कै.शेषराव (बापू)कराड यांच्या गोडजेवणानिमित्त मान्यवरांची उपस्थिती
![इमेज](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiq_mch05_ijMtq37M7oGN_VQVXiG9Sa6tLzZc9nILeXe6tBPPOOVG20FizGylgqgK9F-ou285FISd8joJBQuG34zpFjuEwEP6DHss-FXVQWUkMod58KyKuc1SVuctH-usZ5jomcV3ng3veGgRi7lsxnvnfiMWugqiB27cf9RfPXX67y3Ke7zoMpjTgFBs/s320/IMG-20240212-WA0057.jpg)
संसारात गुंतून न राहता निर्मोही व्यक्ती परमार्थाने सुखाची प्राप्ती करते - हभप संजय महाराज पाचपोर कै.शेषराव (बापू)कराड यांच्या गोडजेवणानिमित्त मान्यवरांची उपस्थिती परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... ज्याप्रमाणे पक्षांचे जीवन हे कुठल्याही मोहात गुंतून न राहता समाधानाने इप्सित साध्य करण्याचे असते त्याचप्रमाणे परमार्थाने युक्त जीवन असणाऱ्या व्यक्ती या कुठल्याही मोहाशिवाय स्वानंद सुखाला प्राप्त होत असतात असे जीवन शेषराव (बापू)कराड यांचे असल्याचे प्रतिपादन रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर यांनी केले. इंजेगाव येथे कै.शेषराव (बापू)कराड यांच्या गोडजेवणानिमित्त किर्तनसेवा झाली यावेळी ते बोलत होते.कै.शेषराव कराड यांच्या गोडजेवणानिमित्त मान्यवरांची उपस्थिती होती. "पक्षी अंगणी उतरती,ते का गुंतोनी राहती " या शांतीब्रम्ह एकनाथ महाराज यांच्या अभंगाचे विवेचन करतांना रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर यांनी सांगितले की, वारकरी संतांनी आपला प्रपंच व परमार्थ केला आणि त्यांना आलेला अनुभव त्यांनी जगाच्या पुढे मांडला. संसाराची अचूक बैठक असल्याशिवाय आपण परमार्थात प्रवेशच करू शकत नाही. परंतु ज