पोस्ट्स

जनता दरबारात प्रश्न लावले मार्गी

इमेज
  आ. पंकजाताई मुंडेंनी जिल्हा ढवळून काढला ; सलग दोन दिवस पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठकीत केली सविस्तर चर्चा परळी वैजनाथ।दिनांक २८। भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या  परळी मुक्कामात संपूर्ण जिल्हा ढवळून काढला. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या सलग दोन दिवस मॅरेथॉन बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.    आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या जोरात वाहू लागले आहे. त्या अनुषंगाने भाजप नेत्या आ. पंकजाताई मुंडे सध्या राज्यभर संघटनात्मक दौरे करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या मराठवाड्यातील कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत त्या उपस्थित होत्या. याठिकाणी त्यांनी विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी त्या थेट जिल्हयात दाखल झाल्या. परळी येथे निवासस्थानी त्यांनी सलग दोन दिवस आष्टी-पाटोदा-शिरुरकासार, केज, माजलगाव आणि परळी शहर व ग्रामीण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर अशी चर्चा केली. आगामी निवडणु

सर्वेक्षणास २ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

इमेज
  मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणास २ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मुंबई, ‍‍दि. ३० : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाचा कालावधी दि.३१ जानेवारी २०२४ पर्यत होता. तथापि काही ठिकाणी सर्वेक्षणास आणखी कालावधीची आवश्यकता असल्याने या सर्वेक्षणासाठी दि.०२ फेब्रुवारी २०२४ पर्यत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती आयोगामार्फत प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. आयोगामार्फत प्रगणकांना सर्वेक्षणासाठी ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सर्वेक्षणादरम्यान केवळ मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाची माहिती मोबाईल अॅप्लीकेशनमधील प्रश्नावलीद्वारे भरून घेतली जात आहे. कुटुंब आरक्षित प्रवर्गातील असल्याची माहिती प्रगणकाला मिळाल्यानंतर त्या कुटुंबाची पुढील माहिती घेतली जात नाही. सर्वेक्षणाचा कालावधी कमी असल्याने प्रगणक सकाळी लवकर अथवा सायंकाळी उशिरा सर्वेक्षणासाठी येऊ शकतात. नागरिकांनी सर्वेक्षणासाठी नियुक्त प्रगणकांना आवश्यक माहिती देऊन सर्वेक्षणास सहकार्य करावे, असे आवाहन आ

वैद्यनाथ बँकेचे व्हाईस चेअरमन रमेश कराड यांचे सांत्वन

इमेज
  वैद्यनाथ बँकेचे व्हाईस चेअरमन रमेश कराड यांचे अनेकांकडून सांत्वन परळी, प्रतिनिधी वैद्यनाथ बँकेचे व्हाईस चेअरमन रमेश आप्पा कराड यांचे वडील शेषेराव संपतराव कराड यांचे गुरुवार दि. 24 जानेवारी रोजी निधन झाले.त्या अनुषंगाने विविध क्षेत्रातील मान्यवर कराड कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटी घेऊन शोकसंवेदना व्यक्त करत आहेत.     आज माजी आमदार गोविंद अण्णा केंद्रे,मनसेचे नेते प्रकाश महाजन, रा.काॅ.नेत्या प्रा. सुशिलाताई मोराळे,सोलापुर येथील  उदयशंकर पाटील,अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर(पापा) मोदी, सर्जेराव तांदळे (भाजपा जिल्हा  सरचिटणीस) जालनाचे ,राजेंद्र राख ,बाळासाहेब राख ,मुन्ना फड ,टिव्ही 9 चे रिपोर्टर  संभाजी मुंडे आदींनी वैद्यनाथ बँकेचे व्हाईस चेअरमन रमेश कराड यांचे सांत्वन केले.

पांगरी येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबीर

इमेज
  फेसबुकवरुनच रोज बाय बाय...        सांग तुला गावाकडे यायचे का नाय..     ........कवी अरुण पवार पांगरी येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबीरात कवी अरुण पवारांनी दिली बहारदार कवितांची मेजवानी परळी वैजनाथ दि.३० (प्रतिनिधी)              लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या वतीने पांगरी येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष युवती शिबीराचे आयोजन सोमवार (ता.२९) ते रविवार (ता.०४) दरम्यान करण्यात आले आहे. शिबीराच्या दुसऱ्या दिवशी सुप्रसिध्द कवी अरुण पवारांच्या काव्य मैफीलीचे आयोजन करण्यात आले होते.काव्य मैफीलीस विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.                  काव्य मैफीलीच्या सुरुवातीला महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ विनोद जगतकर यांनी केले. यावेळी कार्यक्रमास कवी अरुण पवारसह, माऊली मुंडे पाटील, डॉ प्रविण दिग्रसकर, डॉ राजर्षी कल्याणकर, डॉ रंजना शहाणे, प्रा. विणा भांगे, प्रा विशाल पौळ, प्रा डॉ विलास देशपांडे, मुख्याध्यापिका श्रीमती विभुते, नागभूषण फुलारी उपस्थित होते. यावेळी कवी अरुण पव

पुन्हा आंदोलनाने उपसले हत्यार

इमेज
  पुन्हा एल्गार: जरांगे-पाटलांचे 10 फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकार विरोधात आंदोलनाचं हत्यार उगारलं आहे. राज्य सरकारने येत्या 15 दिवसात सगेसोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करावी. 9 तारखेपर्यंतची ही डेडलाईन आहे. जर या कालावधीत कायद्याची अंमलबजावणी केली नाही तर मी येत्या 10 फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण करणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. येत्या 9 तारखेला सरकारला दिलेल्या मुदतीचे 15 दिवस पूर्ण होत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मनोज जरांगे पाटील हे रायगडावर आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी उपोषणाला बसणार असल्याचं स्पष्ट केलं. राज्य सरकारमध्ये बेबनाव आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर वेगवेगळी स्टेटमेंट येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकीकडे नोटिफिकेशन्स काढतात आणि दुसरीकडे आम्ही केंद्रापर्यंत जाऊ असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. ही दोन स्टेटमेंट का? कशासाठी? मराठ्यांना झुलवत ठेवायचं आहे काय? मराठ्यांची मते नको आहेत काय?

विद्वानांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम

इमेज
परळीत २,३,४ फेब्रुवारी रोजी महर्षी दयानंद  द्विजन्मशताब्दी सोहळा     विद्वानांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम परळी वैजनाथ -३०-           समग्र क्रांतीचे अग्रदूत व थोर समाजसुधारक महर्षी दयानंद सरस्वती यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त येथील नंदागौळ मार्गावरील श्रद्धानंद गुरुकुल आश्रमात येत्या २,३ व ४ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय आर्य नेते व प्रसिद्ध विद्वानांच्या उपस्थितीत भव्य स्वरूपात द्विजन्मशताब्दी सोहळयाचे  आयोजन  होत आहे.             महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा व आर्य समाज परळीच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या  कार्यक्रमात तिन्ही दिवस विविध विषयावरील संमेलने, योग शिबिर ,वेदपारायण यज्ञ ,भव्य शोभायात्रा, प्रबोधनपर व्याख्याने ,गुरुकुल वार्षिकोत्सव , शतायुषी तपस्वी व्यक्तिमत्व श्री स्वामी सोममुनिजी गौरव, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक व अभ्यासू व्यक्तिमत्त्वांचा सत्कार असे कार्यक्रम पार पडतील. या कार्यक्रमास दिल्ली येथील वरिष्ठ आर्य नेते श्री विनय आर्य, प्रकाश आर्य, वैदिक विद्वान सर्वश्री प्रा. सोनेरावजी आचार्य (पुणे) पं. प्रियदत्त शास्त्री ( हैदराबाद) , पं. राजवीर शास्त्री (सोलापूर), प

अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण; एकनाथ शिंदेंची घोषणा

इमेज
  अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण; एकनाथ शिंदेंची घोषणा मुंबई : ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचं अभिनंदनही केलं आहे. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे, तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकापर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविलं आणि रसिकांवर अधिराज्य गाजवलं, असं मुख्यमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन करताना म्हटलं आहे

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

इमेज
  परळीजवळ थरारक आपघात: बोअरची गाडी वीजवाहक तारांना चिकटली; दोन मृत्यूमुखी दोन जखमी परळी वैजनाथ, प्रतिनिधी      परळी शहराजवळ दुपारी १२.१५ वा.सुमारास एक थरारक अपघात घडला आहे.बोअरवेल पाडण्यासाठी आलेल्या गाडीचा वीज वाहक तारांशी संपर्क आला व करंट उतरून या बोअरच्या गाडीत असलेले दोन मजूर मृत्युमुखी पडले. तर अन्य दोन मजूर जखमी झाले आहेत. मृत्यू पावलेल्या मजुरांचे पार्थिव उपजिल्हा रुग्णालयात उत्तरे तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. दोन जखमींवर येथेच उपचार सुरू आहेत.       परळी तालुक्यातील वाघबेट येथे पाण्याचा बोर पाडण्यासाठी ओरिसा राज्यातील मजुरांसह बोरवेल मशीन घेऊन  सहा जणांचे एक पथक आले होते. या गावातील बोरवेल पाडण्याचे काम संपल्यानंतर बोरवेलची ही गाडी परळी शहराकडे येत होती. रस्त्यात वीजवाहक तारांना या गाडीचा संपर्क झाला. वीज वाहकतारांचा विद्युत प्रवाह संपूर्ण लोखंडी पाईप असलेल्या या गाडीत उतरला. या गाडीमध्ये एकूण सहा मजूर बसलेले होते. त्यापैकी करंट लागून दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन जण जळून जखमी झाले आहेत. बोरवेल वरील हे सर्व मजूर ओडिसा राज्यातील असून  गोबिंदा जबलसिंग गौंड

राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर; महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश

इमेज
  राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर; महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. १५ राज्यातील ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ६ जागांचा समावेश आहे. देशभरातील १५ राज्यातील ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) आज (सोमवारी) अधिसूचना जारी केली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) आज (सोमवारी) अधिसूचना जारी करून राज्यसभेच्या निवडणूका जाहीर केल्या आहेत. 13 राज्यांतील 50 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपणार आहे, तर दोन राज्यांतील उर्वरित सहा सदस्य 3 एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत. त्या ठिकाणच्या निवडणुका २७ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आल्या आहेत. ज्या राज्यांमध्ये राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत त्यात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, कर्नाटक, उत्तराखंड, छत्तीसगड, ओडिशा, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश यांचा समावेश आहे. राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. राज्यसभेचे एक तृतीया

दहावी-बारावीची कॉपीमुक्त परीक्षा!

इमेज
  दहावी-बारावीची कॉपीमुक्त परीक्षा! प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेसाठीही भरारी पथके; यंदा सरमिसळ पद्धत अन्‌ दहा मिनिटे जादा वेळ इयत्ता दहावी-बारावीची परीक्षा पारदर्शकपणे पार पडावी, म्हणून यंदा बोर्डाने प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेसाठी भरारी पथके नेमण्याचा निर्णय घेतला आहे. बारावीतील विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा २ फेब्रुवारीपासून तर लेखी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. दहावीची लेखी परीक्षा १ मार्चपासून सुरू होईल.             अनेक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून १०० टक्के निकालासाठी परीक्षेवेळी भरारी पथकांचा अंदाज घेऊन वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे सांगितली जातात ही वस्तुस्थिती आहे. अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची खात्री असलेल्या शाळांमध्येच प्रवेश घेतात अशीही स्थिती आहे. त्यासंदर्भातील तक्रारी बोर्डाकडे प्राप्त झाल्यानंतर यंदा पहिल्यांदाच सरमिसळ पद्धत अवलंबण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. त्यामुळे अनेक शाळांची चिंता वाढली आहे. पण, विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीच्या परीक्षेची चिंता न करता, प्रश्नांचा सराव व नोट्‌स काढून त्याच्या अभ्यासावर भर दिल्यास परीक्षा सोपी जाईल, अ

मुख्य डाक घर येथील आधार केंद्राचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन ; शासकीय शुल्कात मिळणार सेवा

इमेज
 मुख्य डाक घर येथील आधार केंद्राचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन ; शासकीय शुल्कात मिळणार सेवा परळी वैजनाथ (प्रतिनिधी) दि.29 - शहरातील मुख्य डाक घर येथील आधार केंद्राचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन  करण्यात आले आहे.परळी वैजनाथ पोस्ट मास्तर सी.बी.हरदास यांच्या वतीने हे आवाहन करण्यात आले आहे.पोस्ट ऑफीसच्या कार्यालयीन वेळेमध्ये हे आधार केंद्र सुरू राहणार आहे. या आधार दुरुस्ती केंद्रावर नवीन आधार काढणे यासह आधार धारकाचे चे फोटो, नाव,पत्ता,मोबाईल नंबर,इमेल आयडी बदलणे,हाताचे ठसे अद्यावत करणे अशा सर्व सुविधा शासकीय शुल्कामध्ये मिळणार आहेत.परळी परिसरातील जास्तीत जास्त  नागरिकांनी या आधार केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन परळी मुख्य डाक घर याच्या कडून करण्यात आले आहे.

अभिष्टचिंतन: ✍️ सुधीर सांगळे यांचा विशेष लेख >>>>>एक वाल्मिक अण्णा सोबतीला हवाच!

इमेज
  एक वाल्मिक अण्णा सोबतीला हवाच! वाल्मिक बाबुराव कराड अर्थात सर्वांचे लाडके वाल्मिक अण्णा या नावाची बीड जिल्ह्याला आणि मुंबईच्या मंत्रालयाला वेगळी ओळख सांगायची गरज नाही! राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ते अगदी पूर्वाश्रयीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनाही आपल्या उत्कृष्ट नियोजनाची भुरळ पाडणारे वाल्मिक अण्णा, असा एक कार्यकर्ता प्रत्येक मोठ्या नेत्यांसोबत असावा, अशी इच्छा वरील पैकी सर्वांनिच बोलून दाखवली. इतकेच नाही तर काही बड्या नेत्यांनी तर चक्क धनुभाऊंना तुमचे वाल्मिक अण्णा आम्हाला द्या, अशी जाहीर मागणीच केली! या गोष्टी सहज घडत नसतात, त्यामागे अपार कष्ट, मेहनत, वेगवेगळा सोसलेला त्रास, अनेकांचे काढलेले रुसवे फुगवे, त्याग, समर्पण अशा विशेषणांची एक मालिकाच असते.  वाल्मिक अण्णा एखाद्या नामांकित इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला लाजवेल असे सुरेख व अद्वितीय नियोजन सभा-कार्यक्रमांचे करतात. एखादा कार्यक्रम त्यांनी मनावर घेतला तो असा घडतो, की तसा कार्यक्रम पुन्हा होणे नाही, त्यापुढच्या कार्यक्रमात ते मागच्या कार्यक्रम

आरक्षणाच्या लढाईत सुरुवातीपासून मुंडेंचा सहभाग, जरांगे पाटलांच्या आंदोलनातही शिष्टाई

इमेज
  अंबाजोगाईत मराठा समाजाच्या वतीने कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा सत्कार आरक्षणाच्या लढाईत सुरुवातीपासून मुंडेंचा सहभाग, जरांगे पाटलांच्या आंदोलनातही शिष्टाई अंबाजोगाई (दि. 28) - मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईला मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात यश आल्यानंतर आज अंबाजोगाई येथे राज्य सरकारचे प्रतिनिधी व आरक्षणाच्या लढाईतील सक्रिय सहभाग घेतलेले राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा मराठा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.  मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात उभारलेल्या आंदोलनास 26 जानेवारी रोजी मोठे यश प्राप्त झाले. महायुती सरकारने समाजाच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या, त्यामुळे महायुती सरकारचे प्रतिनिधी म्हणून धनंजय मुंडे यांचा सत्कार समाजाच्या वतीने करण्यात आला.  धनंजय मुंडे यांनी राजकीय आयुष्यात सन 1999 पासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने कायम पाठिंबा दिलेला आहे. 2007 साली बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना त्यांनी सर्वात प्रथम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा ठराव मांडून संमत करून घेतला होता.  त्यानंतर देखील विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते असताना स

खा.प्रितम मुंडे यांनी दिव्यांगांना दिला विश्वास

इमेज
दिव्यांगांना शासनाच्या सर्व योजना आणि सुविधांचा लाभ एकाच छताखाली मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील  ;पूर्व तपासणी शिबिरातील पात्र लाभार्थ्यांना केले निःशुल्क साहित्याचे वाटप गेवराई । दि. २८ ।  जन्मतः दिव्यांगत्वाची विशिष्ट शक्ती लाभलेल्या दिव्यांग बांधवांचे जीवन कष्टमुक्त करण्यासाठी शासनातर्फे अनेक योजना राबविल्या जात आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या या योजनांचा लाभ बीड जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना एका छताखाली मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे खा.प्रितमताई मुंडे यांनी सांगितले. गेवराई येथे आयोजित निःशुल्क सहायक साधनांच्या वितरण प्रसंगी त्या बोलत होत्या. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान मार्फत गेवराई तालुक्यातील दिव्यांगांसाठी आयोजित केलेल्या पूर्व तपासणी शिबिरातील पात्र लाभार्थ्यांना खा. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते निःशुल्क सहायक साधनांचे वितरण करण्यात आले. गेवराईचे आमदार लक्ष्मन पवार, जिल्हा परिषदेचे सदस्य पांडुरंग थडके, जेडी शाह, दीपक सुरवसे, शाम कुंड,ज्ञानेश्वर खाडे, गहिनीनाथ पालवे, गणेश मुंडे, निलेश सानप यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लाभार्थी उपस्थित होते. पुढे बोलतान

सर्वांचे सहकार्य व गावकऱ्यांचे योगदान यामुळे पुरस्कार- डॉ. राजाराम मुंडे

इमेज
  आर.आर.(आबा) पाटील सुंदरगाव पुरस्कार:परळी तालुक्याला बहुमान: टोकवाडी ठरली 'स्मार्ट व्हिलेज'  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....          स्वच्छ, सुंदर व विकासाभिमुख गाव म्हणून परळी तालुक्यातील टोकवाडी ग्रामपंचायतचा नावलौकिक आहे. या ग्रामपंचायतीने स्वच्छता अभियानातील जिल्हास्तरावरील व विभागीय स्तरावरील पारितोषिके पटकावलेली आहेत. यामध्ये आता मानाचा तुरा खोवला गेला असून बीड जिल्ह्यात आर.आर .(आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार टोकवाडी ग्रामपंचायतने पटकावला आहे. परळी तालुक्याचा हा बहुमान असून परळी तालुक्यात टोकवाडी हे गाव स्मार्ट व्हिलेज ठरले आहे.            26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शासकीय पातळीवरील विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये आर. आर. (आबा) पाटील सुंदरगाव पुरस्कार (२०२१-२२) परळी तालुक्यातील टोकवाडी ग्रामपंचायतने पटकावला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी स्मार्ट व्हिलेज पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.या पुरस्काराचे स्वरूप 50 लाख रुपये रोख, मानचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे. पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्यासह बीडच्या जिल्ह

गंगथडीचा नायक ते मराठायोद्धा, मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा, मनोज जरांगे यांचा संघर्षमय प्रवास

इमेज
  गंगथडीचा नायक ते मराठायोद्धा, मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा, मनोज जरांगे यांचा संघर्षमय प्रवास मुंबई :  मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वात मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक नवी मुंबईत दाखल झाले आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचे ते चेहरा बनले आहेत. जालन्यातील आंतरवाली सराटीत ३१ ऑगस्टला कुणबी नोंदीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज झाला आणि मनोज जरांगे यांचं नाव मोठ्या पातळीवर प्रकाशझोतात आलं. मनोज जरांगे यांनी सातत्यानं विषय लावून धरत त्यांच्या मागण्या मान्य करुन घेतल्या आहेत. गेल्या पाच महिन्यात मनोज जरांगे यांची ओळख गंगथडीचा नायक ते मराठा योद्धा असा प्रवास झाला आहे. गंगथडीचा नायक ते मराठा योद्धा असा प्रवास मनोज जरांगे पंधरा वर्षांपासून मराठा आरक्षण आणि शेतकरी प्रश्नांवरील छोटी मोठी आंदोलनं त्यांच्या शिवबा संघटनेच्या माध्यमातून करत होते. मराठा आरक्षण आंदोलन जालन्यातील आंतरवाली सराटीत होत असलं तरी मनोज जरांगे यांचं मूळ गाव बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मातोरी हे आहेत. मनोज जरांगे यांना मानणारा मोठा वर्ग अंबड, घनसावंग आणि गेवराई तालुक्यात आहे. या भागातून गोदावरी नदी वाहते. यालाच गंगथडी

महाराष्ट्र ठरला सहा पद्मभूषण तर सहा पद्मश्रींचा मानकरी

इमेज
  महाराष्ट्राला १२ पद्म पुरस्कार जाहीर महाराष्ट्र ठरला सहा पद्मभूषण तर सहा पद्मश्रींचा मानकरी • दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ नेते राम नाईक, संगीतकार प्यारेलाल यांच्यासह सहा जणांना पद्मभूषण पुरस्कार • सामाजिक कार्यकर्ते शंकर बाबा  पापळकर ,  मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे ,  नेत्रतज्ञ मनोहर डोळे  सह सहा मान्यवरांना  पद्मश्री   पुरस्कार नवी दिल्ली, 25 :  सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा आज रात्री उशीरा  करण्यात आली.  प्रसिध्द साहित्यिक होर्मुसजी कामा यांना (साहित्य व शिक्षण-पत्रकारिता) क्षेत्रात, अश्विन मेहता यांना (वैधक), ज्येष्ठ नेते राम नाईक यांना (सार्वजनिक सेवा), दिग्दर्शक राजदत्त आणि प्यारेलाल शर्मा यांना (कला) तर कुंदन व्यास यांना (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता) क्षेत्रात पद्म भूषण यांच्यासह महाराष्ट्रातील अन्य सहा मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणा-या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. गृह मंत्रालयाकडून आज या मानाच्या पद्म पुरस्कारांच

प्रा.डॉ.सिद्धार्थ तायडे यांचा विशेष लेख>>>>>>समाजप्रबोधनकार : भीमयुगकार रानबा गायकवाड

इमेज
  समाजप्रबोधनकार : भीमयुगकार रानबा  गायकवाड २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.  भारतीय संविधान अंगीकृत आणि अधिनियमीत करून स्वीकृत केलेला मंगलमय दिन!याच दिवसाचा आणखी एक विलक्षण योग म्हणजे  समाजप्रबोधनकार साहित्यिक संपादक रानबा गायकवाड यांचा जन्मदिवस.सर्वप्रथम त्यांना जन्मोत्सव निमित्ताने सम्यक मंगलकामना! विश्वरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून आपण लेखणी हाती घेतली .कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पावलांनी पुनीत झालेल्या  रयत शिक्षण संस्था सातारा परिसरात  आपल्या आयुष्याची बांधणी केली.आपण पत्रकारिता क्षेत्राला जरी सेवा दिली असली तरी आपण आपल्यातील साहित्यिक-रंगकर्मी सतत जागा ठेवला. अनेक नाटकांमध्ये आपण अभिनय करुन आपल्यातल्या नटाची साक्ष दिली अनेक नाटकांचे अत्यंत सकस आणि अर्थपूर्ण असे नाटयलेखनही केले आहे. आपल्या सशक्त लेखणीतून साकारलेली आणि प्रतिभावंत  सर्जनशील दिग्दर्शक प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी दिग्दर्शित केलेली 'भीमयुग' ही नाट्यकृती म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीदर्शी विचारांचा नाट्याविष्कार  होय. डॉ.बाबासाहेब

विद्या कुलकर्णी यांना राष्ट्रपती पदक जाहीर

इमेज
  विद्या कुलकर्णी यांना राष्ट्रपती पदक जाहीर सीबीआय च्या जॅाईंट डायरेक्टर विद्या जयंत कुलकर्णी IPS यांना आज उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले. मूळ सोलापूर जिल्ह्यातील तिऱ्हे या छोट्याशा गावातील असलेल्या विद्या कुलकर्णी तसेच पंढरपूर हे आजोळ असलेल्या १९९८ बॅचच्या तामिळनाडू केडर च्या आयपीएस आहेत. तिऱ्हे  च्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेऊन नंतर सांगली वालचंद या प्रतिष्ठित महाविद्यालयातून बीई ( कॉम्प्युटर ) चे शिक्षण घेतले आहे. सध्या त्या सीबीआय च्या जॅाईंट डायरेक्टर ( साऊथ झोन ) पदावर दिल्ली येथे कार्यरत आहेत. धुळे येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता सौ. वर्षा घुगरी यांच्या त्या लहान भगिनी आहेत.

शिस्तबध्द ग्रंथदिंडीने परळीकरांचे लक्ष वेधले!

इमेज
  परळीत कोष्टी समाजाच्या वतीने आयोजित श्री रामलिंग चौंडेश्वरी देवी उत्सवाची थाटात सांगता बाल कीर्तनकार ह.भ.प.गौरी हरेगावकर यांचे कीर्तन;  परळी/संतोष जुजगर-  होमहवण, ग्रंथदिंडी, काल्याचे किर्तन व महाप्रसादाने गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या श्री रामलिंग चौंडेश्वरी देवी देवांग पुराण पारायण  सोहळा मोठ्या थाटा- माटात पार पडला. कोष्टी समाजाने आयोजित केलेल्या  कार्यक्रमांचा परळी व पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घेतला. शिस्तबध्द पध्दतीने निघालेल्या ग्रंथदिंडीकडे परळीकरांचे लक्ष वेधले. लहान मुलांच्या हातातील भगवे पताके , रामलिंग चौंडेश्वरी मातेचा व  रामकुष्ण हरी  चा जयघोषाने परळीनगरी दणाणली होती. टाळ- मृदंग  यामुळे सर्वजण मंञमुग्ध झाले होते.           शहरातील गुरूकृपानगर येथील श्री हनुमान मंदिर येथे दि.25 जानेवारी रोजी रोजी श्री रामलिंग चौंडेश्वरी देवांग पुराण पारायण व मान्यवरांच्या उपस्थीत ग्रथंपुजा करून प्रारंभ करण्यात आला होता. या वेळी मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थीती लाभत होती. पारायण व्यासपीठ प्रमुख म्हणून सौ. सोनाली हरेगांवकर या होत्या.       या सप्ताहाची सांगता दि. 25 जानेवारी 2024 र

आरोग्य हॉस्पिटल व अ‍ॅडव्हान्स्ड लॅप्रोस्कोपी सेंटरचा २६ जानेवारीला शुभारंभ

इमेज
 ना.धनंजय मुंडे,खा.डाॅ.प्रितम मुंडे यांच्या उपस्थितीत आरोग्य हॉस्पिटल व अ‍ॅडव्हान्स्ड लॅप्रोस्कोपी सेंटरचा २६ जानेवारीला शुभारंभ परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... जनरल व लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. संतोष रघुनाथ मुंडे व स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ. प्रज्ञा मुंडे (ढाकणे) यांच्या आरोग्य हॉस्पिटल व अ‍ॅडव्हान्स्ड लॅप्रोस्कोपी सेंटरचा ना.धनंजय मुंडे,खा.डाॅ.प्रितम मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवार, २६ जानेवारी २०२४  सायं.६ वा.होणार आहे.       आरोग्य हॉस्पिटल व अ‍ॅडव्हान्स्ड लॅप्रोस्कोपी सेंटरचा नाथ रोड, कृष्णा टॉकीजच्या बाजुला, नेहरू चौक (तळ), परळी वैजनाथ येथे शुभारंभ करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. अशोक बडे (जिल्हा शल्य चिकित्सक, बीड.), डॉ. उल्हास गंडाळ( जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड.), डॉ. लक्ष्मण मोरे (तालुका आरोग्य अधिकारी, परळी वै.), डॉ. अरूण गुट्टे (वैद्यकीय अधिक्षक, परळी वै.), डॉ. राजेश दरडे (वैष्णवी हॉस्पिटल, लातूर), डॉ. प्रदिप हुशे (जालना हॉस्पिटल, जालना), डॉ. शालिनी कराड (कराड हॉस्पिटल, परळी वै.), डॉ. बालासाहेब कराड (कराड हॉस्पिटल, परळी वै.) , डॉ. ज्ञानेश्व

अभिष्टचिंतन लेख:परळीच्या वैभवात भर घालणारे साहित्यिक रानबा गायकवाड

इमेज
  परळीच्या वैभवात भर घालणारे साहित्यिक रानबा गायकवाड              26 जानेवारी हा दिवस भारतीय इतिहासातला सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. ज्या दिवशी भारताला स्वतःचे सार्वभौमत्व असलेले प्रजासत्ताक राज्य मिळाले. लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य. लोकशाहीच्या मार्गाने जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश म्हणून ओळख निर्माण करणारी, जगातील सर्वात सुंदर लिहिली गेलेली राज्यघटना संविधान निर्माते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला अर्पण केली.  त्या दिवसापासून भारतीय समाज रचनेचा गाडा हा राज्यघटनेच्या मार्फत सुरू झाला. तो ऐतिहासिक दिवस म्हणजे 26 जानेवारी होय.     कायद्यापुढे सर्व समान आहेत. स्वातंत्र्य, बंधूता, समता या महान विचारांची जपणूक करणारी, प्रत्येक भारतीयाला भारत देशा प्रति प्रेम प्रदान करणारी, भारत देशामधील प्रत्येक जाती-धर्माच्या माणसाला स्वतंत्रता बहाल करणारी, प्रत्येक भारतीयाला देश प्रेम शिकवणारी, देशाप्रती देश भावना चेतावणारी राज्यघटना भारताला बाबासाहेबांनी दिली.  या राज्यघटनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेला दिवस म्हणजे 26 जानेवारी. हा भारतीय इतिहासातला सर्वात महत्त्वाचा

स्व . श्यामराव देशमुख स्मृतिसमारोह व्याख्यानमाला

इमेज
  रामायण, महाभारत हे जगाला विवेक व आदर्श चरित्र देणारे ग्रंथ -अभय भंडारी स्व . श्यामराव देशमुख स्मृतिसमारोह व्याख्यानमाला    परळी वैजनाथ दि.२५ (प्रतिनिधी)      रामायण, महाभारत हे जगाला विवेक व आदर्श चरित्र देणारे ग्रंथ असल्याचे प्रतिपादन अभय भंडारी यांनी केले. येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयामध्ये आयोजित श्यामराव देशमुख स्मृती समारोहात अभय भंडारी बोलत होते.        या प्रसंगी कार्यक्रमात अध्यक्ष संजय देशमुख तसेच सचिव रवींद्र देशमुख,कोषाध्यक्ष प्रा प्रसाद देशमुख, संस्थेच्या संचालिका छाया देशमुख, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ विद्या देशपांडे यांची उपस्थिती होती .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख यांनी राम हा केवळ उपासनेचा विषय नसून तो एक विचार,आस्था आणि अस्मिता यांचा विषय असल्याचे सांगितले.  आपल्या अध्यक्षीय मनोगतात कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी मुलींच्या शिक्षणाचा वसा घेऊन श्यामराव देशमुख यांनी या संस्थेची उभारणी केली असे सांगून  महाविद्यालयाच्या जडणघडणीचा मागोवा आपल्या वक्तव्यात घेतला. यावेळी पुढे बोलताना अभय भंडारी यांनी सा

मोठ्या संख्येनं उपस्थित रहाण्याचे मुंडे परिवाराचे आवाहन

इमेज
  राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त तळेगाव येथे ह.भ. प. नाना महाराज कदम यांचे कीर्तन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यातील तळेगाव येथे ऐश्वर्यसंपन्न राष्ट्रीय संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त रामायणाचार्य प्रा. डॉ.ह.भ.प.नाना महाराज कदम यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परळी वैजनाथ पंचक्रोशितील नागरिकांनी कीर्तनास मोठ्या संख्येने उपस्थितीत राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.           राष्ट्रसंत भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा त्रिवेणी समन्वय त्यांनी साधला होता. तो त्यांच्या कीर्तनातही दिसून येई. कीर्तनकार म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आपल्या कीर्तनांतून ते जातिभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत. प्रबोधनकार्यासाठी त्यांनी मराठवाडा, विदर्भ , तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटकातील काही भाग व पश्‍चिम महाराष्ट्रासह उभा महाराष्ट्र पिंजून काढला. विठूनामाचा प्रचार करतानाच त्यांनी समत

शिक्षण माझा वसा' या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी संतोष सुतार यांची निवड

इमेज
  शिक्षण माझा वसा' या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी संतोष सुतार यांची निवड परळी वैजनाथ, शिक्षण विवेक आणि टी. बी. लुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशन, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद शाळा, महानगरपालिका शाळा, नगरपालिका शाळा, खासगी अनुदानित शाळा या शाळातील उपक्रमशील युवा शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी "शिक्षण माझा वसा पुरस्कार २०२४"  या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी एकूण सहा विभागातून नामांकने मागविण्यात आले होते. यामध्ये भाषा, गणित, विज्ञान, कला, तंत्रज्ञान आणि उपक्रमशील मुख्याध्यापक या सहा विभागांचा समावेश असून प्रत्येक विभागातून एका शिक्षकाची या प्रमाणे सहा शिक्षकांची निवड राज्यस्तरीय पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. यामध्ये परळी तालुक्यातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, नागापुर येथील उपक्रमशील  शिक्षक श्री. संतोष अंबादासराव सुतार यानी सादर केलेला नवोपक्रम "मी बुद्धिमान - डिजिटल स्वयं अध्ययनमाला" या उपक्रमाची दखल घेत तंत्रज्ञान या विभागातील पुरस्कारासाठी निवड झाल्याचे अभिनंदन पत्राद्वारे कळविले आहे. या पुरस्काराचे वितरण स. भ. म

वीज वाहक तार अंगावर पडून शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू !

इमेज
  वीज वाहक तार अंगावर पडून शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू !  ------------------------------- माजलगाव, दि.२५ (प्रतिनिधी)तालुक्यातील लोनगाव येथील सबस्टेशनला गेलेली वीज वाहक तर अंगावर पडल्याने जाग्यावरच होरपळून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली निपाणी टाकळी येथे घडली.     याबाबत अधिक माहिती अशी की, माजलगाव तालुक्यातील लोनगाव येथे महावितरण कंपनीचे सबस्टेशन आहे. या सबस्टेशन करिता वीज वाहक तर ही निपाणी टाकळी येथून गेलेली आहे. याच गावातील रहिवाशी बालासाहेब वैजनाथ पांडे (वय ६५ वर्षे) हे त्यांच्या शेतातून दैनदिन काम आटोपून आज दि.२५ गुरुवारी पहाटे घराकडे येत होते. या दरम्यान गावच्या स्मशानभूमी जवळ बालासाहेब पांडे आले असता सबस्टेशन गेलेली मुख्य वीज वाहक तर अंगावर पडली, त्यातच त्यांचा होरपळून मृत्यु झाला. या दुर्देवी घटनेने निपाणी टाकळी सह पंचक्रोशी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महावितरण दुरुस्ती बाबत गंभीर ? --------------------------- माजलगाव तालुक्यात अनेक ठिकाणी वीज वाहक तार, खांब हे धोकादायक परिस्थितीत आहेत. ह्यांच्या दुरुस्ती बाबत शेतकरी, ग्रामस्थ ह्यांच्याकडून तक्रार महावितरणकडे करून दुरुस्त