इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

कै.शेषराव (बापू)कराड यांच्या गोडजेवणानिमित्त मान्यवरांची उपस्थिती

 संसारात गुंतून न राहता निर्मोही व्यक्ती परमार्थाने सुखाची प्राप्ती करते  - हभप संजय महाराज पाचपोर




कै.शेषराव (बापू)कराड यांच्या गोडजेवणानिमित्त मान्यवरांची उपस्थिती


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

     ज्याप्रमाणे पक्षांचे जीवन हे कुठल्याही मोहात गुंतून न राहता समाधानाने इप्सित साध्य करण्याचे असते त्याचप्रमाणे परमार्थाने युक्त जीवन असणाऱ्या व्यक्ती या कुठल्याही मोहाशिवाय स्वानंद  सुखाला प्राप्त होत असतात असे जीवन शेषराव (बापू)कराड यांचे असल्याचे प्रतिपादन रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर यांनी केले. इंजेगाव येथे कै.शेषराव (बापू)कराड यांच्या गोडजेवणानिमित्त  किर्तनसेवा झाली यावेळी ते बोलत होते.कै.शेषराव कराड यांच्या गोडजेवणानिमित्त मान्यवरांची उपस्थिती होती.


     "पक्षी अंगणी उतरती,ते का गुंतोनी राहती " या  शांतीब्रम्ह एकनाथ महाराज यांच्या अभंगाचे विवेचन करतांना रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर यांनी सांगितले की, वारकरी संतांनी आपला प्रपंच व  परमार्थ केला आणि त्यांना आलेला अनुभव त्यांनी जगाच्या पुढे मांडला. संसाराची अचूक बैठक असल्याशिवाय आपण परमार्थात प्रवेशच करू शकत नाही. परंतु जीवन जगत असताना सगळ्यात मोठे भय प्राण्याला कोणतं असेल तर ते मृत्यूचे आहे. आणि हे भय जावं अस वाटत असेल तर अखंड भगवंतनामाचे चिंतन करावे लागेल. ज्याला मरेपर्यंत आपल्याला जगायचच आहे हे कळलं तोच या जगात भयमुक्त झाला. परंतु या मरणाचे भय जरी आपण बाळगत असलो तरी संतांनी मात्र तेच मरण आपला सोहळा केलाय. हीच वारकरी संतांनी विश्वात केलेली सर्वात मोठी क्रांती केली. जेव्हा अंगणात दाण्यांचा सडा पडलेला असतो तेव्हा आकाशात उडणारा पाखरांचा थवा ते दाने टिपण्यासाठी येतो आणि त्यांचं पोट भरेपर्यंत ते दाने टिपतात आणि पोट भरल्यावर कितीही दाने शिल्लक राहले तरी त्या मोहात न गुंतता ते आकाशात उडून जातात. असेच यथार्थ जीवन कै.शेषराव (बापू) कराड यांचे होते असे त्यांनी सांगितले.

      वैद्यनाथ बॅकेचे व्हा.चेअरमन रमेश कराड व लक्ष्मण कराड यांचे वडील कै.शेषराव (बापू) कराड यांच्या गोडजेवणानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्याचे कृषिमंत्री ना धनंजय मुंडे, माजी मंत्री तथा भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, माजी आमदार भीमराव धोंडे, माजी आमदार आर टी देशमुख, माजी आमदार गजानन घुगे  माजी आमदार गोविंद केंद्रे , माजी आमदार केशवराव आंधळे,माजी आमदार पाशा पटेल , त्रिपुराचे सचिव किरणकुमार गित्ते, जालना जि प माजी अध्यक्ष ज्ञानदेव बांगर, मनसेचे नेते प्रकाश महाजन, पुणे येथील एडवोकेट अविनाश आव्हाड, अकोल्याचे अजय राजूरकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक, स्नेही, नागरिक, भजनी मंडळ, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या