पोस्ट्स

MB NEWS-प्रशिक्षणासाठी शिक्षकांकडून आकारले जाणारे शुल्क रद्द करा; प्रशिक्षण देणे हि शासनाची जबाबदारी - मराठवाडा शिक्षक संघाचे निवेदन

इमेज
  प्रशिक्षणासाठी शिक्षकांकडून आकारले जाणारे शुल्क रद्द करा; प्रशिक्षण देणे हि शासनाची जबाबदारी - मराठवाडा शिक्षक संघाचे निवेदन *अन्यथा तीव्र आंदोलन करणार* परळी वै:दि 24 प्रतिनिधी   सेवांतर्गत प्रशिक्षण हा शैक्षणिक प्रक्रियेचा भाग आहे. आपल्या शिक्षक कर्मचा-यांना प्रशिक्षण देणे ही शासनाची जबाबदारी आहे. असे असतानाही वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी दोन हजार रूपये शुल्क आकारण्याचा फतवा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने काढला असून शुल्क आकारणी ताबडतोब रद्द करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष पी. एस. घाडगे, सरचिटणीस व्ही.जी. पवार आणि राजकुमार कदम,बंडू अघाव  यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.         या बाबतीत मराठवाडा शिक्षक संघाचे ता.सचिव बंडू अघाव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेली अधिक माहिती अशी की बारा व चोवीस वर्षांच्या अर्हताकारी सेवे नंतर शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणीचा लाभ दिला जातो. यासाठी शासन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचे मार्फत प्रशिक्षण आयोजित करते. वरिष्ठ व निवड श्रेणी मिळण्यासाठी प्रशिक्षण ही महत्त्वाची अट असल्याने

MB NEWS- *अँटो दरपत्रकासाठी ट्राफीक पोलिसांनी पुढाकार घ्यावा !--मुन्ना बागवाले

इमेज
 *अँटो दरपत्रकासाठी ट्राफीक पोलिसांनी पुढाकार घ्यावा !--मुन्ना बागवाले परळी--(प्रतिनिधी)      पेट्रोल आणि डिझेल चे भाव १०० रुपयाच्या पूडे गेल्यामुळे परळी शहरातील अँटोचे भाडे वाढविण्यात आले असून प्रवाशांसाठी ती एक समस्या होऊन बसली आहे.या अँटो भाडे संदर्भात शहर ट्राफिक पोलिसांनी पूढाकार घेऊन दरपत्रक निश्चित करणे गरजेचं असल्याचे मत युवा नेते मुन्ना बागवाले यांनी व्यक्त केले आहे.          या संदर्भात पूढे बोलताना ते म्हणाले की, परळी शहराचे बसस्टॅंड आणि रेल्वे स्टेशन अगदी जवळचं आहे. तेथून परळीच्या कोणत्याही कोपर्‍याकडे जाण्यासाठी जवळपास  २ की.मी. चे अंतर पडते. प्रवाशांना अँटो केल्यानंतर पुर्वी जे भाडे द्यावे लागत होते त्यात गेल्या कांही दिवसापासून पेट्रोल व डिझेलमुळे भाडेवाढ झालेली आहे.                     *अडवणूक ?*           हे जरी खरे असले तरी अनेक वेळा वयस्क प्रवासी, महीला तसेच प्रवाशांसोबत सामानांच्या बॅगा पाहून कांही अँटोवाले त्यांना आव्वाच्यासव्वा भाडे सांगत असल्याची अनेक प्रवाशांकडून तक्रार होताना दिसत आहे. अशाप्रकारे अडवून घेतलेले भाडे प्रवाशांना देणे भाग पडत असून त्यांना विनाकारण

MB NEWS- ⬛ *आजचे राशिभविष्य* ⬛ *दि.२४ नोव्हेंबर २०२१*

इमेज
    ⬛ आजचे राशिभविष्य ⬛        दि.२४ नोव्हेंबर २०२१                           मेष – आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. शेती-जमीन विषयक सरकारी कामांत अडचणी येतील, कौटुंबिक वातावरण बिघडेल. संयमित राहावे. वृषभ – भावंडांचे प्रेम वृद्धिंगत होईल. व्यवसायामध्ये प्रगती होईल. लोकसंपर्क वाढेल. कलागुणांना वाव मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. मिथुन – कौटुंबिक स्वास्थ्य बिघडेल. वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्यावी. अनावश्यक गोष्टींत हस्तक्षेप नको. वादविवादापासून दूर राहावे. कर्क – व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. यशाकडे वाटचाल कराल. आवडत्या व्यक्तींच्या सहवासात दिवस आनंदात जाईल. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. सिंह – अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. गैरसमज होतील. कर्ज प्रकरणांमध्ये अडचणी येतील. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. कन्या – आप्तेष्टांच्या सहकार्याने कामे मार्गी लागतील. प्रवासाचे योग. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. व्यावसायिक उत्कर्ष होईल. प्रसन्नता लाभेल. तूळ – गुणगौरव होईल. सन्मान होतील. प्रतिष्ठा वाढेल. एकंदर प्रगतीच्या दिशेने प्रवास कराल. कौटु

MB NEWS-ओबीसी आरक्षण संरक्षणाबाबत राज्य सरकारने पाठीत खंजीर खुपसला -पंकजा मुंडे

इमेज
  ओबीसी आरक्षण  संरक्षणा बाबत राज्य सरकारने पाठीत खंजीर खुपसला -पंकजा मुंडे मुंबई : एमबी न्युज वृत्तसेवा....        प्रत्‍येकवेळी केंद्र सरकारकडे बोट दाखवू नका.    इम्‍पोरिअल डेटासाठी राज्‍य सरकार निधी उपलब्‍ध करुन देत नाही. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे, अशी राज्‍य सरकारची मानसिकताच नाही. राज्‍य सरकारने ओबीसी समाजाच्‍या पाठीत खंजीर खूपसला आहे. ,अशा शब्‍दात भाजप नेत्‍या पंकजा मुंडे यांनी आज राज्‍य सरकारवर हल्‍लाबोल केला. त्‍या पत्रकार परिषदेत बोलत होत्‍या.          इम्‍पोरिअल डेटासाठी राज्‍य सरकार निधी उपलब्‍ध करुन देत नाही. राज्‍य सरकारला ओबीसींचे राजकीय आरक्षण संपवायचे आहे का, शेतकर्‍यांना पीक विमा दिला जात नाही. अतिवृष्‍टीग्रस्‍तांना सरकारने कोणती मदत केली. संकटात असणार्‍या शेतकर्‍यांकडून सक्‍तीची वीजबिल वसुली का सुरु आहे, असे सवालही पंकजा मुंडे यांनी केला.ठाकरे सरकारमध्‍ये समन्‍वयाचा अभाव दिसून येत आहे. राज्‍य सरकारमध्‍ये विसंवाद असल्‍याने याचा फटका राज्‍यातील सर्वसामान्‍य नागरिकांना बसत आहे, अशी टीकाही त्‍यांनी केली.

MB NEWS-ओबीसींचे असलेले आरक्षण घालवण्याचे पाप महाविकास आघाडी सरकारने केले - खा.डाॅ.प्रितम मुंडे

इमेज
  ओबीसींचे असलेले आरक्षण घालवण्याचे पाप महाविकास आघाडी सरकारने केले - खा.डाॅ.प्रितम मुंडे बीड । दि.२३ । सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविषयी पंधरा महिन्यांमध्ये सात वेळा सुनावणी घेतली,परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सातही वेळा वेळकाढूपणा केला, राज्य सरकारच्या वेळकाढू धोरणामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती मिळाली.हा राज्य सरकारच्या अनास्थेमुळे ओबीसींवर झालेला अन्याय असून ओबीसींचे असलेले आरक्षण घालवण्याचे पाप या सरकारने केले भाजप प्रदेश उपाध्यक्ष खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी म्हंटले आहे. बीड शहरातील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.यावेळी आ.लक्ष्मण पवार,राजेंद्र मस्के,राम कुलकर्णी,देविदास नागरगोजे,भगीरथ बियाणी उपस्थित होते.राज्यातील मराठा आणि ओबीसींच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारची असलेली उदासीनता यावेळी त्यांनी मांडली.ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविरोधात महाविकास आघाडी सरकारच्या लोकांनी न्यायालयात पिटीशन दाखल केल्यामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण गेल्याची टीका त्यांनी केली.मागासवर्गीय आयोग स्थापन करून न्यायालयात इंपिरीकल डाटा सादर करण्याच्या सूचन

MB NEWS-२६/११ शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शुक्रवारी परळीत रक्तदान शिबिर ______________________________________________ 🕳️कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानचा उपक्रम 🕳️उपजिल्हा रुग्णालयात होणार रक्तदान 🕳️शासकीय रक्तपेढी अंबाजोगाईचे रक्तसंकलन _________________________________________

इमेज
  २६/११ शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शुक्रवारी परळीत रक्तदान शिबिर ______________________________________________ 🕳️कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानचा उपक्रम 🕳️उपजिल्हा रुग्णालयात होणार रक्तदान 🕳️शासकीय रक्तपेढी अंबाजोगाईचे रक्तसंकलन _________________________________________ परळी | प्रतिनिधी २६/११ मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली म्हणून येथील कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानने रक्तदान शिबीर आयोजित केले असून या शिबिरात अधिकाधिक युवकांनी रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे. शुक्रवार  दि.२६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वा.उपजिल्हा रुग्णालय, परळी वैजनाथ येथे सदरील शिबीर होत असून या शिबिरातील रक्तसंकलनासाठी शासकीय रक्तपेढी अंबाजोगाई येथील पथक येणार आहे तरी शहर व परिसरातील रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान करून या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

MB NEWS- ⬛ *आजचे राशिभविष्य* ⬛ *दि.२३ नोव्हेंबर २०२१*

इमेज
 ⬛ आजचे राशिभविष्य ⬛       दि.२३ नोव्हेंबर २०२१ मेष – दिवस लाभदायक जाईल, मित्रमंडळींचा सहवास लाभेल,आत्मविश्वास वाढेल, कलाकार व लेखकांना आर्थिक लाभ होतील, आत्मविश्वास वाढेल . वृषभ – बोलताना जपून बोलावे, अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका, मनाविरुद्ध घटना घडतील, व्यावहारिक अडचणी येतील, सावधानता आवश्यक. मिथुन – आरोग्य उत्तम राहील, मनासारख्या गोष्टी घडतील, प्रसन्नता लाभेल, मनपसंद खरेदीचा आनंद घ्याल, आत्मबल वाढेल, मित्रमंडळींचा सहवास लाभेल. कर्क – संयमाने घ्यावे लागेल, अनावश्यक खर्च होईल. प्रतिक्रिया देताना दक्षता घेणे आवश्यक आहे. लोकांना शब्द देऊ नका, गैरसमजातून वादविवाद होतील. सिंह – उत्साही राहाल, आप्तेष्टांच्या मदतीला धावून जाल, व्यावसायिक प्रगती होईल, विवाहविषयक आनंदाची बातमी ऐकायला मिळेल, आठवणींना उजाळा मिळेल. कन्या – आरोग्याच्या दृष्टीने उत्तम दिवस, प्रेरणादायी कार्य कराल, वरिष्ठांचे आशीर्वाद लाभतील, कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील, कार्यसिद्धी होईल. तूळ – जुनेे आजार तोंड वर काढतील, परावलंबी स्वभावामुळे कामे रखडतील, नियोजन आवश्यक आहे, नियमांचे पालन करा, नियमितपणे व्यायाम महत्त्वाचा

MB NEWS-आज अंगारकी संकष्टी, जाणून घ्‍या तिचे माहात्म्य

इमेज
  आज अंगारकी संकष्टी, जाणून घ्‍या तिचे माहात्म्य आज मंगळवार, दि. 23 नोव्हेंबर 2021 रोजी अंगारकी संकष्टी. त्यानिमित्त… पौर्णिमेनंतर जी चतुर्थी येते, तिला संकष्टी चतुर्थी म्हणतात. अमावास्येनंतर जी चतुर्थी येते, तिला विनायकी चतुर्थी म्हटले जाते. संकष्टी चतुर्थी ज्या दिवशी मंगळवारी येते, त्या संकष्टीला अंगारकी संकष्टी म्हटले जाते. ही अंगारकी संकष्टी विशेष अशी आहे. सर्व संकष्टींमध्ये तिचे महत्त्व अधिक मानले जाते. ही अंगारकी संकष्टी कल्याणप्रद आणि शुभदायक अशी मानली जाते. त्यामुळे तिचे माहात्म्य अधिक मानले जाते. अंगारकी संकष्टीचा उपवास आणि व्रत भाविकतेने केले जाते. मुदगल पुराणात अंगारकी संकष्टीचे माहात्म्य सांगणारी कथा आहे. त्यातून अंगारकी संकष्टीचा प्रारंभ कसा झाला, याची माहिती मिळते. मुदगल पुराणाप्रमाणे गणेश पुराणातही अंगारकी संकष्टीसंबंधीची कथा आहे.मुदगल पुराण आणि गणेश पुराण यात सांगितलेली कथा अशी – वेदविद्या पारंगत, प्रख्यात गणेशभक्त भारद्वाज ऋषी हे अवंतीनगरीत वास्तव्यास होते. त्यांचा पुत्र अंगारक. आपल्या पुत्राला त्यांनी गणेशमंत्र दिला. गणेश उपासना करायला सांगितले. अंगारकाने अरण्यात जाऊन

MB NEWS-नीट परीक्षेत 720 पैकी 650 गुण घेवुन उत्तीर्ण झाल्याबद्दल* *पवनराजे अर्बन निधी बँकेच्या वतीने चि.यश श्रीकांत ढेेले याचा सत्कार*

इमेज
  नीट परीक्षेत 720 पैकी 650 गुण घेवुन उत्तीर्ण झाल्या बद्दल  पवनराजे अर्बन निधी बँकेच्या वतीने  चि.यश श्रीकांत ढेेले याचा सत्कार *परळी वैजनाथ / प्रतिनिधी* माहे सप्टेंबर 2021 मध्ये झालेल्या नीट परिक्षेत परळी येथील चि.यश श्रीकांत ढेले याने 720 पैकी 650 गुण घेत ओबीसी प्रवर्गातून देशात 1300 रँक घेवुन उत्तीर्ण होत घवघवीत यश संपादित केले असून त्याच्या या यशाबद्दल आज सोमवार दि 22 नोव्हेंबर रोजी पवनराजे अर्बन निधी बँकेत मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पहार व पेढा भरवून सत्कार करण्यात आला.     आज सोमवार दि 22 नोव्हेंबर रोजी पवनराजे अर्बन निधी मल्टीपर्पज बँकेच्या वतीने परळीचे पहिले तहसीलदार स्व.मन्मथआप्पा ढेले व  माजी नगराध्यक्ष सोमनाथअप्पा हालगे व नगराध्यक्षा सौ.सरोजीताई हालगे यांचा नातू चि.यश श्रीकांत ढेले याने माहे सप्टेंबर 2021 मध्ये झालेल्या नीट परिक्षेत परळी येथील चि.यश श्रीकांत ढेले याने 720 पैकी 650 गुण घेत ओबीसी प्रवर्गातून देशात 1310  तर ओपनमधून 4010 वा रँक घेवुन उत्तीर्ण होत घवघवीत यश संपादित केले आहे. यश श्रीकांत ढेले याचा आज सोमवारी पवन राजे अर्बन निधी मल्टीपर्पज बँकेचे अध्यक्ष प

MB NEWS-चिन्मयमुर्ती संस्थान ऊमरखेडचे कुलमुखत्यार त्रिंबकराव (तात्या) कुलकर्णी यांचे निधन

इमेज
  चिन्मयमुर्ती संस्थान ऊमरखेडचे कुलमुखत्यार  त्रिंबकराव (तात्या) कुलकर्णी यांचे निधन परभणी, प्रतिनिधी......       परभणी शहरातील प्रसिध्द ऊद्योजक व चिन्मयमुर्ती संस्थान ऊमरखेड चे कुलमुखत्यार श्री. त्रिंबकराव (तात्या)नागोराव कुलकर्णी*यांचे परभणी येथे  निधन झाले. ते परभणी शहरातील धार्मीक व सामाजिक कार्यात ते सदैव अग्रेसर असायचे.         श्री त्र्यंबकराव { तात्या  )कुलकर्णी यांचे दिनांक २२/११/२०२१ रोजी  दुःखद निधन झाले आहे.शशिन व नीतीन कुलकर्णी यांचे ते वडील होत.त्यांचा अंत्यविधी दि.२२/११/२०२१ रोजी 3;00 दुपारी  वैकुंठ धाम स्मशानभूमी जिंतुर रोड, परभणी येथे होणार आहे.अंत्ययात्रा राहत्या घरून (तुकामाई) बाळासाहेब ठाकरे नगर, जिंतूर रोड येथुन निघेल. कुलकर्णी कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

MB NEWS-अॅड.आर.व्ही.गित्ते नंदागौळकर यांना पत्नीशोक

इमेज
  अॅड.आर.व्ही.गित्ते नंदागौळकर यांना पत्नीशोक  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      परळी वकील संघाचे माजी अध्यक्ष व सर्व परिचित विधिज्ञ अॅड.आर.व्ही.गित्ते नंदागौळकर यांच्या सुविद्य पत्नी ज्योतीताई गित्ते यांचे आज दि.२२ रोजी सकाळी निधन झाले.            सौ.ज्योती राधाकिशन गित्ते यांचे लातुर येथील फुलाबाई बनसोडे रुग्णालयात आज दि.२२ रोजी ८ वाजता निधन झाले.परवा परळी येथील खासगी रुग्णालयात त्यांचे एक आपरेशन झाले होते.पंरतु बीपी लो होत गेला त्यामुळे लातुर येथे अडमीट केले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या पश्चात पती अॅड.आर.व्ही. गित्ते,दोन मुले असा परिवार आहे. परळी येथे आज दि.२२ रोजी सायंकाळी ४ वा.अंत्यसंस्कार होणार आहेत.गित्ते परिवारावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.        

MB NEWS-शिक्षणप्रेमी स्व. शामरावजी देशमुख

इमेज
  शिक्षणप्रेमी स्व. शामरावजी देशमुख             कै. लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसारक मंडळाचे कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय परळीचे संस्थापक अध्यक्ष स्व. शामरावजी देशमुख यांचा आज  22  नोव्हेंबर रोजी स्मृतीदिन. या निम्मीताने संस्थेच्या वतीने भव्य असा तीन दिवसीय स्मृतीसमारोह आयोजित करण्यात आला असून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद  येवले यांच्या हस्ते या स्मृतीसमारोहाचे उद्घाटन होणार आहे.         कै. लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसारक मंडळाची मुहूर्तमेढ रोवणारे स्व. शामराव संतुकराव देशमुख हे परळी पंचक्रोशीत एक सामाजिक आणि दुसरे सांस्कृतिक क्षेत्रात दानशूर व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. नव्या पिढीला कदाचित हा इतिहास माहिती नाही. परंतू हे वास्तव आणि सत्य आहे. परळी शहरात शिक्षणाची गंगा यावी. शिक्षण हे सर्वसामान्य बहुजन समाजापर्यंत पोहोचावे यासाठी त्यांचे योगदान विसरता येणार नाही.         मराठवाडा हा 17  सप्टेंबर  1948  पर्यंत निजामाच्या अखत्यारीत होता. त्यामुळे सहाजिकच मराठवाड्यात निजामाचे राज्य होते. त्याचेच कायदे कानून इथे लागू होते. त्यावेळेस परळ

MB NEWS- *ध्येयनिष्ट ध्येय पथिक...शामरावजी देशमुख*

इमेज
 ध्येयनिष्ट ध्येय पथिक... शामरावजी देशमुख* .........................स्व.शामरावजी देशमुख- -स्मृती समरोह निमित्याने आयोजित भरगच्च कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका मिळाली.त्यात लिहलं आहे,कौटुंबिक विकासापेक्षा संस्थेचा विकास श्रेष्ठ मानून व मुलींचे उच्च शिक्षण हे ध्येय निश्चित करून ज्यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं अशा ध्येयासक्त व्यक्तीश्रेष्ठाच्या विचारांचा जागर घालण्या साठी... ते वाचून ,ती निमंत्रण पत्रिका पाहून मला स्व. शामरावजी देशमुखांच्या बद्दल चार शब्द लिहण्याची प्रेरणा मिळाली.श्री संजयजींनी ही तशी इच्छा व्यक्त केली.... म्हणून स्व.शामरावजींना आदरांजली म्हणून ही शब्दपुष्पांजली . महिला उच्च शिक्षणाचे उद्दिष्टं स्वतःपुरते पक्कं करून,ज्यांनी निष्ठापुर्वक दमदार पावलं टाकली व अल्पावधीत ,प्रामुख्याने शहरासाठी व सर्व साधारणपणे मराठवाड्यात आदर्श ठरावे असे महिला ज्यूनिअर व वरिष्ठ महाविद्यालय उभे केले ,अशा व्यक्तीश्रेष्ठाचे कार्य जमेल तसे शब्दबध्द करण्याचा प्रयत्न.. शहराच्या केंद्रस्थानी कोट्यावधीचे मुल्य असलेल्या आपल्या जागेत ,शामरावजींनी या लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाची संस्थापना केली व

MB NEWS- ⬛ *नौकरी लावतो म्हणून पुण्याहून आणले परळीला व दोन दिवस केला इच्छेविरुद्ध शारीरिक अत्याचार* 🕳️ *सोलापूरच्या ३८ वर्षिय महिलेची परळीच्या २४वर्षिय युवकाविरुद्ध फिर्याद दाखल*

इमेज
 ⬛ नौकरी लावतो म्हणून पुण्याहून आणले परळीला व दोन दिवस केला इच्छेविरुद्ध शारीरिक अत्याचार 🕳️ सोलापूरच्या ३८ वर्षिय महिलेची परळीच्या २४वर्षिय युवकाविरुद्ध फिर्याद दाखल परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....           परळीत नौकरीला लावतो, रूम बघून देतो असे म्हणून सोलापूरच्या एका ३८ वर्षिय महिलेला पुण्याहून परळीला घेऊन येऊन तिच्यावर इच्छेविरुद्ध शारीरिक अत्याचार केल्या प्रकरणी परळी शहर पोलिसात परळीच्या एका २४ वर्षिय युवका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.        याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आरोपी परळी येथील रहिवासी गणेश बाबुअप्पा कोडी वय 24 वर्षे राहणार जंगम गल्ली, गणेशपार, परळी वैजनाथ याने सोलापूर येथील रहिवासी असलेल्या ३८ वर्षीय महिलेला पुण्याहून परळीला आणले. परळी येथे तुला नौकरी लावून देतो असे अमिष दाखवुन तो तिला परळीला घेऊन आला असे या महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. परळीत आल्यानंतर रूम बघून देतो असे म्हणून दिनांक 19 रोजी रात्री व दि.२० रोजी दुपारी बळजबरीने इच्छेविरुद्ध शारीरिक अत्याचार केला. कोणास सांगितल्यास तुला परळीच्या बाहेरही जाऊ देणार नाही तसेच इथेच मारुन टाकीन अशी ज

MB NEWS-*आजचे राशिभविष्य* ⬛ ््् *दि.२१ नोव्हेंबर २०२१*

इमेज
  *आजचे राशिभविष्य* ⬛      ््््*दि.२१ नोव्हेंबर २०२१* मेष ः चंगळवादावर नियंत्रण आवश्यक आहे. दुसर्‍यावर विसंबून राहू नका. आपले काम चोख करा. आर्थिकद‍ृष्ट्या प्रतिकूल दिवस. आत्मविश्‍वास कमी होईल. वृषभ ः आवडत्या व्यक्‍तींचा सहवास लाभेल. स्वभावामुळे लोक आपलेसे होतील. प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. मनोरंजनामध्ये दिवस जाईल. मिथुन ः अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्थिक नियोजन आवश्यक आहे. कर्ज प्रकरणांमध्ये अडचणी येतील. संयम ठेवणे गरजेचे आहे. आळस व परावलंबित्व सोडावे लागेल. कर्क ः जवळच्या लोकांचे सहकार्य लाभेल. प्रगतीचा मार्ग मिळेल. नियोजनबद्धतेमुळे यशाकडे वाटचाल कराल. जीवलगांचा सहवास लाभेल सिंह ः वरिष्ठांची मर्जी राखाल. विश्‍वास संपादन कराल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. कार्याचे कौतुक होईल. मान-सन्मान मिळवून देणारी घटना घडेल. कन्या ः ठरवलेल्या कामांमध्ये अडचणी येतील. आर्थिकद‍ृष्ट्या प्रतिकूल दिवस. आत्मविश्‍वास द‍ृढ ठेवणे आवश्यक आहे. सरकारी कामांमध्ये अडचणी येतील. नियमांचे पालन करा. तुळ ः उष्णतेचे विकार उद्भवतील. आहारावर नियंत्रण आवश्यक आहे. वादविवादापासून दूर राहा. उष्णतेचे विकार होण्याची

MB NEWS- *सात्विकभाव हा आदर्श जीवनप्रणालीचा पाया - ह.भ.प.बाळकृष्ण महाराज वसंतगडकर*

इमेज
 *सात्विकभाव हा  आदर्श जीवनप्रणालीचा पाया - ह.भ.प.बाळकृष्ण महाराज वसंतगडकर*  परळी वैजनाथ ।प्रतिनिधी.......           गीता -भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे असे संतप्रमाण आहे. त्या अनुषंगाने विचार करता संतसंग जीवनाचे परिवर्तन घडवून आणणारा असतो. यासाठी अध्यात्मिक बैठक गरजेची असुन  सात्विकभाव व अध्यात्मिक संगती आदर्श जीवनाची पायाभरणी करणारी असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. बाळकृष्ण महाराज वसंतगडकर(सातारा)   यांनी केले.          परळी तालुक्यातील नंदनज येथील बाबुराव पंढरीनाथ आघाव व जिल्हा परिषद सदस्य प्रा.मधुकर आघाव यांच्या मातोश्री सौ.पंचफुलाबाई पंढरीनाथ आघाव यांच्या गोडजेवणाच्या कार्यक्रमानिमित्त दि. 19  नोव्हेंबर रोजी किर्तन महोत्सव झाला. दुपारी 1 ते 3 वा.  बाळकृष्ण दादा वसंतगडकर (सातारा)  यांचे किर्तन झाले. याप्रसंगी त्यांनी विविध दृष्टांत व अमोघ वाणीतून तत्त्वचिंतन मांडले.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या "स्वगत सच्चिदानंद मिळोनी, शुध्द सत्वगुणे विणली रे, षड्गुण गोंडे रत्नजडीत तुज, श्यामसुंदर शोभली रे... या अभंगाचे विवेचन त्यांनी याप्रसंगी केले. या चिंतन श्रवणात भाविक मंत्रमुग्ध

MB NEWS-⬛ *ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळीत साकारणार राष्ट्रभक्तीचे स्फूर्तीस्थळ !* 🕳️ *_गटनेते वाल्मिक कराड यांच्या पुढाकाराने परळीमध्ये उभारला जाणार "अतिविशाल तिरंगा ध्वज" आणि "आय लव्ह परळी" सेल्फी पॉइंट - बाजीराव भैय्या धर्माधिकारी_*

इमेज
⬛  *ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळीत साकारणार राष्ट्रभक्तीचे स्फूर्तीस्थळ  !* 🕳️  *_गटनेते वाल्मिक कराड यांच्या पुढाकाराने परळीमध्ये उभारला जाणार  "अतिविशाल तिरंगा ध्वज" आणि  "आय लव्ह परळी" सेल्फी पॉइंट - बाजीराव भैय्या धर्माधिकारी_* परळी वैजनाथ, प्रतिनिधी......         परळी वैजनाथ हे एक राष्ट्रीय महत्व असणारे शहर असुन परळी शहर आता एका वेगळ्या कारणासाठी देशाच्या नकाशावर येणार आहे. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात परळी शहर झपाट्याने विकसित शहराच्या दिशने जात आहे.परळी शहराच्या मूलभूत सोयी सुखसुविधा बाबत अनेक विद्यमान प्रकल्प  कार्यान्वित आहेतच,आता या  विकासयात्रेत परळीच्या शिरपेचात मानाचा एक तुरा खोवला जाणार आहे.शहराच्या सौन्दर्यामध्ये आणखी एक भर पडेल अशी बाब निर्माण करण्यात येत आहे. ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळीत  राष्ट्रभक्तीचे स्फूर्तीस्थळ साकारणार आहे.परळीमध्ये  45 मीटरचा "अतिविशाल तिरंगा ध्वज" आणि  " आय लव्ह परळी" सेल्फी पॉइंट उभारला जाणार असल्याची म

MB NEWS-राजेश गिते यांच्या लोकनेता संपर्क कार्यालयात ॲड. दत्तात्रय महाराज आंधळे यांचा सत्कार

इमेज
  राजेश गिते यांच्या लोकनेता संपर्क कार्यालयात ॲड. दत्तात्रय महाराज आंधळे यांचा सत्कार परळी वैजनाथ, प्रतिनिधी... राजेश गिते यांच्या लोकनेता संपर्क कार्यालयात संतवाड्;मयाचे संशोधन कार्याबद्यल तसेच संतजगमित्र नागा चरित्र लिखाण केले म्हणून ॲड दत्तात्रय महाराज आंधळे यांना पिरंगुट ,पुणे यांचे तर्फे संतजगमित्र पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल महाराजांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी  भाजपा नेते राजेश गिते,नंदनंज सरपंच अनिल गुट्टे,लोणारवाडी सरपंच नवनाथ मुंडे,मिरवट सरपंच धुराजी साबळे मिरवट उपसरपंच रामेश्वर महाराज इंगळे, गणेश मुंडे, प्रविण गुट्टे,आदि उपस्थित होते.

MB NEWS- *नि:संशय परळी वैजनाथ हेच बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग; काशीच्या विद्वतसभेत मुद्द्याची पुनर्मांडणी करणार !* 💢 *_संकेश्वरपिठाधिश शंकराचार्यांसह संत-महंतांची परळीतील धर्मसभेत ग्वाही_* 💢

इमेज
 *नि:संशय परळी वैजनाथ हेच बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग; काशीच्या विद्वतसभेत मुद्द्याची पुनर्मांडणी करणार !* 💢  *_संकेश्वरपिठाधिश शंकराचार्यांसह संत-महंतांची परळीतील धर्मसभेत ग्वाही_* 💢 परळी वैजनाथ, प्रतिनिधी.......      भगवंत कणाकणात भरलेला आहे.मात्र काही स्थानांच्या बाबतीत विनाकारण भाविक भक्तांना विक्षेप दर्शवला जातो.बारा ज्योतिर्लिंग स्थानाबाबत काही भागात वेगवेगळे मतप्रवाह व मान्यता असल्याचे दिसते. वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थान हे नि:संशय परळी वैजनाथ हेच आहे. आद्य शंकराचार्यांपासुन ते आजपर्यंत सर्वांनी हेच स्थान दिग्दर्शित केलेले आहे.त्यामुळे हा कोणाच्या मान्यतेचा विषयच नाही तरीपण या मुद्यावरून होणारा संभ्रम दुर करण्यासाठी काशीच्या विद्वतसभेत या मुद्द्याची पुनर्मांडणी करणार असल्याची ग्वाही संकेश्वरपिठाधिश शंकराचार्य प.प.अभिनव विद्यानृसिंह स्वामी व अन्य संत-महंतांनी परळीतील धर्मसभेत दिली.      संकेश्वर पिठाचे शंकराचार्य जगद्गुरू प.प.अभिनव विद्यानृसिंह स्वामी महाराज, दंडीस्वामी प.पु. अमृताश्रम स्वामी महाराज, हिमाचल प्रदेश येथील प.पु.जयदेवआश्रम स्वामी महाराज,स्वामी मधुरानंद

MB NEWS-नंदागौळचे भुमीपुत्र डॉ.सुनील गित्ते यांची राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण व संशोधन संस्था मुंबई येथे संचालक पदावर नियुक्ती

इमेज
  नंदागौळचे भुमीपुत्र डॉ.सुनील गित्ते यांची राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण व संशोधन संस्था मुंबई येथे संचालक पदावर नियुक्ती  नंदागौळकरांच्या वतीने  डॉ.सुनील गित्तेचा सत्कार  संपन्न  परळी(प्रतींनिधी) परळी तालुक्यातील नंदागौळ येथील डॉ.सुनील विलासराव गित्ते हे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून नियुक्त झालेले अधिकारी असून त्यांनी यापूर्वी छतीसगड राज्यात आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक तसेच निर्माण भवन , नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य विभागात सहाय्यक महानिदेशक म्हणून प्रभावीपणे काम केलेले आहे , या कार्याची दखल घेत केंद्रशासनाने त्यांची मुंबई येथे राष्ट्रीय राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण व संशोधन संस्थेत संचालक या पदावर नुकतीच नेमणूक करण्यात आली असून , त्यांची निवड झाल्यामुळे नंदागौळसह बीड जिल्ह्याचा एक भूमीपुत्र एका महत्वाचा पदावर आल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला असून , त्यांचा सत्कार नंदागौळचे सरपंच सुंदर गित्ते यांनी ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन केला , यावेळी त्यांचे बंधु प्राध्यापक चंद्रकांत गित्ते , महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेचे अध्यक्ष सिद्ध

MB NEWS-⬛ आजचे राशिभविष्य ⬛ दि.२० नोव्हेंबर २०२१

इमेज
  ⬛ आजचे राशिभविष्य ⬛      दि.२० नोव्हेंबर २०२१ मेष-खर्चावर नियंत्रण आवश्यक. आर्थिक नियोजनाचा अभाव संभवतो. वस्तू सांभाळून ठेवा. प्रतिक्रिया देताना कोणालाही वाईट वाटणार नाही, याची काळजी घ्या.        वृषभ-एकाग्रतेने कामे पूर्ण होतील. मनासारख्या घटना घडतील. आत्मविश्‍वास वाढेल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. अलंकार, वस्त्रे मनासारखी खरेदी कराल. मिथुन-नको त्या गोष्टींना अवास्तव महत्त्व देऊ नका. प्रतिक्रिया सावधपणे द्या. जामीन राहू नका. आत्मचिंतनाची गरज. कर्क-चिकाटीने व आत्मविश्‍वासाने व्यवसायात यश मिळेल. लोकांपर्यंत आपले काम पोहोचेल. लाभदायक दिवस. व्यावहारिक चातुर्याने यशस्वी व्हाल. सिंह-अनेक दिवसांपासून चालू असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. कामाचे कौतुक होईल. वरिष्ठांची मर्जी राखाल. कुटुंबीयांसाठी वेळ द्याल. सांस्कृतिक कार्यात सहभागी व्हाल. कन्या-आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. नियमांचे पालन करा. आळस सोडायला हवा. मनाविरुद्ध घटना घडतील. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तूळ-मानसिक व शारीरिक आरोग्य सांभाळा. लोक काय म्हणतील, याचा विचार न करता निर्णय घ्यावा. नको तेच विषय समोर येतील. संयम ठेवणे गरजेचे आ

MB NEWS-आंदोलन सुरूच राहणार : टिकैत

इमेज
  आंदोलन सुरूच राहणार : टिकैत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली असली तरी आंदोलन सुरूच राहील, असे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सांगितले आहे. संसदेत ज्या दिवशी कायदे रद्द केले जातील, त्या दिवसाची आम्ही वाट पाहू, असे टिकैत यांनी खाजगी दूरचित्रवाहिणीशी बोलताना सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या घोषणेवर त्यांनी अविश्वासही दर्शविला. तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी सरकारला ही विधेयके संसदेत सादर करावी लागतील. यावर सदनात चर्चा झाल्यानंतर सरकारकडून ती मागे घेतली जात असल्याबद्दल निवेदन करावे लागेल. तीन कृषी कायद्यांचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयातही पोहोचला होता. गेल्या जानेवारी महिन्यात झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत कायद्याना स्थगिती दिली जात असल्याचे सांगितले होते. मात्र त्यावेळी कायद्यांतील तरतुदींचा अभ्यास करण्यासाठी एका तज्ञ समितीची स्थापना केली होती.

MB NEWS-एमबी न्युज: स्पेशल रिपोर्ट.......पंतप्रधान मोदींनी आज घोषणा करून मागे घेतलेले तीन कृषी कायदे आहेत तरी काय?

इमेज
  एमबी न्युज: स्पेशल रिपोर्ट.......पंतप्रधान मोदींनी आज घोषणा करून मागे घेतलेले तीन कृषी कायदे आहेत तरी काय? एमबी न्युज: स्पेशल रिपोर्ट...  केंद्रातील मोदी सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षभरापासून कृषी कायद्यांवरून देशभरात चर्चा केली जात होती. मोदी सरकारवर यावरून प्रचंड टीका झाली. अखेर मोदी सरकार झुकले आणि त्यांनी कायदे मागे घेतले. हे मागे घेतलेले कायदे नेमके आहेत तरी काय?            पहिला कायदा : शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा २०२० हा कायदा कळीचा मुद्दा बनला होता. या कायद्यानुसार बाजार समितीबाहेर मालाच्या खरेदी विक्रीला परवानगी मिळणार होती. त्यामुळे शेतकरी संतापले होते. बाजार समित्यांच्या अस्तित्वावरच हा कायदा उठल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. या कायद्यानुसार कृषीमालाच्या राज्यांतर्गत आणि आंतरराज्य वाहतुकीतील अडथळे दूर करण्याची तरतूद होती. तसेच मार्केटिंग आणि वाहतूक खर्च कमी करून शेतकऱ्यांना अधिक चांगली किंमत मिळवून देण्याची तरतूद केली होती. इ-ट्रेडिंगसाठी व्यवस्था उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळावी आणि त

MB NEWS-कार्तिक पौर्णिमा व कपीलधार यात्रा : परळीत वैद्यनाथ मंदिर परिसर गजबजला ; दर्शनासाठी मोठी गर्दी

इमेज
  कार्तिक पौर्णिमा व कपीलधार यात्रा :  परळीत वैद्यनाथ मंदिर परिसर गजबजला ; दर्शनासाठी मोठी गर्दी परळी वैजनाथ / प्रतिनिधी. ....          कार्तिक पोर्णिमेनिमित्त व मन्मथस्वामी कपीलधार यात्रेच्या पार्श्वभूमीवर  परळीत वैद्यनाथ मंदिर परिसर गजबजला  आहे.वैद्यनाथाच्या  दर्शनासाठी मोठी गर्दी झाली असल्याचे दिसून येत आहे. बर्याच दिवसांनी वैद्यनाथ मंदिर परिसरात यात्रावजा चित्र बघायला मिळत आहे.         कार्तिक पोर्णिमेनिमित्त हर हर महादेव, श्री संत मन्मथ स्वामी महाराज की जय, असा जयघोष करत कपिलधार यात्रेचे  हजारों भाविकांनी श्री प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतात. या पार्श्वभूमीवर वैद्यनाथाच्या पायर्‍यासमोर प्रसाद साहित्याच्या थाटलेल्या दुकानांची लगबग सुरू झाली आहे.  वैद्यनाथ मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप आले आहे. सकाळ पासुनच दर्शनासाठी भक्तांची रिघ लागली होती. बीड तालुक्यातील कपिलधार येथील श्री संत मन्मथस्वामींची मोठी यात्रा भरते. परळी मार्गे हे भाविक  प्रवास करतात. दरवर्षी या यात्रेदरम्यान यात्रेपुर्वी व यात्रेनंतर चार दिवस असा आठवडाभरात मोठी गर्दी परळीत होते. 

MB NEWS-⭐मोठी बातमी ⭐तीन कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधान मोदींची घोषणा

इमेज
  तीन कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधान मोदींची घोषणा नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी तीन कृषी कायदे  मागे घेण्याची मोठी घोषणा केली. पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी ९ वाजता देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी कृषी कायद्यांबाबत मोठा निर्णय जाहीर केला. शेतकऱ्यांच्या हितासाठी तीन कृषी कायदे आणले होते, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. गेल्या वर्षी २६ नोव्हेंबर पासून शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. गेल्या वर्षभरापासून हे आंदोलन कायम आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी कृषी कायदे  मागे घेण्याची घोषणा केली. पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना संबोधित करताना म्हटले, ”आज मी संपूर्ण देशाला सांगतो की आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या अखेरीस सुरु होणाऱ्या संसद अधिवेशन सत्रात तीन कृषी कायदे रद्द  करण्याची संविधानिक प्रक्रिया पूर्ण केली जाईल. कृषी अर्थतज्ज्ञांनी, शास्त्रज्ञांनी, प्रगतशील शेतकऱ्यांनी कृषी कायद्याचे महत्व समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. पण शेतकऱ्यांच्या हिताची ही गोष्ट आम्