बोरखेड येथील शेतातील सौर उर्जा संच कोसळला
शेतकऱ्यांच्या सौर उर्जा संचाचे वादळाने मोठे नुकसान
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी तालुक्यात दि.25 व 26 मे रोजी आलेल्या वादळात विविध ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. या वादळात शेतकऱ्यांच्या सौर उर्जा संचाचेही वादळाने मोठे नुकसान झाले आहे.
भीषण दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.बोरखेड येथील शेतातील सौर उर्जा संच कोसळल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. बोरखेड शिवारातील गट नं.96 मधील विनय सुंदरराव वानखेडे यांच्या शेतातील सौर उर्जा संच, प्लेटस् असे कोसळले आहे.अचानक आलेल्या वादळामुळे संपूर्ण संच उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.या नुकसानीची प्रशासनाने नोंद घ्यावी अशी मागणी शेतकर्याकडून होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा