जनता दरबारात प्रश्न लावले मार्गी

इमेज
  आ. पंकजाताई मुंडेंनी जिल्हा ढवळून काढला ; सलग दोन दिवस पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठकीत केली सविस्तर चर्चा परळी वैजनाथ।दिनांक २८। भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या  परळी मुक्कामात संपूर्ण जिल्हा ढवळून काढला. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या सलग दोन दिवस मॅरेथॉन बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.    आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या जोरात वाहू लागले आहे. त्या अनुषंगाने भाजप नेत्या आ. पंकजाताई मुंडे सध्या राज्यभर संघटनात्मक दौरे करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या मराठवाड्यातील कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत त्या उपस्थित होत्या. याठिकाणी त्यांनी विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी त्या थेट जिल्हयात दाखल झाल्या. परळी येथे निवासस्थानी त्यांनी सलग दोन दिवस आष्टी-पाटोदा-शिरुरकासार, केज, माजलगाव आणि परळी शहर व ग्रामीण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर अशी चर्चा केली. आगामी निवडणु

आरटीई प्रवेश: आता उरला शेवटचा एक दिवस : यानंतर होणार नाही मुदतवाढ

आरटीई प्रवेश: आता उरला शेवटचा एक दिवस : यानंतर होणार नाही मुदतवाढ


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

        आरटीई प्रवेशाकरिता अर्ज करण्याची मुदत ३१ मे असल्याने पालकांना आता अर्ज करण्याकरता शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. कारण त्यानंतर मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे.
      शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबवली जात असून, ३१ मे अंतिम मुदत असल्याने त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही. अर्थात, त्यापूर्वीच जागांपेक्षा दुप्पट अर्ज आल्याने आता शाळा प्रवेशासाठी सोडत (लॉटरी) काढावी लागणार हे स्पष्ट झाले आहे.आरटीई प्रवेशासाठी राज्य सरकारने विद्यार्थ्याच्या राहत्या ठिकाणापासून एक किलोमीटर परिसरातील अनुदानित, शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतच प्रवेश दिला जाईल, असा निर्णय घेतला होता. परंतु या निर्णयाला विरोध दर्शवत पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

पालकांच्या याचिकेवर सुनावणीनंतर न्यायालयाने शासनाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य मुलांनाही इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळेत प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयानंतर पालकांकडून आरटीई प्रवेशाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

‘आरटीई’अंतर्गत वंचित, आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिला जातो. त्यानुसार खासगी शाळांतील प्रवेशासाठीची अर्ज नोंदणी १७ मेपासून सुरू करण्यात आली आहे. ३१ मे ही अर्ज नोंदणीसाठीची अंतिम मुदत आहे. त्यामुळे आतापर्यंत आलेल्या एक लाख ८७ हजार अर्जांमध्ये आणखी अर्जांची भर पडणार आहे.

आता मुदतवाढ नाही...

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेच्या कामकाजासाठी गठित केलेल्या पडताळणी समितीने प्रवेशपात्र बालकाचे प्रवेशाकरिता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार असल्याने पडताळणी समितीस पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे. त्यामुळे ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम दिनांक ३१ मे असून, पालकांनी मुदतीत अर्ज भरणे आवश्यक आहे.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ प्रवेशप्रक्रिया जूनमध्ये सरू होत असल्याने ‘आरटीई’ २५ टक्के प्रवेश प्रक्रियेस दिनांक ३१ मेनंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही. त्यामुळे पालकांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज मुदतीपूर्वी भरण्याची कृपया काळजी घ्यावी, असे आवाहन शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी केले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?