इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

आरटीई प्रवेश: आता उरला शेवटचा एक दिवस : यानंतर होणार नाही मुदतवाढ

आरटीई प्रवेश: आता उरला शेवटचा एक दिवस : यानंतर होणार नाही मुदतवाढ


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

        आरटीई प्रवेशाकरिता अर्ज करण्याची मुदत ३१ मे असल्याने पालकांना आता अर्ज करण्याकरता शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. कारण त्यानंतर मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे.
      शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबवली जात असून, ३१ मे अंतिम मुदत असल्याने त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही. अर्थात, त्यापूर्वीच जागांपेक्षा दुप्पट अर्ज आल्याने आता शाळा प्रवेशासाठी सोडत (लॉटरी) काढावी लागणार हे स्पष्ट झाले आहे.आरटीई प्रवेशासाठी राज्य सरकारने विद्यार्थ्याच्या राहत्या ठिकाणापासून एक किलोमीटर परिसरातील अनुदानित, शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतच प्रवेश दिला जाईल, असा निर्णय घेतला होता. परंतु या निर्णयाला विरोध दर्शवत पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

पालकांच्या याचिकेवर सुनावणीनंतर न्यायालयाने शासनाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य मुलांनाही इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळेत प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयानंतर पालकांकडून आरटीई प्रवेशाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

‘आरटीई’अंतर्गत वंचित, आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिला जातो. त्यानुसार खासगी शाळांतील प्रवेशासाठीची अर्ज नोंदणी १७ मेपासून सुरू करण्यात आली आहे. ३१ मे ही अर्ज नोंदणीसाठीची अंतिम मुदत आहे. त्यामुळे आतापर्यंत आलेल्या एक लाख ८७ हजार अर्जांमध्ये आणखी अर्जांची भर पडणार आहे.

आता मुदतवाढ नाही...

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेच्या कामकाजासाठी गठित केलेल्या पडताळणी समितीने प्रवेशपात्र बालकाचे प्रवेशाकरिता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार असल्याने पडताळणी समितीस पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे. त्यामुळे ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम दिनांक ३१ मे असून, पालकांनी मुदतीत अर्ज भरणे आवश्यक आहे.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ प्रवेशप्रक्रिया जूनमध्ये सरू होत असल्याने ‘आरटीई’ २५ टक्के प्रवेश प्रक्रियेस दिनांक ३१ मेनंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही. त्यामुळे पालकांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज मुदतीपूर्वी भरण्याची कृपया काळजी घ्यावी, असे आवाहन शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी केले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या