इमेज
प्रशासकीय गतिमानता, सुसूत्रतेसाठी मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना उपविभागांचे स्वतंत्र विभाग; विभागांची संख्या ४५ होणार सामान्य प्रशासन विभाग प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचना करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या ३३ प्रशासकीय विभागांची संख्या ४५ होणार आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज आँफ लिव्हिंग संकल्पनेवर भर देण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार मंत्रालयीन विभागात सुसूत्रता आणण्यासाठी पुनर्रचना करण्यात आली. यामुळे निर्णय घेण्याची प्रक्रिया वेगवान होईल, योजनांची अंमलबजावणी आणि क्षेत्रीय यंत्रणांशी प्रभावी समन्वय साधणे शक्य होणार आहे. सध्या मंत्रालयात ३३ प्रशासकीय विभाग होते. यामध्ये एकाच विभागात दोन अथवा तीन उपविभाग होते. उपविभाग दोन किंवा तीन असले तरी विभागाची आस्थापना एकाच विभागप्रमुखांकडे असते. यामुळे मनुष्यबळाच्या वितरणात अडचणी निर्माण होत असत. त्याचबरोबर उपविभागाचे कामकाजाचे स्वरूप भिन्...

जिल्ह्यात ग्राहकांना योग्य दरात वाळू उपलब्ध करून द्या- अनिल बोर्डे

 जिल्ह्यात ग्राहकांना योग्य दरात वाळू उपलब्ध करून द्या- अनिल बोर्डे      



                                            

   गेवराई :- बीड जिल्ह्यात व गेवराई तालुक्यात गेवराई शहरामध्ये बांधकाम ग्राहकांना कमी किमतीत  रकमेमध्ये वाळू मिळावी असे शासनाचे धोरण असताना प्रत्यक्षात मात्र ग्राहकांना चढ्या दराने वाळू खरेदी करावी लागते याबाबत बीड जिल्हा ग्राहक पंचायतचे उपाध्यक्ष व गेवराई ग्राहक पंचायत मार्गदर्शन केंद्रप्रमुख अनिल बोर्डे यांनी गेवराई येथील नायब तहसीलदार श्री संजय जी सोनवणे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.                  सध्या बीड जिल्ह्यात व इतर नद्यांमधून व गोदावरी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याचे निदर्शनास येत आहे . यावर शासनाने वेळीच  कार्यवाही  करणे आवश्यक आहे. परंतु तसे होताना निदर्शनास येत नाही. त्यामुळे ग्राहकांना वाळू चढ्या दराने घ्यावी लागते. त्यामुळे शासनाचा महसूल देखील वसूल होत असल्याचे दिसत नाही. त्यामध्ये शासनाची मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन ग्राहकाची देखील पिळवणूक होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे ग्राहकांना योग्य दरात वाळू उपलब्ध व्हावी यासाठी शासनाने निर्णय घेतलेला आहे त्याची अंमलबजावणी वेळीच होऊन लिलाव प्रक्रिया पारदर्शक प्रमाणे  राबविणे आवश्यक आहे. बीड जिल्ह्यात ग्राहकांना योग्य दरात वाळू मिळेल याबाबत ठोस उपाययोजना कार्यान्वित करणे आवश्यक आहे. यामध्ये ग्राहक हित जोपासण्यातील याप्रमाणे कारवाई होणे अपेक्षित आहे. यामध्ये ग्राहकाची पिळवणूक होणार नाही याबाबत योग्य ती कार्यवाही युद्ध पातळीवर होणे आवश्यक आहे. निवेदन देताना बीड जिल्हा ग्राहक पंचायत चे उपाध्यक्ष अनिल बोर्डे गेवराई ग्राहक पंचायतचे अध्यक्ष प्रा. भानुदास फलके  प्रा. ए. ए. चव्हाण इंजिनीयर नारायण अवधूत गणेश रामदासी मोहन राजहंस आर जी थळकर आधी जण हजर होते.


Video.....

 









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या