आरटीई प्रवेश: आता उरला शेवटचा एक दिवस : यानंतर होणार नाही मुदतवाढ
![इमेज](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjLeEdoxMMotJnv8Et7UD7XggW98mz7KhAuvM1bpFoGSWiLZKW5-TO7YtBv7FaR3BdZPwcTYO_U6G7YvHh9kYaImpSLdpKOHWw22WV3qiXXX1EQdKFOeJNyNhNILrUKBe4Q227cp5Qx4LQMTsrzGppU3wz6qxovHOFCWIzW0cs6S90WTTP5D48yuiB72hI/s320/app_1716986825665723c989ec0_1000437106.webp)
आरटीई प्रवेश: आता उरला शेवटचा एक दिवस : यानंतर होणार नाही मुदतवाढ परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... आरटीई प्रवेशाकरिता अर्ज करण्याची मुदत ३१ मे असल्याने पालकांना आता अर्ज करण्याकरता शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. कारण त्यानंतर मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे. शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबवली जात असून, ३१ मे अंतिम मुदत असल्याने त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही. अर्थात, त्यापूर्वीच जागांपेक्षा दुप्पट अर्ज आल्याने आता शाळा प्रवेशासाठी सोडत (लॉटरी) काढावी लागणार हे स्पष्ट झाले आहे. आरटीई प्रवेशासाठी राज्य सरकारने विद्यार्थ्याच्या राहत्या ठिकाणापासून एक किलोमीटर परिसरातील अनुदानित, शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतच प्रवेश दिला जाईल, असा निर्णय घेतला होता. परंतु या निर्णयाला विरोध दर्शवत पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पालकांच्या याचिकेवर सुनावणीनंतर न्यायालयाने शासनाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य मुलांनाही इंग्रजी माध्यमांच्या खा