सांगितले. दिव्यांग मंत्रालय व धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू रुग्णांना हे डिजिटल श्रवणयंत्र वितरित केले जाणार आहेत. श्रवणयंत्र (कानाच्या मशीन) वाटप शिबिरासाठी नावं नोंदणी ४ ऑक्टोबर

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

इमेज
  5 ऑक्टोबरला वाशिम येथून पी.एम. किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांच्या निधीचे वितरण कृषी मंत्री धनंजय मुंडे मुंबई दि.3 : पी.एम. किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांचे माहे ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीतील अनुक्रमे 18 वा व पाचवा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते शनिवार 05 ऑक्टोबर, 2024 रोजी सकाळी 11.00 वा. वाशिम येथील समारंभात वितरीत करण्यात येणार आहे.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यवतमाळ -वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड आदी मान्यवर उपस्थित राहणार  असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. शेतक-यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजना माहे फेब्रुवारी, 2019 पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रु. 2000/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. 6000/- त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खा

मराठी भाषेला अभिजात दर्जा

इमेज
  मराठी भाषेला अभिजात दर्जा :माय मराठीसाठी सोन्याचा दिवस - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजचा दिवस मराठी भाषा गौरव दिन मुंबई, दि. ३:- आजचा दिवस मराठी भाषा आणि मराठीवर  प्रेम करणाऱ्यांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा ऐतिहासिक आहे. जगभरात, सातासमुद्रापार पोहचूनही तिथे मराठी भाषा, सणवार उत्सव जोपासणाऱ्यांसाठी गौरवाचा, अभिमानास्पद दिवस आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यासाठी त्यांनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले आहे.  केंद्रीय मंत्रीमंडळाच्या या निर्णयाचे स्वागत करतानाच, मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी राज्यातील मराठी प्रेमी, तसेच साहित्यिक, संशोधकांनी केलेल्या प्रयत्नांचेही कौतुक केले आहे.  आजचा हा दिवस यापुढे 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.  मुख्यमंत्र्यांनी संत ज्ञानेश्वरांच्या माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातें ही पैजा जिंके ।।  या ओळींचाही दाखला दिला आहे. ते म्हणतात, अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्

ॲड. श्रुती स्वामी यांचे वकिली व्यवसायात पदार्पण

इमेज
ॲड. श्रुती स्वामी यांचे वकिली व्यवसायात पदार्पण परळी वैजनाथ(प्रतिनिधी)- येथील लोकमत टाईम्स चे पत्रकार प्रा. राजू कोकलगावे (स्वामी) यांची कन्या कु.श्रुती राजू स्वामी यांनी पुण्याच्या आयएलएस विधी महाविद्यालयातून बी ए. एलएल बी पदवी प्राप्त केली असून त्यांनी वकिली व्यवसायात नुकतेच पदार्पण केले आहे.      ॲड. श्रुती स्वामी यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण परळीत पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून पुण्याच्या नामांकित इंडियन लॉ सोसायटीच्या विधी महाविद्यालय  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आयएलएस लॉ कॉलेजमधून बी ए. एलएल बी पदवी परीक्षेत प्रथम श्रेणी प्राप्त करून त्यांनी घवघवीत यश मिळविले असून महाराष्ट्र आणि गोव्याच्या बार कौन्सिल कडे नोंदणी करून वकिलीच्या क्षेत्रामध्ये दमदार पाऊल टाकले आहे.  वकिली व्यवसायातील पदार्पणासाठी व यापुढील भावी वाटचालीसाठी त्यांच्यावर सहकारी वकील मंडळी तसेच हितचिंतक, नातेवाईक व मित्रमंडळींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

मला टार्गेट करणाऱ्यांना इथली जनता उत्तर देईल - धनंजय मुंडे

इमेज
आँक्टोबर व नोव्हेंबरचे लाडकी बहिण योजनेचे पैसे १० आँक्टोबर पर्यंत देणार ! समाजातील सर्व समाज घटकांच्या सर्वांगीण, सर्वसमावेशक, समतोल विकासासाठी हे सरकार वचनबद्ध - अजितदादा पवार धनंजय मुंडेंना २०२४ नंतर मोठी जबाबदारी -सुनील तटकरे मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं आहे, मला टार्गेट करणाऱ्यांना इथली जनता उत्तर देईल - धनंजय मुंडे परळी वैजनाथ (दि.01) : समाजातील सर्व समाज घटकांचा सर्वांगीण, सर्वसमावेशक, समतोल  विकास करण्यासाठी महायुतीचे हे सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी परळी येथे दिली. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबर चे पैसे बहिणींच्या खात्यात 10 ऑक्टोबर पर्यंत देणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणाही त्यांनी परळी येथील जन सन्मान यात्रेत केली. तर धनंजय मुंडे यांच्यावर 2024 नंतर मोठी जबाबदारी असणार आहे असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावेळी बोलताना दिले अजित दादांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कोणतीच कमतरता नसल्याने बीड जिल्ह्याचा सर्वंकष विकास निश्चित करू अशी ग्वाही

या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आवाहन

इमेज
  उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जनसन्मान यात्रेचे वादळ आज परळीत धडकणार अजितदादा पवार, सुनील तटकरे, कु.अदितीताई तटकरे, धनंजय मुंडे यांसह अनेक मान्यवर राहणार उपस्थित लाडक्या बहिणींच्या वतीने परळीत दादांचे होणार जंगी स्वागत व मिरवणूक या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आवाहन परळी वैद्यनाथ (दि.30) - 'लाभ आणि बळ' हे ब्रीद महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी घेऊन जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने सबंध महाराष्ट्रात फिरत असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या जनसन्मान यात्रेचे वादळ उद्या मंगळवार, दि.01 ऑक्टोबर रोजी बीड जिल्ह्याच्या परळी शहरात धडकणार आहे.  लाडक्या बहिणींच्या सशक्तिकरणाच्या दृष्टीने तसेच परळी मतदारसंघासह बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींशी व नागरिकांशी संवाद साधण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ना.अजितदादा पवार यांसह प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे, कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे, महिला व बालविकास मंत्री कु.आदीतीताई तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्य

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

इमेज
  डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेतील लाभामध्ये दुप्पट वाढ; उत्पन्नाची अट रद्द मंत्रिमंडळाची मान्यता; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती मुंबई दि 30 सप्टेंबर 2024-: कृषी विभागाच्या वतीने अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत घटकांचे सुधारित निकष निश्चित करून आर्थिक लाभ वाढवण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 2017 पासून ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जिल्हा परिषदेचे निधी वितरित करण्यात येतो. रोजगार हमी योजनेअंतर्गत नवीन विहिरीसाठी चार लाख रुपये अनुदान दिले जाते मात्र त्या तुलनेत या योजनेतील लाभ घेण्यास लाभार्थी इच्छुक नसल्याचे दिसून आल्याने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी योजनेतील लाभ वाढविण्याचे प्रस्तावित केले होते.   या योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

इमेज
  परळीजवळ सीताफळ तर मालेगाव जवळ स्थापन होणार डाळिंब इस्टेट मंत्री मंडळाची मान्यता; दोन्ही प्रस्तावांसाठी 98 कोटींची तरतूद: कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती *मुंबई दि 30 सप्टेंबर 2024-* बीड जिल्ह्यातील मौजे वडखेल ता. परळी येथे 29.50 हेक्टर क्षेत्रात सीताफळ इस्टेट तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव जवळ निळगव्हाण येथे 5.78 हेक्टर डाळिंब इस्टेट स्थापन करण्यास आज सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी 98 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. बीड जिल्ह्यात बालाघाट डोंगर रांगेत मोठ्या प्रमाणात सीताफळाचे उत्पादन घेतले जाते. या परिसरातील वातावरण सीताफळ उत्पादनासाठी पोषक आहे. या परिसरात उत्पादित होणाऱ्या सीताफळावर याच ठिकाणी संशोधन व प्रक्रिया झाल्यास सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार असल्याने या ठिकाणी 55 कोटी खर्चाची सिताफळ ईस्टेट प्रस्तावित करण्यात आली होती.   नाशिक जिल्ह्यातील 30 हजार हेक्टर क्षेत्र डाळिंब फळबाग लागवडीखाली आहे नाशिक जिल्ह्यातील सटाणा मालेगाव नांदगाव देवळा परिसरातील वातावरण डाळिंब पिक

राज्यस्तरीय स्पर्धेत सहशिक्षक अनुपकुमार कुसुमकर यांच्या व्हिडीओ चा तालुक्यातून द्वितीय क्रमांक

इमेज
  राज्यस्तरीय स्पर्धेत सहशिक्षक अनुपकुमार कुसुमकर यांच्या व्हिडीओ चा तालुक्यातून द्वितीय क्रमांक  परळी प्रतिनिधी  विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकास सातत्याने प्रयत्नशील असलेल्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत शैक्षणिक वर्ष 23-24 मध्ये राज्यातील उपक्रमशील शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेच्या निकाल नुकताच जाहीर झाला असून महाराष्ट्र माध्य व उच्च माध्य विद्यालय मोहा येथील सहशिक्षक अनुपकुमार कुसुमकर यांचा स्वनिर्मित व्हिडीओ हा तालुका स्तरावर द्वितीय आला आहे. राज्यातील शिक्षकांना तंत्रज्ञानाची आवड निर्माण व्हावी, तंत्रज्ञानाच्या मदतीने अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुलभ व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्याच्या शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत मागील वर्षी राज्यातील सर्वच शिक्षकांसाठी स्वनिर्मित शैक्षणिक व्हिडिओ राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत परळी तालुक्यातील महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा संचलित महाराष्ट्र माध्य व उच्च माध्य विद्यालयातील विज्ञान विषयाचे शिक्षक श्री.कुसुमकर सर या

गेवराई शहरातील ग्राहक पंचायत ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल बोर्डे यांना मातृशोक

इमेज
  गेवराई शहरातील ग्राहक पंचायत ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल बोर्डे यांना मातृशोक   गेवराई,       शहरातील ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या बीड जिल्हा कार्यकारणीचे सन्माननीय उपाध्यक्ष, गेवराई तालुका सक्रिय कार्यकर्ते, ज्येष्ठ सदस्य व श्री जगदंबा ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था अध्यक्ष अनिल बोर्डे यांच्या मातोश्री श्रीमती लिलाबाई बोर्डे 92 व्या वर्षी दुःखद निधन झाले. गेवराई शहरात काकी म्हणून सर्वांना परिचित आहेत. त्यांच्या पाश्चात दोन मुले व दोन मुली नातवंड व पतंवड मोठा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी आज दिनांक 30/9/24 रोजी चिंतेश्वर स्मशानभूमी येथे संपन्न झाला. अंत्यविधीसाठी गेवराई शहरातील प्रतिष्ठित नागरिक विविध संघटनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात जनसमूह उपस्थित होता.

मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

इमेज
  सोनार समाज व आर्य वैश्य समाजासाठीही आता स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळांची स्थापना  जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)  *राज्य मंत्रिमंडळ बैठक*  *संक्षिप्त निर्णय* दिनांक 30 सप्टेंबर 2024 कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ. अनुकंपा धोरणाही लागू (महसूल विभाग)  ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा ८ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान  (नियोजन विभाग) ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती देणार.  एमएमआरडीए ला बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यता (नगर विकास विभाग)  ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती देणार. १२ हजार २०० कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता  (नगर विकास विभाग)  ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गासाठी १५ हजार कोटी कर्जरूपाने उभारणार  (नगर विकास विभाग) देशी गाईंच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना.  (पशुसंवर्धन विभाग) भारतीय खेळ प्राधिकरणाला आकुर्डी, मालाड व वाढवण येथील जागा  नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार (क्रीडा विभाग)  रसायन तंत्रज्ञान संस्थेस ठाणे येथील मौजे खिडकाळीची जागा  (महसूल विभाग) राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र  स्थापणार. जलस्त्रोतांच

एका क्लिकवर शेतकऱ्यांच्या खात्यात 2398 कोटी रुपये

इमेज
  कृषी विभागाच्या कापूस-सोयाबीन अनुदान योजनेतुन राज्यातील 49 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 2398 कोटी रुपये अनुदान एका क्लिकवर वितरित मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान लाभाचे वितरण 96 लाख खातेधारक शेतकऱ्यांना होणार लाभ, आधार व बँक खाते जुळणी पूर्ण होईल तसे उर्वरीत शेतकऱ्यांनाही लाभ मिळेल - धनंजय मुंडे मुंबई (दि. 30) - राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या शब्दांनुसार मागील वर्षी भाव पडल्याने नुकसान झालेल्या राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे अर्थसहाय्य करण्याच्या योजनेतुन आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण प्रणालीची कळ दाबून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वितरणाची सुरुवात करण्यात आली. याद्वारे एका क्लिकवर सुमारे 49 लाख 50 हजार हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टर च्या मर्यादेत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर 2398 कोटी 93 लक्ष रुपये रक्कम वर्ग करण्यात आली

परळी तालुका व शहरातील तीन वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ झालेल्या अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्याकरा- बालासाहेब जगतकर

इमेज
  परळी तालुका व शहरातील तीन वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ झालेल्या अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करा- बालासाहेब जगतकर                                     परळी प्रतिनिधी:-- परळी तालुका व शहरातील तीन वर्षा पेक्षा जास्त कार्यकाळ झालेल्या अधिकाऱ्याच्या तात्काळ बदल्या करण्यात याव्यात अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी केली आहे.                                    येणाऱ्या विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका  ह्या    निपक्षपाती व मोकळ्या वातावरणात व्हाव्यात . त्यामुळे स्थानिक चे उदाहरणात तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय पोलीस स्टेशन शहर व ग्रामीण व नगरपालिका येथील अधिकारी व तीन पेक्षा जास्त वर्ष कार्यकाळ झालेले अधिकारी हे हुकूमशाही व स्थानिक च्या नेतृत्वाच्या म्हणण्यानुसार वागतात व   मतदारावर ही दबाव दहशत निर्माण होते त्यामुळे सदरील निवडणुका स्वच्छ व निपक्षपाती न होता दबाव खाली होतात त्यामुळे  तीन वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ झालेले अधिकारी यांच्या तात्काळ बदल्या करण्यात याव्यात व स्थानिक च्या अधिकाऱ्यांची ही तात्काळ बदली करण्यात  याव्य

मला शेतकऱ्यासोबत फोटो घ्यायचा आहे -राज्यपाल

इमेज
  शेतकऱ्यांच्या योगदानाशिवाय सशक्त राष्ट्रनिर्मिती शक्य नाही- राज्यपाल सी.पी राधाकृष्णन शानदार सोहळ्यात शेतकऱ्यांना कृषी पुरस्कार वितरण सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे 2500 कोटी अनुदान सोमवारी डीबीटीद्वारे वितरित होणार- उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी कृषी मार्गदर्शक दुत म्हणून काम करावे-कृषी मंत्री धनंजय मुंडे *मुंबई दि. २९ सप्टेंबर २०२४-* शेतकऱ्यांच्या योगदानाशिवाय कोणताही सशक्त समाज आणि राष्ट्र निर्माण शक्य नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी व्यक्ती संस्था तसेच अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात येणारे कृषी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम मुंबईतील वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या हॉलमध्ये पार पडला. या भव्य दिव्य कार्यक्रमात सन 2020, 2021 व 2022 या 3 वर्षातील एकूण 448 पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यावेळी राज्यपाल महोदय बोलत होते.  ते पुढे म्हणाले, देशातील १४० कोटी लोकांना शेतकऱ्यांशिवाय भ

रा.काँ.पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित शेतकरी संवाद यात्रेला डिग्रस येथून सुरुवात

इमेज
  रा.काँ.पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित शेतकरी संवाद यात्रेला डिग्रस येथून सुरुवात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले सुदामतीताई गुट्टेंचे केले कौतुक शेतकरी संवाद यात्रेला पहिल्या दिवशी गावागावातून उदंड प्रतिसाद परळी (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ज्येष्ठ नेत्या सौ सुदामतीताई गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवक नेते सुनील भैया गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली परळी मतदारसंघात होत असलेल्या शेतकरी संवाद यात्रेला पहिल्या दिवशी उदंड प्रतिसाद मिळाला आहे. डिग्रस येथील कुलदैवत कालिकामातेचा आशीर्वाद घेऊन या संवाद यात्रेला सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी ही यात्रा डिग्रस, पोहनेर, कासारवाडी, जळगव्हाण, रामनगर तांडा, पिंपरी बु, रामनगर तांडा, ईमान तांडा, घनाळ तांडा, गोवर्धन , हिवरा या गावांमध्ये गेली असता याप्रसंगी शेकडो शेतकरी व गावकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. याप्रसंगी हिवरा शिवारातील  सोयाबीनच्या शेतामध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या तसेच घणाळ तांडा येथे शेतातील बाजरीचे पीक काढणी करत असलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्या

कर्जमाफी, पीकविमासह इतर प्रश्नी भव्य शेतकरी मेळावा

इमेज
  कर्जमाफी, पीकविमासह इतर प्रश्नी भव्य शेतकरी मेळावा डॉ.अजित नवले, डॉ.डी.एल कराड यांची असणार उपस्थिती परळी / प्रतिनिधी        सततचे अस्मानी आणि सुलतानी संकट आणि सरकारच्या उदासीन धोरणामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कर्जमाफी करत तात्काळ पीक विमा वितरण करावा यासह इतर मागण्याला घेत अखिल भारतीय किसान सभा बीड कडून महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य अध्यक्ष तथा बीड जिल्ह्याचे माजी खासदार,जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या १६ व्या स्मृतिदिनानिमित्त 1 ऑक्टोबर रोजी भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या खरीप हंगामात शेतकरी वर्ग अतिवृष्टीमुळे मोठ्या संकटात सापडला असून सततचे अस्मानी आणि सुलतानी संकटात मरण यातना सहन करत आहे.शेती विरोधी धोरणातून कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात यावी,सरकारची धोरणे शेतकऱ्यांच्या हिताची करण्यासाठी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारश अंमलबजावणी करावी,पिकविमा पारदर्शक बनवून सर्व प्रलंबित विमा मिळावा,उत्पादन खर्चावर आधारित कापसाला १०००० व सोयाबीनला ७००० हजार रु. हमीभाव देण्यात यावा,राष्ट्रीय आपत्ती निव